सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ काही ‘अलिखित’ नियम… लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हे माहित असेलच पण तरीही….

काही काही नियम हे ‘अलिखित’ असतात. म्हणजे ते कुठे लिखित स्वरूपात, छापील स्वरुपात नसले तरी जगभर शिष्टाचार-स्वरुपात पाळले जातात.

पूर्वीच्या काळच्या झुंजार राजांची, पराक्रमी योद्धयांची जी अश्वारूढ शिल्पं घडवतात, त्यात एक शिष्टाचार पाळला जातो तो असा –

(१) जर का तो योद्धा लढाई लढत असताना, रणांगणावर झुंजताना मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचे पुढचे दोन पाय हवेत दाखवतात.

(२) जर का त्या योद्ध्याला युद्धात जखमा होऊन प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दूर मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचा एकच पाय हवेत असतो असं दाखवतात.

(३) जर तो योद्धा घोड्याच्या बाजूला घोड्याजवळ लगाम धरुन उभा दाखवला असेल, तर त्याचा अर्थ तो योद्धा आणि त्याचा घोडा दोघांना लढाईत मरण आलेलं असतं.

(४) जर तो स्वार असलेल्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर टेकलेले असतील, तर त्याचा अर्थ त्या योद्ध्याला लढाईखेरीज वेगळ्या कारणाने मरण आलेलं असतं.

लेखक : श्री प्रसन्न पेठे

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted