श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ भावसमुद्र... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
ओठाच्या किनारी विरघळून गेले सोबती
डोळ्याच्या नभातले ओघळलेले मोती.
*
मनाच्या घनांत आठवणींचे वादळ
कधी वचनांच्या विजांचे भय भोवती.
*
सजवून जीवनास विश्वासाचा ऋतू
धोकाच झाला हृदयसृष्टीचे हयाती.
*
अखेर शब्दांची समजूत एक सत्य
काव्यानी निभावले वैफल्याच्या त्या राती.
*
लाटा क्षणांच्या पार करती सल कुठे
काठावरचे स्वर सुखावे व्यथा गाती.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




