सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आक्रोश…..(कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मातीवरचा आक्रोश आता,

आकाशात पण नाही मावत !

बातमी केवढा आघात करते,

“आता नाहीत बिपिन रावत !”

 

नुसतंच शौर्य नव्हते रावत,

तिन्ही दलात समन्वय !

किती वीर रोज जातात,

तरी होत नाही सवय !

 

दर दिवशीच एकेक तारा,

उल्का होऊन पडत आहे !

खरंच गळ्यात हुंदका म्हणून,

एकेक घास अडत आहे !

 

शौर्य तिथेच घात असतो,

गांडुळं काय फिरतात कमी?

त्याना गाठू शकेन अशी,

यमालाही नसते हमी !

 

उंचावरती जाणंच सांगतं,

इंचा-इंचावरती धोके !

लोणी खावून जमिनीवरती,

खादीत निर्धोक,खादाड बोके !

 

चालती बोलती तटबंदीच ही,

“भारत-गड” सुखरुप ठेवते !

हुतात्म्यांच्या माळेमधे,

आपल्या सर्वस्वालाच ओवते !

 

काळालाही हेवा वाटतो,

म्हणून दगा हवेत देतो !

साक्षात् देव आसन सोडून,

असे वीर कवेत घेतो !

 

असह्य नि असहाय म्हणजे,

काय याचा अनुभव क्रूर !

पापणी सोडून एकेक थेंब,

त्यांच्यासोबत चाललाय दूर !

 

 -प्रमोद जोशी.देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments