मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

*एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*… “

आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला,

मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं… मग ते घरचं असो नाहीतर दारचं…

*बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात… *

75 वर्षाच्या म्हातारीने पण *भाजी तरी चिरुन द्यावी* अशी घरातल्यांची अपेक्षा असते…

हि सत्य परिस्थिती आहे…

*आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत* हे रहाणारच…

त्यामुळे *हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो*… ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच *आपल्या सत्तरीतही* करावा लागणार…

” *मी म्हातारी झाल्यावर, माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील” *हि *खोटी स्वप्न आहेत*…

मुलं, मुली कितीही श्रीमंत झाले तरी..

” *आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव*.. “

असं म्हटलं कि *झालं*…

*पुन्हा सगळं चक्र चालु*..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी… ,

 

पण.. पण.. जर हे असंच रहाणार असेल..

*जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का*??

तर नाही…

*परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं. *…

 

मी हे स्वीकारलंय… *खुप अंतरंगातून* आणि आनंदाने…

 

*माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते*… खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली…

 

*सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं* तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते *आणि रात्री दहा वाजता* ही…

आदल्या दिवशी *कितीही कष्ट झालेले असु देत*… दुसरा दिवस हा *नवाच* असतो…

 

*काहीच नाही लागत* हो…

हे सगळं करायला…

*रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा*…

छान आपल्या *छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा* घ्या.. आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा…

*आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या*..

इतकं भारी वाटतं ना…

अहाहा…

सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…

*अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून* ब्रश केला… ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त… आल्याचा चहा पित… *खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना* 

*कि भारी वाटतंं*…

 

*रोज मस्त तयार व्हा*…

आलटुन पालटुन स्वतःवर *वेगवेगळे प्रयोग करत* रहा…

कधी हे कानातले.. कधी ते गळ्यातले…

कधी ड्रेस… *कधी साडी*…

कधी केस मोकळे… *कधी बांधलेले*…

*कधी हि* टिकली तर कधी ती…

*सगळं ट्राय करत रहा… नवं नवं नवं नवं*…

रोज नवं…

*रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे*…

 

स्वतःला बदललं कि… आजुबाजुला *आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल*… तुमच्याही नकळत…

आणि *तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या* वाटु लागाल…

 

मी *तर याच्याही पार पुढची पायरी* गाठलेली आहे…

*माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात*… काय माहित काय झालंय त्या कानांना…

 

*आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी* असते…

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…

 

*जे जसं आहे… ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते*…

कुणी आलाच समोर कि.. ” *आलास का बाबा*.. बरं झालं.. म्हणायचं… *पुढे चालायचं*…

अजगरा सारखी… *सगळी परिस्थिती* गिळंकृत करायची…

 

*माहीत आहे मला*…

*सोपं नाहीये*…

 

*पण मी तर स्विकारले आहे*…

*आणि एकदम खुश आहे*…

आणि म्हणुनच रोज म्हणते…

 

” *एकाच या जन्मी जणु*…

*फिरुनी नवी जन्मेन मी*…

*हरवेन मी हरपेन मी*..

*तरीही मला लाभेन मी*… “

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जेव्हा स्वयंपाकघर शांत झालं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जेव्हा स्वयंपाकघर शांत झालं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★ 

 – अमेरिकेची खरी कहाणी.

 कधी विचार केला आहे का…

की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचं भविष्य बदलू शकतं?

 

अमेरिकेत तसं घडलं.

1970 च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुलं, आजी-आजोबा एकत्र राहायचे. संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे. घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते.

 

पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदललं.

फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला. आई-वडील कामात व्यस्त झाले, मुलं पिझ्झा-बर्गरमध्ये रमली, आणि आजोबांचा आवाज कमी झाला.

 

त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –

“जर तुमच्या घरातील जेवणाचं नियंत्रण कंपन्यांकडे गेलं, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली, तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील. ”

 

लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 

खरंच तसंच झालं.

1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबं “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुलं एकत्र. आज ती संख्या फक्त 20% आहे.

 

उरलेलं काय? – वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटं जगणारे तरुण, तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुलं. घटस्फोटाचं प्रमाण पहिल्या लग्नात 50%, दुसऱ्यात 67% आणि तिसऱ्यात तब्बल 74%!

 

अमेरिकेतील हा अपघात नाही. ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची!!

 

कारण घरचं जेवण हे फक्त अन्न नाही.

ते ऊब आहे.

ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.

ते दादांच्या गप्पा आहेत.

ते आजीच्या गोष्टी आहेत.

ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे.

 

पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येतं, आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनतं.

 

याचं दुसरं भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य!

फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या”वर नफा कमावतो.

 

 पण अजून वेळ गेलेली नाही.

स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवं.

 

जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय.

जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत.

भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.

 

 *अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!! *

आज भारतातही बाहेरचं खाणं, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन — सगळं तसंच सुरू आहे.

उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून…

 

चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा. कुटुंबाला टेबलावर आणा; कारण शयनकक्ष घर देतो, पण स्वयंपाकघर कुटुंब घडवतं.

*आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे ठरवा!! *

 *अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील?? *

 ★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन वर्ष म्हणजे… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन वर्ष म्हणजे… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

नवीन वर्ष म्हणजे – – 

खरं पाहिलं तर नवीन वर्ष म्हणजे काही भौतिक बदल नाही. सूर्य तोच असतो, आकाश तेच असतं, आपल्या जबाबदाऱ्या, अपयश, स्वप्नं सगळं कालचं असतं. फक्त कॅलेंडरवरची एक तारीख बदलते. तरीही या बदलाला माणूस इतकं महत्त्व का देतो, याचा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. माणूस तारखांपेक्षा भावनांवर जगतो.

आपण आयुष्यात अनेकदा थकतो. एखादा दिवस वाया गेला की, मनात अपराधभाव येतो. एखादं अपयश बोचत राहतं. पण त्या थकलेल्या मनालाही स्वतःला सावरण्यासाठी एखादा टप्पा, एखादी रेषा हवी असते. नवीन वर्ष ही अशीच एक मानसिक रेषा असते. इथपर्यंत झालं, आता पुढे नव्याने प्रयत्न करू.

खरं तर नवीन सुरुवात करण्यासाठी 1 जानेवारीची गरज नसते. पण तरीही हा दिवस वेगळा वाटतो, कारण तो आपल्या मनाला परवानगी देतो. मागचं ओझं थोडं बाजूला ठेवून पुढे पाहण्याची. सोमवारी, महिन्याच्या पहिल्या दिवशी, किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला जो उत्साह जाणवतो, तो बदलामुळे नाही; तो आशेमुळे असतो.

नवीन वर्ष म्हणजे संकल्पांची यादी नाही. ती पूर्ण झाली नाही म्हणून स्वतःला दोष देण्याचाही तो दिवस नाही. नवीन वर्ष म्हणजे स्वतःशी शांतपणे केलेली एक कबुली मी अजूनही बदलू शकतो. अजूनही शिकू शकतो. अजूनही स्वतःपेक्षा थोडा चांगला होऊ शकतो.

वर्ष बदलतं तेव्हा आयुष्य बदलत नाही, पण आयुष्य बदलण्याची तयारी मात्र मनात जन्म घेते. हीच तयारी महत्त्वाची आहे. कारण माणसाला पुढे नेणारी गोष्ट तारीख नाही, तर नव्या शक्यतेवरचा विश्वास आहे.

येतं वर्ष हे केवळ शुभेच्छांचा औपचारिक सोहळा न राहता, थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जागरूक आणि थोडंसं स्वतःकडे वळलेलं ठरो. कालच्या चुका आपल्याला तोडू नयेत, तर घडवाव्यात एवढीच अपेक्षा.

नवीन वर्ष आपल्याला नवा माणूस बनवो, असं नाही;

पण आपल्यातला खरा माणूस अधिक ठळकपणे समोर आणो.

याच भावनेतून नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवनाची खरी साधने…- लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ जीवनाची खरी साधने… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला.

थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.

मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.

“अशा साधनांनी हा काय काम करणार? ” असा विचार माझ्या मनात आला.

पण त्यांना काहीच फरक पडलेला दिसला नाही. शांतपणे त्यांनी पाइप सैल केला. एक गंजलेला भाग कापावा लागणार होता. त्यांनी पुन्हा बॅगेत हात घातला आणि एक छोटी करवत काढली — तिचा अर्धा भागच नव्हता!

आता मला खात्री वाटली — मी चुकीच्या माणसाला बोलावलं आहे. पण अवघ्या दहा मिनिटांत गळती थांबली. नळ चमकत होता आणि थेंबही गळत नव्हता.

मी त्यांना शंभर रुपयांची नोट दिली. त्यांनी नकार दिला. “नको साहेब. यातील अर्धेच पुरेसे आहेत. ”

मी आश्चर्याने पाहिलं. “आजकाल जास्त पैसे कोण नाकारतं? ”

ते हसले — शांत, स्थिर हास्य.

– – “साहेब, प्रत्येक कामाची एक ठरलेली किंमत असते. आज जास्त घेतलं, तर उद्या जास्त अपेक्षा राहील. तेव्हा मिळालं नाही, तर मन अस्वस्थ होईल. म्हणून जे योग्य आहे तेवढंच घेणं मला समाधान देतं. ”

मी हळूच मान डोलावली. “किमान स्वतःसाठी नवा पाना आणि करवत घ्या. काम सोपं होईल. ”

ते हलकेच हसले. “अहो साहेब… साधनं झिजण्यासाठीच असतात. तेच त्यांचं नशीब. पण तुटलेली, ओरबाडलेली असली तरी ती आपलं काम करतात. ज्येष्ठ माणसांसारखीच — काही जखमा आल्या म्हणून ते निरुपयोगी ठरत नाहीत. ”

… क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता तेव्हा कोणता पेन वापरता याने फरक पडतो का? महाग किंवा साधा — लिहिता येत असेल तर कुठल्याही पेनाने चांगलं लिहिता येतं. पण लिहिताच येत नसेल, तर सर्वात महाग पेनही उपयोगाचं नाही. कौशल्य हातात असतं, साधनात नाही. ”

मी नि:शब्द उभा राहिलो. त्यांचे शब्द खोलवर मनात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दुर्मिळ होतं — जे पैसा कधीच देऊ शकत नाही.

एक जपण्यासारखा विचार –

संपत्ती आणि सुखाच्या अखंड शर्यतीत…

.. आपण जीवनातील खरी “साधने” विसरतो —

*प्रामाणिकपणा, *

*मेहनत, *

*कृतज्ञता, *

*जाणीव*

*आणि समाधान*.

ही जर टिकून असतील, तर तुटकी साधनंही चमत्कार घडवू शकतात.

– – पण तीच नसतील, तर जगभरची संपत्तीही आपल्या आतली गळती थांबवू शकत नाही.

*

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एकदा वाचून पहाच!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एकदा वाचून पहाच!!

 

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्याभेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही? ”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही, 

तर सजगता म्हणून. ”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते, तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली, आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते? ”

“सुमारे ३० कोटी, ” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला? भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले? गोळ्या कोणी झाडल्या? ”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला, ट्रिगर कोणी दाबला? इंग्रज सैनिकांनी? —

— नाही… ते भारतीय सैनिकच होते. ”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही? एकाने पण का नाही? ”

— — “तुम्ही ज्याला गुलामी म्हणता, ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती. ”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार? आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं…

.. ते बलाच्या जोरावर नव्हे, तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर, त्यांच्या विश्वासघातावर. ”

— — “तुमच्याच लोकांनी धर्म बदलला, तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

— — तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

— — चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

— — भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

… “तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही. तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी, थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो. ”

 

… “जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले, तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात? — तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात, त्यांची सेवा केली, त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं. ”

 

… “आणि आजही तुम्ही बदलले नाही…

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचा मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं. ”

 

… “तुमची निष्ठा देशाशी नाही, तर तुमच्या पोटाशी आहे. ”

… “तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता, पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते, तेव्हा तुम्ही कुठे असता?

तुमची पहिली निष्ठा अजूनही तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे — देश आणि धर्म नंतर. ”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

 

– – – _पुढच्या भारतीयाला पाठवा… कदाचित बदल घडेल

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…. *वो फिर नहीं आते…. * आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात.

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का? ”* या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं…. संपर्कात रहायला हवं.

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना? …. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.

ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला…

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो ….. *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो.

गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से मिलते नहीं*

*उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…* 

माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि…

ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है, क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है*

*अपने दिल में इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर उनको जाने न दो*

*बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 

आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल… नाही का?

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं… तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी.. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची…

 सच कहा है किसी ने…

*… वो फिर नही आते… *

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वरिष्ठता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वरिष्ठता… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

वरिष्ठता – 

 – – वयपरत्वे शांती पूजा – – 

कोणीतरी मला विचारले – 

“आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या वयांचा इतका मोठा उत्सव का करतो?  हे आकडे आध्यात्मिक आहेत की फक्त सांस्कृतिक परंपरा?  ”

– – याचे उत्तर आपल्याला महाभारतातील राजा ययाती यांच्या प्रभावी कथेत सापडते.

ययातीने आयुष्य मनसोक्त जगले — सत्ता, भोग, यश, सर्व काही. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो हादरला. खोल चिंतनानंतर त्याला एक अत्यंत प्रामाणिक सत्य उमगले – – 

“ भोगाला मर्यादा आहे, पण इच्छा कधीच संपत नाही. ”

– – या एका जाणिवेने त्याचे जीवन बदलले. त्याने वृद्धत्व स्वीकारले आणि सांगितले की *आयुष्यात पाच अंतर्गत वळणे (inner turning points) असतात* — ती वयावर नाही, तर समजुतीवर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे आपल्या भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या टप्प्यांशी जुळतात. हे सर्व आपल्याला समजेल अशा शब्दांत पाहूया.

६० – षष्ठी (Shashti)

संचयातून समजुतीकडे मन वळते – ६० च्या आसपास काहीतरी बदलते — शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात.

“आणखी किती मिळवता येईल? ” हा प्रश्न मागे पडतो आणि

“आता खरंच महत्त्वाचे काय आहे? ” असा प्रश्न पुढे येतो.

– हळूहळू अंतर्मुखता सुरू होते. आवाज, कौतुक, टाळ्या यांची गरज उरत नाही. स्पष्टता हवी असते.

– – हे वार्धक्य नाही — महत्त्वाकांक्षेला गाठणारी प्रगल्भता आहे.

७० – भीमरथ शांती (Bheemaratha Shanthi)

शांतता सिद्ध करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान वाटते

– ४० आणि ५० मध्ये आपण जगाला स्वतःबद्दल सांगत असतो.

– ७० व्या वर्षी मात्र एक आश्चर्यकारक बदल होतो.

– तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. वाद आकर्षित करत नाहीत. भांडण जिंकण्यापेक्षा नाती टिकवणे महत्त्वाचे वाटते.

– – तेव्हा उमगते —

बरोबर असण्यापेक्षा शांत असणे अधिक मोलाचे आहे.

म्हणूनच ७० व्या वर्षाचा उत्सव केला जातो.

८० – शताभिषेकम् (Sathabhishekam)

*तुमची उपस्थितीच औषध बनते. *

– – ८० व्या वर्षी लोक सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोल शोधायला येतात —

ही खात्री की आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते.

– या वयात तुमची उपस्थितीच आशीर्वाद ठरते. जास्त बोलण्याची गरज नसते.

– तुमचे अस्तित्वच सांगते —

“सगळं ठीक होतं. आयुष्य मार्ग काढतंच. ”

– – म्हणूनच ८० हा टप्पा पवित्र मानला जातो.

९० – नवती (Navathi)

अहंकार शांतपणे निवृत्त होतो.

९० व्या वर्षी एक दुर्मिळ गोष्ट घडते.

– लोकांना दुरुस्त करावेसे वाटत नाही. मतांवर चिकटून राहावेसे वाटत नाही. गोष्टी वैयक्तिक घेतल्या जात नाहीत. लवकर दुखावले जात नाही.

– – कमकुवतपणामुळे नाही — तर आयुष्य खूप काही दाखवून गेलेले असते, म्हणून किरकोळ गोष्टींवर ऊर्जा वाया घालवावीशी वाटत नाही.

– – एक सौम्य शांतता येते.

ही नम्रताच खरी आध्यात्मिकता असते.  

१०० – शतमानम् (Shatamanam)

आयुष्य वैयक्तिक कथांपलीकडे जाते.. १०० गाठणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या नाही… ते एक अशी अवस्था आहे जिथे मोठे चित्र दिसू लागते.

– ज्या गोष्टींची काळजी केली, त्या बहुतेक अनावश्यक होत्या, हे कळते.

– ज्यांना प्रेम दिले, तेच खरे महत्त्वाचे होते.

– आणि आयुष्य नेहमीच एखाद्या गूढ, दयाळू शक्तीने धरून ठेवलेले होते, याची जाणीव होते.

१०० व्या वर्षी माणूस “व्यक्ती” कमी आणि “उपस्थिती” अधिक बनतो.

सारांश (Essence)

*आपल्या ऋषींनी वय साजरे केले नाही. वयामुळे होणारे अंतर्गत परिवर्तन त्यांनी साजरे केले. *

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात
  • ७० – शांतता हीच शक्ती ठरते
  • ८० – उपस्थिती उपचारक होते
  • ९० – अहंकार शांत होतो
  • १०० – आयुष्य पूर्णत्वाला पोहोचते

– वय म्हणजे अधःपतन नाही.

– – वय म्हणजे गाळण — ज्यातून शहाणपण, कोमलता आणि कृपा शुद्ध होऊन उरते.

*आजचा विचार.. *

वय वाढणे म्हणजे आयुष्य कमी होणे नाही; तर – – 

ते अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होत जाणे आहे

– – – -ही जर अवस्था आणि कृती घडत नसेल तर तुमचं वय आकड्याने वाढले आहे, तुम्ही प्रगल्भ व परिपक्व झालेले नाहीत…

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन धजावत नव्हतं…

ऑक्सिजन ८२… ८०…  मॉनिटरचा तो लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज!

NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजांची सवय असते, पण कालची रात्र वेगळी होती.

 

२२ दिवसांचं बाळ. फुफ्फुसात संसर्ग (Sepsis). श्वासासाठी आम्ही त्याला बबल CPAP (कृत्रिम श्वास) मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक्स, सलाईन, नेब्युलायझर… सगळं सुरू होतं… पण बाळ मशीनला रिस्पॉन्सदेत नव्हतं. ते चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. ते जेवढं रडायचं, तेवढं ऑक्सिजन लेव्हल खाली पडायचं.

 

माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं,

बाळ खूप रेस्टलेसआहे. सिडेटिव्ह (झोपेचं इंजेक्शन) द्यायचं का? “

इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. अशा औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न (Respiratory Drive) मंदावण्याची भीती होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं, त्यात जर श्वास आणखी मंदावला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

 

ती रिस्क घ्यायला माझं मन धजावत नव्हतं.

मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती. डोळे सुजलेले, जीव कासावीस.

मी टीमला म्हणालो, “इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. “

तिला आम्ही पूर्ण गाउन-मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हाताने त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा, सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला…

बाळा… “

– – पुढच्या ३० सेकंदात जे झालं, ते बघून आम्ही डॉक्टर्स असूनही अवाक झालो.

 

जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईचा स्पर्श होताच एकदम शांत झालं.

त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली.

श्वास लयीत आला.

– – आणि मॉनिटर?

जे ऑक्सिजन ८० वर अडकलं होतं, ते बघता बघता ८८… ९२… ९५… ९८% वर गेलं!

हे कुठलंही मॅजिकनव्हतं. हे सायन्स होतं.

.. आईच्या स्पर्शाने बाळाच्या शरीरात ऑक्सिटोसिन‘ (Love Hormone) तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन-किलर आणि स्ट्रेस-बस्टर आहे.

– – जेव्हा बाळ रिलॅक्स होतं, तेव्हा आमची औषधं सुद्धा १००% काम करतात.

 

बाळ आता धोक्याबाहेर आहे.

जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो,

ताई, आभार आमचे नका मानू. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला बरंतुमच्या स्पर्शाने केलंय. “

– – कधीकधी स्टेथस्कोप ला जिंकायला ‘आईच्या स्पर्शाची’ही साथ लागते.

* * * *

लेखक : डॉ. सुजित भरत पाटील

बालरोगतज्ज्ञ, पुणे

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

महाभारत युद्ध संपले. योद्ध्यांचे फाटलेले कपडे, मुकुट, तुटलेली शस्त्रे, तुटलेली रथाची चाके, आणि वातावरणात एक खोल दुःख पसरले होते.

त्या उजाड भूमीत, गिधाडे, कुत्रे आणि कोल्हे यांच्या दुःखद आणि भयावह हाकांमध्ये, द्वापरचा महान योद्धा देवव्रत भीष्म, मृत्युशय्येवर झोपलेला होता, सूर्य उगवण्याची वाट पाहत होता. एकटाच… तेव्हा त्याच्या कानावर एक परिचित आवाज आला, “प्रणाम (नमस्कार) आजोबा. “

भीष्मांच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटले. तो म्हणाला, “देवकीच्या पुत्रा, ये… स्वागत आहे! मी खूप दिवसांपासून तुमचा विचार करत आहे. “

कृष्ण म्हणाला, “मी काय बोलू, आजोबा? आता मी विचारूही शकत नाही की तुम्ही कसे आहात. “

भीष्म गप्प राहिले. काही क्षणांनी तो म्हणाला, “केशव, तू तुझ्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक केलास का? त्याची काळजी घे. त्याला आता तुझी सर्वात जास्त गरज आहे, आता या राजवाड्यात, कुटुंबातील वडीलधारी लोक नाहीत. “

कृष्ण गप्प राहिला.

भीष्म पुन्हा म्हणाले, “केशव, मी तुला काही विचारू शकतो का? तू खूप चांगल्या वेळी आला आहेस. कदाचित मी ही पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी माझ्या अनेक शंका दूर होतील. “

कृष्ण म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

मला एक गोष्ट सांगा, प्रभू! तुम्ही देव आहात, नाही का?

कृष्णाने मध्येच सांगितले, “नाही, आजोबा! मी देव नाही. मी तुमचा नातू आहे, आजोबा, देव नाही.”

भीष्म त्याच्या तीव्र वेदनांमध्येही हसले. तो म्हणाला, “कृष्णा, मी माझ्या आयुष्याचे कधीच मूल्यांकन करू शकलो नाही, म्हणून ते चांगले होते की वाईट हे मला माहित नाही. पण आता मी ही पृथ्वी सोडून जात आहे, कन्हैया, कृपया मला फसवणे थांबवा… “

कसे तरी, कृष्ण भीष्मांच्या जवळ गेला, त्याचा हात धरला आणि म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “

भीष्म म्हणाला, “मला एक गोष्ट सांग, कन्हैया! या युद्धात जे घडले ते बरोबर होते का? “

“आजोबा, कोणाच्या बाजूने? पांडवांच्या बाजूने? “

“कनहैया, आता कौरवांच्या कृतींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण पांडवांच्या बाजूने जे घडले ते बरोबर होते का? आचार्य द्रोणाचा वध, दुर्योधनाच्या मांडीखाली हल्ला, दुशासनाची छाती कापणे, जयद्रथाची फसवणूक, निःशस्त्र कर्णाचा वध – हे सर्व बरोबर होते का? हे सर्व न्याय्य होते का? “

– आजोबा, मी याचे उत्तर कसे देऊ? ज्यांनी ते केले त्यांनी हे उत्तर द्यावे. दुर्योधनाचा वध करणाऱ्या भीमाला उत्तर देऊ द्या; कर्ण आणि जयद्रथाचा वध करणाऱ्या अर्जुनाला उत्तर देऊ द्या. मी या युद्धात अजिबात नव्हतो, आजोबा! “

“कृष्णा, तू मला फसवणं थांबवणार नाहीस का? जग म्हणेल की अर्जुन आणि भीमाने महाभारत जिंकला, पण मला माहिती आहे, कन्हैया, हा विजय तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे. मी तुला विचारेन, कृष्णा! “

-“तर ऐका, आजोबा! काहीही वाईट घडले नाही, काहीही अनैतिक घडले नाही. जे घडले तेच घडले पाहिजे होते. “

-केशव, तू हे म्हणत आहेस का? सर्वात प्रतिष्ठित पुरुष रामाचा अवतार असलेला कृष्ण हे म्हणत आहे? ही क्रूरता कोणत्याही युगात आपल्या शाश्वत परंपरेचा भाग नव्हती, मग ते कसे न्याय्य आहे? “

-इतिहासातून शिकायला मिळते, आजोबा, पण निर्णय सध्याच्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. प्रत्येक युग स्वतःच्या तर्क आणि गरजांनुसार आपला नेता निवडतो. राम त्रेता युगाचा नायक होता, द्वापर युग माझे भाग्य होते. “आम्हा दोघांचा निर्णय सारखा असू शकत नाही, आजोबा. “

-मला समजले नाही, कृष्णा! कृपया समजावून सांगा…

-राम आणि कृष्णाच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आजोबा! रामाच्या काळात, रावणसारखा खलनायक देखील शिवभक्त होता. रावणसारख्या नकारात्मक शक्तीच्या कुटुंबातही विभीषण आणि कुंभकर्णसारखे संत होते. बालीसारख्या खलनायकाच्या कुटुंबातही तारासारख्या विद्वान स्त्रिया आणि अंगदसारखे उदात्त पुत्र होते. त्या काळात, खलनायकांनाही धर्माचे ज्ञान होते. म्हणूनच रामाने त्यांना कधीही फसवले नाही. पण माझ्या काळात कंस, जरासंध, दुर्योधन, दुशासन, शकुनी आणि जयद्रथ सारखे गंभीर पापी पाहिले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रत्येक फसवणूक न्याय्य आहे, आजोबा. पापाचा अंत करणे आवश्यक आहे, आजोबा, पद्धत काहीही असो.

-तर, तुमच्या या निर्णयांमुळे केशव, चुकीची परंपरा सुरू होणार नाही का? भविष्य तुमच्या फसवणुकीचे अनुसरण करणार नाही का? आणि जर तो असे करेल तर ते योग्य असेल का? “

– भविष्य आणखी नकारात्मक दिसत आहे, आजोबा. कलियुगात, हे देखील पुरेसे नाही. तिथे, मानवांना कृष्णापेक्षाही अधिक निर्दयी व्हावे लागेल, नाहीतर धर्माचा नाश होईल. जेव्हा क्रूर आणि अनैतिक शक्ती धर्म पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकता निरर्थक बनते, आजोबा! मग जे महत्त्वाचे आहे ते विजय आहे, फक्त विजय. भविष्याने हे शिकले पाहिजे, आजोबा. “

-“धर्माचा नाश देखील होऊ शकतो का, केशव? आणि जर धर्माचा नाश होणारच असेल, तर मानव ते थांबवू शकतो का? “

-“सर्वकाही देवाच्या दयेवर सोपवणे मूर्खपणाचे आहे, आजोबा! देव स्वतः काहीही करत नाही; मानवांना सर्व काही करावे लागते. तुम्ही मलाही देव म्हणता! तर मला सांगा, आजोबा, मी या युद्धात वैयक्तिकरित्या काही केले का? सर्व पांडवांना ते करावे लागले, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी मी अर्जुनाला हेच सांगितले होते. हेच अंतिम सत्य आहे. “

भीष्म आता समाधानी दिसत होता. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते. तो म्हणाला, “चला कृष्णा! ही माझी पृथ्वीवरील शेवटची रात्र आहे. ” उद्या मला निघून जावे लागू शकते… तुमच्या या दुर्दैवी भक्तावर दया करा, कृष्ण! ”

कृष्णाने स्वतःशी काहीतरी बडबड केली, भीष्मांना नमस्कार केला आणि मागे वळले. पण युद्धभूमीच्या त्या भयानक अंधारात, भविष्याने जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकला होता.

जेव्हा अनैतिक आणि क्रूर शक्ती धर्माचा नाश करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकतेचा धडा आत्मघातकी असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘दोन डोळे आणि तीस म्हणी…’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘दोन डोळे आणि तीस म्हणी… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

— — *पहा माय मराठीची समृद्धी* 

१. डोळा लागणे (झोप लागणे)

२. डोळा मारणे (इशारा करणे)

३. डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४. डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५. डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६. डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७. डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८. डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९. डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१० डोळे दिपणे (थक्क होणे)

११. डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२. डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३. डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४. डोळे भरून येणे (रडू येणे)

१५. डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६. डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७. डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८. डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९. डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०. डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१. डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२. डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३. डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४. डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५. डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६. डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७. डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८. डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९. डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे) 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares