श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। आज प्रस्तुत है परम आदरणीय  बाबासाहेब भीमराव आम्बेडकर जी  की जयंती के अवसर पर उनका विशेष आलेख  आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव। 

 

☆ आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव☆

 

सध्या जगभरात कोरोनाने जो हाहाकार माजवला आहे. त्यात जगभरातून लाखांवर बळी गेलेत. एका जागी कधी न थांबणारा माणसाने स्वतःला एका जागी कोंडून ठेवलेय. आणि याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून जगभरातील सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. आणि सगळ्या जगाला कळून चुकले की स्वतःला घरात ठेवण्या शिवाय सध्यातरी पर्याय नाहीये. म्हणूनच लाॅकडाऊनचा पर्याय सध्या प्रभावी मानला जातोय आणि भारताने सुद्धा हाच पर्याय निवडला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 144 देशात लागू आहे. आणि पुर्णपणे संचारबंदी लागू आहे.

अशा परिस्थितीत श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव. वरिल दिवस म्हणजे भारतीय संस्कृती आणि प्रत्येक भारतीयांसाठी सणच. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणे, सामाजिक बंधूत्वाची भावना वाढीस आणून आपापसातील सामाजिक एकोपा निर्मान करणे हा उद्देश असतो. आणि दरवर्षीच जगासाठी ही मिसाल बनून जातो.

पण अशा उत्सव काळात ‘लाॅकडाऊन ‘ सुरू असल्यामूळे एकत्र येऊन उत्सव साजरा करणे धोक्याचे आहे. हे जाणून या वर्षी एकदम आगळं- वेगळं असं ऑनलाइन जयंतीचं उदाहरण भारताने पुन्हा एकदा जगासमोर ठेवले. एकीकडे जगभरात लाखांवर लोक गेली. आणि लाखो ग्रसित असतांना जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर असणारा भारतात मात्र ही संख्या आटोक्यात आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींवर असून सुद्धा काही हजार रूग्ण आहेत म्हणून भारत त्यामानाने सुदैवी आहे. पण गाफील राहुन चालणार नाही. म्हणून विविध उपाययोजना सरकार करतेय. आणि शासनामार्फत खबरदारीसाठी जे काही निर्णय घेण्यात येत आहेत. मग त्यात काही कठोर निर्णयही आहेत. ते अगदी योग्य आहेत. आणि जनतेने त्यांना स्विकार केले आहेत. जनतेचा आणि सरकारचा हा समन्वय खरोखर कौतुकास्पद आहे.

बाबासाहेब नेहमी म्हणायचे की ‘मी प्रथमतः आणि अंतीमतः भारतीय आहे’. वैचारीक पातळीवर विरोध असला तरी. बाबासाहेबांचं वरिल वाक्य आज जनतेने सुद्धा अबाधित ठेवले आहे. आणि आपण किंवा एखादा समुदाय किंवा आपला धर्म याही पेक्षा ‘देश’ मोठा आहे. हे जनतेने आणि शासनाने मिळून सिद्ध केले आहे.

आणि म्हणून या भिम जन्मोत्सवच्या शुभ समयी भारतीय जनतेने एका ठिकाणी न जमता ऑनलाइन पद्धतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. सोशल मिडिया द्वारे विविध स्पर्धा असतील, निबंध लेखन असेल, बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रश्नावली असेल, असे अनेक उपक्रम राबवून हा भिमोउत्सव साजरा केला जातोय. आणि आंबेडकरी जनतेने खरोखर जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

याबद्दल जनजागृतीसाठी शासकीय पातळीवर, आणि इतरही सामाजिक संघटनांमार्फत, राजकीय पक्षांमार्फत आणि जनतेनेही वयक्तीक रित्या जनजागृती करून जयंती घरीच साजरी करायची असे आवाहन केले. त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. कारण प्रत्येकाने निस्वार्थ पणे आपापली जबाबदारी पेलली आहे. सामाजिक एकोपाचे हे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले. आणि हाच एकोपा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचा संकल्प या जयंतीवेळी मी यापुढेही करणार आहे.

असेच सामाजिक बंधूत्व टिकवून ठेवा. घरीच राहा. सुरक्षित राहा. सर्व भारतीयांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

जय भिम जय भारत

 

वंदीतो बाबा तुम्हास मी

होऊनी चरणी नतमस्तक

बीज रूजवले तूम्ही समतेचे

लिहून घटनेचे पुस्तक

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments