हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 30 – सजल – सौगंध खाई निभाने की खूब मगर… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है दोहाश्रित सजल “सौगंध खाई निभाने की खूब मगर… । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 30 – सजल – सौगंध खाई निभाने की खूब मगर… 

समांत -आने

पदांत -लगे हैं

मात्रा भार -२२

 

दोस्त देखकर आँखें चुराने लगे हैं ।

मित्रता की तराजू झुकाने लगे हैं।।

 

सौगंध खाई निभाने की खूब मगर,

सीढ़ियांँ जब चढ़ीं तो गिराने लगे हैं।

 

खाए कभी सुदामा ने छिपाकर चने,

गरीब को चुभे दंश रुलाने लगे हैं।

 

कन्हैया सा दोस्त,अब मिलेगा कहाँ,

प्रतीकों में बनकर लुभाने लगे हैं।

 

भूल जाने की आदत सदियों से रही ,

आज फिर नेक सपने सुहाने लगे हैं ।

 

स्वार्थ की बेड़ियों में बँथे हैं सभी,

खोटे-सिक्कों को सब भुनाने लगे हैं।

 

तस्वीरें बदली हैं इस तरह देखिए,

चासनी लगा बातें, सुनाने लगे हैं ।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-1 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-1 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सव्वा लाख क्यूसेक पाणी!म्हणजे किती कोणास ठाऊक! पुराच्या काळात रोज एवढं पाणी कोसी नदीतून वाहत असतं. एरव्ही मात्र, सप्टेंबर महिन्यात फक्त पाच लाख क्यूसेक एवढंच वाहतं. आणि ऑक्टोबरात किंवा अश्विनात नऊ लाख क्यूसेक.

काही दिवसांपूर्वी निरूपद्रवी असलेल्या ह्या सापाचं दोन दिवसांपूर्वी अजस्र, क्रूर, सगळं गिळंकृत करणाऱ्या ऍनाकोंडात रूपांतर झालं.

आणि आता कोसी थोडी मवाळ झाली आहे .दोन्ही किनाऱ्यांवरून दुथडी भरून भरधाव वेगाने वाहणारं पाणी थोडं निवळलंय. आता कोसी नदी डौलात  वाहत आहे.

पानार, लोहनद्रा, महानदी आणि बकरा या तिच्या सर्व उपनद्यांचा पूर्वी नारिंगी असणारा रंग आता गढूळ झाला आहे .हरणाची शिकार करून ते अख्खेच्या अख्खे गिळल्यावर अजगर जसा सुस्तावतो, अगदी तशीच कोसीही अगदी शांत, एखाद्या मुलासारखी सालस झाली आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. रोज, प्रत्येक प्रहराला लोक त्यांच्या कोसीमातेची प्रार्थना करत आहेत, ‘हे कोसीदेवी, आमच्यावर कृपा कर. पुरामुळे झालेल्या या प्रलयापासून आम्हाला वाचव!’

हॅरिसनगंज स्टेशनच्या फलाटावरची गर्दी आज ओसरल्यासारखी वाटतेय. काही लोक आपल्या घरी परतले आहेत. जे जाऊ शकले नाहीत, ते मागेच थांबले आहेत.बहुधा त्यांची घरं राहिलेली नाहीत किंवा त्यांच्या झोपड्या अर्ध्याअधिक चिखलात बुडालेल्या आहेत.नाहीतर एखादं मेलेलं, कुजलेलं जनावर -कुत्रा किंवा म्हैस – तिथे पडलं आहे आणि त्याची एवढी दुर्गंधी आजूबाजूला पसरली आहे, की अंगणातसुद्धा पाय ठेवणं मुश्किल झालं आहे. काहीजण आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना किंवा मुलांना मागे सोडून पुन्हा फलाटावर आले आहेत. पुराने पाण्याबरोबर आणलेली एवढी रेती त्यांच्या शेतात पसरली आहे की ते आता तिथे कसलंच पीक काढू शकत नाहीत. काही लोक तर मजुरी -रोजगारीच्या आशेने गुजरात वा पंजाबसारख्या लांबच्या प्रांतात चालले आहेत.

रेल्वेमंत्री याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांनी जाहीर केलं आहे की सहरसा, अररिया, कटिहार, सुपौल, पूर्णिया आणि मधेपुरा वगैरे ठिकाणाहून लोक विनातिकीट प्रवास करू शकतील. त्यामुळे हॅरिसनगंज स्टेशनजवळचे रेल्वे मार्ग दुरुस्त केले आहेत व त्यावरून गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. लोक गाडीत चढले, तर कोणीही त्यांची तिकिटं तपासायला येणार नाहीत. आणि त्यामुळे तिकडे लोकांची एकच गर्दी झाली आहे. गाडी आतून तर भरलीच आहे, शिवाय टपावरही लोक बसले आहेत. प्रत्येक गाडीत तुफान गर्दी आहे. स्पष्टच सांगायचं, तर माणसं भरून ओतत आहेत.

एका सुक्या खडखडीत हातपंपासमोर बिरोजा विडी ओढत बसलाय. दोन दिवस अन्नाशिवायच गेले. आज दुपारी बहुधा डाळभात वाटतील. नशीब चांगलं असेल, तर एखादा कांदाही मिळेल प्रत्येकाला. तो आता फलाटावर फिरत आहे. ओळखीच्या प्रत्येक माणसाला विचारून याविषयी माहिती काढायचा प्रयत्न करत आहे. आणि जर ही माहिती खरी असेल, तर त्याला बांधावर जाऊन त्याच्या मुलीला -जनकदुलारीला -इकडे घेऊन यायचं आहे. त्याचे मुलगे मुरली आणि माधो दोघेही इथेच आहेत, फलाटावर खेळत आहेत. आणि त्याची बायको कालव्याच्या बांधाजवळ, जनकदुलारीबरोबर त्याची वाट पाहत आहे. सगळ्यात धाकटा छोटू तिच्या मांडीवर झोपला आहे.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १९ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विनायक लक्ष्मण छत्रे

विनायक लक्ष्मण ऊर्फ केरूनाना छत्रे (16 मे 1825 – 19 मार्च 1884) हे प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गो. ग. आगरकर ह्यांचे ते गुरू होते.

त्यांचा जन्म अलिबागमधील नागाव येथे झाला. पण बालपणीच आई -वडील गेल्याने ते शिक्षणासाठी मुंबईला चुलत्यांकडे आले. त्यांच्यामुळेच असामान्य बुद्धिमत्तेच्या केरूनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तूनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रा. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानामुळे गणित, खगोल व पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रांत त्यांना गती प्राप्त झाली. प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून केरूनानांनी या विषयातले प्रगत ज्ञान मिळवले.

आर्लिबर यांनी आपल्या वेधशाळेत अवघ्या सोळा वर्षांच्या केरूनानांना दरमहा 50 रु. पगारावर नेमले. तेथे दहा वर्षे केरुनानांनी जागरूकपणे हवामानशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे महाविद्यालयात व अभियांत्रिकी महाविद्यालयात ते गणित व सृष्टीशास्त्र शिकवत होते. ते हंगामी प्राचार्यही होते.

केरुनानानी शालेय पातळीवर गणित व पदार्थविज्ञानावर सुबोध व मनोरंजक भाषेत क्रमिक पुस्तके लिहिली.

त्यांनी मराठीत समर्पक, सुटसुटीत व अर्थवाही शब्द योजले. उदा. केषाकर्षण, भरतीची समा वगैरे. ‘कालसाधनांची कोष्टके ‘ व ‘ग्रहसाधनांची कोष्टके’, ‘कुभ्रम निर्णय’ इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.

केरुनानांनी ‘ज्ञानप्रसारक सभे’पुढे हवा, भरती -ओहोटी, कालज्ञान वगैरे विषयांवर निबंध वाचले.’हवे’वर तर एकूण 17 निबंध आहेत.’पृथ्वीवर पडणारा पाऊस व सूर्यावरील डाग’ या विषयावरही एक निबंध होता.

केरुनानांना शास्त्रीय संगीत व नाटकांचीही आवड होती.

ते दिवंगत झाल्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांना ‘जर प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते, ‘ अशी श्रद्धांजली वाहिली.

 

जनार्दन बाळाजी मोडक

जनार्दन बाळाजी मोडक (३१ डिसेंबर १८४५ – १९ मार्च १८९२ ) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच ते मेजर थॉमस कॅन्डी यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर मोडक ठाणे शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.

‘विविधज्ञानविस्तार’मध्ये त्यांनी ज्योतिष, गणिताविषयी अनेक लेख लिहिले. त्यात भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’चे भाषांतर, संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यातील सौंदर्य व पुस्तकपरीक्षण यांचाही समावेश होता. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधीचे लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’, ‘शालापत्रक’, ‘अरुणोदय’, ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले.’काव्येतिहाससंग्रह’ व ‘काव्यसंग्रह’ या मासिकांच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी उत्तमपणे पार पाडली. याशिवाय त्यांनी ‘जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण’, ‘भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष ‘, ‘वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर ‘ ही पुस्तकेही लिहिली.
या प्रकांड पंडिताचे निधन ठाण्यात वयाच्या अवघ्या सत्तेचाळीसाव्या वर्षी झाले.

केरूनाना छत्रे व जनार्दन बाळाजी मोडक या दोन पंडितांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 100 ☆ बुंदेलखंड की कहानियाँ # 11 – …लरका रोबैं न्यारे खौं ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

श्री अरुण डनायक जी ने बुंदेलखंड की पृष्ठभूमि पर कई कहानियों की रचना की हैं। इन कहानियों में आप बुंदेलखंड की कहावतें और लोकोक्तियों की झलक ही नहीं अपितु, वहां के रहन-सहन से भी रूबरू हो सकेंगे। आप प्रत्येक सप्ताह बुधवार को साप्ताहिक स्तम्भ बुंदेलखंड की कहानियाँ आत्मसात कर सकेंगे।)

बुंदेलखंड कृषि प्रधान क्षेत्र रहा है। यहां के निवासियों का प्रमुख व्यवसाय कृषि कार्य ही रहा है। यह कृषि वर्षा आधारित रही है। पथरीली जमीन, सिंचाई के न्यूनतम साधन, फसल की बुवाई से लेकर उसके पकनें तक प्रकृति की मेहरबानी का आश्रय ऊबड़ खाबड़ वन प्रांतर, जंगली जानवरों व पशु-पक्षियों से फसल को बचाना बहुत मेहनत के काम रहे हैं। और इन्ही कठिनाइयों से उपजी बुन्देली कहावतें और लोकोक्तियाँ। भले चाहे कृषि के मशीनीकरण और रासायनिक खाद के प्रचुर प्रयोग ने कृषि के सदियों पुराने स्वरूप में कुछ बदलाव किए हैं पर आज भी अनुभव-जन्य बुन्देली कृषि कहावतें उपयोगी हैं और कृषकों को खेती किसानी करते रहने की प्रेरणा देती रहती हैं। तो ऐसी ही कुछ कृषि आधारित कहावतों और लोकोक्तियों का एक सुंदर गुलदस्ता है यह कहानी, आप भी आनंद लीजिए।

☆ कथा-कहानी # 100 – बुंदेलखंड की कहानियाँ – 11 – …लरका रोबैं न्यारे खौं ☆ श्री अरुण कुमार डनायक

अथ श्री पाण्डे कथा (1)

पांडे रोबैं रोटी खौं, पांडेन रोबैं धोती खौं, लरका रोबैं न्यारे खौं।

शाब्दिक अर्थ :- विपन्नता की स्थिति में खान पान और रहन सहन पूरा अस्त व्यस्त हो जाता है।

कोपरा नदी के किनारे बसे खेजरा गाँव में सजीवन पाँडे अपनी पत्नी रुकमणी व पुत्र भोला के साथ शिव  मंदिर के बाड़े में छोटी सी कुटिया बनाकर रहते थे। सजीवन पाँडे बड़े भुनसारे उठते, झाड़े जाते, नित्य क्रिया से फुरसत हो कोपरा नदी में 5-6 डुबकी लगा स्नान करते। स्नान के पूर्व अपनी  धोती को धोकर सुखाने के लिए बगराना न भूलते। ऐसा नहीं था की सजीवन पाँडे के पास इकलौती धोती थी, उनके पास धोती, कुर्ता और गमछा एक और सेट था, जिसे वे बड़ा संभालकर रखते और जब कभी कोई बड़ा जजमान उन्हे कथा पूजन में बुलाता तो इन कपड़ों को पहन माथे पर बड़ा सा त्रिपुंड टीका लगाकर, काँख में पोथी पत्रा दबाकर बड़े ठाट से जजमानी करने जाते। जजमानी में जाते वक्त उनकी इच्छा होती की जजमान दान दक्षिणा में एक सदरी दे दे तो उनका कपड़ों का सेट पोरा हो जाय। लोधी पटेलों और काछियों की इस गरीब बसाहट में उनकी इच्छा न तो भगवान ही सुनते और न ही जजमान। यदाकदा सजीवन पाँडे अपने साथ पंडिताइन व एकलौते पुत्र भोला को भी ले जाते। पंडिताइन तो अपने बक्से में  से बड़ी सहेज कर रखी गई साफ सुथरी साड़ी निकाल कर पहन लेती।  पंडिताइन के जीवन में यही अवसर होता जब वे नारी श्रंगार का संपूर्ण सुख भोगती, साड़ी को पेटीकोट पोलका के साथ पहनती और माथे पर टिकली बिंदी पैरों में महावर लगाती। इस पूरे श्रंगार से पंडिताइन का गोरा मुख चमक उठता और सजीवन पाँडे भी उनके रूप की प्रशंसा कर उठते पर यह कहते हुये कि भोला की अम्मा तुम्हें कोई सुख न दे पाया उनकी आँखे गीली हो जाती गला रूँध जाता। ऐसे में पंडिताइन ही सजीवन पाँडे को ढाढ़स बँधाती और कहती भोला के दद्दा चिंता ना करों हमारे दिन भी बहुरेंगे, शंकर भगवान कृपा करेंगे, आखिर बारा बरस में घूरे के दिन भी फिरत हैंगे। अम्मा दद्दा तो साज सँवर जाते पर  भोला  के भाग में चड्डी बनियान ही थी उस दिन सुबह सबरे से अम्मा भोला के कपड़े उतार बड़े जतन से धोती और सूखा देती तब तक  भोला नंग धड़ंग रहते और घर से बाहर न निकलते। उगारे भोला कुटिया के एक कोने में बैठे बिसुरते रहते। जाने के ठीक पहले उन्हे भी नहला धुलाकर चड्डी बनियान में सुसज्जित कर दिया जाता। कुलमिलाकर शिवालय के शंकरजी की पिंडी की सेवा व आसपास के गाँवों की जजमानी से सजीवन पाँडे की घर ग्रहस्ती चल रही थी या कहें कि घिसट रही थी  और उन पर यह कहावत कि “पाँडे रोबैं रोटी खौं, पाँडेन रोबैं धोती खौं, लरका रोबैं न्यारे खौं” (विपन्नता की स्थिति में खान पान और रहन सहन पूरा अस्त व्यस्त हो जाता है) तो फिट ही बैठती।

समय चक्र चलता रहा, भोला पाँडे इन्ही विपन्न परिस्थितियों में, अपने बाप सजीवन पाँडे की पंडिताई में सहायता करते हुये, हिन्दी व संस्कृत का अल्प ज्ञान ले, किशोर हो चले। गाँव में कोई स्कूल न था और हटा अथवा दमोह जहाँ पढ़ाने लिखाने की अच्छी व्यवस्था थी वहाँ भोला को भेज पाने की न तो सजीवन पांडे की आर्थिक हैसियत थी और न ही कोई जजमान या रिश्तेदार का घर जहाँ भोला को रख अंग्रेजी स्कूल में पढ़ाया जा सके। उनकी उम्र कोई 14-15 वर्ष रही होगी कि सजीवन पाँडे को पुत्र के ब्याह की चिंता होने लगी। घर में तो भारी विपन्नता थी अत: पंडिताइन ने भोला का ब्याह तय करने में पति को सलाह देते हुये कहा कि भोला के दद्दा लरका को ब्याव ऐसी जागा करिओ जो कुलीन घर के होयं और खात पियत मैं अपनी बरोबरी के होयं। हमाइ बऊ कैत हती कै “सुत ऐसे घर ब्याहिए, जो समता में होय। खान पान बेहार में मिलता –जुलता होय।।“ सजीवन पाँडे को पत्नी की सलाह भा गई और साथ ही उन्हे  पास ही के गाँव इमलिया  के एक उच्च कुल के गरीब  ब्राह्मण व अपने बाल सखा राम मिलन तिवारी की याद आई। फिर क्या था बजाय संदेसन खेती करने के सजीवन पांडे अपने मित्र से मिलने इमलिया चले गए और उनकी कन्या से अपने पुत्र के विवाह की चर्चा  घुमा फिरा कर छेड  घर वापस आ गये। राम मिलन तिवारी  अपने बाल सखा का मंतव्य न समझ सके पर उनकी धर्मपत्नी जो ओट में बैठी दोनों मित्रों की बात सुन रही थी सब समझ गई। सजीवन पाँडे के वापस जाते ही उसने राम मिलन तिवारी से उनके मित्र के घर आने का कारण बताया और पुत्री के विवाह की चर्चा आगे बढ़ाने ज़ोर डाला। दोनों मित्र एक बार फिर मिले और भोला पाण्डेय का ब्याह तय कर दिया। राम मिलन तिवारी  बड़े कुलीन ब्राह्मण थे अत: उनके घर लक्ष्मी कभी कभार ही आती, लेकिन गाँव के लोगों ने इमलिया के इस सुदामा पर बड़ी कृपा करी और लड़की का ब्याह भोला पाँडे से करवाने पूरी सहायता करी। लोधी पटेलों ने  अन्न चुन्न दे दिया तो काछी सब्जी भाजी लेता आया। बजाजी ने दो चार जोड़ी  कपड़ा लत्ता की व्यवस्था कर दी तो कचेर ने टिकली बिंदी चूड़ी और श्रंगार का समान दे दिया। गाँव भर के युवा बारात के सेवा टहल के लिए आगे आए। राम मिलन तिवारी मौड़ी के ब्याह में कुछ खास दहेज न दे पाये बस किसी तरह नेंग- दस्तूर पूरे कर दिये। सजीवन पाँडे भी यारी दोस्ती के फेर में पड़ गए और पंडिताइन के लाख समझाने- बुझाने पर भी अपने मित्र से कुछ माँग न सके। ब्याह की भावरें पड़ी, बारातियों ने पंगत में पूरी, सुहारी, आलू की रसीली सब्जी में डुबो डुबोकर खाये और पचमेर की जगह केवल लड्डू बर्फी का आनंद लिया। सब्जी में आलू के टुकड़े ढूंढने से मिलते पर बारातियों ने उफ्फ न करी, हाँ । पत्तल की भोजन सामग्री खतम होती कि उसके पहले ही दोनों में गौरस परस दिया गया फिर क्या था बारात में आए पंडित रिश्तेदारों और खेजरा के अन्य ग्रामीणों  ने चार चार पूरी मींजकर गौरस में डाली और 5 मिनिट में ही उसे सफाचट कर गए। पंगत को भोजन का आनंद लेते देख राम मिलन तिवारी  बड़े प्रसन्न हुये और हुलफुलाहट में पूछ बैठे और कुछ महराज। उनका इतना कहना था कि पंगत में से आवाज आई दो-दो पूरी शक्कर के साथ और हो जाती तो सोने में सुहागा हो जाता। चिंतित राम सजीवन कुछ कहते  या पंगत में बिलोरा होता उसके पहले ही इमलिया के घिनहा बनिया बोल पड़े जो आज्ञा महराज और धीरे से बाहर निकल अपनी दुकान से एक बोरी शक्कर उठा लाये। फिर क्या था इधर पंगत शक्कर  के साथ दो दो  पूरी और उदरस्त कर रही थी कि चुन्नु नाई ने यह बोलते हुये पंगत समाप्त करने की सोची “समदी माँगे दान दायजौ, लरका माँगै जोय.सबै बाराती जो चहें अच्छी पंगत होय॥“ उधर राम मिलन आखों मे कृतज्ञता का भाव लिए घिनहा बनिया की ओर ताक रहे थे और मन  ही मन सोच रहे थे कि लड़की को अच्छा वर मिला तो लड़के को सुंदर कन्या मिली बराती भी गाँव वालों के सहयोग से अच्छी पंगत पा गए बस समधी ही दान दहेज से वंचित रह गए। पर उनके बस में दान दहेज देना न था। घर की विपन्नता में दो जून की रोटी का जुगाड़ हो जाता यही बहुत था। वे बारबार बांदकपुर के भोले शंकर जागेशवरनाथ और हटा की चंडी माता का सुमरन कर रहे थे कि सजीवन पाण्डेय उनके पास विदा लेने आ पहुँचे। अश्रुपूरित आखों से राममिलन तिवारी ने अपने बाल सखा की ओर देखा और फिर नए समधी और दामाद भोला पांडे  को साष्टांग दंडवत कर प्रणाम किया। रुँधे गले से उनके मुख से बस इतना ही निकला कि महराज हमाई स्थिति से आप परचित हो कोनौ कमी रै गई होय और अनुआ होय  तो क्षिमा करियों। इतना कह वे अपनी गरीबी के  दुर्भाग्य पर फूट फूट कर रो पड़े। सजीवन पांडे ने समधी को गले लगाया और दुरागमन की बात आगे कभी करने की कह विदा ली।

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ.व्यंकटेश जंबगी

 

?  विविधा ?

☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिति लोक तिन्ही

नुपेक्षी कदा रामदासाभिमानि”

समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.

शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..

हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !

दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.

“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-

“सुभटासि व्हावे सुभट

ठकासि व्हावे महाठक”

असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –

“सामर्थ्य आहे चळवळीचे,

जो जो करील तयाचे

परंतु तेथे भगवंताचे

अधिष्ठान पाहिजे”

हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.

समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.

स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना

लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-

“शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भू मंडळी…”

अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.

यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?

लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.

! !जय जय रघुवीर समर्थ!!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्केच – भाग दुसरा ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग दुसरा ☆ श्री शरद दिवेकर ☆

मी पॅन्टच्या खिशातून रूमाल काढला आणि घाम पुसायला सुरूवात केली. मला काय करावं हेच सुचत नव्हतं. सीटवर बसून रहावं, की सीट सोडून उठून उभं रहावं, की डोंबिवलीला उतरून जावं ! यक्षप्रश्नच उभा ठाकला होता माझ्यासमोर. उठून उभा राहिलो तर किंवा डोंबिवलीला उतरतो म्हंटलं तर मित्रांना काय सांगणार होतो मी ? त्या सगळ्यांनी वेड्यातच काढलं असतं मला. शेजारी बसलेल्या प्रकाशने मला तेवढ्यातच विचारलं “अरे, बरं वाटत नाही आहे का तुला ? केवढा घाम आला आहे तुला !” मी म्हंटलं “नाही रे. बरा आहे की मी.” तोपर्यंत ट्रेनने डोंबिवली सोडलं होतं आणि ती खुपच वेगात धावत होती. मी अखेरीस मनाशी निश्चय केला की आता काही इलाज नाही. जे होईल ते होईल.

मी समोर पाहिलं. त्या माणसाची पेन्सिल आता त्याच्या वहीत झरझर फिरत होती आणि माझ्या काळजावर जणू काही सुरी फिरवल्यासारखं वाटायला लागलं आणि काळजाचे ठोके देखील वाढायला लागले. मनात म्हंटलं ‘बच्चमजी, संपलं सगळं. आता केवळ काही तासच उरलेत तुमचे’. मनात भिती आणखी वाढू नये म्हणून मी डोळे मिटून बसायचं ठरवलं आणि मी डोळे मिटले व मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो.

थोडा वेळ गेला आणि कानावर शब्द पडले ‘अगला स्टेशन, घाटकोपर’ आणि मी डोळे उघडले व घाईघाईने माझ्या सीटवरून उठून उभा राहिलो. शेजारी बसलेला प्रकाश अजुनही सीटवरून उठला नव्हता. तो मला म्हणाला “अरे, अजून विक्रोळी यायचं आहे. तु आज लवकर उभा राहिलास आणि तुला झोप लागली होती आज”. त्यावर मी म्हंटलं “कधी झोप लागली ते कळलंच नाही आणि झोपेत असल्याने कळलंच नाही की अजून घाटकोपर आलं नाही ते”. माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं. त्याच वेळेस त्या  माणसाने त्याच्या हातातील वही बंद केली आणि ती वही व पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली. कुर्ला येण्यापुर्वी तो नेहमीप्रमाणे सीटवरून उठला व दाराकडे जाऊ लागला.

तो माणूस दिसेनासा झाल्यावर थोडंसं हायसं  वाटलं. पण चित्त काही था-यावर नव्हतं माझं. पाय थरथरत होते. काऊंटडाऊन सुरू झालं होतं. माझ्या मित्रांच्या गप्पा सुरूच होत्या. पण मी त्यात नव्हतोच मनाने. हो ला हो करत होतो नुसता. अखेरीस ट्रेन सीएसटीला पोहोचली आणि आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

कसाबसा ऑफिसला पोहोचलो. दरम्यान ऑफिसजवळचा रस्ता क्रॉस करताना मी माझ्या दिशेने जोरात येणारी कार न पहाताच रस्ता क्रॉस करत होतो आणि त्या कारच्या ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबले आणि कार माझ्या पावलांपासून काही सेंटिमीटरवरच थांबली असावी. त्या ड्रायव्हरने कचकचून शिव्या घातल्या मला. मृत्यू समोर दिसत होता. कधी आणि कसा हाच प्रश्न केवळ उरलेला होता. रोड अॅक्सिडन्टमधून तरी वाचलो होतो म्हणायचं.

ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये शिरून खुर्चीत बसलो आणि बेल वाजवली. तेवढ्यात प्युनने काॅफी आणून टेबलवर ठेवली आणि तो बाहेर गेला. अगोदर मी टेबलवरील पाण्याने भरलेला ग्लास ओठांना लावला व घटाघटा पाणी पिऊन तो रिकामा केला व टेबलवर ठेवला. नंतर मी काॅफी पण संपवली. काॅफी प्यायल्यावर थोडं बरं वाटू लागलं. मनावरचा ताण वाढत चालला होता. पण ऑफिसच्या कामात लक्ष घालणं देखील तेवढंच महत्वाचं होतं. म्हणून कम्प्युटर सुरू केला आणि कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करू लागलो. माझी नेहमीची खासियत म्हणजे ऑफिसला लवकर पोहोचायचं आणि लगेचच काम सुरू करून लंच टाईम पर्यंत म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत सत्तर पंचाहत्तर टक्के काम संपवून टाकायचं, अगदी टी 20 मॅचमधील पाॅवरप्लेसारखं. पण आज तसं काही घडत नव्हतं. की बोर्डवर बोटं चालतच नव्हती माझी. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. एम.डी. नी डिस्कशनसाठी बोलावलं होतं. विचलित मनःस्थितीतच  त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. ते काय बोलत होते आणि मी काय ऐकत होतो ते काहीच मेंदुपर्यंत पोहोचत नव्हतं. बधिर होत चाललो होतो मी. एम. डी. नी एक दोनदा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं देखील. पण मध्येच त्यांना महत्त्वाचा काॅल आल्याने त्यांनी मला खुणेनेच जाण्यास सांगितलं व माझी सुटका झाली.

केबिनमध्ये आल्यावर घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे रोजच्यापेक्षा फारच संथगतीने चालत आहेत असं भासत होतं. लंच टाईमला एक कलीग रोजच्याप्रमाणे माझ्या केबिनमध्ये आला. त्यानंतर आम्ही दोघं कॅन्टीनमध्ये गेलो, जेवलो आणि परत आलो केबीनमध्ये. साडेतीन वाजता प्युनने रोजच्याप्रमाणे काॅफी आणून ठेवली. ती प्यायलो आणि पुन्हा घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे कासवाला देखील लाज वाटेल इतक्या संथपणे धावत होते.

अखेरीस सहा वाजले आणि मी यंत्रवत कम्प्युटर शट डाऊन केला. नंतर सॅक पाठीला लटकवली आणि लिफ्टने खाली आलो. सस्पेन्स अजुनही कायम होता. कधीही घडेल असं वाटणारं अजुनही घडलं नव्हतं. नक्की काय घडणार आहे आणि कधी घडणार आहे याची टांगती तलवार अजून मनावर कायम होतीच. पण एवढे तास उलटल्याने सकाळपेक्षा थोडा सावरलो होतो. सीएसटीला पोहोचलो आणि ट्रेनमध्ये बसलो. नेमकी विंडो सीटच मिळाली. विंडो सीटची भितीच बसली होती मनात. ट्रेन धाडधाड धावायला लागली. पण तिच्यापेक्षा जास्त वेगाने  मन धावत होतं भूतकाळात, विशेषतः गेल्या दोन महिन्यांच्या घटनाक्रमांत. थोड्या वेळाने मी भानावर आलो तो कसला तरी कोलाहल कानांवर पडला म्हणून. माणसांचा कोलाहल सुरू होता. ट्रेन ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्येच थांबली होती आणि माणसं खाली उड्या मारुन ट्रॅकवरून चालत कल्याणच्या दिशेने निघाली होती. काहीतरी मोठा लोचा झाला होता. मी देखील ट्रेनमधून उडी मारली आणि ट्रॅकमधून चालत निघालो कल्याण स्टेशन गाठण्यासाठी. मन था-यावर नव्हतंच.

कुठून चाललो आहे याचं भानही नव्हतं. विचारांच्या तंद्रीत मी एक नंबर ट्रॅकवर आलो होतो. मागून वेगात ट्रेन येत होती आणि तिचा मोटरमन जोरजोरात हाॅर्न वाजवत होता. बाजुच्या ट्रॅकवरून चालणारी माणसं बोंब मारत होती. पण माझ्या मेंदुपर्यंत काहीच पोहोचत नव्हतं. अगदी अखेरच्या क्षणी मला जाणीव झाली आणि दोन नंबरच्या ट्रॅकमध्ये आलो. पुन्हा एकदा थोडक्यात बचावलो होतो मी. माझ्या कानांवर पडत होत्या त्याच ट्रॅकवरून चालणाऱ्या माणसांच्या शिव्या. त्या ऐकत आणि त्यांच्या नजरा चुकवत मी अखेरीस कल्याण स्टेशनात पोहोचलो. पार्किंग लॉटमध्ये आलो, बाईकचा ताबा घेतला आणि निघालो माझ्या घराकडे.

घरी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. मी जवळपास जिंकलो होतो. पण अजुनही तीन तास बाकी होते. फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. आज बायकोने माझ्या आवडीचा बेत केला होता. मन बरंचसं था-यावर आल्याने चार घास जास्तच जेवलो. मनात थोडी खळबळ बाकी होतीच तरीही. पण ती बायकोला जाणवू दिली नाही.

जेवण झाल्यावर ड्राॅईंग रूममध्ये आलो. टीव्ही सुरू होता. टीव्ही बघता बघता मुलाला झोप लागली होती. बायको देखील आवराआवर करून ड्राॅईंगरूममध्ये आली. दमल्यासारखी वाटली मला. तेवढ्यात तिने जांभई दिली. त्याचाच फायदा घेऊन मी तिला म्हंटलं “दमलेली दिसतेस तु. तु झोप. मला थोडं अर्जंट काम करायचं आहे ऑफिसचं”. असं म्हणून मी तिला बेडरूममधे पिटाळलं. ती देखील पडत्या फळाची आज्ञा मानून मुलाला घेऊन बेडरूममधे गेली. खरं तर मला कसलंही काम नव्हतं. पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. अखेरचे दोन तास उरले होते आणि या शांत वेळी माझ्या मनातली खळबळ बायकोने नक्कीच ओळखली असती. त्यामुळे मी दोन तास ड्राॅईंगरूममध्ये टीव्हीसमोर बसून काढायचे असंच ठरवलं होतं. टीव्हीवर जे सुरू होतं ते बघत बसलो. लक्ष मात्र घड्याळाकडेच होते. अखेरीस बाराचे ठोके पडले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.

दुस-या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला. पण मी खुशीत होतो. मी मृत्यूला हुलकावणी दिली होती बहुदा. पटापट आवरलं आणि ऑफिसला जायला निघालो. स्टेशन गाठलं, ट्रेन पकडली आणि मित्रांच्या संगतीत प्रवास सुरू झाला. प्रकाशला काहीतरी वेगळं जाणवलं असावं. कारण तो म्हणाला “खुशीत दिसतो आहेस अगदी आज”. त्याला माझ्या खुशीचं काय कारण सांगणार होतो मी ?

आजही मला विंडो सीट मिळाली होती. क्षणभर मनात पाल चुकचुकली. म्हणून समोर पाहिलं. आज तो माणूस डाऊन आला नव्हता. समोरची सीट रिकामी होती. तरीही एक प्रश्न मनात सारखा येत होता. खरं तर काल रात्री झोपतानाच हा प्रश्न पडला होता. तो काही पाठ सोडत नव्हता. ‘मी वाचलो कसा’ ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मनाला शांतता लाभणार नव्हती. अचानक समोरच्या सीटवर नुकताच येऊन बसलेल्या माणसाकडे नजर गेली आणि एक विचार मनात तरळून गेला. माझं मन एकदम थरारलं. तो माणूस आणि सुरेश व रमेश यांच्यात एक साम्य होतं. ते साम्य म्हणजे तिघांनी विराट कोहलीसारखी ठेवलेली दाढी. मी दाढी ठेवलेली नव्हती. दाढी काय ? मला मिशी देखील नाही आहे अजिबात. माझ्या मनाने कौल दिला. या कारणामुळेच मी वाचलो.

काही दिवसांनी पुन्हा अमावास्या आली. मी ऑफिसला जायला निघालो. माझं मन शांत होतं. आता तो माणूस काहीच करू शकणार नव्हता. कारण मला दाढी, मिशा नाहीत आणि माझ्या बाकी तिन्ही मित्रांनाही. स्टेशनवर आलो. ट्रेन यायची होती. ट्रेन आल्यावर धावती ट्रेन पकडली आणि नेहमीच्या चौकोनात आलो आणि माझा हिरमोड झाला. डाऊन आलेल्या एका दाढीधारी माणसाने विंडो सीट अगोदरच काबीज केली होती. नाईलाजाने त्याच्या शेजारची सीट पकडली. समोर पाहिलं मात्र ! समोरच्या सीटवर तोच माणूस डाऊन आलेला होता आणि तो त्याच्या पिशवीतून तीच वही आणि पेन्सिल काढत होता.

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 4 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षा मागून दोन-तीन वर्ष ही सरली. हिचं आपलं ‘एकला चलो रे’ सुरुच होतं. एकटी रहात असली तरी आनंदात होती. अडल्यानडल्या ना मदत करीत होती. बिनधास्त राहत होती. पण कुणाच्यात अडकत नव्हती. कुणावर जीव लावत नव्हती. दर शनिवार रविवार येऊन आमची काळजी घेत होती. मी माझी काळजी यांना बोलून दाखवत होते. हे मनातल्या मनात कुढत होते. अन तशातच पुन्हा एकदा हिनं तो स्फोट घडवला. म्हणजे स्फोटासारखी बातमी दिली आणि त्यांना हृदय विकाराचा जोराचा झटका आला. काही केल्या त्यांना ती बातमी सहन झाली नाही आणि मला एकटीला टाकून माझी जबाबदारी हिच्यावर टाकून गेले.

..शनिवारची ती रात्र मला अजून आठवते. जेवण करून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तिच्या लग्नाचा, जोडीदाराचा विषय आम्ही आता काढत नव्हतो. तिनंच आणलेलं आईस्क्रीम खात आम्ही बोलत होतो  अन तिनं ती बातमी सांगितली. “आई बाबा, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही दोघं आजी आजोबा होणार आहात. मी आई होणार आहे. अंहं, मी लग्न केलेलं नाही करणार सुद्धा नाही हं. पण मी आधुनिक तंत्रज्ञानानं गर्भधारणा करून घेतली आहे. तो आनंद, आई व्हायचा आनंद मला हवा आहे. तुम्ही आता माझ्याबरोबरच राहायचंऽ!

हीच सांगणं अजून पूर्ण होतंय एवढ्यात त्यांच्या छातीत जोरात कळ आली आणि घामाघूम झाले. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. अँब्युलन्स आली, अॅडमिट केलं.. पण रविवारची सकाळ काही माझ्यासाठी चांगली उगवली नाही. त्यानंतर मात्र मला एकटीला तिथे राहणं शक्य नव्हतं. मनात नव्हतं तरीही इकडे आले आणि या तन्वी बाळासाठी इथे राहिले. याच मुद्द्यावरून आम्हा मायलेकींचा अधून मधून वाद होत राहतो. पण पडती बाजू मलाच घ्यावी लागते. तन्वी कडे बघून गप्प बसते. “चला, आता ट्रीप तर ट्रिप. तिच्या तालावर नाचतोच आहोत. हाही त्यातलाच एक भाग. विचार करता करता कधीतरी डोळा लागला.”

” आजी आज ना मी आमच्या क्लासमधल्या नंदन च्या घरी गेले होते. त्याच्याकडे आपल्या घराच्या अगदी कॉन्ट्रास्ट कंडिशन आहे. म्हणजे त्याच्याकडे तो, त्याचे डॅड आणि ग्रॅन्डपा राहतात.”

” तन्वी कशाला गं कारण नसताना मुलांच्या घरी जायचं?”

” आजी, अगं उगीच गेले नव्हते मी. अगं मला ‘आताची कुटुंबव्यवस्था’ या विषयावर प्रोजेक्ट करायचाय. त्यासाठी कमीत कमी दहा घरांना भेटी द्यायच्या आहेत. ऑलरेडी मी चार मैत्रिणी आणि दोन मित्रांकडे जाऊन आली आहे. नंदन कडे जायचं राहिलं होतं. त्याचे डॅड सुद्धा भेटले. कालच रात्री ऑफिस टूर संपवून जपान वरून ते आले होते. नंदन म्हणतो, डॅड भेटणं म्हणजे त्याला क्वचितच; इतके ते जगभर फिरत असतात. पण आजी, घरी डॅडी असणं छान वाटतं गं. घर कसं भरल्यासारखं वाटतं. आजी, तुला माहित आहे का गं? माझे डॅडी कसे आहेत? कुठे असतात? सांग ना गं आजी.”

आता काय सांगू मी हिला? बाई ग त्यासाठीच तर तुझ्या आई बरोबर वाद चालतो माझा. सारखं सांगत होते मी तिला. कधी ना कधी हा प्रश्न तू विचारणारच..”

“हे बघ तन्वी, कशाला त्या गोष्टीचा विचार करायचा? माॅमला तुझा राग येतो माहित आहे ना तुला? याच विषयावर आमचे खटके उडतात. आपल्याला जे हवं असतं ते उत्तर तुझ्या माॅम कडून मिळत नाही. उगाच आपल्या घरातलं वातावरण मात्र बिघडतं. जाऊ दे. आता परीक्षा जवळ आली ना तुझी. मन लावून अभ्यास कर. ट्रीपला जायचंय ना?”

” हो ग आजी, पण.. तुला माहितीये? त्या समोरच्या नवीन फ्लॅटमध्ये आलेत ना! त्यांच्याकडे आई-बाबा आणि एक भाऊ बहीण असे सगळे एकत्र राहतात. तो मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि त्याची बहीण बी फार्म करते. किती छान ना? त्यांचे आई-बाबा दोघे त्यांच्या जवळ राहतात. मी ओळख करून घेतली आहे सगळ्यांशी. मला ना त्यांच्या घरात जाऊन रहावसं वाटतं.”

क्रमशः….

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.) इथून पुढे —–

घराचं कुलूप काढत होते तेवढ्यात समोरच्या श्रीवास्तवभाभी ने टोकले .(श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव मी नेमप्लेटवर वाचलेले होते.) “कहाँ होके आई?”- “घर मालिक के यहाँ.!”  माझ्या उत्तरावर ती खुदुखुदू हसू लागली. म्हणाली, “घरमालिक मतलब तुम्हारा हजबंड ! मकान मालिक कहो.”

अशा तऱ्हेने माझ्या बोलण्यातील गमती जमती दोन-तीन महिने तरी इतरांचे मनोरंजन करीत राहिल्या…. आणि मला कळलं की माझी ‘हिंदी’ पुस्तकी आहे… शब्द संख्या खूप मर्यादित आहे… त्यामुळे मला हिंदीवर खूप अभ्यास करावा लागेल.

हिंदीतलं वर्तमानपत्र (अखबार )वाचायला सुरुवात केली. मासिकं ,साप्ताहिकं यांचं वाचन सुरू झालं. पण खूपसे शब्द डोक्यावरूनच जायचे. बोलीभाषा तर मला चक्रावून टाकायची. एकदा तर जमादारनी (सफाई कर्मचारी) तिचा काहीतरी गैरसमज झाल्यानं माझ्याशी दबंगाई करून,  खेडवळ हिंदीत भांडू लागली. शेजारीपाजारी कोणीच दिसले नाही .भांडण आणि तेसुद्धा हिंदीतनं…बापरे मला काहीच सुचेना .बावीस वर्षाचं लहान वय. कधी अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं… मी घाबरून रडायलाच सुरुवात केली. नवऱ्याला साफ सांगून टाकलं.”इथं नाही राहणार मी. ह्या हिंदी लोकांपुढे माझा नाही टिकाव लागणार.”

हे शक्य नाही हे मलाही माहीत होतं. त्यामुळे मी हिंदीवर थोडं वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करु लागले…आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आमचा मुंबईला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंदीतून मराठी आणि मराठीतून हिंदी असे शब्दकोष विकत घेतले. (ते अजूनही माझ्याकडे आहेत.)

माझं हिंदी वाचन जोरात सुरू झालं. दिल्ली पब्लिक लायब्ररीत नाव घातलं अन् तूर्तास नोकरी करणार नसल्याने मी घरची पी.आर्.ओ. व्हायचं ठरवलं ….आणि ओळखी-पाळखी वाढवायला सुरुवात केली. (रिझर्व रहाणं तसंही मला आवडायचं नाही.) शेजारीपाजारी , पार्कमध्ये, वाचनालयात सगळीकडेच. व मग संक्रांतीच्या हळदी कुंकवा साठी खूप जणींना बोलावून घेतलं … त्यामुळे हळूहळू सगळ्यांशी माझ्या गप्पा -शप्पा सुरू झाल्या. आणि मी ‘पुस्तकी’ हिंदी वरून ‘बोलचाल की हिन्दी’ वर पोहोचले. अन् मला हळूहळू पंजाबी, हरियाणवी ,राजस्थानी, बिहारी हिंदी सुद्धा समजू लागली. स्वतःला हम आणि समोरच्याला (आप नही) तुम म्हणत बोलणाऱ्या यूपीवाल्यांचा नखरा पण समजला.

त्या ‘आप’वरून एक मजेदार प्रसंगच घडला. वरच्या मजल्यावर राहणारी मिसेस कपूर मला तिच्या घराची किल्ली देऊन गेली होती. अर्ध्या तासात तिचा नवरा आल्यावर त्याला ती द्यायची होती. त्याप्रमाणे मिस्टर कपूर आले. “मिसेज़ गॅडरे, चाबी.” ते म्हणाले. मी किल्ली त्यांना दिली. आणि त्यांच्याशी हिंदीत थोडं बोलले. परत जायला निघालेले ते एकदम थांबले.

” एक बात बताऊ..” असं म्हणत ते एकदम नाराजीच्या स्वरात बोलू लागले,” मैं आपसे इतना बडा हूँ, फिर भी आप से आप कहके बात कर रहा हूँ… और आप हैं कि मुझे ‘तुम’ कह रही है.” बापरे… म्हणजे झालीच पुन्हा चूक!  मग मी माझी बाजू सावरून घेतली. ” सॉरी… थोडा लैंग्वेज प्रोब्लेम…. बुरा मत मानना….अंग्रेजी में जैसे you–तू , तुम, आप सब कव्हर करता है, वैसे थोडासा मराठी में भी है. तुम्ही में तुम और आप दोनो आते है..” आणखी पण असंच काहीसं सांगितलं. मग जेव्हा त्यांची समजूत पटली, तेव्हा लगेहात मी त्यांना हेही सांगायला विसरले नाही, “भाईसाब नॉट गॅडरे…गद्रे है हमारा सरनेम… लैंग्वेज प्रॉब्लेम… आपके साथ  भी…”. ते हसले आणि निघून गेले. पण त्यानंतर मी तुम आणि आप च्या बाबतीत खूप सजग झाले.

हिंदी उच्चारांची पद्धत पण मी आत्मसात केली. मैं, है, ऐसा, वैसा, औरत, और म्हणताना मॅ, हॅ, ॲसा, वॅसा, ऑरत, ऑर–आणि बरीच वेगळी उच्चार पद्धती मला जमू लागली. अन् मग सगळे सोपे झाले. हिंदीभाषिकांकडून  “आपकी हिंदी बहूत अच्छी है” असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ८ जानेवारी –  संपादकीय  ?

नारायण भिकाजी  तथा नानासाहेब परूळेकर:

महाराष्ट्रातील एक प्रमुख दैनिक सकाळ चे संस्थापक संपादक ना.भि.परूळेकर यांचा आज स्मृतीदिन.

अमेरिकेतील आपले शिक्षण संपवून नानासाहेब 1929 मध्ये भारतात परत आले.अमेरिकेत असताना त्यांनी फ्रेंच,जर्मन व अमेरिकन वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले.हे अनुभव घेत असतानाच भारतात परतल्यावर वृत्तपत्र काढण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का होत होता.इथे आल्यावर त्यांनी त्यावेळच्या मराठी दैनिकांचा अभ्यास केला. व्यावसायिकता सांभाळून समाजाभिमुख वृत्तपत्र काढण्याचा त्यांचा विचार पक्का झाला आणि 1 जानेवारी 1932 ला ‘ सकाळ’ या दैनिकाचा पहिला अंक निघाला. त्यानंतर 1936 मध्ये त्यांनी ‘स्वराज्य’ हे दैनिक सुरू केले. नंतर त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले. तेज नावाचे कमी किंमतीचे मासिकही सुरू केले. कालांतराने स्वराज्य व तेज बंद होऊन फक्त सकाळ चालू ठेवले.

चालक,मालक,संपादक,व्यवस्थापक अशा सर्व भूमिका बजावून व्यावसायिकता सांभाळून त्यांनी अखेरपर्यंत दैनिक सकाळ यशस्वीपणे चालू ठेवले.

‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र  त्यांच्या  कारकिर्दीचे चित्र मांडणारे आहे.

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पत्रकारितेला सलाम.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138
image_print