प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत चार युगे उलटली महिला आहे, म्हणूनच जग आहे. हे खरं आहे, जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हापासून पूजनीय वाटू लागली? पूर्वी ती पूजनीय नव्हती का? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा, नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ) आला बुवा?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का? पूर्वी इतकी स्त्री पूज्यनीय आता आहे असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पूर्वी जेवढी स्त्री पुजनीय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः—– ह्या विधानात सर्व काही आले व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्षात ठेवा. बस म्हटले की बसणारी, उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय?

हल्ली काळानुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे. गरज शोधाची जननी! काळ बदलला, नारी घरा बाहेर पडली. कारण परिस्थितीच तशी चालून आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणून, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोर गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषार्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागचा चुल, मुलं, बाळंतपण, पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच व त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पूर्वीच्या काळातही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांडणच काय? घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीचे धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभते त्या विकून घरार्थ चालवीत. अजूनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्याच!

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की. नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषां बरोबरीने अंग मेहनत करत. त्या अर्थार्जन करत होत्या! ! !

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मान पानच, किंवा गौरव च होतो ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चन्नांमा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीकच होती ना?

काळ बदलला, आस्थापना, कार्यशैली बदलली. युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला.

तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार, बलात्कार, गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्षा नारी सुरक्षित नाहीं कारण स्पष्टच. चित्रपट टेलीव्हिजनवर येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे. पूर्वीही संघटीत होत्या. नाही असे नाही. तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted