श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ या रंगाला एक्सपायरी नाही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मानवी जीवन विविध कंगोऱ्यांनी बनलेले असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही…

कधीकधी मनुष्याला निर्मम, निर्व्याज, निर्मळ प्रेमाची अनुभूति येते…

कधीकधी एखाद्यावर मनुष्य अकारण प्रेम करू लागतो, तर कधीकधी एखाद्याला अशा अकारण प्रेमाचा लाभ होतो, तो अकृत्रिम स्नेह त्याला अनपेक्षितपणे प्राप्त होतो…

अशावेळी त्या त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेने हास्य विलसते…

अशा अकृत्रिम, निर्मळ हास्याने त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर एक विशेष रंग चढतो…

हा रंग कोणालाही दिसत नाही, पण तो जाणवू शकतो…

ज्याच्या चेहऱ्यावर हा रंग खुलतो, तो मनुष्य तो रंग दिवसभर अनुभवू शकतो…

हा रंग कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही…

तर तो निव्वळ अकृत्रिम स्नेहाचे आणि निर्व्याज प्रेमाने प्राप्त होऊ शकतो…

कारण हा रंग अशी दिव्य अनुभूती घेणाऱ्याच्या मनात तयार होत असतो आणि त्याच्या मनातच साठून राहत असतो…

… त्या रंगाला एक्सपायरी नाही…

हा अनुभव आपण कदाचित कधीतरी घेतला असेल…

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments