श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२५ ?

☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वावरात या इतके कांदे पिकले होते

जागोजागी त्यांचे डोंगर रचले होते

*

उठाव नाही या कांद्याला काय करावे

कवडीच्या भावातच सारे विकले होते

*

भाग भांडवल सुद्धा वसूल झाले नाही

कास्तकार तर सारे येथे खचले होते

*

डोळ्यांचा हा पहा कालवा झाला त्याच्या

काळजात त्या सारे पाणी मुरले होते

*

अंधाराशी रोज लढाई करता करता

कोसळणारे तारे दिवसा दिसले होते

*

सटवाईने कायम केली त्याची थट्टा

त्याचमुळे का नशीब त्याचे रुसले होते

*

लग्न ठरेना म्हणून त्याने फास घेतला

शेतकऱ्यांचे प्रश्न कधी का सुटले होते

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments