मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

१) मुक्ती –

‘बेटा, रात्र खूप झालीय. एवढ्या रात्री एकटाच कुठे चालला आहेस? ‘ आईच्या या प्रश्नावर सी. आय. डी. इन्स्पेक्टर कमल म्हणाले, ‘आई, कॉल आलाय. कुणी तरी अडचणीत असेल. आम्हा पोलिसांचे कामच आहे, अडचणीत सापडलेल्यांना मदत करायची. तू काळजी करू नकोस. मी लवकरच परत येईन. ‘ असं म्हणून जीपमधून कमल नॅशनल हाय वे कडे जाऊ लागले. सगळीकडे गडद अंधार होता. तासभर तरी ते गाडी चालवत होते. इतक्यात उजवीकडे एक शुभ्र साडीतील मुलगी त्यांना थांबण्याचा इशारा करताना दिसली. कमल काहीसे घाबरले. पण तिकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले. एवढ्यात त्यांची जीप अचानक थांबली. ब्रेक लावून ते जीपमधून उतरले आणि सगळीकडे पाहू लागले. पण त्यांना काहीच दिसलं नाही. जीपमध्ये बसून ते पुन्हा गाडी चालवू लागले. थोडं दूर गेल्यावर त्यांना जाणवू लागलं की गाडीत कुणी तरी आहे. बॅक व्ह्यू मिरर मधे बघितल्यावर ते गर्भगळीत झाले. त्यांनी एकदम जीप थांबवली आणि घबरत घाबरत विचारलं,

‘कोण आहेस तू? आत कशी आलीस? ’

आत बसलेल्या मुलीने म्हंटले, ‘‘घाबरू नका. फोन मीच केला होता. ’

‘माझ्याकडे काय काम होतं?

‘मला जो माझी मदत करेल, अशा तुमच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफीसरचीच गरज होती. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तुम्ही मिळालात. ’

‘तुझं काम तरी काय आहे?

‘इथून डावीकडे एक की. मी. अंतरावर एक तळं आहे. त्याच्याजवळ वडाचा विशाल वृक्ष आहे. ’

‘या बाबत मी काय करू शकतो? ‘

‘तुम्हाला माझ्याबरोबर तिथे यावं लागेल! ’

इच्छा नसतानाही कमल आपला मोठा टॉर्च घेऊन त्या मुलीच्या मागोमाग चालू लागले.

वडाच्या वृक्षाच्या जवळ थांबून तिने आपल्या बोटाचा इशारा ज्या जागी केला, ती जागा पाहून कमलना घामच फुटला. त्यांची बोलतीच बंद झाली.

मुलगी म्हणाली, ‘घाबरू नका. ती माझी समाधी आहे. ‘

‘म्हणजे तू… ? ’

‘. हो. त्या शरिराचा मी आत्मा आहे. माझं नाव माया होतं. माझा प्रियकर चंदरने वर्षापूर्वी मला फसवून इथे आणलं. माझ्यावर आपल्या दोन मित्रांसामवेत बलात्कार केला. मग मला मारून टाकलं आणि या इथे मला पुरलं आणि ते पळून गेले. ’

कमलने सावकाश विचारलं, ‘तुला काय हवय? ’

 ‘मला मुक्ती आणि त्यांना शिक्षा’

 ‘पण याला पुरावा काय? ’

‘ओढाताणीत चंदरचं लॉकेट माझ्या हातात आलं होतं. ते अजूनही माझ्या उजव्या हातात सुरक्षित आहे. ’

सकाळ व्हायला आली होती. इन्स्पेक्टर कमलने पोलिसांच्या मदतीने समाधी उघडली. आपल्या टीमच्या माध्यमातून आणि मायाच्या शवाच्या हातातील लॉकेटच्या पुराव्यावरून चंदर आणि त्याच्या दोघा मित्रांना ताब्यात घेतले. न्यायालयात, अपहरण, बलात्कार आणि खून या आरोपाखाली खटला चालवला गेला. तिघांनाही फाशीची शिक्षा होणार, हे जवळ जवळ निश्चित झालं.

न्यायालयातून बाहेर पडताना कमलला दूर झाडाखाली माया उभी असलेली दिसली. ते तिच्याकडे गेले. ‘मी आपली आभारी आहे. आपण मला मुक्ती दिलीत. ’ ती म्हणाली आणि ती गुप्त झाली.

तिथून निघताना कमलच्या मनात आलं, ‘कायदा काय केवळ जीवित लोकांसाठीच असतो?

मूळ कथा – मुक्ति

मूळ लेखक – महम्मद जिलानी मो. 9850362698

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

२) निवास – – 

‘ए, चल, निघ इथून! कब्रस्तानच्या चौकीदाराने झोपलेल्याल्या भिकाऱ्याला फटकारत म्हंटलं.

भिकारी शमशु उठत म्हणाला, ‘भय्ये, फक्त रात्रभरच झोपतो. कुणाला काय त्रास आहे? ‘

‘अरे बाबा, समजत कसं नाही तुला? हे कबरस्तान आहे. नातेवाईक विरोध करतात. ’

‘यात विरोध करण्यासारखं काय आहे? ‘

‘त्यांनाही मन:शांती, समाधान हवे असते. शिवाय अलीकडे जादूटोणा करणारे मांत्रिक मुडदे उकरून गायब करतात. मी तुला किती वेळा समजावलं. पण तू ऐकतच नाहीस. ‘ असं म्हणत त्याने बरोबर आलेल्या पोलिसांच्या हवाली त्याला केले.

पोलीस ठाण्यावरील इन्स्पेक्टरने कडक स्वरात विचारले, ‘ का रे, मुडदे चोरतोस काय? ”

शमशु घाबरत म्हणाला, ‘हुजूर, तसलं काही करत नाही मी! नाईलाजाने मी फक्त तिथे झोपतो! ‘

‘आता असलं काही चालणार नाही. तू दुसरी जागा शोध. ’

‘हुजूर, कुठे शोधू? मंदिर किंवा मशिदीजवळ झोपलो, तर हाकलून देतात. धार्मिक किंवा सरकारी संस्थानच्या आसपासही फिरकू देत नाहीत. फुटपाथवर झोपलं, तर कोणी पियक्कड गाडीवाला, गाडीने चिरडून टाकेल, याचा नेम नाही. जगलो, वाचलो, तर लंगडा, लुळा बनून आयुष्य काढायला हवं. ’ 

‘यात पोलीस काय करू शकणार? ‘

‘ कमीत कमी आम्हाला कब्रस्तानमध्ये तरी झोपू द्या. तिथे भीतीच्या ऐवजी शांती तरी आहे. ‘

हे ऐकून स्तब्ध झालेला पोलीस अधिकारी गांधीजींच्या फोटोकडे पाहू लागला.

मूळ हिंदी कथा – आशियाना

मूळ कथा – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८

अनुवाद – उज्ज्वला केळकर मो. – 8369252454 

३) विवशता – – 

‘माय लॉर्ड, आपण याच्या भोळ्या, भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्याचे पाशवी कृत्य बघा. एका निरागस मुलीची हत्या करताना त्याला ‘रंगे हात ‘ पकडलय. ‘ असं म्हणत सरकारी वकील कुमारसेन यांनी आपला युक्तिवाद मांडला. ही अनोखी केस ऐकण्यासाठी, बघण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खूप गर्दी लोटली होती. पुढील कारवाई करत कुमारसेनने पोलीस पाटील राणे यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावले.

‘आपण काय पाहिलत? ‘

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी गस्तीवर होतो. रात्री जवळजवळ दोन वाजता सुदामा गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या विहिरीजवळ मी याला एका सहा-सात वर्षाच्या मुलीबरोबर पाहिलं.

‘मग काय झालं? ‘ 

‘ जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की या माणसाने त्या मुलीचे हात-पाय-तोंड बांधून टाकलय. हा काय करणार आहे, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मी याला व त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात आलो. मुलीला ताबडतोब इस्पितळात पाठवण्यात आले. हा माणूस मात्र काहीच बोलला नाही. ’ 

‘त्याने काहीचं सांगितलं नाही? ‘ सरकारी वकिलांनी विचारलं.

‘ जी नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने आपलं तोंड उघडलं नाही. ‘

‘माय लॉर्ड, ही केस अगदी स्वच्छपणे समोर येतेय. त्याचं मौन हाच त्याच्या गुन्ह्याचा पुरावा आहे. अपहरण, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न याची केस आहे ही! बी. एन. एस. धारा ६३, १०९ व १३७ च्या अंतर्गत याला शिक्षा व्हायला हवी. ‘

तुला आपली सफाई देण्यासाठी काही बोलायचंय? ‘ न्यायाधीश मॅडमने विचारले.

‘होय जज्जसाहेब. मला फाशी द्या. मी अपराधी आहे. माझा गुन्हा हा आहे, की मी गरीब आहे. ‘

‘तुला काय म्हणायचं आहे? ‘ 

‘माझे नाव गिरिधर आहे. शेजारच्या गोगुल गावातला, मी कमी शिकलेला आदिवासी शेतकरी आहे. पत्नीच्या जीवघेण्या आजारात माझी सगळी शिल्लक मिळकत संपून गेली. माझी ५ एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवून मी कर्ज घेतले आणि पत्नीवर उपचार करण्यासाठी शहरात आलो. नंतर कळलं, याने कोऱ्या कागदावर माझा अंगठा उठवून घेतलाय. ‘

‘पण यामुळे काही तू केलेला गुन्हा माफ होणार नाही. या मुलीचं अपहरण का केलंस? ‘ सरकारी वकिलाने विचारलं.

‘कोणीही बाप आपल्याच मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या का करेल? ‘

‘मग तू विहिरीजवळ का गेला होतास? ‘

सरकारी इस्पितळात इलाजाच्या दरम्यान माझ्या पत्नीचं निधन झालं. काही दिवस होते तेवढ्या पैशातून गुजराण केली. ’ 

‘या मुलीचं काय करणार होतास? ‘

‘ तहान-भूक सहन करत धर्मशाळेच्या परिसरात किती दिवस राहाणार? मग आत्महत्येचा विचार मनात आला. वाटलं, या क्रूर जनावरांच्या जगात माझ्यानंतर हिला एकटीला जगायला ठेवायला नको. वाटलं, विहिरीत उडी मारून दोघांनीही एकदमच मरून जावं. मुलगी ओरडू नये, पळून जाऊ नये, म्हणून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून ठेवलं. ‘

हे ऐकून कोर्टात शांतता पसरली. सगळे निकालाची वाट पहात होते. न्यायाधीश आपला निकाल देताना म्हणाले, ‘ अज्ञान, गरिबी, लाचारी, विवशता यामुळे गिरिधरने हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला. कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल, ती याला होईल. पण कोर्ट सरकारला आदेश देत आहे, की सावकाराकडून गिरिधरची जमीन परत घेऊन त्याला पुन्हा जगण्याची संधी दिली जावी. त्याचे पुनर्वसन केले जावे.

टाळ्यांच्या कडकडाटात कोर्टाची कारवाई संपली…

मूळ कथा – मजबूरी

मूळ लेखक – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८ 

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर

ही आहे गणूच्या चॉकलेटच्या बंगल्याची गोष्ट.

एकदा काय झालं! तारीख होती १४नोव्हेंबर. बालदिन. इनरव्हील क्लबच्या काही महिला नटून थटून धारावीच्या झोपडपट्टीत सकाळीच आल्या. मुलांना खाऊ वाटण्यासाठी. “बालदिन म्हणजे काय? तो का आणि कुणाच्या आठवणीसाठी साजरा केला जातो हे मुलांना सांगण्यासाठी, ”

तसे काही ना काही कारणाने कुणी ना कुणी या झोपडपट्टीत येतच असतात. कपडे, खाऊ, पांघरूणं, धान्य वगैरे घेऊन.

त्या बायकांना पाहून दारादारातून सुख्या, मुख्या, रामू, हसन, सलीम आणि लहानगा गणूही धावत बाहेर आले. अगदी उड्या मारत. खाऊ मिळणार होता ना?

गणू लहान असला तरी मनातल्या मनात तो स्वतःशीच बोलायचा. त्या छान छान साड्या नेसलेल्या, रंगीत कपड्यातल्या, चेहऱ्यावर पावडर लावलेल्या, हसऱ्या बायकांना पाहून गणू मनातच म्हणाला, ” माझी माय कधीच का अशी दिसत नाही? ”

सलीमच्या झोपडीसमोर एक पिंपळाचं झाड होतं. तिथल्याच थोड्या मोकळ्या जागेवर त्या सुंदर बायकांनी मुलांना एकत्र यायला सांगितले आणि बॅगेतून आणलेला खूप सारा खाऊ सगळ्या मुलांना वाटला. मुलांनी नेहमीप्रमाणे गलका केलाच. ” मला द्या मला द्या की” मातकट, न धुतलेले हात पुढे करून. नेहमीप्रमाणेच. गणू मात्र दूर उभा राहून ही सारी गंमत पाहतच होता. खाऊ तर त्याला हवाच होता पण त्याने हात मात्र पुढे केला नाही. एक छान ताई मग स्वतःहून त्याच्या जवळ आली आणि मूठभर चॉकलेट्स तिने त्याच्या चिमुकल्या दोन हातात अगदी प्रेमाने ठेवली. गणूला खूपच आनंद झाला. ती ताई म्हणाली, ” खाऊन टाक सारीच्या सारी पण नंतर मात्र दात घासशील ना? ” गणू ने मोठे डोळे करून ताईकडे पाहिलं आणि म्हणाला या चॉकलेटचा मी एक बंगला बांधू का?

गणूने कधीतरी मुख्याच्या रेडिओवर, चॉकलेटच्या बंगल्यावरचं गाणं ऐकलं होतं आणि त्याला ते फार आवडलं होतं.

ताईला खूपच हसू आले. तिने गणूच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली, बांध की. मी तुला अजून खूप सारी चॉकलेट्स आणून देईन.

त्यानंतर ताईने तिच्या इतर मैत्रिणींना काहीतरी गुपचूप सांगितले आणि ती मुलांना म्हणाली, ” चला रे मुलांनो! हातात हात धरून रिंगण करा बरं! आपण किनई आता एका गाण्यावर नाच करूया. ”

“येरे तू पण ये. नाव नाव काय रे तुझं? ” “गणू. ”

“हे बघ तू रिंगणाच्या मध्यभागी उभा रहा. ही टोपी घाल आणि हे बघ काय आहे. याला मास्क म्हणतात. तोंडावर चढव. ताईने सगळ्यांनाच वेगवेगळे मास्क घालायला दिले. मांजराचे, वाघाचे, कुत्र्याचे, माकडाचे. आणि सगळेजण ताई म्हणत असलेल्या गाण्यावर मस्त नाचू लागले. आता ती धारावीची चिखलातली, उघड्या गटारातली, फाटक्या कपड्यातली झोपडपट्टी नव्हतीच. ती होती एक वेगळीच रंगीबेरंगी नगरी. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला”

गणूला इतका आनंद कधीच वाटला नव्हता. घरात कुणीच नव्हतं. उखडलेल्या फरशीच्या, पत्र्याच्या घरातल्या त्या खडबडीत उंबरठ्यावर तो एकटाच बसला होता. बाकीची मुलं फुटके टायर घेउन गाडा गाडा खेळत होती. काही जवळच साचलेल्या पाण्यात कूदत होती.

माय आणि बापूस दिवसभर घरात नसतात. कधी संध्याकाळी तर कधी रात्रीच घरी येतात. माय त्याच्यासाठी कधी कधी कागदाच्या पुडीत दाणे, भजी, शेव, आणते. बापूसला सारे दारुड्या, बेवडा म्हणतात आणि तो मायला रोज मारतो.

उंबरठ्यावर बसलेल्या गणूला खरंतर हे काहीच आवडत नाही पण आज मात्र तो खूप आनंदात होता. स्वतःशीच हसत होता. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ”त्यातच तो पार हरखून गेला. एका वेगळ्याच दुनियेत गेला. तेवढ्यात डोक्यावर मुकुट घातलेली आणि हातात चांदण्या चांदण्या असलेली एक सुंदर काठी घेऊन एक परी गणूजवळ अलगद हवेतूनच उतरली. गणूला वाटले ही ती ताईच. मुकुट घातलेली, परीसारखी दिसणारी. किती सुंदर! परीने हातातली काठी आपटली आणि काय आश्चर्य तिथे आता धारावीची झोपडपट्टी शिल्लक नव्हती तिथे होता एक सुरेख भलामोठा चॉकलेटचा बंगला. त्याला दारं होती, खिडक्या होत्या. बंगल्याच्या भोवती हिरवीगार झाडं होती, निळ्या रंगाचं सभोवताली पाणी होतं, झाडांवर रंगीबेरंगी पक्षी गणूसाठी गाणी गात होती. फुलपाखरे होती. तिथे गटारांची दुर्गंधी नव्हती. चॉकलेटच्या बंगल्यातून पेपरमीटचा सुगंध घेऊन मस्त वारे वाहत होते.

अबब! केवढा मोठा हा सुंदर चॉकलेटचा बंगला! परीताईचा हात धरून तो या खोलीतून त्या खोलीत नुसता उड्या मारत होता. कुठे कुठे नळही होते आणि त्यातून खीर, बासुंदी सारखे गोड गोड पदार्थ वाहत होते. एक नळ उघडला तर त्यातून कितीतरी सोन्याची नाणीज नाणी वाहिली. चॉकलेटचा पलंग आणि चॉकलेटचे पांघरूण. चॉकलेटची तोरणं, चॉकलेटचे खांब. सोनेरी कागद चिकटवलेल्या चमचमणाऱ्या भिंती. परीताई म्हणाली, ” याला पाहिलंस? याला म्हणतात रोबोट. याचं नाव जीनी. तुला हवं ते माग याच्याकडे. तो तुला जे हवं ते देईलच.

गणूला कळेच ना काय मागावे? खरंतर त्याची यादी खूपच मोठी होती आणि त्याला सगळं हवं होतं. शिवाय या चॉकलेटच्या बंगल्यात वेगळीच माणसं होती. ती सारी हसत होती, खेळत होती, गाणी म्हणत होती. छान शब्दात बोलत होती. तिथे मारामाऱ्या नव्हत्या. भांडण नव्हती. ठिकठिकाणी ठेवलेल्या पेट्यांमधून सोन्याचे, चांदीचे दागिने होते. छान स्वच्छ कपडे होते आणि खुळखुळ आवाज करणारे पैसे होते. एका लांबोळक्या खोलीत शाळापण भरली होती. शाळेतल्या मुलांनी एकसारखे स्वच्छ कपडे घातलेले होते. फळा होता आणि मिशीवाले, घारे डोळेवाले गुरुजी मुलांना शिकवत होते. ते मुलांना सांगत होते, ” जो जे वांछील तो ते लाहो!” गणूला काही त्याचा अर्थ कळला नाही पण त्याला ती शाळा मात्र खूपच आवडली. गणूला वाटले जिनीला सांगावे असाच अगदी असाच “चॉकलेटचा बंगला” मला दे. आणि अशीच हसणारी माणसेही दे. ”

समोर एकदम खूप सारा पांढरा धूर झाला. नंतर एवढासा जिनी त्या धुरातून खोलीभर पसरला. त्याचे डोकंही छताला टेकलं आणि तो केवढ्या मोठ्याने हसला. त्याचा हाताचा पंजा म्हणजे जणू काही पृथ्वीचा गोलच होता आणि त्या गोलावर होता गणूला हवा असणारा चॉकलेटचा बंगला. त्यावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं ते काही गणूला वाचता आलं नाही पण त्यावर डोक्यात मोरपीस घातलेल्या, बासरी वाल्या कृष्णाचं चित्र होतं. गणूने नीट निरखून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात आनंदाची लाटच फेसाळली. तो कृष्ण नव्हता काही तो तर कृष्णा सारखा दिसणारा गणूच होता जिनी म्हणाला, ” हा तुझा चॉकलेटचा बंगला. बंगल्याचं नाव *फेरो रोशर* बरं का आणि त्यावर ही डार्क *चॉकलेटची कडेला आयसिंग केलेली वेलबुट्टी असलेली तुझ्या नावाची सुंदर पाटी. वाच बघू. त्यावर लिहिलंय, ” गणूचा बंगला” नंतर गणू, जिनी आणि परीताईबरोबर बरोबर नाच नाच नाचला. आकाशात झुमकन उडाला. केवढ्या तरी मोठ्या बोटीतून आकाशगंगेतही फिरला. फुलांशी, पाखरांशी, चांदण्याशी गप्पा केल्या. नंतर “जिनी” नाहीसा झाला, आंतर्धान पावला. परीताई ही कुठेतरी लुप्त झाली.

एका सुंदर जगात फिरून आलेल्या गणूला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या घराच्या ओबडधोबड उंबरठ्यावर होता पण त्याला आतून असं वाटत होतं की तो खूपच आनंदात आहे.

“अरे! ओ गणू इथं काय करतोयस? काय खाल्लास पिल्लास की नाय? भगुण्यात भाकर नि पेज ठेवली हुती म्या. ”

माय कधी आली?

तेवढ्यात बापूसही आला. आज तो दोन पायावर न झुलता उभा होता हे विशेष. मायला म्हणाला, “अगं ओ माय आता ही झोपडपट्टी पाडणार म्हनत्यात. कुणी अदानी नावाचा लय मोठा माणूस इथं लय भारी माल बांधणार आहे म्हनत्यात. ” “आता ग बया! मग आपन कुटं जानार व्हय. ”

“कळलच ते. आत्तापोतर इतलंच. ”

गणूनं या दोघांचं बोलणं ऐकलं आणि तो लगेच म्हणाला, ” माय काय बी काळजी नगं करूस. ‘जीनीने’ मला लय भारी चॉकलेटचा बंगला दिलाय. त्यात जाऊन आपण राहू की. ”

गणूच्या मायचा आणि बापूसचा ‘अॉ’च झाला आणि दोघेही एकदमच म्हणाले, ”यडं की खुळं गं हे? ” 

पण गणू ने मात्र मनाशी पक्क ठरवलं होतं, ”एक ना एक दिवस जिनीने दिलेल्या चॉकलेटच्या बंगल्यात आपण राहायला जायचंच. ”

गणूचे हे स्वप्न खरंच ठरो!

आधी पहावं मोठं स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर खूप धडपडावं “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ”

न जाणो! एक दिवस गणूच्या मनातला हा “चॉकलेटचा बंगला” प्रत्यक्ष पहायला अनेक प्रवासी नक्की येतील. बेल्जियममधल्या मुतणाऱ्या मुलाला- गणू इतकाच असेल तो नाही का? – जगभरातले प्रवासी बघायला येतात! इथे काहीही अतर्क्य नाही, अशक्य नाही. त्यातलाच हा गणूच्या स्वप्नातला चॉकलेटचा बंगला.

द्या टाळी.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.) — इथून पुढे – – – 

दिलीपने विचार केला. ”हे बघ. आपण फक्त माधवन आणि नवीन बाळासाठी जाऊया. मीही येतो तुझ्याबरोबर. म्हणजे तू एकटी पडणार नाहीस नयना. तीन महिने राहूया आणि परत येऊया.

कसं उलटं आहे बघ. जावई सज्जन लाखात एक तर मुलगीच मूर्ख आणि तऱ्हेवाईक. आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणाला सांगणार? पण तू गेली नाहीस तर जन्मभर उगाळत बसेल ती. आपली एकच तर मुलगी आहे ही. बघूया.

तिने बोलावलं तरच जाऊया. ” 

मुग्धाला सातवा महिना लागला. तिने आईवडिलांना विचारलं,

बाबा, यावेळी तुम्ही आणि आई दोघेही या. मी तिकीट पाठवते. मी शेवटपर्यंत जॉब करणार आहे. माझी तब्बेत चांगली आहे. नंतर मला रजा घेता येईल.

तुम्ही दोघेही तीन चार महिने रहा. वाटलं तर व्हिसा वाढवून घेता येईल तुमचा. मग मी बाळाला ठेवीन क्रेश मध्ये. ”

आत्ता तरी हा प्लॅन नयनादिलीपला बरा वाटला. हो म्हणाला दिलीप.

तिकिटे आल्यावर नयना दिलीप अमेरिकेला पोचले. एअरपोर्टवर आलेल्या माधवन आणि मुग्धाला बघून नयनाला गहिवरून आलं.

आपली गर्भभाराने जडावलेली लेक बघून नयनाला अश्रू आवरेनात.

आई म्हणत मुग्धाने आईला मिठी मारली. कारने सगळे घरी आले.

दिलीप ते मोठं घर बॅकयार्ड बघून खूष झाला.

“वावा. आता इथे मस्त बाग करू आपण”. तो हसत म्हणाला.

मागच्या अनुभवावरून नयनाने जरा बिचकत स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आज काय करू ग स्वयंपाक मुग्धा? ”

आई, तुला हवं ते कर. मी खाईन ते. ” 

नयनाने माधवनकडे बघितलं. तो हसत होता. मग सांगतो अशी खूण केली त्याने.

नयनाने सुंदर शिरा केला. मुग्धाला आवडायची तशी मटकीची उसळ केली. भजी केली.

“आई, कित्ती दिवसांनी मी इतकं सुंदर सुग्रास अन्न खातेय ग. “मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलं.

चार दिवसांनी माधवन त्या दोघांना घेऊन मॉलमध्ये गेला होता.

नयना म्हणाली “माधवन, ती खरेदी जाऊ दे. आधी मला सांग, हा बदल झाला कसा मुग्धामध्ये? अरे मी तर येणारच नव्हते मागचा अनुभव बघून. अशी ही वागली तर माझीच अवस्था कशी होईल या कल्पनेनेच मला घाम फुटला. हे कसं काय झालं सांग बाबा. ”

माधवन हसत म्हणाला, ”तुमची लेक गुणी आहे हो. फक्त संतापी आणि पुस्तकी आहे फार. म्हणजे बुकिश.

त्या दिवशी काय झालं, माझा मित्र अमोल आहे ना, त्याची बायको रमा पण प्रेग्नन्ट आहे.

तिच्या डोहाळजेवणासाठीआम्हाला बोलावलं होतं. तिथे तिची आई आणि आजी भारतातून आल्या आहेत.

आजींनी मुग्धाला जवळ बसवलं.

तुझी तारीख किती आहे, आईवडील काय करतात अशा चौकश्या केल्या.

 म्हणाल्या “अशी काय अशक्त दिसते आहेस ग तू? नीट खात पीत नाहीस का? तुम्ही मुली म्हणजे कठीण आहात हो. सारखं काय ते गूगल का काय बघून आयुष्य ठरवता?

ते सांगेल तेच खायचं म्हणे. मग डिलिव्हरी पण गुगललाच करू दे की. आचरटपणा सगळा.

चांगलं छान आई आजी देते ते खावं. त्यांना अनुभव असतो पोरी. आमची रमा असलीच पण आता बघ. सगळं खूळ काढूनटाकलं आम्ही तिच्या डोक्यातून. पुस्तकी विद्या नुसती.

व्यवहार नको का जोडीला? फुकट झालोय का आम्ही म्हाताऱ्या? ”

माधवन हसून सांगत होता.

मुग्धाचं वजन अजिबात वाढत नव्हतं आई. तुम्ही गेलात आणि मग समजलं की डॉक्टर म्हणाले वजन कमी आहे बाळाचं.

मुग्धाची डॉक्टर साऊथ इंडियन आहे ती म्हणाली” मुग्धा, आपलं इंडियन फूड सगळ्यात उत्तम असतं. ते खा. हे यू ट्यूब खूळ आधी काढून टाक डोक्यातून.

वजन कमी आहे बाळाचं. मला वाढलेलं दिसलं पाहिजे. मग मात्र मुग्धा घाबरली. मुकाट्याने सगळं खायला लागली. मला उत्तम येतो ना स्वयंपाक. पोळ्या आणतो बाहेरून.

तुम्ही गेल्यावर रडत होती कीआईने केलेलं मी काही खाल्लं नाही आणि तिलाच बोलले मी वाटेल तसं. रोज वाद घातले, तिला वाटेल तसं बोलले मी.

माधवन, येईल ना रे आई पुन्हा?

मला हवी आहे तिची मदत. माझं खूप चुकलं. त्यात रमाच्या आजींनी चांगली कान उघाडणी केली.

आता गाडं ठिकाणावरआलंय. ”

माधवन हसत होता.

“बाबा, मुग्धा हुशार तर आहेच. पण मला माहीत आहे, ती संतापी असली तरी खूप सरळ आणि भाबडी आहे. मला तिची नस बरोबर माहीत आहे. आता हळूहळू तीआणखी समंजस होईल बघा.

मी चार भावंडामध्ये वाढलोय म्हणून मला माणसे समजतात, ऍडजस्ट करता येते. आपलाच हेका दरवेळी चालवता येत नाही हे समजतं मला. पण मुग्धाला ही सवय नाही. एकटीच असल्याने तिला सवय नाही नमते घ्यायची.

पण बदलेल ती हळूहळू. ”

नयनाला माधवनचं फार कौतुक वाटलं. किती समंजस होता हा मुलगा. आपल्या मुलीला अगदी योग्य जोडीदार मिळालाय हे समजलंच त्यांना.

मुग्धातला हा बदल फार सुखावह होता. दोघी मायलेकी मागे बॅकयार्ड मध्ये झोपाळ्यावर बसून तासनतास गप्पा मारत.

मुग्धाला आजीची आठवण येई. तिने सांगितलेल्या गोष्टी तिला आठवत.

“आई मला मुलगीच होऊ दे. मी आमच्याकडे आधीच सांगतात तसे मुलगा का मुलगी आहे हे विचारलं नाहीये. असू दे की सस्पेन्स. ,

पण मला मुलगीच व्हायला हवीय. आणि तीही माझ्यासारखी चिडकी नको. माधवन सारखी शहाणी शांत समजूतदार होऊ दे. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. “मुग्धा, तू सुद्धा खूप गुणीच आहेस बाळा. खूप बदल झालाय तुझ्यात आणि तो चांगलाच आहे.

असं कमी नको लेखू स्वतःला.

सगळी माणसं कशी सर्वगुण सम्पन्न असणार? किती हुशार इंजिनीअर आहेस तू. किती मोठ्या पोस्टवर समर्थपणे एवढी हाताखालची माणसे संभाळतेस ना?

तूही खूप बदललीस. मला तर माझी नात तुझ्यासारखीच व्हायला हवी. गुणी हुशार. , आणि थोडीशी चिडकी पण. ”

मुग्धाने आईच्या कुशीत तोंड लपवलं. नयनाने तिला थोपटलं.

नऊ महिने भरल्यावर मुग्धा प्रसूत झाली.

“माधवन, आई, काय झालं ग मला?

मुलगीच झाली ना? मला दाखवा ना. “

जवळ उभ्या असलेल्या नयनाला आणि माधवनला मुग्धा म्हणाली.

माधवन म्हणाला, “ हो मुग्धा. तुला हवी होती तशी राणी झालीय तुला. ही बघ. ”

मुग्धाने त्या बाळाला जवळ घेतलं.

दोन दिवसांनी राणीला घेऊन सगळे घरी आले.

आता मुग्धाचं आई शिवाय पान हलेना.

आई, राणीला अंघोळ घालायला शिकव मला. तू करतेस तसं तिला मॉलिश करून बघू दे मला तुझ्या समोर.

तू सांग, आता बाळाला पेज कधी सुरू करायची? ”

नयनाने सांगितलेलं सगळं लक्षात ठेवत मुग्धा राणीची काळजी घेऊ लागली. राणी चांगली गुटगुटीत झाली.

तिकडच्या सारखी सीरिअल्स नकोत म्हणत मुग्धाने नयनाच्या देखरेखीखाली छान मऊ भात घालायला सुरवात केली राणीला. आणि तिलाही तो फार आवडायचा.

चार महिने कसे गेले ते कोणालाच समजलं नाही. जायची तारीख जवळ यायला लागली तशी मुग्धा बेचैन झाली.

“आई, मी खूप त्रास दिला तुला. भारतात पण आणि इथेसुद्धा.

 मला माफ कर. मुलगी झाली की तिच्यासाठी जीव कसा तळमळतो हे आता समजतं मला.

राणी पोट दुखून रडायला लागली की मलाच रडू येतं.

मला लहान वयात आणि मोठेपणी पण कधी तडजोडीची वेळच आली नाही. माझं चुकलं खूप. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. ”नाही ग मुग्धा. आई होणं सोपंनसतंच. तूही चुकत शिकशीलच. काळजी नको करू. सुदैवाने आम्ही अजून येऊ शकतो तुमच्याकडे. या गोड राणी साठी. तब्बेती चांगल्या आहेत. पैसा भरपूर आहे. आणखी काय हवं?

आणि माफी कसली ग मागतेस?

माझंही चुकत असेलच की थोडसं.

मीही नोकरी करत होते. झालंही असेल थोडं दुर्लक्ष तुझ्याकडे. पण आजी होती ना तुझ्याकडे लक्ष द्यायला.

तर आता डोळे पूस आणि या गोड बाळाला छान मोठी कर. ”

कधीही अडचण आली तर हाक मार. आम्ही नक्की येऊ. ”भरल्या डोळ्यांनी नयना म्हणाली.

सगळी आवरासावर करून ठरलेल्या दिवशी नयना आणि दिलीप भारतात परतले ते निःशंक होऊन आणि मुग्धामधला सुखावह बदल अनुभवूनच..

समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मुंबई एअरपोर्ट वर विमान पोचले आणि दिलीप आणि नयनाने सुटकेचा निश्वास टाकला. एवढा मोठा कंटाळवाणा प्रवास संपला एकदाचा म्हणून.

रघू ड्रायव्हर कार घेऊन आला होता एअरपोर्टवर. मोठ्या मोठ्या बॅग्ज डिकीत ठेवून त्याने अदबीने विचारलं, “सरळ घरीच जायचं ना सर? का वाटेत जायचं आहे कुठं? ”

“नको नको रे बाबा. फूड मॉलला थांबव आता डायरेक्ट. मस्त कॉफी पिऊया आणि घरची वाट धरू या. ”नयना म्हणाली.

आज जवळजवळ चार पाच महिने अमेरिकेत लेकीकडे राहून आज ते भारतात परत आले.

लाडक्या नातवंडांना सोडून येताना सगळ्या आजीआजोबांच्याडोळ्यात पाणी येतं. नयना दिलीपलाही चिमुकल्या राणीला आणि मुग्धा माधवनला सोडून येताना अश्रू आवरेनात. गोड गुटगुटीत राणी त्यांच्याकडे झेप टाकून येत होती.

इमिग्रेशन मध्ये गेल्यावर राणी आणि मुलगी जावई दृष्टीआड झाले. आणि जड अंत:करणाने दिलीप नयना विमानात चढले.

आत्ता, परतीच्या वाटेवर कारमध्ये बसल्यावर नयनाच्या डोळ्यासमोरून सगळा पट सरकला.

नयना दिलीपच्या बँकेत नोकरीला आली होती. नुकतीच नाशिकहून बदली होऊन नयना रुजू झाली होती. दिलीप तिचा मॅनेजर होता.

सुरवातीला गोंधळलेली नयना आता नवीन बँकेत आणि शहरात चांगलीच रुळली. तिला पुणं फार आवडायला लागलं.

तिला नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि दर आठवड्याला नाशिकला पळणारी नयना आता महिन्याने सुद्धा नाशिकला जायचे टाळू लागली.

दिलीपने एकदा तिला घरी सहज चहाला बोलावले.

त्याचे आईबाबा, धाकटी बहीण आणि घरातले मोकळे वातावरण तिला फार आवडले.

साधारण चार महिन्यांनी दिलीपने तिला लग्नाबद्दल विचारलं. ,

एका छानशा हॉटेलात तिला कॉफी प्यायला त्याने बोलावले आणि मागणी घातली.

हसून दिलीप म्हणाला”अग, माझ्या हे मनात सुद्धा नव्हतं. पण माझ्या आईला तू फार आवडलीस.

बघ आता.

माझ्या आईने, मला सून फार आवडलीय तर तिला विचार बघू असे सांगितलंय बरं मला. म्हणून मी तुला लग्नाचं विचारतोय. ”हसून दिलीप म्हणाला. म्हणजे माझ्याआधीच तुला सासूने पसंत केलीय. “

नयना हसत म्हणाली” हो का? मग अजूनही तुम्ही मला नाही म्हणू शकता. बळजबरी नाहीये कोणाची.”

दिलीप हसला आणि म्हणाला, “मला तर तू आवडतेसच. पण आईसाहेबांना आवडलीस म्हणजे आता काळजी नाही. होणारच तू लाडकी सून त्यांची. ” असं ते लग्न ठरलं आणि थाटामाटात झालं सुद्धा.

नयनाला माहेरी एकत्र कुटुंबाची सवय होती. , सासरी तिला जड गेलं नाही. उलट तिला सासू आणि नणंद मैत्रिणीसारख्याच झाल्या.

लग्नानंतर जरा उशिराच झाली तिला मुग्धा.

सहा वर्षानी घरात लहान बाळ आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मुग्धा आजीआजोबा आईबाबांच्या सहवासात मोठी होत होती. आत्या लग्न होऊन आपल्या घरी गेली होती. आपल्या भाचीच्या ओढीने आत्यासुद्धा मुग्धाला भेटायला जवळजवळ रोज येई.

मुग्धा अत्यंत तीव्र बुद्धी घेऊन आली होती. शाळेत सतत पहिली. दिसायला सुंदर. कधीही दुसरा नंबर न बघितलेली मुग्धा हट्टी हेकेखोर व्हायला लागली.

त्यादिवशी शाळेतून आली ती हातपाय आपटतच.

दप्तर फेकून देऊन जोरात भोकाड काढून रडायला लागली.

”काय झालं मुग्धा? “आजीने घाबरून विचारलं. आजी माझा दुसरा नंबर आला. असं कसं झालं? आदित्यचा कसा आला पहिला नंबर? तू शाळेत चल आणि सांग बाईना. ”हुंदके देत देत मुग्धा म्हणत होती.

“मुग्धा, आधी हे खा बघू. मग जाऊ हं उद्या शाळेत. ”आजी म्हणाली.

मग आजी म्हणाली,

हे बघ बाळा कायम तूच कशी नेहमी पहिली येशील? बाकीची मुलं पण छान अभ्यास करतातच. असा त्रागा करायचा नाही. तू काय कमी हुशार आहेस का? ”

आजीने समजूत घातली खरी, पण नयना बँकेतून आल्यावर हा प्रकार त्यांनी तिच्या कानावर घातला.

नयना, मुग्धा हुशार आहे मान्य. पण हा स्वभाव चांगला नाही. मी म्हणेन तेच खरं, मीच हुशार.

त्या विचारात पडल्या. म्हणाल्या, दिलीपची आजी होती अशी हेकट आणि संतापी. अतिशय त्रागा करायच्या त्या, काही मनाविरुद्ध झालं की.

मुग्धा अशीच झालीय. कोण कोणाचे कसे गुण अवगुण घेतं बघा. ”त्या सुस्कारा टाकून तिथून निघून गेल्या.

दिवस भराभर निघून जात होते.

मुग्धा अतिशय हुशार तर होतीच. उत्तम करिअर करत ती इंजिनिअर झाली.

तिच्याच वर्गातल्या माधवनशी तिने लग्न ठरवलं.

माधवन तमिळ ब्राह्मण. अतिशय हुशार आणि आपल्या व्हॅल्यू जपणारा. स्वभावाने मृदू. नम्र आणि कमालीचा शांत. तमिळ असला तरी उत्कृष्ट मराठी समजत होतं त्याला आणि अस्खलित मराठी बोलायचा तो.

दिलीपने त्याला एकदा सांगितलं”माधवन, तुम्ही फार गुणी आहात. नाव ठेवायला जागा नाही तुम्हाला. पण आमचीच मुलगी फार आक्रस्ताळी आहे. ती अतिशय संतापी आहे. तिला संताप आला की भानच रहात नाही. तुम्हाला तिची ही बाजू माहीत हवी म्हणून मी हे सांगतोय”.

माधवन शांतपणे म्हणाला”काळजी करू नका. मी समजून घेईन मुग्धाला. खूप गुणी मुलगी आहे तुमची. ”

आणि ते लग्न झालं. अतिशय हौसेने करून दिलं नयना दिलीपने.

माधवनचे आईवडील लग्नाला आले आणि उपऱ्या सारखे निघून गेले. त्यांना ही मराठी सून अजिबात पसंत नव्हतीच. नशिबाने मुग्धा माधवन त्यांच्याजवळ रहाणार नव्हते.

माधवनला अमेरिकेचा उत्तम जॉब मिळाला.

मुग्धालाही तिकडे चांगला जॉब मिळायची शक्यता होती. मोठ्या आनंदाने दोघेही अमेरिकेला निघून गेले.

नयनाने तिची सगळी हौसेने तयारी करून दिली. भांडी, कुकर रोजची सगळी पोळपाट लाटण्या पासून तयारी दिली करून.

मुग्धा माधवन गेले. आता घरात फक्त दिलीप आणि नयना.

वडीलधारी माणसे एका मागोमाग एक काळाच्या पडद्याआड गेली आणि नयनाला घर खायला उठलं. तरी अजून तिची नोकरी चालू होती म्हणून बरं.

आता मुग्धाला दिवस गेले.

कोडकौतुक करायला, आवडीचे खायला घालायला म्हणून हौसेने रजा घेऊन नयना दोन महिने मुग्धाकडे गेली. मुग्धाने आईचे छान स्वागत केलं. ” आई किती मस्त वाटलं तू आलीस म्हणून ग. ”

नयना उत्तम सुगरण होतीच.

दुसऱ्याच दिवशी तिने हौसेने पौष्टिक धिरडी केली.

मुग्धा म्हणाली, ”हे मी खाणार नाही. यात न्यूट्रिशस काहीच नाहीये.

माधवनने ती अतिशय आनंदाने खाल्ली. आई, काय सुंदर चव झालीय हो. मला आणखी वाढा. ”

मुग्धाने एकाही धिरड्याला हात लावला नाही. ”अग मुग्धा, यात सगळी पिठे आहेत, मेथ्या आहेत, भाज्या घातल्या आहेत. तू खाऊन बघ. ”पण तिने एकही धिरडे खाल्ले नाही.

नयना कानकोंडी झाली. हे असंच चालू राहिलं तर आपण इथे का आलोय असा प्रश्न तिला पडला.

मुग्धा रोज इंटरनेट बघून त्यातले पदार्थ नयनाला करायला सांगे आणि तेच खाई ती. त्याला ना चव ना ढव.

आता हिचं आणि आपलं पुढे बाळंतपणात कसं होणार याचा प्रश्न नयनाला पडला. बरं काहीबोलायला समजवायला जावं तर लगेच,

माझी डॉक्टर आणि डाएटीशियन सांगेल तेच मी करणार हे उत्तर.

अग, त्या गोऱ्या आहेत, आपली संस्कृती खाणे पिणे वेगळे आहे असं सांगूनही त्यातून भांडणेच होऊ लागल्यावर नयना गप्पच बसली.

अक्षरश:ते दोन महिने कसे जातील असं झालं नयनाला. रोज हे असे सहन करून नयना वैतागली. ना कुठे तिला मुग्धाने फिरायला नेलं ना कुठे नीट संवाद साधला. सतत ती एक तर घरून काम करताना घरच्या ऑफिस मध्ये असायची किंवा वर बेडरूम मध्ये.

तिचा नयनाशी संवादच होत नसे. ना कधी मुग्धाने तिला आवडीचे काही खायला करायला सांगितलं, ना कधी तिने केलेलं कौतुकाने खाल्लं. कधी आणलेले सुंदर ड्रेस घालून बघितले नाहीत की साडी नेसून दाखवली नाही नयनाला..

बिचारा माधवन कानकोंडा होऊन जाई. त्यानेच नयनाला मॉल मध्ये नेलं, तिला हवी ती खरेदी करून दिली.

नयना म्हणाली, ” माधवन, मी तर चालले पण तुमचं कठीण आहे हो.

माझीच मुलगी ही पण कशी वागतेय हो. जगात कोणाला दिवस जात नाहीत का? आणि मी आई आहे ना हिची? आता मी हिच्या डिलीव्हरीला येऊन तरी माझा उपयोग होईल असं वाटत नाही. ”

माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे

सूर्य मावळतीला गेला आहे. चोहीकडे संधीप्रकाश पसरला आहे. डिसेंबर महिना असल्याने हुडहुडी भरवणार्‍या थंडीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरूवात केली आहे. शहराबाहेर फारशी वर्दळ नसणार्‍या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यालयात मी माझे बाबा, आई व आमच्या दोन कुटुंब हिंतचिंतकासह बसलेली आहे. दिव्याच्या अगदी मिणमिण प्रकाशात अंधुकसा अंधार जणू अंगावर येत आहे.

गेल्या वर्षभरापासून या केंद्रात पुनर्वसनासाठी भरती असलेल्या माझ्या नवर्‍याला आज डिस्चार्ज मिळणार म्हणून आम्ही सगळे जमलेलो. बाबा कार्यालयीन पूर्ततेत गुंतले होते. पत्नी म्हणून माझ्या नवर्‍याला मी सोडवून नेऊ शकत असल्याने आम्ही हे पाऊल उचललेले.

“मॅडम, या लेटरवर सही करा “

मी सही केली. अक्षय माझ्या नवर्‍यासह पुनर्वसन केंद्राला आम्ही बाय करून निघालो.

सावित्री तू होतीस म्हणूनच मी जगू शकलो. तू नवजीवन दिलं आहेस मला. आता तुला सावित्री याच नावानं मी हाक देत जाईन.

“अक्षय, कितीही अडथळे आले तरी आपलं प्रेम अक्षय आहे, ते कधीच संपणार नाही. “

O my love. म्हणत अक्षयने एक प्रेमळ कटाक्ष माझ्याकडे ठाकला.

आज कशा अवस्थेतून मी त्याला सोडवलं होतं.? कोणत्या अशा शक्ती होत्या कि ज्यांनी व अक्षयमध्ये दुरावा निर्माण केला होता? . कशी सांगणार ही कथा दोन शब्दात. ” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील, दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

“अक्षयचं स्थळ माझ्यासाठी सांगून आलेलं. घरची गरीब परिस्थिती, पण मुलगा डाॅक्टर असल्याने बाबांनी स्थळाला होकार कळवला.

” बाबा, हा डाॅक्टर आहे. दारू पित असेल तर, ” माझी शंका.

” बाबांनी सरळ मुद्यालाच हात घेतला. अक्षय दारू पित होता, पण पिणार नाही शपथेवर बोलला.

लग्नानंतर सुरूवातीचे दोन /चार वर्ष चांगले गेले. माझ्या घरात प्रथमेश चिमणा ही आला. घर कसं आनंदानं भरलं.

हळूहळू अक्षयने रंग दाखवायला सुरूवात केली. रात्री बेरात्री उशीरा घरी येणंं, पार्ट्यांमधून दारू पिऊन येणं सुरू झालं. मी विरोध करताच, चारचौघात तसं वागावं लागतं. माझ्या व्यवसायाचा तो एक भाग आहे म्हणायचा. ” 

अक्षयचे नातेवाईकही पैशांना लोचणारे होते. याचं लग्न आम्ही करायलाच नको होतं इथपर्यंत यांची मजाल गेलेली. अक्षयला चुकीचे सल्ले देणं, त्याच्यात व माझ्यात दुरावा निर्माण करणं सुरू झालं.

अक्षय तसा imotional fool होता. हलक्या कानाचा होता. त्यांच्या आडसट्यात तो वाहवत गेला. त्यातचं त्याच्याच हाॅस्पिटलमधील विधवा डाॅक्टर त्याच्यावर प्रेमजाळं टाकत होती.

चारी बाजूंनी मला नेस्तनाभूत करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. अक्षय दुरावला. वहिनीच्या अंकित असलेला अक्षय तिच्या हातचं बाहुलं झाला. अक्षयचं दारूचं व्यसन तिनं नवर्‍याच्या मदतीनं वाढवलं. आणि दारूच्या नशेत अक्षयचं घर, बँक बँलन्स, शेअर्स, विमा, कॅश सगळं सगळं हडप केलं. सगळं लुटून झाल्यावर, ” निघ आमच्या घरातून म्हणत अक्षरशः त्याचं सामान फेकलं. अक्षयने विरोध करताच त्याला जबर मारहाण केली व या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन, त्यांना खोटंनाटं सांगत त्याची रवानगी इथे केली.

वर्षभर या केंद्रात खितपत पडल्यावर आज मी याची सुटका केलेली.

राम सीतेसारखा चौदा वर्षाचा माझा वनवास आज संपला होता. अक्षरशः मरणाच्या दारातून मी अक्षयला आणलं होतं. माझ्या मंगळसूत्रात व भाळावरच्या कुंकवाच्या शक्तीनेच तो माझ्यापर्यंत पुन्हा पोचला होता. कितीतरी वर्षाने नववर्ष माझ्या जीवनात आनंद घेऊन आलं होतं.

“काय सावित्री काय म्हणतेस ” ” आज आपलं प्रेम जिंकलं अक्षय ” ” होय, तुझ्या प्रेमात ती शक्ती आहेच ” FM Radio वर गाणे सुरू होते.

” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील

दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिरीप… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तिरीप… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

आज शर्वाणी लग्नानंतर दोन – तीन वर्षांनी दिवाळीतून तिच्या माहेरी म्हणजे बेळगावला जायला निघाली होती. लग्न झाल्यावर ती शशांकबरोबर म्हणजे तिच्या नवर्‍याबरोबर कामाच्या निमित्ताने पूण्याला राहत होती शशांक एका आय. टी. कंपनीत कामाला होता. लग्नानंतर तिचे बेळगावला जाणे क्वचितच व्हायचे. म्हणून हा बेत तिने खूप दिवस अगोदरच ठरवला होता. व्यवस्थित सर्व ठरवून ती प्रायव्हेट बसने बेळगावला जाणार होती. तीन ते चार दिवसांपूर्वी तिने सीटचे आरक्षण करून ठेवले होते. तिने तिच्याबरोबर एक आटोपशीर बॅग घेतली होती. सगळ व्यवस्थित सांभाळत ती बसमध्ये जागेवर येऊन बसली. अजून बाजूच्या सीटवर कोणी आलेले दिसत नव्हते. “आले बाबा एकदाची आता काही काळजी नाही. ” ती स्वतःला म्हणाली. तिला आठवले काल रात्री बाबांशी बोलताना ते म्हणाले होते, ” शरू, काही काळजी करू नकोस. तुझी बस बेळगावला स्टाॅपवर यायच्या अगोदरच हा तुझा बाबा तुला उतरवून घ्यायला हजर असलेला तुला दिसेल.” शर्वाणीचे बाबा म्हणजे अच्युत गोळे. बँकेतील नोकरीतून निवृत्त झालेल एक व्यक्तिमत्व. हुशार, गप्पिष्ट व थोडं मिश्किल. बस सुसाट धावत होती. पण शर्वाणी तर आठवणींच्या गाडीवर स्वार होऊन वेगाने निघाली होती.

बसच्या खिडकीला असलेल्या पडद्यातून उन्हाची किरणे आत प्रवेश करत होती. बसच्या आतल्या त्या अकृत्रिम अंधाराला छेदू पाहत होती. तेवढ्यात नकळत शर्वाणीसुदधा वर्तमानकाळातून भूतकाळाच्या त्या अंधार्‍या विश्वात प्रवेशली. तिला डोळ्यांसमोर लहानपणीची दिवाळी दिसू लागली. नविन कपड्यांची खरेदी, फटाके खरेदी. ते आठवून ती हळूच हसली. पुरूष मंडळींची खरेदीची लगबग, घरातल्या बायकांची फराळाची धावपळ असे कितीतरी प्रसंग तिला खिडकीतून आत येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपेप्रमाणे लख्ख आठवू लागले. तिच्या मनातील आठवणींचा कोपरा प्रकाशित होऊ लागला. आजोबांचे ते दिवाळीसाठी किल्ला बनविणे.. पण आजोबा वारल्यानंतर ते थांबले होते. पुढच्याच क्षणी तिने विचार केला, ” अरे, मी जर ह्यावर्षी किल्ला बनविला तर? अनायसे मी तिथे असणारच आहे. तर काय हरकत आहे? आई बाबांना पण बर वाटेल. आणि तिचे डोळे आनंदाने चमकले.

पुढच्या दोन तीन तासांत शर्वाणी बेळगावला पोहचली. तिला म्हटल्याप्रमाणे तिचे वडील तिची बस यायच्या अगोदरच बस स्टाॅपवर हजर होते. त्यांना पहाताच शर्वाणी सुखावली. वडिलांनी आणलेल्या गाडीत बसून ते घरी जाण्यास निघाले. पुढल्या दहा मिनिटांत गाडी बंगल्याच्या दारात येऊन थांबली. आजोबांच्या वेळेसचा तो बंगला अजून चांगला होता.

गाडीच्या हाॅर्नचा आवाज ऐकून आई बाहेर आली. ” कशी आहेस शरा. चल आत. कधीची वाट बघते आहे. शशांक कसे आहेत? ” आईचे प्रश्न ऐकून बाबा म्हणाले ” अग किती प्रश्न विचारशील. घरात येऊ दे तिला. राहणार आहे आहे आता दहा पंधरा दिवस. मग हव्या तेवढ्या गप्पा मारा मायलेकीने. ” सगळे हसत घरात गेले. हात पाय धुवून, ड्रेस बदलून शर्वाणी डायनिंग टेबलजवळ आली. आई व बाबा तिची वाट पाहत होते. आईच्या हातचे गरमागरम जेवण जेऊन ती तृप्त झाली. आई वडीलांबरोबर गप्पा मारत ती त्यांचे जेवण होईपर्यंत डायनिंग टेबलवर थांबली.

हळूहळू दिवस कलू लागला. बंगल्याच्या गच्चीवर उभी राहून ती समोर पहात होती. वर्षानुवर्षे आहे तसेच सर्व होते. सूर्य अस्ताला जाताना दिसत होता दृश्य फारच विलोभनीय होते. तिच्यामागे आई कधी येऊन उभी राहिली ते तिच्या लक्षात पण आले नाही. शर्वाणीच्या आईचे नाव शैलजा. शैलजाताई तिच्याजवळ येत तिल्रा म्हणाल्या. ” अग इथे आहेस होय? आणि मी आपली तुला सगळीकडे शोधते आहे. ” “हो ग. किती छान वाटत होते सूर्य मावळत असताना पाहीला. आमच्या इथे पूण्याला तर उंचच उंच इमारती त्यातून हे असे सुंदर दृश्य कुठून पहायला मिळणार? “शर्वाणी म्हणाली. ” हो ग बाई. छान एन्जाॅय कर आता आली आहेस तेव्हा. ” आई प्रेमाने म्हणाली.

दुसर्‍या सकाळी लवकर आवरून शर्वाणी आजोबांबरोबर ज्या दुकानात किल्ला बनविण्यासाठी लागणारे सामान आणायला जायची त्या दुकानात गेली आणि सामान घेऊन आली. दुकानात जायच्या अगोदर तिने कामाला येणार्‍या राधा ताईंकडून गेस्ट हाऊसच्या भिंतीची जागा साफ करून घेतली होती. लवकरच तिने पन्हाळा किल्ल्याची छान प्रतिकृती त्याजागी बनविली. जवळ उभे राहून मुलीची कला अवलोकीणार्‍या आईवडीलांनी एकदमच तिला म्हटले, ” तू खरच आज आजोबांची नात शोभतेस खरी. ” शर्वाणी हे ऐकून खूप खूश झाली.. मावळतीला निघालेल्या सूर्याची किरणे झाडांच्या पाठीमागून तिरीपेच्या रुपात त्या प्रतिकृतीवर पडली होती आणि ती किल्ल्याची प्रतिकृती सुंदर भासत होती.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिन्हीसांजा – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ तिन्हीसांजा – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.”… रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.) – इथून पुढे – – 

“आमचा अभिजीत खूप हुशार आणि शिस्तीत वाढलेला मुलगा! स्वतःच्या कर्तृत्वाने सीए झाला. अभिजीतची जमेल तशी हौस- मौज आम्ही केली पण भास्करने कुठल्याच बाबतीत हात सैल सोडला नाही. बहिणींची लग्न, आई-वडिलांची जबाबदारी सांभाळून त्याने चाळीतल्या दोन खोल्यातून आम्हाला हाउसिंग कॉलनीत आणलं. तीन खोल्यांची छोटीशी पण स्वतंत्र आणि स्वतःची जागा. जागेसाठी घेतलेलं लोन हळूहळू फिटत होतं. भास्करचे मित्रच होते आजूबाजूला. आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहणारे नरेंद्र आणि सुलभा ह्यांची आणि आमची दोघांची खूप घट्ट मैत्री!

 अनघाचे वडील एक नावाजलेले सॉलिसिटर आहेत. त्यांची स्वतःची फर्म आहे. तिथेच काम करणाऱ्या अभिजीतच्या दिसण्या- वागण्यावर, कर्तृत्वावर खुश होऊन अनघाच्या श्रीमंत वडिलांनी घरजावई म्हणून त्याला बरोबर हेरला. आपली एकुलती एक, जेमतेम पदवीधर झालेली, श्रीमंतीचा गर्व असलेली अहंमन्य मुलगी अनघा, चतुराईने अभिजीतच्या गळ्यात अडकवली.

 भास्करला हे लग्न एवढं पसंत नव्हतं. अभिजीत त्या श्रीमंती थाटाला, उत्तराच्या नखऱ्यांना भुलला. अगदी खरं सांगायचं तर मलाही त्या श्रीमंतीचं थोडं आकर्षण वाटलं होतं.

 ती दोघं आणि आम्ही कधीही एकत्र राहिलोच नाही. अभिजीतही हळूहळू तिकडचा होऊन गेला. सुखोपभोगाच्या सवयी चटकन लागतात. दोन्ही नातवंडांच्या बारशाच्या वेळी मीच तिथे पाहुण्यासारखी जाऊन आले. भास्करने मात्र त्या घराचा उंबरठा कधीच ओलांडला नाही.

 दोन-तीन महिन्यांपूर्वी भास्करने एका दुपारी मला जवळ बसवून एक महत्त्वाची फाइल दाखविली. साऱ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या, विम्याच्या पॉलिसी, आमच्या घराचे कागदपत्र सारं व्यवस्थित दाखवून ती फाईल कुठे ठेवली आहे तेही दाखवले. या सगळ्याच्या झेरॉक्सची फाईल नरेंद्रकडे दिली आहे असेही सांगितले.

 “आत्ता कशाला हे सगळे सांगत आहात मला? “

“अगं, तुला आपल्या आर्थिक व्यवहाराची सगळी नीट माहिती पाहिजे. तुझ्या एकटीसाठी पुरेल अशी सगळी व्यवस्था मी केलेली आहे. माझ्यानंतर हे घर तुझ्याच नावावर होईल. घराच्या कागदपत्रांवर दुसरं नाव कुणाचं घालायचं हे तू ठरव. नीट विचार करून सगळे निर्णय शांत डोक्याने घ्यायचे बर का! ‘

 भास्करने जणू काही सारं आधीच समजल्यासारखं सगळी निरवानिरव करून ठेवली होती. भास्करला मी काटकसरी समजत होते. काही वेळेला माझ्या साध्या हौशी पुरवल्या गेल्या नाहीत म्हणून रुसत होते. पण भास्करने मुला- सुनेला बरोबर ओळखले होते. भास्करच्या दूरदृष्टीमुळे मी आज आर्थिक दृष्टया कुणावर अवलंबून नाही. जमेल तेवढे दिवस मला स्वतंत्र आणि मनासारखं जगायचं आहे. भास्कर एकाएकी गेला आणि आणि ध्यानी- मनी नसताना मुलावर विश्वास ठेवून अकस्मात मी इथे येऊन पोहोचले आहे. “

 ” रेवती, तू अजून सर्व दृष्टीने सक्षम आहेस. तुला जमेल तेवढे दिवस स्वतंत्रपणे राहण्याचा आनंद जरूर घे.

 तुला घरी परत जायचं आहे एवढंच ना. करूया तशी व्यवस्था आणि इथेही तुझं एक हक्काचं माहेर आहे हेही लक्षात ठेव. “

कृतज्ञतेने रेवतीने सुधाताईंच्या खांद्यावर मान ठेवली आणि आनंदाश्रूंना वाट करून दिली.

जाताना धुरकटलेला वाटलेला कशेडीचा घाट आता परतीच्या प्रवासात रेवतीला हिरवळ अंगावर लेऊन प्रसन्नपणे हसत असलेला वाटला.

 जायच्या आदल्या रात्री रेवतीने संधी साधून सुलभाला हळूच फोन केला होता आणि उद्या अभिजीतबरोबर बहुतेक त्याच्या घरी जात आहे असं सांगितलं होतं. तुझ्याकडे दिलेली किल्ली माझ्याशिवाय कुणाला देऊ नको असेही सांगायला ती विसरली नव्हती.

 बेल वाजली आणि दारात रेवती असल्याचे पाहून सुलभाला आश्चर्याचा धक्काच बसला. बरोबर एक पाहुणीही दिसत होती.

 “चहा आणते ग. हात पाय धुऊन घ्या”

“भाऊजींनाही घेऊन ये बरोबर. थोडं बोलायचं आहे. “

रेवतीने सांगितलेली सगळी हकीगत ऐकून नरेंद्र आणि सुलभा आवाक् झाले. अभिजीतला आईची जबाबदारी तर नकोच होती आणि संपत्तीत लोळणाऱ्या अनघाला आणि अभिजीतलासुद्धा आईच्या जागेचा, पैशाअडक्याचा लोभ सुटला होता. बायकोच्या नादाने बहकलेल्या अभिजीतचा नरेंद्रला खूपच राग आला होता. सुलभा म्हणाली, “पण एवढं तरी नशीब म्हणायचं की, त्यांनी जिथे तुला पोहोचवलं त्या सुधाताई अगदी समंजस निघाल्या. “

 महाबळेश्वरला आठ दिवस शाही विश्रांती घेऊन परतलेल्या अभिजीत- अनघाने दोन दिवसांनी आई राहत असलेल्या कॉलनीत मोर्चा वळवला. खिशातून किल्ली काढून दार उघडायचा प्रयत्न करीत असलेल्या अभिजीतच्या लक्षात आलं की दाराचं कुलूप बदललेलं आहे. आतून हसण्या बोलण्याचे, कपबशांचे आवाज येत आहेत. आश्चर्याने आणि नाईलाजाने त्याने बेल वाजवली आणि समोरचे दृश्य बघून दोघेही थिजून गेले.

आईच्या सहासात मैत्रिणी गोळा झाल्या होत्या. आई कुणाला विणकाम शिकवत होती तर कोणाला भरतकाम.

 रेवती त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून निर्भयपणे म्हणाली,

अरे त्या सुधाताई खूप चांगल्या आहेत बरं का! मी कुणालाच न सांगता, नातेवाईकांचा मैत्रिणींचा निरोप न घेताच इथे आणून सोडले गेले आहे हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला लगेच घरी जाण्याची मोकळीक दिली. तू तुझ्या घरात आनंदाने राहा आणि कधी वाटलं तर इथे हक्काने ये असंही सांगितलं. तू त्यांना दिलेले पैसेही त्या परत करणार आहेत.

तेवढ्यात रेवतीची गाण्याची वही हातात असलेली नीला म्हणाली, “रेवती, तुझ्या वहीतलं हे नवीन गाणं किती छान आहे… 

या सखयांनो परत फिरा ग

घराकडे अपुल्या

तिन्हीसांजाऽऽ करा सुखाच्या.

 रेवतीच्या मनात येत होतं, नरेंद्र भाऊजींनी आपल्याला दाराचं कुलुप लगेच बदलण्याचा किती योग्य सल्ला दिला होता.

“निघतो आम्ही. ” रागारागाने अभिजीत जाण्यासाठी वळत म्हणाला तेव्हा त्याच्या खिशातून अनघाच्या सल्ल्याने, दरवाजाचे बदलायला म्हणून आणलेले कुलूप त्याला बोचकारत होते.

 समाप्त – 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिन्हीसांजा – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ तिन्हीसांजा – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भास्कर गेला.

*दिवसकार्य झाले. आलेली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. फक्त मुलगा आणि सुन राहिले होते. *

*गेले दोन तीन दिवस रेवती बघत होती की मुलगा आणि सुन* *तिचीही बॅग भरत होते. *

*तिच्या साड्या, भरतकाम* *विणकामाचं साहित्य, गाण्याच्या वह्या. *

*स्पष्ट बोलणं झालं नसलं तरी मुलगा त्याच्या घरी घेऊन जात असणार असा रेवतीचा अंदाज होता. *

*एकदोनवेळाच पाहिलेलं त्याचं अलिशान घर तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं*…

*”उद्या सकाळी लवकर आपण निघणार आहोत” रात्री झोपतांना मुलाने सांगितलं*

*ती बरं म्हणाली*..

*पण मुलाची अलिशान कार जेव्हा मुंबईच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण मुलाच्या घरी चाललेलो नाही. *

*कुठे चाललोय आपण? तिने विचारलं*

*”कळेल” मुलाचं अल्पाक्षरी उत्तर*…

*गाडी आता कशेडी घाट उतरत होती*.

रेवतीला चिपळूणपर्यंतचा रस्ता माहित होता कारण ती आणि भास्कर अनेकदा संगमेश्वरला देवदर्शनाला आली होती.

‘संगमेश्वरला देवदर्शनाला चाललोय का आपण? ‘ न राहवून रेवतीने विचारले.

‘तसंच काहीसं’ अभिजीतचं– मुलाचं- तुटक उत्तर आलं. अनघाने— सुनबाईने–गाडी सुरू झाल्यापासून झकास झोप काढली होती. वाटेत थोडं खाणंपिणं झाल्यावर अनघाने मोबाइलमध्ये जे डोकं खुपसलं होतं ते वर केलंच नव्हतं. या क्षुद्र जगाशी काही संबंधच नसल्यासारखंच वागणं होतं तिचं!

चिपळूणनंतर गाडी एका वेगळ्याच आडरस्त्याला वळली. खाचखळग्यांचा रस्ता पार करत एका कौलारू घरापुढे उभी राहिली.

‘तिन्हीसांजा’ ही त्या घरापुढील पाटी वाचून रेवतीच्या लक्षात आलं की, आपल्याला आता एका वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे.

अनिच्छेने रेवती खाली उतरली. तेवढ्यात एक गोरटेल्या, सतेज, साठी ओलांडलेल्या बाई बाहेर आल्या. “या मंडळी! तुमचीच वाट पाहत होते. ” हसतमुखाने त्या म्हणाल्या.

अभिजीतने रेवतीच्या दोन बॅगा काढून त्या बाईंच्या ताब्यात दिल्या. त्यांच्याबरोबर काही बोलून अभिजीत गाडीत बसण्यासाठी वळला.

“थोडं चहा पाणी घेऊन जा”.

“नको, नको. आम्हाला काळोख व्हायच्या आत महाबळेश्वरला पोहोचायचं आहे. आमची दोन्ही मुलं आजी-आजोबांबरोबर तिथल्या हॉटेलमध्ये आमची वाट पहात असतील”. अनघाने तर गाडीतून उतरण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती.

रेवती गाडीतून उतरून, अंगण ओलांडून घराच्या पायऱ्या चढत होती. तिला कुणाकडेच बघण्याची, बोलण्याची इच्छा नव्हती. आपल्याला न सांगतासवरता फसवून या इथे आणून सोडलं म्हणून तिच्या मनातला संताप डोळ्यातून बाहेर पडत होता. सर्वांग गदगदंत होतं.

सुधाताईंना अशा प्रसंगांची सवय होती. त्यांनी शांतपणे रेवतीच्या पाठीवर हात फिरवला.

“सकाळपासूनच्या प्रवासाने दमला असाल. हात पाय धुवून घ्या. चहा पोहे खाऊ आणि मग बोलू”.

रेवतीचे हुंदके थांबत नव्हते. सुधाताईंनी तिला हळूच धरून मागील दारी नेले. गार पाण्याने स्वच्छ हात पाय धुतल्यावर आणि चहा पोहे पोटात गेल्यावर रेवतीला थोडं बरं वाटलं.

सुधाताईंबरोबर मागच्या वाडीत फिरताना स्वच्छ मोकळी हवा आणि ताजा वारा यामुळे रेवतीच्या मनातले काळे ढग थोडे विरळ झाले. क्षितिजावर रेंगाळणारी मावळत्या सूर्याची किरणं माडांच्या झावळ्यांमधून निरोप घेत होती. शेलाट्या, उंच पोफळी वाऱ्याबरोबर डोलत होत्या. आंब्या-फणसांची भारदस्त झाडं तिच्याकडे आश्वस्त नजरेने पाहत होती. हळूहळू फुलणाऱ्या प्राजक्ताचा, गुलबाक्षीचा आणि झाडांच्या पाचोळ्याचा एक विशिष्ट गंध वाऱ्याबरोबर येत होता.

रेवतीच्या मनात आलं, ‘कॉलनीतल्या मैत्रिणींबरोबर दोन दिवस ट्रीपला येण्यासाठी हे ठिकाण नक्कीच छान आहे. पण… पण आपली फसवणूक करून आपल्याला इथे आणून सोडलं आहे याचं शल्य तिच्या अस्वस्थ मनात भरुन राहील होतं. थोड्यावेळाने सुधाताई म्हणाल्या,

“चला, संध्याकाळची प्रार्थना म्हणूया” रेवतीने पाहिलं तर अंगणात आता आठ- दहाजणी बसलेल्या दिसल्या. त्या कातरवेळी, शांत वातावरणात शुभंकरोती, रामरक्षा, श्रीसूक्त ऐकताना रेवतीच्या मिटलेल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. सुधाताईंनी नुसता पाठीवर हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, “रात्री जेवणं झाली की बोलूया बरं”.

गरम भाकरी, भात, त्यावर तुपाची धार, कुळथाचं पिठलं, पापड, तळलेली सांडगी मिरची असा साधा पण आवडता बेत होता. सुधाताईंसह हसत बोलत अंगत- पंगत चालली होती. रेवतीलाही भूक लागली होती. स्वयंपाक करणाऱ्या काकू सगळ्यांना आग्रहाने वाढत होत्या.

स्वयंपाकघर आवरल्यावर सुधाताईंनी हळूच खूण करून रेवतीला मागच्या अंगणात तुळशीच्या कट्ट्यावर बोलावलं. तुळशीजवळ लावलेल्या पणतीचा प्रकाश घराच्या भिंतीवर सावल्यांचा खेळ करीत होता. रेवती अस्वस्थ मनाने सुधाताईंना काय आणि कशा शब्दात सांगायचं याची जुळवाजुळंव करू लागली.

तिचे मन जाणून सुधाताई बोलू लागल्या.

“रेवती, हे आमचं वडिलोपार्जित घर बर का! मुलगा हुशार. पुण्याला राहून शिकला आणि अमेरिकेत पोचला. आता त्यांना कुणालाच परत यायचं नाहीये. ‘हे’ गेल्यानंतर मलाही अमेरिकेत नेत होता पण मला त्या तुरुंगात अडकण्याची इच्छा नव्हती. हे घर, वाडी आणि थोडी शेतजमीन माझ्या नावावर असल्याने आर्थिक दृष्ट्या मी कुणावर अवलंबून नाही. मी शांतपणे पण ठामपणे मुलाबरोबर कायमचे अमेरिकेला जायला नकार दिला. ‘संध्याकाळ’ आपल्या घरातच घालविलेली बरी. नाही का? “

माझ्याबरोबर दुसऱ्या अशाच काही मैत्रिणींना, शाळा कॉलेजात जाणाऱ्या गरजू मुलींना थोडा विसावा देता येईल, मलाही सोबत होईल अशा विचाराने मी इथे राहिले आहे. तुझ्या रडण्यावरून आणि मुला- सुनेच्या वागण्यावरून असं वाटत आहे की, तुझ्या इच्छेविरुद्ध तुला इथे आणून सोडलं आहे. मोकळेपणाने सांग. आपण यातून तुला आवडेल असा मार्ग नक्की काढू. ” 

रेवतीने आश्चर्याने सुधाताईंकडे पाहिलं. खरंच? खरंच असं होईल?

रेवतीच्या डोळ्यातले भाव वाचून सुधाताईच पुढे म्हणाल्या,

“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.

रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

श्यामरावांनी पाह्यल,आई सकाळपासून अस्वस्थ आहे. परदेशी शिकायला गेलेल्या संग्रामची तिला खूप आठवण येतीय. आम्हाला दोघांनाही त्याची आज सकाळी खूप आठवण येत होती.. पण मनाची समजूत काढली, शिकून मोठ्ठा होणार आहे आपला लेक. आणि हो! पंख फुटल्यावर पाखरू घरट्यातून आसमंतात भरारी घेरणारच… पण वयानी आणि मनानी हळव्या आजीला ते समजत होतं पण उमजत नव्हतं. नातू गेल्यापासून ती अबोल झाली होती. तिला कसं खुलवावं आम्हाला म्हणजे मला आणि शामलाला कळतच नव्हतं. तिला मनवायला संग्राम.. तिचा लाघवी नातू दूर देशी गेला होता ना! ..

इतक्यात संग्रामचा.. तिच्या नातवाचा फोन आला. आमच्यात खाजगीत बोलणं झालं. संगनमत होऊन विचारांचं मेतकूट जमलं. शामलाला हे गुपित सांगितल्यावर तिचीही कळी खुलली. ती सासूबाईंना म्हणाली, “आई तयार होता का, आपल्याला तुमचा वाढदिवस साजरा करायला बाहेर फिरायला जायचंय”.

तिला अडवतं आजी म्हणाल्या, “अगं काय हे शामला,! विसरलीस का? वाढदिवस साजरा करायला माझा नातू तरी आहे का इथे? ” ” त्याच्याशिवाय कसला वाढदिवस? मला नाही कुठे यायचं”.

“चला ना आई आपण फिरून येऊ म्हणजे तुमची उदासी कुठल्या कुठे पळेल”..

मिनतवारीने आजी तयार झाल्या. गाडी संग्रामच्या आवडत्या मिठाईच्या दुकानाजवळ थांबली. हातातला जिलबीचा पुडा बघून आजी लेकाला,शामरावांना म्हणाल्या,”शाम्या आधीच सांगते हो! मी जिलबीचा एकही तुकडा खाणार नाही. अरे! नातवाशिवाय जाईल कां मला”! हे बोलतांना भरून आलेले डोळे त्यांनी पदराने पुसले. हाच पदर धरून लहाना संग्राम घरभर नाचायचा. पण आता तो मोठा झालाय ना! दूर देशी पळालाय. आता त्याचं बालपण सरलयं. कुठे शोधू त्याचं ते चिमुकलं बालपण? .. हळव्या मनाच्या आजींचा पदराचा शेव अजूनच ओला झाला..

झोकदार वळण घेऊन गाडी एका लहान मुलांच्या आश्रमाजवळ उभी राह्यली. समोर धोतर, कोट, टोपी घातलेले गृहस्थ श्री. आप्पासाहेब आणि बाल मंडळी गुलाब घेऊन उभी होती.. “सुस्वागतम्” असं स्वागत करून तो बालचमुंचा समूह आजींकडे धावला. शामराव पुढे होऊन गोंधळलेल्या आईचा हात धरून म्हणाले, “आई अगं! हा बालआश्रम आहे आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या प्रेमाला परिस्थितीमुळे ही मुले पारखी झालीत. ऐक ना आई! पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलंय. तुझा नातू आता वयानी मोठा झालाय. मानाने खूप खूप मोठ्ठा होण्यासाठी आपण त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवलंय. तो परत येणारच आहे गं! पण त्याचं बालपण नाही परत येऊ शकत. तुला ते नातवाचं हरवलेलं बालपण हवयं ना? मग तू संग्रामचं बाळरूप ह्या बाळांमध्ये शोध. नक्कीच तुला तुझा नातू ह्यांच्यात दिसेल. “. आजींचा कंठ दाटून आला. डोळे आनंदाने भरून आले. आधीचे अश्रू आठवणींचे होते आणि आत्ताचे आनंदाश्रू होते..

फुगे माळा सुगंधी पुष्प, समई श्रीगणेशमूर्तीपुढची सुरेख फुलांची रांगोळी, औक्षवणाच्या तयारीने हॉल सजला होता.

शामलाने सासूबाईंना औक्षण केले. बावरलेल्या आजींनी हे सारं सुख डोळयात साठवलं. श्रीगणेशाला जिलबीचा नैवेद्य दाखवला गेला. आणि अचानक वेगाने छोटा अबीर प्रसादाच्या ताटाकडे झेपावला. आप्पासाहेब त्याच्या मागे धावतांना म्हणाले,”अरे थांब अबीर,आजी देतील तुला प्रसाद. असा हाताने प्रसाद घ्यायचा नसतो बाळा”

पण हे ऐकायला तो चिमूरडा जागेवर होताच कुठे, आजींचा पदर ओढून तो म्हणत होता,

“अहो आजी,आजी नाही हो मला! तुम्हाला म्हणू कां मी आजी? “.. सगळी माया एकवटली गेली.. प्रेमाने त्याला जवळ घेत आजी म्हणाल्या,. “होय रे होय बाळा! होईन मी तुझी आजी, तू माझा दुसरा संग्रामच आहेस”

अबीरने जिलबीचा तुकडा आजींच्या तोंडात सरकवला. टाळ्या वाजवत तो म्हणाला” हॅपी बर्थडे आजी”.. “अगं बाई हे काय? संग्रामच्या हंसण्याचा आवाज? म्हणजे माझा संग्राम आलाय की काय? ‘ गोंधळलेल्या आजी इकडे तिकडे बघू लागल्या. श्यामरावांनी त्यांच्यासमोर मोबाईल धरला. व्हिडिओतून संग्राम, आजींचा नातू टाळ्या पिटत म्हणत होता, “हैप्पी बर्थडे माय डियर आजी” अगं केव्हापासून मी व्हिडिओ वरून तुला बघतोय. आजी अगं शरीराने मी इथे असलो ना, तरी तुझा नातू मनाने तुझ्या जवळच आहे. खाल्लीस ना तू अबीरच्या हातून जिलबी? ती अगदी माझ्या हातचीचं समज. अबीरच्या डोळ्यात बघ. त्याच्यात लहानपणीचा तुझा नातूच तुला दिसेल. भरपूर प्रेम दिलसं तू मला. आता माझ्या प्रेमात हा चिमूरडा भागीदार झालाय. तुझ्या मायेचा भागाकार नाही गुणाकार होउं दे. माझ्या इतकचं प्रेम, माया संस्कार तू ह्या बालमंडळींना देणार आहेस हो ना गं आजी? ही अशी समाजसेवाच तुझ्या हातून घडेल.. हो ना? “.

आजी खुदकन् हंसल्या. मनाशी म्हणाल्या ‘जग किती पुढे गेलंय,साता समुद्रापलीकडे असलेला माझा नातू मला व्हिडिओतून भेटला ‘ आणि मग,सगळ्या बालमंडळींना कवेत घेतांना आजींचा पदर अपुरा पडला. त्यांच्या कवेत सारं ब्रह्मांड अवतरलं होतं. श्री गणेशाला हात जोडून त्या म्हणत होत्या, “देता किती घेशील दोहो कराने”.

आईचा हसरा चेहरा बघून श्यामराव शामलाला म्हणाले, “आजीला खुलवण्यासाठी नातवानी, संग्रामनी केलेलं सरप्राईज सक्सेस झालं म्हणायचं. जे तुला अन् मला जमलं नाही, ते ह्या पठ्ठयाने, एका मिनिटात जमवलं. “.

आजी गुणगुणत होत्या, “ देव जरी मज कधी भेटला काय हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई माझ्या या बाळांना ”

– – आणि तो क्षण टिपायला संस्थेचे चालक आणि मालक श्री. आप्पासाहेब कॅमेरा घेऊन पुढे सरसावले..

धन्यवाद आप्पासाहेब..        

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर

यशस्वी उद्योगपती, श्रीमंत अनिवासी भारतीय शशिकांत भारतात यायचे ते फक्त कामाच्या निमित्तानंचं. नातेवाईकांशी फोनवर बोलणं व्हायचं पण कधीही भेटण्याचा योग आला नाही. म्हणूनच भेटीगाठी साठीच शशिकांत बायको विदुला आणि मुलगी विनी सोबत भारतात आलेले. गावी जाताना मुख्य डांबरी रस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागल्यावर एसी गाडीतल्या मायलेकी जाम वैतागल्या.

“हॉरिबल रोड, पपा, व्हेअर वी गोइंग”

“आपलं मराठी बोलायचं ठरलंय ना. ”

“ओके, आय मीन बराय. आपण कुठं चाललोय”विनी.

“आत्याकडे”

“व्हॉट आत्या”

“ग्रँडपांची बहीण”

“व्हाय? आय मीन, का? ”

“खूप वर्षात तिलाभेटलो नाही म्हणून. लहानपणी उन्हाळ्यात, दिवाळीला शाळेला सुट्टी लागली लगेच तिच्याकडेच रहायला जायचो. धमाल करायचो. खूप मस्त दिवस होते. ”शशिकांत जुन्या आठवणीत हरवले.

“इतका त्रास करून जाण्यापेक्षा आत्यांनाच हॉटेलवर बोलवलं असतं तरी चाललं असतं. ”विदुलाच्या बोलण्यावर शशिकांतनी त्रासिक नजरेनं पाहिलं तेव्हा विदुला एकदम बाहेर पाहायला लागली.

“तुझ्या फॉरेन लेकीला गाव दाखवायचं होतं आणि महत्वाचं आत्याला त्रास नको म्हणून आपण चाललोय”

“व्हिडिओ कॉलवर बोलायचं ना”विनी.

“फोनवर बोलायचा एकदोनदा प्रयत्न केला पण आत्याला जमलं नाही. नीट बोलणं झाल नाही आणि आत्या सारखी माझी आठवण काढत असते म्हणून तिच्यासाठीच ही व्हिजिट प्लान केली. ”नंतर आत्या आणि आपल्या बालपणाविषयी शशिकांत भरभरून बोलत होते. गावाला पोचल्यावर तिघांचं गुलाबाच्या पाकळ्या उधळत ओवाळून थाटात स्वागत केलं. ते पाहून विदुला, विनी खूप भारावल्या. घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आजकाल सर्रास दिसतं तसं दिखाऊ, नकली अगत्य नव्हतं.

“आत्या कुठंयं”शशिकांतनं आतेभावाला विचारलं.

“तिकडंय. चला, आपण जाऊ”

“आत्याचं वय सत्तर असेल ना”

‘पंच्याहत्तर पूर्ण पण थकली आता!! फार हिंडत-फिरत नाही. बसूनच असते. नजरसुद्धा फार कमी झालीये पण कान मात्र अजूनही तिखट अन बुद्धी तल्लख आहे. फार स्वावलंबी. ऐकतच नाही. आजही स्वतःची कामं स्वतःच करते. मदत करायला गेलं की खेकासते. आज तू येणार म्हणून खुशीतये”भाऊ कौतुकानं म्हणाला.

“जुनी माणसं फार अभिमानी. दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे यांना अपमान वाटतो”बोलत बोलत सगळे आत्याजवळ पोचले.

“अत्ये” शशिकांतनी डोळे मिटून जपमाळ ओढणाऱ्या आत्याला हाक मारली

“कोण रे? शशी का? ”

“हो”

“आलास का बाबा!! लई वाट पायला लावली”शशिकांत, विदुला आणि विनी तिघांनी वाकून नमस्कार केल्यावर आत्यानं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काही वेळ आत्याची विचारपूस करून विदुला, विनी घर बघण्यासाठी गेल्या. शशिकांत मात्र आत्याच्या शेजारी बसले. तिचा सुरकुतलेला थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. काहीच न बोलता दोघं एकमेकांकडे फक्त पाहत होते. आपुलकीच्या नात्याला शब्दांची गरज नसते कारण मायेचा स्पर्श भरभरून बोलतो. आत्या आणि शशिकांत दोघांचे डोळे भरले.

“अत्ये, असं का बघतेस. ”

“लई मोठा माणूस झालास. अबीमाण वाटतो. दादा-वईनीची आटवण आली”आत्यानं डोळ्याला पदर लावला.

“अत्ये, पार म्हातारी झालीस”हुंदका आवरत शशिकांतनी विषय बदलला.

“तर वो. बरं झालं आलास. जीवाला लई बरं वाटलं. आता जायला मोकळी.. ”

“असं का बोलतीस. शंभरी गाठायचीय”

“नको रे बाबा. हातपाय चालतात तवर सुटलेलं बरं!! उगा माझ्यामुळं पोरांना त्रास नग. शशी, आता आलास तर आट-पंधरा दिस रहा. तुझ्या आवडीचं खायला करते”

“पुढच्या वेळी!! यावेळेला जमणार नाही. उद्याच्याला निघेल. खास तुझ्यासाठीच आलोय. भेटून छान वाटलं”

“बरं केलसं. ” त्यानंतर सगळा वेळ शशिकांत आत्याबरोबरच होते. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दोघांनी सोबतच जेवण केलं. आत्याने प्रेमानं गोडाचा घास भरवल्यावर शशिकांत खूप भावूक झाले. विदुलानं घरातल्या सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. विनी सगळ्या नवीन गोष्टीं एन्जॉय करत होती. एरवी कायम खूप गंभीर असणारे शशिकांत खळखळून हसत होते. मोठ्या आवाजात गप्पा मारत होते. विनोद करत होते. टाळ्या देत होते. जन्मापासून बिझनेसमनच्या रुपातच पाहिलेल्या पपांना एकदम आगळावेगळ्या रूपात पाहणं विनीसाठी फार मोठं सरप्राइज होतं. दुसऱ्या दिवशी निरोप घेताना वेळी आत्याचा बांध फुटला तेव्हा शशिकांतसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकले नाहीत.

“अत्ये, माझ्याबरोबर चल, ”

“पोरा, आपलं ते आपलंच. कशाप्पयी इतका लांब गेलास. तूच इत्यं ये. ते लई बेस व्हील”आत्याच्या बोलण्यावर सगळे हसले. विनी, विदुला, शशिकांतला जवळ बोलावून आत्यानं शंभर शंभर रुपये हातावर ठेवले. निघताना विनीनं आत्यासोबत सेल्फी घेतला. परतीच्या प्रवासात शशिकांत गप्पच होते. मायलेकी मात्र जाम खुशीत होत्या.

“पपा, या स्पेशल व्हिजिटसाठी थँक्स, ग्रेट इंडियन फॅमिली!! लाईफटाईम वंडरफुल मेमरी” 

“बरं झालं आपण आलो. ही भेट आयुष्यभर लक्षात राहील” विदुला.

“आज कम्युनिकेशन खूप सोपं झालंय. एकमेकांशी कनेक्ट वाढला असला तरीही आपल्यासाठी कोणीतरी वेळ काढून भेटायला येतोय आणि कुणीतरी आपली वाट बघतंयं हे फिलिंग फार ग्रेट आहे. फोन, व्हिडिओ कॉलवर बोलणं हे फार वरवरचं वाटतं. समोरासमोर कडकडून भेटण्यातला आनंद काही औरच!! अशा आवडत्या माणसांच्या भेटीगाठी म्हणजे मनाची पॉवर बँक. कितीही बिझी असलो तरी आपल्या माणसांच्या भेटीगाठी घेणं हे श्वासाइतकंच गरजेचं आहे. ”

“पपा, आत्यानं तुम्हांला हंड्रेड रूपीज दिले ते फार फनी होतं. ”विनी 

“ए गप. काहीही बोलू नकोस”विदुलानं लेकीला दटावलं. ”

“त्यात फनी काय”शशिकांत.

“एका बिलियनरला हंड्रेड रूपीज म्हणजे.. ”विनी हसली.

“ते पैसे खाऊसाठी दिलेत. ”

“व्हॉट खाऊ!! ”

“सगळं एका क्लिकवर मिळणाऱ्या जनरेशनला खाऊच्या पैशाची मजा कळणार नाही. खाऊसाठी पैसे देणारी ही शेवटची पिढी… आत्यानं दिलेली ही सगळ्यात मोठी अमाऊंट आहे. चार आण्यापासून सुरवात झाली आता शंभर पर्यंत पोचलो. फिलिंग सुप्पर हॅपी!! ही नोट मी कधीच खर्च करणार नाही”शशिकांतचं बोलणं संपायच्या आत विदुला आणि विनी दोघीही एकदम म्हणाल्या. “आम्हीसुद्धा!!”.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares