सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “जगणं ह्यालाच म्हणतात…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆
श्री आलोक सागर यांना शतशः नमन…
IIT दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी, ह्यूस्टन विद्यापीठातून पीएच. डी. , टेक्सास विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केलेले… आणि भारताचे माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांचे एकेकाळचे प्राध्यापक!
पण गेली तब्बल ३२ वर्षं, श्री आलोक सागर यांनी सर्व प्रकारचे सुख-सौख्य, प्रतिष्ठा आणि श्रीमंती दूर सारून, मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आदिवासी भागात राहायला सुरुवात केली आहे — तेही केवळ आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडण्यासाठी.
कोट्यवधींच्या मालमत्तेचे दिल्लीतील मालक असलेल्या श्री सागर यांची आई दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये फिजिक्सची प्राध्यापक होती, वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, आणि लहान भाऊ आजही IIT मध्ये प्राध्यापक आहे.
पण हे सर्व मागे टाकून श्री आलोक सागर संपूर्ण आयुष्य आदिवासी बांधवांसाठी समर्पित करून जगत आहेत. त्यांचे राहणे – एक साधी झोपडी, वेशभूषा – फक्त तीन कुर्ते, आणि परिवहनासाठी – एक सायकल, जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचणार नाही.
अनेक भाषा जाणणारे श्री सागर आदिवासी बांधवांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधतात. त्यांना वाचन, लेखन, शिक्षण देतात आणि पर्यावरण जतनासाठी लाखो फलद्रूप झाडांचे रोपण त्यांनी त्यांच्या माध्यमातून करून घेतले आहे.
गर्द जंगलांमध्ये फिरत, सायकलवरून बिया गोळा करतात आणि त्या बिया आदिवासींना देतात, जेणेकरून ते स्वतःच्या जगण्यासाठी काहीतरी उत्पन्न तयार करू शकतील.
श्री आलोक सागर यांनी पद्म पुरस्कार नाकारला, कारण त्यांना त्याचा मोह नव्हता — त्यांना हवी होती केवळ माणुसकी आणि समाजसेवा.
श्री आलोक सागर यांच्या त्यागमयी जीवनाला व मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम…
“अशा थोर व्यक्तिमत्त्वांमुळेच आजही माणुसकी शिल्लक आहे! ”
लेखक : अज्ञात
सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




