मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ६ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ६ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘Thousand Nights’ कँम्पच्या समोर आमची गाडी थांबली आणि वाळवंटात अचानक समोर दिसलेले ते ‘रिसेप्शन लाउंज’ पाहून गंमतच वाटली. आजच्या जमान्यात प्राणवायूइतकेच अत्यावश्यक झालेले ‘वाय-फाय’ कनेक्शन इथे उपलब्ध आहे म्हटल्यावर ‘हुश्श’ झाले. काउंटरवरची मुलगी ‘वाय-फाय’चा पासवर्ड सांगू लागताच, तिच्या उच्चारांची ढब मला ओळखीची वाटली. सहजच मी तिच्याकडे पाहून म्हटले, “अरे वा! सोप्पा पासवर्ड आहे” त्यावर डोळे विस्फारत ती शुद्ध मराठीत म्हणाली, “हो SSS ! अगदीच सोपा आहे!” ती नाशिकची ईशा नावाची मुलगी होती. तिच्याच शेजारी असलेला, नाशिकचाच हर्षवर्धनही लगबगीने पुढे आला. ओमानच्या वाळवंटी रिसॉर्टमध्ये आमच्या चक्क मराठीत सुरू झालेल्या गप्पा आवरत्या घेणे भाग होते, कारण सूर्यास्ताच्या आत आम्हाला वाळवंटातले काही विशेष अनुभव घ्यायला जायचे होते.

खास वाळवंटात चालणाऱ्या स्कूटरवरून किंवा उंटांवरून फेरफटका मारता येणार होता, ‘Dune Bashing Ride’ घेता येणार होती. अर्थात, यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते. Dune Bashing म्हणजे काय, तर एका ४ X ४ गाडीत बसवून वाळूच्या टेकड्यांवर रफ राईड! आर्मीच्या नोकरीत असताना, ईशान्य भारतात आणि राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या ‘रफ राइड्स’ मी केलेल्या असल्याने, पैसे भरून हाडे खिळखिळी करून घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती.

सर्वप्रथम ताजे-तवाने होण्यासाठी आम्ही तंबूत गेलो. त्या वातानुकूलित तंबूमध्ये सर्व पंचतारांकित सोयी होत्या. खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. मी आणि गिरीश पाय मोकळे करायला अल नासरसोबत बाहेर पडलो. स्वाती दादांजवळ थांबली. अल नासर सहजच म्हणाला, “चला, आपल्याच गाडीतून तुम्हाला सूर्यास्त पाहायला नेतो. कोणत्या पॉईंटवरून बेस्ट दिसेल ते मला माहिती आहे !”

जो अनुभव पैसे भरून मी घेणार नव्हतो, तो फुकटात (आणि मुख्य म्हणजे आम्हाला हव्या त्या वेगाने) घ्यायला मिळतोय म्हटल्यावर आम्ही आनंदाने निघालो. वाळूच्या टेकडीवर चढायला रस्ता असा नव्हताच, पण घाटामध्ये घेतात तशी वळणे घेत-घेत गाडी सफाईदारपणे चढत निघाली. पण टेकडीवर गेल्यावर मात्र ‘योग्य जागे’च्या शोधात अनेक खड्ड्यांमधून आणि उंचवट्यांवरच्या अरुंद मार्गावरून आमचा बैदू चालक हिंडत निघाल्यामुळे आम्हालाही थोडेफार Dune Bashing करता आले. अर्थात, वेग जास्त नसल्यामुळे हाडे मात्र शाबूत राहिली! गाडीतून अनवाणी पायांनी उतरल्यावर मऊसूत वाळूत पावले लोळवत फिरायलाही मजा आली. अल नसरला अचानक मला ‘शेख’ बनवण्याची हुक्की आल्याने त्याने माझ्या डोक्यावर खास ओमानी पद्धतीचा फेटा बांधून माझा फोटोही काढला!

आसपास चिटपाखरूही नव्हते. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकडीच्या कपाळावर पडलेल्या सुबक आठ्या मोजण्यात, आणि त्यावरून चालत गेलेल्या किड्यांच्या पायांच्या ठशांचा माग काढता-काढता, माझ्या आयुष्याची अनेक वर्षे नकळतच गळून पडली आणि मी पुन्हा शाळकरी मुलगा झालो! हळूहळू खाली जात चाललेल्या सूर्याकडे पाहत, ‘कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा’ असे म्हणेपर्यंत निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसल्यानंतर अल नसरने घोषणा केली की आता आपण वळणे-वळणे घेत नव्हे तर वाळूच्या उभ्या कड्यावरून सरळ खाली उतरणार आहोत! कड्यांवरून गाड्या चढवण्या-उतरवण्याच्या अशा ‘साहसी खेळां’चे व्हिडिओ मी पूर्वी पाहिले होते, पण अनुभव कधीच घेतलेला नव्हता. जी टेकडी चढायला आम्ही १५ मिनिटे घेतली होती, ती अक्षरशः तीस सेकंदात उतरून आम्ही खाली आलो आणि पुढच्या दोन मिनिटात कँम्पमध्ये परत पोचलोदेखील! तो अनुभव थरारक खरा, पण पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटण्यासारखा होता.

वाळवंटातली संध्याकाळ तिथल्या दिवसाच्या तुलनेमध्ये खूपच आल्हाददायक असते, कारण तापमान बरेच खाली येते. रिसेप्शनला लागूनच एक ‘कँम्प फायर’ची जागा होती. तिथे सात वाजल्यापासून शेकोटी पेटवलेली होती. त्या भोवती गोल रिंगण करून गाद्या घातलेल्या होत्या. लोक शांत बसून ‘माहौल’ चा आनंद घेत होते. शेजारी काही बैदू लोक आगीवर भाजलेल्या छोट्या-छोट्या गरम रोट्या खायला देत होते. तिथेच भेटलेल्या मुंबईच्या एका तरुण जोडप्याबरोबर माझ्या छान गप्पा झाल्या. ते नवरा-बायको उत्साही पर्यटक होते आणि आजवर दोघे-दोघेच अनेक देश हिंडलेले होते. आता तर त्यांच्या वर्षभराच्या तान्ह्या मुलाला सोबत घेऊन, स्वतःच भाड्याची गाडी चालवत ओमानमधे सगळीकडे हिंडत होते! 

जवळच जेवणाच्या हॉलमध्ये बुफे लावलेला होता. पंचतारांकित हॉटेलात असतात तशा प्लेट्स, काटे-चमचे आणि सजावट होती. जेवणाचा मेनूदेखील पंचतारांकित आणि भरगच्च होता. तिथे जेवण बनवणारे, बुफे लावणारी मुले आणि तिथला केटरिंग व्यवस्थापक हे सगळे भारतीय व बांगलादेशी होते. त्यामुळे आमची विचारपूस ते अधिक आपुलकीने करीत होते. व्यवस्थापकानेही आवर्जून येऊन आम्हाला काय हवे-नको ते विचारून तशी सोय केली.

जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका हेलिपॅडवर गेलो. अहमद नावाचा एक खगोलशास्त्राचा अभ्यासक आमच्यासोबत होता. आसपास मनुष्यवस्ती अजिबात नसल्याने गडद अंधार होता. आकाशदर्शनाची मला तशी फारशी कधी गोडी लागलेली नाही. पण अहमद इतक्या उत्साहाने सगळी माहिती सांगत होता की मलाही त्यात रस वाटला.

अल नासरने रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला बजावून सांगितले की, “उद्या मस्कतच्या वाटेवर, ‘वादी बिन खालिद’ या जागी आपण थांबायचे आहे. तिथल्या स्वर्गीय अनुभवासाठी तुम्हाला तीन तास देखील कमीच पडतील. त्यामुळे इथून सकाळी लवकर निघू या. ” 

‘वाहिबा सँड्स’ मधल्या ‘Thousand Nights’ कँम्पची सकाळ जराशी थंड होती आणि आसपासचे वाळवंट धुक्याची चादर लपेटून शांत बसलेले होते. स्वाती नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर फिरायला गेलेली होती. पण बराच वेळ ती न आल्याने मला जरा काळजीच वाटू लागली. तिचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर ती परत येताना मला दिसली. चालता-चालता अचानक ‘धुक्यात हरवली वाट’ अशी तिची अवस्था झाली होती. मोकळ्या वाळवंटात दिशाहीन भटकण्याचा थरारही काही काळ तिने अनुभवला होता!

कँम्पमध्ये भरपेट नाश्ता करून आम्ही ‘वादी बानी खालिद’च्या वाटेला लागलो. या वादीमध्ये पाण्याचे बारमाही झरे आहेत. खडकांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची, काही खोलगट भागांमध्ये लहान-लहान तळी झालेली आहेत. ओमानवासीयांसाठी असे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे एक मोठे आकर्षणस्थळ असल्यास काय नवल?

गाडी मुख्य रस्त्यावर ठेवून, एका उंच-सखल व खडकाळ रस्त्याने, सुमारे चार-पाचशे मीटर चालत झऱ्यापर्यंत जायचे होते.

दोनेकशे मीटरवर जरासे विस्तीर्ण तळे दिसले. “स्थानिक रीती-रिवाजानुसार, संपूर्ण अंगभर कपडे घालूनच तळ्यामध्ये पोहणे अपेक्षित आहे” अशा मजकुराचे बोर्ड तळ्याजवळ लावलेले होते. अल नासरने आम्हाला आधीच सांगितले होते की ज्या स्त्री-पुरुषांना पोहण्याच्या वेषात (Swimming Costumes घालून) डुंबायचे असेल त्यांनी पुढे झऱ्याजवळच्या भागात जावे. त्यामुळे, जराश्या उंचीवर असलेल्या धबधब्याकडे आम्ही चढत गेलो. डोंगरातून पडणारा धबधबा आणि त्याचे स्वच्छ निळेशार पाणी पाहताच आमचे मन उल्हसित झाले.

पाण्याच्या एका बाजूच्या कड्यालगत, एका व्यक्तीला जेमतेम उभे राहून कपडे बदलता येतील इतपत मोठे असे दोन तंबू लावलेले होते. “तंबू वापरल्यास पेटीमध्ये स्वेच्छेने काही पैसे टाकावेत” असे लिहिलेली एक दानपेटी बाहेर ठेवलेली होती. मात्र, कोणीही मनुष्य पैसे-वसुलीसाठी तिथे नव्हता. हे पाहून मला जरा नवलच वाटले.

पाण्याची खोली कडेकडेने पायाच्या घोट्याएवढी, तर प्रवाहाच्या मध्यभागी, काही ठिकाणी ८-१० फुटांइतकी होती. ते निळे पाणी इतके स्वच्छ होते की तळातले सफेद, गुळगुळीत गोटे आणि पाण्यात पोहत असलेले लहान-लहान मासे अगदी सहज दिसू शकत होते.

क्षणार्धात मला जाणवले की अनेक लहान-लहान माश्यांनी माझ्या पावलांना बारीक-बारीक चावे घ्यायला सुरुवात केली होती. आधी जरा विचित्र वाटले खरे, पण थोड्या वेळाने सवय झाली. चावे घेऊन तळपायाची मृत कातडी ते मासे खाऊन टाकतात आणि आपले पाय स्वच्छ होतात. त्या नैसर्गिक ‘पेडिक्युअर’चा लाभ घेत मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. देशोदेशीचे लोक वादी बानी खालिदमध्ये डुंबायला आलेले होते. एक वयस्कर बाई आणि तिच्यासोबतची काही मंडळी पूर्व युरोपमधल्या लिथुआनिया देशातले होते. एक मध्यमवयीन पुरुष, त्याची पत्नी आणि तरुण मुलगी केरळी हिंदू परिवारातले असावेत असा माझा कयास होता. त्यांच्यासोबत माझा काही जुजबी संवाद झाला. तो मनुष्य मूळचा केरळमधील पालघाट या गावाचा होता (आता त्या गावाला पालक्कड म्हणतात). पण गेली बरीच वर्षे तो ओमानमध्येच स्थायिक होता.

आमच्या जवळच, पंजाबी-मिश्रित हिंदी भाषेत बोलणारी काही मुले लाईफ जॅकेट्स घालून कड्यावरून पाण्यात उड्या टाकत होती. प्राची खोल पाण्यात जायला बिचकत असल्याने त्यातल्या एका तरुणाला, त्याचे जॅकेट थोडा वेळ वापरायला देण्याची विनंती केली. परंतु, “यहाँ बाहर ही किराए पर आपको मिल जायेगा” असे उत्तर मिळाले. नंतर त्याला काय वाटले कोण जाणे? त्याने वरूनच ते जॅकेट टाकले. आम्ही त्याला ‘धन्यवाद” असे म्हणताच तो तरुण प्रसन्नतेने हसला आणि म्हणाला, “हम पाकिस्तान से हैं, पर आप के दुश्मन नहीं है!” 

– क्रमशः भाग ६  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ चीन की ग्रेट वॉल- एक अद्भुत अनुभव ☆ डॉ प्रतिभा मुदलियार ☆

डॉ प्रतिभा मुदलियार

☆ संस्मरण ☆ चीन की ग्रेट वॉल- एक अद्भुत अनुभव ☆ डॉ प्रतिभा मुदलियार ☆ 

प्रिय अर्नेस्टा मोशा,

आज का इमेल मोशा के नाम है।

चीन जाने से बहुत पहले ही मेरे मन में उस देश के प्रति एक विशेष आकर्षण था। बचपन से ही इतिहास और यात्राओं से संबंधित पुस्तकें पढ़ने की आदत रही है। उन्हीं दिनों कभी रेशम मार्ग (Silk Route) की कथाएँ पढ़ीं, कभी बौद्ध भिक्षुओं फाह्यान और ह्वेनसांग के भारत-आगमन के वृत्तांत, तो कभी महान दीवार और निषिद्ध नगर (Forbidden City) के चित्र देखे। उन पन्नों में उभरता चीन मुझे हमेशा एक रहस्यमय, प्राचीन और अनुशासित सभ्यता के रूप में दिखाई देता था। लगता था कि यह ऐसा देश है जहाँ हजारों वर्षों का इतिहास और आधुनिक विकास एक साथ चलते हैं। भारत में रहते हुए चीन के बारे में हमारी जानकारी प्रायः कुछ निश्चित बातों तक सीमित रहती है। उसकी विशाल जनसंख्या, प्राचीन संस्कृति, चीनी मिट्टी के बर्तन, रेशम, चाय और महान दीवार। मुझे ज्ञात था कि वह संसार के सबसे अधिक जनसंख्या वाले देशों में से एक है, जहाँ करोड़ों लोग मुख्यतः मंदारिन (Mandarin) भाषा बोलते हैं। यह भी सुन रखा था कि चीनी भाषा की लिपि वर्णमाला पर आधारित न होकर चित्रात्मक चिन्हों पर आधारित है, जिसके हजारों अक्षर होते हैं। मुझे हमेशा आश्चर्य होता था कि इतनी जटिल प्रतीत होने वाली भाषा में लोग कितनी सहजता से संवाद करते होंगे। चीन के खान-पान के बारे में भी अनेक धारणाएँ थीं। नूडल्स, डम्पलिंग्स, ग्रीन टी और विविध प्रकार के व्यंजन इन सबकी चर्चा सुन रखी थी, परंतु वास्तविक चीन कैसा होगा, यह जानने की उत्सुकता बनी रहती थी। वहाँ के लोग कैसे होंगे? क्या वे उतने ही औपचारिक होंगे, जितना उनके बारे में कहा जाता है? उनकी दिनचर्या, पारिवारिक जीवन और सांस्कृतिक परंपराएँ कैसी होंगी? ऐसे अनेक प्रश्न मन में उठते रहते थे।

विश्व के प्राचीनतम सभ्यता-केन्द्रों में भारत और चीन दोनों की गणना होती है। शायद इसी कारण चीन को देखने की इच्छा केवल एक पर्यटक की जिज्ञासा नहीं थी, बल्कि एक पड़ोसी और सांस्कृतिक रूप से समृद्ध राष्ट्र को निकट से समझने की आकांक्षा भी थी। जब तुमने बीजिंग में आयोजित संगोष्ठी में भाग लेने का प्रस्ताव रखा, तब मुझे लगा कि वर्षों से मन में संजोई हुई वह जिज्ञासा अब वास्तविक अनुभव में बदलने वाली है। और फिर वह दिन आया, जब विमान की खिड़की से नीचे फैली चीन की धरती पहली बार दिखाई दी। मुझे लगा जैसे इतिहास की किसी पुस्तक का एक पृष्ठ अचानक जीवंत होकर मेरे सामने खुल गया हो।

कभी-कभी कोई यात्रा हमारी स्मृतियों में केवल दृश्यों के कारण नहीं, बल्कि उनके पीछे की भावनाओं के कारण बस जाती है। बीजिंग की वह यात्रा मई की वह उजली सुबह, हवा में फूलों की महक, और मेरा उत्साह से दमकता चेहरा! आज इतने सालों बाद जब मैं याद करती हूँ, तो लगता है जैसे हम अभी-अभी उस पुराने स्टेशन से निकले हैं और सामने ग्रेट वॉल की ओर जाती बस हमारी प्रतीक्षा कर रही है।

2007 का वह समय मेरे जीवन का एक सुंदर अध्याय था। हांकुक युनिवर्सिटी ऑफ फ़ोरन स्टडीज, सियोल, वहाँ का वातावरण, विद्यार्थियों की जिज्ञासा, और मोशा तुम्हारे साथ बिताए हुए वे अनगिनत पल…आज भी मन में एक मधुर झंकार छोड़ जाते हैं। मोशा, तुम्हारे साथ घूमना, कोरिया के रीतिरिवाज़, खान-पान, उनकी विनम्र संस्कृति..सब कुछ सीखने जैसा था। और फिर, तुम्हारे कारण ही तो मुझे बीजिंग की उस संगोष्ठी में जाने का अवसर मिला था। जब हमने जाने की योजना बनाई थी, तुमने कहा था…“मई में बीजिंग बेहद सुंदर होता है, हवा में ठंडक और धूप में कोमल चमक।” वह तुम्हारी बात सच निकली। बीजिंग पहुँचते ही वह ताज़गी भरी हवा जैसे शरीर को नहीं, आत्मा को भी छू गई थी। तापमान सुखद था, पेड़ों पर नए पत्तों की हरियाली, और हर गली में खिले गुलाबी-पीले फूलों की सुगंध यह सब मिलकर बीजिंग को किसी प्राचीन कविता-सा बना रहे थे।

हमारे गेस्ट हाऊस की खिड़की से दूर-दूर तक फैली इमारतें दिखाई देती थीं। पुराने बीजिंग का सौंदर्य और आधुनिक चीन की तेज़ रफ़्तार, दोनों का अद्भुत संगम। सड़कों पर साइकिल चलाते लोग, हवा में उड़ते पतंगें, और हर मोड़ पर ताज़े सूप की खुशबू… यह सब कुछ नया और सजीव लग रहा था।

संगोष्ठी का पहला दिन समाप्त हुआ तो हमारे भीतर उत्साह दुगुना हो गया। हम बस तीन दिन के लिए आए थे.. इसलिए ग्रेट वॉल देखना हमारी चेक लिस्ट सबसे ऊपर था। अगले दिन ग्रेट वॉल देखने जाना था। सुबह-सुबह उठे… बाहर हल्की धूप और मंद हवा थी। तुम हमेशा की तरह जल्दी तैयार थीं, मुस्कुराते हुए बोलीं..“Let’s go! The Wall is waiting for us!” मैं हँस पड़ी। उस दिन हम कुल पाँच लोग थे..तुम, मैं, एक कोरियाई स्वहेली प्रोफेसर किम, और चीन के दो स्वहेली विद्यार्थी। वे दोनों उत्साहित थे कि अपने देश का यह चमत्कार हमें दिखाने का अवसर उन्हें मिला है। हमने हल्की जैकेटें, टोपी और सनग्लास पहने और बस में सवार हुए। बीजिंग से बाहर निकलते ही जैसे एक अलग संसार खुल गया.. शहर की भीड़ पीछे छूट गई और सामने फैले हरे-भरे पहाड़, जिनकी गोद में कहीं वह दीवार हमारा इंतज़ार कर रही थी।

रास्ते में तुमने बताया कि अफ्रीका में भी एक ‘ग्रेट वॉल’ की कथा प्रचलित है, पर वह दीवार नहीं, एक प्रतीक है.. लोगों के साहस और एकता का। मैंने मुस्कुराकर कहा, “और आज हम वास्तविक दीवार देखने जा रहे हैं…जो हज़ारों सालों से इतिहास की गवाही दे रही है।” जब हमारी गाडी मुड़ी और हमने पहली बार दूर से दीवार की झलक देखी, तो हम सब कुछ देर के लिए मौन हो गए। वह ग्रेट वॉल सामने थी … पहाड़ों की शृंखलाओं पर सर्प सी लिपटी हुई, हरी धूप में चमकती, समय की तरह फैली हुई।

जिस भाग की ओर हम जा रहे थे, वह ग्रेट वॉल का बादालिंग (Badaling) खंड था, जो बीजिंग से लगभग 70–80 किलोमीटर उत्तर-पश्चिम में स्थित है और राजधानी के सबसे निकट तथा सर्वाधिक लोकप्रिय भागों में गिना जाता है। चीन की महान दीवार वास्तव में एक अकेली दीवार नहीं, बल्कि विभिन्न राजवंशों द्वारा अलग-अलग कालखंडों में निर्मित दीवारों, किलों और सुरक्षा-रेखाओं का विशाल तंत्र है। इसके प्रमुख खंडों में बादालिंग, मुतियान्यू (Mutianyu), जिनशानलिंग (Jinshanling), सिमाताई (Simatai) और जियायुगुआन (Jiayuguan) विशेष रूप से प्रसिद्ध हैं। आधुनिक सर्वेक्षणों के अनुसार इसकी कुल लंबाई लगभग 21,000 किलोमीटर से अधिक मानी जाती है। पहाड़ों, रेगिस्तानों, घास के मैदानों और घाटियों से होकर गुजरती यह संरचना मानो पूरे उत्तरी चीन के भूगोल को अपने भीतर समेटे हुए है। दूर से देखने पर इसकी घुमावदार रेखा सचमुच किसी विशाल अजगर की भाँति पर्वत-शृंखलाओं पर लहराती प्रतीत होती है।

इसका इतिहास भी बड़ा रोचक हैं। ग्रेट वॉल का निर्माण तीसरी शताब्दी ईसा पूर्व में शुरू हुआ था, जब चिन शी हुआंग ने अपने साम्राज्य को उत्तर से आनेवाले मंगोल आक्रमणों से बचाने के लिए यह दीवार बनवाई थी। उस समय इसकी लंबाई लगभग पाँच हजार किलोमीटर थी, बाद में परवर्ती राजवंशों ने इसे बढ़ाते-बढ़ाते तेरह हजार किलोमीटर से अधिक विस्तृत कर दिया। मिट्टी, ईंट और पत्थरों से बनी यह दीवार केवल सुरक्षा का प्रतीक नहीं, बल्कि मानव धैर्य और परिश्रम की अद्भुत मिसाल है। कहा जाता है कि इसके निर्माण में लाखों मजदूरों ने अपने प्राण गंवाए। उनकी स्मृति जैसे आज भी उस दीवार के पत्थरों में साँस लेती है।

यद्यपि महान दीवार के आरंभिक भाग तीसरी शताब्दी ईसा पूर्व में चिन सम्राट चिन शी हुआंग के शासनकाल में बनाए गए थे, परन्तु आज जो मजबूत ईंट-पत्थरों वाली दीवार दिखाई देती है, उसका अधिकांश भाग मिंग राजवंश (1368–1644) के समय निर्मित हुआ। दीवार केवल सैनिक सुरक्षा का साधन नहीं थी, यह संदेश-प्रेषण, व्यापारिक मार्गों की निगरानी और साम्राज्य की सीमाओं के नियंत्रण का भी महत्वपूर्ण माध्यम थी। प्रहरी-दुर्गों पर आग और धुएँ के संकेतों द्वारा दूर-दूर तक सूचनाएँ भेजी जाती थीं। इस दृष्टि से यह अपने समय की एक अत्यंत विकसित संचार-व्यवस्था भी थी।

दीवार की ओर बढ़ते हुए हवा में पत्तों की सरसराहट थी, ऊपर नीला आसमान, और नीचे लहराती घाटियाँ। हर मोड़ पर एक नया दृश्य… कहीं जंगली फूलों की महक, कहीं दूर से आती चिड़ियों की आवाज़। कुछ सीढ़ियाँ इतनी ऊँची थीं कि एक कदम चढ़ने में साँस फूल जाती, फिर भी हम हँसते हुए आगे बढ़ते रहे। तुम कभी आगे निकल जातीं, कभी मुड़कर कहतीं, “Come on, don’t stop! You’ll regret if you don’t reach the top!” मैं हँसते हुए जवाब देती – “I’m coming, Professor of Energy!” हमारे साथ के विद्यार्थी हँसते, फ़ोटो खींचते, कभी फूलों की पंखुड़ियाँ हवा में उड़ाते। किसी मोड़ पर जब हमने पीछे मुड़कर देखा.. दीवार पहाड़ों के बीच लहराती चली जा रही थी। वह दृश्य अविश्वसनीय था। प्रकृति और मानव निर्माण के बीच इतनी सुंदर संगति शायद ही कहीं देखी हो।

ऊँचाई पर पहुँचते ही हवा और तीखी हो गई। हम सब एक पत्थर की मेहराब के पास बैठ गए। कैमरा, मोबाइल, और मुस्कानें..सब एक साथ सक्रिय हो गए। तुम्हारे कैमरे से निकली हर क्लिक में एक कहानी थी.. कभी मैं दीवार पर खड़ी हँस रही थी, कभी तुम आसमान की ओर देखतीं मानो बादलों से बात कर रही हो। 

वहीं पास में एक छोटा-सा चायघर दिखाई दिया। लकड़ी का बना हुआ, उसकी खिड़कियों से ताज़े चाय की भाप उठती दिख रही थी। हम अंदर गए.. गर्म ग्रीन टी का पहला घूँट जैसे सारी थकान को पिघला गया।

मैंने कहा, “इस स्वाद में जैसे इतिहास घुला है।” औऱ तुमने कहा, “और यादें भी।”

दीवार के ईंट-पत्थर, उनकी जोड़ाई, चौकियाँ, प्रहरी दुर्ग.. सबकुछ अत्यंत सटीक था। जहाँ-जहाँ निगरानी के लिए टॉवर बने थे, वहाँ से दूर-दूर तक फैली घाटियाँ दिखाई देती थीं। दीवार पर खड़े होकर चारों ओर दृष्टि दौड़ाने पर समझ में आता है कि इसे केवल शत्रुओं को रोकने के लिए नहीं, बल्कि साम्राज्य की सामूहिक शक्ति और संगठन का प्रतीक बनाने के लिए भी निर्मित किया गया था। शायद इसी कारण 1987 में यूनेस्को ने इसे विश्व धरोहर सूची में शामिल किया। दुनिया के लगभग हर देश से आने वाले पर्यटक यहाँ पहुँचते हैं और उन पत्थरों को स्पर्श कर उस इतिहास से जुड़ने का प्रयास करते हैं जिसने सदियों से मानव कल्पना को आकर्षित किया है।

वास्तव में यह केवल एक दीवार नहीं, बल्कि एक जीवित स्थापत्य था.. जिसमें हर युग ने अपनी छाप छोड़ी थी। कुछ स्थानों पर पत्थर पुराने और क्षीण थे, कुछ पर नए मरम्मत के निशान। धूप उन सब पर समान रूप से पड़ी थी.. मानो समय ने सबको एक-सा बना दिया हो।

तुम्हें याद है, वहाँ लगे एक शिलालेख पर लिखा था कि “जो व्यक्ति ग्रेट वॉल पर नहीं चढ़ा, वह सच्चा वीर नहीं।” यह कथन चीन में अत्यंत प्रसिद्ध है। उस समय हम मुस्कुराए थे, किंतु दीवार की ऊँची-नीची सीढ़ियाँ पार करने के बाद उसके अर्थ का अनुभव भी हुआ। वास्तव में यह केवल एक ऐतिहासिक स्मारक नहीं, बल्कि धैर्य, साहस और मानवीय संकल्प का जीवंत प्रतीक है। जब हम नीचे लौटे, शाम होने लगी थी। सूरज ढल रहा था और उसकी सुनहरी किरणें दीवार पर पड़कर उसे स्वर्णिम आभा दे रही थीं। वह दृश्य मैं आज भी नहीं भूल पाई हूँ। थकान शरीर में थी, पर मन में एक अद्भुत तृप्ति थी.. मानो शताब्दियों पुराने रहस्य को हमने स्वयं छू लिया हो। तुमने लौटते हुए कहा था.. “इतिहास किताबों में नहीं, इन पत्थरों में साँस लेता है।” मैंने धीरे से कहा.. “और हर यात्रा हमें थोड़ा और जीवित बना देती है।”

गेस्ट हाउस में लौटने के बाद हमने देर रात तक बातें कीं। कमरे में एअर-कंडीशनिंग की ठंडी हवा थी, पर बाहर की वसंत भरी रात खिड़की से झाँक रही थी। तुमने अपने देश तंज़ानिया की पहाड़ियों का ज़िक्र किया, मैंने अपने देश के ऐतिहासिक किलों का! हम दोनों ने यही सोचा कि दूरी चाहे कितनी भी हो, अनुभव हमें जोड़ देते हैं।

रात गहराती गई, और हमारी हँसी में बीजिंग की वह वसंतमयी हवा घुलती गई। आज इतने वर्षों बाद, जब मैं अपनी यात्राओं के बारे में सोचती हूँ, तो तुम्हारी और हमारी उस यात्रा की याद स्वतः लौट आती है। खुद से ही कहती हूँ कि इतिहास केवल किताबों में नहीं, बल्कि यात्राओं में, दोस्ती में और उन क्षणों में जीवित रहता है जब कोई व्यक्ति किसी नए देश की मिट्टी को अपने हाथों से छूता है। ग्रेट वॉल तो वहीं है उतनी ही भव्य, उतनी ही शांत, पर शायद अब वहाँ हमारी हँसी की गूँज भी कहीं बाकी होगी। 

प्रिय मोशा, दुनिया चाहे कितनी भी बड़ी क्यों न हो, सच्ची दोस्ती और खोज की भावना हमें हर जगह घर जैसा एहसास देती है। कभी फिर मिलें तो चलें, किसी नई दीवार, किसी नए पहाड़ की ओर जहाँ हवा महकती हो और समय ठहर-सा जाए।

*********

©  डॉ प्रतिभा मुदलियार

पूर्व विभागाध्यक्ष, हिंदी विभाग, मानसगंगोत्री, मैसूरु-570006

306/40, विमल विला, निसर्ग कॉलोनी, जयनगर, बेलगाम, कर्नाटक

मोबाईल- 09844119370, ईमेल:    mudliar_pratibha@yahoo.co.in

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ५ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ५ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

सफरीच्या पाचव्या दिवशी, ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर मस्कतपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर नावाच्या शहराकडे आम्ही निघालो. वाटेत एक-दोन प्रेक्षणीय ‘वादियाँ’ पाहत दुपार-संध्याकाळपर्यंत सूरला पोहोचायचे होते. आमचा गाईड, अल नासर आमच्यासोबत होताच. मस्कत सोडल्यानंतरचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत जात नसल्याने, आजूबाजूचे निसर्गचित्र रुक्षच दिसत होते. चाकाखालचा रस्ता तेवढा मऊसूत असल्याने प्रवासाचा शीण अजिबात जाणवत नव्हता.

मस्कतपासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर हमरस्ता किनाऱ्याच्या दिशेने वळला आणि समुद्रकिनाऱ्याला समांतर धावू लागला. किनाऱ्यापासून सुमारे ६०० मीटर आत असलेल्या ‘बिम्माह सिंक-होल’ नामक ठिकाणी आमची बस थांबली. या जागेचे वर्णनदेखील आम्ही आधी वाचलेले होते. या भागात चुनखडीच्या दगडांचे प्रमाण खूप आहे. कदाचित हजारो वर्षांपूर्वी, एका ठिकाणची चुनखडी भुसभुशीत होऊन ती जमीन खचली आणि एक मोठा खड्डा तयार झाला. त्या खड्ड्याखाली पाण्याचा झराही असल्याने तिथे एक छोटे सरोवर तयार झाले. जमिनीपासून सुमारे ६०-६५ फूट खाली असलेले, नीलमण्याच्या रंगाचे हे तळे सव्वादोनशे फूट लांब आणि दीडेकशे फूट रुंद आहे. कडे-कडेने पाण्यातून चालत जाण्यासारखे किंवा डुंबण्याजोगे असले तरी मध्यभागी त्या तळ्याची खोली अंदाजे ३०० फूट आहे असे वाचले होते. जमिनीवरून खाली तळ्याजवळ उतरण्यासाठी जिना केलेला होता. आम्ही पाहिले तेंव्हा त्या सिंक-होल’मध्ये काही पर्यटक डुंबत असलेले दिसले. एक मनुष्य तळ्याशेजारच्या कपारीतून वर चढत जाऊन त्या तळ्यात उड्यादेखील मारत होता. कडक उन्हाची वेळ असल्याने जमिनीवर तापमान बरेच होते. पण खाली तळ्याजवळ उतरताच आल्हाददायक गारवा जाणवला. पुढे प्रवास करायचा असल्याने, कितीही मोह झाला तरी आम्हाला डुंबायला वेळ नव्हता. फक्त फोटो काढले आणि तिथून परत फिरलो.

पुढे सूरपर्यंतचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगतच होता. आम्हाला अल नासरने सांगितले होते की सूरच्या अलीकडे ‘वादी शब’ आणि आणि ‘वादी तिवी’ अशा दोन ‘वादियाँ’ पाहण्यासारख्या होत्या. वाळवंटातल्या लोकांना दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व माहीत असल्यामुळे वादीचे अप्रूप असणे स्वाभाविकच आहे, कारण, डोंगरात एखादा झरा असल्यास त्याचे पाणी वादीमधूनच वाहत येते. ‘वादी शब’जवळ पुष्कळ पर्यटक दिसले. वाहत्या पाण्यातून ते लोक बोटीने कुठेतरी जात होते. बोटीची फेरी करून परत येणाऱ्या एका भारतीय तरुणाकडून मी माहिती घेतली. १०-१५ मिनिटे बोटीतून जाऊन पलीकडच्या तीरावर ते डोंगरावर चढून आले होते. पण विशेष वेगळे असे काही पाहण्यासारखे नव्हते असे तो म्हणाला. थोडा वेळ तिथे थांबून आणि फोटो काढून आम्ही ‘वादी तिवी’च्या दिशेने पुढे निघालो.

‘वादी तिवी’ मध्ये मात्र खूपच हिरवाई आणि फुलाफळांच्या बागा दिसत होत्या. आम्हाला बसमधून उतरवून अल नासर एका खासगी फार्ममध्ये घेऊन गेला. आपल्यासारख्या देशातील लोकांना अशा बागांचे फारसे कौतुक असायचे कारण नाही. पण या रुक्ष देशात फिरत असताना अचानक समोर आलेली, केळी, संत्री, पपयांनी लगडलेली झाडे व डेरेदार आंब्याची झाडे पाहून मन प्रसन्न झाले. पाणी साठवण्याकरता उंचावरच्या भागात हौद बांधून घेतलेले होते. एकमेकांना जोडणारे उभे-आडवे पाट संपूर्ण बागेतून काढलेले होते. उपलब्ध होणारे सगळे पाणी खुबीने वापरण्याची योजना केलेली होती. या वादीच्या दोन्ही बाजूंना बागा करण्यासाठी, ओमान सरकारने स्थानिक रहिवाश्यांना जमीन वाटून दिलेली आहे. इथे इतर व्यवसायाशी संबंधित बांधकामे करायला मनाई आहे, अशी माहिती अल नासरने आम्हाला पुरवली.

सूरमध्ये पोचायला दुपार होऊन गेली असल्याने भूक कडाडली होती. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात बसून आम्ही अरबी जेवणावर ताव मारला. आता सूरमध्ये पाहण्यासारखे असे एकच महत्वाचे ठिकाण राहिले होते – ते म्हणजे काही शतकांपासून इथे कार्यरत असलेला बोटींचा कारखाना.

सहाव्या शतकापासूनच ओमानमधल्या ग्वादर, मस्कत, सूर, सलालाह येथील बंदरांचे महत्व व्यापाऱ्यांना समजलेले होते. बलुचिस्तानमधल्या कलात राज्याच्या खानाने अठराव्या शतकात, ग्वादर हे बंदर सांभाळण्यापुरते ओमानच्या राजाला देऊ केले होते. ते पुढची १५० वर्षे ओमानच्याच कब्जात राहिले. १९४७ नंतर बलुचिस्तानमधील सर्व संस्थाने पाकिस्तानात विलीन केली गेली. ओमानकडून ग्वादर बंदर परत मिळवण्यात पाकिस्तानला १९५८ साली यश आले. आज पाकिस्तानच्या संमतीनेच, चीनमधील शिंजियांग प्रांतातून ग्वादर बंदरापर्यंत, ३००० किलोमीटरचा थेट रस्ता बांधला जात आहे. आणि भारतासाठी दुर्दैवाची, आणि चीड आणणारी गोष्ट अशी, की पाकिस्तानने व्यापलेल्या, गिलगिट-बाल्टिस्तान या भारतीय भूभागातून तो ‘China-Pakistan Economic Corridor’ नावाचा रस्ता काढला जात आहे!

पूर्वीच्या काळी ओमानच्या मार्गाने होत आलेला व्यापार पाहता, सूरमध्ये बोटींचा कारखाना (Dhow Factory) उभारला गेला नसता तरच नवल वाटले असते. सध्या अस्तित्वात असलेला कारखाना सतराव्या शतकात सुरु झाला. त्यामध्ये पूर्वीपासून काम करणारे पुष्कळसे कारागीर भारतीय होते आणि आजही आहेत. या कारखान्यात आता लाकडी सांगाडा असलेल्या मोटरबोटी बनवल्या जातात. गेल्या तीन वर्षांपासून तिथे बनत असलेली एक मोठी लक्झरी बोट आम्ही पाहिली. सुमारे २१ कोटी रुपयांची ती बोट एक ओमानी व्यापारी बनवून घेत आहे असे समजले.

त्या फॅक्टरीच्या आवारातच एक भेटवस्तूंचे दुकान आणि एक छोटेसे संग्रहालय आहे. दुकानामध्ये बोटींच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या ज्यांची लांबी हातभरापासून ते ४-६ फुटांपर्यंत होती. घरोघरी किंवा संस्थांच्या दर्शनी दालनात काचेच्या शोकेसमध्ये घालून त्या ठेवता येण्यासारख्या होत्या. खलाश्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या सुकाणू सारख्या इतरही अनेक वस्तू तिथे विकायला ठेवल्या होत्या. संग्रहालयामध्ये हिंडताना खूप नवीन माहिती मिळाली. बोट कारखान्याचा सतराव्या शतकांपासूनचा इतिहास, बोटी बनवताना वापरले जाणारे साहित्य आणि त्याची कृती, पूर्वापार होत आलेल्या सागरसफरींमध्ये वापरलेल्या विविध वस्तू, खलाशांनी वापरलेले जुने नकाशे, अनेक फोटो, शंभर वर्षांपूर्वीचे बोटीचे तिकीट, अशा अनेकविध वस्तू आम्ही पाहिल्या.

दिवसभराची आमची भटकंती पूर्ण झालेली होती. सूरमध्ये फक्त रात्रीपुरता मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहिबाच्या वाळवंटाकडे कूच करायचे होते. हॉटेलमध्ये गेल्या-गेल्या समोर वेलकम ड्रिंक घेऊन एक मुलगी उभी होती. तिच्या ड्रेसवर लावलेले ‘सौमिता’ हे नाव वाचून ती बंगाली असावी असा मी अंदाज केला आणि हात जोडून ‘धोंनोबाद’ म्हटले. पाहुण्यांनी तिच्या मातृभाषेत आभार मानल्यामुळे अर्थातच ती सुखावली होती. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेला शौमिता आणि शॉप्तर्षि या दोघांसोबत माझ्या थोड्या गप्पा झाल्या. दरम्यान गिरीश काउंटरवरून आमच्या खोलीच्या किल्ल्या घेत होता. तिथे ड्यूटीवर असलेल्या पाकिस्तानी तरुणीकडून त्याला काही आश्चर्यकारक माहिती मिळाली.

सूरमधल्या हॉटेलात नाश्ता उरकून आम्ही ओमानच्या शार्किया प्रांतात असलेल्या ‘वाहिबा सँड्स’ च्या दिशेने निघालो. आम्ही आज जिथे राहणार होतो ते ‘रिसॉर्ट’ एका वैराण वाळवंटाच्या आत होते. तिथपर्यंत जायला एक कच्चा वालुकामय रस्ता होता. अशा रस्त्यांवर साध्या मोटरगाड्या किंवा बसेसची चाके घसरतात. त्यामुळे आम्हाला ‘४ X ४, किंवा फोर व्हील ड्राइव्ह’ गाडीने जाणे भाग होते (जिच्या चारही चाकांना इंजिनाची चाल मिळते अशी गाडी). आम्हाला ‘बिदियाह’ नावाच्या गावातल्या एका पूर्वनियोजित ठिकाणापासून पिकअप करायला आमच्या रिसॉर्टनेच दोन ४ X ४ गाड्यांची व्यवस्था केलेली होती.

त्या गावाजवळच आम्ही एका ठिकाणी हलके अरबी जेवण जेवलो आणि आमची बस ‘बिदियाह’ गावात येऊन थांबली. आम्हाला घेऊन जायला आलेल्या दोन मोटारगाड्या तिथे येऊन आधीच थांबलेल्या होत्या. बिदियाह गावापासून ‘Thousand Nights’ कँम्प सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर स्थानिक ‘बैदू’ जमातीतला एक तरुण होता. त्याच्या बोलण्याचा ‘लहेजा’ निश्चितच अल नासर किंवा इतर ओमानी माणसांच्यापेक्षा वेगळा होता. अल नासरसोबत त्याची टकळी अखंड चालू होती. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो त्या वालुकामय रस्त्यावरून वेगात पण अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होता. आमच्या गाडीत दादा असल्यामुळे, “गाडी शक्यतो कमी वेगात आणि हादरे बसणार नाहीत अशा पद्धतीनेच चालवावी लागेल” ही आम्ही अल नसरला दिलेली सक्त ताकीद त्याने ड्रायव्हरला कळवली असावी असे वाटले. कारण आमच्या कुटुंबाचीच दुसरी गाडी सुसाट पुढे निघून गेली होती.

चहूकडे रेताड जमीन आणि वाळूच्या टेकड्या दिसत होत्या. अधूनमधून ‘वाळवंटातली जहाजे’ – म्हणजे उंट-चरताना दिसत होतेच. एका झोपडीवजा घरापाशी आमची गाडी थांबली. त्या झोपडीशेजारीच तारांच्या कुंपणाच्या आत उंट होते. “ही वाळवंटातच वास्तव्य करणाऱ्या ‘बैदू’ लोकांची झोपडी आहे. त्यांच्या ‘जीवनशैलीचे दर्शन’ होऊ शकेल” असे अल नासरने आम्हाला सांगितले होते. मात्र, ‘बैदू’ जीवनशैलीचा आभास निर्माण करण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता इतकेच मला जाणवले. तिथे आलेले काही गोरे पर्यटक मात्र त्या वातावरणामुळे ‘भारावून गेलेले’ वाटले. पुढच्या वाटेला लागल्यावर अल नासर हळूच म्हणाला, “आजकाल या वाळवंटांमध्ये ‘बैदू’ राहतच नाहीत. तुम्ही बिदियाह गावात एक पक्क्या घरांची वस्ती पाहिलीत ना? हे ‘बैदू’ तिकडे राहतात आणि दिवसा फक्त उंट चारायला वाळवंटात येतात!” 

काही वेळातच, ‘Thousand Nights’ कँम्पच्या समोर येऊन गाडी थांबली.

– क्रमशः भाग ५.

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ४ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ४ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

मत्रा ‘सूक’ हा आमचा दिवसभरातला शेवटचा थांबा होता. सर्वसाधारणपणे पर्यटकांना आकर्षित करणारी जी दुकाने गावोगावी असतात तशीच तिथेही होती. ‘आलोच आहोत तर काहीतरी घ्यावे’ अशा विचाराने प्रेरित होऊन काहींनी तिथे अत्तरे, ‘लोबान’ वगैरे खरेदीही केली. परतीच्या वाटेवर जुना राजवाडा, म्हणजे ‘अल आलम पॅलेस’ आम्हाला बाहेरूनच पाहता आला. आत जाण्याची परवानगी नसल्याने, राजवाड्यासमोर उभे राहून आम्ही फोटो मात्र काढून घेतले.

ओमान सफरीमधला आमचा चौथा दिवस ‘सागरसृष्टी-दर्शना’साठी राखीव होता. लवकर नाश्ता उरकून, आठ वाजायच्या आत समुद्रकिनाऱ्यावरच्या, अल मौज येथील ‘मोला-मोला डायव्हिंग सेन्टर’ ला पोहोचणे आवश्यक होते. हॉटेलमधून समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणे आणि संध्याकाळी परत येणे, इतकाच प्रवास असल्याने, ‘जाण्या-येण्यासाठी टॅक्सी करू’ असा विचार करून आम्ही आमच्या मिनीबसला सुट्टी दिलेली होती. पण मस्कतमध्ये ‘ऊबर’ उपलब्ध नाही. स्थानिक ऍप वापरून मागवलेल्या टॅक्सी लवकर येत नाहीत. कशाबशा आम्हाला दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही वेळेत अल मौज येथे पोचलो.

देवाशीषने ‘मोला-मोला डायव्हिंग सेन्टर’ सोबत आगाऊ संपर्क करून, मोटरबोट सफर, स्कुबा डायव्हिंग, आणि स्नॉर्केलिंग चे आयोजन केलेले होते. स्कुबा-डायव्हिंगसाठी माझ्या डॉक्टरांची पूर्वपरवानगी मी घेतलेली नसल्याने मी फक्त स्नॉर्केलिंग करणार होतो. बाकी सगळे स्कुबा-डायव्हिंगचा अनुभव घेणार होते. दादा, म्हणजे माझे ९२ वर्षाचे सासरे समुद्रात उतरणार नसले तरी ते आमच्यासोबत बोटीवर येणार होते. मनाने अजूनही तरुण असल्याने, ते हसून म्हणाले, “तुम्हा सर्वांना मजा करताना पाहण्याची मजा मी घेणार आहे!” तरीही आयोजकांनी तीन-तीनदा आम्हाला विचारून खात्री करून घेतली की दादा निश्चितपणे बोटीवर येऊ इच्छित आहेत आणि त्यांना मोटारबोटीच्या प्रवासाचा त्रास होणार नाही. दादांनी ठासून होकार दिल्यानंतर आयोजकांना त्यांचे खूप कौतुक वाटल्याचेही जाणवले.

‘मोला-मोला’ च्या बोटीवर चढण्यापूर्वी आम्हाला आमचे ‘किट’ दिले गेले. बोटीवर कप्तानाव्यतिरिक्त सुमारे २५ पर्यटक आणि ‘मोला-मोला’ चे चार मदतनीस/प्रशिक्षक होते. आमच्याव्यतिरिक्त इतर सर्व पर्यटक आणि ‘मोला-मोला’चे चारपैकी तीन मदतनीस युरोपमधल्या वेगवेगळ्या देशातले होते. एकमेव भारतीय (आणि आशियाई) गट म्हणजे केवळ आमचाच परिवार होता. ‘विल’ (कदाचित विल्यम) नावाचा एक उंचापुरा आणि बलदंड तरुण त्या चौघांचा नेता होता असे दिसले. जेमतेम पंचविशी-तिशीच्या त्या तरुणांनी ओमानसारख्या परदेशात राहून चालवलेला हा उपक्रम कौतुकास्पद होता. बोट सुटण्याआधी एका मदतनीसाने सर्व पर्यटकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर प्रत्येकाला एकेक ‘संमतीपत्र’ दिले गेले जे वाचून प्रत्येकाने सही करणे भाग होते. समुद्रात ज्या धाडसी क्रीडाप्रकारात आम्ही सहभागी होणार होतो त्यातील धोक्यांसंबंधी आम्हाला कल्पना आहे व आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर त्यात सामील झालो असल्याचे ते पत्र होते.

त्यानंतर त्या मदतनीसाने आम्हा सर्वांना दिवसभराच्या कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. सकाळच्या सत्रात एकदा आणि दुपारच्या सत्रात एकदा, असे दोन वेळा आम्हाला स्कुबा-डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करता येणार होते. आमचे दुपारचे जेवण बोटीवरच असणार होते. एका शीतपेटीमधे पाण्याच्या बाटल्या व थंड पेये, आणि शेजारीच चिप्सची पाकिटे, केळी वगैरे ठेवलेले होते. मनाला आवडेल ते, हवे तेंव्हा खायची-प्यायची मुभा होती. पुरुष व स्त्रियांसाठी एकेक टॉयलेटही बोटीवर होते. बोटीच्या टपावर गाद्या अंथरलेल्या होत्या व एका वेळी दहा जणांना टपावर बसण्याची (लोळण्याचीही) सोय होती.

अल मौजपासून सुमारे ३० किलोमीटर दूर समुद्रात असलेल्या, ‘अल दिमानियात’ नावाच्या एका द्वीपसमूहाच्या दिशेने आमची मोटरबोट निघाली. आम्ही आनंदात गप्पा मारत, हास्यविनोद करत होतो, फोटो काढत होतो. अधूनमधून कुणी खाद्यपेयांचा आस्वाद घेत होते.

आमच्यापैकी दोघा-दोघांना एकत्र बोलावून ‘विल’ काही सूचना देऊ लागला. स्कुबा डायव्हिंगचे किट व पाठीवरचा ऑक्सिजन सिलिंडर घालण्याची पद्धत, पाण्याखाली जाताना आणि गेल्यावर करायच्या (आणि न करायच्याही) हालचाली, त्या संपूर्ण काळात बाळगायची सावधगिरी वगैरे तो समजावून सांगत होता. डोळ्यांवर लावायचा चष्मा व त्यालाच जोडलेला, नाकावर लावायचा मास्क आम्हा सर्वांच्या किटमध्ये होताच. पर्यटकांपैकी काहीजण अगदी सराईत पाणबुडे असावेत असे वाटले. त्यांना कोणत्याच सूचनांची गरज नव्हती आणि त्यांच्या किटमध्ये तर रबरी डायव्हिंग सूटदेखील होता जो त्यांनी अंगावर चढवला. आपापले किट व ऑक्सिजन सिलिंडरही अंगावर चढवून ते झटकन तयार झाले.

‘अल दिमानियात’ द्वीपसमूहापैकी एका बेटाच्या बरेच अलीकडे आमची बोट थांबली. पर्यटकांपैकीच २-४ सराईत पाणबुडे (Deep Sea Divers) समुद्रात उतरले आणि खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले. मग बोट जराशी पुढे जाऊन त्या बेटाजवळ उभी राहिली. तिथे पाण्याची खोली काही ठिकाणी सुमारे २० फूट तर काही ठिकाणी ४० फूट होती. आमचा प्रशिक्षक, ‘विल’, आमच्यापैकी दोन-दोन अननुभवी पर्यटकांना एकाचवेळी बरोबर घेऊन पाण्याखाली जात होता. कमी-अधिक फरकाने, ५ ते १५ मिनिटे पाण्याखाली राहून लोक वर येत होते. पाण्याखाली जाण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाच्याच मनातला काहीसा घाबरलेला, अनिश्चिततेचा भाव चेहऱ्यावर दिसत असल्याने, त्यांचे चेहरे ‘फोटो काढण्यासारखे’ झालेले होते. बुडी मारून वर आल्यानंतर मात्र एका नवीन, व चित्तथरारक अनुभवामुळे मिळालेला आनंद, आणि ‘आपण हे करू शकलो’ अश्या अर्थाची त्यांची विजयी मुद्राही कॅमेऱ्यात टिपण्यासारखी होती.

‘विल’सोबत जोड्या-जोड्या डायव्हिंगसाठी जात असताना, ‘ऍना’ नावाची दुसरी प्रशिक्षक उरलेल्या लोकांचा गट घेऊन स्नॉर्केलिंगसाठी निघाली. मीही त्याच गटात होतो. दोन वर्षांपूर्वी मी थायलंडच्या सफरीवर असताना, आयुष्यात पहिल्यांदाच स्नॉर्केलिंग केलेले होते. त्यामुळे ते कसे करायचे याची माहिती होती. स्नॉर्केलिंग करताना आपण पाण्याच्या पृष्ठभागाच्या थोडेसेच खाली बुडून पोहत जायचे असते. आपल्या डोळ्यांवर पाण्यात घालायचा चष्मा आणि नाकावर मास्क लावलेला असतो. एक फूटभर लांबीची, कडक प्लॅस्टिकची नळी चष्म्याच्या जोडलेली असते. त्या नळीचे एका टोकाकडचे भोक तोंडात घेऊन, दातांखाली पक्के दाबून तोंड मिटायचे असते. नळीचे दुसरे भोक पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहते, ज्यातून आपण तोंडाद्वारे हवा खेचत व सोडत राहायचे असते. या सर्व काळात नाक मास्कचा आत बंदिस्त असते व नाकाने श्वासोच्छवास करता येत नाही. पोहताना सावधगिरी म्हणून, हवे असल्यास अंगात लाईफ जॅकेट घालता येते.

पाण्याखालची जीवसृष्टी आणि समुद्रातळाशी असलेले प्रवाळ (Corals) पाहताना वेळेचे भानच सुटते. मला विविध रंगांचे लहान-मोठे मासे आणि कासवे दिसली. एक मोठे कासव खालून वर पोहत-पोहत अगदी माझ्या नाकाखालीच येऊ लागले. पण अगदी जवळ येताच त्याने मार्ग बदलला आणि माझ्याशेजारीच त्याने पाण्याबाहेर डोके काढले. थोडा वेळ हवेत श्वास घेऊन ते पुनः पाण्याखाली गेले. मग मी त्याच्या पाठलागावर निघालो. पुढे पोहत निघालेल्या त्या कासवाच्या मानेभोवती एक मोठा मासा सतत गिरक्या घालत-घालत पोहत होता. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता. जणू काही जमिनीवरून त्यांच्या जगात फिरायला आलेल्या माझ्यासारख्या पाहुण्याचे मनोरंजन करण्याची जबाबदारी त्या दोघांनी उचलली होती! स्नॉर्केलिंग करताना नुसते वेळेचेच नव्हे, तर वयाचेही भान सुटते हे नंतर माझ्या लक्षात आले!

दुपारच्या जेवणात केळी, पिटा ब्रेड व हम्मस, दोन-तीन तऱ्हेच्या चटण्या व सॉस, शाकाहारी व मांसाहारी कबाब अशा गोष्टी होत्या. आम्हाला एक गोष्ट खूपच कौतुकास्पद वाटली. विल, ऍना, आणि इतर दोघा युवा आयोजकांनी आम्हाला सकाळी बोटीवर घेण्यापासून ते समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन आणण्यापर्यंत सर्व कामे केली होती. त्यांचीही बरीच दमणूक झालेली होती. तरीही जेवणाच्या वेळी अतिशय चपळाईने हालचाली करत, त्या छोट्याश्या बोटीच्या मध्यभागी त्या चौघांनीच एक बुफेचे टेबल मांडले. त्यावर टेबलक्लॉथ घालण्यापासून ते जेवणाच्या बशा मांडून सर्वांना आग्रहाने जेवू घालण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली. आम्ही या सफरीचे पैसे भरलेले असल्यामुळे या सेवा आम्हाला मिळणे अपेक्षितच होते. परंतु, ज्या उत्साहाने, हसतमुखाने आणि आपुलकीने ते तरुण ही कामे करीत होते ते वाखाणण्याजोगे होते. विलने तर स्वतःच्या मनानेच आमच्या दादांना पिटा ब्रेड व कबाबचा रोल करून खायला दिला आणि अगदी स्वतःच्या वडिलांप्रमाणे वागणूक त्यांना दिली.

जेवणानंतर पुन्हा दुपारच्या सत्रातले सागरभ्रमण करून झाले. परतीची वेळही झाली होती आणि सगळेच दमलेलेही होते. मोटारबोट वेगाने किनाऱ्याकडे येत असताना बहुतांश पर्यटक काहीसे अंतर्मुख झालेले जाणवले. काही जण दिवसभरातल्या थरारक अनुभवांची उजळणी करत असावेत, तर काहींना नुसतेच परतीचे वेध लागले असावेत. मी आणि गिरीश बोटीच्या कप्तानासमोर असलेल्या छोटयाश्या डेकवर बसून अथांग सागराच्या दर्शनाचा आणि बोटीच्या वेगाचा आनंद घेत होतो. आमच्या बोटीशी जणू स्पर्धा करत असल्याप्रमाणे, काही पक्षी शेजारून उडत चालले होते. दूरवर मस्कतचा किनारा दिसायला लागला तसे आमच्यासह सगळेच पर्यटक आनंदी झालेले दिसले. गिरीशच्या व माझ्या मनात एकदमच विचार आला तो शेकडो वर्षांपूर्वी आपले घर-दार सोडून अज्ञाताच्या प्रवासावर निघणाऱ्या खलाशांचा! 

अनेक दिवसांच्या सागरी प्रवासानंतर किनारा दिसल्यावर त्यांना तर किती आनंद होत असेल?

पण त्याच वेळी मला कुसुमाग्रजांनी लिहिलेले ‘कोलंबसाचे गर्वगीत’ही आठवले…

 “अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला… “

– क्रमशः भाग ४  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ३ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ३ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

जुन्या मस्कत शहरातील मत्रा ‘सूक’ नावाचा बाजार, राजवाडा, रॉयल ऑपेरा हाऊस, आणि सुलतान काबूस मशीद ही ठिकाणे पाहायला आम्ही बाहेर पडलो. अल नसरच्या सल्ल्यानुसार, सर्वप्रथम ‘सुलतान काबूस ग्रँड मॉस्क’ मध्ये जायचे ठरले, कारण ती मशीद सकाळी ११ नंतर दुपारच्या प्रार्थनेसाठी बंद होणार होती. ओमानमधल्या ठिकठिकाणच्या इमारतींना, उद्यानांना, संस्थांना ज्या व्यक्तीचे नाव दिलेले आहे त्या दिवंगत सुलतान काबूसबद्दल कुतूहल जागृत होणे स्वाभाविक आहे.

इ. स. १७४४ मध्ये ओमानी वंशाच्या ‘अल सैद’ घराण्याचा पहिला शासक, ‘इमाम अहमद बिन सैद अल बुसैदी’ याने इराणी आक्रमकांना हुसकावून लावले आणि ओमान व झांझिबारमध्ये मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यापुढे आजतागायत याच घराण्याची सत्ता ओमानमध्ये कायम आहे. ‘काबूस बिन सैद अल सैद’ हा ओमानच्या राजघराण्यातील चौदावा सुलतान होता. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. सँडहर्स्ट येथील ब्रिटिश मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो पुढील दोन वर्षे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होता. १९६४ साली तो मायदेशी परतला. पण त्याचे पुरोगामी आणि स्वतंत्र विचार पसंत न पडल्यामुळे त्याच्या वडिलांनीच त्याला पुढील सहा वर्षे राजमहालामध्ये नजरकैदेत ठेवले. २३ जुलै १९७० ला काबूसने वडिलांविरुद्ध रक्तपातविरहित बंड केले आणि त्यांना निष्कासित करून तो ओमानचा नवा सुलतान झाला. या बंडाला ब्रिटिशांची फूस आणि अप्रत्यक्ष मदत होती असे बोलले जाते. परंतु, जे झाले ते ओमानच्या भल्यासाठीच झाले असे आता म्हणता येईल.

सुलतान काबूसने सत्ता हाती येताच काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. गेली अनेक वर्षे स्वतःच्याच कोषात बंद होऊन जगापासून तुटलेल्या ओमान देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध त्याने पुनर्स्थापित केले. १९६० च्या दशकात ओमानमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलसाठे सापडले होते. खनिज तेलाच्या निर्यातीमधून मिळत राहिलेला पैसा वापरून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सुलतान काबूसने चंग बांधला. १९७० साली संपूर्ण ओमानमध्ये केवळ तीन शाळा होत्या ज्यात फक्त ९०० मुले शिकत होती. ओमानमधल्या एकाही मुलीने शाळा पाहिलीदेखील नव्हती. आज त्या देशातल्या एकूण १८०० देशी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधून साडेसात लाख विद्यार्थी शिकत आहेत, आणि त्यापैकी मुलींची संख्या सुमारे ५० टक्के आहे. ओमानमध्ये २१ भारतीय शाळा आहेत ज्यामध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून शिक्षण दिले जाते. ही माहिती आम्हाला पुढे वाहिबाच्या वाळवंटात भेटलेल्या एका भारतीय हिंदू डॉक्टरकडून मिळाली. ओमानमध्येच जन्मलेली त्याची धाकटी मुलगी अशाच एका ‘इंडियन स्कूल’ मध्ये शिकत होती.

जी गत शिक्षणाची, तीच पूर्वी आरोग्यव्यवस्थेची आणि मूलभूत सुविधांची होती. १९७० साली मस्कतच्या रस्त्यांवर पथदिवेही नसल्याने लोक कंदील घेऊन हिंडत असत. घरोघरी वीज आणि नळातून येणारे पाणी कुणी बघितलेही नव्हते. संपूर्ण देशभरात फक्त एक ब्रिटिश व एक अमेरिकी अशी दोनच रुग्णालये होती ज्यामध्ये केवळ १३ डॉक्टर कार्यरत होते. प्राथमिक आरोग्यसेवेसाठी कित्येकांना ३-४ दिवसांची पायपीट करावी लागे. आता ओमानमध्ये सरकारी व खाजगी मिळून ७० मोठी रुग्णालये आहेत. त्या मोठ्या रुग्णालयातून आणि लहान-सहान खाजगी दवाखान्यांमधून हजारो डॉक्टर सेवा देत आहेत. ओमानमध्ये कित्येक भारतीय डॉक्टर्सही काम करतात. ओमानसफरीला निघण्यापूर्वी अशा दोन वेगवेगळ्या डॉक्टरांशी आमचा संपर्क झाला होता जे दोन-अडीच दशके ओमानमध्ये राहून काम केल्यानंतर आता परत येऊन पुण्या-मुंबईत स्थायिक झाले आहेत.

१९७० मध्ये ओमानमधल्या दळणवळणाची अवस्था तर अठराव्या शतकातल्या भारतात जी काही असेल त्यापेक्षा वाईट होती. देशभरात एकूण फक्त १० किलोमीटर पक्के आणि १८०० किलोमीटर कच्चे रस्ते होते. आज ओमानमध्ये ३०००० किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे देशभर पसरलेले आहे. त्याशिवाय, वाळवंटातल्या वाड्यावस्त्यांना जोडणारे आणखी ३०००० किलोमीटर लांबीचे कच्चे रस्ते आहेत. आमच्या सफरीत ओमानमध्ये आम्ही पाहिलेले एकूणएक रस्ते भलतेच मुलायम होते. काही डोंगराळ भागात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे खराब झालेला तुरळक भाग वगळता, एकाही हमरस्त्यावर किंवा शहरातील सडकेवर एकही खड्डा नव्हता.

ओमान हा पूर्वीपासूनच एक इस्लामी देश आहे. परंतु, १००-१२५ वर्षांपासून इथे व्यापारानिमित्त स्थायिक झालेल्या गैरमुस्लिमांची संख्या कमी नाही. १८७० साली गुजरातमधल्या मांडवीतून इथे येऊन व्यापाराला सुरुवात केलेले रामदास ठाकरसी व त्यांचा मुलगा खिमजी यांची ‘खिमजी रामदास आणि कंपनी’ आज ओमानमधील मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्थांपैकी एक आहे. शेठ खिमजींचा नातू, कनकसी गोकुळदास खिमजी यांना सुलतान काबूसने ‘शेख’ ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. त्यामुळे, ते जगातील एकमेव हिंदू शेख ठरले आहेत!

सुलतान काबूसच्या धर्मविषयक उदारमतामुळे ओमानमध्ये धार्मिक तेढ अस्तित्वात नाही. इथल्या कायद्यानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि धर्मा-धर्मात भेदभाव करणे वर्ज्य आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे साडेपाच टक्के लोक हिंदू आणि साडेसहा टक्के लोक ख्रिश्चन आहेत. या दोन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी सुलतान काबूसने सरकारी जमीन देऊ केली. त्यापूर्वीच काही सिंधी व्यापाऱ्यांनी १९०९-१० साली मस्कतमधल्या जुन्या राजवाड्याजवळ मोतीश्वर महादेव मंदिर बांधलेले होते जे आजही अबाधित आहे. त्या मंदिरात पूजाअर्चा आणि विविध सण-उत्सव नियमितपणे साजरे होतात. मस्कत, सलाला, सूर या शहरांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि श्रीगणेशाची चार प्रमुख मंदिरे आहेत. अल नसरसोबत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यातून असे लक्षात आले की या देशात सर्वच धर्म आणि धार्मिक कार्यक्रम मुख्यत्वे घराघरांपुरते आणि आपापल्या प्रार्थनास्थळांपुरते मर्यादित आहेत. तसेच परधर्माविषयी सार्वजनिक स्वरूपाची चर्चा किंवा टीका-टिप्पणी निषिद्ध मानली जाते.

मस्कतदर्शनातला आमचा पहिला पडाव ‘सुलतान काबूस ग्रँड मॉस्क’ या भव्य मशिदीत होता. स्वतः सुलतानाने या मशिदीचे उदघाटन २००१ साली केले होते. सुमारे १०० एकर खुल्या जमिनीवर मध्यभागी बांधलेल्या या मशिदीची व्याप्ती १० एकर आहे. आजूबाजूला उरलेल्या ९० एकर जागेत उद्याने, हिरवळ आणि पार्किंग व इतर सोयी केलेल्या आहेत. भारत, इजिप्त, इटली, व ओमानमधील विविधरंगी संगमरवरी दगड आणि भारतातून आयात केलेला तीन लाख टन राजस्थानी लाल दगड वापरून ही मशीद बांधलेली आहे. या मशिदीत पुरुषांना व महिलांना प्रार्थना करण्यासाठी दोन स्वतंत्र दालने आहेत. त्यामध्ये ६५०० पुरुष व ७५० स्त्रिया एकावेळी प्रार्थना करू शकतात. त्याशिवाय, चहूबाजूंनी असलेल्या ओसरीवर आणखी १५००० लोक गुडघे टेकून प्रार्थना करू शकतील इतकी जागा आहे. परंतु, अल नसरच्या सांगण्याप्रमाणे, मस्कतमध्ये इतरही मशिदी असल्याने आजपर्यंत अगदी ईदच्या प्रार्थनेसाठीही कधी इथे एवढी गर्दी जमलेली नाही. मशिदीच्या मुख्य दालनाच्या ४६७५० चौरस फूट फरशीवर एक मोठा इराणी गालिचा अंथरलेला आहे (चिकटवलेला नाही). एकवीस टन वजनाचा हा गालिचा २८ विविध रंगाच्या धाग्यांनी विणलेला आहे. इराणमधून आलेल्या ६०० स्त्री-पुरुष कारागिरांनी चार वर्षे खपून हा गालिचा त्या जागेवरच स्वतःच्या हातांनी विणून तयार केला होता. त्यावेळी तो जगातला सर्वात मोठा एकसंध गालिचा होता. अल नासरने आम्हाला हसत-हसत सांगितले की या मशिदीच्या उदघाटन सोहळ्यात उपस्थित राहून परत गेल्या-गेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या सुलतान झाएदने एका इराणी कंपनीकडे याहीपेक्षा मोठ्या गालिच्याची ऑर्डर नोंदवली. त्यामुळे, २००७ साली उदघाटन झालेल्या अबू धाबी येथील ‘शेख झाएद मशिदी’मध्ये आज इथल्यापेक्षाही मोठा गालिचा अंथरलेला आहे!

ओमानमध्ये १९७० सालापर्यंत संगीत-नृत्य-कला यांना मज्जावच होता. रेडिओ बाळगणे हा गुन्हा होता आणि त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद होती. संपूर्ण देशात केवळ एक मिलिटरी बँड होता, पण त्यातील वादकही ओमानी नव्हे तर बलुची सैनिक होते. सुलतान काबूसने ओमानी आणि बैदू जमातीच्या लोकसंगीत व नृत्याच्या प्रसाराला प्रोत्साहन दिले आणि देशभरात या सर्व कलांना व्यासपीठ मिळवून दिले. स्वतः सुलतान काबूस याला संगीत-नृत्य-कला यांमध्ये रुचि होती. त्याची साक्ष म्हणून, भारताचे ओमानमधील माजी राजदूत श्री. अनिल वाधवा यांनी लिहिलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वागतार्थ २००९ साली आयोजित केलेल्या शाही भोजनादरम्यान वाजणाऱ्या संगीतासोबत सुलतान काबूसने अभावितपणेच टेबलावर ठेका धरलेला श्री. वाधवा यांनी स्वतः पाहिला होता!

मस्कतमधले ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ सुलतान काबूसच्या कलाप्रेमाचे एक सुंदर प्रतीक आहे. याचेही उदघाटन स्वतः सुलतान काबूसनेच २०११ साली केले होते. कलात्मक पद्धतीने रचलेले-सजवलेले हे संगीत-नाट्यगृह अतिशय प्रेक्षणीय आहे. खुर्च्या आणि बॉक्सेस मिळून यात ११०० प्रेक्षकांना बसायची सोय आहे. इथला रंगमंच केवळ फिरता किंवा सरकताच नव्हे तर खाली-वर हलणाराही आहे. एक कळ दाबताच रंगमंचासमोरचे ‘पिट’ आणि खुर्च्यांच्या पहिल्या दोन रांगा जमिनीखाली जातात, आणि दुसरी कळ दाबून स्टेजची लांबी (खोली) वाढवता येते. ओमानी संगीताच्या मैफली, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सैनिकी बँडच्या सांगीतिक कवायती, देशोदेशीचे वाद्यवृंद, ऑपेरा संच, अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांनी या संगीत-नाट्यगृहाचे वार्षिक वेळापत्रक भरगच्च असते. आम्ही तिथे गेलो तेंव्हा, म्हणजे ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान जॉर्डन व ऑस्ट्रियाच्या सैन्यदलांच्या बँड्सचे सादरीकरण होणार होते. नुकताच, म्हणजे ३०-३१ ऑक्टोबरला तिथे भारतीय सतारवादक उस्ताद निशात खान यांचा कार्यक्रम होऊन गेला होता.

– क्रमशः भाग ३ 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग – ३३ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग- ३३ ☆ श्री सुरेश पटवा ?

7.पग-पग नर्मदा यात्रा

ग्वारीघाट से तिलवारा घाट:13 अक्टूबर 2018

ग्वारीघाट से चले दो घंटे हो चुके थे। तिलवारा घाट शाम तक पहुँचने का लक्ष्य था। तिलवारा घाट का पुल तीन किलोमीटर पहले से दिखने लगा था। उसे देखते ही लगा कि लो पहुँच गए तिलवारा घाट, परंतु चलते-चलते पुल नज़दीक ही नहीं आ रहा था। पुल के दृश्य का पेनोरमा नज़ारा जैसा का तैसा बना था। तभी सामने एक बड़ा चौड़ा पहाड़ी नाला रास्ता रोककर खड़ा हो गया। खेतों में काम कर रहे मल्लाहों से पूछा तो उन्होंने बताया कि दो किलोमीटर ऊपर चढ़कर नाला पार करके नागपुर रोड पर पहुँच कर तिलवारा घाट पहुँचा जा सकता है इसका मतलब हुआ चार किलोमीटर का चक्कर। सबके पसीने छूट गए।

टी.पी.चौधरी साहब सपत्नीक गेंदों की मालाओं, नारियल,फल और ढेर सारा प्यार व परकम्मावासियों के प्रति हृदय में सम्मान लेकर तिलवारा घाट पर खड़े हमारी स्थिति लेते रहे थे। मोबाइल से उनको निवेदन किया कि एक नाव घाट से भिजवा दें। इसके पहले कि वे घाट पर आएँ एक नाविक को हम दिख गए और हमने भी तेज़ आवाज़ के साथ हाथ हिलाए। वह आया तो उसकी नाव में बैठकर तिलवारा घाट पर उतरे। चौधरी साहब ने बड़ी आत्मीयता और सम्मान से माला पहनाकर स्वागत किया और नारियल चिरोंजी अर्पित किया मानो हम देव हो गए हों। हमेशा की तरह हम उनके चरणस्पर्श करने को झुके तो उन्होंने हमें रोक दिया क्योंकि हम परिक्रमा वासी थे। भाभी जी अभिभूत थीं, उनका मातृवत प्रेम पूरी यात्रा हमारे साथ चला। सब लोग चौधरी दम्पत्ति के बारे में बतियाते रहे।

वैराग्य पर बातें करने लगे। घर, कपड़े, बिस्तर, पानी, खाना, पंखा, फ़र्निचर, गद्दे, गाड़ी, रुपया-पैसे, रिश्ते-नाते इन सब से परे भगवान भरोसे सिर्फ़ भगवान भरोसे। न रास्ते का पता, न खाने का पता, न ठिकाने का पता। बस एक अवलंबन नर्मदा, जिसके भरोसे ईश्वर के रिश्ते की डोर आदमियत से बंधी है। बस वही बचाएगी, वही खिलाएगी, वही सुलाएगी। सब कुछ तोड़कर और सब कुछ छोड़कर उसकी धारा में जाओगे तो वह पार लगाएगी। कर्मकांड से परे एक दीपक आस्था का। जूझो धूप से, पहाड़ से, पानी से, इंसानी नादानी से। धौंकनी सा चलता दिल, पिघल कर पसीना होती देह और आत्मा में तारनहार के प्रति असीम आस्था की परीक्षा है नर्मदा यात्रा।

जिस घर के सामने पहुँचकर कंठ से “नर्मदे हर” का अलख जगाया। उत्तर में हर-हर नर्मदे का स्वर घर के सभी सदस्यों की आवाज़ में एकसाथ गूंजा और सबसे बुज़ुर्ग सदस्य की आवाज़ सुनाई देती है बैठो साहब पानी पी लो, चाय पी लो, भोजन बना दें। सिर्फ़ आदमियत का रिश्ता कि पूरी पृथ्वी के जीव एक ही ब्रह्म के अंश, सब अन्योनाश्रित हैं। वसुधेव कुटुम्बकम, भारतीय संस्कृति का सबसे बड़ा मूल्य, जो मानवता वादियों का सबसे बड़ा संबल है। धर्म का सच्चा रूप और दुनिया की आतंकवाद के विरुद्ध एकमात्र आशा।

अत्यावश्यक से परे न्यूनतम पर निर्वाह पर विचार हुआ। भूख, भोजन, यौनइच्छा और आराम ये चार चीज़ें मानुष और पशु को प्रकृति की अनिवार्य देन हैं क्योंकि जीवन का चक्र इन्हीं से गतिमान होता है। भूख है तो भोजन की तलाश है, शरीर की थकान से भरपेट भोजन मिला तो यौन इच्छा जागती है, जिसकी पूर्ति होते ही नींद की प्रगाढ़तावश आराम अनिवार्य हो जाता है। छः दिन भूख, भोजन, यौनइच्छा से परे सुबह से शाम तक चलते-चलते चूर होने से भूख मिट गई, भोजन नहीं मिला तो यौनइच्छा लुप्त सी रही क्योंकि काम की जननी ऊर्जा का अंश देह में बचा ही नहीं। यहाँ से प्रथम सह यात्री विनोद प्रजापति दमोह को वापिस चले गये, श्रीवर्धन नेमा व रवि भाटिया जबलपुर।

तिलवारा घाट से भेड़ाघाट: 14 अक्टूबर 2018

14 तारीख़ को हम तिलवारा घाट से चलने को तैयार हुए तो पता चला कि पुल के किनारे से एक नाला गारद और कंपे से भरा होने के कारण रास्ता दलदली हो गया है लिहाज़ा एक किलोमीटर ऊपर से नए घूँसोर, लमहेंटा, चरगवा, धरती कछार से एक रोड शाहपुरा निकल गई है, वह राह पकड़ी। लम्हेंटा घाट पर शनि मंदिर से लगा ब्रह्म कुंड देखा। ऐसी मान्यता है कि जब कोई कोढ़ी मर जाता है तो उसके शव को ब्रह्मकुंड में सिरा देते हैं। वह सीधा पाताल लोक पहुँच जाता है।

उसके बाद आया बगरई गाँव। बगरई शिल्पकारों का गाँव है। वहाँ कारीगरों के 250-300 घर हैं। चारों तरफ़ संगमरमर पत्थर की खदानें हैं। दस हज़ार रुपयों में एक ट्राली पत्थर ख़रीद कर कटर, छेनी, वसूली और दांतेदार रगड़ से पत्थर को मूर्तियों की शक्ल में ढाल देते हैं। अधिकांश कारीगरों ने बैंकों से क़र्ज़ लिए थे वे सब ख़राब हो गए, उनका रिकार्ड बिगड़ने से उनको क़र्ज़ मिलना बंद हो गया। अब निजी माइक्रो फ़ाइनैन्स कम्पनी के कारिंदे उन्हें 24% वार्षिक ब्याज की दर से क़र्ज़ उनके घर पर देते हैं और घर से ही वसूली करते हैं। बगरई गाँव में एक बसोड के घर रुक कर पानी पिया। अरुण दनायक जी ने उनसे लम्बी बातचीत की, उनके फ़ोटो उतारे। आगे रामघाट की तरफ़ चल दिए। तब पता नहीं था कि हमें बिजना घाट तक का सफ़र तय करना होगा। रामघाट पर ढीमर जाल में मछली पकड़ते मिले।

नर्मदा का सच्चा सेवक “निषाद समाज” है। केवट, निषाद, धीवर, ढीमर, मल्लाह, मछुआरे, कहार, बरुआ, बरौआ, बर्मन इन उपनाम वाले मेहनती लोग देश की अधिकांश नदियों की मचलती लहरों पर सवार होकर लोगों को पार उतारने वाली जातियों के रूप में पहचाने जाते हैं। आदमी की तरह शब्द भी पैदा होते हैं, बड़े होते हैं, बूढ़े होते हैं और मर जाते हैं। इन शब्दों की जीवन यात्रा का एक विकास क्रम है। शब्द सरोकार से पैदा होते हैं, अपनी उपयोगिता सिद्ध करके संस्कृति के हिस्से बनकर चले जाते हैं। भारत में जातियाँ खेत या बगीचों की तरह व्यवस्थित रूप से उगाई फ़सल की तरह विकसित नहीं हुईं हैं। जातियाँ जंगल में विकसित पेड़-पौधों, घास-फूस, झाड़ी-झंखाड़ की तरह ज़रूरत के अनुसार उपजी और विकसित हुईं हैं। बर्मन कहलाने वाले ये लोग नर्मदा घाटी के मूल निवासी हैं। नर्मदा घाटी में बाहर से आए लोगों ने व्यापार वाणिज्य और प्रशासन के मेल मुलाक़ात से  एक तंत्र विकसित करके वाणिज्यिक गतिविधियों पर अधिकार कर लिया। ये बेचारे लघु सीमांत कृषक, मछली पालन और नाविक बनकर जहाँ के तहाँ हैं।

जबलपुर के ग्वारीघाट पर नर्मदा किनारे पहुँचते ही नाव से उस पार जाने के लिए काले स्याह बर्मन युवकों से सामना होता है। ये अर्धनग्न मेहनतकश नौजवान उछलते-कूदते नाव को घुमाते रहते हैं। उनकी बाहों, पुट्ठों, पीठ और पैर पर धूप में चमकती  मांसपेशी मछलिएँ उनके श्रमसाध्य जीवन की कहानी स्वमेव कह जाती हैं। यह समाज अमरकण्टक से भड़ौच तक नर्मदा के दोनों किनारों पर सेवा को मुस्तैद रहता है। ये लोग नर्मदा की सभी सहायक नदियों के किनारे भी जीवन के अनिवार्य हिस्से हैं।

तिलवारा घाट से परिक्रमा शुरू करने के बाद जब ख़ूब प्यास लगी तो पहला घर जिस पर दस्तक दी, वह बर्मन का था। छरछरे बदन की एक महिला ने नर्मदे हर कहने पर रुकने का इशारा किया, उनके  घर रुक गए। उन्होंने पहले ठंडा पानी फिर गरम चाय से परिक्रमावासियों को निहाल कर दिया। भोजन की ज़ुहार करने लगीं जिसे हमने विनम्रतापूर्वक मना कर दिया। उनका परिवार नर्मदा के कछार की ज़मीन पर तरबूज़-ख़रबूज़ सागभाजी उगाता था। तीन साल पहले जबलपुर के खटीकों ने गुंडई से ज़मीन हड़प ली। वहाँ फ़ार्महाउस बन रहा है। मालूम पड़ा कि ज़मीन सरकारी थी जिसे वे लोग सैकड़ों साल से जोत रहे थे। अब कोर्ट में केस लगा है जिसकी सुनवाई पर बर्मन परिवार ने जाना बंद कर दिया है। ज़ाहिर है कि फ़ार्महाउस की फ़सली ज़मीन पर रंगीनी रातों का सिलसिला शुरू होगा। बर्मन परिवार बेदख़ल कर दिया जाएगा।

सुविधा के लिहाज़ से हम इनका सम्बोधन निषाद समाज से करेंगे। जब से नदियों के किनारे मानव सभ्यता की शुरुआत हुई है तब से निषाद समाज का अस्तित्व रहा है। नाव बनाना, जाल बुनना, नदी पार कराना, नाव खेना, मछली पकड़ना, नदी कछार में खेती करना और डूबतों को तारना इत्यादि इनकी आजीविका के साधन रहे हैं।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

संस्थापक सम्पादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

निझवाच्या अलीकडे बस थांबवून अल नासरने आम्हाला एका ‘सूक’मधे नेले. ते कदाचित ‘डेट फॅक्टरी’ चे आऊटलेट असावे. त्या दुकानात किमान १५ ते २० प्रकारचे खजूर मोठमोठ्या काचेच्या बरण्यांमधे मांडून ठेवलेले होते. त्यापैकी कोणत्याही बरणीतून कितीही खजूर उचलून खायची मुभा होती (लोकलाज हा एकच अंकुश मनावर होता!) वेगवेगळ्या चवीचे खजूर चाखायला मजा आली. दालचिनी, आले, तीळ असे अनेक पदार्थ लावलेले खजूर होते. तीळ व पिस्ते घोटून केलेल्या एका ‘ताहिनी’ नावाच्या चटणीत बुडवून ते खायचे होते. तो अप्रतिम स्वाद अविस्मरणीय आहे. त्याच दुकानात वेगवेगळ्या स्वादाचे मधही चाखायला मिळाले. सुमाक, झातर, केशर, रोझ वॉटर असे निरनिराळे एसेन्स आणि मसालेही तिथे विकायला ठेवले होते.

मग आम्ही शेजारीच असलेल्या, ओमानी हलव्याच्या दुकानात शिरलो. इथला हलवा म्हणजे आपल्याकडे बॉंबे हलवा/कराची हलवा किंवा इतरही नावांनी प्रसिद्ध असलेला चिवट हलवा. खजूर, अक्रोड, बदाम, असे वेगवेगळे मेवे घालून बनवलेले, विशिष्ट चवींचे हलवे विकायला आणि चाखायलाही ठेवलेले होते. हलवेदेखील चाखून पाहायचा मोह झाला होता. पण खजूर बऱ्यापैकी ‘चापून’ झालेले असल्याने आणि अचानक कॅलरीज् चा हिशोब आठवू लागल्यामुळे हलव्याच्या दुकानातला मुक्काम आम्ही ‘सूक’मधल्या इतर दुकानात हलवला.

एका दुकानात संत्र्याचा व उसाचा ताजा रस समोरच काढून मिळत होता. वाटाड्या अल नासर म्हणाला, “तुम्हा भारतीयांना याचे काही अप्रूप नसणार! चला, पुढे जाऊ या!” पुढे एका दुकानात ‘लोबान’चे खडे विकायला ठेवले होते. लोबान म्हणजे एका विशिष्ट झाडाचा सुकवलेला चीक असतो, ज्याला आपण ऊद म्हणून ओळखतो. लोबान निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर तर केला जातोच, पण इथे खाद्यपदार्थांमधेही याचा वापर होतो. नंतर मस्कतमधल्या एका हॉटेलात आम्हाला ‘वेलकम ड्रिंक’ म्हणून लोबानचे पाणी प्यायला मिळाले!

त्याच ‘सूक’मधे भाजी व फळबाजारही होता. एक ओमानी रियाल २२० रुपयांइतका असतो. साहजिकच (रुपयांच्या हिशोबात) सर्व काही महाग असेल असे आम्हाला वाटले. चौकशा करून भारतातल्या भाजीपाल्यांच्या किंमतीशी तुलना केली गेली. पुष्कळशा भाज्यांचे दर भारतातल्या दरांच्या जवळपासचेच होते. तिथे अगडबंब कलिंगडे, पपया, डाळिंबे वगैरे विकायला होती. डाळिंबे तुरळकच दिसली, पण पुन्हा ‘मस्कती डाळिंबां’ची आठवण झाली आणि आम्ही चौकशी करायला गेलो. पण त्या डाळिंबाचे रूप फारसे आकर्षक वाटेना. एकाच ठिकाणी खूप मोठी आणि आकर्षक डाळिंबे दिसताच आम्ही अल नासरला विचारले, “हीच का ती सुप्रसिद्ध मस्कती डाळिंबे?” तर तो म्हणाला, “नाही नाही. इतकी छान आहेत म्हणजे ती इजिप्ती डाळिंबे असावीत. ” फळवाल्यानेही ती डाळिंबे इजिप्ती असल्याचे सांगितले. आम्ही कपाळाला हात लावत पुढे झालो.

आम्ही हिंदुस्थानी आहोत हे पाहून एक बांगलादेशी खजूरविक्रेता आमच्या प्रेमात पडला. त्याने आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात खजूर विकला आणि वजन करतानाही झुकते माप दिले. आम्ही खूष झालो. पण निघताना आमच्या लक्षात आले की त्या दुकानाचा खरा मालक एक वृद्ध ओमानी गृहस्थ होता. तो कुठेतरी गेलेला असताना त्याच्या नोकराने परस्पर ही ‘बंगाली जादू’ केली होती! जवळच एक म्हातारा ओमानी माणूस ओले खजूर विकायला बसला होता. आम्ही खरेदी केली नाही तरी त्याच्यासोबत फोटो काढून हवाय म्हटल्यावर तो खूश झाला.

‘सूक’मधे आमचा बराच वेळ गेला होता. अजून आम्हाला निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले पाहायचे होते. अल नासरने आठवण करून देताच आम्ही घाईघाईने बसमध्ये चढलो.

निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले आम्ही पाहिले, आणि त्यांचा इतिहासही ऐकला-वाचला. ते पाहून एकीकडे असे वाटले की, “यात काय आहे? यापेक्षा कितीतरी उंच, आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेले अनेक गड आमच्या महाराजांच्या राज्यात आहेत. ” पण ओमानमधल्या त्या दोन्ही किल्ल्यांची डागडुजी व रंगरंगोटी, आणि तिथली स्वच्छता पाहून मात्र वैषम्य जाणवले. आपल्या गडकोटांची होणारी दुर्दशा आठवली आणि ती दुर्दशा दूर करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किती तोकडे पडत आहेत हेही जाणवले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात, म्हणजे सतराव्या शतकात ओमानमध्ये बांधल्या गेलेल्या निझवा किल्ल्याची उंची आणि व्याप्ती आपल्या सिंहगड, रायगडाच्या जवळपासही नाही. परंतु, आणखी एक मोठा फरक आहे. या किल्ल्यांनी फारशी तुंबळ युद्धेही पाहिलेली नाहीत, आणि आपल्या देशावर झाली तितकी विध्वंसक आक्रमणेही ओमानवर कधी झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच हे किल्ले आजपर्यंत बऱ्यापैकी सुस्थितीत राहिले असावेत. बाहलाचा किल्ला आणखी जुना, म्हणजे बाराव्या शतकात बांधला गेलेला आहे. आज तो एक ‘युनेस्को हेरिटेज साईट’ म्हणून गणला जातो.

दोन्ही किल्ल्यांची रचना पुष्कळशी सारखीच आहे. आपल्या गडांना असतात तसेच भक्कम दरवाजे, त्या दरवाजांमध्ये ठोकलेले अणकुचीदार व जाडजूड लोखंडी खिळे, दरवाज्यातून शत्रू आत शिरलाच तर वरून उकळते तेल ओतण्याची योजना, बंदूकधारी सैनिकांसाठी बुरुजात केलेली भोके, किल्ल्याच्या एका कोपऱ्यात कैद्यांना ठेवण्यासाठी केलेली अंधारकोठडी, हे सर्व काही ओळखीचे होते. एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे तर दोन्ही किल्ल्यात एक-एक खजूराचे कोठार होते. त्यातल्या कट्टयांवर खजूर भरलेली पोती ठेवली जात असत. ते सैनिकांचे आणीबाणीकरता साठवलेले अन्न असे. त्या कट्टयांना थोडासा उतार केलेला होता. उतरंडीच्या टोकाखाली एक खळगा होता. खजूराच्या पोत्यातून वाहणारा रस त्या खळग्यात जमा होत असे. तो रस रोटीवर फासून खाल्ला जाई!

किल्ले पाहून झाल्यावर आम्ही जेवून पुढे निघेपर्यंत तीन वाजून गेले होते. आजचे शेवटचे ठिकाण म्हणजे ओमानचे राष्ट्रीय संग्रहालय होते. तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला साडेतीन-पावणेचार होतील आणि पाच वाजता संग्रहालय बंद होईल, असा इशारा अल नासरने दिला होता. या संग्रहालयाबद्दल मी आधी फारसे काही वाचले नव्हते. शिवाय, ओमानचा इतिहासही मला तितकासा चित्तवेधक वाटलेला नव्हता. त्यामुळे, “संग्रहालय काय, तासाभरात पाहून होईल. ” असा माझा कयास होता.

‘Oman Across Ages’ नावाचे ते संग्रहालय अतिशय भव्य, प्रेक्षणीय आणि माहितीपूर्ण होते. आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बनवलेले एकन्एक दालन पाहत राहावे असे होते. ते संग्रहालय मन लावून पाहायला मला एक पूर्ण दिवसभरही कमी पडला असता. सुंदर चित्रे, ध्वनिफिती आणि लेखांच्या माध्यमातून, आदिमानवाच्या काळापासूनचा ओमानी इतिहास तिथे साकारलेला होता. आश्चर्यकारक माहिती म्हणजे, हजारो वर्षांपूर्वी या प्रदेशात नद्या, वने आणि वन्यजीव अस्तित्वात होते. पर्यावरणात होत गेलेल्या बदलांमुळे, काही अपवाद वगळता आज इथे खडकाळ-डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नाही. संग्रहालयाच्या शेवटच्या दालनात सुलतान काबूसचा जीवनपट, आणि त्याने ओमानमध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल, यांचे प्रदर्शन होते. एकूणात, ‘चुकवू नये असे’ हे शब्द या संग्रहालयाच्या बाबतीत सार्थ ठरतील.

पाच वाजता संग्रहालय बंद व्हायची वेळ होती. पण आम्ही एकदा संग्रहालयात शिरलो म्हटल्यावर पाचच्या पुढेही काही काळ आम्ही पाहत राहू शकू असे आम्हाला वाटले होते. परंतु, ४. ५० पासूनच तिथल्या सुरक्षारक्षकांनी आमच्या कानाशी, “निघा निघा” अशी घाई सुरू केली. नाइलाजाने आम्ही बाहेर पडलो. पण बाहेरच्या कॉफी शॉपमध्ये मात्र बसायला परवानगी होती.

कॅफेतल्या नेपाळी मुलाने आम्हाला थांबायला सांगितले कारण कॉफी मशीनवरचा ‘डॅनी’ नावाचा भारतीय तरुण कुठेतरी गेलेला होता. ‘डॅनी’ परत आल्यावर उलगडा झाला की तो पुण्याचा ज्ञानेश पाटील होता! जेमतेम पंचविशीतल्या, अविवाहित ज्ञानेशने पुण्यात ‘वेस्टीन’ हॉटेल आणि इतरत्र कुठेतरी पूर्वी नोकरी केलेली होती. गेली चारपाच वर्षे तो इथे होता. प्रत्यक्षात तो कॉफीमशीन चालवणारा कर्मचारी नसून त्या कॅफेचा ऑपरेशन्स मॅनेजर होता. स्टाफ कमी असल्याने त्या दिवसापुरते तो हे काम पाहत होता. त्याच्याकडून आम्हाला बरीच मोलाची माहिती मिळाली.

ओमानमध्ये नोकरी मिळवून देणाऱ्या काही भारतीय एजन्सी आहेत. पण त्यांच्यातर्फे नोकरी मिळाल्यास पगाराचा घशघशीत हिस्सा एजन्सीला द्यावा लागतो. ज्ञानेश मात्र कोणाच्यातरी थेट ओळखीतून आल्यामुळे त्याला दरमहा ४०-४५ हजार रुपये वाचवता येत होते. शिवाय त्याला राहायला घर आणि येण्या-जाण्यासाठी मोटरकार विनामूल्य मिळालेली होती. ओमानमध्ये नोकरदारांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना कर भरावा लागतो. “कोणा भारतीय मुलांना इकडे येऊन नोकरी करण्यासाठी काही माहिती किंवा मदत हवी असल्यास तर मी नक्की देईन” असे आश्वासन ज्ञानेशने मला दिले.

दिवसभरात आम्हाला बरेच काही पाहायला मिळाले होते. पण संग्रहालयात वेळ कमी पडल्याची चुटपुट मात्र मनात राहिली. पुढचा दिवस मस्कत शहरासाठी राखीव होता. दिवसभरात काय काय पाहायचे-करायचे याची उजळणी करत ‘फ्रेझर स्युईट्स’ मधे परतलो…

– क्रमशः भाग २  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – १  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जायचे होतेच. ओमान देशामधे एक-दोन दशके नोकरी-व्यवसायानिमित्त राहिलेल्या काही व्यक्तींकडून त्या देशाबद्दल आम्हाला खूपच चांगले ऐकायला मिळाले होते. त्यामुळे तो देश पाहायची इच्छा झाली होती. पूर्वी फार काही ऐकले-वाचले नसले तरी मस्कती डाळिंबाचे नाव तेवढे लहानपणापासून ऐकून होतो.

माझ्या पत्नीचा धाकटा भाऊ गिरीश, त्याची पत्नी प्राची, मुलगी दीपशिखा, आणि मुलगा-सून म्हणजे देवाशीष-आकांक्षा, असे सर्वजण दिवाळीत ओमानच्याच सफरीवर जायचा बेत ठरवत होते. मग मी, माझी पत्नी सौ. स्वाती, आणि तिचे वडील (दादा) असे तिघे त्यांना सामील झालो.

देशा-परदेशातल्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्या-त्या प्रदेशाची जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. स्वातीला पर्यटनाची आवड असल्याने तीही अनेक पर्यटकांनी बनवलेले व्हिडिओ पाहत असते. ओमानमधल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती तिने काढली. ओमानचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांविषयी मी वाचून काढले.

अरबस्तानच्या आग्नेय टोकाला असलेला ओमान हा तसा एक लहान देश आहे. ओमानच्या ईशान्येकडे ओमानी आखात आणि आग्नेयेला अरबी समुद्र असल्याने त्याला लांबलचक किनारपट्टी लाभली आहे. परंतु किनाऱ्यापासून आत आले की सगळा प्रदेश डोंगराळ आणि वाळवंटी आहे. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे अनेक शतकांपासून भारत, चीन आणि आफ्रिकी देशांसोबत ओमानचे व्यापारी संबंध आहेत.

मुहम्मद पैगंबराच्या हयातीतच ओमानमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार-प्रसार झाला. सुरुवातीला ‘सुन्नी’ इस्लाम मानणारा हा देश सातव्या शतकापासून हळूहळू ‘इबादी’ इस्लामचा अनुयायी झाला. इबादी पंथाचे लोक काहीसे मवाळ असतात आणि ते कट्टरपंथी सुन्नींपेक्षा अधिक सहिष्णु आहेत. इस्लामच्या मूळ शिकवणीशी सर्वाधिक साम्य त्यांच्या पंथाचे आहे असे ते मानतात. गेल्या काही शतकांत भारत, पाकिस्तान, व बांगलादेशातून येऊन ओमानमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी लोकांमुळे इथल्या लोकसंख्येत लक्षणीय बदल झाला आहे. आता इथे सुमारे ४५% इबादी, ४५% सुन्नी आणि उरलेले इतरधर्मीय लोक आहेत.

आमच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. इथले बहुसंख्य धनिक व्यापारी आणि राज्यकर्ते मूळ ओमानी वंशाचे आहेत. परंतु लहान-सहान दुकानदार, हॉटेलांमधले वेटर, पेट्रोल पंपावरचे कर्मचारी, बांधकाम किंवा सुतारकाम करणारे कामगार हे सगळे बाहेरच्या देशातून इथे पोटापाण्यासाठी आलेले आहेत. त्यातले बहुसंख्य लोक भारतीयच आहेत. त्यामुळे, आम्ही जाऊ तिथे खुशाल हिंदीतच संवाद सुरू करायचो आणि समोरून हिंदीतच प्रत्युत्तर येई. आम्हाला इथल्या हॉटेल-रिसॉर्टमध्ये मुख्यत्वे केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील तरुण-तरुणी भेटले.

ओमानच्या राष्ट्रीय संग्रहालयात भेटलेला पुण्याचा ज्ञानेश, सूरच्या हॉटेलातले कोलकात्याचे शॉप्तर्षी चॉक्रोबोर्ती किंवा शौमिता, आणि वहिबा वाळवंटातल्या रिसॉर्टमधली नाशिकचे ईशा, हर्षवर्धन, कुणाल वगैरे मुला-मुलींशी झालेल्या गप्पांवर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

ओमानला आम्ही आमच्या कौटुंबिक सफरीवर निघालो होतो. यात्रा कंपनीसोबत जात नसल्याने सर्व नियोजन आम्हालाच करायचे होते. हॉटेल बुकिंग, प्रेक्षणीय ठिकाणे, तिथे जाण्यासाठी वाहनव्यवस्था, जेवणखाण अशा सर्व बाबींवर आमचा विचारविनिमय झाला होता. विमानतिकिटे आपली आपण काढायची आणि इतर सर्व खर्च सामायिकपणे करायचे हेच आमच्या सगळ्या कौटुंबिक सफरींचे सूत्र असते. त्यानुसार आम्ही मुंबई-मस्कत-मुंबई तिकिटे तीन महिने आधीच काढली होती. पण व्हिसा काढण्यापासून पुढचे सर्व काही आमचा भाचा देवाशीष आणि त्याची पत्नी आकांक्षानेच समर्थपणे पार पाडले.

मुंबईहून अडीच तासांचा विमानप्रवास करून आम्ही स्थानिक वेळेनुसार दुपारी १-१. ३० च्या सुमारास मस्कतला पोचलो. बोशर या मस्कतच्या उपनगरात ‘फ्रेझर स्युईट्स’ नावाच्या एका ‘अपार्ट-हॉटेल’मध्ये आमचे बुकिंग होते. ‘अपार्ट-हॉटेल’ म्हणजे हॉटेलवजा अपार्टमेंट किंवा अपार्टमेंटवजा हॉटेल! अलीकडच्या काळात खूपच लोकप्रिय होऊ लागलेली ही एक छान संकल्पना आहे. यात एकाच ग्रुपमधल्या ४-६-८ लोकांना एकत्र राहायचे असल्यास एक २-३-४ बीएचके अपार्टमेंट मिळू शकते. हॉटेलात मिळणाऱ्या सोयी, म्हणजे रूम सर्व्हिस, कॉंप्लिमेटरी नाश्ता वगैरे सर्व सोयी इथेही असतात.

‘फ्रेझर स्युईट्स’ च्या समोरच एक पांढरीशुभ्र संगमरवरी मशीद होती. विमानतळावरून आम्हाला घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरने पुरवलेल्या माहितीनुसार तिचे नाव ‘मोहम्मद अल अमीन मशीद’ असे होते. ओमानमधल्या ‘बाहवान इंटरनॅशनल’ या सुप्रसिद्ध बिझनेस ग्रुपने ती मशीद बांधलेली असल्याने तिला बाहवान मशीदही म्हटले जाते. ड्रायव्हरने असेही सांगितले की त्या मशिदीच्या घुमटांवर सुंदर नक्शी असून त्या नक्शीला सोनेरी पार्श्वभूमी आहे. शिवाय त्या मशिदीवरचे दिवे लावल्यानंतर तिच्यावर एक हलकी निळसर झाकही दिसते. त्या माहितीचा प्रत्यय मात्र मला दुसऱ्या दिवशी पहाटे आला आणि ते सुंदर दृश्य मी मोबाईलमध्ये कैद करून घेतले.

अपार्टमेंटमध्ये सामान ठेवून आम्ही लगेच मस्कतच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. एका क्रूझवर आमचे बुकिंग केलेले होते. त्या दुमजली बोटीत आमच्यासह देशोदेशीचे एकूण २०-२५ पर्यटक होते. खानपानाची रेलचेल होती. समुद्रकिनाऱ्यालगत प्रवास सुरू असताना एक माणूस आम्हाला माहिती पुरवत होता. मस्कतमधल्या इमारती, किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज, नांगरून ठेवलेली ओमानच्या सुलतानाची मोठी विशेष बोट, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहत होतो. एका इमारतीकडे इशारा करत गाईडने आम्हाला सांगितले की ते मस्कतमधले सर्वात आरामदायी आणि सर्वाधिक महागडे हॉटेल होते. रिट्झ-कार्लटन कंपनीच्या त्या ‘अल-बुस्तान पॅलेस हॉटेल’ मधल्या आणि जवळच असलेल्या ‘शांग्री ला’ नावाच्या आणखी एका लक्झरी हॉटेलमधल्या सर्व खोल्या काही महिन्यांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी श्री. मुकेश अंबानी यांनी बुक केल्या होत्या म्हणे! 

खऱ्या-खोट्याची शहानिशा मात्र आम्हाला करता आली नाही.

अल बुस्तान पॅलेस हॉटेलजवळच्याच एका इमारतीबद्दल आमचा गाईड म्हणाला की तो सुलतानाचा जुना राजवाडा आहे. सुलतान आता तिथे राहत नाही परंतु ओमानला भेट देणारे सर्व देशांचे राष्ट्रपती-पंतप्रधान त्या राजवाड्यातच राहतात. त्या राजवाड्याबद्दल त्याने दिलेली अधिक माहिती अतिशय रोचक होती. जर सुलतान निपुत्रिक असेल किंवा त्याच्या पश्चात राजगादीसाठी दोघा-तिघा वारसांमध्ये चुरस होण्याची शक्यता असेल तर सुलतान मृत्यूपत्रात आपली इच्छा लिहून ठेवतो. ते पत्र एका लिफाफ्यात बंद करून जुन्या राजवाड्यात ठेवले जाते. सुलतानाच्या मृत्यूनंतर तो लिफाफा उघडला जातो आणि दिवंगत सुलतानाने नेमलेला उत्तराधिकारी गादीवर बसतो. १९७० पासून ओमानवर राज्य करणारा सुलतान, काबूस बिन सैद अल सैद, हा जानेवारी २०२० मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे सध्याचा सुलतान हैथम अल तारिक बिन सैद याला त्याच पद्धतीने निवडले गेले.

दिवंगत सुलतान काबूस याने आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत ओमान देशासाठी पुष्कळ काही केले. या देशाची प्रगती कशी होत गेली असेल याची झलक आम्हाला हळूहळू दिसू लागली होती. पण त्याबद्दल विस्तृत माहिती अजून मिळायची होती. दुसर्‍या दिवशी ‘Oman across the Ages’ नावाचे संग्रहालय पाहताना ती मिळाली.

ओमानमधल्या ऐतिहासिक किल्ल्यांचा आणि राष्ट्रीय संग्रहालयाचा दौरा करायला आम्ही दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर बाहेर पडलो.

यात्रा कंपनीसोबत जाणाऱ्यांना, यात्रा संयोजकांकडून मिळणाऱ्या “उद्या ६-७-८” किंवा “उद्या ७-८-९” अशा सूचनांची सवय असेल. “उद्या ६-७-८” या संक्षिप्त सूचनेचा अर्थ असा असतो की “बेड टी सहा वाजता मिळेल, नाश्ता सात वाजता खायचाय, आणि बस आठ वाजता निघेल”! 

यातली अखेरची वेळ सर्वात महत्त्वाची असते. तिचे पालन न करणाऱ्यांची, संयोजकांकडून सौम्य शब्दात, आणि सहप्रवाशांकडून तिखट शब्दात, किंवा बोलके हातवारे आणि नेत्रपल्लवीद्वारे ‘पूजा’ होते हेही अनेकांना माहीत असावे! 

पण आमची कौटुंबिक सहल असल्याने हे सगळे आम्हाला लागूच नव्हते! कारण आमच्यातले ‘लेट लतीफ’ निवांतच होते आणि इतरांच्या सौम्य कोपरखळ्यांचाही आनंद लुटत होते! परंतु, सगळे वेळापत्रक आमच्याच हातात असल्याने आम्ही फारशी फिकीर करत नव्हतो. या निमित्ताने यात्रा कंपनीच्या संयोजकांना त्यांच्या संयमासाठी मनोमन सलाम मात्र करावासा वाटला!

आमच्यासोबत ‘अल-नासर’ नावाचा एक जेमतेम तिशीचा तरुण, स्थानिक वाटाड्या म्हणून आला होता. आमची मिनीबस मस्कतहून निझवाच्या दिशेने निघाली. खिडकीतून मस्कत दिसत होते. इथल्या जवळपास सर्वच इमारती उदी रंगाच्या किंवा पांढऱ्याशुभ्र आहेत. शहरी भागात बहुमजली इमारती आहेत, परंतु इतरत्र बहुतांशी बैठी अथवा दुमजली घरेच दिसतात. काही घरांच्या आवारात तुरळक फुलझाडे दिसली. पण मोठ्या हमरस्त्यावर आल्यानंतर मात्र दुतर्फा खडकाळ, डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नव्हते. एक वैशिष्ट्य मात्र सगळीकडे जाणवले, की गावातले रस्ते आणि मुख्य हमरस्ते हे सगळे इतके छान, मखमली होते की पोटातले पाणीही हलले नाही!

अल-नासर म्हणाला होता, “वाटेत तुम्हाला मी

‘डेट फॅक्टरी’ दाखवणार आहे. ” निझवाच्या अलीकडे एका ‘सूक’ जवळ आमची मिनीबस थांबली. अरबी भाषेत बाजाराला ‘सूक’ म्हणतात. उत्साहात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांना हा शब्द ऐकून निश्चितच सुख होईल!

डेट, म्हणजेच खजूर हे फळ म्हणजे वाळवंटातल्या लोकांसाठी हापूस आंब्याहूनही श्रेष्ठ! या प्रदेशात कॉफी प्यायची प्रथा आपल्याकडच्या चहापानासारखीच आणि तितकीच जुनी आहे. वेलची घातलेल्या काळ्या कॉफीच्या घुटक्यांसोबत खजूराचा आस्वाद इथे सर्रास घेतला जातो.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग – ३२ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग- ३२ ☆ श्री सुरेश पटवा ?

अनवरत परम्परा  

नर्मदा परिक्रमा के विषय में प्रसिद्ध साहित्यकार अमृतलाल बेगड़ ने अपने अनुभव साझा किए हैं। जेडीए अध्यक्ष डॉ. विनोद मिश्रा ने भी अपनी पुस्तक में नर्मदा परिक्रमा के अद्भुत अनुभवों को साझा किया है। रमनगरा निवासी वयोवृद्ध ज्योतिषाचार्य पं.मोतीराम शास्त्री की रचना पय: पानम् को राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त हो चुका है। मनीषियों ने लिखा है कि नर्मदा का स्वरूप आल्हादित करने वाला है। नर्मदा के कल-कल निनाद में शिवत्व का बोध होता है। नर्मदा की उछलती लहरों का नृत्य अंत:पुर के दरवाजों को खोल देता है। इसका आध्यात्मिक सुख अवर्णनीय है। वहीं भू-जल विद विनोद दुबे का कहना है कि नर्मदा जल में वैक्टीरिया को खत्म करने की अद्भुत शक्ति है। नर्मदा घाटी में युगीन सभ्यता बिखरी पड़ी है। लोगों की इस पर नजर पड़े, वे इसके महत्व को समझें। संभवत: इसलिए ही नर्मदा परिक्रमा की परम्परा प्रारंभ हुई होगी। पाषाण में तब्दील हो चुके नर्मदा के किनारे पेड़-पौधों व पत्थरों के अलावा नर्मदा घाटी के रहस्यों पर आज भी अनेक शोध चल रहे हैं। तीन बार नर्मदा परिक्रमा कर चुके रामदास अवधूत का मानना है कि आज भी कई अदृश्य शक्तियां और देवता नर्मदा की परिक्रमा करते रहते हैं। नर्मदा की परिक्रमा उद्गम स्थल अमरकंटक से या फिर ओंकारेश्वर से प्रारंभ की जाती है, जो पैदल तीन साल, तीन माह और तेरह दिन में (दोनों तट) पूर्ण होती है। वाहनों पर लोग इसे 108 दिन में भी पूरा कर लेते हैं। परिक्रमा प्रारंभ करने से पहले श्रद्धालु इसका संकल्प लेते हैं और फिर पूजन के बाद मां नर्मदा को एक कड़ाही प्रसाद भेंट करते हैं। कड़ाही प्रसाद से ही कन्याओं और सुपात्र ब्राम्हणों को भोजन कराया जाता है।

हमारी पहली परिक्रमा रामलला के आशीर्वाद और शनि महाराज के दर्शन से शुरू हुई। पुराने साथी मित्र और पड़ौसी श्री एल पी दुबे जी ने पुष्पमालाओं और मिठाई से परिक्रमा वासियों को विदाई दी। उनका प्रेममय व्यवहार आज की पूरी यात्रा मे परिक्रमा वासियों के बीच चर्चित रहा। अरुण श्रीवास्तव, आर.व्ही. अग्रवाल, एल.एन. अग्रवाल, अनिल मिश्रा, के.एल, सोनीजी आदि भी ग्वारी घाट मिलने और सद्भावना व्यक्त करने आये। अमृत लाल बेगड की धर्मपत्नी श्रीमती कांता बेगड के ममतामयी सानिध्य से परिक्रमा की शुरुआत हुई। उन्होंने सर्वाधिक मान बढ़ाया, जब हम और अरुण दनायक उनसे आशीर्वाद  लेने  पहुँचे तब उन्होंने छोटी-छोटी अनेक बातें नर्मदा यात्रा को लेकर बताई। श्री टी. पी. चौधरी दम्पत्ति ने तिलवारा घाट पर पहुँच कर अत्यंत प्रेमपूर्वक परिक्रमा वासियों का उत्साहवर्धन किया। उन्होंने सपत्नीक फूल मालाओं से परिक्रमा वासियों का स्वागत किया। फल नारियल भेंट किए। स्नेही जनों का प्रेम इस यात्रा मे मिलना अपने आप मे आह्लादकारक रहा। हमारे मित्र श्रीवर्धन नेमा जी स्टेट बैंक अधिकारी संघ के उप-महासचिव हैं। उन्होंने अत्यंत विनम्रतापूर्वक जबलपुर में रहवास भोजन की व्यवस्था कराई और ग्वारीघाट से तिलवारा घाट तक परिक्रमा यात्रा में साथ चले। उनके विनम्र स्वभाव से हमारा मन अभिभूत हो गया।

नर्मदा परिक्रमा:पहला चरण

ग्वारी घाट से झाँसी घाट

पहली यात्रा 13 अक्टूबर 2018 को ग्वारी घाट से प्रारम्भ हुई। हमारे दल में एक रिटायर्ड सैनिक कोलिता थे। वे अपनी उम्र 100 से ऊपर बताते थे, परंतु लगते नहीं थे। बुज़ुर्ग लोगों को अक्सर अपनी उम्र बढ़ाकर बताने की आदत हो जाती है। फिर भी वे 80-90 के बीच के तो थे। उनके दाहिने पैर में गोली लगी थी। उनका बैग सबसे भारी था। चैन भी ख़राब हो गई तो सेफ़्टी पिन लगाकर बैग पीछे डंडे में फँसाकर थोड़ा लँगड़ा कर चलते थे। फिर भी कई बार सबसे आगे निकल जाते थे। उनकी याददाश्त कमज़ोर हो गई है। अक्सर भूल जाते थे। हर बार पूछते थे कि अब होशंगाबाद आएगा। चलते-चलते जब लोग चिड़चिड़े हो जाते तो भुनभुनाने लगते। जगमोहन अग्रवाल कई ट्रैकिंग अभियान में जा चुके हैं। वे कोलिता जी को साथ लाए थे। दनायक जी ने अग्रवाल जी से कहा कि यार अगली बार इनको मत लाना। कहीं भी आगे निकल जाते हैं, भूल जाते हैं। अग्रवाल जी ने कोलिता जी को झिड़की पिलाई कि बीच में चला करो। जब थकान उतरती तो सब सामान्य हो जाते थे। लेकिन तब से कोलिता जी मेरे के पीछे चलने लगे। कोलिता जी सेना की ट्रेनिंग के हिसाब से क़दम गिन कर किलोमीटर का हिसाब लगाने में माहिर हैं। उनका अन्दाज़ कभी ग़लत नहीं हुआ। एक बार मैंने उनको जानबूझकर बातों में लगा लेने के बाद तय दूरी किलोमीटर में पूछी तो उन्होंने कहा कि क़दम गिनना भूल गए। अन्दाज़ से दूरी बताई वह वास्तविक दूरी के आसपास थी। एक बात है यदि क़दम गिनते रहो तो थकान का अहसास नहीं होता।

एक जगह भूख पर चर्चा चल पड़ी। सृष्टि का आधार भूख है। ऋग्वेद में ऋचाओं के सूत्र हैं कि कहीं कुछ नहीं था, अंतरिक्ष भी नहीं, ब्रह्माण्ड भी नहीं। सब कुछ शून्य था। एक शून्य हिरण्य गर्भ कहा गया है। दूसरा ब्रह्म अस्तित्व शिव तत्व। बिग बेंग सिद्धांत से हॉकिंग ने इसी की पुष्टि की है। गैसों का एक महावलय पूरी तीव्रता से गोलाकार घूमने लगा। उसकी गहराई में सृष्टि का अंड जन्मा। शिव के बीज तत्व ने पूरी तीव्रता से उसके अंदर प्रवेश किया तब वह अंड प्रस्फुटित हुआ और ब्रह्माण्ड अस्तित्व में आया, अंतरिक्ष में ऐसे कई ब्रह्माण्ड हैं। हम सब सृजन करने के लिए उसी प्रक्रिया को दोहराते हैं। अंड की फूटने की भूख और शिवतत्व की सघन ऊर्जा की सृजन भूख से जगत निर्माण हुआ है। ब्रह्म का अंड से मिलन हुआ ब्रह्माण्ड। सृष्टि का यह विधान हम सब अनिवार्यत: पूरा करने को प्रकृति के वशीभूत हैं। परिक्रमा यात्रा में सुबह से भूखे पेट आठ-दस किलोमीटर चलने के बाद भी भूख का अहसास न होना चमत्कारी तो है ही, वैज्ञानिक भी है। सूर्य ऋग्वेद का देवता है। ब्रह्माण्ड में ऊर्जा का सबसे बड़ा श्रोत सूर्य है। जिसमें अणुओं के खंडन-विखंडन की सतत प्रक्रिया चल रही है। वह बिना कुछ खाए ऊर्जा पैदा कर रहा है। परिक्रमा यात्री जब लगातार चलता है तब उसकी देह सूर्य के समान सतत ऊर्जा पैदा करने लगती है। सूर्य जैसा हो जाना ही सूर्योंपासना है। यात्री की अस्थियाँ, मांसपेशियाँ, स्नायुतंत्र और ग्रंथियाँ ऊर्जा का सघन वलय बनकर शरीर में शक्ति पैदा करतीं हैं। विजातीय पदार्थ द्रव्य बनकर पसीने के साथ देह से बाहर होता जाता है। मनुष्य की भूख के कई स्तर हैं। पेट की भूख, शरीर की भूख, मन की भूख, मस्तिष्क की भूख और आत्मा की भूख। पेट की भूख पूरी होते ही शरीर की भूख जागती है। शरीर की भूख पूरी होने पर मन की भूख जागती है। अंत में आत्मा की भूख अन्तरात्मा को जानने की जागती है। भूखों का नियोजन ही मानव जीवन है। इसी भूख के नियोजन में छुपे हैं पाप-पुण्य, नैतिकता-अनैतिकता और सदाचार-भ्रष्टाचार के मूल्य। देह की भूख भोजन की भूखी है, मस्तिष्क की भूख प्रशंसा माँगती है। मन की भूख रंजन की और आत्मा की भूख समर्पित आस्था की दरकार है। भूख से आध्यात्म का यह अर्थगहन नर्मदा यात्रा की अद्भुत उपलब्धि है।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

संस्थापक सम्पादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ अनन्त की गोद में: देवभूमि की एक यात्रा ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

🌿 यात्रा संस्मरण –  अनन्त की गोद में: देवभूमि की एक यात्रा 🌿

कुछ यात्राएँ हमें स्थानों तक ले जाती हैं… और कुछ ऐसी होती हैं जो हमें भीतर की ओर ले चलती हैं। उत्तराखण्ड की पावन धरती—देवभूमि—की मेरी यह यात्रा निस्सन्देह मुझे अध्यात्म की गहराई में लेकर गई।

लगभग डेढ़ महीने तक, जीवन ने पहाड़ों, हिमनदों और नदियों की लय पकड़ ली। घुमावदार पहाड़ी रास्ते कभी-कभी धैर्य की परीक्षा लेते, पर हर मोड़ पर प्रकृति अपना नया रूप दिखाती—बर्फ से ढकी चोटियाँ मौन वैभव में खड़ी, और साथ बहती पवित्र नदी जैसे सदा साथ निभाने वाली सहचरी।

मन बार-बार पूछता रहा—इस भूमि में इतने मंदिर, कथाएँ और आस्थाएँ कैसे समायी हैं? शायद इसका उत्तर ग्रन्थों में नहीं, इस भूमि की हवा में है—जहाँ हर श्वास स्वयं एक प्रार्थना बन जाती है।

🌊 ऋषिकेश: जहाँ मौन बोलता है

हिमालय की तराई में बसा ऋषिकेश, पावन गंगा के तट पर, हमें अपने शांत आलिंगन में ले लेता है।

मेरी पत्नी राधिका, परमार्थ निकेतन आश्रम में, एक गहन योग-प्रशिक्षण में प्रतिभागी थीं—उनका दिन भोर से आरम्भ होकर देर रात्रि में समाप्त होता। और मुझे मिला एक दुर्लभ वरदान—कुछ न करने का मधुर सुख।

सुबह मैं गंगा के किनारे बैठता, जल की लहरों को प्रथम किरणों में झिलमिलाते देखता। वहाँ, उस निःशब्दता में, विचार धीरे-धीरे शांत हो जाते और समय जैसे थम सा जाता। ध्यान स्वयं ही घटित होने लगा।

रविवार की एक सहज पदयात्रा हमें भूतनाथ मंदिर तक ले गई, जहाँ से गंगा और ऋषिकेश का दृश्य किसी स्वप्न सा प्रतीत हुआ—मानो नदी धरती और आकाश को एक सूत्र में पिरो रही हो।

🕉️ हिमालय का आह्वान

योग-प्रशिक्षण पूर्ण होते ही, मन हमें और भीतर—हिमालय की गोद में बसे उन पवित्र स्थलों की ओर खींच ले गया, जिन्हें देखने की चाह वर्षों से थी। पंच प्रयाग, जहाँ नदियाँ मिलकर एक हो जाती हैं, हमें बुला रहे थे।

🔱 गुप्तकाशी और उखीमठ: प्रार्थनाएँ सबके लिए

गुप्तकाशी में प्राचीन विश्वनाथ मंदिर, काशी की स्मृति जगाता है, और अर्धनारीश्वर मंदिर शिव और शक्ति के दिव्य संतुलन का प्रतीक है।

यहाँ हमने प्रार्थनाएँ कीं—अपने लिए, अपने परिवार और मित्रों के लिए, और उन पूर्वजों के लिए जो अब हमारे बीच नहीं हैं। ऐसा लगा मानो समय की सीमाएँ मिट गई हों और अतीत व वर्तमान एक ही क्षण में समा गए हों।

उखीमठ में ओंकारेश्वर मंदिर की संध्या आरती अत्यन्त भावपूर्ण थी। दीपों की ज्योति जब संध्या आकाश से मिलती, तो ऐसा लगता मानो दिव्यता साक्षात् उपस्थित हो।

💍 त्रियुगीनारायण: जहाँ प्रेम शाश्वत हुआ

त्रियुगीनारायण, वह पावन स्थल जहाँ मान्यता है कि भगवान शिव और माता पार्वती का विवाह हुआ था।

वहाँ आज भी होते विवाहों को देखना अद्भुत था—मानो समय ठहर गया हो और हर युगल उस दिव्य मिलन का आशीर्वाद पा रहा हो।

🏔️ चोपता से जोशीमठ: शिखरों और सरलता के बीच

आगे बढ़ते हुए चोपता के हरे-भरे मैदान, दूर चमकते हिमनदों के साथ, किसी स्वप्न से कम नहीं लगे।

जोशीमठ में नृसिंह मंदिर का वातावरण अत्यन्त शांत था। परन्तु सबसे मनमोहक दृश्य था—मंदिर प्रांगण में छोटे बच्चों का उत्साहपूर्वक क्रिकेट खेलना। कोई रोकटोक नहीं। बच्चों को निर्भीक होकर खेलने का अवसर मिलना ही चाहिए।

उस क्षण, पवित्रता और सहजता का सुंदर संगम देखने को मिला।

🌳 ज्योतिर्मठ: समय से संवाद

आदि शंकराचार्य द्वारा स्थापित ज्योतिर्मठ, मानो समय की सीमाओं से परे है।

वहाँ स्थित प्राचीन कल्पवृक्ष के नीचे बैठकर ध्यान करना एक अद्भुत अनुभव था। समीप की गुफा ने हमें भीतर की यात्रा पर आमंत्रित किया।

कुछ स्थान ऐसे होते हैं जहाँ मौन रिक्त नहीं होता—वह पूर्ण होता है। यह उन्हीं में से एक था।

🌊 पवित्र संगम: जहाँ नदियाँ एक हो जाती हैं

हर प्रयाग एक पावन कथा सा प्रतीत हुआ—

विष्णुप्रयाग में धौली गंगा और अलकनंदा का आलिंगन,

नन्दप्रयाग में नन्द बाबा और कृष्ण की स्मृतियाँ,

कर्णप्रयाग में महाभारत के कर्ण की तपस्या की छाया,

रुद्रप्रयाग में जल को स्पर्श कर आरती करने का अप्रत्याशित सौभाग्य।

हमारे कक्ष से नीचे दिखता संगम, एक जीवंत चित्र सा प्रतीत होता था।

धारी देवी मंदिर में भोर का पहला दर्शन और आरती—अत्यन्त दिव्य और आत्मीय अनुभव।

🌺 देवप्रयाग: अलकनंदा और भागीरथी का संगम

देवप्रयाग में, जहाँ भागीरथी और अलकनंदा मिलकर गंगा का स्वरूप लेती हैं—वहाँ पहुँचकर मन स्वतः ही मौन हो गया।

दो नदियों का यह मिलन, जीवन का एक गहरा रूपक प्रतीत हुआ—दो यात्राएँ, जो मिलकर एक ऐसी धारा बनती हैं जो असंख्य जीवनों का आधार बनती है।

नेत्र अनायास ही नम हो उठे—यह भाव केवल अनुभव किया जा सकता है।

🌺 सुरकण्डा देवी और लाखामण्डल: आस्था की अनुगूँज

सुरकण्डा देवी मंदिर की चढ़ाई और मार्ग में दिखते हिमालय के दृश्य मन को मंत्रमुग्ध कर देते हैं। राधिका की यह वर्षों पुरानी इच्छा थी, और वहाँ पहुँचकर जो दिव्य अनुभूति हुई, वह शब्दों से परे है।

लाखामण्डल मंदिर में संध्या आरती के समय गाँव के बच्चों की उल्लासपूर्ण सहभागिता ने मन मोह लिया। पास ही बहती यमुना के किनारे उनका क्रीड़ांगन और खेल के प्रति जोश, एक सजीव उत्सव सा प्रतीत हुआ।

🌄 यात्रा जो अभी शेष है

लौटते समय हमारे पास कोई भौतिक स्मृति नहीं थी—केवल एक गहन तृप्ति थी। यह अनुभव कि जीवन स्वयं एक तीर्थयात्रा है।

अब भी एक पुकार शेष है—भागीरथी के साथ चलने की, पंच केदार और पंच बद्री की यात्रा करने की।

ईश्वर हमें सामर्थ्य दे कि हम इन आकांक्षाओं को पूर्ण कर सकें।

तब तक, हिमालय हमारे भीतर ही बसा रहेगा।✨

#देवभूमि #उत्तराखण्ड #आध्यात्मिकयात्रा #हिमालय #गंगा #प्रकृतिप्रेम #आत्मअनुभूति #योगऔरध्यान #भारत_की_आत्मा

© श्री जगत सिंह बिष्ट

साधक

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares