श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “स्वराज्याच्या सौदामिनी” – लेखिका : सुश्री वसुधा परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : स्वराज्याच्या सौदामिनी
लेखिका : वसुधा परांजपे
पृष्ठ : २००₹
मूल्य : ३२५₹
प्राचीनतम कालापासून आजपर्यंतचा भारताचा इतिहास हा विजिगिषू वृत्तीने भरलेला आहे. निर्भय धडाडी, समग्र समर्पण वृत्ती, अभंग, जिद्द व असीम स्वातंत्र्यकांक्षेने स्वराज्याच्या सौदामिनी शत्रूवर कोसळल्या व अजर अमर कीर्ती प्राप्त करत्या झाल्या. सिंधप्रांत राजकन्या राणी सुदेण्णा, काश्मीरची राणी दिव्दा, उदेपुर समर सौदामिनी राणी कर्मदेवी, चितोडची अग्निज्वाला राणी पद्मिनी, चितोडची रणझुंजार जवाहिरबाई, गोंडावनाची रिपुमर्दिनी दुर्गारानी, स्वामिनिष्ठ पन्नादायी व अक्षया दासी, तुळूनाडूची किरीय अतुलनीय अब्बक्क राणी, केळवाडची स्वामींनी पत्तामाता, राष्ट्रस्वातंत्र्यजननी महाराष्ट्राच्या जिजामाता, तक्षशिला तथा तोंडांतकची राजकन्या ताराशुथान, महाराणी येसूबाई, औरंगजेबाला रडवणारी भद्रकाली ताराराणी, केळदीची राजारामांना मदत करणारी धैर्यशील चेन्नम्मा, इंदूरचे पुण्यश्लोक स्वामींनी अहिल्यादेवी होळकर, कित्तूरची रणरागिणी चेन्नम्मा, कलकत्त्याची रणधुरंदर राणी रासमानी, महेश्वरची रणचंडी राजकन्या भीमाबाई, १८५७ची कीर्ती पताका राणी लक्ष्मीबाई, नागालँडची झुंजार कन्या गाई डिन्ल्यु माँ, जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी, मराठवाड्याची वीरांगना सौ. दगडाबाई शेळके अशांसारख्या मरणाला मिठी मारणाऱ्या हजारो स्त्रियांचे चरित्र वाचले की मन निस्तब्ध होते.
अशा शूरवीर स्त्रियांच्या पराक्रमाची हि गाथा नवीन पिढीला माहित व्हावी, हीच ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना लेखक आणि प्रकाशकाची भूमिका आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







