सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ एमिली शेंकल – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
एमिली शेंकल
“ही त्या स्त्रीची कथा आहे, जिने देशासाठी पती गमावला… पण इतिहासानं तिचं नावसुद्धा पुसून टाकलं. “
या आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नी, ज्यांना स्वातंत्र्यानंतर भारतात पाऊल ठेवू दिले गेले नाही. जाणून घ्या का…
ही गोष्ट 1947 पूर्वीची आहे. ही कथा आहे एका जर्मन स्त्रीची – नाव होतं एमिली शेंकल. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, आणि नाही ऐकलं तरी तुमची चूक नाही, कारण इतिहासातून हे नाव जवळजवळ पुसून टाकलं गेलं.
1937 साली एमिली शेंकल यांनी भारतमातेच्या लाडक्या पुत्राशी विवाह केला आणि एका अशा देशाला सासर मानलं ज्याने कधीही या सुनेचं स्वागतच केलं नाही. ना तिच्या आगमनावर मंगलगीत गायलं गेलं, ना तिच्या मुलीच्या जन्मावर आनंद सोहळा झाला. लोकमानसात तिच्या जीवनाविषयी कुठलीच चर्चा झाली नाही.
एकूण सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिला पतीसोबत फक्त तीन वर्षे राहता आलं. त्यानंतर पती देशासाठी लढायला निघून गेले. जाताना एवढंच वचन दिलं – “आधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो, मग उरलेलं आयुष्य आपण सोबत घालवू. ” पण तसं होऊ शकलं नाही. 1945 मध्ये कथित विमान दुर्घटनेत ते बेपत्ता झाले.
तेव्हा एमिली शेंकल अतिशय तरुण होत्या. हवं तर त्या युरोपीय संस्कृतीप्रमाणे दुसरा विवाह करू शकल्या असत्या, पण तसं न करता त्यांनी आयुष्यभर प्रचंड संघर्ष केला. टेलिग्राफ ऑफिसमध्ये एका क्लर्कची छोटीशी नोकरी आणि अत्यल्प वेतन यावर त्यांनी आपल्या मुलीचं संगोपन केलं. ना कुणाकडे तक्रार केली, ना काही मागितलं.
दरम्यान भारत स्वतंत्र झाला होता. एमिलींची इच्छा होती – किमान एकदा तरी त्या देशात जावं, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पतीने प्राण दिले.
पण भारतातील एका राजकीय घराण्याला या एकाच स्त्रीची एवढी भीती वाटत होती की, जिचं स्वागत सन्मानाने करून नागरिकत्व द्यायला हवं होतं, तिला भारताचा व्हिसाही कधी दिला गेला नाही.
अखेरीस कोणत्याही झगमगाटापासून दूर, संघर्षमय आणि साधं जीवन जगत मार्च 1996 मध्ये एमिली शेंकल यांनी गुमनामपणे देह ठेवला.
“इतिहासानं नावं कोरली, पण एका पत्नीचं बलिदान गाळलं. ती होती एमिली शेंकल बोस. “
देशाच्या सर्वात लोकप्रिय नेत्याच्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मपत्नी. पण गांधी-नेहरू घराण्याने कधीच त्यांना या देशात येऊ दिलं नाही.
कारण कदाचित नेहरू परिवाराला ठाऊक होतं – या परदेशी सुनेचं भारतात पाऊल पडलं असतं तर देशाने तिला डोक्यावर उचलून घेतलं असते. त्यांच्यासाठी ही मोठी राजकीय धोक्याची घंटा ठरली असती… आणि कदाचित तसं खरंच झालं असतं.
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





