श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “कर्मा रिटर्न्स…” – लेखक : श्री केदार सोमण ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
आजकाल खूपवेळा वाचायला मिळते की “कर्मा is बिच”
“कर्मा रिटर्न्स”
आपल्याकडे सुद्धा म्हण आहे…. पेरावे तसे उगवते, किंवा करावे तसे भरावे.
पण हे अर्धसत्य वाटते मला, जगात वावरताना अनुभव घेताना, वरील म्हणींचा प्रत्यय नेहमी येतोच सर्वांना, असे नाही वाटत.
कितीतरी, सुस्वभावी, पापभिरू संकटात लोकांना मदत करणारी माणसे, दुर्दैवाचे दशावतार अनुभवताना दिसतात.
कित्येक फ्रॉड लोक, लोभी व्यक्ती कित्येक लाखो कोटींचे घोटाळे करून, मस्त जगत असतात.
आणि कितीतरी साधीसरळ माणसे स्वतःच्या मुलांना पैश्याअभावी उच्चशिक्षण सुद्धा देऊ शकत नाहीत.
किंवा घरात कोणीतरी असाध्य रोगाने आजारी असते, कोणाचे एकुलत्याएक अपत्याचा अकाली मृत्य होतो.
असे काय मोठे कुकर्म केलेले असते की त्यांना पुत्रवियोगाचे जगातील सर्वात मोठे दुःख भोगावे लागते?
मला स्वतःला तरी असे वाटते, नियतीला चांगलं वाईट असे काहीही कळत नाही.
विजे सारखी ती कधी कोणावर कोसळून उध्वस्त करेल आयुष्य, हे सांगू शकत नाही.
मी माणुसकीने वागतोय कारण मग माझ्यापण वाट्याला चांगली वागणूक येईल, असा विचार करत जगणे हे फोल आहे.
आपण माणुसकीने वागावे कारण ते केल्याने मला समाधान लाभते. मला स्वतःची लाज वाटणार नाही. इतकेच फक्त असावे.
या लहरी नियतीच्या फटकाऱ्याला, आपण सगळेच मनातून घाबरत असतो, ती सुप्त भीती प्रत्येकाच्या मनात असते.
ह्या सुप्तभीतीला जो व्यवस्थित सांभाळू शकला, त्याचे आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी असते.
ही मनातील सुप्तभीती, हेच उगमस्थान आहे देवाचे, भक्तीचे, श्रद्धेचे.
मन सुदृढ करण्याचे अनेक मार्ग म्हणजे हे सर्व.
आणि ज्याला स्वतःचे मन सुदृढ करण्यात यश आले, तो सुखी.
#असेच_एक_मुक्तचिंतन…
★★★
लेखक : श्री केदार सोमण
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




