सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी  मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं।  उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है  सौ. सुजाता काळे जी  द्वारा  प्रकृति के आँचल में लिखी हुई एक अतिसुन्दर भावप्रवण  मराठी कविता  “तेव्हा तुझी आठवण येते…”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 29 ☆

☆ तेव्हा तुझी आठवण येते… ☆

 

मी रानोमाळ भटकते

दऱ्या डोंगरातून फिरते

पायवाटेवर भरगच्च बहरलेली

रानफुले खांदयांशी लगडतात

उंच उंच गवताचे पाते

गालावर टिचकी मारते

तेव्हा तुझी आठवण येते

वाऱ्याची अल्लड झुळूक

कपाळावरील बटांना

अलगद उडवते

नाजुक रंगीत फुलपाखरू

खांदयावर हात ठेवते

अलगद हृदय उलगडते

तेव्हा तुझी आठवण येते

क्षितिजापाशी सूर्य

पाऊलखुणा सोडतो

अंधारतो काळोख अन्

झोंबतो गार वारा

अंगावर येतो शहारा

तेव्हा तुझी आठवण येते

 

© सुजाता काले

पंचगनी, महाराष्ट्रा।

9975577684

sujata.kale23@gmail.com

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments