मराठी साहित्य – विविधा ☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

मी झोपेत होतो का… हो झोपेतच होतो. अचानक मला एक प्रकाशमान गोलाकार भाग समोर दिसायला लागला. हे काय आहे… काय असेल… हा विचार करत होतो.

तेवढ्यात आवाज आला… वत्सा… घाबरु नकोस… मीच आहे. आता सध्या आईमुळे मीपण काही धार्मिक सिरीयल सुरु असतांना मोबाईल हातात घेत टि. व्ही. समोर बसतो. त्यामुळे वत्सा, आचार्य, शिष्य, नामस्मरण असे शब्द कानावर येतात त्यामुळे त्यांची थोडी सवय झाली आहे. नाहीतर मी झोपेत त्या आवाजाला घाबरण्याऐवजी वत्सा या शब्दालाच घाबरलो असतो.

जागा असतो तर कदाचित मोबाईल हातात घेऊन गुगलवर वत्सा याचा अर्थ पण शोधला असता. पण वत्सा लिहीतांना त ला स जोडायचा, का स ला त हा प्रश्न कदाचित पडला असता. आणि शाळेत शिकलेले स ला ते स ला ना ते हे व्याकरण याचा काहि संबंध आहे का हे आठवावे लागले असते.

व्याकरणात हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण झोपेत द्वितीय, विभक्ती, आणि प्रत्यय याचा संबंध नव्हता, कारण मी प्रथम किंंवा प्रथमच भक्तीचा प्रत्यय घेत होतो. पण वत्सा मीच आहे यात मी म्हणजे नक्की कोण हे काही समजलंच नाही.

मोबाईलच एक बर असतं, त्याला ट्रू काॅलर लावल की कोण बोलतय हे समजत. पण नुसत्या आवाजाने मी ओळखणं मला कठीण गेलं. किंवा आवाजावरून मी कोणालाही ओळखेन असा असणारा मी पणा गळून पडला. कारण हल्ली मी आवाजावरून दुधवाला, भंगारवाला, भाजीवाला अशा काही लोकांना ओळखायला लागलो होतो. पण हा आवाज नवीन होता.

अरे तु ज्याची आराधना करतोस तोच मी… तुला भेटायला आलो आहे…

अरे देवा… काही कळलं नाही तर जागेपणात जी त्रासीक प्रतिक्रिया असते, तीच झोपेतही उमटली…

बरोबर तोच… तोच मी देव…

त्याला अरे देवा हेच समजलं असेल. त्रासीक आवाज लक्षात आला नसावा.

तोच मी देव अस म्हंटल्यावर आता माझे वरचे शब्द तेच होते, फक्त वापर वेगळ्या पध्दतीने. आणि ऊत्साहात… अरे… देवा… वा… वा… पण तुझा चेहराच दिसत नाही. तो दिसू दे…

तु नामस्मरण करतांना जे नांव घेतो तेच नांव घे. तोच तुझा ओ. टि. पी. आहे. ते अगदी मोबाईल सारखच आहे… पैसे देतांना जसं तू ओ. टि. पी. ने कन्फर्मेशन देतोस तसच माझं नांव घे. ते नांव म्हणजे ओ. टि. पी. घेतल्यावर माझा चेहरा काय संपूर्ण मीच दिसायला लागेल.

आता देवाला काय सांगणार… मोबाईल वर पैसे देतांना दोन बँक असल्यातरी आधी बँक सिलेक्ट करावी लागते मग ओ. टि. पी. येतो. इथेही ओ. टि. पी. म्हणून देव नावच घ्यायला सांगतोय. पण… कोणत्या देवाचं नांव घेऊ…

रविवारी सूर्यनारायण, सोमवारी महादेव शंकर, मंगळवारी गणपती बाप्पा, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी कोणत्या देवीचं नांव घ्याव हा प्रश्न असतो, पण मी आठवेल किंवा जमेल त्या देवीच नांव घेत हा प्रश्न तात्पुरता माझ्यासाठी सोडवतो. शनिवारी हनुमान यांच नांव घेतो.

शनिवारी शनीचं नांव टाळतो. कारण खोडी काढणं याचही नांव घेणं असा अर्थ निघतो. त्या अर्थाने शनी देेवाने पाहिले तर ऊगाचच शनी मागे लागेल हि भिती.

बर्‍याचदा तर सकाळ, संध्याकाळ आणि जमल्यास दुपार, व ठराविक दिवस यांना ठरवून वेगवेगळ्या देवांची नांव घेतो. आता ओ. टि. पी. म्हणून कोणाचं नांव घेऊ. कारण चेहराच दिसत नाही…

हो, बरोब्बर वरच्या वारात बुधवार नाही. हा वार मी मुद्दाम मोकळा सोडला आहे. त्याला काही कारण आहे. पण ते सांगायचं नाही.

बर मी सगळ्यावारी वेगवगळ्या देवाचं नांव घेतो. त्यांचा चेहरा लक्षात आहे. पण आवाजाच काय? देव आपला आवाज ऐकत नाही असं आपण सहज म्हणतो. पण आपला प्रयत्न त्याने आपलं ऐकावं याचसाठी असतो. आपण कधी मनापासून त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केल्याचं आठवतच नाही. मग ओळखणार कसा त्याचा आवाज…

बरं त्याची नांव तरी किती… सूर्य, रवी, शंकर, महादेव, गणपती, वक्रतुंड, दत्तात्रेय, श्रीपाद, अंबाबाई, दुर्गा, पवनसूत, हनुमान, विष्णुला तर सहस्त्र नांव आहेत. बरं ओ. टि. पी. टाकायचा म्हणजे तोच टाकावा लागेल, चुकवून चालणार नाही. ही मानसिकता.

आता झोपेत का असेना पण देवाच्या मिळणार्‍या दर्शनाला आपण मुकणार याची खंत. काय करावं हाच विचार.

तेवढ्यात देवच म्हणाला, तुझ्या ओ. टि. पी. ची वेळ संपली आहे. मला जावं लागेल कारण अजूनही काही लोकांना असेच ओ. टि. पी. द्यायचे आहेत. पण तु निराश होऊ नकोस. कारण…

एखाद्या गोष्टीचं मुल्य ठरल्यावर ते द्यायचं सध्या तुझ्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. वेगवेगळे पे तुझ्याकडे आहेत. शिवाय चेक, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड असेही पर्याय आहेत. रोख रकमेत दहा, पन्नास, शंभर, पाचशे अशा वेगवेगळ्या दर्शनी मुल्यांच चलन तुझ्याकडे आहे. हे फक्त सोयीस्कर व्यवहारासाठीचे मार्ग आहेत. पण मुल्य एकच असतं.

तु वारानुसार भक्ती करत असलास तरी सगळी एकाच ठिकाणी येऊन मिळते. वार कदाचित आमच्या किंवा तुमच्या सोयीने झाले किंवा केले असतील. पण तुमची भक्ती आणि श्रध्दा यात फरक जाणवत नाही. सगळ्या वारी आमच्याबद्दल असलेला तुमच्या मनातला भाव तेवढाच आणि सारखाच असतो. त्यात ऊजवं डावं जाणवत नाही. ऊलट ज्या देवाला जे आवडेल, भावेल, रुचेल ते सर्वतोपरी करण्याचा आणि देण्याचा तुमचा ऊत्साह आणि प्रयत्न दांडगा असतो. मग यात उपवास घडला, त्रास झाला तरी चालतो. आणखीन काय पाहिजे. हिच भक्ती म्हणजे मूल्य आहे. जे तु वेगवेगळ्या पध्दतीने देण्याचा प्रयत्न करतोस. पण प्रामाणिकपणा तेवढाच असतो.

मी तुला भेटायला यायचं ठरवलं होत, तसा आलो आणि भेटलो. जाता जाता एकच सांगतो तुम्हाला हल्ली मोबाईलमुळे मराठी पण इंग्रजी शब्दांच्या सहाय्याने लिहायची सवय झाली आहे.

मी म्हणालो तो ओ. टि. पी. काहिसा तसाच आहे. ओळख Olakh तुझा Tuza परमेश्वर Parameshwar. OTP.

मनात देव कोणताही असला तरी भाव एकच असतो. आणि तो तुच नाही, तर तुझ्या सारख्या अनेकांनी ओळखला आहे. कोणाचही आणि कोणतही नांव घेतलं तरी चालतं हेच लक्षात ठेव. ज्याच नांव घेशील तोच ओ. टि. पी. परत संभ्रमात पडू नकोस. चला येतो मी. अनेक आशिर्वाद. असं म्हणत तो प्रकाश देणारा गोलाकार भाग लुप्त झाला.

पण जाता जाता अनेक ओ. टि. पी. त्याचा अर्थ आणि भक्तीभाव यासह देऊन, समजवून गेला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

रंग…

रंग. रंग मनुष्याच्या आयुष्यात ok खूप महत्वाची भूमिका बजावतात…! कोणतीही वस्तू विकत घेताना, निवडताना, भेट देताना, स्वीकारताना इतर बाबींसोबत त्या वस्तूचा रंग अवश्य पाहतो…! रंगाच्या बाबतीत प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी आवडनिवड असते, असू शकते…!

काही रंग मनाला शांती देणारे असतात, तर काही रंग मनुष्याला नकोसे असतात…

बऱ्याच लोकांना विशिष्ट रंगाच्या वस्तूच नव्हे, तर व्यक्तीही आवडत नाहीत. अनेक लोकांना मनुष्याच्या सावळ्या (खरंतर काळया…) रंगाचे वावडे असते…

या वावड्या स्वभावाचा कधीकधी अतिरेकी नमुना पाहण्यात येतो…! एखाद्या गोऱ्या रंगाच्या मनुष्याच्या बाजूला एखादा काळा मनुष्य बसला तर त्याला असे वाटते की याचा काळा रंग आपल्या अंगाला लागणार तर नाही ना?

इथेच हे थांबत नाही…

एक जुने मराठी गाणे आठवले…

काळाही म्हणतो गोरी पाहिजे,

गोरा ही म्हणतो गोरी

आता तुम्हीचं सांगा पावण 

कुठे जातील काळ्या पोरी…

एक गाणे म्हणजे समाजमनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल…

एका आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचे रंग (शरीराचा वर्ण) भिन्न भिन्न असल्याचे आपण पाहतो…

पण, गोरा म्हणजे चांगला आणि काळा म्हणजे वाईट असे अंधविश्वासू समीकरण आपल्या मनात मांडतो आणि मनुष्य त्यानुसार आचरण करतो…

हा वेताळ नव्हे काय?

आपण सर्वजण एकाच आईची लेकरे आहोत, असे मनावर बिंबवून पक्के केले तर मनामनात लपलेला वेताळ बाहेर काढून टाकायला हवा…

मनुष्य महत्वाचा की त्याचा रंग महत्त्वाचा याचा निर्णय करता आला तर या वेताळाला पळवून लावणे शक्य होईल.
पटतंय ना?

मानवी जीवन प्रवासात रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्या लक्षात येईल. किंचितशी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की रंग आहेत म्हणून आयुष्य रंगीबेरंगी आहे, रंग नसते तर आयुष्य बेरंगी झालं असतं…

हेच सूत्र भगवंतांच्या, ही चराचर सृष्टी निर्माण करणाऱ्याच्या मनात असावे म्हणून त्याने एकाच रंगाची किंवा एकाच प्रकारची माणसे निर्माण केली नाहीत… (त्याने एकाच रंगाचं आणि गंधाचे तसेच एकाच आकाराचे साबण बनवणारा कारखाना काढलेला नाही…)

त्याने त्याच्या कार्यकौशल्याप्रमाणे काही ठिकाणी एकदम गोरी, काही ठिकाणी निमगोरी, काही ठिकाणी सावळी, काही ठिकाणी लख्ख काळी अशी विविध प्रकारची माणसं निर्माण केली…

हे वर्णन वाचताना खूप छान वाटत, नाही का?

पण प्रत्यक्षात…

प्रत्येकाला गोरे व्हायचे आहे, प्रत्येकाला अधिक गोरे व्हायचे आहे…

सध्या मनुष्याला गोरे करणारी अनेक मलमे बाजारात विकत मिळत आहेत… (अर्थात अशी मलमे लावून फक्त जाहिरातीत दाखवलेली महिला गोरी होत असते, प्रत्यक्षात तसे गोरे कोणीही होत नसते…) 

एकेकाळी पांढरी पूड लावून मनुष्य तात्पुरता गोरा व्हायचा आणि त्यात समाधान मानायचा, पण आता काळ बदलला, तशी अनेक शोध लावले गेले…

आता ठिक्कर काळा मनुष्य देखील कृत्रिम रित्या काही काळापुरता गोरा होऊ शकतो…

गोरे होणे वाईट आहे असे बिल्कुल नाही, पण विधात्याने सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला उचित असा रंग दिला आहे तो न स्वीकारता, त्याने निगुतीने केलेल्या एखाद्या रचनेत मनुष्याने ढवळाढवळ केल्यासारखे होणार नाही का? या कृत्रिम रित्या गोरे होण्याचा हव्यास म्हणजे एक प्रकारचा

वेताळच नव्हे काय?

ह्या वेताळामुळे मनुष्य गोरा होतो की नाही ते सांगणे अवघड आहे, पण दोन गोष्टी नक्की होतात. एक म्हणजे त्या मनुष्याचा न्यूनगंड वाढतो आणि अशी विशिष्ट मलमे विकणाऱ्या कारखान्यांची भरभराट खात्रीने होते…

पटतंय का?

आपण वेळीच या वेताळाला आवर घालायला हवा…

– लेख क्र. ९

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या जाहिरातींचा सुळसुळाट सगळीकडेच आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या जाहिराती असतात. टीव्हीवर जाहिराती असतात. रेडिओ वर जाहिराती असतात. पूर्वी रेडिओ वरती एक कार्यक्रम संपला की एखादी जाहिरात असायची आणि दुसरा कार्यक्रम सुरू व्हायचा.

आता तर गाणं सुरू झालं, की दोन ओळी संपतात आणि जाहिरात सुरू होते. कडवं पूर्ण होतं आणि दुसरी जाहिरात लागते.

आता जाहिरातीचा आणखीन एक छान प्रकार बघूया…

तुम्ही म्हैस ही माझी गोष्ट वाचली असेलच.

बावधन या भागात रहदारीचा रस्ता सुखाने आणि आनंदाने आणि सुरक्षितपणे क्रॉस करण्याकरता तिथल्या मुलाने चौका चौकात आता म्हशी ठेवल्या आहेत.

लोकांची रस्ता क्रॉस करण्याची छान सोय होते, मुलाला छान पैसे मिळतात, म्हशीचा आणि मुलाचा छान व्यायाम पण होतो.

एक दिवस मी त्या मुलाला सहज सुचवले की या म्हशीच्या पाठीवर या भागातल्या लोकांना काही जाहिरात करायची असेल तर ती कापडा वरती लिहून म्हशीच्या पाठीवर झूल म्हणून टाकायची.

दुकानदारांची जाहिरात होईल आणि तुला त्यांच्याकडून पैसे पण मिळतील. आणि त्यामध्ये म्हशीला त्रास असा काहीच नाही.

मुलाला कल्पना पटली आणि लगेच त्याने इम्प्लिमेंटेशन केले.

आता तो त्या म्हशींच्या पाठीवर रोज निरनिराळ्या जाहिराती लिहिलेली कापडाची झूल घालत असतो.

म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणाऱ्यांकडून पैसे मिळतातच, आणि आता जाहिरात दारांकडून पण पैसे मिळतात.

मी जेव्हा जेव्हा तिथे रस्ता क्रॉस करण्याकरता जातो, तेव्हा मला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याकरता तो माझ्याकडून पैसे घ्यायला नकार देतो. आणि आभार म्हणून प्रत्येक वेळा मला एक छान फुलाचा पुष्पगुच्छ देतो.

पुढे मागे अजूनहि काही नवीन नवीन कल्पना सुचतीलच…

चला बाय बाय, शुभ दिवस 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथांचा जन्म उच्चवर्णीय, गर्भश्रीमंत, जमीनदार व उच्चशिक्षित घराण्यातला. त्यांच्या व्यापक विचारांना जाती धर्माची, वर्ण पंथांची, देश वा राज्याच्या सीमांची बंधनं मान्य नव्हती. ते अखिल मानव जातीच्या भल्याचा विचार करीत. कदाचित् त्यामुळेच समकालीन विचारवंतांच्या मनात त्याच्या विषयी नेहमीच संशयाचे धुके असत असे. परंतु त्यांचं आपल्या देशावर, या वसुंधरेवर निरतिशय प्रेम होतं. त्यांचे विचार प्रगल्भ होते. बुद्धिमत्ता अलौकिक होती. आरशासारखं स्वच्छ मन होतं.

त्यांच्या मते प्रत्येकाला शिक्षणातून स्वतःचा उत्कर्ष घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार व समान संधी मिळायला हवी. त्यासाठी देश, प्रांत अशा सीमारेषा नसाव्यात. त्या काळातही ते जागतिकीकरणाचे ध्येय बाळगून होते.

गीतांजलीतील आपल्या ३५ व्या कवितेत त्यांनी अत्यंत सकारात्मक असे हे विचार मांडले आहेत. जेथे जात, पंथ, वर्ण, रूढी, भाषा अशा कोणत्याही भेदभावाच्या भिंती नाहीत, समानता आहे, परस्परांबद्दल आदर आहे, नैतिकता, विवेक, सत्यवचन यांचा अंगिकार करणारं मन आहे अशा विश्वाची, मानवजातीची आस त्यांनी इथे व्यक्त केली आहे.

समाजात भयमुक्त, संघर्ष मुक्त वातावरण असावे. दडपशाहीच्या निंदनीय वास्तवातून बाहेर पडले पाहिजे अन्यथा वाळवंटातील रेती मध्ये रुतल्याप्रमाणे बसावे लागेल. ते ओलांडून गेलो तरच प्रगतीशील भविष्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा स्वच्छ प्रवाह निर्माण होईल, जो कधीच थांबणार नाही. एकसंध, निष्पक्ष असा परिपूर्ण भारत, परिपूर्ण जग निर्माण केले पाहिजे.

ते ह्या काव्यातून प्रत्येक मानवासाठी नैतिक, बौद्धिक व आध्यात्मिक स्वातंत्र्याची मागणी करतात. तसेच वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध भाष्य करतात. वैयक्तिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सर्व बंधनांना तोडून जे स्वातंत्र्य लाभेल ते स्वर्गासम असेल. त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जागे कर, अशी ते विधात्याकडे प्रार्थना करतात.

त्यांचे हे काव्य म्हणजे जणू सगळ्या मानवतेला आवाहन आहे. विचारही इतके दूरदर्शी, सार्वकालिक आणि व्यापक आहेत की आजही ते सर्वांना मार्गदर्शक ठरतील. या कवितेने स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली. स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्ता बदल नाही. तर भयमुक्त समाज निर्माण करणे जेथे परस्परांबद्दल आदरभाव असेल, समानता असेल.

हे काव्य संपूर्ण विश्वात गाजले कारण यातील विचार वैश्विक आहे. यात सामूहिक प्रबोधनाचे आवाहन आहे. न्याय्य, खुल्या भयमुक्त मानवी जगाच्या निर्मितीचं आवाहन आहे. ही कविता फक्त भारतातच नाही तर बांगलादेशातही पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते.

सन १९१७ च्या कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रविंद्रनाथांनी ही कविता ‘इंडियन प्रेअर’ म्हणून प्रस्तुत केली होती. तिचं सिंहीली भाषेतही भाषांतर झालं आहे. सन १९१० च्या आधी त्यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. नंतर त्यांच्या ‘नैवेद्यम्’ या कवितासंग्रहातून ‘प्रार्थना’ या शीर्षकाखाली ती प्रसिद्ध झाली. ही मूळ कविता क्रांतिकारी वळणाची व अधिक आवेशपूर्ण होती. तिचे इंग्लिश मध्ये भाषांतर करताना टागोरांनी त्यात

काही बदल करून ती बरीच

सौम्य केली आहे.

—–

गीत ३४

LET only that little be left of me whereby I may name thee my all.

Let only that little be left of my will whereby I may feel thee on every side, and come to

thee in everything and offer to thee my love every moment.

Let only that little be left of me whereby I may never hide thee.

Let only that little of my fetters be left whereby I am bound with thy will, and thy purpose

is carried out in my life ⎯ and that is the fetter of thy love.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३४

☆ 

सायुज्य मुक्ती नकोच देऊ

जरा विलगता आपण ठेऊ

असेल जर का थोडे अंतर

पाहिन रुपडे तुझे निरंतर

घडोघडी तव चरण सेवा

माझ्या हातून घडेल देवा

असशील जर तू आजुबाजूला

तू माझा, मी दाविन सकला

क्षणोक्षणी तुज अर्पिन प्रीती

म्हणून करतो ही तुज विनती

एकरूपता नकोच मजला

थोडे अस्तित्व दे गोपाला

☆ 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३५ ☆ 

WHERE the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free; Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls; Where words come out from the depth of truth; Where tireless striving stretches its arms towards perfection;

Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit; Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action ⎯

Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ३५ ☆ 

जेथे मनी भिती नाही

मान सदा ताठ राही

जेथे ज्ञान असेल मुक्त 

संकुचित भिंती होती लुप्त

*

असं विश्व माझं घर असेल

सत्याच्या गर्भातून शब्द बरसेल

कर्तव्यनिष्ठा, चिकाटी न् अचूकता

असेल आचार विचारांची प्रगल्भता

*

वाट दाखवणारा जर तू असशील

तर धरतीवर असा स्वर्ग वसवशील

तुझ्या कृपेचा असेल वरदहस्त

तर असाच असेल माझा भारत

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆  गीत ३६ ☆ 

THIS is my prayer to thee, my lord ⎯ strike, strike at the root of penury in my heart.

Give me the strength lightly to bear my joys and sorrows.

Give me the strength to make my love fruitful in service. Give me the strength never to disown the poor or bend my knees before insolent might.

Give me the strength to raise my mind high above daily trifles. And give me the strength to surrender my strength to thy will with love.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत ३६ ☆ 

☆  हे देवा! ☆ 

☆ 

घाव एक तो असा घाल की 

दारिद्र्य मनाचे समूळ जाऊ दे

दीन दुबळ्यांची सेवा आणिक

परोपकार हातून घडू दे

*

असोच इतके बळ मनाचे

सुखदुःखाच्या पार जाऊ दे

सत्तेच्या या माजापुढती

कधी न मजला नत होऊ दे

*

तुच्छ गोष्टींना महत्व देऊन

मन कोते ना कधी वाटू दे

इच्छा तुझिया पूर्ण कराया

शक्ती माझी खर्ची पडू दे

☆ 

– क्रमशः भाग १२.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔅 विविधा 🔅

☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जगामध्ये काही चांगली माणसं आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. किंवा खरोखर अनुभवतो सुद्धा. डॉ. सुजित भरत पाटील यांचा “ते शंभर रुपये “हा लेख वाचला आणि अगदी तसाच काहीसा प्रसंग मी अनुभवला तो मला आता लिहावासा वाटतो. प्रसंग अगदी असाच माणसा माणसातला फरक जाणून देणारा. 27 आणि 28 जानेवारी 2026 या दोन दिवशी आमच्या गावाकडची देवीची यात्रा होती. 28 जानेवारीला देवीचा प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. जेवण झाल्यामुळे घरी जायची गडबड नव्हती. समोर लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल लागलेले होते. मी सुद्धा नातीसाठी काहीतरी घ्याव म्हणून खेळण्यांच्या स्टॉल कडे गेले. खूपच लहान मुलांची खेळणी होती. त्यामुळे दुसरी मध्ये शिकणाऱ्या माझ्या नातीसाठी मी एक मोठा बॉल घेतला. माझी पहिलीच भवानी असल्यामुळे त्याच्याकडे मला परत द्यायला सुट्टे पैसे नव्हते. माझ्याकडे त्यावेळी दोनशे रुपये होते. त्यातली शंभर रुपयाची नोट मी त्याला दिली आणि पन्नास रुपये परत मिळण्याची वाट बघत होते. त्यावेळी मी उरलेले शंभर रुपये रुमालाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात ठेवले होते.

“थोडं थांबा मॅडम पैसे देतो “असे म्हटल्यामुळे मी आणखीन खेळणी बघू लागले. खाली वाकून खेळणं घ्यायचं. बघायचं कसं आहे आणि परत जागेवर ठेवून दुसर खेळण घ्यायच. असं मी बऱ्याच वेळा केले. त्यानंतर त्याने माझे पन्नास रुपये दिले आणि मी आमच्या घरच्या स्त्रियांबरोबर घरी आले. कुलूप उघडेपर्यंत मी कट्ट्यावर बसले आणि सगळे पैसे एकत्र ठेवायचे म्हणून रुमाल उघडला. तर त्यात शंभर रुपये नव्हते. माझ्या लक्षात आले की बहुतेक खेळण्यांच्या तिथे पडले असावेत. मी आमच्या घरी आलेल्या एका पाहुणीला घेऊन पुन्हा खेळण्यांच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. पैसे मी नीट ठेवले नाहीत. माझ्या निष्काळजी पणामुळे ते पडले याचा दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. तिथे जाऊन मी खेळणी उलटी पालटी करून बघू लागले. तो खेळणी वाला म्हणाला, “मॅडम काय पाहिजे “मी म्हणाले “मघाशी माझे शंभर रुपये बहुतेक इथे पडले आहेत. “स्टॉल वाला 30 -32 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाला, “हो हो आहेत माझ्याकडे पैसे. मला सापडले ते. ” हे ऐकल्यानंतर मला खूप हायस वाटलं. आणि माझ्या लक्षात आलं की तो माझी ही रिएक्शन टिपण्यासाठी माझ्याकडे एक टक बघत होता आणि अतिशय गोड हसत होता. “थँक गॉड “मी म्हणाले. थँक्स असे मी त्याला दोन-तीन वेळा म्हणाले. तो म्हणाला, “मॅडम असू दे हो. दिवसभर कष्ट करून जे पैसे मिळतात त्यात आम्ही समाधानी आहे. आम्हाला दुसऱ्यांचे पैसे कशाला हवेत. घरी गेल्यानंतर शांत झोप येते हे महत्त्वाच आहे. पण मॅडम पैसे नीट सांभाळून ठेवत जावा बरं का. ” मी त्याला हो हो म्हटले आणि तिथून निघाले. मला राहून राहून वाटत होते की जगात काही चांगली माणसं आहेत म्हणून जग चालते. असा प्रामाणिकपणा खूप दुर्मिळ असतो. त्याचबरोबर मलाही पैसे नीट जपून ठेवायला हवेत याची जाणीव झाली. एक मोठा अनुभव येऊनही माझ्याकडून पुन्हा पुन्हा चुका होतात याचे कधीकधी मला आश्चर्य वाटते. या प्रसंगा बरोबरच सहा महिन्यापूर्वी श्रावणामध्ये घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळला. माझ्याकडे भिशी होती. श्रावण महिना आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणींना जेवणाचे आमंत्रण दिले. आणायसे श्रावण महिना आहे तर सवाष्णी घालूयात असा विचार केला होता. मैत्रिणी बरोबर सव्वा बारा वाजता घरी आल्या. पण हे सगळं करायच्या नादात माझी पूजा राहिली होती. पण आता एवढ्या सगळ्या गोंधळात शांतपणे पूजा होणार नाही म्हणून मी या सगळ्या गेल्या की पूजा करू आणि नंतर जेवण करू असा विचार केला. मी पूजेची चांदीची भांडी धुतलेली तिथेच किचनमध्ये ठेवली होती. माझ्या सुनबाई सर्विसला गेल्यामुळे दोघी चौघीं मैत्रिणींचा मदतीसाठी म्हणून वावर किचन मध्ये होता. त्यांच्या नजरेला ती भांडी पडलेली होती. सगळ्या सवाष्णींना जेवण दिले. एक छोटासा गेम ही घेतला आणि नंतर त्या सगळ्या घरी गेल्या. मी पूजा करण्यासाठी ताम्हण हातात घेतले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यातली चांदीची वाटी गायब झाली आहे. वाटी बऱ्यापैकी मध्यम आकाराची होती. मला प्रचंड धक्का बसला. मी सगळीकडे शोधाशोध केली. पण वाटी काही सापडली नाही. मी देवाची पूजा नीट करू शकले नाही. तसेच मी जेवनही नीट करू शकले नाही. माझा मैत्रिणींवरचा विश्वासच उडून गेला. मी खूप अस्वस्थ झाले. आमच्या यांना काही सांगण्याची सोय नव्हती. काय करावे काही सुचत नव्हते. कोणी बरं घेतली असेल याचा विचार करून करून डोके भनभानून गेले. प्रत्येक मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आणि त्यांना वाचायचा मी प्रयत्न करत होते. तरीही मला काही अंदाज येत नव्हता. मी आल्यानंतर माझ्या सुनबाईंना सांगितले. तिने सगळी भांडी व वाट्या चेक केल्या. तरीही वाटी सापडली नाही. कोणाला कसे विचारावे काही समजेना. शेवटी मुलाला मी ही गोष्ट सांगितली आणि दोघांनाही सांगितलं की मला आत्ता जाऊन सगळ्यांना जाब विचारता येईल पण वाटी तर एकीनेच घेतली आहे. मी घेतली आहे म्हणून कोणीही सांगणार नाही. आणि इतर सगळ्यांना वाटणार की मी त्यांच्यावर संशय घेतला. मैत्रीमध्ये एवढ्या वर्षांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार म्हणून मी ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये ठेवली. अजूनही राहून राहून वाटते की एवढ्या चांगल्या घरातल्या स्त्रिया सुद्धा अशा असू शकतात अशा वागू शकतात. आमची कामवाली सुद्धा खूप प्रामाणिक आहे. तिने कधी कशाला हात लावलेला नव्हता. उलट कधी पॅन्टच्या खिशात पैसे सापडले तर तिने आणून दिले होते. पण एखादी मैत्रीण अशी वागते याचा अजूनही भरोसा वाटत नाही. उलट मैत्रिणींनी सांगायला हवे होते की तू ही सगळी भांडी देवघरात नेऊन ठेव. यांना अस करून झोप कशी काय लागत असेल. एका व्यक्तीबरोबर या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना याचे काही वाटत नाही. उलट मी कशी चालाखी केली आणि मला फायदा झाला याची फुशारकी ते घरात मारत असतील. आज चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. केव्हाही आता चांदीचा विषय आला की मला ती डोळ्यासमोर चांदीची वाटी दिसते. आणि मैत्रिणी दिसतात. आणि तो खेळण्यांचा स्टॉल वाला दिसतो.

© सौ. जयश्री अनिल पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – – ७८ – जोहार मायबाप जोहार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ७८ – जोहार मायबाप जोहार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

“माझी जडणघडण” ही मालिका मी जवळजवळ गेली दीड वर्षे लिहीत आहे. सुरुवातीला हे एक आव्हान म्हणून स्वीकारताना मी खूप साशंक होते. मूळातच मी, ” हे का लिहावं? ” हा प्रश्न माझ्या मनात होता. कारण स्वतःविषयी काही लिहावं आणि ते वाचकांकडून वाचलं जावं इतकी मी कुणी प्रसिद्ध अथवा वलयांकित व्यक्ती नाही. चार चौघींसारखंच माझं जीवन. पण आयुष्यातील अनुभवांविषयी, जीवन जगताना जे जे जाणवले ते लिहावं असं वाटलं आणि मी तसा प्रयत्न करायचं ठरवलं.. ”

मग अक्षरशः मी माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळही जवळ घेऊन बसले. अदृश्यपणे माझ्याच आयुष्याचं गाठोड सोडवलं आणि मग त्या प्रवाहात लिहिता लिहिता स्वतःला खरोखरच झोकून दिलं.

– – वास्तविक “माझी जडणघडण” ही ७७ भागांची मालिका म्हणजे माझे आत्मवृत्त आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आलेल्या कडू, गोड, आंबट, तुरट अनुभवांचं भेटलेल्या अनेक व्यक्तींचं माझ्या जडणघडणीत काय योगदान ठरलं याचं मी बारकाईने निरीक्षण केलं, काहीसं चिंतनही केलं आणि माझ्या दृष्टीने मला जे वाटलं ते तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रांजळपणे ठेवलं.

ही मालिका लिहिताना आणि विशेषतः भूतकाळात शिरताना मला सुद्धा नक्कीच खूप आनंद मिळाला. तेव्हा न जाणवलेलं लिहिताना जाणवलं. हरवलेलं कितीतरी, दडून बसलेलं काहीतरी गवसत गेलं आणि जीवन पुन्हा नव्याने कळत गेलं. प्रत्येक लेख लिहिताना मला हे वाटायचं की, ” यात तसं विशेष काय आहे? ” पण ज्या ज्या वेळेला वाचकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचे त्यावेळी मी मनोमन हरखून जायचे. वाचकांचा या मालिकेला खरोखरच उदंड प्रतिसाद मिळाला. कुठेतरी वाचकही माझ्या या लेखनाशी रिलेट व्हायचे. त्यांच्या जीवनातलेही संदर्भ ते या लेखनात पडताळून बघायचे. अभिप्रायासोबत तेही त्यांच्या आयुष्यात आलेले अशाच प्रकारचे अनुभव मला सांगायचे. कित्येकांचे फोनही यायचे. काहीजण वैयक्तिक मेसेजेसमधून त्यांच्या भावना व्यक्त करायचे आणि हे सगळंच माझ्यासारख्या सामान्य लेखिकेसाठी खूपच भारी होतं. माझ्या अनुभवात त्यांचेही अनुभव मिसळत माझ्या जडणघडणीचा आणखी एक नवाच प्रवास त्यामुळे सुरू व्हायचा.

“पुढील भागाची प्रतिक्षा करत आहोत. ”हे वाचकांचं वाक्य माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असायचं.

या लेखनानिमित्ताने अनोळखी ओळखींमधून त्यांच्या हृदयीचे खरेखुरे बोल वाचून, ऐकून मीही प्रत्येक वेळी खरं म्हणजे अधिक समृद्ध होत गेले. अनेक नवी दालनेत जणू काही माझ्यासाठी उघडली गेली. त्यामुळे माझ्या या वाचक वर्गाची मी खूप ऋणी आहे. माझ्या लेखनातून मी त्यांना काय दिलं यापेक्षा त्यांच्या प्रांजळ मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रियेतून मला मात्र खूप आनंद मिळाला. सुरुवातीला जे वाटत होतं की “मी हे का लिहावं? ” ही भावनाच गळून गेली. या लेखनाच्या माध्यमातून मला खूप मोठा मित्रपरिवार लाभला आणि मी अक्षरशः त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. माझ्या मनातल्या अनेक प्रश्नचिन्हांनाही मी वाट मोकळी करून दिली. हा साराच आनंद खरोखरच अवर्णनीय होता.

खरं सांगू का? तसा हा जडणघडणीचा प्रवास न संपणाराच आहे. याचं शेवटचं स्थानक म्हणजे आपला शेवटचा श्वास. आज मागे वळून पाहताना ज्यांनी माझं बोट धरून जीवनरूपी आकाशातले तारे मला पाहायला शिकवलं ते हात लुप्त झालेले जाणवत असले तरी आयुष्याची उरलेली वाट नव्या पिढीच्या हाताला धरून चालतानाही पुन्हा एकदा जडणघडणीचाच प्रवास सुरू असल्याची भावना मनात प्रबळ होते. जगत असताना संस्कार म्हणून सहजपणे ज्यांना मी माझ्यातलं दिलं त्यांच्याच सोबतीने पुन्हा माझ्यावरच संस्कार होत असल्याचं अनुभवते तेव्हाही हेच वाटतं की हे संस्काराचं पात्र केवढं मोठं आहे! अनंत आहे, न संपणारं आहे म्हणूनच म्हणते ही जडणघडणीची मालिका न संपणारी आहे. सांगायचं असं काहीतरी खूप बाकी आहे आणि पुढेही ते बाकीच राहणार आहे. काल घडलं, आजही काही घडणार आहेच आणि पुढेही घडेल.. म्हणून आता इथेच थांबायचं मी ठरवलंय. तुमचा प्रेमळ निरोप घेत आहे. या संपूर्ण मालिकेच्या प्रवासात वाचकहो! तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी केवळ अनमोल आहे. धन्यवाद तरी कसे देऊ? तुमच्या कायम ऋणातच मी राहीन. हेच नम्रपणे म्हणावसं वाटतं..

।।जोहार मायबाप जोहार

तुमच्या महाराचा मी महार

बहु भुकेला झालो

तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।

तेव्हा मित्रहो! आता निरोप घेते. चूक भूल द्यावी घ्यावी. सदैव एकमेकांच्या स्मरणात मात्र नक्कीच राहू.

बाsssय!

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

शब्द, श्रद्धा आणि शोक – – 

 – – – मृत्यू, संदेश आणि आपण!

परवा सकाळी अचानक मोबाईल वाजला.

पटलावर एकच अभद्र ओळ…

“आपल्या सोसायटीतील ज्येष्ठ सभासद श्री ××××× यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ”

बस्स…

त्या एका ओळीत त्यांचे अख्खे आयुष्य थांबले होते.

क्षणभर शांतता.

मग व्हॉट्सॲप समूह हलला… जागा झाला…

आणि पटलावर भावनांचा पूर उसळला.

 

हात जोडले गेले 

अश्रू वाहू लागले 

फुले अर्पण झाली 

दिवे पेटले आणि क्षणात विझले 

 

शब्द कमीच…

भावचिन्हेच जास्त.

RIP…

ॐ शांती…

ईश्वराची इच्छा…

अरेरे…

 

प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेच्या चौकटीतून…

दुःखाला आकार देत होता.

व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती.

 

शोक सगळ्यांचाच;

पण त्याची मांडणी मात्र

व्यक्तिमत्त्वानुसार—

कुणी कृपण,

कुणी रुक्ष,

कुणी सवंग,

कुणी उथळ;

कुणी शिष्ट, संयमित,

कुणी दयार्द्र,

कुणी प्रगल्भ

*मृत्यूनंतर व्यक्तीला*

*त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार*

*आदरांजली वाहिली जावी, *

*तो त्याचा अधिकार आहे. *

हिंदू मन मृत्यूला पूर्णविराम मानत नाही.

इथे शरीर पडते; आत्मा नाही.

तो अजर, अमर, अविनाशी, नित्य.

तो पुढच्या—अनंताच्या प्रवासाला निघतो.

म्हणूनच अशा वेळी ओठांवर सहज उमटते—

“मृतात्म्यास सद्गती लाभो, ”

“आत्म्यास मोक्ष मिळो. ”

हे शब्द मृत्यूनंतरच्या प्रवासावर

अढळ विश्वास ठेवणाऱ्यांचे.

इस्लाम आणि ख्रिश्चन परंपरेत

जीवन एकदाच मिळते.

मृत्यूनंतर शरीर मातीच्या कुशीत विसावते,

आणि आत्मा अंतिम दिवसाची वाट पाहतो.

म्हणून तिथे सद्गती नसते,

तिथे असते चिरशांती…

चिरनिद्रा…

Rest in Peace.

किंवा अल्लाहकडे केलेली क्षमायाचना.

त्या शब्दांत आक्रोश नसतो,

असतो शांत स्वीकार.

बौद्ध विचार मृत्यूकडे

‘थांबा’ म्हणून पाहतो—

कर्मांच्या प्रवाहातून

मुक्त होण्याची एक शक्यता.

म्हणून “निर्वाणाची प्राप्ती होवो”

असे म्हणताना शब्द हलके होतात…

श्वासासारखे.

शीख धर्मश्रद्धेत

आत्मा ईश्वरात विलीन होतो.

“वाहेगुरूच्या इच्छेत सर्व आहे”

हे वाक्य दुःखाला तर्क देत नाही,

ते फक्त त्याला धरून ठेवते.

प्रत्येक श्रद्धा मृत्यूला वेगळा अर्थ देते,

आणि…

तोच अर्थ

शोकसंदेशात उतरतो.

म्हणून शोक व्यक्त करताना

आपले शब्द आपल्यासाठी नसतात.

ते त्या गेलेल्या माणसासाठी असतात –

आणि उरलेल्यांच्या मनासाठी.

धर्म माहीत नसेल,

तर मौन…

किंवा मोघम, मृदु शब्द—

“त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ”

“या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत, ”

“माणसं जातात… आठवणी राहतात. ”

 

शोक मिरवायचा नसतो,

तो जपून ठेवायचा असतो—

योग्य शब्दांत.

कारण

अचूक, समर्पक शब्दयोजना

हीच खरी श्रद्धांजली असते.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “परदेशी भक्तांचा कृष्ण consciousness!” ☆ श्री संभाजी बबन गायके

शामा आन बसो ब्रिंदावन में 

मेरी उमर बीत गयी गोकुल में 

मैं तो बन के दुल्हन आज सजी

बस तुमही हो मेरे तन मन में ।। 

श्रीकृष्ण नावाचं एक गारूड गेली कित्येक युगे सहृदय मानवांच्या मनावर राज्य करीत आलेलं आहे. विविध रूपांत भगवान श्रीकृष्ण कोट्यवधी लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. कृष्णलीला अगाध आणि अनंत आहेत.

मानवी देहात अवतरीत झालेला हा देव देहाच्या, वासनेच्या अंगभूत मर्यादा ओलांडून केंव्हाच पुढे, अगदी पुढे निघून आलेला दिसतो. माना मानव वा परमेश्वर… मी स्वामी पतितांचा म्हणत हा कर्माचा योगी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सबंध जगतातील अनेकांच्या मनात वसलेला दिसतो.

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या ISKON अर्थात International Society for Krishna Consciousness या संस्थेने कृष्णाची आणि जगाची गाठ घालून दिली, असे म्हणता येईल. पाश्चात्य जगतातील विज्ञाननिष्ठ लोक मोठ्या संख्येने कृष्णनाम जपताना दिसतात, तेंव्हा ही जाणीव निश्चितच अगदी उच्च पातळीवरची असेल, यात शंका नाही!

हजारो परदेशी युवक-युवती भारतात कृष्णाच्या शोधात येताना दिसतात, भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी, त्यांनी लीला केल्या त्या वृंदावनात रमताना दिसतात…. गाताना दिसतात. मोठ्या श्रद्धेने ही मंडळी श्रीकृष्ण भावानामृत ग्रहण करतात. यामागील कारणे काहीही असोत… त्यांना त्यांच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी हा मार्ग योग्य वाटतो… हे महत्त्वाचे!

इंटरनेट वर सध्या एका रशियन युवतीने अत्यंत तल्लीन होऊन गायलेल्या एका हिंदी कृष्ण भजनाचा रील खूप मोठ्या संख्येने पाहिला जातो आहे. उच्चार, गायनाची धाटणी काहीशी वेगळी असली तरी ती ज्या भावनेने गाते आहे…. ते ऐकण्यासारखे आहे. विशेषत: तन मन में हा उच्चार तर केवळ अवीट गोडीचा.

मन:शांतीच्या शोधात असणा-यांना कृष्णभक्ती हा एक उत्कृष्ट मार्ग उपलब्ध आहे. किंबहुना अध्यात्माच्या जगतात कृष्ण नाम हा परवलीचा शब्द बनला आहे. राम कृष्ण नामे ही (ये) दोन्ही साजिरी… हृदयमंदिरी स्मरा का रे… आपली आपण करा सोडवण… संसार बंधन तोडा वेगी… असं माऊली म्हणतात. राम आणि कृष्ण अर्थात श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही नामे साजिरी, गोड आहेत….. या नामांच्या केवळ उच्चाराने संसार बंधनातून सुटका होऊ शकते, असा विश्वास श्री ज्ञानोबारायांनी दिला आहे. असो.

परदेशी लोकांनी आपला हा ठेवा आपलासा केला आहे… हेच खरे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान आणि समर्थ रामदास ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महारुद्र जे मारुती रामदास

कलीमाजि जे जाहले रामदास

श्री समर्थ रामदास स्वामींना मारुतीचा कलियुगातील अवतार असे म्हणतात. त्यांना सुरुवातीपासूनच हनुमंता बद्दल अत्यंत ओढ होती. हनुमानावर त्यांची श्रद्धा होती. भक्ती होती. प्रभू श्रीरामांनी त्यांना दृष्टांत दिला तेव्हापासून समर्थांनी ” समर्थ ” होईपर्यंत पुढे कार्य समाप्ती पर्यंत हनुमानाची अखंडित सेवा, साधना केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

शक्तीने मिळती राज्ये

शक्ती नसता विपन्नता

मोंगलांच्या आक्रमणाच्या काळात श्री रामदास स्वामींचा अवतार झाला. मोगलांनी जनतेला सळो कि पळो करून टाकले होते. त्यांची केव्हाही धाड पडायची. घरावर नांगर फिरवला जायचा. आपलीच माणसे क्षुल्लक वतनांसाठी, जहागिरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान कोणाकडेच नव्हता. समाज अस्वस्थ झाला होता. समाज आपले शौर्य, धैर्य विसरला होता. या सर्व परिस्थितीवर समर्थांनी मात केली. आणि बल उपासनेसाठी त्यांनी हनुमंताची मंदिरे स्थापन करण्यास सुरुवात केली. शक्ती आणि भक्ती चा प्रचार केला. मठ स्थापन केले. त्यातून तरुण बलवान व्हायला लागले.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

सौ. शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अनिकेतला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७२ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता.

अनिकेत चिडून म्हणाला, “काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. चला, मला लवकर ‘हिंजवडी’ला सोडा. “

आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली.

रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता.

अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, “अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझी मीटिंग आहे. “

आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, “साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल. “

अनिकेतने तोंड वाकडं केलं, “बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं. ” शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते.

अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, “ठेवा सुट्टे. उपकार समजा. “

आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका ‘छोट्या टिफिन बॉक्स’ मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला.

अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला.

त्याने विचारलं, “त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय? ” आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं.

त्यात ‘चिल्लर आणि नोटा’ होत्या आणि एक ‘फोटो’ होता.

तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले:

“साहेब, ही माझी नात आहे, ‘रिया’. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. “

आज तिची ‘शाळेची फी’ भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो.

आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले.

“साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात… पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला ‘उशीर’ म्हणत होतात ना… तो माझ्यासाठी ‘संघर्ष’ होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं. “

हे ऐकून अनिकेत सुन्न झाला.

ज्या हातांना तो ‘कमकुवत’ आणि ‘म्हातारे’ समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते.

त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली.

अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती.

त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले.

आजोबांनी हात जोडले, “नको साहेब, हे खूप आहेत. “

अनिकेत हळवा होऊन म्हणाला, “आजोबा, हे पैसे फीसाठी नाहीत. हे त्या ‘रिया’साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला ‘माणुसकी’ शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल. “आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली.

अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो.

कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी ‘पालक’ असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares