हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 98 – मनोज के दोहे…शिक्षा ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे… शिक्षा”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 98 – मनोज के दोहे… शिक्षा ☆

शिक्षा का मंदिर जहाँ, सबको मिलता ज्ञान।

देवतुल्य शिक्षक रहें, हरते हर अज्ञान।।

शिक्षा वह अनमोल धन, जीवन भर का साथ।

लक्ष्मी जी का वरद हस्त,जग का झुकता माथ।।

मानव के निर्माण में, शिक्षक रहा महान।

बचपन को संयोजना, नव पीढ़ी को ज्ञान।।

शिक्षक की कर वंदना, सुदृढ़ बने समाज।

शिक्षित मानव ही गढ़े, नैतिक-धर्म-सुराज ।।

ज्ञान और विज्ञान से , भरता प्रखर प्रकाश।

मानव हित को साधकर, करे तिमिर का नाश।।

शिक्षा पाने के लिए, मानव गया विदेश।

थाह नहीं भंडार का, है अमूल्य विनिवेश।।

शिक्षित मानव देश की, नींव करे मजबूत।

रखे सुरक्षित देश को, बुने प्रगति के सूत।।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अकिंचन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – अकिंचन ? ?

कोई धन पर अड़ा रहा,

सम्पर्कों पर कोई खड़ा रहा,

प्राचीन से अर्वाचीन तक

बार्टर का सिलसिला बना रहा,

मैं निपट बावरा, अकिंचन

केवल सृजन के बल पर टिका रहा।

(काव्य संग्रह – “क्रौंच” से)

© संजय भारद्वाज 

(प्रातः 9:28 बजे, 13.8.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 माधव साधना सम्पन्न हुई। आपको अगली साधना की जानकारी शीघ्र दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

??

☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆

(याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?) – इथून पुढे —

‘कारवाँ’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या ना, तिथं नायिकेवर म्हणजे आशा पारेखवर चित्रीत झालेलं ‘दैया ये मैं कहां आ फसी’ हे गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि अरुणा इराणीवर चित्रित झालेलं ‘दिलवर दिल के प्यारे’ हे गाणं दीदीचं आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील. ज्या सातत्यानं आशाताई गाणी गात राहिल्या, ते तर अफाट आहे, विस्मयजनक आहे.

‘उमराव जान’ हा चित्रपट म्हणजे आशाताईंचा अक्षरशः पुनर्जन्म होता. त्यांच्या कारकीर्दीचा मोठा आणि यशस्वी टप्पा तोवर होऊन गेला होता. एक प्रकारचा ठहराव त्यांच्या कारकीर्दीत आला होता. त्याच सुमारास अचानक ‘उमराव जान’ आला. दीदी त्यांच्या स्थानी अढळ होत्याच; तरीही संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’नंतर आशाताईंच्या गायकीला, लोकप्रियतेला मिळालेली झळाळी अभूतपूर्व होती आणि अगदी या क्षणापर्यंत ती उंची तशीच कायम आहे.

मी ‘प्रभुकुंज’समोरून जातो, तेव्हा मनात येतं, की भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं, तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं एखादं झाड असावं, तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठं तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं. या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देश पातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी.

एस. डी. आणि आर. डी. यांची बरीच गाणी ईशान्य भारतातील लोकगीतांवर बेतलेली आहेत. तिथल्या पारंपरिक संगीताचं सौंदर्य या दोघांनी हिंदी गाण्यांत अतिशय नजाकतीनं ओतलं आहे. ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे ‘अजनबी’मधलं गाणं ऐकून बघा किंवा ‘हरे राम हरे कृष्ण’मधलं ‘कांची रे कांची रे’ ऐकून बघा. अशा खूप चाली तयार झाल्या असतील. आपण त्या दीदी किंवा आशाताईंच्या आवाजात ऐकतो, तेव्हा मूळ चालींचं ते वेगळंच रूप असतं. मूळ ट्यूनपासून केवळ स्फूर्ती घेतलेली असते, बाकीची निर्मिती संगीतकाराची असते, गायक ते अधिक फुलवतो.

‘बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर दोन केवढे सक्षम पर्याय होते. एखादं गाणं दीदीला द्यावं, की आशाताईंना असा त्यांना प्रश्न पडत असेल,’ असं लोक अनेकदा म्हणतात; परंतु मला त्याहीपेक्षा पंचम यांचं जास्त कौतुक वाटतं. आशाताई तर त्यांच्या पत्नी होत्या; परंतु त्यांनी किती बरोब्बर वाटणी केली आहे बघा गाण्यांची. दीदींचं गाणं दीदींना, आशाताईंचं आशाताईंना. ‘हमशक्ल’ नावाचा चित्रपट होता, राजेश खन्ना आणि तनुजाचा. तनुजा वेडी असते आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलेलं असतं. त्यातलं गाणं आहे, ‘देखो मुझे देखो, कैसी मैं दिवानी हूँ’ हे गाणं ऐका. त्या गाण्याची स्केल बघा. एक तर पंचम यांनी ते बसवलंच खूप वेगळं आणि आशाताईंनी काय गायलंय बघा. व्यक्तिरेखा ‘वेडी’ आहे, तो वेडेपणा सुरांमधून बरोब्बर थ्रो करायचा, म्हणजे काय आव्हान होतं! त्यात सुरुवातीला आशाताई अगदी एखाद्या वेडीसारखं हसल्यादेखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याची चाल पूर्ण वेगळी आहे. वरच्या पट्टीतून थेट खालच्या पट्टीत गाणं येतं; पण आशाताईंनी ते सहजपणे पेललं आहे. ‘जवानी दिवानी’मधल्या ‘जाने जां ढूंढती फिर रहीं हूँ’मधले चढ-उतार ऐका. ‘ज्वेलथीफ’मधलं ‘रात अकेली है’ ऐका. ‘अनहोनी’ या चित्रपटातल्या ‘मैने होठों से लगाई तो हंगामा हो गया’ यातली मदहोशी अनुभवा. राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधलं ‘आनेवाला, आयेगा आनेवाला’ बघा. त्या गाण्यात केवढे चढ-उतार आहेत. ही गाणी ऐकल्यावर मग तुम्ही थेट ‘ज्यूली’मधलं राजेश रोशननं संगीत दिलेलं भजन ऐका, ‘सांचा नाम तेरा…’ काय जबरदस्त भजन आहे. त्यात सोबत उषाताईही आहेत. या गाण्यात आशाताईंचा आवाज भक्तीरसात अगदी ओथंबलेला आहे. ही रेंज कल्पनातीत आहे.

आशाताईंना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. एकदा मी आशाताईंच्या घरी जेवायला गेलो होतो. संपूर्ण टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरलं होतं. लॉबस्टर, प्राँझ, बांगडा, पापलेट, मटण, चिकन, बिर्याणी… तुम्ही नाव घ्या, तो पदार्थ टेबलवर होता. मी विचारलं, ‘आणखी कोण कोण आहेत जेवायला?’ त्या म्हटल्या ‘तुम्ही एकटेच आहात.’ मी हसून विचारलं, ‘अहो आशाताई, मला काय भस्म्या लागला का?’ तर मला म्हणाल्या, ‘सगळं खाऊ नका; पण सगळं खाऊन बघा. प्रत्येक पदार्थाची फक्त चव बघा.’ त्या दिवशी मला सुगरण या शब्दाचा खरा अर्थ कळला. गाणं असो की खाणं, प्रत्येक गोष्ट आशाताई जीव ओतून करणार. त्या साक्षात शारदा आहेत आणि साक्षात अन्नपूर्णही आहेत!

‘पुलं’चंच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात. त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं, सुसह्य केलं. त्यांना नव्वदी निमित्त त्रिवार शुभेच्छा !

– समाप्त – 

लेखक : श्री राज ठाकरे

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 156 – गीत – बहुत बहुत कहना है तुमसे… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत – बहुत बहुत कहना है तुमसे।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 156 – गीत – बहुत बहुत कहना है तुमसे…  ✍

बहुत बहुत कहना है तुमसे

सोच सोच कर रह जाता हूँ।

 

यह कहना है वह कहना है

मर्यादा के कूल कगारे-

तटवर्ती होकर वहना है।

केवल यही देखना है अब

कितनी गति है, लय है।

 

उस दिन क्या सोचा था किसने

जिस दिन पहली बार मिले थे

बर्लिन की दीवार खिंची थी

हम तुम दो दुर्भेच किले थे।

अब है निर्मल पवन प्रवाहित

अपना नील निलय है।

 

आँखों में सपन सलौने हैं

सपने क्या हैं, मृगछौने हैं

कैसे खुएँ तुम्हारा आँचल

जन्मजात ही हम बौने हैं।

जो जैसा है, सब तेरा है,

यह व्यक्तित्व विलय है।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ “मानुष हौं तो वही रसखानि” – भाग – 2 ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

☆ “मानुष हौं तो वही रसखानि” – भाग – 2 ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

कृष्णभक्त रसखान के सवैयों का काव्यानुभव (उत्तरार्ध)

प्रिय पाठकगण

सस्नेह वंदन!  

जन्माष्टमी का पर्व हमने उत्साह सहित मनाया! उस पावन पर्व के अवसर पर हम कृष्णभक्त रसखान के ‘मानुष हौं तो वही रसखानि’ इस काव्य के अन्य सवैयों का काव्यानंद अनुभव करेंगे|

धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।

खेलत खात फिरैं अँगना, पग पैंजनी बाजति, पीरी कछोटी॥

वा छबि को रसखान बिलोकत, वारत काम कला निधि कोटी।

काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥

उपरोक्त सवैये में एक गोपी अपनी सखी से कृष्ण के सुंदर रूप का वर्णन करते हुए कहती है, “अरी सखी, देख तो, धूल में खेलते खेलते कृष्ण का पूरा शरीर धूल से धूमिल हो गया है, कितना सुंदर लग रहा है ना! और हाँ देख उसके घुंघराले बाल कितनी खूबसूरती से बंधे हैं, एक चोटी उसके सर पर कैसी सज रही है (भले ही द्वारका जाकर उसे सोने का मुकुट मिला हो, परन्तु, बचपन की यह चोटी सचमुच निराली ही थी!) आंगन में खेलते हुए खाना और खाते हुए खेलना, यह दृश्य तो हृदयंगम है| खाता क्या है तो माखन रोटी| इस प्रकार दौड़ते भागते और गिरते समय उसके पैरों के पैंजनियों की छन छन करती आवाज तो अति मधुर है| यह नादब्रह्म तो सप्तसुरों के परे है अर्थात आठवाँ सुर है| स्मरण करते रहें आठवें का (कृष्ण का) आठवाँ स्वर अर्थात उसके पैंजनियों की झनकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) उसने पीत वर्ण की लंगोट पहन रखी है (बड़े होने पर पीतांबर, धन्य हो किसनकान्हा!)| इस कृष्ण के मनमोहक और मनभावन रूप ने हर किसी को पागल कर रखा है, यहां तक कि कामदेव और कलानिधि चंद्र भी उनकी सुंदरता के सामने अपने करोड़ों रूप न्योछावर कर रहे हैं। अरी सखी देख, उस मुए कौवे की किस्मत कैसी चमक उठी है, उसने सीधे सीधे कृष्ण के हाथ की माखन रोटी पर ही झपट्टा मारा और देख तो, उसे लेकर उड़ भी गया!”

कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।

मोहनी ताननि सो रसखानि अटा चढि गोधन गैहै तौ गैहे॥

टेरि कहौ सिगरे ब्रज लोगनि काल्हि कोऊ सु कितौ समुझे है।

माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥

उपरोक्त पंक्तियों में रसखान बताते हैं कि गोपियाँ कृष्ण के प्रेम में किस कदर पागल थीं। एक गोपी अपनी सखी से कह रही है, “ऐ मेरी सखी, सुन ले, जब जब कृष्ण की मंद मंद सुरीली बांसुरी बज रही हो, तब तब कोई मेरे कानों में अपनी उंगलियां डाल दे, अर्थात मैं उनकी बांसुरी बिल्कुल भी सुनना नहीं चाहती! वह मेरे घर की सबसे ऊपरी अटारीपर चढ़ आएगा और जानबूझकर गायों को चराने ले जाते समय चरवाहे गाते हैं न, वैसे ही गीत (गौचरण) गाते रहेगा, जो मेरे मन को मंत्रमुग्ध कर देंगे| लेकिन मैं सभी ब्रजवासियों को चिल्ला चिल्ला कर यहीं बताऊंगी कि, मुझे भले ही कोई भी कितना ही और कैसे भी लाख समझाने का प्रयत्न करो, परन्तु हे सखी, इस श्यामल तनु कृष्ण के चेहरे की वह मंद, मधुर मुस्कान मेरे मन पर कब्ज़ा कर रही है! मैं अपने मन को नियंत्रित नहीं कर पा रही हूँ| वह मेरे हृदयकमल के चारों ओर भ्रमर की भांति घूम घूम कर मुझसे प्रेमालाप करते हुए मधुर गुंजन कर रहा है! अर्थात् मैं कृष्ण के प्रेम में पूरी तरह डूब चुकी हूँ| मैं इतनी अधिक व्याकुल और उन्मत्त हो गई हूँ कि, क्या कहूँ और कैसे कहूँ! मैं सारी लज्जा छोड़कर श्रीकृष्ण की ओर दौड़ रही हूँ|”

मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।

ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥

भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।

या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥

इस सवैये में कवि ने कृष्ण के प्रति गोपी के अनोखे प्रेम को प्रकट किया है। देखिए कैसे वह कृष्ण की चीजें पहनने के लिए किस कदर तैयार है। वह गोपी अपनी सखी से कहती है, “हे सखी, मैं ना अपने सिर पर (कृष्ण की तरह) मोर पंख का मुकुट पहनूंगी। मैं अपने गले में गुंजा की माला डालूंगी, यह भी संभव है कि, मैं पीत वस्त्र धारण करूँ और हाथ में एक छड़ी लेकर एक ग्वालिन बनकर गायों को जंगल में चराने के लिए भी ले जाऊँ और उनके पीछे चलते हुए उनकी अच्छी तरह से रखवाली कर लूं| कृष्ण तो मुझे इतना प्रिय है कि, मैं उसके लिए जो भी हो करुँगी, उसे पाने के लिए तुम जो कहोगी वहीं स्वांग रचूंगी| परन्तु एक बात याद रखना ऐ मेरी प्रिय सखी, कृष्ण की जो मुरली है न, जिसे वे अपने अधर में रखते हैं, उसे तो किसी भी हालत में, यानि कभी भी, अपने अधर में नहीं रखूंगी!” (सौत है न!)

मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।

ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥

अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।

और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।

गोपिकाएं कहती हैं, ‘सर पर मोर पंख, होठों पर मुरलिया और गले में वनमाला पहने कृष्ण को देखकर मन हवा में कमल का फूल जिस प्रकार से लहराता है, उसी तरह झूल रहा है| मेरी ऐसी प्रेममग्न स्थिति में, यदि कोई बैरन उल्टा सीधा बोल भी दे, तो भी उसे सहन किया जाता है! रसखान कहते हैं, जब लावण्य के मूर्तिमंत रूप कृष्ण से इतने स्नेह्बंधन बंध गए हैं कि, चाहे कोई एक बात कहे, चाहे कोई लाख बार टोके, चाहे कोई और रंग हो या न हो, उस साँवरे कृष्ण सखा के रंग में ही रंगते हुए रहना है! जाते जाते इसी अर्थ के निकट जाता हुआ प्रसिद्ध मराठी गायिका माणिक वर्माजी के गाने का स्मरण हुआ, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’ (अर्थात उस श्यामल तनुको देखते ही मैं उन्मना अवस्था में पहुंची हूँ, अब यह समझ नहीं पा रही हूँ कि, इस उन्मुक्त मन पर कैसे काबू रखूं|)

जिसके गले में वैजयंतीमाला शोभायमान होती है ऐसे कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवन श्रीकृष्ण के चरणों में यह शब्द कुसुमांजली अर्पित करती हूँ!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 144 ☆ निर्मळ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 144 ? 

☆ निर्मळ…

मनाची औदार्यता असावी

मनाची सौंदर्यता जपावी

मन उदार करून सहज

स्नेहाची उधळण करावी…!!

 

स्नेहाची उधळण करावी

सहिष्णूता, जपावी

वाट्यातील वाटा देतांना

अहंकाराची झालर नसावी…!!

 

अहंकाराची झालर नसावी

सहजतेने मुक्त व्हावे

क्षणभंगूर जीवनात आपुल्या

काहीतरी निर्मळ कार्य करावे…!!

 

काहीतरी निर्मळ कार्य करावे

कीर्ती गंध पसरवून द्यावा

शेवटी काय राहते भूव-री

याचा विचार स्वतः करावा…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर. आता इथून पुढे)

आपल्यावर खूप अन्याय झालाय आणि काही झालं तरी याचा बदला आपण घ्यायचाच असा ठाम निश्चयही त्याने आता केला. इतकी वर्षे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब करत, तो मानवी नात्यांपासून दूर राहिला. त्याने कुणाला संधीच दिली नाही, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण करायची.

डॉ. हंसा दीप

कोर्टाने जेव्हा त्याला, जोएना आणि कीथ या दांपत्याच्या हवाली केलं तेव्हा त्याच्या माथ्यावर एक छत आलं. रहाण्यासाठी चांगलं घर, आणि जगण्यासाही जे जे आवश्यक, ते सारं तिथे होतं. या दोघा पती-पत्नीमध्ये कधी भांडणे झालेली त्याने पाहिली नाहीत. सगळे कसे हळू आवाजात विनम्र होऊन बोलायचे. त्या घराने कधी, कुणाचा मोठा आवाज ऐकला नव्हता. त्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे, हे कधी ल्क्षातच आलं नाही त्याच्या. त्याला वाटायचं, पोलीस आणि कोर्ट यांच्या भीतीमुळे, ते त्याच्याशी चांगलं  वागतात. थोडा जरी आवाज झाला, तरी तो खडबडून उठून बसे. त्याला वाटायचं, आत्ता त्याच्या थोबाडीत बसेल. असेच दिवस जात राहिले. होता होता तो सतरा, अठरा वर्षाचा झाला. या दरम्यान त्याचे दत्तक आई-वडीलही गेले. तो शाळेत गेला होता. दोघेही रेग्युलर चेक आपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. ते परत कधी आलेच नाहीत. तो शाळेतून परत आला, तेव्हा नातेवाईकांची, परिचितांची तिथे गर्दी झाली होती. त्याच्या कानावर आलं, की रस्त्यावर एका अपघातात, त्या दोघांचा मृत्यू झालाय. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिथे राहायला सांगितलं. पण तो आपल्याच नादात मुक्त पक्षाप्रमाणे, आपली वाट शोधत आपलं घरटं बनवण्यासाठी तिथून बाहेर पडला.

आता तो एकटा… अगदी एकटा होता. त्याच्या आई-वडलांना त्याच्यापासून हिरावून घेणं, हा त्याच्यावर झालेला अन्याय होता. त्यानंतर तो मिळेल ते आणि जमेल तसं काम करू लागला आणि स्वत:च स्वत:चा चरितार्थ चालवू लागाला. स्वत:ला खूश ठेवण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं, ते सारं त्याने केलं, पण तो कुणाचा मित्र नाही बनू शकला. त्याला एकच भीती होती, कुणी त्याच्या जवळ आलं आणि हिंसक बनलं, तर काय होईल?

तो बुद्धिमान होताच. मनापासून अभ्यासही केला. जोएना आणि कीथने त्याच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च केला होता. तो त्यांना निराश करणार नव्हता. ते चांगले होते, पण त्याला सतत वाटायचं, की त्यांनी त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवायला नको. त्याचंच त्याला दु:ख व्हायचं. त्यांचं लाडा-कोडाचं वागणं, त्याला पोकळ वाटायचं. सगळ्यात त्याला जास्त भीती कशाची वाटायची, तर त्याच्या आत धुमसणार्‍या संतापाची. तो कधीही उसळून बाहेर येऊ शकत होता.

सगळ्याचा विचार करता करता तो खूप पुढे आला होता. आता या मनोकामनेचा अंत करण्याच्या दृष्टीने तो खूप जवळ पोचला होता. बस्स! ही शेवटचीच लाल बत्ती. त्यानंतर तो लगेचच त्या ठिकाणी पोचेल.

‘अरे साशा तू? ‘ शेवटच्या लाल दिव्याशी गाडी थांबली, तेव्हा कुणी तरी हवेत हात फडकावत म्हंटलं.

आपलं नाव ऐकल्यावर तो गडबडून गेला. त्याला वाटलं, कुणी तरी आपली चोरी पकडलीय. त्याने वळून पाहिलं. ती लीसा होती. ती आत्ता इथे काय करतेय? साशाला प्रश्न पडला. ती नेहमीच साशाच्या अवती-भवती रेंगाळायची. पण काम झाल्यावर. ‘आत्ता इथे…?’ ही तर कामाची वेळ होती. आज त्याच्याप्रमाणेच लीसानेही कामातून रजा घेतली आहे का? यावेळी लीसाशी बोलत राहीलं, तर तो आपल काम करू शकणार नाही. तिची नजर चुकवून निघून जाणंच योग्य होईल. त्याने तिला न पाहिल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत काही तरी शोधत असल्याचे नाटक करू लागला. तिथे खरं तर काहीच नव्हतं.

“साशा, साशा!” ती इतकी मोठमोठ्याने ओरडत होती, की आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तर लोक तिला वेडीच समजतील. त्याला हार मानावी लागली.

हो. मीच! सगळं ठीक आहे ना? तू यावेळी इथे कशी? कामावर गेली नाहीस का? ‘ साशाच्या स्वरात आश्चर्य होतं आणि पाठ सोडवून घ्यायची घाईही होती.

‘आज मी रजा घेतलीय, पण तू इथे कसा? तू पण रजा घेतलीयस का?’

‘रजा नाही घेतली. पण एका मित्राला घर बदलण्यासाठी मदत करतोय. त्यानंतर कामावर जाईन.’

‘चल साशा! कॉफी घेऊयात. नंतर जा म्हणे.’ लीसाच्या डोळ्यात चमक होती, ’ठीक आहे’ साशा म्हणाला. दिवा बदलला होता आणि त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोचायचं होतं. मधेच लीसा आली, तर सगळंच अवघड झालं असतं. त्यापूर्वी तिच्याबरोबार कॉफी होऊन जाऊ दे. काही बिघडत नाही. थोड्या वेळाने तो आपलं काम करू शकतो.

लीसाला पसंतीचा अंगठा दाखवून त्याने आधी विचार करून ठेवला होता, तिथे गाडी पार्क केली. आजचीही मुलाखत लीसाला संस्मरणीय वाटायला हवी, असा विचार करत तो तिच्यासोबत आत जाऊन बसला. त्याच्या आतल्या धोकादायक इच्छांचा तिला वासही लागू नये, यासाठी नेहमीपेक्षा तो जास्तच काळजी घेत होता. लीसाला जरा आश्चर्यच वाटलं.

‘काय झालं? आज जरा वेगळा वाटतोयस तू! ‘ लीसा म्हणाली. या आकस्मिक झालेल्या भेटीचा आनंद लीसाच्या चेहर्‍यावर झळकत होता. 

‘लीसा आज तू फार गोड दिसते आहेस.’ लीसाच्या डोळ्यात बघत तो प्रेमाने म्हणाला.

 ‘आज तू प्रथमच माझ्याकडे नीटपणे बघतोयस.’ आपले खोडकर डोळे नाचवत लीसा म्हणाली.

‘ मग काय आधी डोळे बंद होते? ‘ सगळं माहीत असूनही साशा आजाण बनू पहात होता. त्याला अभिनय काही करता येत नव्हता. आज प्रथमच तो अगदी मनापासून बोलत होता.

‘मला तरी असंच वाटतय, की तू कधी माझ्याकडे नीटपणे पाहीलंच नाहीस. मीच तेवढी अशी आहे, की कित्येक दिवसापासून तुझ्या मागे मागे फिरते आहे आणि एक तू आहेस, जो माझ्यापासून दूर दूर पळतो आहेस.’

‘माहीत आहे.’ हत्यार खाली ठेवण्यातच आपली भलाई आहे, हे साशाच्या लक्षात आलं.

‘शाळेपासून हे असंच चाललय. कधी कधी मला वाटतं मी वेडी आहे, जी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतेय. मरतेय तुझ्यासाठी. आता तर आपण दोघे मिळवायलाही लागलोत. आता तू कुठल्या गोष्टीसाठी वाट बघतोयस, कुणास ठाऊक?’ लीसा आणखी थोडी त्याच्याजवळ सरकली. तिची जवळीक साशाला चांगली वाटली. शरीराच्या ऊबेचं आकर्षण प्रथमच त्याला जाणवलं. एक वेगळीच ओढ, ज्याच्या पकडीत तो यापूर्वी कधीच आला नव्हता.

लवकरच कळेल तुला, मी कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतो.’ तिचे हात आपल्या हातात घेऊन साशा म्हणाला आणि क्षणभर विसरलेलं त्याचं लक्ष्य त्याच्यासमोर आलं.

‘खरच!’  त्याच्या हाताचं चुंबन घेत लीसा म्हणाली, ‘ओह! साशा, चल, मग आपण लग्न करू. आता प्रतीक्षा करणं आवघड झालय! ‘

‘लीसा तू चांगली मुलगी आहेस. किती तरी चांगली मुले तुला मिळू शकतील. ‘ तिचा आनंद साशाला जाणवत होता, पण एक शंकाही होतीच.

‘अनेक जण मिळतील, पण तू नाही ना मिळणार! बरं ते जाऊ दे. हा भाड्याचा ट्रक घेऊन तू निघलाहेस कुठे? घर बदलण्यासाठी कुठल्या मित्राची मदत करायला निघाला आहेस?’

‘आहे एक जुना दोस्त. ‘ पुन्हा एकदा आपली विचारांची गाडी रुळावर आणीत साशा म्हणाला. ‘लीसा प्लीज़ आता मला जाऊ दे. जरा घाईत आहे. ल्ग्नासारख्या गोष्टीवर विचार करण्यासाठी थोडा वेळ तरी हवा ना!’

‘ हो! हो! नक्कीच! जरूर वेळ घे, पण इतकाही वेळ लावू नको, की आपण म्हातारे होऊ. पण साशा आज आणखी थोडा वेळ थांब ना! जीवनातील हे रोमांचक क्षण, मी आणखी थोडा वेळ अनुभवू इच्छिते.’ लीसाला प्रथमच इतक्या निवांतपणे    साशा भेटला होता आणि हे क्षण ती हातचे जाऊ देऊ इच्छित नव्हती.  

‘ नाही लीसा मला जायला हवं. मी माझ्या दोस्ताला वेळ दिलीय.’  साशाच्या डोक्यातील विचारांची वावटळ त्याला घाई करायला उसकत होती.

‘मी पण येऊ का तुझ्याबरोबर?’

‘नको.’ तिचा पाठलाग चुकवणं, तसं आधीपासूनही त्याला अवघड वाटायचं. तिला खूप आवडायचा तो, पण तिला माहीत नाही, आज त्याचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास आहे. आज त्याचात परिवर्तन होणार आहे. यानंतर ना आठवणी रहातील, ना तो. ना भूतकाळ राहील, ना भविष्यकाळ.

कॉफी शॉपमधून उठून आता तो तिला बाय म्हणत होता, एवढ्यात त्याच्या समोरून एक ट्रक धडधडत- खडखडत निघाला आणि फुटपाथवर चढला. फुटपाथवर चढताच त्याने अशी गती पकडली की जणू जमिनीवर कुणीच नाही आहे. त्याचा अ‍ॅक्सीलेटर दाबला जात होता आणि किंचाळ्यांचा आवाज  आकाश फाडू पाहात होता. भूकंप झाला होता जसा. जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. कुणी वाचले. कुणी टायरच्या खाली आले. कुणी मधेच अडकून ओढले जाऊ लागले. आता सगळीकडून पायी चालणारे वाट फुटेल तिकडे अंदाधुंद पळत सुटले. गर्दीला डोळे नव्हते. गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्‍हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही.

क्रमश: भाग ३

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी. आता इथून पुढे)

त्याच्या मनात आलं, या सार्‍यासाठी मग आजचाच दिवस का निवडू नये? आज जीवनातला आपला खास दिवस आहे. आज आपला वाढदिवस आहे. भयमुक्त होण्यासाठी, यापेक्षा दुसरा चांगला दिवस कोणता असेल? आज नाही केलं, तर पुन्हा कधी करायला जमेल?

अकस्मात मनात आलेल्या या विचारात त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी दडून राहिलेला उन्माद सामील झाला. त्याच उन्मादाने रस्ता दाखवला. एका भाड्याने मिळणार्‍या गाडीच्या ऑफीसचा. त्याने अनेकदा कार, जीप भाड्याने घेतली होती. मग विचार केला, आज एक ट्रकच भाड्याने घेतला तर- नंतर विचार करू काय करायचं ते. जेवढ्या त्वरेने हा विचार त्याच्या मनात आला, तेवढ्या त्वरेने त्याने तो अमलातही आणला. नाही तर एखादा निर्णय घेण्यासाठी त्याला किती तरी दिवस, महीने, वर्षसुद्धा लागायचं.

डॉ. हंसा दीप

साशाने एक छोटा ट्रक भाड्याने घेतला आणि वेगाने ट्रक चालवू लागला. त्याच्या गतीपेक्षा त्याच्या डोक्यातील विचारांची गती किती तरी पटीने जास्त होती. आज तो तीस वर्षांचा झाला होता. पूर्णपणे लायक झाला होता. आज नाही, तर पुन्हा कधीच नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायला, तो अगदी उतावीळ झाला होता. शांती आणि सौहार्द बाळगत तो इथपर्यंत पोचला होता. आता यापेक्षा तो जास्त प्रतीक्षा करू शकत नव्हता.

एक गोष्ट करणं शक्य होतं. गाडीचा वेग वाढवायचा. ती फुटपाथवर चढवायची. फुटपाथवर असलेल्या लोकांना चिरडत सुसाट वेगाने गाडी पुढे न्यायची. रस्त्याच्या शेवटी कडेला जे झाड आहे, त्याला गाडी टकरवायची. मग गाडीही वाचणार नाही आणि तोही.  गाडीला नंतर आग लागली, आणि त्याची नावनिशाणीही मिटून गेली, तर सोन्याहून पिवळं. आणि अशा तर्‍हेने त्याच्या ‘मिशन सूड’ या मोहिमेचा यशस्वी अंत होईल. तो तृप्त होईल आणि समाधानाने मरेल.

पण का  कुणास ठाऊक, गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळली. कदाचित आपल्या घराचा निरोप घ्यावासा वाटला त्याला. धिम्या गतीने तो गाडी चालवत होता. त्याला लोकांना भासवायचं होतं की तो घर बदलतोय आणि सामान घेऊन जाण्यासाठी त्याने ट्रक आणलाय. तो मात्र घरच नव्हे, तर शहर, देशच काय जगही बदलायची इच्छा धरून आलाय. घराजवळ त्याच्या परिचयाचे अनेक चेहरे आपल्या कामावर जाताना त्याला दिसत होते.

“गुड मार्निंग, काय म्हणातोयस दोस्त?” जवळून निघलेला जेसन एका क्षणासाठी थांबला. तो कामावर जाताना रोजच सकाळी भेटायचा.  जेसनच नव्हे, तर अनेक लोक याचवेळी कामावर निघण्यासाठी बाहेर पडत.

“गुड मार्निंग जेसन, सगळं ठीक आहे.” आपले हात हवेत पसरून त्याच्या अभिवादनाला उत्तर देत, साशाने स्मितहास्य केलं.

‘आज ट्रक घेऊन कामावर निघालायस?’

‘हं! एका दोस्ताचं सामान शिफ्ट करायचय. नंतर कामावर तर जायलाच हवं!’

‘ काम तर करायलाच हवं! ठीक आहे परत भेटू!’

जेसन तिथेच कुठे तरी रहायचा. तसेच आणखी काही लोक होते। येता-जाता दिसायचे. त्यापलीकडे कुणाशी तसा काही संबंध नव्हता. रोज याच वेळी भेटणार्‍यांना हाय-हॅलो करून तो पुढे निघाला. कुणालाही जराशीही कुणकुण नव्हती की आजचा दिवस त्याच्यासाठी किती खास दिवस आहे. मुक्तीचा दिवस. त्या विचारातून मुक्ती मिळवण्याचा दिवस, ज्या विचाराने आजपर्यंत त्याची पाठ सोडली नव्हती. त्या जखमेपासून मुक्ती, जिची वेदना त्याला रक्तबंबाळ करत त्याच्या काळजापर्यंत पोचली होती. शरीराचे घाव केव्हाच भरून आले होते, पण त्या जखमांनी मनावर घातलेले घाव अजूनही ताजेच होते. त्यामुळे आजपर्यंत तो कुणालाही आपलं मानू शकला नाही. प्रत्येक जण त्याला दहशतवादीच वाटायचा. मुखवटा घालून आलाय आपल्यापुढे, असं वाटायचं त्याला. मुखवटा काढला, तर आत हिंसक पशूच असणार आहे, जो त्याला पकडीत जखडणार आहे असं वाटायचं त्याला. तो धडपडेल. तडफडेल. मदतीसाठी इतरांना हाका मारेल, असे विचार त्याच्या मनात यायचे.

साशाचे पालन-पोषण करताना, त्याच्या दत्तक माता-पित्यांनी त्याला खूप काही शिकवलंही होतं. अनेकदा भूतकाळ त्याची पाठ सोडायचा, तेव्हा तो असा माणूस बनायचा, की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटायचा. प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करू लागायचा. रुंद कपाळ, भुरे केस, छोटीशी फ्रेंच कट दाढी. मोठा आकर्षक दिसायचा तो. त्याचे नाव घेऊन मुली दीर्घ निश्वास टाकत. त्याची शालीनता बघून अनेक जणी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत. पण कुणीच त्याच्या मनाच्या तळापर्यंत पोचली नाही. एक एक करत सगळ्यांनी आपले हत्यार टाकले. अपवाद फक्त लीसाचा.

लीसा अजूनही त्याच्या मागे आहे. तिचं शालेय शिक्षण त्याच्याबरोबरच झालय. अनेकदा ती त्याला भेटायला येते. त्याच्या घराच्या बाहेरही आणि कामाच्या बाहेरही.  साशाने तिची उपेक्षा केली, बघून न बघितल्यासारखं केलं, तरी ती आपली सावलीसारखी त्याचा मागे असते. तिचा स्वत:चा परिवार आहे. ती कामदेखील करते. साशाला कधी कधी समजतच नाही की साशा तिच्यापासून दूर का रहातो?       

साशाची इच्छा असूनही तो लीसाला समजावू शकला नाही, की ती त्याला आवडते, पण त्याच्या आत जी भीती आहे, तिला तो घाबरतोय. ती भीती त्याला अशा तर्‍हेने जखडून टाकते, की कुठल्याही व्यक्तीतला चांगुलपणा त्याच्या ल्क्षातच येत नाही. त्याला नेहमी तेच तेच आणि तेवढंच दिसतं. चांगल्या चेहर्‍यांच्या आतही त्याला कुठे ना कुठे तरी पशुता दृष्टीस पडते. मनापासून वाटूनही पापुद्र्यांखाली जमलेल्या भीतीपासून त्याला मुक्ती मिळत नाही. ओल्या मातीला जसा आकार दिला जाईल, त्याच आकारात ती वस्तू कायम रहाते, तुटल्या-फुटल्याशिवाय या वस्तूचं दुसरं काहीच होऊ शकत नाही तसंच. साशाचं बालमनदेखील त्या भीतीत असं घट्ट जखडलं गेलय, इतकं पक्कं झालय की बदलायला तिथे कुठे वावच उरला नाही.

लीसाकडेदेखील, तो त्या पद्धतीने बघू शकला नाही, ज्या पद्धतीने त्याने बघावं, असं लीसाला वाटत होतं. साशालादेखील तिच्या संगतीत खूप छान वाटायचं. तो तिच्या संगतीत वेळ घालवू इच्छ्त असे. पण काही क्षणातच ते विचार त्याच्या डोक्यात प्रहार करू लागत, आणि ते त्याला एकटं  राहायला भाग पाडत. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एक दिवस लीसा साशाला म्हणाली, ‘ मी तुला मुळीच आवडत नाही का? ‘

या प्रश्नासाठी तो तयार नव्हता. उत्तर लगेच द्यायला हवं होतं. त्यामुळे गोष्ट घुमवून फिरवून तो बोलू शकला नाही. तो म्हणाला, ‘तू मला खूप आवडतेस.’

‘खरंच!’ लीसाचे डोळे चमकले. साशाच्या डोळ्यात खोलवर काहीतरी शोधताना तिचा चेहरा प्रफुल्लित झाला. तिच्या आंगोपांगातून खुषी झळकू लागली. असं उत्तर येणं तिच्यासाठी खूप रोमॅंटिक होतं आणि खूप रोमांचकही.

‘ हो. अगदी खरं!’ तो स्वत:ला थोपवू शकला नाही. एका तरुण हास्यासह तो तिच्याकडे एकटक बघत राहिला.

‘मग माझ्यापासून दूर का रहातोस?’

‘कारण मी अजून तरी कुठलंही नातं जोडायला तयार नाही.‘

‘ काही हरकत नाही. मी समजू शकते. तुला हवा तेवढा वेळ तू घे. मला तुझी सदैव प्रतीक्षा राहील.’

लीसा आसपासच कुठे तरी राहायची  आणि साशाची येण्या-जाण्याची वेळ बघून त्याला भेटण्याचा प्रयत्न करत करायची. साशादेखील सामान्य दिसण्याचा, रहाण्याचा प्रयत्न करत रहायचा. आपल्या आत कोणतं युद्ध चालू आहे, याची त्याने कुणालाही जराही जाणीव होऊ दिली नव्हती.

जेव्हा भूतकाळच्या आक्रमणापासून तो दूर असायचा, तेव्हा तो सगळ्यांना खूप मदत करायचा. सगळ्यांच्या मनात त्याने आपल्यासाठी खास जागा निर्माण केली होती. गरजावंतांसाठी जे जे करणं शक्य असेल, ते ते तो करत होता.     आज मात्र तो जसा विचार करत होता, तसा त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता. आज त्याच्यात इतकी आकड आली होती, की स्वत:ला सशक्त दाखवण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो निघाला होता. टोरॅंटो शहराच्या नार्थ यॉर्क एरियात, फिंच अ‍ॅव्हेन्यूपासून पुढे जात  यंग स्ट्रीट आणि शेपर्ड अ‍ॅव्हेन्यूच्या चौकाजवळ त्याला पोचायचं होतं. आपलं काम पूर्ण करण्यासाठी. त्या प्रत्येक घटनेबद्दलचा न्याय मिळवण्यासाठी, काही खास लोकांचे चेहरे काजव्याप्रमाणे चमकत होते आणि अदृश्य होत होते. त्याच्यावर दया दाखवणार्‍यांचेही चेहरे त्यात सामील होते.

‘बिच्चारा..’

‘राक्षसाच्या घरात जन्माला आलाय हा निष्पाप मुलगा…’

‘मार खाऊन खाऊन दिवस काढतोय.‘   

‘सारखा भेदरलेला असतो. ‘

लोक दहा तोंडांनी बोलत. जेवढी तोंडे, तेवढे बोल. सगळ्यांची तोंडे तो आता बंद करेल.

गाडी पुढे… पुढे… पुढे चालली होती. लाल दिवा, हिरवा दिवा, याच्याबरोबर त्याच्या छातीची धडधड वाढत होती… कमी होत होती. दुपारची वेळ होती. रहदारी जास्त नव्हती. एकदा तिथे पोचलं, की गाडी कुठून कशी वर चढवायची, याचा तो विचार करणार होता. आपल्या हातातलं स्टियरिंग व्हील त्याने आशा तर्‍हेने धरून ठेवलं होतं, जशी काही  कुणाची तरी मानगुटच त्याने धरून ठेवलीय. त्याला जुनी आठवण झाली. मागे एकदा त्याच्या वडलांनी त्याची अशीच मानगुट धरून ठेवली होती. ती कशी बशी सोडवून घेऊन तो आपल्या खोलीत आला होता. खोलीचा दरवाजा बंद करून तो दिवसभर आत उपाशी तापाशी तसाच बसून राहिला होता. अशीच एकदा त्याच्या आवडत्या सायकलीची मोडतोड करण्यात आली होती. सायकलीच्या प्रत्येक भागाचे तुकडे तुकडे होत असलेले बघताना त्याला वाटत राहिलं, आपल्या शरिराचेच बोटा बोटाएवढे तुकडे होऊन फेकले जाताहेत. सायकलचा प्रत्येक भाग तोडताना होणारा आवाज त्याला आपल्याच ओरडण्यासारखा वाटला, मदतीसाठी जणू तो कुणाला तरी हाका मारत होता.

त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर.

    क्रमश: भाग २

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पल-पल ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – पल-पल ? ?

छोटी-सी थी

कितनी बड़ी हो चली है,

बूँद-सी लगती थी

धारा बन बह चली है,

जीवन की गति पर

आश्चर्य जता रहा था,

दर्पण में दिखती

अपनी उम्र से बतिया रहा था,

आश्चर्य पर हँस पड़ी वह

कुछ यूँ कहने लगी वह,

धीमे चलने, पिछड़ जाने

का सोग जीवन भर रहा,

आगमन-गमन की घटती दूरी पर

कभी चिंतन ही न हुआ,

बीता कल, आता कल,

कल हुआ हरेक पल,

भूत,भविष्य की चर्चा में

हाथ से निकला हर पल,

यह पल यथार्थ है

यह पल भावार्थ है

इस पल को साँसों में उतार लो

इस पल को रक्त में निचोड़ लो

अन्यथा दर्पण हमेशा है,

बढ़ती उम्र हमेशा है,

कल होता पल हमेशा है,

और बातूनी तो

तुम हमेशा से हो ही..!

© संजय भारद्वाज 

प्रातः 7:19 बजे, 01.01.2019

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 माधव साधना- 11 दिवसीय यह साधना  बुधवार दि. 6 सितम्बर से शनिवार आज 16 सितम्बर तक चलेगी💥

🕉️ इस साधना के लिए मंत्र होगा- ॐ नमो भगवते वासुदेवाय 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा – लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा – लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

ओरिसा हे राज्य सुंदर घनदाट जंगलासाठी आणि चिलका सरोवरासाठी प्रसिद्ध आहे.  त्याचप्रमाणे तेथील मंदिरे सुद्धा प्रसिद्ध आहेत. प्राचीन भारतीय वास्तुशिल्पांचा अप्रतिम नमुना म्हणजे पूरीचे जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचे सूर्यमंदिर. 

माझा एका तत्त्वावर दृढ विश्वास आहे. ते तत्त्व म्हणजे आमची कंपनी कोणत्याही प्रदेशात एक डेव्हलपमेंट सेंटर उघडते, तेव्हा त्याचबरोबर आमच्या इन्फोसिस फौंडेशनचे कार्य सुद्धा त्या भागात तात्काळ सुरू झाले पाहिजे.  याच कारणाने आमच्या फौंडेशनचे कार्य ओरिसामध्ये सुरू झाले. ओरिसा राज्यात प्रचंड गरिबी आहे व त्या भागात सुमारे  १३,५०० बिनसरकारी (एनजीओ) संस्था गरिबातील गरिबांची मदत करण्यासाठी कार्यरत आहेत.

ओरिसा राज्यात बरेच आदिवासी आहेत. सर्व आदिवासी वस्त्या घनदाट जंगलातील दुर्गम भागात आहेत. त्यांच्या स्त्रिया गडद रंगाच्या साड्या परिधान करतात. पोपटी,  गडद पिवळ्या, गडद लाल आणि काळ्याभोर केसाचा अंबाडा घालून त्यात फुले माळतात. ओरिसाच्या जंगलातून प्रवास करत असताना या स्त्रिया दृष्टीस पडणं हा एक सुखद अनुभव असतो.

एकदा मी कलाहंडीला निघाले होते. ते गावही म्हणता येणार नाही, शहरही म्हणता येणार नाही. तिथली खास प्रसिद्ध म्हणता येईल अशी एकही गोष्ट सांगता येणार नाही.  माजुर भुंज किंवा कोरापुट प्रमाणेच ही पण एक आदिवासी वस्ती आहे. 

असं म्हणतात की स्वातंत्र्यपूर्ण काळात या कलाहंडीवर एक राजा राज्य करत होता.  हा राजाच आपला प्रतिपाळ करणारा, तारणहार आहे असा तेथील आदिवासींचा विश्वास होता व त्या राजाला दैवी शक्ती प्राप्त आहे,  अशीही त्यांची समजूत होती. हे आदिवासी इतके निष्पाप आहेत की राजेशाही संपुष्टात आली असल्याची त्यांना कल्पनाही नाही. अजूनही एखादं मुलं अनाथ झालं तर ते त्याला नेऊन कलेक्टरच्या दारात ठेवून येतात. त्यांच्या दृष्टीकोनातून राजा हा त्यांचा सर्वश्रेष्ठ त्राता असतो.

कलाहंडीचे जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे भवानी पट्टनम.  ते इतर जिल्ह्याच्या ठिकाणांपेक्षा निराळ आहे.  ते एक छोटसं गाव आहे.  मी आज पर्यंत जी काही जिल्ह्याचे ठिकाण पाहिली, त्यापेक्षा ते अगदीच वेगळे आहे, उदाहरणार्थ माझं जन्मगाव म्हणजे धारवाड.  खरंतर हे भवानी पट्टनम इतकं झोपाळलेलं गाव आहे हे पाहून मला फार आश्चर्य वाटलं. 

त्या गावातील अनाथ मुलांसाठी, अविरतपणे काम करत असलेल्या एका एनजीओला भेटायला मी गेले होते. त्याच्या डोक्या वरील प्रत्येक पांढरा केस त्याच्या आयुष्यभराच्या निस्वार्थ त्यागाची कहाणी सांगत होता.  या अनाथ मुलांची सेवा करताना स्वतःच्या मनात कोणतीही प्रतारणा येऊ नये यामुळे त्यांनी स्वतः विवाहसुद्धा केला नव्हता.

भुवनेश्वर पासून केसीना या भवानीपट्टनमच्या जवळच्या रेल्वे स्टेशन पर्यंतच्या प्रवासात मी या आदिवासीचं निरीक्षण करत होते.  ते आपली ट्रेन येण्याची वाट पाहात अत्यंत शांतपणे प्लॅटफॉर्मवर थांबत. ते अननस, रानटी केळी, बटाटे अशा विविध वस्तू बांधून घेऊन निघालेले असत.

माझ्याबरोबर एक दुभाष्या होता. कोणत्याही भागातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन काम करायचं तर त्या भागातील लोकांची भाषा येणे अत्यंत महत्त्वाचा असतं.  या आदिवासी विषयी माझ्या मनात हजारो प्रश्न उमटले होते.  संस्कृती विषयी त्यांच्या काय कल्पना होत्या, त्यांची जीवन पद्धती कशी होती इत्यादी. हे आदिवासी नेहमी घोळक्यानेच राहतात असं मला सांगण्यात आलं होतं. आपण सुसंस्कृत लोक रूढी परंपरांचा आणि रितीरिवाजांचा जसा बाऊ करतो तसा हे लोक करत नाहीत.

त्यांचं वागणं सरळ, साधं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी मालमत्तेची संकल्पना त्यांच्यात जवळ जवळ आढळतच नाही.  या लोकांची जवळून ओळख करून घेण्याची मला तीव्र इच्छा होती.  त्या लोकांना कोणत्यातरी मार्गाने काहीतरी मदत करावी व त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये,  त्यांची स्वतःची ओळख हरवली जाऊ नये हा माझा उद्देश होता.

या लोकांची गाठ घेण्यासाठी मला किमान दोन मैल पायी चालावं लागेल असं मला माझ्या दुभाष्याने सांगितलं. त्यांच्या छोट्या घरापर्यंत पोहोचायला गाडीचा रस्ताच नव्हता. मी तयार झाले. 

बराच वेळ चालल्यावर अखेर एक गाव लागलं. मला एक स्त्री भेटली. मला तिच्या वयाचा काही अंदाज करता येईना. तिच्या तोंडची बोली भाषा जरा वेगळीच होती. त्यामुळे आमच्या दुभाष्याला तिचं बोलणं मला समजावून सांगण्यास जरा कष्ट पडत होते. ती स्त्री काळीसावळी, काळ्याभोर केसांची होती.  ती सहज सत्तर वर्षाची असेल,  पण तिच्या डोक्याचा एकही केस पांढरा नव्हता. तिने केसांना रंग वगैरे लावलेला असण्याचा प्रश्नच नव्हता. मग तिचं गुपित तरी काय असावं ? त्या दुभाष्यालाही काही सांगता येईना.  पण हे गुपित तिचं एकटीचंच नव्हे तर त्या वस्तीतील प्रत्येकच माणसाचं होतं,  कारण त्यांच्यापैकी कुणाचाही एक सुद्धा केस पांढरा नव्हता.

त्यानंतर मला एक म्हातारा माणूस भेटला. मी म्हातारा म्हणते आहे खरी.. पण त्याचं सुद्धा वय नक्की किती असावं हे सांगणं फार कठीण होतं. आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घडलेल्या घटनांचे संदर्भ दिले,  त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशेचार वर्षाचं असावं. 

या म्हाताऱ्याशी माझं संभाषण चांगलं रंगतदार झालं. मी त्याला विचारलं,  आपल्या देशावर कुणाचे राज्य आहे ?

त्याच्या दृष्टीने देश याचा अर्थ कलाहंडी एवढाच होता, हे उघडच होतं. त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला. तुम्हाला माहित नाही ? आपल्या देशावर कंपनी सरकारचं राज्य आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ईस्ट इंडिया कंपनी.  भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, याची त्या म्हाताऱ्याला कल्पना नव्हती. 

मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोक चक्र दाखवलं.  

पण त्यांचा त्याच्यावर काही प्रभाव पडला नाही.  हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे.  त्याच्याकडे पाहून थोडेच कळणार आहे,  आपल्यावर कुणाचे राज्य आहे ते ? आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे.

इंग्लंडची ती गोरीवाली राणी आता परत गेली आहे व तिचा आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला,  पण त्याला काही ते पटेना. 

आदिवासी जमातीमध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्त्वाची असते, याची मला पूर्ण कल्पना होती.  त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला.  हे पहा,  या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण, खूप खूप साड्या, मिठाची गोणी, आगपेटया….अगदी जमिनीचा तुकडा सुद्धा विकत घेता येऊ शकतो,  याची तुम्हाला कल्पना आहे का ?

त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही लोक आपापसांत भांडता,  वाडवडिलांनी ठेवलेल्या जमिनी सोडून दुसरीकडे जाता,  आपलं हे जंगल सोडून शहरात जाता.  त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्ष जगलोच ना ? आमचे वाडवडील सुद्धा जगले.  आम्ही देवाची लेकरे.  या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहात आहोत. ही देवभूमी आहे. ही जमीन कोणाच्याच मालकीची नाही. इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही.  कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही. वारा आमची आज्ञा पाळत नाही.  पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही. या तर देवाच्या देणग्या. या भूमीची खरेदी विक्री आम्ही कोण करणार ? मला हेच तुमचं समजत नाही. जर इथलं काहीच तुमच्या मालकीचं नाही, तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाच्या जोरावर करता ? तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडेल.  

त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं,  ते काही मला समजेना.  त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशीच समजूत होती की,  माझं ज्ञान त्याच्याहून जास्त आहे.

चलनवाढ आणि घट,  राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहिती आहे.  इथे या माणसाला या सगळ्या कशाचीही माहिती नव्हती.  पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता.  भूमी, पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकीण नसते हे त्याला माहित होतं. 

मग जास्त सुसंस्कृत कोण ? कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हातारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares