संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “मेरा देश बदल रहा है !” ☆ संध्या बेडेकर ☆
काल एका ऑटो रिक्षाच्या मागे अजित दोवाल भारताचे NSA म्हणजे National Security Advisor यांचा फोटो असलेला एक sticker /poster बघीतला खाली लिहिलेले होते.
” My Hero “
अजित दोवाल म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्त्व, विलक्षण बुद्धी, चाणाक्ष चतुर, Risk घेणे व त्यासाठी perfect planning for any operations. हे त्यांच्या स्वभावातच आहे. शत्रुच्या घरात घुसून मारायची हिम्मत ठेवणारे. यांच्या नावानेच थरथर कापतात शत्रू. कोणतेही operation दोवालांच्या नेतृत्वाखाली होणार, असे समजल्यावर दुश्मन तेथेच ढेर होतात.
” Real life Real HERO”
भारताचे जेम्स बॉन्ड आहेत. वयाची पंचाहत्तरी पार केली असली तरी कमालीची बुद्धी व कौशल्य.
मी रिक्षावाल्याला विचारले. हे poster कोणी लावले ??? तेव्हा तो म्हणाला…
मॅडम एक कॉलेज का लडका लगाया ये। मुझे बोला ये सिनेमा के हिरो का poster निकालो। और ये लगाओ। ये असली हिरो है। और उसने ‘दोवाल सहाब ‘के बारे में बहुत जानकारी भी दिया। मैं तुरंत तैयार हो गया। अभी मैं अपनी सवारी को भी poster के बारे में जितना मुझे पता है मैं बताता हूं।
मला त्या मुलाचे तर कौतुक वाटलेच. व या रिक्षावाल्याचे पण. त्याला सुध्दा खरा हिरो कोण??? हे लगेच लक्षात आले. खरी आणि चांगली गोष्ट कोणालाही कळते. फक्त सांगणाऱ्याचे सांगणे दमदार असले पाहिजे. मार्गदर्शन करणारा बरोबर असला, तर गोष्टी पटतात. आणि विचारही बदलतात.
“मेरा देश बदल रहा है “
हे आजकाल ऐकू येणारं वाक्य. देश नक्कीच बदलत आहे. जगाची भारताकडे बघायची नजर बदलली आहे. कोरोनानंतर आपली संस्कृती किती चांगली आहे. हेही जगाला कळले आहे. Hello म्हणत ‘Shake hand ‘ ची जागा आता ‘नमस्ते’ नी घेतली आहे.
देश अचानक बदलत नसतो. तो प्रयत्न करून बदलावा लागतो. ज्या देशात तरूणांची संख्या जास्त आहे, तेथे सर्व शक्यही आहे.
याची सुरुवात प्रत्येकाने करायला हवी. अगदी प्रत्त्येक घरात, शाळेत, नोकरी च्या जागी, प्रसार माध्यमे /मिडिया सर्वांच्या सहकार्याने देश नक्की बदलू शकतो.
सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेवढी चांगली नाही. दिवसभर breaking news च्या नावाने TV वर ओरडून ओरडून त्याच त्याच बातम्या सांगत असतात. शंभरापैकी पहिल्या पन्नास काय त्यापेक्षाही जास्त बातम्या negative असतात. खून, मारामाऱ्या बलात्कार, चोऱ्या, गोळीबार, एकमेकांना शिव्या देणे. मानहानी करणे. हे सर्व बघून/ ऐकुन आपल्या देशात फक्त अशाच गोष्टी घडतात का ????? हेच मनात येत.
आपल्या देशात चांगल्या गोष्टी घडतच नाही का ???? देशात सर्व वाईटच घडत असतं का???
बातम्या मधे जर पहिल्या पन्नास बातम्या चांगल्या सांगितल्या, तर त्याचा प्रभावी परिणामही दिसेल. Freedom of speech चा योग्य, सकारात्मक उपयोग ही करता येतो.
या भोवऱ्यातुन बाहेर पडणे, म्हणजे पहिली कठीण परिक्षा. एकशे चाळीस करोड लोकांचा हा देश आहे. आपल्या देशात काही तरी, कुठे तरी रोजच चांगलं नक्कीच घडत असणार. शंभर बातम्या मधे चांगली बातमी केंव्हा येते आणि जाते कळतही नाही. .
चांगली बातमी काहीही असू शकते. एखाद्या सामान्य माणसाचे असामान्य कार्य.
एखाद्या विद्यार्थ्याने मिळविलेले असामान्य यश. जसे 2020 च्या NEET परिक्षेत ओडीसा च्या Soyeb Aftab व दिल्ली ची आकांक्षा सिंग ने 720/720 असे perfect 720 marks मिळविले.
हरियाणा मधील ‘किरोडी’ नावाच्या एका गावाने एक नवा इतिहास रचला. त्या गावात असलेल्या एकुण २५० पैकी प्रत्त्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली आहे. हरियाणा सारख्या राज्यात उचलेले हे पाऊल खूप कौतुकास्पद, सकारात्मक, आणि अनुकरणीय आहे.
एका सोळा वर्षांच्या Priyavrath Patil नावाच्या मुलाने संस्कृत च्या सर्व महापरिक्षा पास केल्या. He is the youngest ever to pass all exams.
ओडिशा च्या तटावर पृथ्वी ll मिसाइल चे successful परिक्षण झाले. ,
उत्तराखंडची मशरूम queen नावाने प्रसिद्ध ‘दिव्या रावत’ जगभरात आपला व्यवसाय करते. किती तरी लोकांना तिने रोजगार दिला आहे.
BRO ‘ Border Road organisation ने एका वर्षात 54 पूल बांधले.
‘ Breaking news :म्हणून चांगली बातमी पण लोकांना आकर्षित करू शकते.
अशा चांगल्या बातम्या कुठे तरी एका कोपऱ्यात दडून असतात. बहुतेक फक्त बातम्यांचा शंभर आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांचा समावेश होतो. पण पत्नीने प्रिकराच्या मदतीने पतीला मारून, त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले, ही बातमी मात्र आठवडाभर चघळली जाते.
एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची मेहनत discipline, dedication, regular practice त्यांचे training अशा कितीतरी गोष्टी बातम्या मधे चर्चेचे विषय असू शकतात. यांचा परिणाम/ प्रभाव वेगळा पडेल. एक positive उर्जेचा संचार होईल. अशी स्वप्ने बघणाऱ्या अनेक मुलांना दिशा मिळेल.
नवीन पीढीला मार्गदर्शन मिळेल.
तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय वाटतं ?? आपला देश कसा प्रगती करू शकतो?? देशात काय बदल करावासा वाटतो ?? असे प्रश्न तरूण पीढ़ी ला विचारले तर त्यांच्या विचारांना चालना मिळेल. दिशा मिळेल.
विचारांची direction बदलेल..
आणि कौतुक म्हणजे, एवढा मोठा देश सांभाळणारे आमचे माननीय प्रधानमंत्रीना हे सर्व माहिती असतं. आपल्या मन की बात कार्यक्रमात ते अशा सर्व गोष्टींचा उल्लेख न विसरता आवर्जुन करतात. व त्या सर्वांचे अभिनंदन ही करतात.
कोणता देश किती श्रीमंत आहे ???? हे त्या देशाची प्राकृतिक संपदा, व त्या देशातील जनतेचे आचार विचार, संस्कृती, सवयी, त्यांचे देशप्रेम यावर अवलंबून असते.
देश सर्वोपरी आहे ही भावना असली तर सर्व सहज शक्य आहे.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





