सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ आज दिवाळी पाडवा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

साडेतीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्त•••

बलिप्रतिपदा•••

मुख्यत: पती-पत्नी नाते अधिक दृढ करण्याचा दिवस•••

व्यापारी नव वर्ष सुरुवात•••

आपल्या चांगल्या कृतीचा चांगल्या भावनांचा देवालाही हेवा वाटो ईतके चांगले वागण्याचा प्रयत्न तरी करायला हवा ना? पाताळात जाऊनही एक दिवस का होईना पण भूलोकातील आपल्या प्रजेला भेटण्याचे भाग्य ज्याला मिळाले असे बळीराजाचे भाग्य सकल पुरुषांना मिळो म्हणून सर्व स्त्रियांनी केलेली प्रार्थना पतीची उदंड आयुष्याची कामना आणि यमानेही परत जावे म्हणून केलेले औक्षण•••

व्यापारी लोकांनी नव्या वहीत सरस्वती गणपती काढून केलेली पूजा आणि त्या दिवसापासून नव्याने हिशेब मांडण्याला सुरूवात•••

आपल्या आयुष्याचे सगळेच हिशेब आपल्यालाच मांडायचे असतात. जुने हिशेब पुसून जुने हेवेदावे विसरून नात्यांचे नवे हिशेब सुरू केले ना की सुखी जीवनाचे गणित बरोबर सुटते. म्हणूनच आज पासून प्रामुख्याने पती पत्नी नात्यातील रुसवे फुगवे दूर करून नवीन प्रेमाने सुरूवात केली की बाकीची सगळी नाती फुलाप्रमाणे आपोआप बहरातात.

पूर्वी फक्त बायकोने नवर्‍यालाच तेल लावून औक्षण करावे असे नव्हते तर••• आईने मुलाला, भावजयने दिराला, काकूने पुतण्याला, मामीने भाच्याला अशा अनेक नात्यांनाही दृढ केले जायचे. खर्‍या अर्थाने सण नात्यांचा साजरा करून संस्कृती जपली जायची. त्यामुळे स्त्रीचा मान सन्मान आपोआप व्हायचा

आज समाजातील प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलणे गरजेचे असल्याने सगळ्या स्त्रियांना आदराचे स्थान मिळून त्यांच्याशी असलेल्या सामाजिक नात्याचे स्मरण आज करून दिवाळीचा पाडवा/ बलीप्रतिपदा/ व्यापारी नव वर्षाची सुरुवात करताना या दिवसाच्या सगळ्यांनाच मंगलमय शुभेच्छा !!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted