मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाला विनवणी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🌨️🙏 देवाला विनवणी! 🙏🌧️ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

खळ नाही आभाळाला

अविरत धरलीस धार

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर!

*

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

वावरात शिरे पाणी

तोडूनिया त्याची मेर!

*

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना!

*

कर उपकार आम्हांवर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो?

सांग कशास पळवतो?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तयात वेगळाल्या छटा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तयात वेगळाल्या छटा… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मुळे यांची जमिनीखाली

जमिनीच्या वरती वाढ

वेगवेगळे पान आकार

वेगळे असे प्रत्येक झाड

*

फुलरंग पिवळेच तरी

तयात वेगळाल्या छटा

आकार फुलांचे वेगळे

मनमोहक गंधांच्या लाटा

*

वंश एक जातही एकच

एक सर्वांची गंध कुळी

एकतरी जवळी असावा

सकाळ असो वा सायंकाळी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सद्गती… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सद्गती… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

(गझल स्वरूप)

ना गताची खंत

ना भविष्याची चिंता चालू आहे तसे राहू दे

सांग मज, प्रवाहात या टिकाव धरू कसा?

 

कुणी सोबतीस आहे

कुणी तोडले संबंध आहे

तूला जे योग्य वाटते, ते तू कर

सांग फक्त, मस्तीत मी माझ्या राहू असा?

 

आप्तस्वकीय रणांगणी

माझ्याच विरोधात उभे

गीता सांगून वळविले मन तूवा

मी अर्जून नाही, हे तूला पटवू कसा?

 

मीच माझा वैरी

मीच आहे विषयी, व्यसनी

पेरले तेच उगवले आहे

मृत्यूनंतर सद्गती मागू कसा?

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६५ – पितृअष्टक ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६५ – विजय साहित्य ?

☆ पितृअष्टक…!

पितृ पंधरवड्यानिमित्त पूर्वजांचे स्मरण !

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला

पुढे वारसा हा सदा वाढविला

अशा नम्र स्मरतो त्या पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||

*

इथे मान सन्मान सारा मिळाला

पुढे मार्ग तो सदा दाखविला

कृपा हीच सारी केली तयांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

*

मिळो सद् गती मज पितरांना

विनती हीच माझी त्रिदेवतांना

कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||

*

जोडून कर हे विनती तयांना

अग्नि वरूण वायु आदी देवतांना

सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||

*

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना

सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना

मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||

*

करूनी सिध्दता भोजनाची तयांना

पक्वान्ने आवडीनें बनवून नाना

सदा तृप्ती होवो जोडी करांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||

*

मनोभावे पुजूनी तिला, यवाने

विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने

आशिष द्याहो आम्हा सकलांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||

*

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा

न्यून काही राहाता माफी कराना

गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूक… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ भूक सुश्री नीलांबरी शिर्के 

लोकशाहीचे हीत साधत

त्याला मिळाले त्याच्या पुरते

पण तयांची भूकच मोठी

मागत दुज्या ताटातले ते

देणारा कसे देईल!

त्याच्या पुढचे ताट ओढूनी

जातपात आईमाय काढूनी

मिळेल कैसे झुंडशाहीनी!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोगाची एक भावुक सत्यकथा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विलक्षण योगायोगाची एक भावुक सत्यकथा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. मराठवाडय़ातील लातूर या गावात!! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!!

त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले.

आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच!!!

त्या काळात त्यांनी जे मन लावून शिकवले, ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते, तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच!!

तर एके दिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी  मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते, आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे.

त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!!

कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

आणि ही ती कविता – –

चंदनाच्या विठोबाची

माय गावा गेली

पंढरी या ओसरीची

आज ओस झाली

कोनाड्यात उमडून

पडे घरकुल

आज सत्य कळो येई

दाटीमुटीतील

काही दिसे भरलेले

रित्या बोळक्यात

गवसले आजवर

जे न रांजणात

~ बी. रघुनाथ

© डॉ. धनंजय देशपांडे, (dd) लातूर  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

यथा व्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥

अर्थ: आपल्या भक्तिलक्षणाकरिता नारदमहर्षी उदाहरण देतात – जशी गोकुळातील गोपिकांची (अवस्था होती.)

विवेचन: स्वतःचे भक्तिलक्षण नारद सोदाहरण पटवून देतात. कोणतीही महत्त्वाची भावना किंवा ज्ञान हे अमूर्तच असते. त्याच्या अभिव्यक्तीकरिता एखाद्या व्यक्त उदाहरणाची अपेक्षा असते. मूर्तात प्रविष्ट झाल्यावाचून अमूर्त प्रगट होऊ शकत नाही. नारदांनी ज्या भक्तीचे स्वरूप एकोणिसाव्या सूत्रात सांगितले, ती भक्ती उत्कटतेने पूर्ण रूपाने कोठे प्रगट दिसली असेल तर ती नारदांना गोकुळात दिसली. गोकुळातील पुरुष, स्त्रिया, गोप, बालक सर्वच भगवान श्रीकृष्णावर प्रेम ठेवणारेच होते. पण नारदोक्त भक्तिलक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी दिसला म्हणून त्यानी गोपिकांचेच उदाहरण घेतले आहे. नुसते ‘गोपिकानाम्’ म्हटले असते तर कोणत्याही मोठ्या नगरात गोप गोपिकाची वस्ती असते. पण ते भक्त नसतात. केवळ गोकुळातील व्रज भूमीतील गोपिकाच भक्त होत्या. म्हणून ‘व्रजगोपिकानां’ म्हटले आहे.

गोपिका म्हणतात, “हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे.” मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात.  आपल्या इंद्रियांच्याद्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.

‘गोपायति’ इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.

नाथ भागवतात गोपींचे वर्णन पुढील प्रमाणे आले आहे.

*”गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।

रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥

*

त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।

तैं परतल्या म्हणोनि ‘नेति नेति’ । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥

*

विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।

असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥

*

जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख ।

श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥

*

त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती ।

रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, ‘तुम्ही शोक करू नका.’ द्वापार युगात तुम्ही गोपी व्हाल, त्यावेळी मी आपली इच्छा पूर्ण करेन.

.गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करीत असत. गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते.

गोपींच्या प्रेमाचे वर्णन माउलींनी आपल्या विहरणी मध्ये केले आढळते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,

धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥

चांदवो चांदणे चापे वो चंदनु ।

देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।

कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥

सुमनांची सेज शीतळ वो निकी ।

ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्तीसूत्र – क्र. २१

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घुंगराची गाडी आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ घुंगराची गाडी आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

गाडी घुंगराची आली माझ्या माहेराची

गाडी घुंगराची आली माझ्या माहेराची..

माया किती माझ्यावर भाऊरायाची…

*

किनखापी पडदा हो गाडीला मलमलीचा

चढायला ठेवला मला मखमली गालीचा

काटा नको टोचायला काळजी बहिणीची

गाडी घुंगराची…

*

सर्जा गर्जा धावतात चाल ती दुडकी

हळूच मी बघते हो उघडून खिडकी

ज्वारी बाजरीचं शेते हिरव्या पदराची..

गाडी घुंगराची…

*

हेरमळा वाजे चाक कुई कुई कुई

भाचे म्हणतील आता आली माझी फुई

घाई घाई घेऊन मी काकवी मळ्याची..

चाखतील पोळीसवे जात लेकरांची…

*

अलाबला घेईल ती वहिनी माझी गोड

रसरसली आहे जणू आंब्याची ती फोड

सरबराई कराया धावते वन्सची

जागा जणू घेतलीया तिनं हो आईची.

घुंगराची गाडी आली माझ्या माहेराची…

*

पाहताच भावाला मी हासते खळाखळा

उभ्या उभ्या पिकतो हो हास्याचा तो मळा

सर नाही माहेराला दुज्या त्या गावाची..

घुंगराची गाडी आली…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोल ना गं अबोली… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बोल ना गं अबोली…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

बोल ना ग अबोली माझ्याशी जरा

नाजूक साजूक तुझा नखरा

*

नवरीसाठी तुझा खास गजरा

माहेरचा मान तुला आहेच खरा

*

चार रंगाची चांदणी खुळी

मऊ मुलायम तुझी पाकळी

*

गुलाबी हिरवी अबोली पिवळी

वाऱ्यावर डुलते सोनसळी

*

नाव तुला शोभते फटाक्याचे फुल

कदंबे विणताना मना पडे भूल

*

कागड्याची फुले मोगऱ्याच्या संगे

दुरंगी विणताना अबोली रंगे

*

परसात तुझे ताटवे फुलती

वैद्याचे गुण अंगी केवढी महती

*

बालपण हसले तारुण्य रुजले

तुझ्या संगती जीवन सजले

*

शब्द आज माझे झाले दिवाणे

अबोलीसाठी हे काव्य नजराणे

*

कविता सजली पानात रुजली

कुंतल सजवून ती कुजबुजली

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पूर्वज… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पूर्वज… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

गणेश विसर्जन झाले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पंधरा दिवस पूर्वजांच्या नावाने

पिंड घालणे, चांगले चुंगले खाणे

कावळ्यांना महत्व देणे

वर्षभर का मग दुर्लक्षिलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पूर्वज होते तेव्हा केली का हो सेवा

उलट पदोपदी प्रार्थना लवकर सोडव रे देवा

कावळ्यांना तरी कधी देता का मेवा

नकोत त्यांना भाव नुसते दाखवलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

आता तरी ऐका  म्हणणे त्यांचे

हेच पंधरा दिवस पुन्हा सान्निध्याचे

माना की हे दिवस पण पुण्याईचे आशीर्वादाचे

अशुभ का समजता या पंधरवड्यातले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares