☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ७ – ट्रेंड ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
ट्रेंड
आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…
बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?
पोशाख हा सर्वसाधारणपणे संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?
आपल्याकडे एक म्हण आहे.
‘ एक नूर आदमी.. दस नूर कपडा…’
थोडक्यात मनुष्याची पत प्रतिष्ठा मोजण्याचे, जाणून घ्यायचे पोशाख हे एक माध्यम आहे.
आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे पोशाख परिधान करणे उचित नव्हे काय? पण याचा विचारच केला जात नाही असे पुढील उदाहरणातून आपल्या लक्षात येऊ शकेल…
आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, खास करून गावाकडे जिथे पंख्याची किंवा शीतलीकरण साधनांची सोय करणे शक्य नाही, अशावेळी, अशा ठिकाणी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…! ) त्या नवरदेवाची स्थिती काय होत असेल…?
लग्नाच्या नावावर लोकं करीत असलेले अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरणाचे फॅड, विवाहातील मौल्यवान संस्कार सोडून त्याला आपण सर्वांनी मिळून दिलेले एखाद्या तांत्रिक सोहळ्याचे अर्थात इव्हेंटचे स्वरूप, तसेच दैनंदिन जीवन जगताना मनुष्य खोट्या प्रतिष्ठेसाठी करीत असलेले अनावश्यक खर्च, या सर्व गोष्टी वेताळ बनून आपल्या मानगुटीवर बसल्या आहेत, नाही का?
माझी ताई रमा देशमुख, वय वर्षे सत्तर मुंबईत असते. घरी पंचाहत्तर वर्षाचे भाऊजी, मुलगा सुन, नातू सर्व आहेत. फक्त शनिवार रविवार सर्व जण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायचा प्रयत्न करतात. बाकी आठवडाभर रोज सकाळी लग्न घाईच असते. आॅफिस, शाळेची रोज तीच वेळ जरी असली तरी घाई असतेच. ••••
हा सकाळचा वेळ म्हणजे ताई भाऊजींकरिता निवांत वेळ असतो. बगीच्यात बसून पेपर वाचणे, चहा घेणे, बगीच्यात झाडांना पाणी घालणे वगैरे काम ते करतात. एकदा मुलांची घाई संपली की ते आपल्या कामाला लागतात. जाता जाता अजय अनिता काही सूचना न विसरता करतातच. •••
” वेळेवर औषध घ्या. वेळेवर जेवा, अॅमेझोन चे आज एक पार्सल येईल तेवढे घ्या. दरवाजा उघडू नका. ग्रील मधूनच घ्या. ” वगैरे वगैरे. ••••
” मावशींना स्वयंपाकाचे सर्व सांगितले आहे. तुम्ही धावपळ करू नका, शाळेतून आल्यावर अनय आपल्या हाताने दूध घेईल. फक्त लक्ष असू द्या. जाता जाता अनिताच्या काळजीयुक्त सूचना असतातच. “•••
असा साधारण रोजचा संवाद असतो.
थोड्या फार फरकाने कित्येक घरी सकाळी असेच दृश्य असते.
मुलांना आई वडिलांची काळजी असतेच. नोकरी ही सांभाळायची असते. मुलांना त्यांच्या म्हातारपणाची सोयही करायची असते. सध्याची परिस्थिती बघता एकुलता एक मुलगा जरी असला, तरी त्याचे शिक्षण ट्युशन्स, ग्राउंड वर खेळायला नेणे, अशी बरीच कामं आईवडीलांना असतातच. •••
महागाई, प्राइवेट नोकरी बघता मुलांना काही कमी कष्ट, काळजी नसते. तरूण वयात जास्तीत जास्त काम करावे, पैशाची सोय करून ठेवावी असा त्यांचाही विचार असावा. •••
आई बाबांना ही सांभाळायचे असतेच.
अजय अनिता ला आईबाबांचा खूप आधार आहेच. घरी कोणी लक्ष देणारे असले की बरेच प्रश्न उद्भवतच नाही. रोज कुलुप लावायचे काम नसते. आधार असतो.
ताई भाऊजी आपलं ज्येष्ठत्व छान सांभाळतात. ••••
आज आॅफिस ला जाताना अजय सांगुन गेला, आज माझी महत्वाची मिटिंग आहे. तेंव्हा मी उशीरा येईन, संध्याकाळी जेवायला माझी वाट बघू नका. माझे बाहेरच जेवण आहे. ••••
ताईने स्वतः ला भजन, भिशी, जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, मैत्रिणीं बरोबर गप्पा टप्पा यात बिझी ठेवले आहे. अनय चार ते सहा ग्राउंड वर खेळायला जातो. त्या वेळी भाऊजी आपल्या मित्राला सोबत म्हणून त्यांच्या घरी जाऊन बसतात. ••••
भाऊजींचे मित्र श्री मनोहर जोशी मागच्या वर्षी पडले व त्यांचे दोन्ही पाय अधु झाले. आता ते व्हील चेअर वर आहेत शरीर नाजूक झाले असले, तरी बुद्धी छान काम करते. ते बुद्धिबळ कॅरम, पत्ते छान खेळतात, मॅचेस बघायला त्यांना आवडत. बरोबर त्यांच्या मित्राचा साथ असला तर दोघेही मॅचचा आनंद घेतात. त्यांची चर्चा रंगते, जोशी साहेब रोज भाऊजींची वाट बघतात. ••••
त्यांचा एकुलता एक मुलगा आनंद अमेरिकेत स्थाईक झाला आहे. पैशाची कमी नाही. त्याने चोवीस तास एजन्सी चा सहायक मदतीला घरी ठेवला आहे. तो जोशी काकांची सर्व काम छान प्रेमाने करतो.
पण मित्रांसोबत गप्पा मारणे विविध विषयांवर गप्पा, चर्चा ही पण बौद्धिक आवश्यकता असतेच. ते काम भाऊजी अगदी न चुकता रोज करतात. दोन तास आपल्या मित्रांसोबत घालवतात. आनंदला या गोष्टीची जाणीव आहे. तो मधून मधून भाऊजीं बरोबर बोलतही असतो. ••••
असा सर्व दैनंदिन कार्यक्रम सुरळीत चालू असताना, आज अचानक ताईचा पाय खुर्चीत अडकला आणि ती पडली. शेजारच्या पराग च्या मदतीने भाऊजींनी ताईला दवाखान्यात नेले. देवाच्या दयेने विशेष काही झाले नाही तरी पायाला दुखापत झाली होतीच. आता पंधरा दिवस तरी अजिबात चालायचे नाही अशी सूचना पण डॉक्टर ने दिली. ••••
भाऊजी नी मला, अनिताला फोन करून सांगितले. तसेच आनंद ला पण कळविले की आज मला तुझ्या बाबांना भेटायला जाण जमणार नाही. तरी लक्ष असू दे. •••
आजचा दिवस फारच घडामोडींचा गेला पण सर्व वेळेवर व्यवस्थित झालं. त्याच समाधान होत. ••••
दुसऱ्या दिवशीची सकाळ थोडी वेगळीच उजाडली. ताईची व्यवस्था कशी करायची?? यावर सर्व बोलत असतानाच बेल वाजली. अजयने दार उघडले तर दारात साधारण पन्नाशीच्या वयाच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या एक मावशी उभ्या दिसल्या.
त्या म्हणाल्या, •••
नमस्कार मी माणिक पाटील. मी TIME BANK हुन आले आहे. ताईंच्या मदतीला म्हणून मी आलेय. ••••
अजय मावशीं बरोबर बोलत असतानाच आनंदचा भाऊजींना फोन आला. त्याने Time Bank कडून सौ. माणिक पाटील पंधरा दिवसांसाठी घरी येण्याची बातमी दिली. •••
अजयला Time Bank बद्दल माहिती होती. पण मी, ताई भाऊजी आम्हाला काहीच कळलं नाही. •••
तेंव्हा अजयने खुलासा केला. तो म्हणाला, •••
अग!! जस आपण बॅंकेत पैसे जमा करतो ना, आणि गरजेनुसार ते पैसे वापरतो तशीच ही पण बॅंकच आहे. यात पैसे ऐवजी वेळ जमा करायचा व आवश्यकतेनुसार तो जमलेला वेळ आपल्याला वापरता येतो. ••
जगात चौतीस देशात ही बॅंक व्यवस्थित चालू आहे. मागे आनंद याविषयी माझ्या बरोबर बोलला होता. त्याने त्याच्या मित्रां बरोबर अशी बॅंक मुंबईत सुरु केली आहे. तसेच बंगलोर, राजस्थान मध्ये थोड्या फार प्रमाणात असे काम सुरू आहे. सध्या एखाद्या सोसायटी करिता किंवा छोट्या संख्येत असे प्रयोग सुरू आहेत. कागदावर लिहून किंवा फक्त विचार करण्यापेक्षा प्रत्यक्षात करून बघावा, म्हणजे नेमके, काय प्रश्न, शंका, उद्भवतात हे कळेल. संकल्पनेची माहिती लोकांपर्यंत पोहचेल. काही उत्साही लोक, संस्था मदतीचा हात पुढे करतील. संकल्पनेला भक्कम आकार देण्यासाठी नियम, सुरक्षा, बॅंकेचे व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी नियमावली, रजीस्ट्रेशन, पैशाचे व्यवस्था, वगैरे अनेक गोष्टींचा विचार विमर्श हौईल. असा हा TIME BANK चां concept आहे. असे काम करायला प्रोपर फुल प्रूफ सिस्टीम असायला हवी. एकदा का प्रचलनात आली की तेही होईल. •••
ही सोय फक्त ज्येष्ठांसाठींच आहे असं नाही. कोणीही यांचा लाभ घेऊ शकतो फक्त त्याकरिता त्यांच्या अकाउंट मध्ये वेळेचा बॅलेंस असायला हवा तरच याची सुविधा तुम्हाला मिळेल. •••
आज आपल्या घरी सौ् माणिक मावशी आल्या, कारण बाबांचा टाईम बॅंक बेॅलेंस भरपूर आहे. बाबा जोशी काकांकडे रोज संध्याकाळी जायचे, तेंव्हा तो वेळ आनंद बॅंकेत जमा करत असे. •••
त्यामुळे आज आपल्याला माणिक मावशींची मदत होत आहे. आता हा आईसाठी दिलेला वेळ माणिक ताईंच्या अकाउंट मध्ये जमा होईल. •••
अशी ही सायकल चालू राहिल
स्वीझरलॅंड साऊथ अफ्रिका, इजराईल सारख्या अनेक देशांत ही व्यवस्था छान चालू आहे. •••
तशी व्यवस्था चांगलीच आहे, गरजेची पण आहे. आता आपल्या देशात एकदा का ही व्यवस्था प्रचलनात आली तर चांगले होईल. •••
मला आनंद व त्यांच्या सारख्या शिकलेल्या मुलांचे कौतुक वाटते की त्यांनी आपली नोकरी सांभाळून या प्रकारची सेवा समाजात उपलब्ध करण्याचे ठरविले आहे.
आज आपल्यालाही त्याचा उपयोग झालाच. ••••
भाऊजी म्हणाले, •••
अरे!! पण मी काही मनोहर कडे या उद्देशाने जात नव्हतो. माझा वेळही त्याच्या बरोबर चांगला जात होता. माझी अशी काहीच अपेक्षा नाही. •••
अजय म्हणाला, ••• बाबा!! बरोबर आहे तुमचे म्हणणे. आनंद ने पण तुमच्या वेळेचा/ मदतीचा मान ठेवला. ••••
आज सर्व वेगळ्याच विश्वात होते. भाऊजी म्हणाले, •••
खरंच या तरूण मुलांचे किती कौतुक करावे कळतच नाही. खरंच ही संकल्पना छान आहे. सर्वांनाच कधी न कधी मदतीची गरज पडतेच. •••
मदत आपणही करावी आणि निःसंकोचपणे घ्यावी. •••
योग्य उद्दिष्ट ठेवून योग्य दिशेने सतत प्रयत्न केल्यास आव्हानात्मक परिस्थितीवर सहज विजय मिळवू शकतो. •••
खरंच, ते दिवस छान होते, घड्याळ एखादयाकडेच असायचे, पण वेळ सर्वांकडे.
आता घड्याळ सर्वांकडेच आहे परंतु वेळ कोणाकडेच नाही. •••
आज या गोष्टीचा खेद आहे. ••••
गरजेच्या वेळेस कोणी भरवशाची व्यक्ती माझ्या मदतीला येईल, हा विचार खूप मानसिक आधार देणारा आहे. त्याकरिता आधी •••
एकदा माझ्या एका अत्यंत अरसिक नातेवाईकाने प्रश्न विचारला होता, “दरवर्षी तुम्ही इतके फिरत असता, सात आठ दिवसांसाठी इतका पैसा खर्च करता, कशासाठी? त्यातून काय मिळतं तुम्हाला? हे निरर्थक वाटत नाही का तुम्हाला? मी तर याला उधळपट्टीच म्हणेन. ”
त्याच्या या प्रश्नाने खरं म्हणजे मी थक्कच झाले होते. शिवाय त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जी एक आर्थिक बाजू होती त्यातून त्याला बाहेर काढून कुठल्यातरी अज्ञात, पलीकडच्या आवश्यक भावनिक, मानसिक, विश्वात घेऊन जाणं म्हणजे आपलीच किती दमछाक होईल आणि ऊर्जेचा अपव्यय होईल असा विचार करून मी चक्क गप्पच राहिले. माझ्या मौनाचा अर्थ त्यांनी जो लावला असेल तो असो, मला त्याचा विचार करण्याची गरज भासली नाही.
पण तुमच्याकडे एक रुपया असेल तर अर्ध्या रुपयाची भाकरी खा आणि अर्ध्या रुपयाची फुले विकत घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुलं तुम्हाला जगणं शिकवतील. माझ्या आयुष्याची ही एक मार्गदर्शक रेखा आहे म्हणून प्रवास करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे असे मला कधीच वाटलं नाही कारण निरनिराळ्या ठिकाणची भ्रमंती म्हणजे एक विशाल असे प्रकटीकरण(एक्सपोजर) असते. जडणघडणीचे एक सक्षम आणि भक्कम माध्यम असते. प्रवासात येणारे भले बुरे अनुभव, होणारी विविध व्यक्तींशी ओळख, अडचणी, संकटे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत न डगमगता कसं स्थिर राहावं याचं प्रात्यक्षिक देणारं ठरतं. प्रत्येक भ्रमंतीत असे विविध अनुभव येतातच असाच आणखी एक कसोटीचा क्षण ठरावा असा भयप्रद अनुभव आम्ही दोन-तीन वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशातल्या “बाली” या बेटावर गेलो असताना घडला. त्याच बाली सफरीतले काही वेचक क्षण. ही सफर आम्ही साधना, सतीश, सुमन, प्रमोद याआमच्या जीवलग मित्रमैत्रिणींसोबत केली होती.
फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.
समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले. उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता. सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे. त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच. तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.
बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र, रंगी बेरंगी, चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते. आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी हे एक नृत्य. साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या….
या जुन्या गाण्याचीही आठवण झाली.
काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं. एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.
परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले, ” अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच. जा पण सांभाळून.. ”
मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो. वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू. बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.
हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे सोपे नव्हते. पाय वाळूत रुतत होते. रुतणारे पाय काढून पुढची पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता. समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.
विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता. आम्ही दोघं खूपच मागे राहिलो. मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”
मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.
We have failed” आपण उंट नव्हतो ना…
कुठून तरी साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली. सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार. मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श!! आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, *देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ*
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको.. हेच खरे.
शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.
दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला. पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो, त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत आखू लागले.
दुसर्या दिवशीच्या सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.
अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.
अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं. पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता.
थोडं हसतो थोडं रुसतो
प्रत्येक आठवण
पुन्हा जागून बघतो ।।
अशीच मनोवस्था झाली होती.
सिंधुसम हृदयात ज्यांच्या
रस सगळे आवळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो..
बा. भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो.
असे हे बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण!!
तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त, सैल होता.
इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली.
ही गव्हाळ वर्णीय, , नकट्या नाकाची, गोबर्या गालांची, मध्यम उंचीची, गुटगुटीत ईंडोनेशीयन माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही आहेत.
भाषेचा प्रमुख अडसर होता. कुठलीही भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते, भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.
सहज आठवलं, पु. ल. जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला.
बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द *सुसु*.
बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात.
पण त्यांनीही आपले, ’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता!
या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.
राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.
बाली या शब्दाचा अर्थ त्याग.
बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे. आणि तो अधिक बरोबर वाटतो.
आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ. बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.
बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हतीा हे मात्र खरं!!
संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.
संगीत, जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत, सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे. थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत होतो. LIVE AND LET LIVE.
एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं. वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.
अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.
एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.
घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं, सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं? ”
रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.
मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.
चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं, पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात, हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?
हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.
पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?
नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच गाडी का थांबवतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?
लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून, काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!
माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!
अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.
भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?
ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं. अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का? लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.
गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल.. सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील…!
आपल्या मराठी भाषेत विशेषणाची अगदी रेलचेल आहे. रंग असेल तर लाल भडक, पिवळा धमक, पदार्थ असेल तर खमंग ढोकळा, खुसखुशीत चकली, चमचमीत भेळ वगैरे, यांनी काय बरे होते. उदा. भेळ म्हंटल्यावर नॉर्मल चिरमुऱ्यांची भेळ. चमचमीत भेळ म्हटले कागदात वरपर्यंत ढीग लावलेली वरून बारीक शेव त्यावर मिरची कैरीची फोड हे चित्र उभे करण्याची ताकद या विशेषणांमध्ये असते. पण काही शब्द हे स्वयंभू असावेत विशेषणांशिवाय परिणाम साधतात. लोणचे हे त्यापैकीच एक. लोणचे शब्द उच्चारला की तोंडाला पाणी सुटते. वेगळे विशेषण लावायची त्याला गरज नसते. तसे आंबट, गोड खारट, तिखट अशा सगळ्या चवीचे मिश्रण असले तरी त्यातली प्रत्येक चव स्वतंत्र अनुभवता येते. खरे तर या चवी लोणच्यात प्रमाणापेक्षा थोड्या जास्तच वापरल्या जातात. पण एकत्र मुरल्यावर त्या जी काय चव धारण करतात त्याला तोड नाही.
तात्पुरते भाज्यांचे लोणचे. उत्तरेकडे मोहरीच्या तेलातील लोणची, दक्षिणेकडील वेगळ्या मसाल्यातील लोणची असे अगणित प्रकार आपल्या भारतात पहायला मिळतील.
पानात मिठाच्या खालोखाल डाव्या बाजूला विराजमान होणारे लोणचे, चटणी आणि कोशिंबीर.
पण लोणच्यामुळे पान देखणे दिसायला लागते. वाढायला सुरुवात केल्यावर चटणी किंवा कोशिंबीर कोणी चाखून बघत नाहीत. तो मान लोणच्याचा. लोणचे बोटावर घेऊन चाखल्याशिवाय राहवत नाही.
लोणचे काय करते तर, सगळ्या चवी आपल्या मुखात स्त्रावयला लागतात आणि आपली जेवणाची इच्छा वाढवतात. हे झाले शास्त्र.
पण लौकिक अर्थी काय काय करते बघूया
एखादी भाजी चांगली झाली नसेल, तर बायकोला न दुखवता नवऱ्याच्या मदतीला धाऊन जाते.
मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर उपयोगी येते. अचानक पाहुणे आले तर भाजी सोबत पुरवठा म्हणून येते.
शेजाऱ्यांची वाटी आली असेत तर त्यात काय घालून द्यायचे तर लोणचे.
शिवाय पराठे, धपाटे, थालीपीठ, मुगाची खिचडी यां पदार्थांची रंगत लोणच्याशिवाय नाही, की लग्नाची पंगत ही नाही.
संध्याकाळी बरणीतून काढायचे नाही, तिन्ही सांजेला कुणाला देऊ नये, माहेरवाशिणीना लोणचे देऊ नये अशाही काही याच्या मान्यता आहेत.
भात, भाकरी खाऊन पोटाची भूक भागते पण जिभेची तृप्तता करण्याचे सामर्थ्य लोणच्यातच.
असे हे लोणचे इतके वर्ष घरगुती विषय होता. पण मध्यंतरी आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा लोणचे घालतानाचा एक व्हिडिओ वायरल झाला. तोही छान भारतीय बैठकीत अगदी घरगुती साध्या कपड्यात. अगदी आपण घरी असतो तशा.
.. त्या व्हिडिओ मध्ये त्यांचा साधेपणा दिसत होताच – – पण त्याचसोबत – –
… एरवी घरात बरण्यामध्ये साठवलेले, गरजेपुरते बाहेर काढले जाणारे साधे लोणचे मात्र त्यादिवशी ग्लॅमरस झाले…
☆ “अस्थिहीन जिव्हा आणि भिक्षापात्रे !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
निसर्गाने हाड नसलेला जीभ नावाचा एक महत्त्वाचा अवयव निर्माण केला तो बोलणे सुलभ व्हावे म्हणून. हा अवयव लवचिक असल्याने त्यातून कोणत्याही शब्दांचा उच्चार करता येतो. पण असे असले तरी काहीही बोलू नये, असे अपेक्षित असते. जिभेला हाड असते तर जीभ मन मानेल तशी वळली नसती.. म्हणून तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? असं रागावून विचारले जाते. अर्थात, आपल्या जिभेला हाड आहे, असे समजून जीभ वापरली पाहिजे. हा संकेत पाळला नाही तर या जिभेच्या शब्दाने ऐकणाऱ्या माणसाला बोलणाऱ्याचे हाड मोडायची इच्छा होऊ शकते!
गेल्या तीन दिवसांत अशा अनेक जिभा वळवळत आहेत. आणि दुर्दैवाने ही वळवळ बघावी आणि ऐकावी लागत आहे!
पूर्वी समाजमाध्यमे म्हणजे रेडिओ आणि वर्तमानपत्र आणि पुढे फार फार तर दूरदर्शन असा कारभार होता.
आता माळरानावर जाऊन बोंब मारायला पाटलाची परवानगी लागत नसल्याने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला आहे!
यात आघाडीवर आहेत ते इलेक्ट्रॉनिक मिडिया मधील अधिकृत आणि स्वयंघोषित वार्ताहर. वार्तेचे हरण (हरिण नव्हे!) करणारे म्हणजे बातमी शोधून, हुडकून ती हरण करून, पळवून घेऊन जाणारे ते वार्ताहर. पण म्हणून काहीही पळवून न्यावे का?
ज्या विषयाचे तांत्रिक ज्ञान आपल्याला नाही, तसे ते इतरांनाही नसावे, अशा आविर्भावात ही मंडळी बोलत असतात. घटनास्थळ आणि विमानतळ यांत कित्येक किलोमीटर्स चे अंतर होते, असे सांगणारे प्रतिनिधी दिसले! सामाजिक विषयांवर उत्तम live येणारे काही विमानविद्येवर तुफान बोलताना दिसले!
फेसबुक, यूट्यूब व्हिडिओ यांच्या माध्यमातून बरेच पैसे मिळू शकतात, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. Likes जितक्या जास्त तेवढे पैसे मिळण्याची शक्यता अधिक असाच हिशेब असल्याने येनकेन प्रकारे लोकांनी like करावे, comment करावे, share करावे, असा प्रयत्न होणे साहजिकच आहे. पण त्यासाठी भिक्षापात्र अवलंबणे कितपत योग्य आहे? हे लाजिरवाणे जिणे जळाले तरी चालेल का?
अमूक व्यक्तीला अमूक पदी नेमावे असे कुणाला वाटते आणि कुणाला वाटत नाही? या पोस्टवर लोक सहज व्यक्त होतात, कारण सध्या हा विषय ऐरणीवर आहे. खरं तर, चितेची राख थंड होण्याआधीच या चर्चा सुरू केल्या जातात, हेच दुर्दैवाचे आहे! एखाद्या पोस्ट वर आपण नाही म्हटले किंवा होय म्हटले तर कोण ऐकेल? या संख्येवर निर्णय होणार आहे का? हा काय अधिकृत surevy आहे का? पण अशा पोस्ट्स वर हजारो comments दिसतात!
खरेच भक्त असाल तर या संताच्या, नेत्याच्या फोटोला like कराल… अशी गळ घातली जाते!
बारामती विमान अपघातसदृश भलतेच व्हिडिओ अपलोड केले जात आहेत, लोक उत्सुकतेपोटी हेही व्हिडिओ खरे म्हणून पहायला जातात!
आणि व्हिडिओवाला म्हणतो… हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा… कारण youtube वाले अर्धवट व्हिडिओ पाहिला गेला की पैसे देत नाहीत. म्हणून हे लोक आमटीत पाणी घालत राहतात.
लोकांना बीभत्स बघण्याची चटक लागली आहे. आणि त्याचाच फायदा घेत विविध व्हिडिओ share होत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीचा छिन्नविछिन्न देह बघण्याची इच्छा का व्हावी. त्याची शेवटची हीच प्रतिमा आपल्याला मनात कोरायची असते का?
अपघात नव्हे घातपात हे ठासून सांगणारे सर्वाधिक आहेत. नशीब याबाबतीत तरी बहुमतावर काही निर्णय होत नाही ते!
आणखी एक… श्रद्धांजली वाहताना… मला त्यांचे राजकारण आवडत नव्हते, मतभेद होते, मतभेद असू शकतात, अशी पुस्ती जोडायला लोक कमी करत नाहीत! केवळ श्रद्धांजली वाहिली असती तर तुम्हांला लोकांनी त्यांचे अनुयायी म्हटले असते, अशी भीती वाटते का?
शोक करणाऱ्या व्यक्तीचे close ups का हवे असतात छायाचित्रकारांना? तुमच्या भावना काय आहेत हे शोकमग्न नातेवाईकांना विचारणे कितपत शहाणपणाचे आहे?
यावर उपाय म्हणजे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत राहणे… पण हे शक्य होत नाही! आणि यामुळेच सर्वांचे छान चालले आहे!
आजवर झालेल्या अपघातांच्या रीतसर चौकशा झालेल्या आहेत, पण त्यांचे निष्कर्ष कुणी पहात नाहीत. जनरल कमेंट म्हणजे आपलं मनाला वाटेल ते बोलून मोकळं होणं लोक पसंत करतात. फेसबुक, व्हॉट्सॲप मुळे हे बोलणं एकाच वेळी अनेकांना ऐकावे, वाचावे लागते! दिशाभूल करणारे मथळे, फोटो आणि व्हिडिओ यांची आजकाल चलती आहे. कृपया विवेक से काम लें! असे म्हणावेसे वाटते!
‘लोक जैसा ओक धरवेना’ असे तुकोबाराय म्हणून गेलेत, ते खरेच! असो.
☆ एक आई “वरती”… एक आई “खालती”…☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
एक आई “वरती”.. एक आई “खालती”
खरेतर प्रत्येकाला तीन आई असतात.
एक जिने जन्म दिला
दुसरी धरणी माता
तिसरी भारतमाता!
तिन्ही श्रेष्ठच, . पण तरी जन्मदात्री आई बद्दल विशेष स्थान आपल्या जीवनात नेहमीच असते. जोवर ती असते तोवर आपण खूप निवांत असतो. आपल्यातील खोडकर मूल जपण्याचे काम आईच तर करते. मात्र ज्याक्षणी ती आपल्याला सोडून वर निघून जाते त्या क्षणी आपण अचानक “मोठे” झाल्याचे जाणवते. “पोरका” या शब्दाचा अर्थ कळायला लागतो.
असाच मला तो कळला जेव्हा आई “सोडून” गेली. खूप दिवस एकाकी होतो.
सामाजिक कामात मन गुंतवून घेत घेत त्या एकाकीपणातून थोडाफार बाहेर आलो, पण तरी तिची सर येणे शक्य नव्हते. मात्र एक दिवस अचानक एका मातेची ओळख झाली तीही सोशल मीडियावरच. “बाबा आमटे विचारधारा” नावाचा एक ग्रुप आहे. जिथं सामाजिक काम करणारे विविध लोक एकत्र आलेत. तिथं भेटल एक दाम्पत्य… श्री व सौ अनुश्री भिडे… वास्तव्य ठाणे. (मुंबई)
श्री भिडे नामांकित बँकेतून निवृत्त झालेले. दोघांशी परिचय वाढला. आणि त्यातूनच एक दिवस थेट ते मला भेटायला ऑफिसवर पुण्याला आलेले. आणि त्यानंतर स्नेहधागा अधिक बळकट झाला. अतिशय प्रेमळ असं हे दाम्पत्य. अक्षरशः लखपती असूनही निगर्वी… आणि अत्यन्त साधी राहणी. “वरणभातवाले आम्ही लोक” असं ते म्हणत. यात सगळं आलं.
मात्र दुर्दव असं की भिडेकाका अचानक “वर” गेले आणि माउली एकटी पडली. पन्नास साठ वर्षाचा सहवास होता त्यामुळे माउली फारच दुःखात… त्याकाळात जमेल तसे त्यांच्या सोबत राहून त्यांना सावरत होतो. त्याही मन मोकळं करायच्या.
हळूहळू सावरल्या. त्यांना सांगितलं की, “काका आहेतच सोबत… फक्त ते आता तुमच्या वाढीव सामाजिक कामातून लोकांना दिसतील. तर अशी काम करायला घ्या आता”
त्यांनीही ते मनावर घेतलं. आणि कळलं तर तुम्हालाही वेड लागेल इतकं मोठं काम त्या करत गेल्या. काही एनजीओ बद्दल मी जेव्हाही पोस्ट करायचो तेव्हा त्याचा निरोप यायचा की “त्या संस्थेचा” नम्बर आणि पत्ता पाठवा. आणि तात्काळ त्या तिथं जाऊन जमेल तशी मदत करायच्या.
एक झलक सांगतो. मराठी इंग्रजी भाषेविषयी सोप्या भाषेत एक पुस्तक प्रज्ञा (माझी एफबी फ्रेंड) हिने लिहिलेले. हल्ली पुस्तक विकत घेऊन वाचणे कमी झालेय हे सर्वाना माहित आहे. मात्र अनुश्रीताईनी काय करावं? ते पुस्तक घराघरात गेले पाहिजे म्हणून चक्क दीड लाख रुपयांची ती पुस्तके खरेदी करून लोकांना वाटून टाकली. नंतर नंतर तर प्रज्ञा फक्त यांच्यासाठी पुस्तक काढतेय अशा आवृत्या निघत गेल्या.
कोण करत कुणासाठी इतकं?
एकदा मी त्यांना म्हटलं पण, “अहो, सगळं उधळून टाकताय… तुम्हालाही वृद्धपण आहे. औषधपाणी दवाखाना आहे. त्याची तरतूद ठेवा की “
तर म्हणाल्या… “त्याची का काळजी करू? तुमच्यासारखे आहेत की”
काय बोलणार यावर? महिन्याला लागतात मला किती दहापाच हजार पुरतात असं म्हणत बाकी सगळी पेन्शन त्या समाजासाठी खर्च करून टाकतात. आजवर किती खर्च केले यावर मी विचार केला तर कैक लाख रुपये माझ्याच समोर यांनी देणग्या देऊन समर्पित केलेले आठवले. काय म्हणावं अशा माउलीला?
मधेच कधीतरी त्यांच्याकडून फोटो येतात अन मी कपाळावर हात मारतो. कुठंतरी दूर डोंगर दऱ्यात कुणीतरी शाळा चालवत असत तिथं या जाऊन मुलाला पाटीपुस्तक दप्तर ड्रेस देऊन आलेल्या असतात. तर कधी सेवा सहयोग या संस्थेच्या कामात स्वतःला गाडून घेतात. मलाही त्यात ओढून घेतात. आणि नकळत त्या कार्याला बळकटी आणतात.
नुकताच ठाण्यात माझे सायबर क्राईम वरचे लेक्चर होते. त्यांना हे कळलं आणि तडक मेसेज आला “मी येतेय”
मी म्हटलं, “अहो तो कार्यक्रम त्या सोसायटीच्या लोकांसाठी आहे फक्त”
तर म्हणाल्या, मला तुला भेटायच आहे. मी येणार
आणि खरेच त्या आल्या. त्या सोसायटीत त्यांची एक मैत्रीण राहत होती. तिच्यासोबत या आल्या. ज्याचे लेक्चर आहे त्यांची ही व्यक्ती जवळची आहे असं कळल्यावर संयोजकांनी त्यांना पुढच्या पहिल्या रांगेत बसायला सांगितलं असणार मात्र त्यांनी नकार देऊन शांतपणे मागे कुठेतरी बसून पूर्ण लेक्चर ऐकलं आणि सम्पल्यावर मग येऊन भेटल्या.
त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की मलाही गहिवरून आलं. जणू आपलं लेकरू किती मोठं काम करतंय, लोकांना सायबर जागृत करतंय… हा त्यांना आनंद! मीही जवळ जाऊन घट्ट मिठी मारली. तेव्हा तिथं जमलेले बाकीचे लोक पाहायला लागले माझ्याकडे… मी त्यावेळी म्हणालो… “हि माझी आई आहे”
त्यावर सगळे कौतुकाने यांच्याकडे पाहायला लागले. त्या थोड्याश्या लाजल्या पण! कारण त्यांना कदाचित मी असं काहीतरी म्हणेल असं वाटलं नव्हतं. “काय हे” अशा अर्थने त्यांनी विचारलं पण! मी म्हंटल… “त्यात काय? एक आई वर आहे पण खाली तुम्हीच तर आहात”
यावर मात्र त्या मोकळेपणी हसल्या. आणि आजवर मला अहोजाहो म्हणणाऱ्या त्या ताई त्याक्षणापासून अरेजारे बोलून मलाही सुख देऊ लागल्या.
*
डॉ. डीडी क्लास :ज्यांना आई आहे त्यांना कदाचित कळणार नाही पण ती नसताना आपण जास्त एकाकी होतो. आहे तोवर तिची तितकी किंमत ठेवत नाही. गेल्यावर पोकळी निर्माण होते ती मात्र भरून निघत नाही. मात्र तुम्ही “बालक” म्हणून कार्यरत राहिलात तर नक्की तुम्हालाही जशी मला हि अनुआई मिळाली तशी तुम्हालाही मिळू शकते आणि पोरकेपण कमी होते. पहा जरा अवतीभोवती… नक्की अशी कुणीतरी दिसेल तुम्हाला! त्यासाठी शुभेच्छा!
☆ Retired from work, not from fun… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
आज अनिताकडे पार्टी आहे. तिच्या आणि अजयच्या ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत. त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे. ••••
पहिल्यांदाच सर्वांना घरी बोलविण्याचा बेत तिने ठरविला. नाहीतर महिन्यातून एकदा सर्व मित्र बाहेर हॉटेलमध्ये भेटतात, गप्पा टप्पा मारतात, आणि रिचार्ज होऊन घरी येतात. हॉटेल असेच शोधतात जेथे मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल. ••••
या सर्व कार्यक्रमात आजी आजोबा घरीच राहतात, त्यांना रात्रीचे बाहेर जाणे, उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही.. यावेळेस अनिता अजयने घरीच बोलविण्याचा प्लान ठरविला ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले. ••••
सर्वांच्या सोयीनुसार दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी, असं तिच्या मनात होतं. •••••
घरचे जेष्ठ, ••••••
*Retired from work जरी असले तरी They are not retired from Fun. *••
असं तिचं मत आहे. नेहमी आपण बाहेर जातो, ते काहीही तक्रार न करता घरी राहतात. येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात.
त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे. बदल change प्रत्येकाला आवडतोच. ••••
आपण आपल्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल. हा विचार अनिताच्या मनात होताच. •••
खरंतर दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं हा बदल करण्याचा विचार अजून दृढ झाला. •••
परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. हे असे वागणे योग्य नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे एवढ तरी नक्कीच अपेक्षित होतं. ••••
बरं!! आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही. ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही. ••••
मुलांना आपल्या पेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित वागता आलं पाहिजे. थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ••••
तेंव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले. ••••
जेंव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला, तेंव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. •••••
*अग! ते खूप बोलतात. * आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही. * त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते. * आपला अर्धा वेळ त्यातच जाईल. *मग रोजच्या सारखच होणार ना, * बदल कुठे झाला?? * त्यांना लवकर जेवायचे असते. * रात्री चे झेपत नाही वगैरे वगैरे.
अनिता म्हणाली, ••••
अग!! आपण थोडा बदल करून तर बघू. माझ्या घरी सुरुवात करू. अग!! जमेल सर्व. मी करते तयारी. त्यांना ही बरं वाटेल. मुलांनाही मदतीला घेऊ. ••••
*रश्मी*. कशी बशी या प्लान साठी तयार झाली. ••••
आज देशपांडे आजी आजोबा, कुलकर्णी आजी आजोबा, जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते. आणि थोडे आश्चर्य चकितचही होते. ••••
मुलांबरोबर लग्नाला जाणे, एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते. उत्साह तर होता बरोबर थोडं टेंशन ही होत. ••••
पार्टी छान झाली. सर्वांनी enjoy केलं. लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली. आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले.
सिनीयर्स ची आपापसात छान ओळख झाली. गप्पा झाल्या. यंग जनरेशन च्या मनसोक्त गप्पा रंगल्या. हॉटेल पेक्षा हे option छान आहे. छान हातपाय पसरून गप्पा मारता येतात. हे सर्वांना पटलं.
फॅमिली गेटटूगेदर छान रंगल. ••••
दुपारच्या चहा नंतर अंताक्षरी चा कार्यक्रम झाला. तरूण वर्ग, बच्चा पार्टी, आणि आजीआजोबा गृप असे तीन गट होते. सर्वांनी धमाल केली. आजी आजोबांनी जूनी गाणी छान म्हंटली. •••
अगदी अंगाई गीत, मंगलाष्टक तर
*जा मूली जा दिल्या घरी तू सुखी रहा.
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
*घट डोईवर, घट कमरेवर •••
शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले. गाण होत ••••
**घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे. •••**
शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले, ••••
**धन्यवाद मुलांनो, आज तुमच्यात सामिल केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली. आम्ही दहा वर्षांनी लहान झालो. ••••
Hope, We hv not troubled you. •••
बाकी प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याच तर खूपच कौतुक झालं. •••
अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले, त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे हे तिच्या लक्षात आले. ••••
म्हणतात ना •••
समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात. •••
माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. ••••
श्री सिद्धरामेश्वर ग्रामदैवत असलेल्या या गावावर त्यांच्या कृपेमुळे सुख शांती आणि त्याबरोबर समाधान नांदते आहे. ज्यांना सुख शांती आणि समाधान हवे होते ते सोलापुरात राहिले. ज्यांना सुख हवे होते ते बिचारे सोलापूर सोडून गेले. सोलापूरकर बे वापरत असला तरी बेरकी नाही तो खूप मायाळू कनवाळू माणुसकी असलेला आहे.
इथल्या खाद्य संस्कृतीत अग्रक्रमाने येणारा पदार्थ म्हणजे शेंगादाण्याची चटणी स्वयंपाक घरातील हे दैवत! जेवताना बाकी काही नसलं तरी चालेल पण शेंगादाण्याची चटणी पानात असलीच पाहिजे! हा इथला नियम. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी ही जातीपाती धर्मात भेद करत नाही. तुम्ही सोलापुरी म्हणल्यावर तुम्ही कोणत्याही जातीचे धर्माचे असा तुमच्या घरात आणि पानात शेंगाची चटणी हवीच हवी. या शेंगाचा चटणीने सोलापूरला जगात मार्केट मिळून दिले आहे.
पानांमध्ये मीठानंतर डाव्या बाजूला विराजमान होण्याचा मान या चटणीला तसेच उजव्या बाजूची भाजीची जागा भरून काढण्याचा सन्मान सुद्धा तिचाच… भाजीची जागा भरून काढणे हे तिचेच काम. सोलापुरी माणसाला न्याहरीला शिळी
भाकरी दही किंवा तेल शेंगाची चटणी कांदा एवढे पदार्थ झाले की तो कुठे हॉटेल हुडकणार नाही. दोन पोळ्या दुधात कुस्करून त्याबरोबर शेंगाची चटणी तोंडी लावणारे अनेक जण तुम्हाला सोलापुरात मिळतील. शाळेतल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या डब्यात तेल चटणी पोळी हा पदार्थ कॉमन आहे. 70% पोरांच्या डब्यात तेल चटणी पोळी मिळणारच!
खूप वर्षापूर्वी माझी आत्ये बहीण पुण्यावरून आली प्रवासात म्हणून तिने दोन पोळ्या आणि चटणी आणली होती त्या चटणीत अर्धवट कुटलेले शेंगदाणे तिखट आणि मीठ एवढे पदार्थ होते त्यातल्या कुठल्याही पदार्थाची एकमेकांशी गट्टी नव्हती ती मला म्हणाली, ” शेंगाची चटणी खा खूप छान झाली” मी म्हणलं, ” याला तुम्ही शेंगाची चटणी म्हणता? ” मग आमच्या घरातली उखळी चटणी तिला खाऊ घातली त्यानंतर मात्र असंख्य वेळा सोलापूर जाताना ती आपल्या मामीकडे हट्ट करून उखळी चटणी घेऊन जात असे उखळी चटणी म्हणजे उखळात कांडून कांडून त्याला तेल सुटल्यावर.. त्याचा एक वेगळा सुगंध येतो… खमंगपणा वाढतो. शेंगादाणे खूप बारीक होत नाहीत पण एकमेकात मिसळून जातात आणि त्याला उखळाचा आकार प्राप्त होतो त्याला आम्ही मुद्दा चटणीही म्हणतो आता मुद्दा असा आहे ही चटणी तेल सुटल्यामुळे मुद्दा झालेले असते. एका घरात तर मी तिचे लाडू बनवलेले पाहिले शेंगाच्या चटणीचे लाडू…? काय कल्पना आहे ना त्यांच्याकडून हे लाडू पुण्याला असलेल्या त्यांच्या माहेरी पाठवले जात. माझ्या गावाकडून माझ्या काकूचा फोन येई” काय पाठवू तुला खायला “तेव्हा मी सरळ सांगायची सहा भाकरीचे एक गाठोडे पाठवा तेही अगदी पांढऱ्या स्वच्छ फडक्यात बांधून, डबा नको पहिल्या दोन भाकरी शेंगाची चटणी म्हणजे एका भाकरीवर शेंगाची चटणी आणि त्याच्यावर झाकल्यासारखी दुसरी भाकरी दोन भाकरी मध्ये तुरीच्या डाळीचा पेंडपाला आणि वरच्या दोन भाकरी मध्ये हळद मोहरी घातलेले बाट्याचे कैरीचे लोणचे… अहाहा या वर्णनाने सुद्धा तोंडाला पाणी सुटत. त्या शेंगाच्या चटणीच्या सहवासाने स्नेहमय झालेली ती भाकरी अप्रतिम चवीची असायची. मुळात शेंगाची चटणी करताना शेंगा मध्यम आचेवर खरपूस भाजल्या पाहिजेत त्यातच खमंगपणा उतरला पाहिजे मग याची टरफले काढून योग्य प्रमाणात तिखट मीठ थोडेसे जिरे हा ऑप्शन आहे भरपूर लसूण इथे मात्र काटकसर नाही असे टाकून हे मिश्रण उखळातच कांडावे लागते तेव्हा त्याला सोलापुरी चटणी म्हणतात. या चटणीला मिक्सरचा आधुनिकपणा मानवत नाही आणि ती चवही त्याला येत नाही आणि मग कुटून कुटून तेल सुटल्यावर काढलेली चटणी म्हणजे सोलापुरी शेंगा चटणी!
शेंगाची चटणी हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे…
वाटलं ना थोड अवघड वाक्य! पण मी असं ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे की पानात शेंगाची चटणी नाही म्हणून ताट भिरकावून देणारे पुरुष होते. त्यामुळे बायका आवर्जून डबाभर शेंगाची चटणी करून ठेवीतच कारण ती जर संसारातला सलोखा सांभाळत असेल तर कशाला भानगडीत पडा…? हा सुज्ञपणा सोलापुरी बायकांमध्ये होता. मी एका लग्नाला गेले होते खेडेगावात त्या ठिकाणी एका मोठ्या टोपल्यात शेंगाची चटणी करून ठेवलेली होती कोपऱ्यात टोपलवर कांदे होते आणि एका चटईवर पातळ कडक भाकरी होत्या… हा लग्नातला कुणीही आल्यानंतर केला जाणारा पहिला पाहुणचार! खेडेगावात अख्खा गाव त्या लग्नात असतो तेव्हा गावातल्या कोणीही यावं आणि शेंगा चटणी बरोबर भाकरी खाऊन जावं अशी तेव्हाची परिस्थिती होती
शेंगाच्या चटणीला पहिलं मार्केट मिळून दिलं ते नसले यांच्या चटणीने नसले यांची शेंगाची चटणी प्रसिद्ध पावली. सोलापुरात आलेला माणूस चादरीबरोबर शेंगाच्या चटणीची पाकीट घेऊन जात असे आता नसल्यांच्या चटणी बरोबर “सुंदर चटणी” जी लकी चौकात मिळते त्यांचं पॅकिंग खूप छान असतं तेच छान पिशवी देतात बरोबर त्यामुळे तिचा पुडा कॅरी करायला सोपा पडतो. शिवाय सोलापुरी तिखटपणा न खपणार्या माणसासाठी कमी तिखटाच्या, सपक… असे अनेक प्रकारे त्यांच्याकडे मिळतात. त्याचप्रमाणे लक्ष्मी मार्केटच्या जवळ पूर्वी जिथे चुरमुऱ्याची दुकान होती तिथेही वेगवेगळे मसाले आणि त्याबरोबर प्रामुख्याने मिळणारी चटणी खूप चविष्ट असते. पेठे यांची चटणी प्रसिद्ध होती परंतु नसले पासून मात्र शेंगाच्या चटणी चे बाजारी मार्केट वाढले आता अनेक धाब्यावर सुद्धा तुम्हाला शेंगाची चटणी मिळते. शेंगाची चटणी पार अमेरिकेपर्यंत पोहोचली आणि आता ते काय फार अवघड नाही सोलापूरचे अनेक लोक आता अमेरिकेत सुद्धा स्थायिक झालेले आहेत तरीही सोलापूरी माणसाला अजूनही त्याचा म्हणावा तसा ब्रँड जमलेला नाही. सोलापुरात येणारा प्रत्येक माणूस चादरी घेऊन जातो तसाच सोलापुरी शेंगादाणा चटणी घेऊन जातोच जातो. सोलापूरहून जाणारा माणूस आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून शेंगदाणे चटणी घेऊन चालला आहे.
माझ्याकडे एक मुंबईच्या गायनॅकॉलॉजिस्ट आल्या होते त्यांना मी कडक भाकरी शेंगाची चटणी आणि मेथी ची तोडलेली भाजी दिली त्यांचा मुंबईवरून दुसरे दिवशी फोन आला की कसं खायचं? मी म्हणाले, “भाकरीच्या मध्ये शेंगाची चटणी घ्या त्याच्यावर दही घाला कडेकडेने भाकरी शेंगाच्या चटणी लावून खा मध्यावर याल तेव्हा तो भिजलेला तुकडा इतका अप्रतिम लागतो त्याची चव जेवणानंतर तासभर तरी रेंगाळत राहते आणि मध्ये मध्ये तुम्हाला तोडून निवडून दिलेली कच्ची मेथी तोंडी लावा”. तासाभराने त्यांच्या मिस्टरांचा फोन आला ते डॉक्टर आहेत “शीलाताई एका अप्रतिम पदार्थाचे मी आज सेवन केले आणि तृप्त झालो ही किमया शेंगाच्या चटणीत आणि कडक भाकरीत आहे पण भाकरीतला कडकपणा सोलापुरी माणसात मात्र अजिबात नाही तो खूप प्रेमळ आहे तो कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवून त्याला घरात घेतो चहा पाजतो आणि त्याच्या पाहुण्याच्या घरापर्यंत नेऊन सोडतो.
कर्नाटक जवळ असल्यामुळे शेंगाच्या चटणीची बॅडगी मिरचीशी जवळीक वाढली आहे त्यामुळे त्याला एक वेगळा लालपणा पण येतो त्यामुळे तिचे सौंदर्य वाढले आहे. पण कोल्हापुरी लवंगी मिरचीचा ठसका लागलेला शेंगादाणा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय सोडत नाही अशा सर्व तिखट प्रकारच्या चटण्या सुद्धा यात उपलब्ध असतात तर अशी ही सोलापुरी शेंगा चटणी हिला कोणत्याही प्रकारची भेसळ मान्य नाही उगीच तीळ शेंगादाणा चटणी खोबरे शेंगादाणा चटणी असे कोणतेही प्रकार प्रयोग म्हणून सुद्धा करू नयेत ती शुद्ध आणि सात्विक आहे बरं…!
डिसेंबर महिन्यापासून सोलापुरात सुरू होणाऱ्या हुरडा महोत्सवात याचे स्थान अनन्यसाधारण आहे शेंगाच्या चटणी शिवाय चव नाही हिरव्यागार लुसलुशीत हुरड्या शेजारी तांबडीलाल सोलापुरी शेंगा चटणी मांडली की हुरड्याची चव आणि त्याचे सौंदर्य दोन्ही वाढते. हुरड्याचे मार्केटिंग करताना हुरड्याच्या थाळीचे जे चित्र टाकतात त्यात हुरड्या बरोबर असलेल्या शेंगा चटणीचे फोटो अत्यंत भुरळ पाडणारे आकर्षक असतात. अर्थात कुणाच्याही शेतात जाऊन हुरडा खाऊन येणार्या आमच्या पिढीला हे मार्केटिंग तितकेसे बरे वाटत नाही. पण काळ
बदललाय. चलता है…!
एका माझ्या वाचकाने सुचवलं याच्यावर लिहा हो… म्हणून हा लेखन प्रपंच खर तर प्रत्येक वाचकाला एक शेंगाचटणीचा पुडा द्यावा असं मला खूप वाटतं पण इथून ते शक्य नाही ना मंडळी… हा लेख वाचल्यानंतर बाजारात जा शेंगा चटणी घेऊन या तेल चटणी पोळी खा आणि तृप्त व्हा.
चटणी आवडली तर पुढे पाठवा ते ते सुद्धा थोडी चव चाखतील ना माझी काहीच हरकत नाही…!