श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ मित्र… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
मैत्री केली तर
गरज पाहू नका,
आणि मदत केली तर
ती बोलून दाखवू नका.
कारण कोणत्याही
बाटलीचा सील,
आणि दोस्तांचा दिल
एकदा तोडला की
विषय संपला.
मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपते पण
सवय कधीच सुटत नाही.
‘मित्र’ नावाची ही दैवी देणगी
जिवापाड जपून ठेवा,
कारण.. जीवनांतील
अर्धा गोडवा हा
मित्रांमुळेच असतो.
कोणीतरी विचारले
“मित्रांमध्ये एवढे काय विशेष
नातेवाईकांपेक्षा? “
त्यांना सांगितले,
“मित्र हे फक्त मित्र असतात.
त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र
असं काही नसतं.
ते ‘थेट’ मित्रच असतात. “
मैत्रीचे धागे हे
कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही
बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहूनही
मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातानेही
तुटणार नाहीत.
प्रत्येक दुखण्यावर
दवाखान्यात उपचार
होतातच असे नाही.
काही दुखणी
कुटुंब आणि मित्र मंडळी
यांच्या बरोबर हसण्या आणि
खिदळण्यानेही बरी होतात.
माणसाने
कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात ‘सावली’
म्हातारपणात ‘शरीर’
आणि..
आयुष्याच्या
शेवटच्या काळात ‘पैसा’
कधीच साथ देत नाहीत.
साथ देतात ती
फक्त आपण जोडलेले
जवळचे मित्र.
मित्र बोलवत आहे,
पण तुम्हाला जावेसे
वाटत नसेल तर..
समजा की तुम्ही म्हातारे झालात.
म्हातारपण येऊ न देणे
आपल्या हातातच आहे ना!
मित्रांसोबत राहा
व आनंदात
जीवन भर जगत राहा.
☆
कवि : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






