मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ ) इथून पुढे —– 

राजारामच्या वागण्या-बोलण्यातला मनापासूनचा आपलेपणा खरंतर रत्नालाही खूप आवडतो… तिलाही तो जवळचा वाटतो. त्याच्या भेटीचा तो एक प्रसंग तर तिच्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरला आहे… म्हणजे जेव्हा राजाराम आम्हाला शिर्डीमध्ये अगदी अचानक भेटला होता, तो प्रसंग… मी गाडी घेतल्यानंतरच्या लगेचच्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब शिर्डीला गेलो होतो. तिथे आम्हाला राजाराम आणि रेणुकावहिनी अगदी अनपेक्षितपणे भेटले. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच प्रसाद घेतला… दोन तीन तास एकत्रच होतो आम्ही. निघायची वेळ झाली तेव्हा मी माझ्या मुलांना त्या दोघांच्याही पाया पडायला सांगितलं. आणि फक्त दोन्ही मुलांनीच नाही, तर रत्नानेही त्या दोघांना वाकून नमस्कार केला. ते पाहून राजारामला खूपच भरून आलं होतं… डोळेही पाणावले होते त्याचे… माझ्याशी तर बोलूही शकला नव्हता तो. पण हात जोडून रत्नाला म्हणाला होता… ‘‘ वहिनी, मी तुमच्यापेक्षा फक्त वयाने मोठा आहे. बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही दोघे माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. मी तुमचा ‘ सुदामा ’ आहे असं समजून माझी कायम आठवण ठेवा…” त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण त्यानंतर जेव्हा-केव्हा त्याची आठवण काढली जाते, तेव्हा रत्ना राजारामविषयी ‘सुदामा’ या नावानेच बोलत असते—-

श्री भगवान वैद्य प्रखर

राजाराम झोपून उठल्यावर मी आमच्यासाठी चहा टाकला. तेवढ्यात तो तयार होऊन आला.. चहा घेता घेता त्याने विचारलं… ‘‘ रिटायर झाल्यावर दिले जातात, ते सगळे पैसे मिळाले असतील ना तुला? ”… राजारामने एक खडा टाकून पाहिला … पाणी किती खोल आहे याचा अंदाज घेत होता बहुतेक तो… ‘‘ हो… थोडे फार मिळाले… पण अजून बरेच मिळायचे बाकी आहेत… सरकारी काम आहे बाबा… आणि ते कधीच सहजपणे होत नाही, हे तर जाहीर आहे.”… मी पण त्याला माझ्याकडच्या पैश्यांचा थांगपत्ता लागू दिला नाही. 

‘‘ आणि रत्नावहिनींची नोकरी व्यवस्थित चालली आहे ना? ”– हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे, असंच मला वाटून गेलं.

‘‘ ठीक चालली आहे असंच म्हणायला हवं… दोन-दोन महिन्यांचा , कधी कधी तर तीन तीन महिन्यांचाही पगार दिला जात नाही तिच्या ऑफिसकडून…” … वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा आधार घेऊन मी सारखं त्याच्याशी चक्क खोटं बोलत होतो. तो आणि मी काही वेळ जणू एक अनामिक खेळ खेळत होतो… ज्यात मी होतो फळांनी लगडलेला एक वृक्ष… आणि राजाराम होता एक लहानसा निष्पाप मुलगा… जो अतिशय साध्या-सरळ मनाने बाण मारत राहिला होता आणि वृक्ष मात्र अतिशय हुशारीने आपली फळं वाचवत राहिला होता. 

पाच वाजायच्या जरासं आधीच मी राजारामला घेऊन बस-स्टँडवर पोहोचलोही होतो. बस अजून लागली नव्हती. राजारामला तिथेच थांबायला सांगून, मी त्याच्यासाठी पान आणायला गेलो. परत येईपर्यंत बस लागलेली होती. राजाराम बसमध्ये चढतच होता, इतक्यात रत्ना जवळजवळ पळतच बसपाशी आली. 

‘‘ वहिनी तुम्ही?… अहो इतकी धावपळ करत इतक्या लांब यायची काय गरज होती…”

‘‘ गरज होती दादा. खरं तर सुधाच्या लग्नासाठी आम्ही रामटेकला यायलाच हवं होतं. पण तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे मला. भावाच्या घरीही त्याला मदत करायला कुणी नाहीये. त्यामुळे आम्हा दोघांनाही काही दिवस आधीच त्याच्याकडे जावं लागणार आहे… हे घ्या.. सुधाच्या लग्नानिमित्त आमच्याकडून भेट…” तिने राजारामच्या हातात एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवली… ‘‘ रेणुकाताईंना म्हणावं की लग्नात ही साडी नेसायची. हा रंग अगदी खुलून दिसेल त्यांना… आणि त्याच पिशवीत शर्ट-पॅन्टचं कापडही आहे… तुमच्यासाठी.. अजून लग्नाला थोडे दिवस आहेत. गेल्या गेल्या शिवायला टाका.” 

‘‘ वहिनी उगीचच इतका खर्च कशाला केलात? तुम्ही दोघं लग्नाला आला असतात तर वेगळी गोष्ट होती.” 

‘‘असू दे हो… आणि रेणुकाताईंना ही चिठ्ठी द्या.”… पर्समधून एक पाकिट काढून तिने राजारामला दिलं… ‘‘ नीट सांभाळून ठेवा हं खिशात. वधू-वरांना आमचा आशिर्वाद सांगा, आणि लग्न पार पडल्यावर रेणुकावहिनींना घेऊन चार-आठ दिवस रहायलाच या आमच्याकडे… नक्की या.” 

…. एवढ्यात कंडक्टरने घंटा वाजवली आणि राजाराम जाऊन त्याच्या सीटवर बसला. रत्ना आणि मी आपापल्या स्कूटरवरून घरी आलो. मला घर एकदम सुनंसुनं वाटायला लागलं… हि-या-मोत्यांनी भरलेली नौका समुद्रात अचानक दिसेनाशी झाल्यावर दु:ख.. निराशा दाटून यावी… तशाच दु:खात… तशाच निराशेत मी जणू बुडून चाललो होतो. माझी मन:स्थिती रत्नाला बहुदा नेमकी कळली होती… ‘‘चला, चहा घेऊया.” 

‘‘ नको… आत्ता नको… नंतर घेऊ या….  बिचारा राजाराम… त्याला मी वीस हजार देईन या आशेने आला होता. त्याची एकूण परिस्थिती पाहून वाटलंही होतं… द्यावेत म्हणून…”

‘‘ मग का नाही दिलेत? त्याला वीस हजार देऊन टाकले तर आपण कंगाल होऊ असं  वाटलं होतं का तुम्हाला? अहो जन्मभराची तुमची मैत्री… वीस हजार रूपये त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले का तुम्हाला? घरातले दोघं दोघं नोकरी करत असतांना सुद्धा, एखाद्या मित्राला त्याच्या गरजेच्या वेळी जर ते उपयोगी पडू शकले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातली अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही… जाऊ दे आता. आणि ऐका… आता असे हताश होऊ नका… मी एकवीस हजार रूपयांचा बँक ड्राफ्ट काढून तुमच्या ‘सुदामा’ च्या हवाली केला आहे. त्या पाकिटात तो ड्राफ्टच होता. आणि म्हणूनच तो नीट सांभाळून न्यायला सांगत होते त्यांना……  आता चालेल ना चहा?” … असं म्हणत रत्ना चहा करण्यासाठी आत निघून गेली… 

आणि मी विचार करत राहिलो… ‘आज रत्नाने किती सहजपणे मला “ द्वारकाधीश “ बनवून टाकलं आहे’……..  

— समाप्त —

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला…) इथून पुढे —–

‘‘ मनोहर, आत्ता मी जिची लग्नपत्रिका द्यायला आलोय् ना, ती माझी तीन नंबरची मुलगी… सुधा… म्हणजे माझी शेवटची जबाबदारी…” 

‘‘ अरे पण तुला तर चार मुली आहेत ना?” 

‘‘ हो. पण चौथ्या मुलीचं लग्न दोन वर्षांपूर्वीच झालं. मी आमंत्रण पाठवलं होतं की तुला. अर्थात् तुला ते मिळालं की नाही कोण जाणे. असो.  काय आहे… सुधाचा डावा हात लहान आणि कमजोर आहे. या अपंगत्वामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे धाकटीचं लग्न आधी करून टाकलं. मुलाने तर पाच वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केलाय्… स्वास्थ्य केंद्रातल्या एका नर्सशी… आणि तेव्हापासून तो वेगळाच रहातोय्. या सुधासाठी स्थळ शोधणं फारच अवघड झालं होतं रे…”

‘‘ तिचा हा होणारा नवरा काय करतो?”

‘‘ मी टायपिस्ट म्हणून मँगेनीजच्या खाणीत काम करायचो ना, तिथे विष्णू नावाचा एक चपराशी होता. मी रिटायर होण्याच्या सहा महिने आधी एका दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी अनुकंपा-तत्त्वावर त्याच्या या मुलाला नोकरी मिळाली. त्याचाही डावा पाय पोलिओमुळे निरूपयोगी झालाय्… डाव्या पायाने लंगडाच झालाय् म्हण ना. दहावी पास आहे.” 

‘‘ थोडा भात घे ना अजून…” काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं मला. 

श्री भगवान वैद्य प्रखर

‘‘ नको नको… खूप जेवलो आज… किती दिवसांनी इतकं चांगलं जेवण झालंय् ते काय सांगू तुला?… या लग्नात हुंडा म्हणून साठ हजार रूपये द्यायचे ठरलेत. इकडून-तिकडून चाळीस हजारांची सोय झालीये. तरी अजून वीस हजारांची सोय करायला हवी. त्यासाठी ठोठावता येईल असं एकही दार उरलेलं नाहीये आता. लग्न अठ्ठावीस तारखेला आहे… आणि आज अठरा तारीख… असो… तू आता रिटायर झाला आहेस ना… आत्तापर्यंत एकाही लग्नाला आला नाहीस… पण या लग्नाला नक्कीच येऊ शकतोस. रेणुका… माझी बायको… म्हणत होती की, ‘‘ तुमचा हा मित्र म्हणजे मोठी आसामी आहे… स्वत: जाऊन निमंत्रण दिलंत तरच येतील ते. म्हणून आलो आहे…” ‘अन्न दाता सुखी भव’… असं म्हणत राजाराम हात धुवायला गेला. 

तो उठून गेल्यावर मला खरंच जरा हायसं वाटलं. माझ्या मनातल्या मनात विचाराचा जणू एक दिवा लागला, ज्याच्या प्रकाशात, राजारामने स्वत: मला निमंत्रण पत्रिका द्यायला येण्यामागचं ‘रहस्य’ मला उलगडल्यासारखं मला वाटलं… आणि माझ्या मनातल्या आमच्या मित्रत्वाच्या सरोवरात आजपर्यंत ज्या निर्मळ मैत्रीचे तरंग सतत उठत होते, त्या जागी आता जणू वाळूच्या लाटा उमटू लागल्या आहेत असं मला वाटून गेलं. मी डायनिंग टेबल आवरलं. राजाराम हात पुसत परत माझ्या जवळ येऊन उभा राहिला… 

‘‘ साडेपाचच्या बसचं रिझर्वेशन आहे बरं का रे माझं… पाच वाजता तरी निघावं लागेल मला…” राजाराम मोकळेपणाने म्हणाला… मनावरचं कुठलं तरी ओझं उतरल्यावर जाणवतो तो मोकळेपणा मला त्याच्या बोलण्यात जाणवला. 

‘‘अरे आजच्या दिवस थांब की. उद्या सकाळी जा. साडे-सहा सात वाजेपर्यंत रत्ना येईलच ऑफिसमधून… मग मस्त गप्पा मारू तिघं जण. अजून पुरेशा गप्पा तरी कुठे मारल्यात आपण…” असं म्हणतांना मला मनापासून सारखं जाणवत होतं हे की ते सगळं मी अगदी वरवरचं… औपचारिकपणे बोलत होतो… माझ्या मनातले मैत्रीचे धागे कमकुवत झाल्याचं माझं मलाच जाणवत होतं. 

‘‘ नको रे… आणि रत्नावहिनींशी सकाळीच चांगल्या दोन तास गप्पा मारल्या आहेत मी. त्यांनी हे ही मला सांगितलंय् की त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्नही नेमकं २८ तारखेलाच आहे. त्यामुळे सुधाच्या लग्नाला तुम्ही दोघं येऊ शकणार नाही, हे समजलंय् मला. आणि अरे मलाही तर खूप गप्पा मारायच्या आहेत की तुझ्याशी… आता हे लग्न एकदा पार पडलं की खास तेवढ्यासाठीच येईन तुझ्याकडे आणि चांगला आठवडाभर राहीन बघ… त्यावेळी मग मला जे जे माहिती नाहीये ते तू मला सांग… आणि तुला जे माहिती नाही, ते सगळं मी तुला सांगेन… काय?”

‘‘ पण आता थोडावेळ तरी आराम कर बाबा. मी तुला स्टँडवर पोहोचवायला येईन.”… आणि राजाराम जरासा म्हणून आडवा झाला आणि घोरायलाही लागला. मीही आडवा झालो. 

पण काही केल्या मला झोप लागेना… माझं मन तर माझ्याही  नकळत थेट रामटेकात पोहोचलं होतं… राजाराम हा तिथला माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. म्हणजे तसा तीन वर्षं पुढे होता तो माझ्या… मॅट्रिक झाल्यावर त्याने टायपिंगच्या परिक्षा दिल्या. आणि त्यानंतर रामटेकपासून दहा कि.मी. लांब असलेल्या मँगेनीजच्या खाणीत नोकरीला लागला… आधी रोजंदारीवर टाइम-कीपर म्हणून लागला होता, आणि सहा महिन्यांनी तिथेच टायपिस्ट म्हणून काम करायला लागला. मी मॅट्रिक झाल्यावर जेव्हा नोकरी शोधायला लागलो, तेव्हा राजाराम हा त्याबाबतीतला एकमेव मार्गदर्शक होता माझा … तोच माझ्या सगळ्या सर्टिफिकेटसच्या टाइप करून कॉपीज् काढायचा… खाणीतल्याच सरकारी लेबर ऑफिसरकडून वेळोवेळी त्या प्रमाणित करून घेऊन मला द्यायचा… त्या सगळ्या कामाची जबाबदारी त्याचीच आहे, असं मानणारा राजाराम… ‘With due respect and humble submission, I beg to state’’… अशासारखी सुरूवात करत मोठे मोठे अर्ज माझ्यासाठी स्वत: लिहूनही काढणारा…. पाठवायची घाई असेल तर स्वत:चे पैसे खर्च करून, पोस्टाची तिकिटं आणून लावून, अर्जांची ती पाकिटं कितीतरी ठिकाणी स्वत: पाठवणारा राजाराम… मला पहिली नोकरी मिळाल्याचं कळताच आनंदाने वेडा झालेला… स्वत:च्या खर्चाने पेढे वाटणारा राजाराम…. आई-वडील… बहिण…भाऊ… यांच्या प्रेमाखातर, गावाच्या जवळच असणा-या त्या खाणीत, तसली ती साधारण नोकरी करतच आयुष्य घालवलेला राजाराम… साहजिकच… कुठल्याही प्रगती विना, जसा होता तसाच राहिला. मी मात्र नोक-या बदलत राहिलो… त्या अनुषंगाने गावं बदलत राहिलो… राज्यही बदलत राहिलो. पण माझा हा बालमित्र राजाराम… त्याला मात्र मी कधीच विसरू शकलो नाही. त्यामुळेच त्याच्याबरोबर लहानपणी काढलेले, आणि माझ्या मॅट्रिकच्या सर्टिफिकेटसोबत कपाटात अगदी जपून ठेवलेले आमच्या दोघांचे फोटो, म्हणजे माझ्या मुलांसाठी मोठाच कुतूहलाचा विषय असायचा . त्याच्याबद्दल मी सतत इतका बोलायचो ना… त्या ‘टेपस्’… मी रत्नाला कितीवेळा ऐकवल्या असतील कोण जाणे ! आता तर जेव्हा जेव्हा राजारामचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा… ‘अख्ख्या गावात हा एकच मित्र होता का तुम्हाला… राजाराम नावाचा?’ असा टोमणा मारल्याशिवाय रहात नाही ती आणि मला कळत नाही आता कसा सांगू तिला की ‘अगं… आयुष्याच्या सुरूवातीपासूनच्या ते आत्तापर्यंतच्या या प्रवासात, वादळवा-याच्या तडाख्याने मातीच्या किती छोट्या-मोठ्या टेकड्या-डोंगर आपलं अस्तित्वच गमावून बसतात ते… त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ 

– क्रमशः भाग दुसरा. 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 1 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 1 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

गेटला कुलूप असलेलं पाहून माझी नजर आपोआपच मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. अकरा वाजत आले होते. म्हणजे रत्ना ऑफिसला जायला निघालीही होती. मी बॅगेतून किल्ल्यांचा जुडगा काढला, आणि गेटचं कुलूप उघडलं. अंगणात गेल्यागेल्याच माझं लक्ष सहज त्या कोप-याकडे गेलं, जिथे रत्नाची कायनेटिक ठेवलेली असते. कोपरा रिकामा होता ते पाहून रत्ना घरातून निघाली असल्याची खात्रीच पटली. मी घराच्या दाराचं कुलूप काढून बैठकीच्या खोलीत गेलो. समोरच्या टी-पॉयवर एक चिठ्ठी ठेवलेली बघताच, मी झटकन् ती चिठ्ठी उचलली आणि वाचायला लागलो. रत्नाने लिहिलं होतं… ‘‘ तुम्ही लायब्ररीत गेल्यावर थोड्या वेळातच तुमचे बालमित्र ‘सुदामा’ घरी आले होते. याच महिन्यात अठ्ठावीस तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्याचं आमंत्रण द्यायला आले आहेत. आज संध्याकाळच्या साडेपाचच्या बसचं परतीचं रिझर्व्हेशनही करून आले आहेत. मी तुमच्या दोघांचा स्वयंपाक करून ठेवला आहे. त्यांचे एक परिचित माझ्या ऑफिसजवळच राहतात. त्यांना आमंत्रण देण्यासाठी ते माझ्याबरोबरच आले आहेत. येतांना रिक्षाने येतील. दुपारी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला रजा घेणे शक्य नव्हते. तरीही ऑफिस सुटल्यावर थेट स्टँडवर येण्याचा प्रयत्न करते. मागे कधीतरी तुम्ही मला सांगितलं होतंत की तुमच्या या बालमित्राला खीर खूप आवडते म्हणून… मी खीर करून ठेवली आहे. दोघं मिळून सगळी संपवून टाका बरं का. मी माझ्यासाठी डब्यात घेऊन आले आहे.” 

श्री भगवान वैद्य प्रखर

चिठ्ठी वाचून टी पॉयवर ठेवता ठेवता माझं लक्ष टी.व्ही. जवळ ठेवलेल्या हॅन्डबॅगकडे गेलं. मी सहजच जवळ जाऊन पाहिलं… ती बॅग एखाद्या घराची छोटी प्रतिकृती आहे असंच वाटून गेलं मला… भिंतीवरचं प्लॅस्टर कितीतरी ठिकाणी निखळल्यावर कसं दिसतं… तशीच दिसत होती ती बॅग. तिच्या एका कोप-यात एक कागद चिकटवलेला होता… ज्यावर लिहिलेलं होतं… राजाराम चिंधूजी निंबाळकर, नेहरू वॉर्ड, मु.पो.रामटेक, जि.नागपूर… तो कागदही बराच जीर्ण झालेला होता. पण तो त्या बॅगेला इतका घट्ट चिकटलेला होता की, तो त्या बॅगेचाच अंगभूत भाग आहे, असं वाटत होतं. 

राजाराम आल्याचं कळल्यामुळे माझं मन आणि शरीरही रोमांचित झालं होतं. किती वर्षांनी भेटणार होतो आम्ही दोघे…पण… पण अजूनही त्याच्या एका मुलीचं लग्न व्हायचं आहे?… खरं तर त्याच्या मुलींची नावंही मला नीटशी आठवत नाहीयेत्. त्यातल्या दोघी तिघींची लग्नं तर नक्कीच झालेली होती. त्यांच्या निमंत्रण-पत्रिका आल्या होत्या की मला… पण कधी फक्त अभिनंदनाचा मेसेज पाठवून, तर कधी त्याच्याशी फोनवर बोलून, मी माझी ‘मैत्री’ निभावत राहिलो होतो. एक-दोनदा तर रत्नानेच पत्र पाठवली होती त्याच्या बायकोला… म्हणजे रेणुकाला. माझ्या घराची वास्तुशांत होती तेव्हा मीही आमंत्रण दिलं होतं त्याला… आणि माझ्या मुलीच्या लग्नालाही बोलावलं होतं. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर, त्यासाठी तो नक्की येईल अशी आशा… नव्हे.. खात्रीच वाटली होती मला. भलेही त्याच्या मुलामुलींच्या लग्नाला मी जाऊ शकलो नसलो, तरी माझ्या मुलीच्या लग्नाला त्याने यायला नको होतं का?… एकच तर मुलगी आहे मला…मला जरा रागच आला होता त्याचा. पण रत्नाने त्यावेळी मला समजावलं होतं… ‘अहो, तुमचा बालमित्र गरीब आहे. मित्राच्या मुलीच्या लग्नाला ते रिकाम्या हाताने कसे येऊ शकले असते? शिवाय यायचं म्हणजे तीनेकशे रूपये तरी बस भाड्यासाठी खर्च करावेच लागले असते ना त्यांना…” आमच्या मित्र-प्रेमात तिने अढी पडू दिली नव्हती… पण आता इतक्या वर्षांनी तो आला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार त्यामागे… किती वेळ मी असल्या शंकांच्या भोव-यात सापडलो होतो कोण जाणे… दारावर टकटक झाली, तसा मी भानावर आलो. माझा अंदाज खरा ठरला होता… राजारामच आला होता. दार उघडताक्षणी आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली… नंतर कितीतरी वेळ त्या ड्रॉइंगरूममधल्या पंख्याची हवासुद्धा आमच्या स्पर्शाने जणू गहिवरली आहे असंच मला वाटत राहिलं होतं. जवळपास वीस वर्षांनी भेटत होतो आम्ही… वीस वर्ष हा काही थोडा-थोडका काळ नाही. 

अत्यंत आपलेपणाने निमंत्रण पत्रिका माझ्या हातात ठेवून राजाराम आंघोळीला गेला. मी डायनिंग टेबलावर जेवणाची सगळी तयारी करून ठेवली. आणि मग ती पत्रिका वाचायला लागलो. तेवढ्यात राजाराम आवरून तयार होऊन आला. ‘चल जेवायला…’ मी त्याला म्हटलं…

‘‘तुला खीर आवडते हे मी रत्नाला कधी सांगितलं होतं कोण जाणे… पण आज खास तुझ्यासाठी ती खीर करून ठेवून गेली आहे बरं का ! मी गोड खूपच कमी खातो. आणि ‘दोघांनी मिळून खीर संपवून टाका’ असं रत्नाने चिठ्ठीत बजावलं आहे. त्यामुळे आता याची जबाबदारी पूर्णपणे तुझ्यावर आहे मित्रा…” खरंतर राजारामने लवकरात लवकर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं… वागावं असं मला वाटत होतं.

‘‘ मनोहर, अरे माझं खीर खाणं तर कधीच बंद झालंय्. चार मुली आणि एक मुलगा… यांना वाढवता वाढवता, त्यांची लग्नं करून देता देता माझी कंबर पार मोडून गेली आहे. खीर सोड… आता चहाही बिनदुधाचा पिण्याची वेळ आलीये माझ्यावर. आज वहिनीने माझ्यासाठी खीर केली आहे, तर मी नक्कीच खाईन… पण इतकी सगळी नाही खाऊ शकणार बाबा… आता सवयच राहिली नाहीये, आणि आता अशी इतकी पौष्टिक खीर तर पचणारही नाही मला. आपण पूर्वी खायचो ती खीर कशी असायची ते आठवतंय् ना तुला? डबाभर भातात एक वाटी दूध… एक वाटी पाणी… आणि फक्त दोन चमचे साखर घालायची. खूप वेळ ते सगळं एकत्र घोटत रहायचं आणि घटाघट पिऊन टाकायचं… भाताचा तांदूळही रेशनचा असायचा … तो इतका सुवासिक कुठला असायला? ”… राजाराम इतक्या मोकळेपणाने बोलायला लागला, याचा खूप आनंद झाला मला. त्याने निदान जेवण होईपर्यंत तरी मनावर असणा-या ताण-तणावातून बाहेर यावं आणि मोकळा श्वास घ्यावा असं मला अगदी मनापासून वाटत होतं. म्हणून मी झटकन् विषय बदलला. आणि त्याच्या कौटुंबिक बाबतीत बोलायच्या ऐवजी, गावात काय परिस्थिती आहे, या विषयावर बोलायला लागलो.. पण बहुतेक राजारामला या विषयात मुळीच रस नव्हता. म्हणून त्याने अगदी थोडक्यात मला सांगितलं, की आता रामटेकला जाण्यासाठी फक्त सकाळी, संध्याकाळीच नाही, तर दुपारीही बस सुरू झाली आहे… बस स्टँड आता गावाबाहेर हलवला गेला आहे. विड्याच्या पानांच्या ज्या बागा होत्या, त्या जागी पानांच्या ऐवजी आता निवासी कॉलन्या उगवल्यात. आपल्या बरोबर तो एक ‘हा’ होता ना, त्याचे कॅन्सर झाल्याने निधन झाले. दुसरा एक होता तो क्षयरोगाने ग्रासलेला आहे. आणि तो आणखी एक होता ना… कबड्डी खूप छान खेळायचा तो… त्याने कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली… राजारामचं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या  लक्षात आलं की, माझ्या लहानपणीच्या ज्या एका छोट्याशा बागेची अतिशय मोहक अशी प्रतिमा माझ्या हृदयात मी सांभाळली होती, आणि मला कायम जी आशा वाटत होती की, माझ्यासारखीच आणखी आणखी प्रगती करत, त्या छोट्या बागेचं आता मोठं उद्यान झालं असेल, तसं काहीच झालं नव्हतं… त्यातल्या एकन् एक रोपट्यावर काळाची घातक कीड पडली होती. मी हळूच राजारामकडे पाहिलं… आणि… आणि मला वाटून गेलं की, जीवन मरणाच्या सततच्या संघर्षात, कसं तरी करून स्वत:ला जपण्यात यशस्वी होत राहिलेलं, त्याच बागेतलं एक झाड माझ्यासमोर उभं आहे… मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला… 

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

साहित्य अकादमी पुरस्काराचा शानदार सोहळा चालू होता.  एक एक पुरस्कार विजेते राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्विकारत होते.  सुरेख व्यासपीठ, सुंदर सजावट.  प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निवेदिका, व्यासपीठावरचे मान्यवर, आणि अंगरक्षक.  प्रेक्षागृहातली सभ्य विद्वत्ता.  सगळेच कसे नीटनेटके होते.

याच वातावरणात एक व्यक्तिमत्व होतं शोभा विधाते. त्यांच्या “परीघ”  या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा, सावित्री फुले सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता.  निवेदिकेने  त्यांचे नाव पुकारले.  थोडक्यात परिचय करून दिला.  आणि त्यांना मंचावर पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित केले.

शोभा विधाते याही  वयात चेहऱ्यावर प्रसन्नता टिकून होत्या. रुपेरी केस,  सोनेरी काठाची पेस्टल शेडची साडी, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ,  वयाला शोभेसाच  सारा साज.

त्या मंचावर आल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.  निवेदिका म्हणाली, ” शोभाताई!  आपल्या  या काव्य प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.  ‘परीघ या काव्यसंग्रहातील एकेक रचना मनाला भिडते.  इतकी खरी वाटते की,  वाचताना जाणवते, या साऱ्या आपल्याच भावना आहेत. आपले मनोगत आपण प्रेक्षकांसमोर मांडावे.”

पोडीअमचा  माईक शोभाताईंनी हलकेच पकडला.  समोरच बसलेल्या विनय कडे त्यांनी पाहिलं.  विनयने अभिमानाने अंगठा दाखवला. शोभाताई बोलू लागल्या.

शोभा. एक मध्यमवर्गीय, रिती रिवाज, परंपरा सांभाळणाऱ्या समाजभिरू  कुटुंबातील मुलगी.  बाळबोध वळणाची, चौकटीत एका वर्तुळात वाढत होती.  मुलीची जात, मुलीची मर्यादा, मुलीने कसे वागावे, मुलीला काय शोभते, तिने काय करावे, काय नको,  कसे राहावे याच परिघातले शब्द ऐकत, ऐकत, आखलेल्या पाऊलवाटेवर ती चालत होती.  पण आतले आवाज आणि आतली वादळे तिला काहीतरी वेगळच सांगत होते.  तिचे स्वतःशी संवाद घडत होते. तिचे भांडणही तिच्या स्वत:शीच होत होते.

एक दिवस आई तिला म्हणाली,

“शोभे! आता पुरे शिक्षण.  वयोपरत्वे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत.  तरच ते चांगले असते.  जे समाजमान्य आहे तेच करावे.  आम्ही आता तुझ्यासाठी स्थळे पाहतो. एकदा तुझे लग्न झाले की दादाचाही मार्ग मोकळा होईल.”

तेव्हां तिने आईला विचारले,

“असं का?  तुम्ही दादाच लग्न करा की.  मला इतक्यात लग्न करायचं नाही.  मी काय करायचं ते मी ठरवेन.”

तेव्हां दादा चमत्कारिकपणे तिला म्हणाला होता,

” मग काय घोडनवरी झाल्यावर करणार का लग्न? आणि कधी आरशात पाहिलेस स्वतःला?  बुद्धिमत्तेचा गर्व उगीच नको करूस. शेवटी चूल आणि मुल, रांधा, वाढा, उष्टी काढा हेच खरे तुमचे जग. कळलं का? “

दादाच हसणं,  बोलणं, चेष्टेतलं असलं तरी खूप लागलं होतं.  प्रातिनिधिक स्वरूपाचं वाटलं होतं. पुरुषप्रधान परिघातलं ते अत्यंत संकुचित, कोत्या मनाचं,  खच्चीकरण करणारं, अडथळ्यांचं, हीन वक्तव्य होतं.

शोभा गप्प बसली होती याचा अर्थ तिने ते मानलं, स्विकारलं, असा मुळीच नव्हता. पण तिला एक माहीत होतं, लग्नाळू मटिरियल आपल्यात नाही.  “स्वजातीय, सुस्वरूप, सुगृहिणी, गृहकृत्यदक्ष, कमावती वधु पाहिजे”  या सदरातले एक एक शब्द,  तिने तिच्या मनाच्या खिडकीतून भिरकावून लावले होते.  एक मात्र नक्की होतं, समाजभीरु,  मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी, तिचं अस्तित्व, तिचं असं जगणं, बोलणं  तणाव देणार होतं.

तरीही एकदा तिने आई-वडिलांच्या आग्रहास्तव एक स्थळ, हो! स्थळच म्हणूया बघण्यास होकार दिला होता. त्याला  नकार देताना तिने आईला स्पष्ट सांगितले,

” तुला माहित आहे का त्याने मला काय विचारले?”

” काय?”  आईने  भीतभीतच तिला  विचारले.

शोभाने हसून म्हटले,” अगं! तो विचारत  होता, तुम्हाला मच्छरदाणीत झोप येते का?”

तरीही आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतीच.

प्रश्न तिथेच संपला होता? की परिघाबाहेरचा एक अवघड प्रश्न सुरू झाला होता?  दरम्यान काही घटनाही घडल्या.

शेजारच्या घरातल्या मीनाने स्वतःला जाळून घेतले होते.  आत्महत्येचे कारण समजलेच नाही. अपघाताच्या नावाखाली केस मिटवली गेली.

नंदिनी मावशीची मुलगी कायमसाठी तिच्याकडे परतली होती.  घटस्फोटाची नोटीस तिला मिळाली होती. प्रश्न होता तिच्या एकुलता एक मुलाच्या  कस्टडीचा.  नंदिनी मावशीच्या मुलीचे आर्थिक बळ शून्य  होते. कायद्याच्या कचाट्यात तिचे मातृत्व भरडून गेले होते.

प्रमोशनसाठी बॉसने घातलेल्या अटी धुडकावल्यामुळे वैजयंतीची बढती  नाकारली गेली. तिला राजीनामा द्यावा लागला होता.

आजूबाजूला घडणाऱ्या अशा अनेक घटनांशी शोभा तिचं नातं शोधत होती.  आणि शोधता शोधता तीही या प्रवाहाच्या विरोधात जात होती.

सोशियोलॉजी मध्ये ती पीएचडी करत होती. तिला टाटाची शिष्यवृत्तीही मिळाली होती. “शिक्षण, शोषण, आणि आजच्या स्त्रीचे स्थान सुरक्षितता आणि भवितव्य.”  हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. तळागाळापासून ते उच्चस्तरीय गटातल्या अनेक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून तिने असंख्य टिपणे गोळा केली होती. आणि त्याचबरोबर जीवनाच्या एका महाद्वारातून, मिळालेल्या अनुभवातून, ती अधिक स्वयंप्रेरित, कणखर आणि निश्चयी  बनत चालली होती.

अनेक वेळा ‘हा दिवा मालवू की नको’ या संभ्रमातही ती पडली होती. पण तरीही पायाखालची वाट तिला बोलावत होती.

दादाचं लग्न झाल्यावर तिने घर सोडलं.  स्वतंत्र बाण्याची, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिलेली, भले समाजासाठी वेगळी, चौकटी बाहेरची पण ती एक सक्षम स्त्री होती. ‘हा माझा मार्ग एकला’  हेही ती जाणत होती. तिची वाट सोप्पी नव्हती. आई-वडिलांना तिने  सांगितले,

“तुम्ही माझे जन्मदाते आहात. मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. आपण एकत्र राहू शकतो.”

   पण त्यांनी मुलाकडे राहणंच  पसंत केलं.  ते कधीही म्हणाले नाहीत,” तू मुलगी असलीस तरी मुलासारखीच आहेस.”

    शोभा विधाते, हे नाव ठळक होत गेलं.  साहित्य क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व.  समाजाभिमुख लेखनामुळे वाचकांचा ओघ वाढत गेला.  पुस्तकांचा प्रचंड खप झाला. अनेक मुलाखती घडल्या. अनेक साहित्य कट्ट्यांवर एक शानदार व्यक्तिमत्व झळकत होतं.    

 शोभा विधाते.

    मुलाखतकार हटकून विचारायचे, ‘आता शेवटचा प्रश्न. थोडा व्यक्तिगत. आपण लग्न का केले नाही?’

    त्यावेळी मात्र शोभाच्या मनात विनोदानेच यायचे की सांगावे का यांना? “मला मच्छरदाणीत झोपायचे नव्हते.”

    आयुष्याच्या मध्यंतरानंतर विनय भेटला.  खरं म्हणजे तो तिचा बालमित्रच होता. अतिशय बुद्धीमान, विचारी. किती तरी वक्तृत्वस्पर्धेची व्यासपीठे दोघांनी मिळून गाजवली होती. पण तारुण्यात जे धागे जुळू शकले नाहीत, ते या उतार वयात जमले.

 

   गृहस्थी भोगून मोकळा झालेला विनय आणि वेगळाच प्रपंच सांभाळत आलेली अविवाहित शोभा.  विनय ची  कहाणी जेव्हा शोभाने ऐकली  तेव्हांही तिला वाटले होते,  सहजीवनाचे सौख्य शून्य टक्के असताना ही माणसे आयुष्यभर तडजोडी करत कशी जगतात?  आता बायको जग सोडून गेली, मुलगा परदेशस्थ झाला.  विनयचे जीवन मुक्त होते का एकाकी होते?  आणि अशा मध्यावर शोभाने, विनयशी तिचे जीवन का जोडले?  प्रश्न अनुत्तरीतच होता.  कदाचित प्रवाहात हरवलेले दोन ओंडके  योगायोगाने जवळ आले असतील.

   गेल्या काही वर्षापासून शोभा आणि विनय, विवाह बंधनात न अडकता एकत्र रहात आहेत. परिघा बाहेरचं जीवन जगत आहेत.

    मंचावरून बोलत असताना, शोभा जणू अदृश्यपणे मनाच्या प्रोजेक्टरवर तिच्या आयुष्याचा चित्रपट पाहत होती.  प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.  संग्रहातल्या अनेक कवितांची जन्म कहाणी तिने  उलगडली होती. मनोगताच्या  समारोपाशी येताना ती म्हणाली,

“एक कविता सादर करते. कवितेचे  शीर्षक आहे, परीघ.”

      तुझ्या दारावर किती वेळा थाप वाजवली

      पण आतून तू कडी काढलीसच नाहीस

      बंद दारापलीकडे मला ऐकू येतोय

      तुझा घुसमटलेला श्वास

      निशब्द नाकारलेले ठोके

      अगं! मी तुझं अस्तित्व.

      तुझी अस्मिता, स्वातंत्र्य विश्वास.

      पण तुझं दारच बंद!

     सोडायचा नाही परीघ तुला

    म्हणतेस, बरी आहे रे मी या वर्तुळातच

    पण लक्षात ठेव, वाटलंच कधी तर दार उघड

    मी पायरीवर तुझी वाट बघत आहे ..

नि:शब्द प्रेक्षागृहात नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि बाहेरच्या काउंटरवर “परीघ” काव्यसंग्रहाच्या सर्व कॉपीज संपून गेल्या.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संशोधन – सुश्री अर्चना तिवारी ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ संशोधन – सुश्री अर्चना तिवारी ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्यां वर संशोधन प्रबंध हाती घ्यावा.’

‘फारच छान!’

‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या.’

‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय.’

‘अरे, नि:संकोचपणे सांग.’

‘सर, शेतकर्यांणवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’

‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं.’

‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’

‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’

‘ पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’

‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’

‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’

अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्यां वर आपल्याला संशोधन करायचं नाहीये.’

 ‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’

 ‘हे बघ, ज्या शेतकर्यां्बद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’

 ‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय.’

 ‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्याट ठरतात.

मूळ कथा – शोध   – मूळ – मूळ लेखिका – सुश्री अर्चना तिवारी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेगळा… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ वेगळा… ☆  सौ. प्रभा हर्षे 

जानेवारी महिना आला की नीताला छातीत धडधडायला लागतं. मन फार उदास होतं. २६ जानेवारी– तिच्या  समीरचा वाढदिवस. समीर वेगळा रहायला लागल्याला आज ५ वर्षे झाली. पण एकही वर्ष त्याने वाढदिवसाला घरी यायचं टाळलं नाही. समीर नीताचा पहिला मुलगा. अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या समीरला नीता व सुजय यांनी अक्षरश: हाताचा पाळणा करून वाढवला. पण त्याची कुडी तशी लहानखोरच राहिली. धाकटा सचिन मात्र अगदी उलट. आडदांड असलेला सचिन जरी फक्त २२ वर्षांचा असला तरी दिसे मात्र जणू समीरचा मोठा भाऊच. आणि तो वागेही तसाच ! आपल्या या अशक्त भावाची तो खूप काळजी घेई. ५ वर्षांपूर्वी  समीर जेव्हा वेगळा राहू लागला तेव्हा मात्र सचिन खूप रागावला होता. ‘‘ सबर्बनमध्ये नोकरी आहे म्हणून कुणी वेगळं राहतं का? तू रोज आपली गाडी  घेऊन जात जा. मी तुला पेट्रोल भरून देतो. आणि आई तू तरी कशी परवानगी देतेस गं त्याला ? काय गरज आहे वेगळे रहाण्याची? ” — 

 

त्याच्या प्रश्नांच्या या सरबत्तीपुढे नीता मात्र अगदी शांत राहिली होती. सुजयनेही यावर बोलायचे टाळले होते. समीरने  वेगळे घर घेऊन राहावे ही खरं तर डॉक्टरकाकांचीच आयडिया होती. बऱ्याच विचारांती सुजयला मान्य झालेली, पण नीताला अजिबात न पटलेली. आपल्या या अशा वेगळ्या मुलाला डोळ्यासमोरून दूर जाऊ द्यायला ती तयार होत नव्हती ते त्याच्या अतीव काळजीमुळेच.  डॉक्टरकाका मात्र आपल्या मतावर ठाम होते. “ मुलांची काळजी घ्या, पण त्यांना कुबड्यांची सवय लावू नका. लक्षात ठेवा, तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात. केव्हातरी त्याला एकटे राहावे लागणारच आहे. त्याची जबाबदारी त्याला घेऊ द्या. तो खूप हुशार आहे. उगाच का  कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये  पहिल्या फटक्यात एवढा चांगला जॉब मिळाला आहे त्याला ? लोकांच्या विचित्र नजरा पाहून त्याच्या मनाची किती उलघाल होत असेल याचा विचार करा. त्याला विश्वासात घ्या. त्यालाही एकटं वेगळं राहावंसं वाटत असेल तर मग त्याला राहू दे स्वतंत्रपणे.  त्याला अभ्यासालाही निवांत वेळ मिळेल. ऐका माझं.” —नीताचा नाईलाज झाला. समीरच्या कलाकलाने त्याचं मत जाणून घेतल्यावर दोघेही तयार झाले, आणि समीर एकटाच वेगळा राहू लागला. 

 

या सर्व घटनेला आज ५ वर्षे झाली. हळूहळू समीरने आपले येणे जाणे हेतुपुरस्पर कमी केले. तसा मोबाईलवर संवाद रोज असे. पण प्रत्यक्ष येणे जाणे मात्र कमी झाले. त्या वर्षीची २६ जानेवारी ही तारीख. सार्वत्रिक सुट्टी असल्याने समीर लवकरच घरी आला. आल्याआल्या देवाच्या आणि आई बाबांच्या पाया पडला. सर्वांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. भेट म्हणून त्याच्या आवडीचे आणलेले कपडे दिले. आज बाहेर जेवायला जायचा बेत होता. नीताने केलेला त्याच्या आवडीचा उपमा सर्वांनी खाल्ला. सचिन मात्र नेहेमीपेक्षा जरा गप्पगप्पच होता त्यादिवशी. संध्याकाळी समीर त्याच्या घरी परत गेल्यावर तो परत नव्याने बाबांशी हुज्जत घालू लागला— 

 

‘‘ बाबा, आपलं एवढं मोठं घर आहे. माणसं  ४ व खोल्या ९. असं असताना का तुम्ही समीरला तिकडे असं वेगळं राहायची परवानगी दिली आहेत ? तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही.” 

‘‘ सचिन, बाळा तू आता मोठा झाला आहेस. काही गोष्टी न सांगता तुला कळल्या पाहिजेत रे.” सुजयचा गळाही दाटून आला होता. “ आज तुला खरं काय ते सांगतो. मला सांग तू समीरच्या बोलण्या-चालण्याकडे कधी  बारकाईने लक्ष दिलं आहेस का? ”

‘‘ बाबा, असं का विचारता? तो खूप अशक्त आहे. त्यामुळे तो अगदी हळूबाई असल्यासारखा  वागतो. अगदी शांत असतो, कमी बोलतो, हे का मला माहीत नाही? ” 

‘‘ अरे बाळा हे सगळं वरवरचं  आहे. खरी गोष्ट आम्ही मह्तप्रयासाने सर्वांपासून लपवून ठेवली आहे. पण आज तुला सांगतो. नीट ऐक. समीर १३/१४ वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वागणं फार बदलायला लागलं होतं. विचित्र व्हायला लागलं होतं. त्याच्या बोलण्याचालण्यात थोडी बायकी झाक येऊ लागली होती. आम्हाला फार काळजी वाटायला लागली होती. मनाला वेगळीच शंका भेडसावत होती. म्हणून त्याला आम्ही डॉक्टरकाकांकडे घेऊन गेलो—-  तो दिवस आमच्यासाठी फार भयंकर ठरला होता बाळा. डॉक्टरांनी त्याची सर्व तपासणी केली व त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं —- “ समीर ‘गे’ आहे. त्यामुळे त्याचं वागणं बदलतं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल.” 

काय करावं, काही कळेना. आम्ही अगदी सुन्न होऊन गेलो होतो. ‘आमच्या मुलाच्या नशिबातच हे असं का ?’ हा एकच विचार मनाला सारखा पोखरत होता. तुझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती बिचारी रडून तिचं दुःख मोकळं तरी करू शकत होती. पण मी— तिच्याइतकंच दुःख मलाही होत होतं. पण मोकळेपणाने रडूही शकत नव्हतो मी. आईला रडतांना पाहून समीर अगदी बावरून गेला होता– सारखा माझ्याच मागेमागे करत होता.   या सगळ्यांत आम्हाला आधार दिला तो आपल्या डॉक्टर काकांनी. समीर डोळ्यासमोर आला की आम्हाला रडायला येई. पण डॉक्टरकाकांनी खूप धीर दिला. “ तो समंजस आहे. हुशार आहे. तो समजून घेईल. पण तुम्ही जबाबदारीने वागा.” –त्यांनी एका मानसोपचार तज्ञाशी समीरची गाठ घालून दिली. त्या तज्ञांनी मात्र आपले काम चोखपणे बजावले. या ‘गे’ प्रकाराबद्दल असलेले सर्व अपसमज त्यांनी मुळातून काढून टाकले. काही हार्मोन्सची इंजेक्शन दिली तर तुम्ही नॉर्मल आयुष्य व्यवस्थित जगू शकता हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण देऊन पटवून दिले. तेव्हापासूनच त्यांच्याच सल्ल्यानुसार आम्ही समीरला जास्तीत जास्त स्वातंत्र्य देतो. त्याला वेगळे वाटू नये याची काळजी घेतो. नातेवाईकांनी अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नयेत म्हणून पटतील अशी उत्तरे देतो. आता हेच पहा ना, त्यानेच विचारले,  “ बाबा माझे पैसे साठले आहेत. मी घर घेऊ का?” तेव्हा मी त्याला छोटे घर न घेता मोठे घर घ्यायला सांगितले व वरचे पैसे ट्रान्सफर करून दिले. हेतू हा की त्याला असे वाटू नये की आपल्याला कोणी विचारत नाही. कधी तरी आपण जातो तेव्हा त्यालाही कंम्फर्टेबल वाटेल. आणि खरं सांगू का सचिन, माझी तर अशी इच्छा आहे की त्याला कोणाची तरी सोबत मिळावी !”

‘‘अहो बाबा, म्हणूनच तर मी म्हणतोय ना की त्याला घरातच राहू दे म्हणून ! आपण आहोतच ना त्याच्या सोबतीला.”

‘‘अरे अशी सोबत नाही. आयुष्यभरासाठीचा कुणीतरी जिवाभावाचा साथीदार ! त्याच्यावर निसर्गाने हा जो अन्याय केला आहे, त्याची बोच कमी करण्यासाठी जन्मभराची साथ देणारा कोणी जोडीदार– मग तो कोणीही असो– कदाचित याच्यासारखाच असू शकतो की तो.  त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य एकट्याने काढायचे ही कल्पनाही मला सहन होत नाही रे. लोकांच्या दृष्टीकोनात आजकाल फरक पडला आहे आणि समजा नसेल तर आपण त्यांना पटवून देवू की मन, भावना, आत्मीयता, प्रेम यासाठी  सर्वच जण भुकेलेले  असतात. समीरसारखे तर कदाचित जास्तच. पण त्यांचा Inferiority Complex त्यांना अबोल बनवतो, एकटं पडायला भाग पडतो. हे थांबवले पाहिजे रे. तो न्यूनगंड घालवला पाहिजे – अगदी जाणीवपूर्वक. त्याची कमतरता लक्षात घेऊन समाजाने जास्तीत जास्त त्याला सामावून घेतले पाहीजे. पटतंय ना तुला ? म्हणून मग मी आपल्यापासूनच सुरुवात केली. कालच तो मला सांगत होता. “ बाबा माझे लवकरच प्रमोशन होईल. मग मी गाडी घेऊ का !” मी सांगितले, ‘‘अरे बिनधास्त घे. चांगली लेटेस्ट मॉडेल घे. तुझ्या गाडीतून आपण चौघे ट्रीपला जाऊ. भरपूर मजा करू. “ सचिन अरे, आता कळले ना, की आईवडील आपल्या मुलांची आयुष्यभरच काळजी करत असतात. ती कितीही मोठी झाली तरी ! गे असला म्हणून काय झालं… माझाच मुलगा आहे ना ! त्याने चुकीच्या वाटेने जाऊ नये यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. आणि बाळा आता हे सगळं समजल्यावर तू त्याच्यावरचं तुझं प्रेम तसूभरही कमी होऊ देऊ नको. त्याच्याशी असं काहीच वागू-बोलू नकोस ज्यामुळे तो दुखावला जाईल, आणखी कोशात अडकेल. समजतंय ना तुला ? कुणीच त्याच्याशी कुठल्याही वेगळेपणाने वागायचं नाहीये. ऐकशील ना माझं ?” 

सचिनने आपले भरून आलेले डोळे पुसत मान हलवली. ‘ समीर कसाही असला, कुठेही रहात असला, तरी मी कधीच त्याला अंतर देणार नाही बाबा ‘ मनोमन जणू शपथच घेतली त्याने. आणि इतका वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेली नीता —तिच्या डोळ्यातले अश्रू जरी थांबत नव्हते तरी डोळ्यात एक निश्चय स्पष्ट डोकावत होता. ती स्वत:लाच बजावत होती, ‘माझा मुलगा असे ना का वेगळा, पण नाही होऊ देणार मी कधीच त्याला दुबळा. बनवेन त्याला समर्थ ! कणखर आणि कर्तृत्ववान —- इतरांपेक्षा जास्तच‘—

© सौ प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल. मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले.)  इथून पुढे ——-

“तो मला वृद्धाश्रमात ठेवून निघून गेला तो गेलाच. मला  अगदी थोडे पेन्शन आहे, पण मला काय लागते हो?

याने दहा वर्षाचे पैसे भरून टाकलेत— मला आश्चर्य वाटते,हा माझाच का मुलगा? कुठे कमी पडलो आम्ही त्याच्यावर संस्कार करायला? जाऊ दे. नशिबाचे भोग म्हणायचे.” सुधाताई खिन्न होऊन म्हणाल्या– “ तुम्ही त्याच्याच वयाचे ना?

काल तुमची आई येऊन सगळ्या पेशन्टची किती मायेने चौकशी करून गेली. किती अभिमान आहे त्यांना तुमचा.

माझा मुलगा इतका विख्यात सर्जन असूनही, मी या सुखाला कायमची पारखी झाले आहे. एकदा विचारले सुद्धा,की अरे,असे का वागतोस बाबा ? काय चुकलंय आमचं? “ तर म्हणाला, “ काही नाही ग.पण आता मलाच काही इंटरेस्ट नाही, नाती उगीच जपत बसण्यात. माझा व्याप खूप वाढलाय, आणि मी  करतोय ना कर्तव्य?  मला अजिबात वेळ नाही सतत भारतात फेऱ्या मारायला. “ .. “आता यावर काय बोलणार सांगा.” डॉक्टरही अवाक् झाले हे ऐकून.

सुधाताई वृद्धाश्रमात गेल्या. एक महिन्याने चेकअप साठी आल्यावर, डॉक्टर विश्वास त्यांना म्हणाले, “ ताई, एक सुचवू का? आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही व्यवस्थापक म्हणून काम बघाल का?  वर्षाची एकटीची खूप धावपळ होते. सगळा स्टाफ सांभाळायचा, पेशन्टचे जेवणखाण, आणि इतर सगळीच  मॅनेजमेंटबघावी लागते..  खूप काम करावे लागते तिला. “

जरासा विचार करून सुधाताई म्हणाल्या, “ बरं. करुन बघते एखादा महिना.” 

दोन महिन्यांनी सुधाताईंनी काम बघायला सुरवात केली. त्यांनी हॉस्पिटलच्या किचनपासून सुरवात केली. मुळात त्या शिक्षक असल्याने त्यांना व्यवस्थापनाची उत्तम सवय होतीच ! गोड बोलून,नीट लक्ष देऊन, त्यांनी सगळा नोकरवर्ग  आपलासा केला. एका डायरीत त्यांना रोजचा खर्च, बिले,  लॉंन्ड्री ,सर्व लिहून काढायला लावले. चार महिन्यांनी वर्षाला ती डायरी दाखवली.

व्यवस्थितपणे लिहिलेली ती डायरी पाहून वर्षा थक्क झाली. सगळी उधळमाधळ थांबली होती. वेळच्यावेळी सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या होत्या. जेवणाचा दर्जा कितीतरी सुधारला होता. जवळजवळ चाळीस हजार रुपये वाचले होते चार महिन्यात. रोज सुधाताई सकाळी ९ ला हजर असत, ते संध्याकाळी  सातला,सर्व मार्गी लावूनच जात.

डॉक्टर विश्वास आणि वर्षाने, सुधाताईना बोलावून घेतले. “अहो, काय हा चमत्कार करून दाखवलात तुम्ही !

केवढा खर्च होत होता पूर्वी ! आम्ही इतकं लक्ष देऊ शकत नव्हतो हो. केवढी बिले यायची किराण्याची, लॉन्ड्रीची. आणि स्टाफला किती सुंदर शिस्त लावलीत तुम्ही. पेशन्टही, जेवणावर खूष आहेत पूर्वीपेक्षा. सुधाताई, किती गुणी आहात तुम्ही. मी तुम्हाला ऑफर देतो, नाकारू नका. तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून रहायलाच या. आम्ही तुम्हाला अति होईल असे काम कधीच सांगणार नाही. फक्त देखरेख करायची तुम्ही. आम्ही तुम्हाला छान खोली देतो रहायला. आणि काम होईनासे झाले, तरी आम्ही तुम्हाला कायम सांभाळू— अगदी माझ्या आईसारखेच. मान्य आहे का? दरमहा तुम्हाला आम्ही पगार देऊच, तो तुमच्या बँकेत जमा होईल.”

सुधाताई थक्कच झाल्या. ही अपेक्षाच कधी केली नव्हती त्यांनी—

“ अहो डॉक्टर,मला कशाला पगार? आणि मी  राहीन की वृद्धाश्रमात. आणि तिथूनच येत जाईन ना रोज.” 

“ नको नको,ताई, तुम्ही इथेच राहा. माझ्या आईलाही तुमची छान सोबत होईल. तुम्हाला सांगू का, ही सूचना तिचीच आहे खरं तर. ती बघतेय ना तुम्ही केलेला बदल. परवा तुम्ही सिस्टरला चादरीचा हिशोब विचारला तेव्हा किती गडबडून गेली होती ती. निमूट सर्व चादरी मोजून जमा केल्या तिने. पूर्वी हे आम्हाला शक्य होत नव्हते हो.

माझ्या आईनेच हे बघितले आणि म्हणाली, ”अरे,तुम्ही सुधाताईंनाच विचारा की, त्या काम बघतील का ते.” 

सुधाताईंच्या डोळ्यात अश्रू आले.

“ जे काम माझ्या मुलाने करायला हवे, ते काम तुम्ही परकी मुले करताय, काय बोलू मी ? मी नक्की करीन हे  काम.

त्यात अवघड काय आहे ? पण डॉक्टर, एक शब्द द्या. या वयात आता पुन्हापुन्हा धक्के सहन होत नाहीत हो.

मला पुन्हा वृद्धाश्रमात नाही ना पाठवणार? नाही तर मी आहे तिकडेच बरी आहे.” 

डॉक्टर वर्षाच्या डोळ्यात पाणी आले. “ नाही हो सुधाताई,असं कसं करू आम्ही? एवढे मोठे हॉस्पिटल आहे आपले, तुम्ही आम्हाला कधीही जड होणार नाही. उलट तुमची केवढी मदतच होतेय आम्हाला. आणि आम्ही आणखी नोकर देऊ की तुमच्या मदतीला.”  सुधाताई तयार झाल्या या ऑफरला.

त्या गेल्यावर डॉक्टर विश्वासच्या आई म्हणाल्या, “ तुम्ही दोघांनी किती छान काम केलेत रे. शाबास. एका कर्तबगार बाईचा आत्मसन्मान तिला परत मिळवून दिलात. असेच कायम सहृदयतेने वागा रे पोरांनो ! विश्वास, तो अभय– मुलगा म्हणून अपात्र ठरला. पण तू आज नुसता डोळ्यांचा नाही तर मनाचाही डॉक्टर झालास बघ.” 

— विश्वास, वर्षा आणि त्यांच्या आईच्या डोळ्यातलं पाणीच खूप काही सांगून गेलं.

— समाप्त —

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहृदय— भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

हॉस्पिटल मध्ये तुडुंब गर्दी होती. ओ पी डी तर ओसंडून वहात होती. डॉ. विश्वासने नर्सला विचारले, “ किती आहेत अजून लोक ग?”

” सर,आज तुम्हाला उशीर होणार घरी जायला.  पुन्हा उद्याची चार मोतीबिंदूची ऑपरेशन्स ठरली आहेतच.”

“ बरं, ठीक आहे. वरचं वर्षाबाईंचं काम आवरलं का. संपली का तिची ओ पी डी.? त्यांना म्हणावं एकदमच जाऊ आता “

“हो, बघते जाऊन. विचारते.”

सगळे  पेशंट तपासून झाले आणि एक बाई बसल्या होत्या, पण त्यांना मात्र घाई दिसत नव्हती. सिस्टरने त्यांना आत बोलावले. डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासले आणि म्हणाले, “ बाई, तुमचा एक मोतीबिंदू पिकलाय, त्याचे ऑपरेशन करावे लागेल. दुसरा डोळा  चांगला आहे.” 

बाई म्हणाल्या, “ हो,मला कल्पना आहे. पण डॉक्टर,खर्च किती येईल?मी वृद्धाश्रमात राहते, पण पैसे देईन मी तुमचे.  सवलत दिलीत, तर थोडे थोडे करून नक्की देईन. निम्मे आधी भरेन मी. “

डॉक्टरांनी त्यांच्याकडे बघितले.वृद्धाश्रमात राहण्याइतक्या त्या वृद्ध दिसत नव्हत्या. असतील साठीच्या आसपास.

“ बिलाचे बघूया नंतर.”डॉक्टर म्हणाले, “ पण तुमच्या बरोबर कोणी येणार आहे ना,ऑपरेशनच्या दिवशी?”

“ हो. माझी मैत्रीण येईल माझ्या बरोबर. पण तुम्ही मला ठेवून नाही ना घेणार? चार तासात सोडतात ना “ त्यांनी घाईघाईने विचारले ..

डॉक्टर हसले,आणि म्हणाले,” हो हो! तुम्ही चार तासात घरी जाल.” 

बाई अतिशय सभ्य सुसंस्कृत दिसत होत्या. डॉक्टरांनी काय तपासण्या कराव्या लागतील त्याची यादी दिली आणि  रिपोर्ट्स घेऊन बोलावले. बाई दोन दिवसात रिपोर्ट्स घेऊन आल्या. ते तपासून डॉक्टर म्हणाले, “ परवा आपण तुमचे करून  टाकू ऑपरेशन. चालेल ना?” 

“ पण सर, तुम्ही अजून पैशाचे बोललाच नाहीत. मी हे आत्ता  वीस हजारच देऊ शकते. मग दरमहा हजार देऊ शकेन. खात्री बाळगा, मी तुमचे पैसे बुडवण्याचे पाप करणार नाही.” 

“ ठीक आहे हो, चालेल. पण अजून मी तुमचे नावच विचारले नाही की.” 

बाई म्हणाल्या,” मीही सांगितले नाही. मी श्रीमती सुधा निमकर.” 

डॉक्टरांनी चमकून बघितले, “ बाई, अभय निमकर तुमचा कोण ?” 

“मुलगा !  तो इंग्लंडला मोठा सर्जन आहे.”

“काय सांगता सुधाताई? अभय तुमचा मुलगा आहे ?अहो,आम्ही एकाच कॉलेजातून डॉक्टर झालो .

माझा वर्गमित्र आहे अभय. तरीच मला तुम्हाला खूप पाहिल्यासारखे वाटत होते. मी खूप वेळा आलोय तुमच्या घरी.

जेवलोय सुद्धा तुमच्या हातचे अनेक वेळा. माफ करा हं, पण खूप वर्षे झाली ना,म्हणून ओळखले नाही तुम्हाला.” 

“अहो,ठीक आहे, कितीतरी वर्षे  झाली ना. बदल होतात हो माणसात.परिस्थिती बदलते.”

— डॉक्टरांना जास्त विचारण्याचे धैर्य झाले नाही. ठरलेल्या दिवशी बाईंची शस्त्रक्रिया छान पार पडली. डॉक्टर सुधाताईंच्या खोलीत आले…..  

” ताई, अगदी छान झाले हं ऑपरेशन. मी एक विनंती करू का? तुम्हाला मी आज आणि उद्या इथेच ठेवून घेतोय. आम्ही वरच राहतो. मी आणि माझी पत्नी वर्षा, दोघेही डॉक्टर आहोत ना. तिचे दुसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह आहे. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो. तुम्हाला जेवण वगैरे सगळे आम्हीच देऊ, आणि मग दोन दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज देऊ. चालेल ना?” 

सुधाताई संकोचल्या. म्हणाल्या,””अहो उगीच कशाला तुम्हाला त्रास ! मी अगदी छान आहे की आता. पण तुम्ही म्हणताय तर राहीन मी इथे.” बोलतांना सुधाताईंच्या डोळ्यात पाणी चमकले.

डॉक्टर राऊंड संपवून निघून गेले. रात्री वर्षाशी बोलताना डॉक्टर विश्वास म्हणाले,” नक्की काय ग झाले असेल?

इतक्या सुसंस्कृत बाई, सभ्य, पुन्हा स्वतः शिक्षिका होत्या.का बरं अशी वेळ आली असेल त्यांच्यावर–वृद्धाश्रमात राहण्याची?”

” हो रे! किती  छान आहेत त्या ! पण आपण हळूहळू विचारू त्यांना.” वर्षा म्हणाली. 

दुसऱ्या दिवशी राऊंड घेताना,डॉक्टर सुधाताईंच्या रूममध्ये आले. “ कशा आहात ताई? बरे आहे ना सगळे?” 

“अहो ,बरे काय.. अगदी छान आहे सगळे. अगदी माहेरी आल्याचे सुख घेतेय हो मी. पण उद्या मात्र सोडा बरं का.”

 — डॉक्टर त्यांच्या शेजारी बसले, आणि म्हणाले,  “ताई,असं काय घडलंय की तुम्हाला घर सोडावे लागले? अभयचे बाबा  कशाने गेले? मला काहीच कल्पना नाही हो. पण रागावू नका. मला सांगितलेत तर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो यातून.”

सुधाताईंनी सुस्कारा सोडला. “ काय सांगू तुम्हाला मी ! तुम्हाला माहीतच आहे, अभय किती हुशार होता ते. पण त्याचा स्वभाव मात्र एकलकोंडा, चमत्कारिकच जरा ! आम्ही मध्यमवर्गीय माणसे हो ! अभयच्या वडिलांची सामान्य नोकरी आणि मी प्राथमिक शिक्षिका. पण अभय सगळे स्कॉलरशिप मिळवत शिकला हो. आम्हाला जराही तसदी नाही पडली त्याच्या खर्चाची. तो एम एस झाला,आणि त्याला इंग्लंडला पुढचे शिकण्याची संधी चालून आली. आम्ही त्याला जमेल तेवढे पैसे दिले, पण उरलेल्या रकमेसाठी कर्ज काढावे लागलेच. त्यासाठी आमचा लहान फ्लॅट गहाण ठेवावा लागला. कर्जाचे हप्ते त्याने भरले, कर्जही फेडले. पुढे त्याने तिकडे गोऱ्या मुलीशी लग्नही केले. आम्ही कशालाच विरोध केला नाही. पण हळूहळू तो आमच्यापासून दूरच गेला. त्याचे बाबा अचानक गेले तेव्हाही उपऱ्यासारखा पंधरा दिवस आला,आणि निघून गेला. त्या मुलीशीही त्याने घटस्फोट घेतला,असे म्हणाला.

मला म्हणाला, मला असे सारखे यायला जमणार नाही. मी हा फ्लॅट विकून टाकणार आहे. तुझी सोय वृद्धाश्रमात करतो. नशीब तरी बघा माझं, तो फ्लॅट यांनी त्याच्याच नावावर केला होता. त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल… मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले …

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो परत आला होता? – भाग 2 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तो परत आला होता? – भाग 2 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

 (मागील भागात आपण पाहिले –  ‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी  लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो. आता इथून पुढे )

तिची आई, दरवाजाशी उभी होती. ती म्हणाली, ‘अरे तू…?’

ती माझ्याकडे नेहमीच अनुकूल दृष्टीने बघत आलीय. तिने मला मिठीत घेऊन माझ्या गालावर ओठ टेकले. मला काहीच कळलं नाही. अखेर काय झालय काय? मग मला कळलं, आत्ता आत्ताच एड्रियाना आई बनलीय. त्यामुळे सगळे अतिशय खूश आणि उत्तेजित झाले होते. माझ्या विजयी प्रतीद्वंद्वीचा हात हातात हात घेऊन त्याचे अभिनंदन करण्याशिवाय मी काय करू शकत होतो?

मला काळत नव्हतं की मी ही गोष्ट त्यांना विचारू की गप्प बसू? मग मला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मी खोट्या औदासिन्याने म्हंटलं, ’मी घंटा न वाजवताच आत आलो कारण मी एक घाणेरडी मोठीशी झोळी घेतलेल्या भिकार्‍याला आपल्या घरात गुपचुप येताना पहिलं आणि मला वाटलं, चोरी करण्याच्या उद्देशाने तो आत आलाय.’

ते सगळे माझ्याकडे हैराण होऊन बघू लागले. ‘भिकारी? झोळी? चोरी करण्यासाठी?  त्यांना कळतंच नव्हतं. किती तरी  वेळापासून ते इथे बैठकीच्या खोलीतच आहेत आणि त्यांना तसा कुणी भिकारी दिसला नव्हता.

‘मग माझ्याकडून नक्कीच काही तरी चूक झालेली असणार.’ मी म्हंटलं. मग ते मला एड्रियाना आणि नवजात शिशु असलेल्या खोलीत घेऊन गेले. आशा स्थितीत मला काय बोलावं हे कळेना. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि बाळाकडे नीट पाहिलं. मी विचारलं, ‘बाळाचं नाव काय ठेवणार?’ त्यांनी सांगितलं, त्याच्या वडलांच्या नावावरून गुस्तावो ठेवण्याचं नक्की केलय. त्याचं नाव फर्नांडो ठेवलं असतं, तर मला जास्त बरं वाटलं असतं. पण मी गप्प बसलो.

घरी आल्यावर मला निश्चितपणे वाटू लागलं की हा तोच भिकारी आहे, ज्याला म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोने धक्का देऊन मारलं होतं. तो बदला घेण्यासाठी नाही, तर एड्रियानाच्या मुलाच्या रूपात जन्म घेण्यासाठी परतला होता. पण दोन –तीन  दिवसानंतर मला माझी कल्पना हास्यास्पद वाटू लागली आणि हळूहळू मी ती गोष्ट जवळ जवळ विसरूनच गेलो.  ती घटना मी पूर्णपणे विसरून गेलो असतो. पण….

१९७९ मध्ये एक अशी घटना घडली, की त्यामुळे. १९६९ मध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली.

दहा वर्षं होऊन गेली. काळ पुढे पुढे जात होता. मी खोलीतल्या खिडकीजवळ बसून एक पुस्तक चाळत होतो. थोड्या वेळाने मी सवयीनुसार खिडकीतून बाहेर इकडे-तिकडे पाहिले. एड्रियानाचा मुलगा गुस्तावो आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होता. तो जे खेळत होता, ते त्याच्या वयाच्या दृष्टीने अगदी पोरकट असे  होते. मला वाटलं, आपल्या वडलांकडून त्याने वारशात मंदबुद्धी प्राप्त केलीय. तो जर माझा मुलगा असता, तर यापेक्षा निश्चितपणे चांगला खेळ निवडून खेळला असता आणि आपले मनोरंजन केले असते.

गुस्तावोने दोन्ही घरांच्या मध्ये जी कॉमन भिंत होती, त्यावर काही रिकामे डबे ठेवले होते. आपल्या गच्चीवर उभा राहून दगड मारून तो ते पडण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे डबे आणि दगड, त्यांचे शेजारी डॉन सिज़ेरियो यांच्या बागेत पडत होते. मला वाटलं, म्हातारा डॉन सिज़ेरियो याने आपली फुले आणि फुलझाडे या दगडांमुळे नष्ट झालेली पाहिली, तर त्या नक्कीच हार्ट अ‍ॅटॅक येईल.

अगदी याच वेळी डॉन सिज़ेरियो आपल्या घरातून बाहेर पडला. तो चांगलाच म्हातारा झाला होता. अतिशय लडखडत चालत होता. अगदी सावधपणे एक पाय मग दूसरा पाय खाली ठेवत तो चालत होता. घाबरत घाबरत तो लोखंडी दरवाजापर्यंत पोचला. दरवाजा उघडून तो हळूहळू त्याच्या पुढच्या दगडी पायर्‍या उतरू लागला

म्हातारा बागेत आला. अगदी त्याच वेळी गुस्तावोने शेवटचा डबा दगड मारून खाली पाडला. म्हातारा पायर्‍या उतरत होता. गुस्तावोने त्याला पाहिले नव्हते. डबा जोराचा आवाज करत म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोच्या बागेत पडला. डब्याच्या जोरदार आवाजाने तो एकदम चमकला. मागे वळून बघण्याचा प्रयत्न कारताना तो घसरला आणि पहिल्या दगडी पायरीवर त्याचं डोकं आदळलं आणि फुटलं.

मी हे सारं बघितलं पण म्हातार्‍याने मुलाला बघितलं नव्हतं की मुलाने म्हातार्‍याला. एव्हाना काही कारणाने मुलाचं मन खेळावरून उडालं आणि तो तिथून निघून गेला. काही क्षणात खूपसे लोक म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोच्या प्रेताभोवती जमा झाले. चुकून पाय घसरल्याने म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोचा मृत्यू झाला, असं जाहीर झालं.

दुसर्‍या दिवशी मी पहाटेच उठलो आणि खिडकीजवळच्या खुर्चीवर  स्थानापन्न झालो.  डॉन सिज़ेरियो च्या पंचकोनी घरामध्ये रात्रभर आणि सकाळी लोक बसून घरच्या लोकांचं सांत्वन करत होते. अजूनही बरेचसे लोक त्या घराच्या बाहेर उभं राहून सिगरेट पीत होते व आपापसात बोलत होते.

एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरातून, तोच चिंध्या लपेटलेला म्हातारा भिकारी बाहेर पडला. त्याच्या अंगावर एक फाटलेला ओव्हरकोट होता. त्याने कडब्याने बनवलेली एक मोडकी-तुटकी टोपी घातली होती आणि हातात एक मोठीशी घाणेरडी झोळी होती. लोक घृणा आणि भीती यामुळे बाजूला सरकले. तो बायका पुरुषांची गर्दी चिरत पुढे निघाला. ज्या बाजूने तो आधी दोन वेळा आला होता, त्याच दिशेला हळू हळू चालत तो दूर जाऊन अदृश्य झाला.

दुपारी मला कळलं गुस्तावो सकाळपासून आपल्या बिछान्यात नाहीये. हे ऐकून मला वाईट वाटलं, पण फारसं आश्चर्य वाटलं नाही. बर्नेस्कोनी परिवाराने गुस्तावोला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा शोध आशेच्या जिद्दीवर अजूनही चालू आहे. मला मात्र त्यांनी शोध थांबवावा, असा सांगण्याची हिंमत कधीच झाली नाही.

— समाप्त —

मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो

हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी  अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तो परत आला होता? – भाग 1 – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

१९६५ मधे मी २३ वर्षाचा होतो. भाषा आणि साहित्य या विषयाचा शिक्षक होण्यासाठी मी शिकत होतो. त्या वर्षी, वसंताचा गंध सप्टेंबरमध्येच हवेत दरवळू लागला होता. एका सकाळी, खरं तर पहाटेच म्हंटलं पाहिजे,  मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. आमची बहुमजली इमारत होती आणि मी सहाव्या मजल्यावर रहात होतो. मी थोडासा आळसावलो होतो आणि थोड्या थोड्या वेळाने खिडकीतून बाहेर बघत होतो. तिथून मला आमची गल्ली दिसत होती. आणि रस्त्यावरच्या फूटपाथच्या बगलेत मला म्हातार्‍या डॉन सिज़ेरियोचा बगीचा दिसत होता. त्यात भरपूर खत घातलेलं होतं. त्याचं घर गल्लीच्या कोपर्‍यावर तिरकं असं होतं. त्यामुळे त्याचं घर कसल्या तरी अनियमित आकाराचं पंचकोनी असं काही तरी दिसत होतं.

डॉन सिज़ेरियोच्या घराच्या बगलेत बर्नेस्कोनी परिवाराचं सुंदर घर होतं. ते सगळे अतिशय चांगले, उदार, हवेहवेसे वाटणारे लोक होते. त्याला तीन मुली होत्या आणि मी, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी एड्रियाना हिच्यावर प्रेम करत होतो. अधून मधून मी त्याच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याकडे बघत होतो. अर्थात इतक्या सकाळी सकाळी एड्रियाना दिसण्याची शक्यता नव्हतीच.

गल्लीत आता कोणीच नव्हतं त्यामुळे माझं लक्ष आपोआप त्या माणसाकडे गेलं. घरांच्या पुढच्या रस्त्यावर तो दिसत होता. तो आमच्या सोसायटीकडेच येत होता. हा रस्ता डॉन सिज़ेरियो आणि बर्नेस्कोनीच्या घराच्या समोरून जात होता. माझं त्याच्याकडे आपसूकच लक्ष गेलं. तो कुणीतरी भिकारी किंवा भटक्या असावा. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या चिंध्यात तो लपेटलेला होता.

तो दाढीवाला माणूस अतिशय अशक्त आणि दुबळा दिसत होता. त्याने एक मोडकी तोडकी कडब्याची टोपी घातली होती. उकडत असतांनाही त्याने धूसर रंगाचा एक फाटका ओव्हरकोट घातला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे एक घाणेरडी झोळी होती. माझा अंदाज होता, की त्या झोळीत भीक म्हणून मिळालेल्या गोष्टी किंवा इकडे तिकडे मिळालेल्या खाण्याच्या वस्तू तो ठेवत असणार. 

मी त्याच्याकडे बघत होतो. तो भिकारी डॉन सिज़ेरियोच्या घराच्या समोर थांबला आणि लोखंडी कुंपणातून त्याने घरमालकाला काही तरी भीक देण्याचा आग्रह केला. म्हातारा डॉन सिज़ेरियो एक कंजूष माणूस होता. त्याचे एकूणच व्यक्तिमत्व अप्रीय, तिरस्कार निर्माण करणारं होतं. भिकार्‍याकडे न बघता , त्यांनी हातानेच त्याला निघून जाण्याची खूण केली.  भिकारी मंद आवाजात त्याला सतत काही तरी देण्याविषयी आर्जव करत होता. इतक्यात मी त्या म्हातार्‍या माणसाच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकला,

‘मला त्रास देऊ नको. चालता हो इथून…’

तरीही तो भिकारी सारखा आग्रह करत राहिला. तो दगडाच्या तीन पायर्‍या चढला आणि ते लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला. डॉन सिज़ेरियोच्या सहनशक्तीचा आता अंत झाला. ते पुढे झाले आणि त्यांनी त्या भिकार्‍याला जोरात धक्का दिला. भिकारी ओल्या पायरीवरून घसरला. त्याने फटकाची लोखंडी सळी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर धडाम असा जोरदार आवाज आला. तो फरशीवर उताणा पडला. त्याचे पाय आकाशाकडे उठलेले मला दिसले. त्या क्षणार्धात दगडाच्या पहिल्या पायरीला धडकून, त्याचं डोकं फुटलल्याचा आवाज मी ऐकला. डॉन सिज़ेरियो पळत पळत बाहेर आला. जमिनीवर पडलेल्या भिकार्‍यावर तो झुकला. त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा त्याने प्रयत्न केला. ती त्याला ऐकू आली नाही. मग डॉन सिज़ेरियो घाबरला. त्याने हाताच्या पंजाने त्या भिकार्‍याला पकडून दुसर्‍या टोकाला दगडांजवळ ओढत नेले.  मग घरात जाऊन घराचे दार लावून टाकले. त्याच्या अनैतिक अपराधाचा कोणी साक्षी नाही, यबद्दल तो आश्वस्त होता. पण साक्षीदार मी होतो. लवकरच त्या बाजूने जाणारा एक माणूस त्या शवाजवळ थांबला. मग हळू हळू अनेक लोक तिथे जमा झाले. आणि तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या मृत भिकार्‍याला अ‍ॅम्ब्युलंसमध्ये घालून घेऊन गेले. ही गोष्ट इथेच संपली आणि यावर नंतर कुणीही काहीही बोलले नाही.

माझ्याबद्दल बोलायचं झालं, तर या घटनेबद्दल मी अतिशय सावध होतो आणि मी माझं तोंड कधीही उघडलं नाही. कदाचीत माझं वागणं चुकीचं असू शकेल पण त्या म्हातार्‍यावर दोषारोप ठेवून मला काय मिळणार होतं? त्याने माझं कधीच काही बिघडवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इरादा त्या भिकार्‍याला जीवे मारण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कोर्टात चकरा मारायला लागण्याचे कष्ट पडावेत, हे मला उचित वाटलं नाही. मला वाटलं, त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत एकटंच सोडावं.

हळू हळू ती घटना मी विसरून गेलो.  पण जेव्हा जेव्हा मी डॉन सिज़ेरियोला बघतो, तेव्हा तेव्हा मला अजब अशी अनुभूती येते. त्याला ही गोष्ट माहीत नाही, की या सार्‍या दुनियेत मी असा एकमेव माणूस आहे, की जो त्याचं भयानक रहस्य जाणून आहे. तेव्हापासून का कुणास ठाऊक, मी त्याच्यापासून दूर राहायला लागलो आणि त्याच्याशी बोलण्याची मी कधीच हिंमत केली नाही.

                   *** *** *** *** *** ***

हळू हळू मी ही घटना विसरत चाललो, पण जेव्हा जेव्हा डॉन सिज़ेरियो मला दिसतो, तेव्हा तेव्हा, मला एक अजब अशी अनुभूती होते की सार्‍या दुनियेत, मी असा एकमात्र माणूस आहे, जो त्याचं भयानक असं रहस्य जाणून आहे

                 *** *** *** *** *** ***

१९६९मधे मी २६ वर्षाचा झालो. मी एव्हाना स्पॅनिश भाषा आणि साहित्य यात डिग्री मिळवली होती. एड्रियाना बर्नेस्कोनीने माझ्याशी नाही, अन्य कुणाशी विवाह केला होता. ती व्यक्ती तिच्या योग्य होती की नाही, मी प्रेम करत होतो, तेवढंच प्रेम तीही व्यक्ती तिच्यावर करत होती की नाही, कुणास ठाऊक? त्या वेळी एड्रियाना गर्भवती होती आणि तिने केव्हाही बाळाला जन्म दिला असता. ती आताही पहिल्यासारखी त्याच सुंदर घरात रहात होती आणि दररोज, पाहिल्यापेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. सकाळी लवकर मी काही मुलांना व्याकरण शिकवून येणार्‍या परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेत होतो. सवयीनुसार मी रस्त्याच्या पलिकडे एक उदास दृष्टिक्षेप टाकत असायचो.

त्या दिवशी अचानक माझं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. मला वाटलं, मला दृष्टिभ्रम झालाय. तीन-चार वर्षापूर्वीचा तो भिकारी, ज्याला डॉन सिज़ेरियो ने धक्का देऊन मारून टाकलं होतं, तो त्याच रस्त्यावरून चालत येत होता. त्याच चिंध्यात लपेटलेला. एक फटका ओव्हरकोट त्याच्या अंगावर होता. कडब्याने बनवलेली एक मोडकी –तुटकी टोपी त्याच्या डोक्यावर होती आणि त्याच्या हातात एक घाणेरडी झोळी होती. 

आपल्या विद्यार्थ्यांना विसरून मी खिडकीशी पोचलो. त्याची गती मंद झाली. तो आपल्या अपेक्षित इमारतीशी पोचणारच होता.

‘अरे, तो मृत भिकारी पुन्हा जिवंत झाला—‘ मी विचार करू लागलो. ‘डॉन सिज़ेरियोचा बदला घेण्यासाठी आला की काय?’ पण तो डॉन सिज़ेरियोच्या फटकापासून पुढे गेला. मग तो, एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरासमोरच्या फटकाशी थांबला. मग तो फाटक उघडून आत गेला. 

‘मी आलोच इतक्यात…’ असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी  लिफ्टने खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो.

क्रमश: भाग १

मूळ लॅटिन कथा – मूळ लेखक फ़र्नांडो सोर्रेंटीनो

हिन्दी अनुवाद – वापसी – हिन्दी  अनुवादक – श्री सुशांत सुप्रिय

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print