(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। मैं विस्मित हूँ उनकी इस रचना को पढ़ कर। आज कितने ऐसे कवि या साहित्यकार हैं जिन्होने समाज के उस अंग के लिए लिखा है जिसे घृणा (किळस) की दृष्टि से देखा जाता है। उस अंग के लिए जिनका जीवन ही श्राप समान है। श्रीमती रंजना जी की कविता अनायास ही बाबा आमटे जी की याद दिला देता है जिनका सारा जीवन ही कुष्ठ रोगियों की सेवा में व्यतीत हो गया। ऐसे विषय पर इस अभूतपूर्व भावुक एवं मार्मिक रचना के लिए श्रीमती रंजना जी आपको एवं आपकी लेखनी को नमन।)
नाही किळस वाटली त्यांना अंगावरच्या जखमांची.
आणि झडलेल्या बोटांची….
पांढरपेशी सुशिक्षित आणि स्वतःला….
सर्जनशील सुसंस्कृत समजणाऱ्या समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांची ….
धुतल्या जखमा केली मलमपट्टी घातली पाखरं मायेची….
अंधकारात बुडलेल्या जीवांना दिली उमेद जगण्याची …..
पाहून सारा अधम दुराचार असह्य झाली पीडा अंतःकरणाची ..!
हजारोच्या संख्येने जमली जणू फौजच ही दुखीतांची.,
रक्ताच्या नात्यांनाही नाकारले
तीच गत समाजाची . …
कुत्र्याचीही नसावी…. इतकी ! लाही लाही… झाली जीवाची.
(श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर जी का e-abhivyakti में स्वागत है। कौन कहता है कि सेना और पोलिस में कार्यरत कर्मी संवेदनशील नहीं होते और साहित्य की रचना नहीं कर सकते? यह कविता इस सत्य को उजागर है। गंतंत्रता दिवस (दिनाक २६/०१/२०१८ ) को रचित श्री संतोष जी को एवं उनकी कलम को नमन।)
कोणी आले पोटासाठी कोणी आले प्रेमासाठी,
कोणी कुटुब जगविण्यासाठी तर कोणी देशभक्तीसाठी.
नऊ महीने पोटात वाढला, नऊ महीने मैदानात झिजला,
खडतर प्रशिक्षण पुर्ण करुनी तो झुजण्या पोलीस झाला.
जनसेवाची नशाच चढली आठवण कुटुबाची मनातच विरली.
कधीखुन कधीदरोडा तर कधी दगलीत दगड अंगावर आली.
भिती त्याच्या ना डोळ्यात ना मनात कर्तव्यतही ना दिसली.
करीता तपास त्याची लेखनी अन काया नाही कधी दमली.
चौकीलाच घर माने जनतेतच मायबापाचा शोध असे डोळी.
मुला बाळाची आठवण येता ना आश्रु ढाळी आनंदानी गिळी.
पत्नीच्या विरहात जरी त्याची जात असे रोजच रात्र काळी.
तरीही जोमाने कार्यास लागे रविच्या साक्षीने रोज सकाळी.
तो यंत्र आहे का देव कसला हा अजब मानव प्रश्न मज पडे
कीती प्रकारची कामे करती त्याचे मोजमाप नाही कोणाकडे.
करता तपास रात्रदिनी कोणी बंदोबस्तात सदैव असते व्यस्त.
कोणी नक्षल्याची झुजते त्याच्या कामाला कधीच नाही अस्त.
कोणी जखमी दगड फेकीत कोणी अतंकवाद्याच्या गोळ्यात,
कोणी भुसुरुगात गेले गाडुन कोणी नक्षल्याच्या चकमकीत,
तरीही त्याची माघार नसे कर्तव्यत दुःख लपवत अश्रु गिळत,
जनतेसाठी भावनांचे बलिदान देत आनंदाने होतो तो शहीद.
ज्यांच्या बलिदानावर कुटुब आपले सुरक्षित आम्ही जगतो.
त्याच्याच त्यागाच्या अश्रुवर आम्ही सणवार साजरे करतो.
आपण मात्र सुखात आपल्या ते बलिदान क्षणात विसरतो.
तो मात्र हा विचार नकरता विरहातही कार्यतत्परतेने करतो.
राज्या राखीव बल असो वा गडचिरोलीचा जहाबाज पोलीस.
मुबईचा असो वा रेल्वे, ग्रामीण, माझा महाराष्ट्रचा तो पोलीस.
प्रत्येकाचे आहे बलिदान मोठे, आम्हासाठी दुसरा पर्याय कुठे,
‘सदरक्षणाय खल निग्रहनाय’ हे ब्रीद त्याचे आचारातही वठे
क्षणा क्षणाला मी त्याचे हे बलीदान खाकीत स्वताही स्मरतो.
खाकीलाच शान मानतो जनतेसाठी, तिरंग्यासाठी जीव देतो.
माझा असे त्रिवार मुजरा धन्यावाद त्याचे व देवाचे मानतो.
या जन्मी मला तु केला पोलिस पुढिल जन्माची वाट पाहतो.
(संभवतः विश्व में ऐसा कोई भी मनुष्य नहीं होगा जिसका पुस्तकों से परोक्ष या अपरोक्ष न रहा हो। सुश्री ज्योति हसबनीस जी e-abhivyakti के प्रारम्भिक साहित्यकारों में से एक हैं, जिनका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है। आपकी यह कविता हमें बचपन से हमारे पुस्तकों से निर्बाध सम्बन्धों का स्मरण कराती हैं।)
पुस्तकांशी नातं लहानपणीच जडलं
चांदोबा वेताळ कुमार ने घट्ट घट्ट केलं
पऱ्यांच्या राज्यात मुक्त संचार
तर कधी जादुच्या सतरंजीवर होऊन स्वार किर्र जंगल घातले पालथे तर ऐटीत चढलो डोंगरमाथे ,
कधी मैफल जमली हिमगौरी अन् सात बुटक्यांची
तर चाखली गंमत फास्टर फेणेच्या सायकल शर्यतीची
तिरसिंगरावाच्या कुस्तीत हरवून गेलो
तर मॅंड्रेकच्या संमोहनात हरखून गेलो
ब. मों. नी साकारलेल्या शिवशाहीने मोहून गेलो
तर ह. ना. आपटेंच्या सूर्यग्रहणाने दु:खी झालो
बोकिल द. मांच्या मिष्कीलीत खळाळून हसलो तर पुलंच्या हसवणूकीत पार विरघळलो
विंदा, बोरकर, शांताबाईंच्या कवितेचे सूरच आगळे होते
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अत्यंत भावप्रवण कविता। जीवन के सत्य को अपनी गंभीर एवं दर्शनिक दृष्टि से चुने हुए शब्दों के साथ इस रचना को रचने के लिए आपकी कलम को नमन।)
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा रचित e-abhivyakti में प्रथम बाल गीत *उन्हाळी सुट्टी* प्रस्तुत है। मुझे पूर्ण विश्वास है कि आपको भी अपनी गर्मियों की छुट्टी याद आ ही जाएगी। इस बालगीत के लिए हम कविराज विजय यशवंत सातपुते जी के हृदय से आभारी हैं।)