श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 *

विचारावाचून /

न पाविजे समाधान //१//

*

देह त्रिगुणांचा बांधा /

माझी नाही गुण सुधा //२//

*

देवाचिये चाडे/

देवा द्यावे जे जे घडेल //३//

*

तुका म्हणे होते /

बहु गोमटे उचिते //४//

*

  – संत तुकाराम.

तुक म्हणे

कोणत्याही गोष्टीचा सारसार विचार केल्याशिवाय मनाला समाधान वाटता कामा नये. आपण माझा माझा म्हणतो तो देह त्रिगुणांनी बनलेला आहे . पण त्या देहातले गुणावगुणही माझ्या मालकीचे नाहीत. म्हणून मनात देवाचे भान ठेवून जे काही घडते ते देवालाच अर्पण करावे. त्याच्यामुळे जे काही घडेल ते उचित, देखणे, आणि योग्यच घडेल .

मनात सतत विचार असायलाच हवेत त्याशिवाय मन स्वस्थ रहातच नाही. मला दिसणारा आणि मला माझा वाटणारा देह माझा नाही . त्याची रचना निराळीच आहे .तो पंचमहाभूते व त्रिगुणानी बनलेला असून त्यांच्याशीच कटीबद्ध आहे. मला ज्यांचा अभिमान वाटतो ते गुणही माझे नाहीत. दूस-या कुणीतरी ते गुण माझ्या देहात भरलेले आहेत. हे जेव्हा पक्के आपल्या मनात बसेल तेव्हा जे काही बरेवाईट घडेल ते सारे देह घडवणा-या परमेश्वरालाच अर्पण करावे असे वाटायला हवे. त्या मुळे आपल्याला जे फळ आणि बळ मिळेल ते महत्त्वाचे आणि यथायोग्यच असेल.

 © प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments