? वाचताना वेचलेले ?

☆ लग्नविधीमध्ये दडलंय काय? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

१) लग्नात मांडव कशासाठी ???

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी?

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !

३) नवरदेवाची कानपिळी वधूच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी?

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !

४) मुलीच्या मागं मामाच उभा राहतो,हे कशासाठी?

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !

५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी?

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी !

६) लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी???

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं ही केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !

७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी?

= तांदळाची अक्षता याच्या साठी की तांदळाचे बीज लावताना आपण एका जागी लावतो.ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते. तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात *

पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments