सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

सत्यमेव जयते ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पुरणकाळापासून ज्या एका गोष्टीला अत्यंत महत्व दिले आहे ते म्हणजे सत्य. खरे बोलणे, खरे वागणे सत्याची कास न सोडणे या गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात.

त्यामुळेच नेहमी खरे बोलणारा राजा जेव्हा नरोवा कुंजरोवा असे अर्धसत्य बोलतो तेव्हा मरणोत्तर त्याला त्याची शिक्षा भोगायलाच लागली होती.

भगवान श्रीकृष्णाने धर्म युद्धात सत्याची साथ दिली होती.

हे जरी खरे असले तरी सत्याची व्याख्या कोणाला करता आली नाही.

संत ज्ञानेश्वर यांनी देखील सत्याचे अनन्यसाधारण महत्व जाणून ज्ञानेश्वरांच्या मते, सत्य म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा शोध घेणे आणि त्याद्वारे ईश्वराशी एकरूप होणे. हे एक आंतरिक आणि अनुभवात्मक ज्ञान आहे, जे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून प्राप्त होते असे सांगितले आहे. ते असेही म्हणतात “जे खऱ्या अर्थाने सत्य जाणतात, ते नेहमी आनंदी आणि समाधानी असतात. “

सत्याची एक व्याख्या अशी सुद्धा केली जाते की सत्य हे ईश्वर आहे, ईश्वर सुंदर आहे, म्हणून जे जे सुंदर आहे, ज्यात ईश्वराचे वास्तव्य आहे ते सत्य आहे. यातूनच सत्यम शिवम सुंदरम संकल्पना येऊन पुढे हेच शब्द घेऊन त्याचे एक गाजलेले गीत बनले.

परंतु सगळ्यात आधी मुंडक उपनिषेदात सत्याचा नेहमी विजय होतो हे सांगणारा सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः/ येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्//. असा श्लोक आहे. संपूर्ण मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.. सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही.. सत्य द्वारेच देवांना यात्रा पथचा जो मार्ग आहे तो विस्तीर्ण झाला, ज्या मार्गाचा आपण सर्वांनी उपयोग केला तर आपण आपले अंतिम ध्येय गाठू शकतो तसेच ऋषी गण यांनी या मंत्राचा उपयोग करूनच सत्याच्या आधारे लक्ष परमधाम प्राप्ती केली आहे. उपनिषदचे हे वाक्यांतील अंश ‘सत्यमेव जयते’ हे आदर्श वाक्य म्हणून याचा राष्ट्रीय प्रतीकात समावेश केला गेला आहे.

आपल्या राष्ट्रीय चिन्हावर हे वाक्य आपल्याला पहायला मिळते. सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य मानले जाते त्याचा अर्थ आहे, सत्याचा नेहमी विजय असे म्हटले जाते की सत्यमेव जयते हे वाक्य राष्ट्रपटलावर मान्यता मिळवण्यासाठी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारल्या गेल्यानंतर राष्ट्रीय प्रतीकांचा स्वीकार केला गेला. खरे तर अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेले असते.

आहे. 26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेल्यानंतर या राष्ट्रीय प्रतीकांना स्वीकार केला गेला. त्यामध्ये हे वाक्य सुंदर वाक्य म्हणून त्याचा राष्ट्रीय चिन्हात समावेश केला गेला.

गांधीजींनी सुद्धा सत्याचा आग्रह धरला. किंबहुना सत्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलाला सत्याग्रह म्हटले गेले. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र्यालासुद्धा माझे सत्याचे प्रयोग हे आहे.

तसेच सत्य हे न मरणारे शाश्वतवाटल्याने ज्योतिबा फुले यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.

जगातील त्रिकाला बाधित सत्य जन्मलेला तो मरणार आहे हे मानलेले असले तरी त्याहूनही मोठे असे सत्यमेव जयते हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते.

तसेच सत्याचा मोठा फायदा म्हणजे आपण काय बोललो होतो ते कधी लक्षात ठेवावेलागत नाही.

सत्यमेवची फोड सत्यम एव अशी आहे. एव म्हणजे ‘च ‘ त्वमेव माता पिता त्वमेव तूच माता तूच पिता, एकमेव एकच तद्वतच सत्यमेव म्हणजे सत्यच. सत्यमेव जयते सत्यच विजयी होते.

हे खरे आहे की सत्याच्याच मार्गावर असंख्य अडचणी असतात म्हणून लोक खोट्याचा सहज उपलब्ध असलेला पर्याय निवडतात. पण त्याची किती मोठी शिक्षा नंतर भोगावी लागते हे सत्य समोर आल्यावर कळते. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. म्हणूनच प्रत्येकानेच सत्याची कास धरली तर……

करा विचार आणि म्हणा सत्यमेव जयते

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted