मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ७ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ७ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(याबाबत ही एक कथा आहे. संन्यास स्वीकारण्यासाठी शंकराचार्यानी आपल्या आईची अनुमती मागितली. त्यावर आई त्यांना म्हणाली, तू संन्यास घेतल्यावर माझा अंत्यविधी तुला करता येणार नाही. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला संन्यास घ्यायचाच असेल तर माझ्या मृत्यूनंतर घे. यावर मी संन्यास घेतला तरी तुझा अंत्यसंस्कार जरूर करीन, असे वचन आईला देऊन संन्यासासाठी तिची अनुमती मिळवली.) – इथून पुढे – – – 

ज्यावेळी त्यांच्या मातेचा अंत झाला त्यावेळी संन्यासी बनलेले शंकराचार्य आईच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आले. त्यावेळेस संन्याशाने अंत्यसंस्कार करणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे असे सांगून तत्कालीन सनातनी रूढीप्रिय धर्ममार्तंडानी प्रेत स्मशानात नेण्यात शंकराचार्यांना विरोध केला. शंकराचार्यांच्या जातभाईंनी प्रेत उचलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी आपल्या घराच्या अंगणातच चितारचून आईच्या मृत शरीराला अग्नी दिला. त्यावेळी चोली आणि मुकाणी जातीच्या दोन ब्राह्मणांनी त्यांना साथ दिली. या ब्राह्मणांना बद्रीनाथाच्या पूजनाच्या अधिकार देऊन शंकराचार्य त्यांच्या ऋणातून मुक्त झाले. आजही याच ब्राह्मणांच्या वंशात बद्रीनाथाच्या पूजनाचे अधिकार वंशपरंपरेने चालत आले आहेत.

बद्रीनाथ गढवाल नरेशांचे कुलदैवत होय. गढवालची राजगादी ही भगवान बद्रीनाथाची होय या भावनेने त्यांनी राज्यकारभार केला. बद्रीनाथ मंदिराच्या पुजाऱ्यास रावळ असा किताब त्यांनी बहाल केला. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थेत चलावी यासाठी १४० गावातील सरकारी जमीन देणगी दाखल मंदिरास बहाल केली. त्याद्वारे लाख दीड लाखाचे उत्पन्न मंदिरास मिळते. याशिवाय दानशूर भक्तांकडून देणग्या मिळतात. त्यातून मंदिराची पूजाअर्चा, प्रसाद, रावळ व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा पगार भागविला जातो. पंधराव्या शतकात टेहरीच्या गढवाली राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला. सध्या मंदिराचा कारभार टेहरी संस्थानाच्या वतीने पाहण्यात येतो.

बद्रीनाथ मंदिर मे मध्ये उघडते व दिवाळीनंतर बंद होते. मंदिर बंद करताना पूजा करून तुपाचा दिवा लावून ठेवतात. सहा महिने मंदिर बर्फात निद्रिस्त असते. बर्फ वितळल्यावर मे मध्ये ज्यावेळी मंदिर उघडले जाते त्यावेळी दिवा तसाच जळत असतो, पूजेतील फुले टवटवीत असतात. बंद काळात नारद गुप्त रूपाने पूजा करतात, लक्ष्मी दिवा लावते अशी भक्तांची श्रद्धा आहे. बंद काळात येथे कोणीही राहत नाही. मंदिर बंद करते वेळी एक किलो शुद्ध गाईचे तूप घेतात. त्यापैकी काही तूप मूर्तीवर चोळले जाते, त्यावर पातळ वस्त्र चिकटवले जाते. त्यानंतर राहिलेल्या तुपात एक किलो तांदूळ कालवून कापसाची वात बाहेर काढून एका डब्यात भरतात. वात पेटवून आरती करून मंदिर बंद करतात. सहा महिन्याने मंदिर उघडल्यावर दिवा जसाच्या तसा जळत असतो. हे दिव्य ज्योती दर्शन पाहण्यासाठी मंदिर उघडण्याच्या दिवशी यात्रेकरूंची मोठी गर्दी बद्रीधामात होते.

महाभारत व इतर अनेक पुराण ग्रंथात बद्रीनाथांसंबंधी अनेक उल्लेख आहेत. भगवान विष्णू द्वापार युगात श्रीकृष्ण व अर्जुनाच्या रूपाने प्रकट झाले. दक्षाच्या तेराव्या मुलीचा विवाह धर्माबरोबर झाला. तिच्यापोटी सत् युगात मानव कल्याणासाठी विष्णूने नर आणि नारायणाच्या रूपाने जन्म घेतला. अलकनंदेच्या किनाऱ्यावरील ज्या पर्वतावर त्यांनी तप केले त्यांना नर आणि नारायण पर्वत अशी नावे पडली. नर नारायणांनी ऋषीमुनी व मानव जातीला त्रस्त करणाऱ्या सहस्त्र कवचधारी राक्षसांचा वध केला. मानवी कल्याणासाठी महाभारत आणि अठरा पुराणे रचण्याची प्रेरणा नारायणांनीच व्यासांना दिली. स्कंद पुराणात बद्रिक्षेत्राची चार नावे आहेत. द्वापार युगात विशाला, त्रेता युगात योगसिध्दा, सत् युगात मुक्तीप्रदा व कलियुगात बद्रीनाथ अशा नावांचे उल्लेख स्कंद पुराणात सापडतात. कलियुगात मानवाला श्री विष्णूचे साक्षात दर्शन होणार नाही म्हणून ते मूर्ती रुपात या ठिकाणी प्रकटले. बद्री म्हणजे बोर. पूर्वी या परिसरात काटेरी बोरीची झाडे विपुल होती. या झाडांना येणारी बोरे ऋषीमुनी भक्षण करीत. या बोरांमुळे त्यांच्या शरीरात अनेक दिवस टिकणारी ऊर्जा निर्माण होत असे. त्या कारणाने ते अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकत. तप:साधनाप्रसंगी नरनारायणावर बोरीच्या झाडाने सावली धरली अशी अख्यायिका आहे. बोरीच्या वनातला नारायण म्हणून भगवान विष्णू बद्रीनारायण झाले. बद्रीवनाचा विस्तार १२ योजने (एक योजन म्हणजे चार मैल) लांब व तीन योजने रुंद होता. बदरीशपुरी ऐश्वर्य व सुख शांती देणारे तीर्थस्थान आहे. बद्रीनाथ यात्रा करणाऱ्यास पुनर्जन्म लाभत नाही. या पुण्यदायी यात्रेने सर्व पापांचा नाश होतो, विकार वासना संपून जातात. आत्मशुद्धी होते. ‘जो जाईल बदरी न येईल तो उदरी’ अशी मराठीत एक म्हण आहे.

बदरी विशाल या नावामागची वराह पुराणातील एक कथा आम्हास येथे ऐकायला मिळाली. सूर्यवंशी राजा विशाल शत्रूकडून पराजित झाला. त्याचे राज्य त्याच्या शत्रूंनी बळकावले. तो दुःखी झाला. त्या अवस्थेत तो हिमालयात आला. भक्तिभावाने त्याने बद्रीनाथाचे पूजन केले. बद्रीधामपूरीतील गंधमादन पर्वतावर जाऊन बद्रीनाथाच्या कृपेसाठी तपाचरण केले. त्याची भक्ती पाहून बद्रीनाथांनी त्यास दर्शन दिले. आपले राज्य पुन्हा मिळवून देण्याचे कृपा व्हावी अशी विनंती भगवान बद्रीनाथाजवळ राजाने केली. बद्रीनाथने राजाला सामर्थ्य व निर्भयता प्रदान केली. त्यामुळे राजाला राज्य पुन्हा मिळाले. तसेच तुझ्या अढळभक्तीमुळे माझ्या नावापुढे लोक तुझे नाव लावून जयजयकार करतील असाही वर दिला. तेव्हापासून जय बद्री विशालकी असा जयघोष सुरू झाला. हॉटेलवर आलो तर साबुदाण्याची गरम गरम खिचडी तयार होती. ती खाऊन आम्ही जवळच असलेल्या माणा गावी जायचे ठरविले. त्यासाठी आम्ही एक टॅक्सी बुक केली. माणा हे गाव बद्रीनाथ पासून तीन कि. मी. अंतरावर असून तिबेट सीमेपासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी हे गांव भारतातील शेवटचे खेडे म्हणून ओळखले जायचे. पण पंतप्रधान मोदीजींनी त्याचे नामकरण भारताचे प्रथम खेडे असे केले. गावची लोकसंख्या फक्त १२०० असून हिवाळ्यात हे सर्व लोक सखल प्रदेशात स्थलांतरीत होतात; कारण हा भाग त्यावेळी पूर्णपणे बर्फाच्छादित असतो. हे गांव पौराणिक कथांचे संदर्भ, महाभारतातील घटनांचे संदर्भ तसेच अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ९. ३० वाजता माणा गावच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. प्रवेशद्वारावर ‘First Indian village Mana:भारत का प्रथम गांव माणा’ अशी इंग्रजी व हिंदीत पाटी लावली आहे. तिच्या पार्श्वभूमीवर आम्ही फोटो काढून घेतले. टॅक्सीवाल्याने आम्हाला पार्किंगमध्ये ड्रॉप केले. तेथून आम्ही पिट्टू केले व दर्शनीय ठिकाणे पाहण्यास निघालो.

‘First Indian village Mana’ 

प्रथम आम्ही पाहिली ती गणेश गुफा. येथेच महर्षी व्यासांनी श्री गणेशास महाभारताचे श्रुतलेखन सांगितले होते. त्याचे असे झाले: महर्षी व्यासांनी महाभारताची रचना करायचे ठरवले. ते अत्यंत वेगाने विचार करीत. एव्हढ्या जलद कोण बरे लिहून घेणार? असा ते विचार करू लागले. त्यांना श्री गणेशाचे नाव सुचले. त्यांनी गणेशास विनंती केली. त्याने ती मान्यही केली. पण त्याने एक अट घातली. ‘मी तुम्ही ज्या वेगाने सांगाल, त्या वेगाने लिहून घेईन, पण तुम्ही सांगताना अजिबात थांबायचे नाही. ज्या क्षणी तुम्ही थांबाल, त्या क्षणी मी लिहायचे सोडून निघून जाईन. ’ महर्षी व्यास विचार करू लागले. ‘श्री गणेशाएव्हढा जलद लिहिणारा लेखनिक आपणास शोधून सुद्धा सापडणार नाही. पण त्याच्या या अटीचे काय बरे करावे? ’ तेव्हाढ्यात त्यांना एक कल्पना सुचली. ते गणेशाला म्हणाले, ”तुमची अट मला मान्य आहे, पण माझीही एक अट आहे. मी जे सांगेन ते आपण फक्त लिहायचे नाही, तर त्याचा अर्थ समजून घेऊन घेऊन मगच ते लिहायचे. ’ गणेशाने ती अट मान्य केली. महर्षी व्यास महाभारत सांगू लागले. गणेशांना त्याचा अर्थ लागून ते लिहितात तो पर्यंत व्यास मुनींना पुढील मजकूर सुचत असे. अशा प्रकारे महाभारताचे लिखाण पूर्ण झाले. मंदिर प्राचीन असून मंदिरात श्री गणेशाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्ग भुयारी आहे. दर्शन घेऊन आम्ही सरस्वती नदीचचे उगमस्थान पहायला गेलो. येथे सरस्वती नदी उगम पावते, मोठा आवाज करीत दरीत कोसळते व तिथेच लुप्त होते. मान्यता अशी आहे की, ज्यावेळी गणेशजी महाभारताचे लिखाण करीत होते त्यावेळी त्याना सरस्वतीनदीच्या आवाजाचा त्रास होऊ लागला. त्यांना त्रास होऊ नये म्हणून ती लगेचच लुप्त झाली. सरस्वती नदीवरच एक भलीमोठी शिळा आहे, तिला भीम पूल असे संबोधिले जाते. अशी मान्यता आहे की, ज्यावेळी पांडव स्वर्गात निघाले होते, त्यावेळी सरस्वती नदी त्यांचे मार्गात येत होती. द्रौपदीला नदी ओलांडणे सुलभ व्हावे म्हणून भीमाने नदीवर एक शिळा टाकली. तिच्यावरून जाऊन द्रौपदीने नदी पार केली. भीम पूल ओलांडून आम्ही सरस्वती मंदिर बघायला गेलो. हे मंदिर भव्य व अतिशय सुंदर आहे. मंदिराची निर्मिती MIT विश्वशांती विश्वविद्यालय, पुणे यांनी केली आहे. मंदिरात सरस्वती देवीची अत्यंत देखणी मूर्ती आहे. सोबतच विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती देखील आहेत. या मंदिराच्या अनावरण प्रसंगी MIT विश्वशांतीचे संस्थापक प्रो. विश्वनाथ कराड, प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ विजय भटकर, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हजर होते. भीमपूल ओलांडल्यावर एक कमान लागते. त्यावर ‘स्वर्गारोहण मार्ग’ असे लिहिले आहे. हा तोच मार्ग आहे ज्यावरून पांडव व द्रौपदी स्वर्गप्रती जाते झाले. आम्ही त्या कमानीतून पलीकडे गेलो.

पलीकडे यूधिष्ठिराचे श्वान तसेच द्रौपदीसह पाच पांडवांच्या १२ फूट उंचीच्या सोनेरी रंगाच्या मूर्ती आहेत. मान्यता अशी आहे की, श्री कृष्णाच्या मृत्यूनंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला राज्य सोपवून पाची पांडव व द्रौपदी नर नारायण पर्वतावरून आपली स्वर्गाकडे जाण्याची यात्रा सुरू केली. मार्ग दऱ्याखोऱ्याचा व घनदाट अरण्याचा होता. चालता चालता द्रौपदी तोल जाऊन दरीत पडली व मृत्यू पावली. कांही वेळानंतर सहदेवाचाही तोल गेला व तो मृत्युमुखी पडला. त्यापाठोपाठ नकुल, अर्जुन व भीमही मृत्यू पावले. शेवटी फक्त धर्मराज व त्याचा विश्वासू श्वान स्वर्गात पोहोचले जेथे इंद्रदेवाने त्यांचे स्वागत केले. स्वर्गारोहण मार्ग परिसरातच चहाच्या कांही टपऱ्या आहेत. त्यांवर ‘हिंदुस्तानकी आखरी चायकी दुकान’ असे पूर्वी लिहिले होते, त्यातील ‘आखरी’ शब्दावर काट मारून तिथे ‘प्रथम ’ शब्द लिहिलेला दिसला.

इथे लोकरीचे कपडे चांगले मिळतात. त्यामुळे स्त्रीवर्गाने इथेही शॉपिंग केले. पिट्टूत बसून आम्ही पार्किंग पर्यंत आलो. तेथून सकाळच्या टॅक्सीने साधारण अडीच वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो.

 त्या दिवशी विश्रांती घेऊन ६ जूनला सकाळी ६. ३० वाजता हरिद्वारला जायला निघालो. रात्री आठ वाजता हरिद्वारला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बरीचशी मंडळी मनसादेवीच्या दर्शनाला गेली. पण सौ ची तब्येत जरा नरम असल्याने आम्ही गेलो नाही.

 ७ जूनला जेवण करून सकाळी अकरा वाजता आम्ही दिल्लीला जायला निघालो. संध्याकाळी सहा वाजता दिल्लीला पोहोचलो. ड्रायव्हरने आम्हाला साधारण स्टेशनजवळ सोडले. सर्व सहकाऱ्यांचा व पुसेगावकर दांपत्याचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला जाणारे सातजण दोन रिक्षांनी स्टेशनला आलो. आमची पुणे समर स्पेशल ट्रेन रात्री १०. १० ला होती. आम्हाला रात्रीचे जेवण बांधून दिले होते. ते आम्ही गाडीत खाल्ले. गाडी आठ जूनला रात्री ११. ५५ ला पुण्याला पोचणार होती. पण समर स्पेशल असल्याने प्रत्येक स्टेशनवर हिला मागे ठेऊन रेग्युलर गाड्या पुढे सोडल्या जात होत्या. पूर्वीच्या प्लॅन प्रमाणे आम्ही एक दिवस चि. मुग्धाकडे थांबून नऊ तारखेला दुपारी किंवा दहा तारखेला सकाळी सांगलीला जाणार होतो. पण असे तसे जागरण होणारच आहे व अनायसे कनेक्टिंग ट्रेन आहेच, तर सांगलीला जाऊनच विश्रांती घेऊ असा आम्ही विचार केला व नऊ तारखेच्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे बुकिंग आम्ही हरिद्वार सोडल्यावरच केले होते. आमची सांगलीला जाणारी कनेक्टिंग ट्रेन रात्री ३. ४० ला होती. ती मिळते की नाही अशी धाकधूक वाटू लागली. रडत खडत पुणे समर एक्सप्रेस नऊ तारखेच्या पहाटे ३. ३५ ला पुण्याला पोचली. नशिबानं आमच्या लगतच्या प्लेटफॉर्मवरच महाराष्ट्र एक्सप्रेस लागली होती. पळत पळत कशीबशी ती पकडली व नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सांगलीला पोचलो. आम्हाला घ्यायला जावई आले होते, त्यांच्या गाडीत बसून घरी पोचलो. अशा पद्धतीने आमची चारधाम यात्रा सफल संपूर्ण झाली.

– समाप्त –

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ६ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ६ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

दुसरी एक कथा पांडवांच्या संबंधात आहे. या कथेतून केदारनाथ मंदिराशी त्यांचा निकटचा संबंध जाणवतो. पांडवांकडून महाभारतातील महायुद्धात भाऊबंद, गुरुजन व ब्राह्मण पुत्रांची हत्या झाल्याचे पातक घडले. या पापातून मुक्त होण्यासाठी व्यास ऋषींचे सांगण्यावरून ते भगवान शंकराच्या दर्शनासाठी काशीला गेले. पांडवांची भक्ती पारखण्यासाठी काशीत त्यांना दर्शन न देता भगवान शंकर हिमालयात गुप्त काशीला येऊन गुप्त रूपाने राहू लागले. पांडव त्यांच्या शोधार्थ गुप्त काशीला येऊन पोहोचले. पांडवाना पाहून शंकर गुप्त रूपाने गौरीकुंडापाशी प्रकटले. अंतर्ज्ञानी पांडव त्वरित गौरीकुंडाकडे आले. तेथून शंकराने केदार शिखराकडे पोबारा केला. शंकर दर्शनाच्या उत्कट इच्छेने भारावलेले पांडव दगड धोंड्यातून वाट काढीत केदार भूमीवर पोहोचले. पांडव दिसताच रेड्याचे रूप घेऊन ते चरू लागले. परंतु चाणाक्ष भिमाने रेडा रूपातील भगवान शंकराला ओळखले. सर्व पांडव दर्शनासाठी पुढे धावले. त्या क्षणी प्रचंड शिलाखंडाचे रूप घेऊन भगवान शंकर भूमीत प्रवेश करू लागले. भीमाने धावत जाऊन भूमीत गडप होणाऱ्या शंकराला पकडण्याचा प्रयत्न केला. बहुतेक भाग भूमीत प्रवेशला होता फक्त पाठीचा भाग भीमाच्या हाती सापडला. सर्व ताकत एकवटून आपल्या बलवान बाहूंनी भीमाने हा भाग पकडून ठेवला. त्यामुळे हा भाग तसा जमिनीवर राहिला तेच त्रिभुजाकार केदारलिंग होय. भूमीत गेलेले बाकी भाग तुटून ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. डोळे नेपाळमध्ये निघाले; त्याला पशुपतिनाथ म्हणतात. बाकी शरीराचा भाग केदारनाथ परिसरात प्रकट झाला. मुख रुद्रनाथमध्ये, हात तुंगनाथमध्ये, नाभि मद् महेश्वर मध्ये व जटा कल्पेश्वरामध्ये प्रकट झाल्या.

हिमालयातील केदारनाथसह या चार तीर्थक्षेत्रांना पंचकेदार म्हणतात. या पंचकेदारांची यात्रा केल्यावर केदार यात्रा पूर्ण होते असे मानले गेले आहे. पांडवांची अढळ आणि उत्कट भक्ती पाहून भगवान शंकरांनी त्यांना प्रसन्नतेने दर्शन दिले. त्यांना पाप मुक्त केले. भगवान शंकरदर्शन स्मृती प्रित्यर्थ पांडवांनी त्रिभुजाकार शिवलिंगावर मंदिर बांधले. आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अशी या पवित्र केदारनाथ मंदिराची जन्म कथा आहे. कतुरी शैलीच्या या दगडी मंदिराची उंची ६६ फूट आहे. तांबड्या रंगाचे दगड चुन्याशिवाय बेमालूम सांधण्यात आले आहेत. दर्शनी दरवाज्यावर सूर्य देवाची प्रतिमा कोरण्यात आली आहे. मंदिरावर सुवर्णकलश आहे. भोवतालच्या हिमपर्वतांच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. आद्य शंकराचार्यांनी येथे तप:साधना करून हिंदू धर्माची पुनर्स्थापना व पुनर्रचना केली. त्यांचे जीवनकार्य संपल्यावर वयाच्या बत्तीसाव्या वर्षी याच पवित्र भूमीत त्यांनी देहत्याग केला. केदारनाथ मंदिरामागे शंकराचार्यांची समाधी आहे. एका शिलेवर शंकराचार्यांचा हात रेखांकित करण्यात आला आहे. याच ठिकाणी अतिप्राचीन इशानेश्वराचे अवशेष व शिलालेख सापडले आहेत. हिमालयातील पाच खंडांपैकी केदारखंड हा हिमालयाचा मध्यवर्ती भाग होय. या मध्यभागाच्या केंद्रबिंदूवर केदारनाथाचे मंदिर उभे आहे.

मंदिराच्या पूजाअर्चेसाठी टेहरीच्या राजाने काही गावातील जमीन देवस्थानला दान केली आहे. त्या अगोदरच्या काळात आद्य शंकराचार्यांनी केदारनाथाच्या पूजेची व्यवस्था केली होती. प्राचीन काळात हिमालयातील यक्ष-किन्नर केदारलिंगाची पूजा करीत. दक्षिणी जंगमाकडे केदारनाथाचे पौरोहित्य वंशपरंपरेने चालत आले आहे. शिवभक्त भुकुंड हा आपला मूळ पुरुष होय असे या मंदिराचे पुजारी म्हणतात. याबाबतचा इतिहास असा: पांडवकाळात स्वामी वीरभद्र नावाचा शिवगण होता. पांडवांच्या स्वर्गारोहण प्रसंगी त्याच्याकडून शिवाज्ञाचे उल्लंघन झाले. त्यावेळी तुला मानवजन्म घेऊन माझ्या अवज्ञेचे प्रायश्चित भोगावे लागेल, असा शाप भगवान शंकराने त्यास दिला. त्यावर वीरभद्राने आर्त स्वरात भगवान शंकरांची क्षमा मागितली. शंकरांचा क्रोधाग्नी क्षमला. ते प्रसन्नतेने वीरभद्रास म्हणाले, ”चौल देशातील वेदपाठी ब्राह्मणाच्या घरी तुझा जन्म होईल. पुढे तू भूकुंड नावाने प्रसिद्ध पावशील. त्यावेळी दृढभावाने माझी पूजाअर्चा करून माझ्या सहवासात येशील. ”त्यानुसार चौलमध्ये वेदपाठी ब्राह्मणाच्या घरात वीरभद्राचा जन्म झाला. ब्रह्मचर्य धारण करून तो वेदशास्त्र संपन्न झाला. भूकुंड मुनी या नावाने प्रख्यात झाला. काही दिवस वाराणशीत जाऊन अध्ययन करीत राहिला. तेथून तो गंगोत्रीला आला. तेथे त्याने तप:साधना केली. गंगोत्री वरून केदार नगरीत आला. येथे भगवान शंकराची मनोभावे भक्ती केली. अनेक शिवभक्तांनी भुकुंडांचे शिष्यत्व स्वीकारले. त्याने पंचकेदाराची यात्रा करून श्रद्धेने पूजन केले. केदारपुरीत त्याने कठोर तप केले. त्याच्या तपाने प्रभावित होऊन भगवान शंकरांनी त्यास दर्शन दिले. भूकुंडाने शंकराकडे एक वर मागितला, ”मला या मानवी देहातून मुक्त करून शिवगण म्हणून पुन्हा आपल्या सेवेत घ्यावे, तसेच केदारलिंगाच्या पूजनाची परंपरा माझ्या शिष्यांत सदैव चालत राहावी. ” भुकुंडाच्या विनंतीनुसार श्री शंकराने त्यास मानव देहातून मुक्त केले. केदारलिंगाच्या पूजाअर्चेची जबाबदारी भुकुंडाच्या शिष्यांकडे कायमची सोपवण्यात आली. तेव्हापासून हीच प्रथा चालू आहे. मंदिराच्या दक्षिण पुजाऱ्यांनी नंतर बद्रीनाथच्या पुजाऱ्यांप्रमाणे श्रीनगरच्या राजाकडून रावळ ही उपाधी घेतली. भुकुंडापासून आजतागायत झालेल्या केदारनाथच्या ३२० पुजारांची जाडजूड जुन्या वहीत केलेली नोंद पुरावा म्हणून उपलब्ध आहे. मुख्य रावळास विवाह करण्याचा अधिकार नाही, मात्र त्याच्या शिष्यांना तो आहे.

मे महिन्यात अक्षय तृतीयेला केदारनाथाचे मंदिर उघडते. दीपावली बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येतो. त्यानंतर येथे चिटपाखरूही राहत नाही. गौरीकुंडा पर्यंतचा साराप्रदेश बर्फमय होतो. रस्ते बुजून जातात. केदारनाथ मंदिर बर्फात समाधीस्थ होते. तप:साधना व ईश्वरी साक्षात्कारासाठी काही साधू या बर्फमय प्रदेशात अट्टाहासाने राहतात. सारी सामग्री अगोदर जमवितात. केदारनाथची यात्रा म्हणजे पृथ्वी, आकाश आणि सूर्य या त्रिनेत्ररुपी ईश्वराची एक निसर्ग यात्रा होय. या निसर्गयात्रेत घनदाट वृक्षराजी आणि हिमशिखरांच्या दर्शनाने डोळे सुखावतात. महाकवी कालिदासाचे मेघदूत महाकाव्यच जगल्याची अनुभूती येते. या निसर्ग यात्रेतून निसर्गानंद आणि स्वर्गसुखाच्या प्राप्तीचे समाधान मिळते. ही आनंददायी निसर्गयात्रा प्रत्येकाने एकदातरी अनुभवावी.

बद्रीनाथ..

चार जूनला सकाळी आठ वाजता बद्रीनाथसाठी प्रयाण केले. अलकनंदेच्या काठाकाठाने बदरीधामाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळचे प्रसन्न वातावरण, हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी, धुक्याचा दुपट्टा लेऊन शेजारून वाहणारी अलकनंदा, मधूनच अवखळ वारा हा दुपट्टा ओढून वृक्षांच्या गळ्यात अडकवायचा, त्यावेळी दिसणारे अलकनंदेचे बदामी रंगाचे पाणी बघत बघत आमचा प्रवास सुरू होता. एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे चारी धामांकडे जाणारे रस्ते अप्रतिम आहेत, पण त्यांची रुंदी कमी आहे. कांही कांही ठिकाणी तर केवळ एकच चारचाकी जाईल एव्हाढाच रुंद!!  सव्वासहा वाजता विष्णुप्रयाग येथे चहापानासाठी थांबलो. हे क्षेत्र अलकनंदा व धौलीगंगा या नद्यांच्या संगमावर स्थित आहे. पंचप्रयागांपैकी हे प्रथम प्रयाग आहे. उरलेले चार प्रयाग म्हणजे नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग व देवप्रयाग होत. विष्णुप्रयाग हे क्षेत्र जोशीमठ-बद्रीनाथ रस्त्यावर चमोली जिल्ह्यात आहे. येथेच नारद मुनींनी घोर तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले होते. म्हणून या स्थळाचे नाव विष्णुप्रयाग असे पडले. येथील सुंदर असे अष्टकोनी विष्णुमंदिर १८८९ साली इंदोरच्या महाराणींनी बांधवले होते.

चहा-बिस्किटे घेऊन आम्ही बद्रीनाथकडे आगेकूच केली व साधारण आठ वाजता अलकनंदा नदीच्या काठावर असणाऱ्या बद्रीनाथला पोचलो. नारायण पॅलेस या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. प्रचंड थंडी होती जेवण करून झोपी गेलो.

पाच तारखेला पहाटे उठून हॉटेलबाहेर आलो. समोर बर्फाच्छादित हिमशिखरांचे मनोहर दर्शन घडले. ती शिखरे म्हणजे नर-नारायण पर्वत रांग आहे. ज्यामध्ये निळकंठ हे एक प्रमुख शिखर आहे. धुके नसल्याने त्याचे मनोहर दर्शन आम्हाला घडले.

अंघोळी वगैरे उरकून सात वाजता बद्रीनाथाच्या दर्शनाला निघालो. हॉटेल ते मंदिर अंतर दोन किलोमीटर एव्हढेच असले तरी रस्ता चढाचा असल्याने आम्ही पिट्टू ठरविले. हे पिट्टूवाले नेपाळी होते. पिट्टूवाल्याने मंदिरापर्यंत नेऊन तुम्हाला दर्शनही घडवतो असे सांगितले. वाटेत बाजारपेठ आहे. तिथे पूजासाहित्य वगैरेंची दुकाने आहेत. अलकनंदेवरील पूल ओलांडून व दगडी पायऱ्या चढून पिट्टूवाल्याने आम्हाला मंदिराच्या प्रांगणात आणले. जय बद्रिविशाल असा जयघोष करत यात्रेकरू रांगेत उभे होते.

 चित्रांत नेहमी पाहत असलेल्या बद्रिनाथाच्या देखण्या मंदिरासमोर आपण प्रत्यक्ष उभे आहोत हे अजूनही खरे वाटत नव्हते. स्वतःला चिमटा घेऊन कळ आल्यावर हे खर आहे हे पटलं. मंदिर अतिशय भव्य असून पशुपक्षांच्या विविध शिल्पकृतींनी नटलेले, रंगीबेरंगी व अतिशय देखणे आहे. प्रवेशद्वारावर चौघड्यासाठी मंडप असून त्यावर तीन सुवर्ण कळस आहेत. आम्हाला पिट्टूवाल्याने पहिल्यांदा गेट नं २ ला नेले व तेथील सुरक्षा रक्षकांना आम्हाला आत सोडण्याविषयी सांगितले. बऱ्याच विनंत्या करूनही रक्षकाने आम्हाला सोडले नाही, पण गेट नं ३ ला जाण्यास सांगितले. गेट नं ३ समोर बराच वेळ उभे राहिलो. दिंडी दरवाज्यातून आतील डोअर कीपर्स आम्हाला दिसत होते. आमच्या पिट्टूवाल्यांनी हजारो विनंत्या करूनही ते आमच्याकडे किल्ली नाही, ज्यांच्याकडे किल्ली आहे ते लवकरच येतील असे बहाणे करत राहिले. आम्ही परत मंदिराच्या प्रांगणात आलो. तेथे आल्यावर असे समजले की दोन हजार रुपयांचे स्पेशल कूपन काढल्यावर आपल्याकडून अगदी बद्रीनाथांच्या मूर्तीसमोर बसून पूजा करून घेतली जाते. आम्ही तिकीट काढले व बाजूच्या दरवाज्याने सभामंडपात प्रवेश केला. सभामंडपात कुबेर, गरुड आदिंच्या अतिशय सौंदर्यशाली कलापूर्ण भव्य मूर्ती आहेत. आमचा नंबर आल्यावर आम्ही गाभाऱ्यासमोर जाऊन बसलो. शाळिग्राम शीलेची बद्रीनाथजींची मूर्ती तीन फूट नऊ इंच आहे. आम्हाला नशिबाने ओरिजिनल मूर्ती पहायला मिळाली. या मूर्तीत परीस बसवलेला आहे असे म्हणतात. केदारनाथ सारखे गर्भगृहात जाऊन मूर्तीचे स्पर्श दर्शन घेऊ दिले जात नाही. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस नरनारायण, कुबेर व नारदाच्या मूर्ती आहेत. गुरुजींनी संकल्प सांगून आमचेकडून यथासांग पूजा करून घेतली. बरोबर आणलेले चांदीचे तुळशीपत्र आम्ही बद्रीनाथांना वाहिले. आम्हाला अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. पूजा करून बाहेर आलो.

परिक्रमा मार्गावर घंटाकर्णाची विशाल मूर्ती आहे. हा बद्रीनाथांचा द्वारपाल होय. तसेच श्री लक्ष्मी, श्री गणेश, लक्ष्मण यांची सुंदर छोटी मंदिरे मंदिराच्या आवारात आहेत. मागे शंकराचार्यांची गादी आहे. तेथे एका चित्रकाराने काढलेले शंकराचार्यांचे अतिशय प्रसन्न चित्र आहे. प्रदक्षिणा घालून साडेआठ पर्यंत आम्ही रूमवर परतलो.

हरिद्वारला आम्हाला कल्पना देखील नसतांना आमच्या कडून गंगामय्येची आरती करून घेतली गेली, केदारनाथला गर्भ गृहात जाऊन आम्हाला स्पर्श दर्शन घेता आले, आज अगदी चार फूट अंतरावरून आम्हाला बद्रिनाथांची पूजा करता आली. कोणी विश्वास ठेवो वा ना ठेवो, माझे पक्के मत बनले आहे की, या सर्व गोष्टी नशिबातच आसाव्या लागतात. देवच आपणाकडून या सर्व गोष्टी करवून घेत असतो. नाहीतर बघा ना, आमच्या ग्रुप मधीलच एक नवराबायको केदारनाथचा चढ डोलीने चढले पण त्यांची बायको आजारी पडल्याने त्याना केदारनाथांचे दर्शन कांही घडले नाही. अशी बरीच उदाहरणे आपण नित्य बघत असतो.

बद्रीनाथाचे मंदिर कोणी व कधी बांधले याचा इतिहास उपलब्ध नाही. परंतु शंकराचार्यांनी लिहिलेला एक संस्कृत श्लोक मंदिरात सापडला आहे, त्यावरून बद्रीनाथाचे मंदिर अडीच हजार वर्षांपूर्वी बांधलेले आहे याचा उल्लेख सापडतो. पूर्वी देवगण, सिद्ध, गंधर्व व ऋषीमुनी बद्रीनाथाचे पूजन करीत. सदर मंदिर शंकराचार्यांनी बांधले असे काहीजण म्हणतात. परंतु शंकराचार्य आठव्या शतकात झाले. त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे प्राबल्य वाढून हिंदू धर्म मृतप्राय झाला होता. बौद्ध धर्मियांनी बद्री मंदिरातील बद्रीनाथाची मूर्ती तप्तकुंडात फेकून दिली होती. या मूर्तीबाबत शंकराचार्यांना दृष्टांत झाला. त्यांनी सदर मूर्ती तप्तकुंडातून काढून त्याची प्रतिष्ठापना केली. बद्रीनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे पौरोहित्य दक्षिणेकडील नंबुद्रीपाद ब्राह्मणाकडे आहे. याबाबत ही एक कथा आहे. संन्यास स्वीकारण्यासाठी शंकराचार्यानी आपल्या आईची अनुमती मागितली. त्यावर आई त्यांना म्हणाली, तू संन्यास घेतल्यावर माझा अंत्यविधी तुला करता येणार नाही. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला संन्यास घ्यायचाच असेल तर माझ्या मृत्यूनंतर घे. यावर मी संन्यास घेतला तरी तुझा अंत्यसंस्कार जरूर करीन, असे वचन आईला देऊन संन्यासासाठी तिची अनुमती मिळवली.

– क्रमशः भाग सहावा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ५ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ५ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आमची चार धाम यात्रा…

गंगेच्या सांगण्यानुसार भगीरथाने सुमेरू तथा सतोपंथ हेमशिखरावर भगवान शंकरासाठी तप सुरू केले. वर्षांमागून वर्षे लोटली. भगीरथाचे तप चालूच राहिले. भगीरथाच्या तप:प्रभावाने भगवान शंकराचे आसन डगमगू लागले. त्यांची समाधी भंग पावली. भगीरथाच्या समोर येऊन ते उभे राहिले. वरं ब्रूही म्हणाले. भगीरथाने सर्व निवेदन करून गंगेस धारण करण्याची विनंती भगवान शंकरांना केली. शंकरांनी ती मान्य करून ते डमरू वाजवू लागले. आनंदाने नाचू लागले. आपल्या जटा सोडून कमरेवर हात ठेवून पाय फाकून ते आकाशाकडे पाहू लागले. त्याचवेळी आकाशात विजेसारखा लख्ख प्रकाश पडला. गगनभेदी कडकडाट होऊन गंगा जलप्रवाहाच्या रूपाने खाली कोसळली. त्या वेळी भगवान शंकरांनी आपल्या जटेत गंगा झेलली. गंगा शंकरांच्या जटेत फिरू लागली. नेत्र कमळांच्या पुष्प मालिकेसारखी ती दिसू लागली. तिच्या जलधारेचा वेग कमी होऊन ती शंकरजटांत सामावली. त्रैलोक्यनिधी पवित्र गंगा धारण केल्याच्या आनंदात भगवान शंकर कैलासात निघून गेले. भगीरथाला गंगा द्यायची आहे याचे त्यांना विस्मरण झाले. पुन्हा गंगोत्री या ठिकाणी एका शिलेवर बसून भगीरथाने शंकरांची पुन्हा उग्र तप:साधना सुरू केली. भगवान शंकर भगीरथाला पुन्हा दुसऱ्यांदा प्रसन्न झाले. भगीरथाला एक दिव्य रथ देताना ते म्हणाले, ‘भक्ता तुझी साधना, पराक्रम आणि कुल धन्य होय. तू तुझ्या तप:सामर्थ्याने साऱ्या कुळाचा उद्धार केला केला आहेस. या रथावर बसून तू पुढे जा गंगेचा प्रवाह तुझ्या मागे मागे येईल. ’

सुमेरू पर्वत शिखरशृंखलेवर जाऊन भगवान शंकराने गंगेस आपल्या जटांतून मुक्त केले. ती आल्हादपणे धरतीवर अवतरली. गंगेचा प्रवाह दहा धारांनी विविध शिखरांवरून वाहू लागला. सतपथ सरोवरातून निघालेली अलकनंदा, केदारकंठावरून निघालेली मंदाकिनी या गंगेच्याच धारा होत. गंगेची मुख्य धार शिवलिंग शिखराच्या खालील भूगर्भातील बर्फखंडातून बाहेर पडते. हीच गंगेची मुख्य मोक्षधार भगीरथाच्या मागून जाऊ लागली. गंगोत्री या स्थळी भगीरथाचे विश्राम केला. तेथे त्याने गंगेची मनोभावे पूजा केली. म्हणून या ठिकाणी गंगोत्री हे पावन तीर्थ निर्माण झाले. भगीरथामागे जाऊन सगर पुत्रांच्या रक्षेला गंगेचा स्पर्श झाला. त्या क्षणी त्यांचा उद्धार झाला. भगीरथाच्या मागून निघालेल्या गंगेने कोट्यावधी भारतवासीयांचे जीवन सुखी केले.

भगीरथाने कठोर परिश्रम करून गंगा आणली. यावरून अशा परिश्रमाला ‘भगीरथ प्रयत्न’ असा वाक्प्रचार ही मराठीत रूढ झाला आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल सप्तमीला गंगेने ब्रम्हलोकातून भगवान शंकराच्या जटांत प्रवेश केला. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल दशमीला भगवान शंकराकडून भगीरथाला गंगा प्राप्त झाली. या दोन तिथींना गंगा दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतो. मुखवा या गावापासून या दसऱ्याची विशाल मिरवणूक निघते. गंगेची पालखी घेऊन ही मिरवणूक वाजत गाजत गंगोत्रीला येते. याप्रसंगी पारंपारिक पोशाख करून लोक आनंदाने नाचतात. गंगागीत गातात. अतिशय उत्साहात गंगाजन्मोत्सव साजरा करतात.

गंगा नावाचा द्रवरूप पदार्थ म्हणजे साक्षात परब्रह्म होय. महापातकांचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे. असा स्कंदपुराणात उल्लेख आहे.

केदारनाथ —

एक जूनला पहाटे पाच वाजता चहा घेऊन फाटा गावाकडे प्रस्थान केले. या फाटा गावात त्या दिवशी आमचा मुक्काम असणार होता. खिडकीतून बाहेर पाहतांना आजूबाजूचे भान विसरायला होत होते. खरोखर ‘अनंत हस्ते कमलावराने देता, घेशील किती तू दोही करी’ अशी आमची अवस्था झाली होती. आमच्याबरोबर किचन जीप होती. नाश्ता व जेवण रस्त्यातच घेतले. वाटेत सव्वाचार वाजता रुद्रप्रयागला गाडी थांबवली. खाली उतरून अलकनंदा व मंदाकिनी नद्यांचा संगम बघितला. रात्री आठ वाजता महाराष्ट्र निकेतन या हॉटेलला पोचलो. रात्री जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली.

त्याप्रमाणे दोन जूनला रात्री एक वाजता आम्ही बसमध्ये बसलो. बसने सीतापूर पार्किंग पर्यंत गेलो. तेथून साधारण दोन किलोमीटर्स चालल्यावर शेअर रिक्षास्टँड लागले. एक रिक्षात बाराजण घेतात. ज्याला जसे जमेल तसे रिक्षा पकडून सर्वजण साधारण पाच किलोमीटरवरील गौरीकुंड पर्यंत आलो. तेथे एकत्र जमलो. डोलीचे बुकिंग करण्यासाठी क्यू असतो. त्या लाईनमध्ये उभे राहिलो असतो तर आमचे दोन तास गेले असते. पण पुसेगावकरांनी एक लोकल माणूस बरोबर घेतला होता. त्याने पुढे जाऊन सर्वांचे बुकिंग केले, थोडे जास्त पैसे द्यावे लागले, पण महत्वाचा वेळ वाचला. डोलीवाल्यांचे रजिस्ट्रेशन केलेले असते. डोलीत बसतांना गोफ मध्ये अडकविलेले रजिस्ट्रेशनकार्ड ते आपल्याला देतात. एका डोलीत एक जण बसू शकतो व चार जणं ती डोली उचलतात. जातांना मध्ये मध्ये त्यांना नाश्ता व जेवण द्यायला लागते. ट्रॅक १६ किलोमीटर्सचा आहे पण वळणं वळणं असल्यामुळे प्रत्यक्षात २२ किलोमीटर्स वाटचाल करावी लागते. प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी पोहोचलो.

मी व पुसेगावकर साडेबारा वाजता पोहोचलो. मुख्य मंदिराकडे पोहोचण्यापूर्वी एक ऑफिस लागते. तेथे चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी उत्तराखंड टुरिझम डेवलपमेंटकडे आपण जे रजिस्ट्रेशन केले होते ते दाखवून आपल्याला दर्शनासाठी एक टोकन देण्यात येते. डोलीवाले त्या ऑफिसच्या बरेच अलीकडे उतरवितात. तेथून त्या ऑफिस पर्यंतचे अंतर साधारण १-१।। कि. मी. आहे. टोकन घेऊन मंदीरासमोर एक मोठी घंटा आहे, तिथपर्यंत मी व पुसेगावकर आलो. काहीजण पूर्वीच पोहोचले होते. केदारनाथ मंदिराचे चित्र बऱ्याचदा बघितले होते. त्यासमोरच आपण उभे आहोत हे खरच वाटतं नव्हतं!! मी मनोमन देवळाच्या शिखराला नमस्कार केला. दर्शनासाठी भलीमोठी रांग होती. तीमध्ये उभे राहिलो असतो तर दर्शनाला सहा सात तास लागले असते. आम्ही थोडी विश्रांती घेऊन, स्पेशल दर्शनाची काही सोय होती का हे पहायचे ठरविले. केदारनाथ येथे विश्रांतीसाठी तंबू आहेत तसेच पक्क्या खोल्या देखील आहेत. आमच्यासाठी पुसेगावकरांनी कांही तंबू आरक्षित करून ठेवले होते. कांही तंबूत तिघांची तर कांहीत चौघांची राहण्याची व्यवस्था होती. आम्हाला चौघांची सोय असलेला तंबू देण्यात आला. तंबू जाड गाद्या, जाड पांघरुणे, उशा आदींनी सुसज्ज होता. लाईट व मोबाईल चार्जिंगची सोय होती. मंदिराच्या मागील बाजूस स्पेशल दर्शनासाठीचा काउंटर आहे व तो पाच वाजता उघडतो असे समजले. सौ सुनीता त्या शून्याच्या खाली चार अंश तपमान असणाऱ्या गोठविणाऱ्या थंडीत काउंटर समोर तीन वाजताच लाईनमध्ये उभी राहिली. पाच वाजता काऊंटर उघडला पण काउंटरवाल्याने सांगितले की स्पेशल दर्शनाचा कोटा संपला आहे. हताश मनाने लाईन मधील सर्वजण आपापल्या टेंटकडे परतले. सुनीता कांहीवेळ तिथेच उभी राहिली. तवंर एक व्यक्ती तिच्याजवळ आली आणि म्हणाली, ’मांजी, आपको स्पेशल दर्शन करना है क्या? ’ सुनीता होय म्हणाली. तो म्हणाला, आठ बजे मोबाईल टॉवर के नीचे एक दुकान है, वहा आ जाईये’ आम्ही रात्री आठ वाजता तिथे पोहोचलो. त्याने आम्ही किती माणसे आहोत ते विचारून, अमुक एव्हढे पैसे होतील असे सांगितले व रात्री अकरा वाजता स्पेशल दर्शनाची लाईन असते तिथे यायला सांगितले. त्याप्रमाणे थोडंस खाऊन आम्ही स्पेशल दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो. स्पेशल दर्शन वाल्यांना बाजूच्या दरवाज्याने सोडतात. त्याप्रमाणे आम्ही आत गेलो. गाभाऱ्याच्या बाहेरील भागात पाच पांडव, द्रौपदी, कुंती यांच्या कलात्मक सुंदर मूर्ती आहेत. त्यांचे दर्शन घेत घेत आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथे केदारनाथांचे रेड्याच्या पाठीसारखे स्वयंभू पाषाण स्वरूप आहे. ते बघून मन भरून आले. त्याला तूप लावायची प्रथा आहे. तत्पूर्वी तेथील गुरुजींनी गंगेच्या पाण्याने भरलेला एक कलश आमच्या हाती देऊन आम्हाला त्या पाण्याने केदारनाथांचा अभिषेक करायला सांगितले. अभिषेकानंतर आम्ही केदारनाथांना बरोबर नेलेले तूप चोळले व चांदीचे बिल्वपत्र अर्पण केले. हे शिवलिंग नसल्याने त्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली तर चालते. अर्धी प्रदक्षिणा झाल्यावर गुरुजींनी यमुना जलाने भरलेला एक कलश आमचे हाती देऊन त्या पाण्याने देखील अभिषेक करायला सांगितला. आम्ही केला. आम्ही किती नशीबवान की, आम्हाला गंगा व यमुना दोन्हींच्या जलाने केदारनाथांना अभिषेक करता आला!! दर्शन घेऊन बाहेर आलो. ज्यांनी आमच्या स्पेशल दर्शनाची सोय केली होती, ते गुरुजी भेटले. त्यांचे आभार मानून त्यांना ठरलेली दक्षिणा देऊन नमस्कार केला.

नंतर मंदिराच्या मागील बाजूस जाऊन भीम शिळेचे दर्शन घेतले. ही शिळा २० फूट लांब व १२ फूट व्यासाची आहे. २०१३ साली आलेल्या प्रचंड महापुरात पाण्याच्या प्रवाहाबरोबर ही शिळा घरंगळत आली व मंदिराच्या मागील बाजूस येऊन थांबली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह दुभंगून मंदिराचे रक्षण झाले. ही खरोखर ईश्वराची लीलाच म्हणायला पाहिजे. भीम शिळेचे दर्शन घेऊन आम्ही टेंटवर येऊन थोडी विश्रांती घेतली व (तीन जूनला) सकाळी चहा बिस्किटे घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. हा प्रवास मी पिट्टूने केला. पिट्टू म्हणजे आपणाला नेणाऱ्या माणसाच्या पाठीवर एक बास्केट असते, त्यात बसवून आपणास तो नेतो. पार्श्वभूमीला बर्फाच्छादित हिमशिखरे असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दर्शन डोळे भरून घेतले. पिट्टूने मी व आमच्यापैकी कांही वयस्क मंडळी एक ते दिड किलोमीटर्स दूर असणाऱ्या एका हॉटेलजवळ गेलो. साधारण याच ठिकाणी डोलीवाल्याने काल आम्हाला सोडले होते. कांही मंडळी पायी तिथपर्यंत आली. नंतर पिट्टू, घोडा व डोली यांपैकी ज्याला जे सोयीचे वाटले त्याने ते निवडले व खऱ्या अर्थाने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत आम्ही निघालो. मध्ये मध्ये रिमझिम पाऊस पडत होता. पिट्टूवाल्याने पिट्टूवर व पर्यायाने माझ्यावर प्लास्टिकचे आवरण घातले. एक व्यक्तीस पाठुंगळीला घेऊन २२ किलोमीटर्सचा उतार उतरणे खायचे काम नाही. त्यामुळे दोन तीन ठिकाणी मी मुद्दाम थांबवून त्यास खाऊ पिऊ घातले. चारच्या सुमारास गौरीकुंडला पोहोचलो. तेथून शेअर जीपने सोनप्रयाग पर्यंत गेलो. तेथून बरेचसे चालल्यावर एक वाहनस्टँड लागते. तेथून गुप्तकाशीकडे जाणारी शेअर जीप मिळाली. तिने फाट्याच्या महाराष्ट्र निकेतनला साधारण पावणेसहा पर्यंत पोचलो. कांही मंडळी साडेतीन चारपर्यंत पोचली होती. जेवायला पुरणपोळीचा बेत होता. मंडळी पुरणपोळीवर ताव मारून आराम करत होती. आचारी मंडळीही निवांत होती. मी हातपाय धुवून कपडे बदलले व चहा वगैरे काहीतरी घ्यावे म्हणून मी व पत्नी वरच्या मजल्यावर गेलो. आचाऱ्याने निरोप दिला की, तुमच्यासाठी गरम गरम पोळ्या बनवल्या जात आहेत. मला त्यांचे खूप कौतुक वाटले. दूध व पुरणपोळीवर ताव मारून ताणून दिली ते दुसरे दिवशी (४ जूनला) पहाटे पाचलाच उठलो.

महाभारत, लिंगपुराण, वामनपुराण, शिवपुराण, ब्रह्मपुराण, वायुपुराण, कूर्मपुराण व गरुड पुराणात केदारनाथच्या अनेक कथा आणि अख्यायिका आहेत. भारत भूमीवर जी बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकी हिमालयातील केदारनाथ हे एक होय. ज्यावेळी ईश्वराने मानवी सृष्टी निर्माण केली, त्याच्या रक्षणासाठी भगवंताने नरनारायण यांना पृथ्वीवर पाठवले. जगाच्या कल्याणासाठी गंधमादन पर्वतावर नरनारायणाने भगवान शंकरासाठी उग्र तप केले. भगवान शंकर प्रसन्न होऊन नरनारायणास त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावेळी नरनारायण नम्रपणे त्यांना म्हणाले, ” विश्वकल्याणासाठी आम्ही आपले स्मरण केले. विश्वकल्याणासाठी आपण या पर्वतात सदैव प्रकट स्वरूपात कायम वास्तव्य करावे. आपल्या दर्शनातून संसारी मानवाला मुक्ती लाभेल. ” भगवान शंकरांनी नरनारायणाचे मनोगत स्वीकारले. केदार भूमित ते निवास करू लागले. त्यापासून हे पावन तीर्थ केदारनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. या पवित्र निवासस्थानाबाबत पार्वतीशी बोलताना ते म्हणाले, ”मी ज्याप्रमाणे अनादी कालापासून या विश्वात वावरतोय, त्याप्रमाणे केदारभूमी ही प्राचीन आहे. ब्रह्मरूप धारण करून याच ठिकाणी सृष्टीनिर्मितीची रचना मी केली तेव्हापासून ही केदारभूमी अस्तित्वात आहे. ही देव दुर्लभ पवित्र भूमी होय. ” ही कथा वायुपुराणात वाचायला मिळते.

पुरातन यथा हं वै तथा स्थानामिदं किला।

यदा सृष्टीक्रिया यांच मयावै ब्रह्ममूर्तीना।।

स्थितमत्रैव सततं परब्रम्ह जिगीशया ।

तदादिकमिदं स्नानं देवानामपि दुर्लभम।।

असे या तीर्थक्षेत्राचे वर्णन केदारकल्प या ग्रंथात आहे.

– क्रमशः भाग पाचवा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ४ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ४ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

उत्तरकाशीकडे… 

३० मे रोजी ठरल्यानुसार ११ वाजता आम्ही उत्तरकाशीकडे प्रस्थान केले. वाटेतील निसर्गसौदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही संध्याकाळी साडेचार वाजता उत्तरकाशीला पोहोचलो. ११५८ मीटर्स उंचीवर भागीरथीच्या काठावरील एक तीर्थक्षेत्र म्हणून उत्तर काशीचा अनेक पुराणग्रंथात उल्लेख आहे. पुराणात उत्तरकाशीचा उल्लेख सौम्यकाशी म्हणून आहे. गढवालीत उत्तर काशीला बारहाट असे म्हणतात. अनादिकालापासून ही नगरी ऋषी मुनींची तपोभूमी होती. अशी मान्यता आहे की पांडवांची इथे ये जा असायची. तसेच जमदग्नी ऋषींचा आश्रम इथेच होता. येथेच जमदग्नी ऋषींचे कनिष्ठ पुत्र परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपली माता रेणुका हिचा शिरच्छेद केला होता. बालखिल्य, ऐरावत, इंद्रकिल व वारुणावत हे चार पर्वत उत्तरकाशीचे चार पहारेकरी आहेत. उत्तरकाशी वरुणावतच्या पायथ्याला वसली आहे. हे नगर पूर्वी भारत व तिबेट यांदरम्यानच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. तिबेटी व्यापारी पर्वत पार करून येत व मीठ व इतर पदार्थांच्या बदल्यात रत्नांची घेवाण करत. उत्तरकाशी वरुणा व अस्सी या दोन नद्यांच्या मध्ये स्थित आहे. या नगरीच्या एका टोकाला अस्सी व भागीरथी यांचा संगम आहे तर दुसऱ्या टोकाला वरुणा व भागीरथी यांचा संगम आहे. या दोन संगमांमधील ठिकाणास वाराणसी म्हणतात. पूर्ण जगात फक्त दोनच ठिकाणे अशी आहेत की जी दोन संगमांदरम्यान वसली आहेत. एक आहे काशी व दुसरे स्थान आहे उत्तर काशी. म्हणूनच प्राचीन काळी उत्तर काशीला सौम्य काशी म्हणून संबोधिले जात असे. या नगरीला उत्तर काशी म्हणण्याचे दुसरे कारण म्हणजे गंगामाई इथून जवळच असलेल्या तंबाखानी इथे धरण बांधण्यापूर्वी उत्तर दिशेकडे वहात होती. उत्तरकाशीचा उल्लेख स्कंद पुराणातील केदारखंडात सापडतो. दरवर्षी चैत्रातील कृष्ण त्रयोदशीला वरुणावताची पंचक्रोश प्रदक्षिणा निघते याला वारुणी यात्रा म्हणतात.

हॉटेलवर मुक्कामी जाण्याआगोदर आम्ही येथील प्रसिद्ध विश्वनाथ मंदिरात गेलो. उत्तर काशीमधील हे सर्वांत जुने मंदिर. या मंदिराची निर्मिती कचुरी शैलीत पाषाणांनी केली आहे व त्यासाठी हिमालय पद्धत अवलंबली आहे. मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ गंगाजलाने विश्वनाथाला अभिषेक होतो. प्रांगणात श्री गणेश आणि शक्तिदेवतेचे मंदिर आहे. प्रांगणातच एकवीस फूट उंचीचा व अडीच फूट व्यास असलेला भव्य त्रिशूळ आहे. त्रिशूळाचा वरचा भाग लोखंडी तर खालचा भाग तांब्याचा आहे. देव दानवांच्या युद्धात देवानी याचा वापर केला होता. अशी केदारखंडातील अख्यायिका आहे. या त्रिशुळावर प्राचीन पाली लिपीत कांही ओळी कोरल्या आहेत. त्या ओळी इसवीसनाच्या ५०० वर्षांपूर्वी उत्तर काशीच्या राजाने आपल्या राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने नंतर कोरलेल्या असाव्यात असा इतिहास तज्ञांचा अभिप्राय आहे. हा त्रिशूळ उत्तराखंडच्या प्राचीन धार्मिक चिन्हांपैकी एक आहे. त्रिशुळावर नाग वंशाची वंशावळ देखील अंकित आहे. मंदिर परिसरात साक्षी गोपाल व मार्कंडेय ऋषींची मंदिरे देखील आहेत. मंदिरातील महादेवाची पिंड थोडी झुकलेली आहे. त्या संबंधी अशी आख्यायिका आहे की, ऋषी मार्कंडेय विधिलिखिताप्रमाणे अल्पायु होते. ते सदरच्या मंदिरात तपस्या करीत असत. त्यांचे आयुष्य संपल्यावर स्वतः यमराज त्याना नेण्यास आले, त्यावेळी मार्कंडेय पिंडीला घट्ट मिठी मारून बसले होते. यमराजानी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पिंडी थोडी वाकडी झाली. मार्कंडेयांची भक्ती व तपश्चर्या पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले व त्यांनी यमांना माघारी पाठविले. मार्कंडेय ऋषींना दीर्घायुष्य प्राप्त झाले. या प्राचीन विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार टेहरीचा पवॉरवंशीय राजा सुदर्शन शहाने १८५७ मध्ये केला. महाशिवरात्रीचा सोहळा येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भगवान भोलेनाथांच्या प्रतिमा व गंगामैयाच्या सासन काठ्यांसह हजारो शिवभक्त ढोल ताशांच्या गजरात पूर्ण उत्तरकाशीची नगर प्रदक्षिणा करतात. विश्वेश्वर मंदिराजवळच मारुतीरायाचे सुंदर मंदिर आहे. तिथे जाऊन आम्ही मारूतिरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही कृष्णा पॅलेस या हॉटेलात मुक्कामासाठी गेलो. आमच्या हॉटेलमधून अप्रतीम निसर्गसौंदर्य दिसत होते. पण आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये आमच्यापैकी कांही जणांची राहण्याची सोय केली होती, त्या हॉटेलच्या मागील बाजूस गंगामैया झुळूझुळू वहात होती व निसर्गाच्या माहोल कांही औरच होता.

गंगोत्रीकडे – – 

३१ मे ला सकाळी साडेसहा वाजता गंगोत्रीला जाण्यासाठी आम्ही निघालो. साडेनऊला गाडी गंगोत्रीजवळ पार्क केली. तेथून साधारण तीन किलोमीटर्स पायी चालावे लागणार होते. रस्त्यात पूजासाहित्याची अनेक दुकाने आहेत. त्यापैकी एका दुकानातून गंगाजल घरी नेण्यासाठी एक कॅन विकत घेतला. १०. ३० वाजता गंगोत्री मंदिराच्या प्रांगणात पोचलो. पुसेगावकरांनी एका पुजाऱ्यांकरवी खास दर्शनाची व्यवस्था केली होती त्यामुळे आम्हाला फारसे रांगेत उभे राहावे लागले नाही.

जी थोडी रांग होती त्या बरोबर आम्ही पुढे पुढे सरकू लागलो व गंगामैयाच्या मूर्तीसमोर आलो. गंगामैयाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरामध्ये असून भान हरपेल एवढी देखणी आहे. मैय्याचे मनोभावे दर्शन करून बाहेर आलो. कांही पायऱ्या उतरून खाली आलो. मंदिरासमोरून गंगामैया तुफान वेगाने वाहते. यात्रेकरूंना नदीत पाय धुण्यासाठी जाड साखळ्या बांधल्या आहेत. त्यांना धरून आम्ही हातपाय प्रक्षालन केले व बरोबर आणलेल्या कॅन मध्ये गंगाजल भरून घेतले व वर येऊन तेथे असलेल्या पुजाऱ्यांकरवी कॅनमधील जलाचे पूजन करून घेतले. याला गंगापूजन म्हणतात. हे सर्व आवरून पावणेदोनला आम्ही बसमध्ये बसलो. गंगोत्री ते उत्तरकाशी सदोदित गंगामैया सतत आमच्या सोबत होती. कधी झुळूझुळू तर कधी जोरकसपणे. वाटेत येणाऱ्या दगडधोंडे व खडकांना अलगद ओलांडत तर कधी त्यांचेवरून अवखळपणे उड्या घेत तर कधी त्याना वळसे घालत. सोबतीला चीड आणि देवदार वृक्ष होतेच! असे सर्व निसर्गसौंदर्य प्राशन करीत आम्ही साडेचार पाच पर्यंत रूमवर पोचलो.

गंगा गंगोत्री वरून उगम पावते, असा काही लोकांचा समज आहे. परंतु गंगोत्री पासून १८ किलोमीटर दूरवर असलेल्या प्रचंड बर्फाच्या ग्लेशियरमधून ती बाहेर पडते. हजारो वर्षांपूर्वी गंगेचा उगम गंगोत्रीस असावा, परंतु प्रचंड वृक्षतोडीमुळे हिमकडे कोसळून तो १८ किलोमीटर मागे गेला असावा. या उगमाला गोमुख असे म्हणतात. कठोर तप करून राजा भगीरथाने स्वर्गातून तिला पृथ्वीवर आणले म्हणून तिला भागीरथी नावाने संबोधले जाते. देवप्रयाग पर्यंत ती भागीरथी नावाने वाहते. देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथीचा संगम होतो. देवप्रयाग पासून ७१ किलोमीटर प्रवास करून ऋषिकेशच्या मैदानात ती गंगा या नावाने अवतरते.

मात: शैलसुता सपत्नी वसुधा शृंगाराहारवली ।

स्वर्गारोहिण वैजयंती भवती प्रार्थये ।।

त्वत्तिरे वसतस्त्वदर्पित पिबत स्त्वव्दीचिशु ।

स्त्वन्नाम स्मरत स्त्वदर्पित दृश:स्योन्मे शरीरव्यय: ।।१।।

याप्रमाणे भागीरथीचे पुराणग्रंथात सुंदर वर्णन दिले आहे. त्याचप्रमाणे गंगेची जन्मकथाही पुराणात आहे. धरतीवर तिची अवतरण झाले याची ही कथा म्हणजे इतिहास होय. सत् युगातील ही कथा आहे.

प्राचीन काळात इश्वांकू वंशातील चक्रवर्ती राजा सगर राज्य करीत होता. महापराक्रमी आणि प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा म्हणून त्याचा लौकिक होता. त्याने अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. त्यासाठी त्याने घोडा सोडला. सदर राजाचा अश्वमेध यज्ञ साकार झाला तर हा शक्तिशाली राजा आपला पराभव करून इंद्नगरीचा कब्जा घेईल अशी इंद्राला भीती वाटली. या अश्वमेध यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी त्याने एक क्लुप्ती योजली. त्यानुसार त्याने घोड्याला पकडून समाधीस्थ कपिल मुलींच्या आश्रमात गुपचूपपणे बांधून टाकले. घोडा हरवल्याचे कळताच सगर राजा चिंताग्रस्त झाला. आपल्या पराक्रमाला आव्हान देणाऱ्या कोणत्या वीराने घोडा अडवला म्हणून राजाच्या सैन्याने त्याचा शोध घेतला, परंतु घोडा सापडायला तयार नव्हता. शेवटी त्याने आपल्या साठ हजार पुत्रांना घोड्याला शोधण्यासाठी पाठवले. त्यांनी स्वर्ग मृत्यू पाताळ पालथे घातले, परंतु घोडा मिळाला नाही. ते निराशमनाने माघारी परतले. फिरत फिरत ते कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आले. तो आश्रमापाठीमागे घोडा बांधलेला त्यांना दिसला. मुनी समाधीस्थच होते. आपल्या आश्रमामागे चक्रवर्ती राजा सगराचा अश्वमेध यज्ञाचा घोडा बांधला आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. परंतु कपिलमुनींनीच घोडा पळवून आश्रमात बांधून ठेवला असा सगर पुत्रांचा समाज झाला. त्यांनी चिडून कपिलमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या गळ्यात मृतसर्प लटकवला. मुनींना मोठमोठ्याने अर्वाच बोलू लागले. त्यामुळे मुनींची समाधी भंग पावली. सगर पुत्रांच्या मर्कटलिला पाहून त्यांचा क्रोधांनी जागृत झाला. डोळे उघडताच त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. त्यामुळे ६०, ००० सगरपुत्र भस्म होऊन त्यांचे राखेच्या ढिगार्‍यात रूपांतर झाले. राजा सगराला ही बातमी समजतात तो कपिल मुनींकडे आला. कपिल मुनींची त्याने क्षमा मागितली. पुत्रांना जीवदान देण्याची विनंती केली. आपल्या आश्रमात घोडा बांधण्याचे कपटकारस्थान इंद्राचे होते हे नंतर योगसाधने द्वारा मुनींना समजले. केवळ अज्ञानापायी सगर पुत्रांचा नाश झाला. त्यामुळे कपिलमुनींना खंत वाटली. ते राजाला म्हणाले, ’तुझ्या पुत्रांचा मृत्यू माझ्या शापामुळे होणार होता. तसे त्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं. तो मृत्यू कोणत्याही कारणाने टाळता आला नसता. यात माझा आणि त्यांचा काहीच दोष नाही. त्यांचे जगण्याचे दिवस संपलेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. परंतु अधिक विचार न करता मी त्यांना भस्म केल आहे त्यामुळे त्यांच्या आत्ममुक्तीसाठी आणि उद्धारासाठी प्रयत्न करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यासाठी त्यांच्या मुक्तीचा मार्ग मी तुला सांगतो. प्रत्यक्ष ब्रह्मद्रव्य गंगा ब्रम्हलोकातून खाली आणली व तिचे जल या रक्षेवर शिंपडले तर तत्काळ तुझ्या पुत्रांना मुक्ती मिळेल. ’ यावर राजा सगर विवश होऊन म्हणाला, ’मुनीवर्य ब्रह्म लोकातून गंगा पृथ्वीवर आणणे ही अशक्य गोष्ट आहे. माझी शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ती तेवढी प्रबळ नाही. गंगा अवतरणासाठी मी असमर्थ आहे. ’ यावर मुनीवर्य म्हणाले, ’राजा या जगात मानवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्याच्या अंतरंगात ईश्वरी शक्तींचे प्रचंड भांडार आहे. पण त्याचा त्याला पत्ता नसतो. त्यासाठी कठोर साधनेची गरज असते. त्यासाठी सत्यव्रती, प्रतिज्ञापालक, दृढनिश्चयी बनावं लागतं. तरच त्याच्यातील सुप्त शक्ती व पुरुषार्थ जागा होतो. मग त्याला जगातली कोणतीही गोष्ट साध्य करता येते. तुझ्या कुळात असा सामर्थ्यशाली पुरुष निर्माण होऊन तो ब्रह्मलोकांतून गंगा मृत्यूलोकात निश्चितपणे आणेल. या गंगेच्या स्पर्शाने तुझ्या पुत्रांना मुक्ती मिळेल. ’

मुनींचा आशीर्वाद घेऊन दुःखद अंतःकरणाने राजा राजधानीत आला. राजवाड्याच्या दर्शनी दरवाजावर त्याने एक शिलालेख कोरला- ‘माझ्या ६०, ००० पुत्रांची राख कपिलाश्रमासमोर पडलेली आहे. कपिल मुनींच्या शापामुळे दग्ध झालेल्या या पुत्रांच्या मुक्तीसाठी गंगाजलाची आवश्यकता आहे. माझ्यानंतर माझ्या वंशात होणाऱ्या ज्या राजांच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य असेल त्याने ब्रह्मलोकांतून गंगा पृथ्वीवर आणावी. आपल्या कुळाचा उद्धार करावा. जोपर्यंत गंगा पृथ्वीवर वाहत राहील तोपर्यंत त्याचे नाव घेतले जाईल. ’

सगर राजाचा पुत्र दिलीप हा सिंहासनावर बसला. त्याने शिलालेख वाचला. परंतु त्याला ब्रह्मलोकातून गंगा आणणे शक्य झाले नाही. त्याला अतिशय तेजस्वी पुत्र झाला. त्याचे भगीरथ नाव ठेवण्यात आले. लहानपणापासून भगीरथ जिज्ञासू प्रवृत्तीचा होता. राजवाडाच्या दरवाजाकडे तो तासानतास बघत राहायचा दरवाजावरील शिलालेख त्याने आपल्या पिताजींकडून वाचून घेतला त्याचा अर्थ व इतिहास समजावून घेतला. आपल्या आजोबांची अतृप्त इच्छा पूर्ण करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. युवावस्था प्राप्त झाल्यावर तो राजसिंहासनावर बसला. पण त्याचे मन राज्यकारभारात रमेना. ऐशआराम त्याला बोचू लागला. दरवाजावरील शिलालेख त्याला खुणावत होता. आव्हान करीत होता. मग त्याने एक दिवस घोर प्रतिज्ञा केली. :‘ब्रह्म लोकातून गंगा धरतीवर आणून पितरांचा उद्धार करीन त्याचवेळी मी सिंहासनावर बसेन. ’ प्रतिज्ञेनुसार राज सिंहासनाचा त्याग करून तो हिमालयात गेला. हिमशृंग पर्वतावरील श्रीकंठ शिखरावर तो पोहोचला. तेथे त्याने गंगा प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या सुरू केली. हिमालयातील यक्ष, किन्नर व गंधर्वांनी विघ्ने आणून त्याचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर विजय मिळवून भागीरथाने आपली तप:साधना चालू ठेवली. भागीरथाची कठोर तपश्चर्या पाहून गंगा प्रसन्न झाली. भागीरथाने तिला आपल्या तपश्चर्येचे कारण सांगितले. त्यानुसार गंगा ब्रम्हलोकातून मृत्यूलोकात यायला तयार झाली. परंतु ती भगीरथाला म्हणाली, ’मी तुझ्या पुर्वजांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर येईन, परंतु माझ्या जलप्रवाहाचा वेग पृथ्वीला सहन होणार नाही. त्याच्या वेगाने तिचे तुकडे तुकडे होतील. माझा वेग धारण करणारी एकच व्यक्ती आहे. श्री भगवान शंकर त्यांच्यातच माझ्या प्रबळ वेगाला धारण करण्याची शक्ती आहे त्यांना तू प्रसन्न करून घे. मी यायला तयार आहे.’

– क्रमशः भाग चौथा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

त्यानंतर हरिद्वार जवळील कानखलस्थित दक्षेश्वर महादेव मंदिर बघायला गेलो. आत गेल्या या गेल्या वाघ सिंहाच्या प्रतिमा लक्ष वेधून घेतात. तसेच माता पार्वतीला हातांवर घेतलेल्या महादेवांची मोठी मूर्ती आहे. तसेच माता पार्वतीला हातांवर घेतलेल्या महादेवांची मोठी मूर्ती आहे. मंदिराला पौराणिक महत्व आहे. कारण येथेच दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला होता ज्यामध्ये भगवान शिवांना आमंत्रित केले नव्हते. प्रत्यक्ष पित्याने आपल्या पतीचा केलेला अपमान सहन न झाल्याने ज्या यज्ञकुंडात पार्वतीने आत्मदहन केले, ते यज्ञकुंड येथे आहे. पार्वतीच्या आत्मदहनाचा धक्का सहन न झाल्याने महादेवांनी आपल्या जटेच्या केसापासून वीरभद्र या योध्याची निर्मिती केली. त्याने दक्ष प्रजापतींचा शिरच्छेद केला करून त्याला बकऱ्याचे शीर बसविले अशी कथा आहे. हे मंदिर राणी धनकौर यांनी १८१० साली निर्माण केले. १९६२ मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे शनी मंदिर, हनुमान मंदिर आदि मंदिरे आहेत. महाकवी कालिदास या स्थळी अनेक दिवस वास्तव्यास राहिला. मेघदूता सारखे चिरतरुण काव्य त्याने याच कनखलच्या धरतीवर बसून लिहिले असा काही पुराण इतिहास संशोधकांचा तर्क आहे. याच कनखलच्या धरतीवर कालिदासाने मेघदूताला अलकापुरीचा मार्ग सांगितला. याप्रसंगी येथील निसर्गमय अल्हाददायी वातावरणाचे अतिशय सुंदर वर्णन कालिदासाने मेघ दूतात केले आहे. हे वर्णन वाचून सुईन चांग हा चिनी प्रवासी अतिशय प्रभावीत झाला. अंतर्बाह्य भारून गेला. या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी अनेक संकटे झेलीत, हजारो मैलांचा प्रवास करून तो सतराव्या शतकात चीनवरून हरिद्वारात आला. हरिद्वारातले नैसर्गिक, धार्मिक व अध्यात्मिक सौंदर्य त्याने डोळ्याखालून घातले. हिंदू संस्कृतीचे चैतन्यमय सौंदर्य पाहून तो आनंदून गेला. साहित्य, संस्कृती आणि धर्म यांचा संगम असलेले हरिद्वार हे हिंदू धर्माच्या उन्नत अवस्थेचे प्रतीक होय अशा शब्दात हरिद्वारचे वर्णन त्याने आपल्या प्रवास ग्रंथात केले आहे. त्या अगोदर सहाव्या सातव्या शतकात ह्यु एन त्संग हा प्रसिद्ध चिनी प्रवासीही हरिद्वारला येऊन गेला होता.

हरकी पौडी घाटावर सूर्यास्ताच्यावेळी गंगा आरती असते व त्यासाठी पाच वाजल्यापासूनच जागा धरून बसावे लागते असे आम्हाला दुपारी जेवणाच्या वेळीच सांगितले होते. पण दक्षेश्वर महादेव मंदिराहून यायलाच आम्हाला वेळ झाला. आम्ही गेलो त्यावेळी घाटावर एव्हढी गर्दी होती की मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पण गंगा मैय्यालच आमची दया आली असावी. एक इसम जणू आम्हाला हुडकतच आल्यासारखा आमच्याजवळ आला आणि म्हणाला, “आपणास गंगा मैय्याची आरती करायची आहे का? अमुक एक पैसे द्यावे लागतील. ” आम्ही मान्य केले. ती व्यक्ती आम्हाला थेट नदी जवळ असलेल्या गंगा मैय्याच्या देवळाजवळ घेऊन गेला. एका पुजाऱ्याच्या हवाली त्याने आम्हाला केले. त्या पुजाऱ्याने आम्हाकडून गंगा मैय्याची यथासांग पूजा करून घेतली व म्हणाला, “तुम्ही सात नंबर पोस्ट जवळ थांबा, तिथे आरती येईल. ” त्याप्रमाणे आम्ही ठरलेल्या ठिकाणी थांबलो. एव्हढ्यात ध्वनिक्षेपकावरून आरतीचे प्रसन्न सूर कानी पडू लागले. अनेक पुजारी दिप आणि इतर साधने घेऊन आरत्या करत होते. आरतीच्या लयबद्ध सुरात दिवे वरखाली केले जात होते. एवढ्यात एक पुजारी अनेक ज्योती असणारा मोठा पितळी दिवा घेऊन आमच्या जवळ आला व त्या दिव्याने आम्ही अगदी गंगा मैय्याच्या किनारी उभे राहून आम्ही आरती केली. अशा प्रकारे आरती करायला मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक भक्त इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करण्यासाठी गंगेत लहान तरंगणारे दिवे सोडून या विधीत सहभागी होत होते. वातावरण अत्यंत उत्साही व आध्यात्मिक असते. गंगा आरती करून हॉटेलवर आलो. जेवण केले. दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तेथे आम्हाला सांगण्यात आला. तदनुसार दुसरे दिवशी सकाळी पावणे आठला राणाचट्टीकडे प्रयाण करायचे होते. तेथे आमचा मुक्काम असणार होता. राणाचट्टी म्हणजे जमनोत्रीचा बेसकॅम्प.

जमनोत्रीच्या दिशेने

२८ तारखेला सकाळी पावणेआठ वाजता आमची बस राणाचट्टाकडे निघाली. वातावरण अतिशय आल्हाददायी होते. आकाश लखलखित निळेभोर होते. त्याखाली बर्फाच्छादित पांढरे शिखरे होती. त्याखाली हिरवी वनस्पती आणि शेजारून कलकल आवाज करीत फेसाळती यमुना वाहत होती तर उंचावरून खाली उडी घेणारे जलप्रपात यमुनेच्या मिठीत मिटून जात होते. मंद शितल वारा तन मन फुलवित होता. पक्षांची किलबिल कानाला मोहिनी घालत होती. ज्यावेळी निळ्या आकाशात सूर्य थोडा वर आला त्यावेळी या साऱ्या वातावरणात पवित्रता आणि तेज अवतरले, सारे काही उजळून निघाले. सुंदरता, सुरम्यता आणि उबदार शीतलता यांचे दर्शन ठाई ठाई होऊ लागले. त्यामुळे मनाची प्रसन्नता अत्युच्च टोकाला पोहोचली. मानवी जीवनातील साऱ्या चिंता, श्रम यांचा विसर पडला. दोन डोळ्यांनी हे निसर्गसौंदर्य किती किती प्राशन करू असे मला होऊन गेले. यात्रा संपल्यावर देखील या निसर्ग सौदर्याचा ठेवा मजजवळ असावा म्हणून बसच्या खिडकीतून मी भरपूर फोटोज व व्हिडिओज काढले. एके ठिकाणी बस नाष्ट्याकरता थांबली. त्या हॉटेलच्या गच्चीत टूर ऑपरेटर्सनी self introduction चा कार्यक्रम ठेवला होता. आमच्या सोबतच अकोल्याच्याच एका टूरिस्ट कंपनीची बस व चार इनोव्हा होत्या. एकंदर आम्ही साधारण साठ जण होतो. या कार्यक्रमामुळे आम्ही सर्वजण आणखी जवळ आलो. या गच्चीतून दिसणारा नजारादेखील आम्ही मोबाईलमध्ये साठवून ठेवला. सव्वा सहाला बस राणाचट्टीला पोहोचली.

तेथे हॉटेल गंगा-जमुनामध्ये आमची राहण्याची सोय होती. रूम समोरच्या कॉरिडॉर मधून अप्रतिम निसर्गदृश्य दिसत होते. थंडी भरपूर होती. रूम मधील फरशीवर पाय ठेवल्यावर जणू बर्फाच्या लादीवर पाय ठेवल्यासारखे वाटत होते. आम्हाला दिलेले पांघरूण साधारण चार इंच जाड होते. जेवण करून, सार्वजनिक त्रिपदी म्हणून गुडुप्प झोपी गेलो.

२९ तारखेला सव्वा सातला चहा नाश्ता करून जानकीचट्टीकडे जाण्यासाठी बसने निघालो. अर्ध्या पाऊण तासात तेथे पोचलो. बस पार्किंगलॉट मध्ये पार्क केली. बस थांबल्या थांबल्या शेकडो डोलीवाले बसवर तुटून पडले व आपलीच डोली घेण्याविषयी आग्रह करू लागले. आमच्यापैकी ज्यांना ज्यांना डोलीने जायचे होते, त्यांच्यासाठी पुसेगावकरांनी डोल्या जमवून दिल्या. आम्हाला घोड्याने जायचे होते. घोडे बुकिंगची सोय पार्किंग पासून थोड्या अंतरावर होती, तेथे जाऊन आम्ही घोडे बुक केले. घोड्यावरून प्रवास करायची ही माझी दुसरी खेप. यापूर्वी माथेरानला घोड्यावर बसलो होतो, पण तो सपाट प्रदेश होता. घोडा पायऱ्या चढतो, निसरड्या रस्त्यावरूनही व्यवस्थित जातो, हे मी प्रथमच अनुभवत होतो. जानकीचट्टीपासून संपूर्ण सात किलोमीटर्स चढाईचा रस्ता आहे. या डोंगर कपाऱ्यातून गेलेल्या रस्त्याने जाताना निसर्ग खजिन्याचे एक एक दालन उघडत गेले. निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा नवनवीन साक्षात्कार होत गेला. चीड, कालासिरस, देवदार, अक्रोड, बांस आदी वृक्षांनी आणि विविध दिव्य औषधी वनस्पतींनी यमुनेचे संपूर्ण खोरे गर्द हिरव्या रंगात बुडाले होते.

या गर्द राईतून कडेकपारीतून धावणारी यमुना सळसळत्या सौदामिनी सारखी तेजस्वी दिसत होती. खोल दरीत नजर टाकली की डोळे हिरवे झाल्याचा भास व्हायचा. मन एकाग्र करून बसलो की कानांना पानाची सळसळ आणि पक्षांची किलबिल ऐकू यायची पण हे पक्षी मात्र कोठे दिसत नव्हते, नजरेच्या टप्प्यात येत नव्हते. निसर्गसौंदर्य प्राशन करत साडेनऊला जमनोत्रीला पोचलो.


आजूबाजूच्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर अत्यंत सुंदर चित्रातल्यासारखे दिसते. यमुना मातेची मूर्ती काळ्या संगमवरातून घडवलेली असून अत्यंत देखणी आहे. मंदिर परिसरातच एक उकळत्या पाण्याचे छोटे कुंड आहे. त्या कुंडातील पाणी कायमच उकळत असते. त्यामुळे यमुनोत्रीचा सारा परिसर सतत वाफाळलेला असतो. त्या पाण्यात फडक्यात बांधलेले तांदूळ ताबडतोब शिजतात. या पाण्यात शिजलेले तांदूळ हाच यमुनोत्रीचा प्रसाद होय. तो आम्ही घेतला.

कूर्म पुराणातील यमुनोत्रीची कथा येथे आम्हाला ऐकावयास मिळाली. गंगा आणि यमुना या सूर्यकन्या. सावत्र बहिणी. सूर्याच्या संज्ञा या पत्नीपासून गंगेची निर्मिती झाली. छाया या दुसऱ्या पत्नीपासून यमुना व यमराज उत्पन्न झाले. यम आणि यमुना हे सख्खे भाऊ बहीण होते. एकदा यमाने चिडून आईला लाथ मारली. त्यावेळी तुला स्वर्गलोकातून मृत्यूलोकात जावे लागेल. तेथे मानवाच्या लोकसंख्येच्या नियंत्रणाचे काम करावे लागेल. माणसाच्या गळ्याभोवती मृत्यूचा पाश आवळण्याची व पापी लोकांना शासन करण्याची कामगिरी पार पाडावी लागेल. असा शाप छायाने यमराजाला दिला. सूर्याने या शापाचे समर्थन केले. त्यानुसार यम राजाचा पृथ्वीवर संचार सुरू झाला. सूर्यानेही जनकल्याणार्थ यमुनेला पृथ्वीवर पाठवले. ती स्वर्गातून श्वेतपर्वतावर म्हणजेच बंदर पूच्छवर उतरली. (बंदरपुच्छ हे जमनोत्रीजवळील एक शिखर आहे) तिथून खाली उतरून ती प्रवाहित झाली. भगवान श्रीकृष्णाच्या आठपट्टराण्यांपैकी यमुना ही कालिंदी या नावाने ओळखली जाते. यम आणि यमुना निसर्ग नियमानुसार आपापल्या कार्यात मग्न होते. वर्षांपासून वर्षे गेली. यमुना भावाच्या आठवणीने व्याकुळ व्हायची. मृत्यूच्या कार्यात आणि पापी जनांना नरकाच्या दारात ढकलता ढकलता यम यमुनेला विसरून गेला. अनंत कालानंतर एक दिवस यमाला यमुनेचे स्मरण झाले. माझी बहीण कोठे आहे, काय करत असेल म्हणून तो चिंतीत झाला. तिच्या शोधासाठी त्याने यमदुतांना पाठवले. त्यांनी त्रिखंड पालथे घातले. पण यमुना त्यांना भेटली नाही. मग स्वतः यम तिच्या शोधात निघाला. पण त्यालाही यमुनेचा पत्ता लागेना. तो ध्यानस्थ झाला. अतींद्रिय शक्तींनी त्याला यमुनेचा पत्ता कळला. तो धावत हिमालयात आला. यमुनोत्रीत त्याला त्याची बहीण यमुना भेटली. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील द्वितीया होती. या दिवशी झालेल्या भाऊ बहिणीच्या अलौकिक भेटीने त्यांची हृदय उचंबळून आली. यमुनेने यमाचा योग्य तो आदर सत्कार केला. तप्त कुंडातील गरम पाण्याने त्याला अभ्यंग स्नान घातले. त्याच्यासाठी पंचपक्वानांचे भोजन रांधले. त्याला पंचारतीने ओवाळले. यमाला अतिशय समाधान आणि आनंद वाटला. ओवाळणी म्हणून तू कोणताही वर माग, तुझी इच्छा पूर्ण होईल असे प्रसन्नचित्त यमाने यमुनेला सांगितले. त्यावर मला कोणत्याही प्रकारची इच्छा नाही तुझ्या भेटीने मला सर्व मिळाले आहे असे यमुना नम्रपणे उत्तरली. परंतु ओवाळणी म्हणून तुला काहीतरी मागितलेच पाहिजे असा हट्ट यमाने धरला. त्यावर यमुना त्यास म्हणाली तुला द्यायचेच असेल तर असा वर दे की, कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षाच्या द्वितीयेला जे भाऊ-बहीण एकमेकांना भेटतील, एकमेकांच्या सुखदुःखात समरस होतील, जी बहीण प्रेमाने भावाला ओवाळेल, या प्रेमाचे प्रतीक म्हणून जो भाऊ बहिणीला ओवाळणी घालेल, त्या भावा-बहिणीस तू चिरंतन सुखी ठेव. त्यांच्यावर अकस्मात मृत्यूचा घाला घालून त्यांना यमयातना देऊ नकोस. भाऊ बहिणीच्या चिरंतन निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक म्हणून हा वर मला तू दे. यमुनेला हा वर तथास्तु म्हणून यमाने दिला. तसेच या द्वितीयेला जे लोक यमुना जलात स्नान करतील ते पुनर्जन्म बंधनातून मुक्त होतील असाही वर यमाने यमुनेला दिला. म्हणून मथुरा आणि यमुनोत्री येथे भाविक या दिवशी मोठ्या संख्येने यमुनेचे स्नान करतात. यम आणि यमुनेच्या उत्कट भेटीच्या या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. यम यमुनेच्या भेटीच्या दिवसापासून भाऊबीजेची प्रथा सुरू झाली. हजारो वर्षापासून भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. ही यम आणि यमुनेच्या अत्युच्च प्रेमाचे प्रतीक असलेली कथा ऐकून हजारो वर्षांपूर्वी घडलेला हा सारा प्रसंग माझ्या अंत:चक्षू समोर उभा राहिला. हिवाळ्यातले सतत सहा महिने बर्फात समाधीस्थ असलेले यमुनोत्रीचे मंदिर अक्षय तृतीयाला उघडते. भाऊ बीजेच्या दिवशी बंद होते. या दिवशी यम यमुनेकडे भाऊबीजेसाठी अदृश्य रूपाने येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे भाऊबीजेच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. आम्हाला हॉटेलमधून निघतांना चिवडा लाडू वगैरेचे पॅकेट दिले होते. ते खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला १०. ३० ला निघालो व १२. ३० वाजता आमची बस जिथे पार्क केली होती तिथे पोहोचलो. डोलीतून गेलेले सहप्रवासी साधारण दोन पर्यंत तिथे पोहोचले. आमच्यापैकी कांही अतिउत्साही लोक पायी गेले होते, ते साडेचार पाच पर्यंत परत आले नव्हते. त्यांची वाट बघून इतर लोक कंटाळले. त्यामुळे एक बस त्यांना घ्यायला तिथे थांबेल व एक बस इतर लोकांना घेऊन हॉटेलकडे परतेल असे ठरले. त्याप्रमाणे साडेपाचला आम्ही रूमवर परतलो. थोडी विश्रांती घेऊन साडेसातला जेवणाच्या टेबलवर आलो. तेंव्हा पायी गेलेली मंडळी भेटली. ती साडेसहाला जानकीचट्टीवर परतली होती. टूर ऑपरेटर्सनी अशा अतिउत्साही मंडळींना आवर घातली पाहिजे असे मला वाटते. When you are in Rome you should behave like Romans only. जेवणाच्या वेळी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगण्यात आला. दुसऱ्यादिवशी सकाळी अकरा वाजता जेवण करून आम्हाला उत्तरकाशी मुक्कामी जायचे होते.

– क्रमशः भाग तिसरा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – भाग-९ – नेपाल यात्रा – हिमालय की गोद में – ६ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – भाग-९ ☆ श्री सुरेश पटवा ?

19 जून 2022 की सुबह होटल के कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफ़ास्ट का शुरुआती अनुभव अच्छा नहीं रहा। मेन्यू देखकर सोचा आधा पराठा चना सब्ज़ी से और दो ब्राउन ब्रेड अण्डा के साथ लेंगे। बासा पराठा तेल में तलकर रखा था। एक टुकड़ा खाकर रख दिया। ब्रेड की तरफ़ रुख़ किया। ब्रेड-ऑम्लेट से काम हो गया। शाकाहारी मेहमान चिड़चिड़ाहट से भरे शिकायत अधिक कर रहे थे, खा कम रहे थे। उन्होंने मैनेजर को बुला कर ताज़ा पराठा बनवाया। फिर किचन से बुलाई ताजी चाय से हिसाब बराबर किया। भारतीय होटल में जो पेशेवराना अन्दाज़ होता है वह नेपाल में नदारत है। जो स्थिति भारत के होटलों में 1980 के दशक में होती थी, लगभग वही स्थिति नेपाल में अभी है। होटल मैनज्मेंट की पढ़ाई वहाँ नहीं होती और बेरोज़गारी अधिक होने से सस्ता अकुशल श्रम उपलब्ध है। इसलिए कर्मचारियों में पेशेवराना कौशल की उम्मीद बेमानी है। 

सारंगकोट

जवाहर जी ने सौदेबाज़ी कुशलता से सारंगकोट जाने के लिए एक आल्टो कार टैक्सी किराये पर ली। जिसका ड्राइवर दीपक बातूनी है। फेवा झील की कहानी सुनाने लगा। हमने बातों को बदलने के हिसाब से उसकी आल्टो का ज़िक्र छेड़ दिया। भारत में महंगाई का रोना रोने वालों को एक ख़ुशख़बरी है। जो आल्टो भारत में पाँच लाख में ख़रीदी जा सकती है वह नेपाल में पच्चीस लाख में मिलती है। क्या कहा? हिसाब बताएँ ! भारत में पाँच लाख में कार ख़रीदी, नेपाली मुद्रा में (5×1.60) आठ लाख में पड़ी, उस पर नेपाल की तीन सौ प्रतिशत कस्टम ड्यूटी लगी, हो गई न चौबीस लाख, उसे नेपाल में लाने का खर्च, बीमा, रोड टैक्स एक लाख। इस तरह पच्चीस लाख की कार 180.00 रुपए प्रति लीटर पेट्रोल पर चलाएँगे तो टैक्सी के किराए के पशुपतिनाथ मलिक हैं। सारंगकोट सबसे खूबसूरत स्पॉट है। यह एक बहुत ऊँची पहाड़ी पर स्थित है जहाँ से चारों तरफ़ हिमालय के अन्नपूर्णा रेंज के पहाड़ दिखते हैं। जिनके बीच में फेवा झील भी झिलमिलाती है। आजकल झील से सारंगकोट केबल कार चलने लगी है। जिसमें बैठकर आप हवा से बातें कर सकते हैं। डर लगे तो गाना भी शुरू कर देते हैं। अधिक डर से पेट में गुड़गुड़ाहट होने लगे तो ऊपर पहुँचने तक इंतज़ार करना होगा। वहाँ सब व्यवस्था है।

हमने चढ़ना शुरू किया। सीढ़ियों पर मुर्गी के चूज़े सामने आ गये। जिनकी मासूमियत देखकर लगा कि इन कठिन पहाड़ों में इनको भी चढ़ने में मुश्किल होती होगी। हम तो दस कदम चढ़कर हाँफने लगे लेकिन वे चूज़े दो-दो सीढ़ी उचक कर हमें चिढ़ाते हुए ऊपर पहुँच कर मुस्कुरा रहे थे। लौटते में इन चूज़ों के मलिक विनोद मिल गये। उन्होंने अन्नपूर्णा शिखर के दर्शन भी कराए और ठंडा पानी भी पिलाया। उन्होंने बताया बाज़ार में एक देशी मुर्ग़ की क़ीमत 3,000/- रुपए है। जो विदेशियों की पहली माँग होने से कमाई का मुफ़ीद साधन है। गाँव में लगभग हर घर देशी मुर्ग़ और बकरे पालता है। हिंदुओं के शाक्त सम्प्रदाय होने के कारण अधिकांश नेपाली माँसाहारी हैं। भोजन में मांस सेवन रोज़ की बात है।  

अन्नपूर्णा पर्वत श्रृंख्ला हिमालय ट्रैक का सबसे मशहूर स्थान है जो ट्रैकर व पर्वतारोहियों का मुख्य केंद्र है। पर्वत की ऊँचाई छूने के एक अनोखा-सा अनुभव होता है। उसी अनुभव को पर्यटक यहाँ जीने आते है। कठिन चढ़ाई आपको उस जगह पहुँचा देगी जहाँ से आप पूरे शहर व उसके आस-पास के संपूर्ण दृश्यों को अपनी आँखों में भर सकते हैं। अपने साथ कैमरा या अच्छा मोबाईल लेकर जाए ताकि अधिक-से-अधिक तस्वीरों को बटोरकर अपने साथ ले जा सकें।

सारंगकोट पर्वत पर अद्भुत दृश्यों के लिए प्रसिद्ध है। यह समुद्र तल से 1600 मीटर की ऊँचाई पर बसा एक हरियाली युक्त स्थान है। पैराग्लाइडिंग का मुख्य केंद्र भी है। यहाँ से ऊगते और ढलते सूरज को देखना मतलब एक यादगार दृश्य को आँखों में समाना। यहाँ से अन्नपूर्णा, धौलागिरी, मनस्लू व पोखरा की घाटी का मनोरम दृश्य दिखता है। अलग-अलग ऐंगल से आप तस्वीरें खींच सकते हैं। आप यहाँ शाम को टहल सकते है। चहलक़दमी के दौरान चिड़ियों की चहचहाट आपका हृदय जीत लेगी।

गोरखा म्यूज़ियम

पहाड़ से नीचे उतरकर एक जगह लंच लिया। उसके बाद पोखरा के महेंद्र पुल पर स्थित गोरखा म्यूज़ियम देखने गये। पोखरा दर्शनीय स्थल के इस हिस्से में आकर आप गौरवान्वित महसूस करेंगे। यह संग्राहलय गोरखा सिपाहियों को समर्पित है जिन्होंने अपने अदम्य साहस से देशवासियों को हमेशा गर्व महसूस करवाया है। मौका आने पर इन्होंने देश को अपनी सेवा से कृतज्ञ किया है। यहाँ आकर आप गोरखा सिपाहियों के जीवन के बारे में जान सकेंगे कि कैसे उन्होंने मुश्किल से मुश्किल परिस्थिति से देश को दुश्मनों से बचाया है? आप यहाँ आकर बखूबी समझ पाऐंगे। तस्वीरों के ज़रिए आप इनके जीवन की तह तक पहुँच पाऐंगे। इससे अच्छा मौका आपको और कहीं नहीं मिलेगा कि आप उनके जीवन शौर्य से कुछ पल के लिए जुड़ें।

मिथक के अनुसार गोरखनाथ नाम के एक संत पहली बार नेपाल में प्रकट हुए थे। उनके ‘पदचिह्न’ और एक मूर्ति के साथ एक गुफा बनी हुई है जिस स्थान पर ऋषि गोरखनाथ प्रकट हुए थे, उस स्थान पर नगर की स्थापना होने के कारण स्थान का नाम गोरखा पड़ा। 

महाराजा पृथ्वी नारायण शाह ने खंडित नेपाल के राज्यों को एकसूत्र में पिरोने के लिए 1744 में पहली गोरखा सेना का गठन किया था। गोरखा युद्ध के दौरान गोरखाओं द्वारा प्रदर्शित यौद्धा गुणों से प्रभावित होकर, सर डेविड ओक्टरलोनी ने ब्रिटिश भारतीय सेना में गोरखाओं को अनियमित बलों के रूप में लेना शुरू किया। 24 अप्रैल 1815 को, गोरखा रेजिमेंट की पहली बटालियन को नासिरी रेजिमेंट के रूप में स्थापित किया गया था। यह रेजिमेंट बाद में किंग जॉर्ज की पहली शाही गोरखा राइफल्स बन गई।

गोरखा पूरे भारतीय उपमहाद्वीप में ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी के विस्तार में सहायक रहे। गोरखाओं ने गोरखा-सिख युद्ध, प्रथम और द्वितीय आंग्ल-सिख युद्ध, अफगान युद्ध और 1857 के भारतीय विद्रोह को दबाने में साहसिक प्रदर्शन किया था। इन वर्षों के दौरान, अंग्रेजों ने गोरखाओं की भर्ती जारी रखकर गोरखाओं की संख्या में वृद्धि की। गोरखा रेजीमेंटों ने दोनों विश्व युद्धों के दौरान राष्ट्रमंडल सेनाओं के हिस्से के रूप में एक प्रमुख भूमिका निभाई, और व्यापक युद्ध सम्मान अर्जित किया। नेपाली खुकरी चलाने वाले गोरखाओं को सम्मान दिया। 

भारत की स्वतंत्रता के बाद, भारत, नेपाल और ग्रेट ब्रिटेन ने गोरखा सैनिकों के बँटवारे हेतु ब्रिटेन-भारत-नेपाल त्रिपक्षीय समझौते पर हस्ताक्षर किए।  ब्रिटिश भारतीय सेना में 10 गोरखा रेजिमेंटों में से छह को भारतीय सेना में स्थानांतरित करने के लिए रखने लिए प्रावधान किया गया था। चार नेपाल ने रखीं थीं। 2020 तक, भारत में 7 गोरखा रेजिमेंटों में सेवा देने वाली 39 गोरखा बटालियन हैं। भारतीय फ़ौज में जनरल मानेकशॉ इसी रेजिमेंट के चीफ़ थे। जिन्होंने एक पत्रकार के प्रश्न, कि क्या फ़ौजी को मौत से डर नहीं लगता है, के जवाब में कहा था कि “यदि फ़ौजी को मौत से डर नहीं लग रहा तो या तो वह गोरखा है या फ़ौजी झूठ बोल रहा है।”

बौद्ध पेगोडा

हमारी टैक्सी अनाडू पर्वत पर एक खाजा घर के सामने रुकी। उसकी मलाकिन हुमक कर आई और बोली- पहले इधर आइए-फिर ऊपर जाइए। हमने कहा- पहले ऊपर जाएँगे-फिर लौट कर खायेंगे। फिर न उसने बुलाया और ना हम गये।  

एक ऊँची पहाड़ी पर स्थित बौद्ध पेगोडा को शांति स्तूप या पीस पगोड़ा के नाम से भी जाना जाता है। यह अनाडू पर्वत पर काफ़ी ऊँचाई पर स्थित है।  लेकिन हिम्मत करके चढ़ गये। क़रीब पाँच सौ सीढ़ियाँ चढ़कर आधा घंटे में ऊपर पहुँचे। जहाँ से फेवा झील को देख प्रफुल्लित हुए। इस पर्वत से चारों तरफ़ पोखरा की बसावट नज़र आती है। हर तरफ पहाड़-ही-पहाड़ के बीच बसा यह स्तूप अपने नाम के अनुकूल शांति का एहसास करवाता है। पेगोडा परिसर में आर्य मौन व्रत का पालन करवाया जाता है। बात करने पर पेगोडा सेवक चुप रहने की मौन हिदायत देते रहते हैं। हमने सोचा, विपसना ध्यान के लिए इससे उत्तम स्थान नहीं मिलेगा। जवाहर जी और हमने बीस मिनट का ध्यान किया। उसके बाद नीचे उतरे। पोखरा दर्शनीय स्थल में यह बहुत प्रसिद्ध है। यहाँ आकर इस शोभित स्थान को छोड़ देना आपकी बहुत बड़ी भूल होगी।

मांउनटेन म्यूज़ियम

पेगोड़ा से उतरकर इंटरनेशनल मांउनटेन म्यूज़ियम देखने पहुँचे जो नेपाल के पुरातत्व विभाग की  देखरेख में संचालित है। यह संग्रहालय मुख्य रूप से पर्वतारोहण के क्षेत्र में हासिल की कई उपलब्धियों को प्रदर्शित करने के लिए बनाया गया है।  

वहाँ पहुँचने पर पता चला कि संग्रहालय का उद्घाटन 5 फरवरी 2004 को हुआ था। हर साल 100,000 से अधिक घरेलू और अंतर्राष्ट्रीय पर्यटक इंटरनेशनल माउंटेन म्यूजियम (IMM) देखने आते हैं। IMM दुनिया भर में पहाड़ और पर्वतारोहण से संबंधित महत्वपूर्ण रिकॉर्ड, दस्तावेज और प्रदर्शित करता है। कोविड-19 महामारी के कारण, संग्रहालय मार्च 2020  में बंद हो गया था। नवंबर 2020 में फिर से खुला है। संग्रहालय में तीन मुख्य प्रदर्शनी हॉल हैं। हॉल ऑफ ग्रेट हिमालय, हॉल ऑफ फेम और हॉल ऑफ वर्ल्ड माउंटेन। नेपाली लोगों की पारंपरिक संस्कृति और मूल्यों का प्रतिनिधित्व करती पर्वतीय लोगों की संस्कृति और जीवन शैली, प्रसिद्ध चोटियों, प्रसिद्ध पर्वतारोहियों के वर्णन, भूविज्ञान सहित वनस्पतियों  और जीवों की प्रदर्शनी हैं। यति के बारे में भी एक प्रदर्शनी है, जो नेपाल की जनजातियों को समर्पित है। माउंट मानसलू की 31 फुट की प्रतिकृति भी दर्शनीय है।

संग्रहालय में अनोखी कलाकृतियों, वास्तविक उपकरण, पर्वतों से जुड़ी अनसुनी कहानियाँ व तस्वीरें और कुछ ऐसे यात्रियों की तस्वीरें जो सबसे ऊँची पर्वत श्रृंख्ला तक पहुँच चुके हैं, सबकुछ शामिल है। संग्राहलय आपको हिमालयी क्षेत्र में रहने वाले लोगों के साथ 14 सबसे मशहूर व ऊँची चोटियों से परिचित करवाता है।

डेविस फॉल

संग्रहालय से निकल कर डेविस फॉल झरने की तरफ़ रुख़ किया, जिसकी खास बात यह है कि ये ज़मीन के नीचे 500 मीटर लंबी सुरंग में है। इसके आस-पास का इलाका घने वृक्षों से घिरा हुआ है। यह अन्य सभी वॉटरफॉल से अलग है। पोखरा आकर प्राकृतिक नज़ारों से लबालब यह जगह देखना बेहद अलहदा अनुभव है। पोखरा में पर्यटन स्थल की कमी नहीं है पर इस जगह जाना मतलब प्रकृति को खुद में समा लेना। यह झील गुप्तेश्वर महादेव नामक गुफा से होकर गुज़रती है।  

अगर आप अपने रोमांच को चरम-सीमा पर पहुँचाना चाहते हैं, तो यह जगह खास आपके लिए है। जैसा कि आप नाम से समझ गए होंगे कि यह एक ऐसी गुफा है जहाँ आपको हज़ारों की तादाद में चमगादड़ दिखेंगे। अँधेरी गुफा में हर तरफ उल्टे लटके चमगादड़, सोचिए कितना रोमांचक होगा! पतली गुफाओं से होकर गुज़रते हुए आप इस गुफा को अपनी पोखरा यात्रा का हिस्सा बना सकते है।

नज़दीक में उन हज़ारों तिब्बती लोगों के लिए शरणार्थी शिविर बनाए गए थे जो 1959 में तिब्बत पर चीन का कब्ज़ा होने के बाद नेपाल भाग आए थे। यहाँ तिब्बती लोग हाथ से बने गहनें, हल्की वस्तुऐं, कारपेट, कलाकृति बेचते है। तिब्बत की पारंपरिकता इन वस्तुओं में साफ दिखाई पड़ती है। यही वस्तुएँ यहाँ का मुख्य आकर्षण है जिन्हें पर्यटक स्मृति के तौर पर अपने साथ ले जाते है। 

*********

20 जून 2022 को पहले पोखरा से लुम्बिनी के लिए बस या टैक्सी से जाना तय था लेकिन रास्ते में भूश्रखलन होने से बुद्धा एयरवेज से पोखरा से भैरहवा के लिए हवाई जहाज़ टिकट बुक करानी पड़ीं। अब बस में धक्के खाने की जगह हवाई जहाज़ से उड़कर लुम्बिनी पहुँचना होगा। एक फ़ायदा यह होगा कि समय बचेगा, और नुक़सान यह होगा कि रास्ते के हिमालय सौंदर्य का रसपान नहीं कर पायेंगे। हिमालय का वह हिस्सा हमारी आँखों से औझल रह गया।  

सुबह नाश्ते में ब्रेड-दूध और ग्रीन विजिटेबल का सेवन किया। होटल ने हवाई अड्डा के लिए टैक्सी उपलब्ध कराई। समय पर विमानतल पहुँच गए। वहाँ बीस-पच्चीस लोगों के बैठने हेतु कुर्सियाँ थीं। सभी भरी थीं। बाहर आकर ज़मीन पर बैठ इंतज़ार करने लगे। हवाई अड्डा इतना छोटा है कि उस जैसे बीस हवाई अड्डा मिलकर भी नई दिल्ली स्टेशन के बराबर नहीं हो सकते हैं। हवाई अड्डा का हाल 80 फुट लम्बा और 60 फुट चौड़ा है, यानि निवासी कालोनियों के 2400 वर्ग फुट के दो प्लॉट के बराबर। प्रस्थान क्षेत्र ज़रूर थोड़ा बड़ा है। किसी सफ़ाई की आशा करना बेकार है। आगमन-प्रस्थान व्यवस्था चाकचौबंद नहीं अपितु राम भरोसे है। हैंड बैगेज की सुरक्षा जाँच ठीक से नहीं होती। प्रहरी और कर्मचारी सभी लापरवाह हैं। इसीलिए शायद आतंकवादियों ने 2001 में काठमांडू-दिल्ली फ़्लाइट को अगवा करके अमृतसर होते हुए कंधार ले गए थे। विमान 64 सीट वाला छोटा सा था। उसमें एक भी सीट रिक्त नहीं थी। एयरकंडिशन में जान नहीं थी। विमान में बैठे नीचे के इलाक़ों के बारे में सोचते रहे।

नेपाल-भारतीय सीमा पर पूर्व से पश्चिम गोरखपुर, बस्ती, गोंडा, बरेली और लखनऊ ज़िलों की सीमा लगती है। नेपाल से घाघरा नदी उतर कर फ़ैज़ाबाद होते हुए छपरा के पास गंगा में मिलती है। बिहार के बेतिया, मोतिहारी, दरभंगा और पूर्णिया ज़िले नेपाल सीमा पर हैं। नेपाल तरफ़ जनकपुर और मिथिला हैं। जनकपुर सीता जी का मायका और रामचंद्र जी की ससुराल है। गंडक नदी हाजीपुर के नज़दीक गंगा में मिलती है। विराटनगर से कोशी नदी बिहार में प्रवेश करती है। वह गंगा से मिलने के पूर्व पूर्णिया ज़िला में मानसूनी बाढ़ का तांडव मचाती है। गर्मागरम वातावरण में बीस मिनट में भैरहवा पहुँच गये। टैक्सी से होटल आलोक में पहुँच आराम किया। लंच लेकर लुम्बिनी घूमना तय किया।

लुम्बिनी

नेपाल में लुम्बिनी प्रांत के रूपन्देही जिले में लुम्बिनी बौद्ध तीर्थ स्थल है। बौद्ध परंपरा के अनुसार, यह वह स्थान है जहां रानी महामायादेवी ने 563 ईसा पूर्व सिद्धार्थ गौतम को जन्म दिया था। लुम्बिनी में मायादेवी मंदिर सहित कई पुराने मंदिर हैं। विभिन्न देशों के बौद्ध संगठनों द्वारा विभिन्न नए मंदिर निर्मित किए गये हैं या अभी भी निर्माणाधीन हैं। कई स्मारक, मठ, एक संग्रहालय और लुंबिनी अंतर्राष्ट्रीय अनुसंधान संस्थान भी पवित्र स्थल हैं। इसके अलावा पुष्करिणी सरोवर है, जहाँ महामायादेवी ने प्रसव पूर्व स्नान किया था। लुम्बिनी को 1997 में यूनेस्को द्वारा विश्व धरोहर घोषित किया गया।  

लुम्बिनी एक बड़े मठ क्षेत्र 4.8 किमी (3 मील) और चौड़ाई 1.6 किमी (1.0 मील) से घिरा है जिसमें केवल मठ बनाए जा सकते हैं, कोई दुकान, होटल या रेस्तरां नहीं बनाए जा सकते। यह पूर्वी और पश्चिमी क्षेत्र में विभाजित है। पूर्व क्षेत्र में थेरवा वादी मठ हैं जबकि पश्चिमी क्षेत्र में महायान और वज्रयान मठ हैं। पश्चिमी और पूर्वी क्षेत्रों को अलग करने वाली एक लंबी नहर पानी से भरी है, जिसकी लंबाई के साथ दोनों क्षेत्रों को जोड़ने वाले ईंट मेहराब पुलों की एक श्रृंखला है। नहर के उत्तरी छोर पर मोटर नौकाओं द्वारा पर्यटकों को नौकायन सेवा प्रदान की जाती है। महामाया मंदिर दर्शन के बाद हमने भी नौकायन का आनंद लिया। लुंबिनी के पवित्र स्थल में प्राचीन मठों के खंडहर, एक पवित्र बोधि वृक्ष, एक प्राचीन स्नान तालाब, अशोक स्तंभ और मायादेवी मंदिर है, जिसे पारंपरिक रूप से बुद्ध की जन्मभूमि माना जाता है। बुद्ध की जन्मभूमि होने से विभिन्न देशों के तीर्थयात्री सुबह से लेकर शाम तक इस स्थल पर नामजप और ध्यान करते हैं।

लुम्बिनी में 200 से अधिक दर्शनीय स्थल दस वर्ग किलोमीटर क्षेत्र में बिखरे हैं। हम आलोक-इन होटल में रुके। हम सोच रहे थे कि घूमने के लिए टैक्सी कर ली जाए। मैनेजर से पता चला कि टैक्सी की बजाय इलेक्ट्रिक ऑटो बेहतर रहेगा। वह हमें सभी धार्मिक स्थलों के नज़दीक तक ले जायेगा। जवाहर जी ने पंद्रह सौ रुपए बताने वाले एक इलेक्ट्रिक ऑटो वाले को नौ सौ नेपाली रुपयों में तय कर लिया। बैठने के बाद पता चला कि ऑटो वाला थोड़ा अक्खड़ मिज़ाज है। इसलिए थोड़ा सा हमें भी सख़्त होना पड़ा। सबसे पहले सिद्धार्थ जन्म स्थली महामाया मंदिर देखने पहुँचे। यह एक पुरातात्विक खोज है। भला हो जेम्ज़ प्रिंसेप का जिन्होंने यह जगह खोज निकाली जहाँ सम्राट अशोक का शिलालेख गड़ा था। जो हमें बताता है कि सम्राट अशोक ने उस स्थान को सिद्धार्थ की जन्म स्थली के रूप में खोज कर प्रस्तर शिलालेख स्थापित करवाया था।   घूमने के दौरान पता चला कि लुम्बिनी परिसर को तीन क्षेत्रों में विभाजित किया गया है: पवित्र उद्यान, मठ क्षेत्र, सांस्कृतिक केंद्र और न्यू लुम्बिनी गांव।

  • पवित्र उद्यान लुम्बिनी क्षेत्र में बुद्ध का जन्मस्थान और पुरातात्विक आध्यात्मिक महत्व के अन्य स्मारक जैसे मायादेवी मंदिर, अशोक स्तंभ, मार्कर स्टोन, जन्म मूर्तिकला, पुष्करिणी पवित्र तालाब और अन्य संरचनात्मक खंडहर शामिल हैं।
  • बौद्ध स्तूप और विहार क्षेत्र को दो क्षेत्रों में विभाजित किया गया है: पूर्वी मठ क्षेत्र जो बौद्ध धर्म के थेरवाद स्कूल का प्रतिनिधित्व करता है और पश्चिमी मठ क्षेत्र जो बौद्ध धर्म के महायान और वज्रयान स्कूल का प्रतिनिधित्व करता है, दोनों तरफ उनके संबंधित मठ हैं। एक लंबा पैदल मार्ग और नहर है जिसके दोनों तरफ़ बौद्ध मठ हैं। कई देशों ने अपने अद्वितीय ऐतिहासिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक पृष्ठभूमि में बौद्ध स्तूप और मठ स्थापित किए हैं।
  • सांस्कृतिक केंद्र और न्यू लुम्बिनी गांव में लुम्बिनी संग्रहालय, लुम्बिनी अंतर्राष्ट्रीय अनुसंधान संस्थान, विश्व शांति स्तूप शामिल हैं। जापान का शिवालय, लुम्बिनी क्रेन अभयारण्य और अन्य प्रशासनिक कार्यालय हैं।

बौद्ध के जन्म के समय पहुँच जाएँ तो कहानी आसान लगने लगेगी। ईसा से 600 वर्ष पूर्व तक कृषि, लघु उद्योग और व्यापार स्थापित होकर उन्नति करने लगे थे। स्वामित्व संस्था का विकास होने के फलस्वरूप मालिकाना हक़ की सुरक्षा हेतु एक राजसत्ता की आवश्यकता महसूस की जाने लगी थी। जिसे पूरा करने के लिए समाज के प्रमुख गणों ने जनपद नामक संस्था गठित करना शुरू किया। भारत में तराई के इलाक़े और मालवा-गुजरात के अलावा पंजाब के इलाक़े बहुत उर्वरक होने से ज़मीन सोना उगलने लगी। कारोबार फलने-फूलने लगा। देश-दुनिया का सोना मुद्रा रूप में हाथोंहाथ इन महाजनपदों तरफ़ बह चला। उसी काल में इन इलाक़ों में सोलह जनपदों का विकास हुआ।   

आरंभिक बौद्ध तथा जैन ग्रंथों में निम्न लिखित सोलह महाजनपदों का नाम मिलता है। अंग, अश्मक, अवंति, चेदि, गांधार, काशी, काम्बोज, कोसल, कुरु, मगध, मल्ल, मत्स्य पांचाल, सुरसेन, वज्जि, वत्स। ईसापूर्व छठी सदी में जिन चार महत्वपूर्ण राज्यों ने प्रसिद्धि प्राप्त की उनके नाम हैं, मगध के हर्यंक, कोसल के इक्ष्वाकु, वत्स के पौरव और अवंति के प्रद्योत। जनपदों में घोर हिंसक संघर्ष के दौर में महावीर स्वामी और गौतम बुद्ध का अवतरण हुआ। जनता भी घातक खूनी संघर्षों से परेशान थी। उसने जैन और बौद्ध दर्शनों को अंगीकार किया। पहले बिंबिसार जैन हुए फिर अशोक बौद्ध हो गए थे।  

शाक्यों की राजधानी कपिलवस्तु थी। लुम्बिनी कपिलवस्तु के पूर्व में देवदाह नामक एक कुलीन गणराज्य में स्थित था। बौद्ध परंपरा के अनुसार, यहीं पर बुद्ध का जन्म हुआ था। माना जाता है कि 1896 में रूपन्देही में खोजा गया एक स्तंभ अशोक की लुम्बिनी यात्रा के स्थान को चिह्नित करता है। स्तंभ की खोज से पहले स्थल को लुम्बिनी के नाम से नहीं जाना जाता था। शिलालेख में लेख है: “जब राजा देवनामप्रिय प्रियदर्शिन का अभिषेक हुए बीस वर्ष हो गया था, तो उन्होंने स्वयं इस स्थान पर आकर पूजा की क्योंकि बुद्ध शाक्यमुनि का जन्म यहीं हुआ था। एक पत्थर का खंभा स्थापित किया, कि धन्य यहाँ पैदा हुआ थे। (उसने) लुमिनि के गाँव को उस साल करों से मुक्त कर दिया, और बाद में (केवल) उत्पादन के आठवें हिस्से का भुगतान लिया।” पार्क को पहले रूपन्देही के नाम से जाना जाता था, जो भगवानपुरा के उत्तर में 2 मील दूर स्थित है।

हम सभी साथी महामाया मंदिर में पहुँचे। एक पुरातात्विक खंडहर के बीच में महामाया देवी अशोक वृक्ष की शाखा पकड़े प्रसवलीन हैं। हमें स्मरण हुआ- सुत्त निकाय में कहा गया है कि बुद्ध का जन्म लुम्बिनेय जनपद में शाक्यों के एक गाँव में हुआ था। बौद्ध परंपरा में बुद्ध के जन्म के तुरंत बाद महामाया की मृत्यु हो गई, जिसे आमतौर पर सात दिन बाद कहा जाता है। इस प्रकार महामाया ने अपने बेटे की परवरिश नहीं की, शिशु का पालन-पोषण उनकी मौसी महाप्रजापति गोतमी ने किया था।

महामाया (माया) का अर्थ संस्कृत में “भ्रम” है। माया को महामाया और मायादेवी (मायादेवी, “रानी माया”) भी कहा जाता है। चीनी में, उसे मोये-फ़ेरेन, “लेडी माया”) के रूप में जाना जाता है, तिब्बती में उसे ग्युट्रुल्मा के नाम से, जापानी में उसे माया-बुनिन के नाम से, सिंहली में उन्हें महामाया देवी के रूप में जाना जाता है।

वहाँ उनके जीवन के अन्य दृश्यों को दिखाया गया है, जैसे कि गौतम बुद्ध के साथ उनकी गर्भावस्था की भविष्यवाणी करने का सपना देखना या उनके पति राजा शुद्धोदन के द्वारा बेटे के जीवन के बारे में भविष्यवाणियां करना, उनके जन्म के तुरंत बाद, उन्हें अक्सर गौतम को जन्म देते समय चित्रित किया जाता है, एक घटना जिसे आम तौर पर आधुनिक तराई में लुंबिनी में हुआ माना जाता है। माया को आमतौर पर एक पेड़ के नीचे खड़े होकर जन्म देते हुए और सहारे हेतु एक शाखा को पकड़े ऊपर की ओर पहुंचते हुए दिखाया गया है। बौद्ध विद्वान मिरांडा शॉ, कहते हैं कि जन्म के दृश्य में रानी माया का चित्रण यक्षिणी के रूप में जानी जाने वाली वृक्ष आत्माओं के पहले बौद्ध चित्रणों में स्थापित एक पैटर्न का अनुसरण करता है।

माया का विवाह कपिलवस्तु के शाक्य वंश के शासक राजा शुद्दोधन से हुआ था। वह राजा शुद्दोधन के चाचा की बेटी थी इस प्रकार शुद्दोधन की चचेरी बहन थी; उसके पिता देवदह के गण प्रमुख थे। माया और राजा शुद्धोधन की शादी में बीस साल तक कोई संतान नहीं हुई। किंवदंती के अनुसार एक पूर्णिमा की रात रानी को एक सपना दिखा। उसने महसूस किया कि वह चार देवों द्वारा हिमालय में अनोट्टा झील में ले जाया जा रहा है। उसे सरोवर में स्नान कराने के बाद देवताओं ने स्वर्गिक वस्त्र पहनाए, इत्र से अभिषेक किया और दिव्य फूलों से सजाया। इसके तुरंत बाद एक सफेद हाथी, अपनी सूंड में एक सफेद कमल का फूल लिए प्रकट हुआ और तीन बार उसकी परिक्रमा की, उसके दाहिनी ओर से उसके गर्भ में प्रवेश कर गया। अंत में हाथी गायब हो गया और यह जानते हुए कि हाथी महानता का प्रतीक है, उसे एक महत्वपूर्ण संदेश दिया गया है, रानी जाग गई।  

बौद्ध परंपरा के अनुसार जन्मना बुद्ध तुइता स्वर्ग में एक बोधिसत्व के रूप में निवास कर रहे थे। उन्होंने आखिरी बार पृथ्वी पर पुनर्जन्म लेने के लिए एक सफेद हाथी का आकार लेने का फैसला किया। माया ने सिद्धार्थ को 563 ईसा पूर्व जन्म दिया  गर्भावस्था दस चंद्र महीनों तक चली। प्रथा का पालन करते हुए, रानी जन्म के लिए अपने घर लौट रही थी। बीच राह में वह साल के पेड़ (शोरिया रोबस्टा) के नीचे टहलने के लिए अपनी पालकी से नीचे उतर गई। नेपाल के खूबसूरत फूलों के बगीचे में माया देवी पार्क से प्रसन्न हुई और एक साल पेड़ के नीचे खड़े होकर जन्म दिया। किंवदंती है कि राजकुमार सिद्धार्थ उसके दाहिने तरफ से निकले थे।

विद्वान आम तौर पर इस बात से सहमत हैं कि अधिकांश बौद्ध साहित्य यह मानते हैं कि बुद्ध के जन्म के सात दिन बाद माया की मृत्यु हो गई, और फिर तुसीता स्वर्ग में उनका पुनर्जन्म हुआ। बुद्ध के ज्ञानोदय के सात साल बाद, वह तवतीमसा स्वर्ग की यात्रा करने के लिए नीचे आईं, जहां बाद में बुद्ध ने उन्हें अभिधर्म का उपदेश दिया। उसकी बहन प्रजापति बच्चे की पालक माँ बनी। सिद्धार्थ  आत्मज्ञान प्राप्त करके बुद्ध बनने के बाद, माता को सम्मान देने और धम्म की शिक्षा देने के लिए तीन महीने स्वर्ग में अपनी माँ के साथ रहे।

ललितविस्तार एक संस्कृत महायान बौद्ध सूत्र है जो गौतम बुद्ध की कहानी को तुशिता से उनके वंश के समय से लेकर वाराणसी के पास हिरण पार्क में उनके पहले उपदेश तक बताता है। ललितविस्तार शब्द का अनुवाद “द प्ले इन फुल” या “एक्सटेंसिव प्ले” किया गया है, जो महायान के दृष्टिकोण का जिक्र करता है कि बुद्ध का अंतिम अवतार इस दुनिया में प्राणियों के लाभ के लिए था। देवदाह की यात्रा के दौरान बुद्ध लुम्बिनि वन में रहे और वहां देवदाह सुत्त का प्रचार किया।

1896 में, जनरल खड्गा समशेर राणा और एलोइस एंटोन फ्यूहरर ने 7वीं शताब्दी ईस्वी में प्राचीन चीनी भिक्षु-तीर्थयात्री जुआनज़ांग द्वारा और एक अन्य प्राचीन चीनी भिक्षु-तीर्थयात्री फैक्सियन द्वारा सृजित महत्वपूर्ण ऐतिहासिक अभिलेखों में उल्लेख है कि रूपन्देही में एक महान पत्थर के स्तंभ की खोज की। स्तंभ पर ब्राह्मी शिलालेख इस बात का प्रमाण देता है कि सम्राट अशोक ने तीसरी शताब्दी ईसा पूर्व में इस स्थान का दौरा किया था और इसे बुद्ध के जन्म स्थान के रूप में पहचाना था। शिलालेख का अनुवाद परनवितन ने किया था।

रॉबिन कॉनिंघम के अनुसार लुंबिनी में मायादेवी मंदिर में अशोक युग के दौरान मौजूदा ईंट संरचनाओं के नीचे खुदाई बौद्ध मंदिर की दीवारों के नीचे एक पुरानी लकड़ी की संरचना के प्रमाण प्रदान करती है। अशोक मंदिर का लेआउट उस काल की लकड़ी की संरचना का बारीकी से अनुसरण करता है, जो साइट पर पूजा की निरंतरता की तरफ़ इंगित करता है। मौर्य पूर्व की लकड़ी की संरचना एक प्राचीन वृक्ष मंदिर प्रतीत होती है। लकड़ी के पोस्टहोल से लकड़ी का कोयला की रेडियोकार्बन डेटिंग और मिट्टी में तत्वों की वैकल्पिक रूप से उत्तेजित ल्यूमिनेसिसेंस डेटिंग से पता चलता है कि मानव गतिविधि लगभग 1000 ईसा पूर्व लुंबिनी में शुरू हुई थी। कॉनिंघम बताते है, साइट 6 वीं शताब्दी ईसा पूर्व से एक बौद्ध स्मारक हो सकता है।

हमने बुद्ध की जन्मस्थली पर वह चीज पता करने की कोशिश की जिसे “ज्ञान” कहते हैं। जिसका उपदेश उन्होंने दुनिया को दिया। इसका सारांश क्या है। वह जैसा हमें समझ आया, वह इस तरह है।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – २ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – २ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

कुंभ पर्वात स्नानाचे पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी संबंध भारतातून लाखो लोक हरिद्वारला जमतात. सर्वजण बहुसंख्येने हरकी पौडीकडे स्नानासाठी धावतात. या ठिकाणचा घाट पूर्वी अतिशय अरुंद होता. अनावर झालेल्या गर्दीमुळे अनेक यात्रेकरू चिरडून मरण पावल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. १८१९ साली भरलेल्या कुंभमेळ्या प्रसंगी ४०० लोक प्राणास मुकले. अशा प्रकारच्या घटना १९२७, १९३८, १९४४ व १९५० यासाली अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभाचे प्रसंगी घडल्या आहेत. त्यामुळे हरकी पौडी घाटाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या घाटाच्या कडेला एक टेकडी होती त्यावर आता घरे, मंदिरे आणि विविध दुकाने उभी राहिली आहेत. पूर्वी उन्हाळ्यात ब्रह्मकुंडाच्या पाण्याची पातळी कमी व्हायची. कधी कधी ते कोरडे ठणठणीत पडायचे. त्यासाठी सप्तधारा या ठिकाणी एक बांध घालण्यात आला. त्यातून एक कालवा काढण्यात येऊन तो कुंडाच्या ठिकाणी वळविण्यात आला. त्यामुळे हे ब्रह्मकुंडच कालव्यात सामावून गेले. कुंडावरून कलकल करीत गंगा पुढे धावते. मध्येच एक बेटासारखा भाग निर्माण झाला आहे त्याला मालद्वीप म्हणतात. त्याच्या पलीकडून गंगेची दुसरी धार वाहते. त्यामुळे हरकी पौडी या घाटाची रुंदी आता दीडशे मीटर झाली आहे. बेटासह सर्व घाट उद्योगपती बलदेवप्रसाद बिर्ला यांनी तांबड्या फरशीने बांधून काढला. बेटावर राजविली स्मृती टॉवर उभारण्यात आला आहे. त्याला घंटाघरही म्हणतात. हरकी पौडीवर भगवान विष्णूंच्या पदकमलांची चिन्हे अंकित होती, तसेच मुघल सम्राट अकबराचा विश्वासू राजा मानसिंग याचीही समाधी हरकी पौडी जवळ होती. त्यावर मोगलकालीन शिल्पकृती होत्या एम. या राजा मानसिंगाने हरिद्वारची पुनर्स्थापना करून त्याचे सुंदर नगरीत रूपांतर केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी गंगेत विसर्जन करण्यासाठी सम्राट अकबराने खास व्यवस्था केली होती. तसेच गंगाकाठी त्याची समाधी बांधली. परंतु महापुराने ही समाधी व विष्णु पदचिन्ह घाटावरून अदृश्य झाले.

पूर्वी गंगेला आलेल्या महापुरामुळे हरिद्वारचा अनेक वेळा विध्वंस झाला आहे. १९२४ मध्ये आलेल्या महापुरामुळे तर संपूर्ण हरिद्वार जलमय झाले होते. पुराचे संकट कायमचे टाळण्यासाठी गंगेच्या मुख्य प्रवाहाला अनेक फाटे फोडून कालवे काढण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य प्रवाह विभक्त होऊन पुराचे संकट आता उरले नाही. गंगेच्या विविध कालव्यांवर अनेक पूल नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हरिद्वार आज पूल आणि मंदिरांची नगरी बनले आहे. गरुड घाटावर बांधण्यात आलेला गंगा नहर पुल हा सर्वात जुना पूल होय. हा १८५४ साली बांधण्यात आला आहे. भारतात सप्तमोक्षदायी जी सात तीर्थस्थाने आहेत त्यापैकी हरिद्वार एक होय. गंगाद्वार, ब्रह्मपुरी, स्वर्गद्वार, कपिल या नावाने हरिद्वारचा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. स्कंदपुराणात हरिद्वारला मायापुरी म्हटले आहे.

अयोध्या मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका॥

पुरी, द्वारावती दैव स्वप्तैते: मोक्षदायका:॥

असे वर्णन गरुड पुराणात आहे. या मायापुरी नगरीची लांबी १२ योजने होती. रुंदी तीन योजने होती. पूर्वेला नील, दक्षिणेला चक्रतीर्थ व उत्तरेला रत्नस्तंभ पर्वतापर्यंत माया नगरीचा विस्तार होता. नैसर्गिक घडामोडीत कालांतराने या नगरीचा विनाश झाला. केवळ १५ किलोमीटर परिसरात विस्तारलेले आजचे हरिद्वार पूर्वीच्या प्राचीन मायापुरीचाच एक भाग होय. फार वर्षांपूर्वी हरिद्वारच्या गंगाकाठचा परिसर अति घनदाट अरण्याने व्यापलेला होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी जाळलेले पांडवकालीन खांडववन म्हणजेच हा प्रदेश होय असे पुराण इतिहास संशोधकांचे मत आहे. खांडववन जाळून निसर्ग विनाश घडवून आणल्याबद्दल श्रीकृष्ण व अर्जुनाचा अनेक निसर्गप्रेमी ऋषीमुनीनी निषेध केला होता असे हरिद्वारच्या एका निसर्गप्रेमी साधकाने उल्लेखिले आहे. याच परिसरात पांडव वनवासात राहिले होते. पुलत्सवंशीय रजपूत राजा इसमसिंह याने २००० वर्षांपूर्वी आजच्या हरिद्वार नगराची पुनर्स्थापना केली होती असे म्हणतात. हरिद्वारवर राज्य करणारा वेणू हा शेवटचा राजा होता. उत्खननात त्याच्या नावाची नाणी सापडतात.

गंगा स्नानानंतर नाश्ता करून १० वाजता ऋषिकेशला जायला निघालो. हरिद्वार ते ऋषिकेश २८ किलोमीटर्स आहे. आम्ही ११ वाजता ऋषिकेशला पोहोचलो. मणिकूट पर्वताच्या कुशीत गंगाकाठी वसलेले हृषीकेश म्हणजेच भगवान विष्णूचा निवास असलेली भूमी. बहुसंख्य लोक हृषीकेशचा अपभ्रंशाने ऋषिकेश असा उल्लेख करतात. त्याचा अर्थ ऋषींच्या निवासाची भूमी असाही केला जातो. वशिष्ठ, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, परशुराम इत्यादी तपस्व्यांच्या साधनेने ही भूमी पवित्र पावन झालेली आहे. स्वयंभू मनू, महाराज दक्ष, राजा भगीरथ, राजा नहुष, श्रीराम लक्ष्मण, धर्म, भीम, अर्जुन व गौतम बुद्ध या राजघराण्यातील श्रीमंत योगी पुरुषोत्तमांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. त्यामुळे ऋषिकेशचे सारे वातावरण हजारो वर्षांपासून अविनाशी तेजाने भारलेले आहे. ऋषिकेशमध्ये पाऊल टाकले की मनातील विकारांचा व विचारांचा केरकचरा गळून पडतो. तनमन शांत होऊन गंगेच्या पाण्यासारखे पवित्र होते. त्यासाठीच लाखो यात्रेकरू ऋषिकेशकडे लोहचुंबकासारखे आकर्षिले जातात.

ऋषिकेश ही दहा हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली तपभूमी होय. पुराणकाळी तप:साधना करणाऱ्या ऋषीमुनींना त्रास देऊन त्यांच्या साधनेत विघ्न निर्माण करणाऱ्या मधु आणि कैटरी या दैत्यांचे उच्चाटन श्रीविष्णुने केले. ही स्कंद पुराणातील कथा एका साधकाने सांगितली. श्री विष्णूची भूमी म्हणून पूर्वी या ठिकाणाचे नाव श्रीकेश होते. यासंबंधानेही त्याने दुसरी कथा ऐकवली. एका आम्र वृक्षाखाली रैभ्य नावाचा कुबडा ऋषी श्री विष्णूसाठी तप करीत होता. त्याच्या कठोर तपाने श्रीविष्णू त्याला प्रसन्न झाले. त्यावेळी रैभ्य ऋषींना श्री विष्णूंनी वचन दिले की माझा कायम येथे निवास राहील. यापुढे या भूमीचे नाव श्रीकेश होईल. पुढे याच श्रीकेशचा अपभ्रंश होऊन हृषिकेश आता ऋषिकेश असे या भूमीचे नाव प्रख्यात झाले.

विसाव्या शतकात स्वामी शिवानंद, स्वामी करुणानंद, स्वामी पूर्णानंद, शारदानंद, नारायणा नंद, कृष्णानंद हे जगप्रसिद्ध योगी या परिसरात होऊन गेले. ऋषिकेश मध्ये आश्रम स्थापन करून वेदाभ्यास, योग, संस्कृत भाषा प्रसाराबरोबरच मानव कल्याणाचे ऐतिहासिक कार्य या योगी जनांनी केले. त्यामुळे अनेक भारतीय व परदेशी नागरिक योगपारंगत झाले. भारतीय योगविद्या परदेशात पोहोचली. आजही या आश्रमांतून भारताचा पौराणिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य अखंडपणे चालू आहे. आज ऋषिकेश योगविद्येचे विश्वविद्यापीठ बनले आहे.

ऋषीकेशला पोहोचल्यावर पुसेगावकरांनी त्यांच्या ओळखीच्या एका गाइडला बोलावून घेतले. रस्ता चिंचोळा असल्याने आमची बस गावात फिरू शकणार नाही, यास्तव आपण रिक्षा करूया असे त्याने सुचविले. त्याप्रमाणे एका रिक्षात तीन जण असे रिक्षा करून आम्ही निघालो. ऋषिकेशमध्ये तपोवन नावाचा विभाग आहे. बहुसंख्य मंदिरे याच भागात आहेत. त्या भागात आम्ही पोहोचलो.

पहिल्यांदा आम्ही गेलो बद्रीनाथ- केदारनाथ स्मृती मंदिरात. भगवान बद्रीनाथ व भगवान केदारनाथ यांची ही दोन मंदिरे कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वतींच्या पदतीर्थयात्रेच्या स्मृतीप्रित्यर्थ सन १९८६ साली निर्मिली आहेत. पारंपारिक द्रविड शैलीतील ही मंदिरे देखणी आहेत. ज्यांना कांही कारणवश बद्रीनाथ व केदारनाथ यात्रा शक्य होत नाही, त्यांनी येथे दर्शन घेतल्यास तेव्हढीच पुण्यप्राप्ती होते अशी मान्यता आहे.

नंतर आम्ही गेलो सीता रामधाम मंदिरात. याला गंगामाता मंदिर असेही म्हणतात. हे १८ मजली मंदिर असून यातील बरेचसे मजले अंडरग्राउंड आहेत. गेल्या गेल्या आपणास दुर्गा मातेचे मंदिर दिसते. वरील मजल्यावर मकरवाहिनी गंगामाता मंदिर आहे. तेथून गंगानदी व ऋषिकेश यांचा अप्रतिम नजारा दिसतो. उतरतांना आपण अंडरग्राउंडला जातो, विविध मजल्यांवर जवळ जवळ १००० खोल्या असून त्यांत देवदेवतांच्या सुंदर मूर्त्या आहेत. रावण वधानंतर रामाला ब्रह्मदोष लागला, त्याच्या निवाणार्थ त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषींनी त्याला केदारखंडला जाऊन तप करण्यास सुचवले. राम, लक्ष्मण, सीता ऋषिकेशला पोहोचल्यावर तपोवनातील या स्थानावर गंगामाता त्यांच्या स्वागतार्थ आली. तेथे एका मंदिराचे निर्माण करण्यात आले ते हेच मंदिर होय.

नंतर आम्ही गेलो राधा कृष्ण मंदिर आनंद धाम येथे. येथे राधाकृष्ण व देवदेवतांच्या सुंदर मूर्ती आहेत. जवळच फक्त लक्ष्मणाचे देऊळ आहे. मला वाटतं फक्त लक्ष्मणाचे असे हे एकमेव देऊळ असावे. येथे आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी लक्ष्मणाने तपश्चर्या केली होती.

नंतर आम्ही सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिर बघितले. येथील शिवलिंग साडेअकरा फूट उंच असून त्याचे वजन १२ टन आहे.

नंतर आम्ही प्रसिद्ध असा लक्ष्मण झुला बघितला. रावणवध करून रामाने सीतेची लंकेच्या तुरुंगातून सुटका केली. सीतेसह रामलक्ष्मण अयोध्येला परतले. अयोध्या नगरवासीयांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परंतु अनेक दिवस रावणाच्या ताब्यात असलेल्या सीतेच्या चारित्र्याबद्दल कांही क्षुद्र प्रवृत्तीच्या प्रजाजनांनी आक्षेप घेतला. त्यानुसार रामाने सीतेचा त्याग केला. सीतेला यासंबंधाने रामाने कांहीएक न सांगता हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अरण्यात सोडून येण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपविण्यात आली. ज्या ठिकाणी लक्ष्मणाने सीतेला सोडले तेच गंगाकाठचे लक्ष्मण झुल्याजवळचे ठिकाण होय. सीतेला गंगेचे विशाल पात्र पार करता यावे म्हणून लक्ष्मणाने बाणांचा पूल त्या ठिकाणी बनवला. अशी रामायणात कथा आहे. हा लक्ष्मणाचा बाणांचा पूल कालौघात नष्ट झाल्यावर त्याची स्मृती म्हणून जुटच्या दोरखंडाचा पूल बनविण्यात आला. याच झुलत्या पुलाला लोक लक्ष्मण झुला म्हणू लागले. तेच नाव अजपावेतो रूढ झाले आहे. १८८९ मध्ये सूरजमल नागरमल या राजस्थानच्या दानशूर सावकाराने सध्याचा लोखंडी झुलता पूल बांधला. त्यात अनेकवेळा दुरुस्त्या करून तो आता भक्कम बनविण्यात आला आहे. सुरक्षा कारणास्तव २०२० पासून त्यावर कोणालाही जाऊ दिले जात नाही. आम्हीला देखील पूल फक्त जवळून पाहता आला. त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक फोटो काढून घेतले व दुधाची तहान ताकावर भागविली.

लक्ष्मण झुला पाहून आम्ही परत हरिद्वारला यायला निघालो व दोन वाजता हरिद्वारला पोहोचलो. जेवण वगैरे करून आम्ही हरिद्वार दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो. त्यासाठी आम्ही एक रिक्षा ठरवली.

सर्वप्रथम आम्ही राम दरबार शीश महल मंदिरात गेलो. गेल्या गेल्या राम-लक्ष्मण-सीता व हनुमान असलेला राम दरबार दिसतो. अत्यंत देखण्या अशा या मूर्ती आहेत. मंदिरात गणेश भगवान, हनुमान, लक्ष्मी नारायण, सरस्वती, संतोषी माता, स्कंद माता, कात्यायनी माता, दुर्गा माता, राधा कृष्ण यांच्या देखण्या मूर्ती आहेत. एका विशिष्ठ कोनातून पाहिले असता त्या मुर्तीच्या असंख्य प्रतिमा दिसतात. एका काचेच्या बंदिस्त टाकीत तरंगता पाषाण आहे त्याला राम सेतू पत्थर म्हणून ओळखले जाते. वरच्या मजल्यावर विविध मूर्ती, पौराणिक गोष्टींवर आधारित देखावे, चित्रे आहेत.

यानंतर आम्ही गेलो आचार्य बेला इंडिया टेंपल बघायला. हे मंदिर रामानुज संप्रदायाशी निगडित आहे. हे सप्त सरोवर मार्गावर आहे. येथे रामायण व महाभारतातील विविध प्रसंगांचे देखावे खुबसूरतरित्या साकारले आहेत. या मंदिराची स्थापना १९५० च्या काळात झाली आहे. महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाद्वारा अर्जुनास उपदेश देतानाच प्रसंग आहे, लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापतानाचे चित्र, आपल्या गुरु आज्ञेनुसार राम लक्ष्मण त्राटीकेचा वध करतानाचा देखावा आहे, आत गेल्या गेल्या श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलतानाचे अद्भुत चित्र आहे, श्री कृष्णाचे विराट रूपदर्शन, भगवान रामाचा लंका विजय, लक्ष्मणाला शक्ती लागणे, यशोदा मैय्या बरोबरच्या बालकृष्ण लीला आदि देखावे आवर्जून बघण्यासारखे आहेत. बहुसंख्य मूर्ती व देखावे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवले आहेत.

यानंतर अशाच पद्धतीचे आणखी एक मंदिर बघितले. तिथेही देवदेवतांच्या मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिस मधून साकारलेले पौराणिक गोष्टींवर आधारित देखावे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेला भुयारी मार्ग वगैरे होते. गंगावतरणाचा देखावा लक्ष वेधून घेणारा होता. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक फोटो काढून घेत होते.

त्यानंतर आणखी एक राम मंदिर बघितले. गेल्या गेल्या राम-लक्ष्मण-सीता व हनुमान यांचे देऊळ दिसते. मूर्ती अत्यंत देखण्या आहेत. याशिवाय गणेश भगवान, राधा कृष्ण, संकटमोचन हनुमान, दुर्गामाता वगैरे अनेक देवदेवतांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामचरित मानस लिहिलेले आहे. प्रत्येक चौपाई स्पष्ट वाचता येते; तसेच लंका कांड, सुंदर कांड वगैरे प्रत्येक कांडांचे सेपरेशन व्यवस्थित केले आहे.

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ आमची चार धाम यात्रा – भाग – १ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? मी प्रवासी ?

☆ आमची चार धाम यात्रा – भाग – १ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आमचे एक नातेवाईक श्री पुसेगावकर यांनी नुकतीच श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ ही यात्रा कंपनी सुरू केली होती. ते नुकतेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले होते व त्यांची पुढची यात्रा हिमालयातील चार-धाम होती. यात्रा खर्च प्रत्येकी रु ४५,  ०००/- येणार होता. त्यापैकी रु २०, ०००/- लगेच पाठवून उर्वरीत रक्कम नंतर पाठवायची होती. त्याप्रमाणे २३ मार्चला आमच्या दोघांचे रु ४०,०००/- आम्ही पुसेगावकरांना G-pay ने पाठविले.

आमची टूर दिल्ली-चार धाम- दिल्ली अशी होती. ती २६ मे ला दिल्लीहून सुरू होऊन ७ जूनला दिल्लीला संपणार होती. चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड टुरिझम डेवलपमेंट बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करावे लागते; त्यात यात्रेचा कालावधी,  कोणत्या तारखेला तुम्ही कोठे असणार आहात वगैरे तपशील ध्यावा लागतो. सर्व यात्रेकरूंची रजिस्ट्रेशन्स श्री. पुसेगावकरांनी करून सर्वांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स पाठवली. आमचे रजिस्ट्रेशन २८ मार्चला झाले.

दरम्यानच्या काळात २२ एप्रिलला पहेलगाम हल्ल्याची दुःखद घटना घडली. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी त्यांचे पर्यटन रद्द केलेच पण इतरही ठिकाणच्या अनेक पर्यटकांनीही त्यांच्या टूर्स रद्द केल्या. आमच्या मनातही चलबिचल सुरू झाली. पहेलगामच्या भ्याड हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. आता हे युद्ध किती दिवस चालणार,  आपली यात्रा होणार की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. पण चारच दिवसांत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली. पाकिस्तानने युद्धबंदी करावी अशी भारताला विनंती केली व भारताने ती मान्य केली व १० मे रोजी हे युद्ध संपले. हळू हळू वातावरण निवळू लागले व आम्ही ठरल्याप्रमाणे यात्रेला जायचे नक्की केले व १३ मे ला चारधाम यात्रेचे राहिलेले पैसे व बुकिंगचे पैसे असे रु ५८, ४५०/- श्री पुसेगावकरांना G-pay ने पाठविले.

दरम्यान केदारनाथकडे जाणाऱ्या घोड्यांना कोरोना सदृश आजार झाला आहे व त्याची लागण यात्रेकरूंना होत आहे अशी बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. श्री. पुसेगावकरांनी त्यांच्या केदारनाथ येथील कॉन्टॅक्टस् कडे विचारपूस करून ही बातमी निराधार आहे याची शहनिशा केली.

 १६ मे रोजी पुसेगावकरांनी यात्रेचा संपूर्ण तपशील पाठविला. त्यात कोणत्या दिवशी किती वाजता निघायचे,  मुक्कामाला आपण कोठे असणार आहोत वगैरे इत्यंभूत माहिती होती. तसेच गरम कपडे,  छत्री,  रेनकोट,  कुठे कुठे ओटी भरायची आहे व त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे इत्यंभूत माहिती पाठवली.

पुणे मार्गे दिल्ली

२३ तारखेला सव्वा नऊ वाजता वंदे भारत एक्सप्रेसने आम्ही पुण्याला निघालो. आज पर्यंत वंदे भारत गाड्यांविषयी फक्त ऐकून होतो,  पण आज गाडी प्रत्यक्ष अनुभवता आली. आरामदायी आसने,  सर्वांना सोसेल एवढे वातानुकूलन,  स्वच्छता,  पडद्यावर दिसणारी गाडीची सद्य:स्थिती म्हणजे पुढील स्टेशन किती लांब आहे,  तेथे पोहोचण्याची वेळ,  गाडीचा सध्याचा वेग वगैरे. एवढा वेग असूनही पोटातील पाणीही हालत नव्हते. गाडीची फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे गाडीत फक्त कन्नड व इंग्रजी वृत्तपत्रे वाचायला दिली गेली. गाडी हुबळीतून सुटत होती त्यामुळे कन्नड वृत्तपत्र ठीक आहे,  पण गाडीचा बहुतांश प्रवास महाराष्ट्रातून होत असल्याने मराठी वृत्तपत्र देणेही आवश्यक आहे. गाडी ठीक सव्वा वाजता पुण्याला पोहोचली. आम्हाला घ्यायला अमित आला होता. दोन सव्वादोनला चि. मुग्धाच्या घरी पोहोचलो. पुणे मुक्कामी अमितने आम्हाला परमपूज्य गुळवणी महाराजांनी चालू केलेल्या ‘वासुदेव निवास’ या पवित्र ठिकाणी नेले. तेथे मनःशांतीचा विलक्षण अनुभव येतो. चि. मुग्धाने आमची बडदास्त अत्यंत उत्तम ठेवली होती.

२५ मे रोजी सकाळी दर्शन एक्सप्रेसने आम्ही दिल्लीला प्रयाण केले व खऱ्या अर्थाने आमची यात्रा सुरू झाली. २६ मे ला सकाळी सात वाजता फिरोजपूरला (दिल्लीला) पोहोचलो. पुसेगावकरांनी हॉटेल ‘लकी इन’ मध्ये काही खोल्या आरक्षित केल्या होत्या. स्टेशन पासून हे हॉटेल साधारण १२-१३ किलोमीटरवर आहे. खोलीवर जाऊन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला,  तोवर अकोल्याचे यात्रेकरू देखील येऊन पोहोचले. श्री व सौ पुसेगावकरांची तेथेच भेट झाली. दुपारी तीन वाजता हरिद्वार कडे प्रयाण करायचे होते,  मधल्या काळात स्त्रीवर्गाने करोलबाग मध्ये जाऊन थोडेफार शॉपिंग केले. दुपारी दीड-दोन च्या सुमारास जेवण करून हॉटेलपासून साधारण एक किलोमीटरवर पार्किंग केलेल्या २२आसनी टुरिस्ट बस मध्ये बसलो. बस समोर नारळ वाढविण्यात आला व देवादिकांचा जयघोष करून बस मार्गस्थ झाली. थोड्या वेळाने गाणी व जोक्स यांना उधाण आले. शिरीष पुसेगावकर किशोरदांचे जबरदस्त फॅन आहेत. किशोरदांची अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांनी एक माहोल पैदा केला. अमितनेही गाणी म्हटली. अत्यंत अध्यात्मिक असलेला अमित एवढी छान गाणी म्हणतो. हे आम्हाला प्रथमच कळले. शुभांगीनेही काही गाणी म्हंटली. पुण्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी मनोरंजक किस्से सांगून प्रवाशांची करमणूक केली. अकोल्याची बरीचशी मंडळी नाना महाराज तराणेकरांची अनुयायी होती त्यामुळे संध्याकाळी सात वाजता सार्वजनिक त्रिपदीचे म्हणणे झाले. हा त्रिपदी म्हणण्याचा परिपाठ पूर्ण यात्रेदरम्यान सुरू होता; अगदी केदारनाथच्या गोठविणाऱ्या थंडीतही! त्यामुळे सर्वांना मानसिक बळ मिळायचे. बसमध्ये नाना महाराजांचा फोटो ही लावण्यात आला. आमचा ड्रायव्हर एक सरदारजी होता. बस चालवण्याचे त्याचे कौशल्य काही वेळातच आमच्या लक्षात आले.

२६ मे ला रात्री नऊ वाजता आम्ही हरिद्वारला पोहोचलो. आमची राहण्याची सोय लाला किशनलाल सेवाकुंज मध्ये करण्यात आली होती. पूर्ण यात्रेदरम्यान शुद्ध शाकाहारी जेवण होते. यासाठी एक जीप होती. त्यात तांदूळ,  गव्हाचे पीठ वगैरे असायचे; फक्त भाज्या रोज मार्केट मधून आणल्या जायच्या. आचारी व त्यांची टीम नागपूरची होती. स्वयंपाक अत्यंत रुचकर असे. साधारण एक दिवसाआड गोड पक्वान्न असायचे. ही टीम एवढी प्रेमळ होती की,  मला एकट्याला केदारनाथहून यायला उशीर झाला संध्याकाळचे सहा वाजले. त्या दिवशी पुरणपोळीचा बेत होता; तर सहा वाजता सुद्धा मला गरम गरम पोळ्या करून आग्रहाने वाढण्यात आल्या. पुसेगावकरांनी खास नागपूरहून आंबे आणले होते. एक दिवस आमरसाचा बेत होता. यात्रा सुरू होण्यापूर्वी आम्हाला पूर्ण यात्रेची ईटीनरी देण्यात आली होती; तरीपण रोज जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जायची; तद् नुसार २७ तारखेला पहाटे पाच वाजता गंगा स्नानास जायचे होते,  दहा वाजता ऋषिकेश दर्शनाचा कार्यक्रम व अडीच वाजता ऋषिकेशहून परत हरिद्वार व त्यानंतर हरिद्वार दर्शन व संध्याकाळी गंगा आरती असा कार्यक्रम होता. गंगा स्नानासाठी कोठे जायचे,  काय काळजी घ्यायची हे सर्व तपशीलवार सांगण्यात आले.

हरिद्वार आणि ऋषिकेश दर्शन

सत्तावीस तारखेला पहाटे पाच वाजता उठलो व हॉटेलपासून रिक्षाने सर्वानंद घाटावर स्नानासाठी आलो. आयुष्यात एकदा गंगा स्नान व जवळून हिमालय दर्शन या माझ्या अनेक वर्षांपासूनच्या इच्छा होत्या त्यातील एक आज पूर्ण होणार होती. येथे गंगा नदीचे पात्र भरपूर विस्तीर्ण असून पाण्याला ओढ देखील भरपूर आहे; म्हणून नगर निगमने लोखंडी कठडे व दोरखंड बसवले आहेत. इतर सर्वांनी दोराला धरून नदीत बुड्या मारल्या. मी सर्वप्रथम गंगेला मनःपूर्वक नमस्कार केला व पायरीवर बसून तांब्याने डोक्यावरून आंघोळ केली. गंगा स्नानाची एक इच्छा पूर्ण झाली.

गंगेच्या काठावर वसलेले हरिद्वार हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र. साधुसंत,  महात्मे यांच्या गंगाकिनारी असलेल्या कायम वास्तव्यातूनच या पवित्र नगरीचा उदय झाला. राम-लक्ष्मण,  पांडव आणि अनेक थोर ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन बनली आहे. सर्वसामान्य माणसाला गंगा दर्शन प्रथम येथे घडते म्हणून या नगरीला जिव्हाळ्याने गंगाद्वार असेही म्हणतात.

यवनांच्या आक्रमणाचे अनेक प्रहार झेलूनही हिंदू धर्माची पताका फडकवीत ही भूमी उभी आहे. अशा या पुण्यभूमीच्या दर्शनाने आम्ही पावन झालो. जमुनोत्री,  गंगोत्री,  केदारनाथ व बद्रीनाथ या हिमालयातील चार धाम यात्रेचा शुभारंभ हरिद्वारपासूनच होतो व या पवित्र यात्रेची सांगताही हरिद्वार येथेच होते. हिमालय हा हरी (विष्णू) व हर (शंकर) यांचे निवासस्थान म्हणून या नगरीचे नाव हरिद्वार पडले. विष्णूभक्त ‘हरिद्वार’ म्हणतात तर शिवभक्त ‘हरद्वार’ म्हणतात. या ठिकाणी ब्रम्हा-विष्णू-महेशाचे कायमचे वास्तव्य असल्याची प्रत्येक हिंदूधर्मियाची अढळ मान्यता आहे. या बाबत एक पुराणकथा आहे ती अशी: राजा श्वेत याने गंगाकिनारी एका जलकुंडा जवळ उभे राहून ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली. राजाची घोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले व राजाला वर मागण्यास सांगितले. त्यावर राजा म्हणाला,  ”देवा मला कोणती काही प्रकारची ऐहिक सुख व संपत्ती नको,  माझे तुम्हा जवळ एकच मागणे आहे ते म्हणजे आपण,  विष्णू देव आणि शंकर महादेव यांनी या नगरीत सदैव वास्तव्य करावे. ”तेव्हापासून हरिद्वारात ब्रह्मा-विष्णू-महेश निवास करून आहेत. ज्या कुंडाच्या ठिकाणी ब्रह्मदेव श्वेतराजाला प्रसन्न झाले त्या कुंडाला ब्रह्मकुंड नाव पडले. याच ठिकाणी दक्षाला विष्णुदर्शन झाले. ब्रह्मकुंडालाच ‘हर की पौडी’ असेही म्हणतात. या संबंधात दुसरी एक कथा आहे.

राजा विक्रमादित्याचा भाऊ भृतृहारी याने या ठिकाणी तपश्चर्या करून अमरपद प्राप्त केले. त्याच्या स्मरणार्थ राजा विक्रमादित्याने ब्रह्मकुंडात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या. या पायऱ्यांना लोक ‘हरी की पैडिया’ म्हणू लागले. त्याचा अपभ्रंश होऊन ‘हर की पौडी’ हे नाव रूढ झाले.

सागर मंथनातून निघालेला अमृतकुंभ दानवांकडून हिसकावून घेऊन ज्यावेळी ब्रह्मदेव निघाले त्यावेळी त्यांनी काही काळ या ब्रह्मकुंडा जवळ विश्रांती घेतली. या अमृतकुंभातले काही अमृतकण या कुंडात पडले,  त्याने या कुंडातील पाणी अमृतमय बनले अशी आख्यायिका आहे. या अमृतकुंडात स्नान केल्याने माणसाची जन्म जन्मांतरीची पापे नाहीशी होतात,  वर्तमान जीवनातील त्याची पाप वासना जळून जाते,  त्याचे तन – मन पवित्र होते,  मृत्यूनंतर पुनर्जन्मास न येता माणूस अमरपदास पोहोचतो अशी प्रत्येक हिंदूची श्रद्धा व भावना आहे. याच भावनेतून दर सहा वर्षांनी अर्ध कुंभ व बारा वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरतो. हिमालयाच्या कुशीत कडेकपारीतील गुहेत राहणाऱ्या तपस्वी साधूमुनींसह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो साधुगण आणि यात्रेकरू हरिद्वारात कुंभ पर्वाच्या दिनी जमतात. २०२१ मध्ये झालेल्या कुंभ पर्वास ९१ लाख यात्रेकरू जमले होते. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने खास व्यवस्था ठेवली होती. याबाबत माहिती सांगताना एक नागा साधू म्हणाला,  “अमृत कुंभाकरता देव आणि दानव यांच्यात बारा दिवस कलह चालला. स्वर्गलोकांतले हे बारा दिवस पृथ्वीवरील बारा वर्षे होत. देवाने आपल्या ताब्यातला अमृतकुंभ बारा दिवसात ज्या बारा ठिकाणी ठेवला त्या बारा ठिकाणांवर या अमृतकुंभाच्या स्मरणार्थ कुंभ पर्व साजरे केले जाते. ज्या ठिकाणी हा कुंभ ठेवला त्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ज्या तिथीला हे अमृतकण या ठिकाणी पडले त्या तिथीला कुंभ पर्व मानून त्या ठिकाणच्या जलप्रवाहात स्नान केल्याने माणसास अमरत्व लाभते,  तो स्वर्गलोकीचा निवासी बनतो जन्ममृत्यूच्या संकटातून तो मुक्त होतो. हा अमृतकुंभ ठेवलेल्या बारा ठिकाणांपैकी आठ स्वर्गलोकी आहेत बाकी चार ठिकाणे पृथ्वीवर आहेत. हरिद्वार,  प्रयाग,  उज्जैन व नाशिक अशी ही ठिकाणे होत. मेष राशीतून कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश होतो त्यावेळी हरिद्वारात कुंभमेळा भरतो. नागा साधू संप्रदायात शस्त्रधारी आणि शास्त्रधारी असे दोन प्रकार आहेत. मुघलांनी ज्यावेळी हरिद्वारवर आक्रमण केले त्यावेळी शस्त्रधारी साधूंनी पराक्रम गाजवून मोगलाचे आक्रमण परतवून लावले. हिंदू धर्म संस्कृती व मंदिराचे रक्षण केले म्हणून कुंभमेळ्याच्या दिनी या साधूंना गंगेतील ब्रह्मकुंडात सर्वप्रथम स्नान करण्याचा मान आहे. त्यानंतर इतर साधुसंत स्नान करतात तर सर्वात शेवटी इतर लोक स्नान करतात. सतत तीन दिवस या पवित्र पुण्यदायी स्नानाचा कार्यक्रम चालतो. सर्व साधू सोन्या-चांदीने मढवलेल्या हत्ती घोड्यावरून वाजत गाजत भव्य मिरवणुकेने हरकी पौडी घाटावर जातात. त्यात नग्न साधू,  वस्त्रधारी साधू बहुसंख्येने सहभागी होतात. कुंभपर्व प्रसंगी हर की पौडीवरील गंगेच्या ब्रह्मकुंडात स्नान केल्याने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या कृपेस प्राप्त होतो,  त्याच्या सर्व पापांचा क्षय होतो. या स्नानाने १००० अश्वमेध यज्ञ १०० वाजपेयी यज्ञ,  १००० वेळा कार्तिक स्नान,  नर्मदेतील एक करोड वैशाखी स्नान व पृथ्वीला एक लाख प्रदक्षिणा घालण्याची पुण्याई लाभते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – rgpujari@gmail.com मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य # २२५ – पर्यटन- एलोरा का धर्मराजेश्वर मंदिर – ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। अनेक पत्र-पत्रिकाओं में रचना सहित 145 बालकहानियाँ 8 भाषाओं में 1160 अंकों में प्रकाशित। प्रकाशित पुस्तकेँ-1- रोचक विज्ञान कथाएँ, 2-संयम की जीत, 3- कुएं को बुखार, 4- कसक, 5- हाइकु संयुक्ता, 6- चाबी वाला भूत, 7- बच्चों! सुनो कहानी, इन्द्रधनुष (बालकहानी माला-7) सहित 4 मराठी पुस्तकें प्रकाशित। मध्यप्रदेश साहित्य अकादमी का श्री हरिकृष्ण देवसरे बाल साहित्य पुरस्कार-2018 51000 सहित अनेक संस्थाओं द्वारा सम्मानित व पुरस्कृत। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत साहित्य आप प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका आलेख “पर्यटन – एलोरा का धर्मराजेश्वर मंदिर”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # २२५ 

☆ पर्यटन- एलोरा का धर्मराजेश्वर मंदिर ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’    

अजंता, एलोरा, धर्मनार की गुफाएं हो या यहां के मंदिर, सभी एक ही शैल को तराश कर बनाए गए हैं। इस कारण ये अलौकिक वास्तुशिल्प के सर्वोत्कृष्ट नमूने, पच्चीकारी की बारिश शैली की उन्नत तकनीक और भारतीय वास्तु निर्माण शैली की वैज्ञानिक विधि को दर्शाते हैं। इसी कारण देश-विदेश के पर्यटक इन्हें निहारने, इनकी कला को अपने दिल दिमाग में बैठाने, भारतीय वास्तु शैली को दिलों में सजौने आते हैं। ताकि वह गर्व के साथ बता सके कि भारतीय प्राचीन परंपरा व यहां की वास्तु निर्माण शैली कितनी सर्वोत्कृष्ट थी।

अजंता एलोरा की श्रंखला वहीं तक सीमित नहीं है। यह मंदसौर जिले के चंदवासा के धमनार तक फैली हुई है। यहां की चंदन की पहाड़ियों में अजंता के कैलाश मंदिर की तरह धर्मराजेश्वर का मंदिर उत्कीर्ण है। दोनों ही मंदिर शैल उत्कृष्ट शैली पर बने हुए हैं।

इसे अंग्रेजी में इंडियन रॉक कट आर्किटेक्चर कहते हैं। हिंदी में किसी विशेष चट्टान को तराश कर बनाया गया वास्तुशिल्प कहते हैं। इसकी विशेषता यह होती है कि इसे एक ही चट्टान को तराश कर खोदा जाता है। तत्पश्चात उसे मंदिर का रूप दिया जाता है। इसे ही शैल उत्कीर्ण वास्तुकला कहते हैं।

भारत में अजंता-एलोरा के साथ-साथ धमनार की गुफाएं इसी शैली में बनी हुई है। यह मानव द्वारा निर्मित वास्तु कला का अदभुत, अनोखा व उत्कृष्टता का बेहतरीन नमूना है। इसे देखने के लिए लाखों लोग यहां पर्यटन करने आते हैं।

पर्यटन के आकाश में अजंता एलोरा की गुफाएं व मंदिर तो दिखाई देते हैं मगर इसी शैली में मंदसौर जिले में बने धमनार का धर्मराजेश्वर मंदिर का कहीं नाम नहीं आता है। यह सदा से ही उपेक्षित रहा है।

भारत के ह्रदय में बसे मध्यप्रदेश के मंदसौर जिले की शामगढ़ तहसील में धमनार की गुफाओं के पास धर्मराजेश्वर मंदिर उत्कीर्ण है। यह मंदिर चंदन की पहाड़ियों को तराश कर बनाया गया है। एक ही शैल पर उत्कीर्ण मंदिर उत्तर भारतीय नागरी शैली में बना हुआ है। जबकि कैलाश मंदिर दक्षिण भारतीय द्रविण शैली में निर्मित है।

कैलाश मंदिर की तरह तरह धर्मराजेश्वर मंदिर के प्रांगण में मुख्य मंदिर के साथ-साथ 7 लघु मंदिर उत्कीर्ण कर बनाए गए हैं। यहां का मुख्य मंदिर पहले विष्णु मंदिर था बाद में इसे शिव मंदिर में परिवर्तित कर दिया गया। मुख्य मंदिर के गर्भ गृह में शिवलिंग तथा द्वार के प्रस्तर पर विष्णु की प्रतिमा उत्कीर्ण है।

यह मंदिर 14.53 मीटर और 10 मीटर चौड़ाई में बना हुआ है। इस मंदिर में द्वार मंडप, सभा मंडप, अर्ध मंडप, गर्भ गृह और कलात्मक शिखर निर्मित है। इसका शिखर उन्नत तथा कलश युक्त है। मुख्य द्वार पर भैरव व भवानी की प्रतिमा उत्कीर्ण है।

इस मंदिर के साथ-साथ 7 लघु मंदिर है। इसमें वराह, दशावतार, शेषषायी, विष्णु, पंचमहादेवी आदि की मूर्तियां उत्कीर्ण है।

आठवीं व नौवीं शताब्दी में प्रतिहार राजवंश द्वारा इसका निर्माण किया गया था। यहां प्रतिवर्ष महाशिवरात्रि पर मेला का आयोजन किया जाता है। यह पूरा मंदिर 104 गुणित 67 फिट की लंबाई चौड़ाई के साथ 30 फीट गहरी चट्टान को तराश कर बनाया गया है। इसी मंदिर के पास अजंता एलोरा की तरह 50 गुफाएँ निर्मित की गई है। यह अजंता एलोरा की शैलियों और उसी उद्देश्य पर बनाई गई है।

इस पर्यटन स्थल पर मंदसौर, शामगढ़ भानपुरा से ट्रेन बस द्वारा जाया जा सकता है। शामगढ़ से 22 किलोमीटर दूर और गरोठ से 16 किलोमीटर की दूरी पर स्थित चंदवासा गांव से 3 किलोमीटर की दूरी पर धमनार स्थित है। यहीं धर्मराजेश्वर मंदिर बना हुआ है।

यहां तक पहुंचने के लिए इंदौर, भोपाल, उदयपुर, कोटा से हवाई जहाज द्वारा पहुंचा जा सकता है। विश्व प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर मंदसौर से 122 किलोमीटर दूर, चंबल, गांधी सागर से पास में यह स्थान स्थित है। यहां बस, ट्रेन और निजी साधनों से जाया जा सकता है।

 

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

27-01-2023

संपर्क – 14/198, नई आबादी, गार्डन के सामने, सामुदायिक भवन के पीछे, रतनगढ़, जिला- नीमच (मध्य प्रदेश) पिनकोड-458226

ईमेल  – opkshatriya@gmail.com मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – भाग-८ – नेपाल यात्रा – हिमालय की गोद में – ५ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – भाग-८ – काठमांडू ☆ श्री सुरेश पटवा ?

भक्तपुर से वापसी में काठमांडू के प्रसिद्ध स्थानों को देखते हुए आये। भक्तपुर- काठमांडू मार्ग पर नेपाली संसद जिसे संघीय परिषद कहते हैं, के साथ विभिन्न मंत्रालय भवन बने हुए हैं। राजधानी बहुत ही सघन तरीक़े से बस चुकी है। कहीं भी ख़ाली जगह नहीं दिखती।

राजमहल जो कि लोकतांत्रिक व्यवस्था लागू होने के बाद से संग्रहालय बना दिया गया है, उसे देखा।  उसके बाद काठमांडू के हनुमान ढोका दरबार देखने गये। मल्ल युगीन वास्तुकला के भवन और मंदिर देखे। वहाँ से स्वयंभू नाथ मंदिर पहुँचे। मंदिर एक पहाड़ी पर स्थित है। स्थान भ्रमण पूर्व वहाँ का इतिहास जानना ज़रूरी है। तब ही हम भ्रमण का आनंद ले सकते हैं। 

काठमांडू का प्राचीन इतिहास इसके पारंपरिक मिथकों और किंवदंतियों में वर्णित है। स्वयंभू पुराण के अनुसार, वर्तमान काठमांडू कभी “नागदहा” नाम की एक विशाल और गहरी झील थी, क्योंकि यह सांपों से भरी हुई थी। बोधिसत्व मंजुश्री ने अपनी तलवार से सरोवर को काट कर  वहां से पानी निकाल दिया गया। इसके बाद उन्होंने मंजुपट्टन नामक एक शहर की स्थापना की, और धर्मकार को घाटी की भूमि का शासक बनाया। कुछ समय बाद, एक राक्षस ने निकासी बंद कर दी, घाटी फिर से एक झील में बदल गई। तब भगवान कृष्ण नेपाल आए, राक्षस का वध किया और सुदर्शन चक्र से चोभर पहाड़ी के किनारे को काटकर फिर से पानी निकाला। वह अपने साथ कुछ गोपालों को लाये और भुक्तमन को नेपाल का राजा बनाया। शिव पुराण की कोटिरुद्र संहिता, अध्याय 11, श्लोक 18 इस स्थान को नयापाल शहर के रूप में संदर्भित करता है, जो अपने पशुपति शिवलिंग के लिए प्रसिद्ध था। नेपाल नाम की उत्पत्ति संभवत: इसी शहर नयापाला से हुई है।

काठमांडू शहर दुनिया के सबसे पुराने बसे हुए स्थानों में से एक है। इसकी स्थापना दूसरी शताब्दी ईस्वी में हुई थी। घाटी को ऐतिहासिक रूप से “नेपाल मंडला” कहा जाता था और यह नेवार लोगों का घर रहा है, जो हिमालय की तलहटी में एक शहरी सभ्यता थी। यह शहर नेपाल साम्राज्य की शाही राजधानी था और नेपाली अभिजात वर्ग के महलों, मकानों और उद्यानों में अतिथियों की मेजबानी करता था। यह 1985 से दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संघ (सार्क) का मुख्यालय रहा है। काठमांडू नेपाल के बागमती प्रांत में स्थित नेपाली गणराज्य सरकार की राजधानी है।

काठमांडू कई वर्षों से नेपाल के इतिहास, कला, संस्कृति और अर्थव्यवस्था का केंद्र रहा है। हिंदू और बौद्ध बहुमत के साथ बहु-जातीय आबादी वाला नगर है। धार्मिक और सांस्कृतिक उत्सव काठमांडू में रहने वाले लोगों के जीवन का एक प्रमुख हिस्सा हैं। पर्यटन अर्थव्यवस्था का एक महत्वपूर्ण हिस्सा है। 2013 में, काठमांडू को दुनिया के शीर्ष दस पर्यटन स्थलों में तीसरा स्थान दिया गया था, और एशिया में पहले स्थान पर था। शहर को नेपाली हिमालय का प्रवेश द्वार माना जाता है। यह कई विश्व धरोहर स्थलों का घर है: जिनमें दरबार स्क्वायर, स्वयंभूनाथ, बौधनाथ और पशुपतिनाथ प्रमुख हैं। 2010 में विश्व बैंक के अनुसार काठमांडू घाटी प्रति वर्ष 4 प्रतिशत की दर से फैल रही है, जिससे यह दक्षिण एशिया में सबसे तेजी से बढ़ते महानगरीय क्षेत्रों में से एक बन गया है। नेपाल में पहला क्षेत्र है जो तेजी से शहरीकरण और आधुनिकीकरण की अभूतपूर्व चुनौतियों का सामना कर रहा है।

भूगर्भीय प्लेटों के खिसकने से हिमालयी बसावटों में भूकम्प आते रहते हैं। एक बहुत बड़ा भूकम्प 1934 में आया था। काठमांडू और भक्तपुर के हेरिटेज भवनों को भारी नुक़सान हुआ था। फिर अप्रैल 2015 में 7.8 रीऐक्टर से आए भूकंप ने काठमांडू के ऐतिहासिक क्षेत्र बुरी तरह क्षतिग्रस्त कर दिए थे। कुछ इमारतों को बहाल कर दिया गया है जबकि कुछ पुनर्निर्माण की प्रक्रिया में हैं। जिन्हें हमने आज के भ्रमण में देखा।

काठमांडू के लिए स्वदेशी नेपाल भासा शब्द येन है। नेपाली नाम काठमांडू काठमंडपम से आया है, जो दरबार स्क्वायर में खड़ा था। संस्कृत में काष्ठ का अर्थ है “लकड़ी” और मण्डपम का अर्थ है “मंडप”। यह सार्वजनिक मंडप है जिसे नेवाड़ी में मारू सत्ता के नाम से भी जाना जाता है। इसका पुनर्निर्माण 1596 में राजा लक्ष्मी नरसिंह मल्ल के काल में बिसेठ द्वारा किया गया था। तीन मंजिला संरचना पूरी तरह से लकड़ी से बनी थी और इसमें न तो लोहे की कीलों का इस्तेमाल किया गया है और न ही किसी अन्य सहारे का। किंवदंतियों के अनुसार, शिवालय के निर्माण के लिए उपयोग की जाने वाली सभी लकड़ी एक ही पेड़ से प्राप्त की गई थी। अप्रैल 2015 में एक बड़े भूकंप के दौरान वह संरचना ढह गई। अभी सहारा देकर खड़ी की जा रही रही है। कई लकड़ी के खम्भे और मियारें बदली जा रही हैं।

प्राचीन पांडुलिपियों के कॉलोफ़ोन, काठमांडू को नेपाल मंडल में काठमांडप महानगर के रूप में संदर्भित करते हैं। बौद्ध लामा आज भी इसका पाठ काठमनाप करते हैं। इस प्रकार, काठमांडू को काठमांडप के नाम से भी जाना जाता है। मध्ययुगीन काल के दौरान, शहर को कभी-कभी कांतिपुर कहा जाता था। यह नाम संस्कृत के दो शब्दों – कांति और पुर से मिलकर बना है। कांति एक ऐसा शब्द है जो “सौंदर्य” के अर्थ में प्रयुक्त होता है। सौंदर्य ज्यादातर प्रकाश से जुड़ा है और पुर का अर्थ है स्थान, इस प्रकार इसका अर्थ “प्रकाश का शहर” है।

स्वदेशी नेवार लोगों में, काठमांडू को ये डे (नेवार: येँ दि) के नाम से जाना जाता है, और पाटन और भक्तपुर को क्रमशः याला डे (नेवार: कील दे) और ख्वापा डे (नेवार: ख्वाप द्) के नाम से जाना जाता है। “येन” यंबू (नेवार: यम्बु) का छोटा रूप है, जो मूल रूप से काठमांडू के उत्तरी भाग को संदर्भित करता है। पुरानी उत्तरी बस्तियों को यांबी कहा जाता था जबकि दक्षिणी बस्ती को यांगला के नाम से जाना जाता था। वर्तनी “काटमांडू” का प्रयोग अक्सर पुराने अंग्रेजी भाषा के पाठ में किया जाता था। हाल ही में, हालांकि, अंग्रेजी में “काठमांडू” वर्तनी अधिक सामान्य हो गई है।

काठमांडू के कुछ हिस्सों में पुरातात्विक खुदाई में प्राचीन सभ्यताओं के प्रमाण मिले हैं। मालीगांव में पाई गई सबसे पुरानी एक मूर्ति 185 ईस्वी सन् की थी। ढांडो चैत्य की खुदाई में ब्राह्मी लिपि में एक शिलालेख के साथ एक ईंट का पता चला है।  पुरातत्वविदों का मानना ​​है कि यह दो हजार साल पुराना है। पाषाण शिलालेख नेपाल के इतिहास के प्रमुख स्रोत हैं।

काठमांडू का सबसे पहला पश्चिमी संदर्भ पुर्तगाली जेसुइट के एक उल्लेख में प्रकट होता है। जोआओ कैब्राल जो 1628 के वसंत में काठमांडू घाटी से गुजरे थे और उस समय के राजा, शायद काठमांडू के राजा लक्ष्मीनरसिंह मल्ल द्वारा तिब्बत से भारत के रास्ते में उनका स्वागत किया गया था। उन्होंने बताया कि वे नेपाल साम्राज्य की राजधानी “कैडमेन्डु” पहुंचे।

मध्ययुगीन लिच्छवी शासकों से पहले की अवधि के बहुत कम ऐतिहासिक अभिलेख मौजूद हैं। नेपाली राजशाही की वंशावली गोपालराज वंशावली के अनुसार, लिच्छवियों से पहले काठमांडू घाटी के शासक गोपाल, महिपाल, आभीर, किरात और सोमवंशी थे। किरात वंश की स्थापना यलम्बर ने की थी। किरात युग के दौरान, पुराने काठमांडू के उत्तरी भाग में यंबू नामक एक बस्ती मौजूद थी। कुछ चीनी-तिब्बती भाषाओं में, काठमांडू को अभी भी यंबू कहा जाता है। येंगल नामक एक और छोटी बस्ती मंजुपट्टन के पास पुराने काठमांडू के दक्षिणी हिस्से में मौजूद थी। सातवें किरात शासक, जितेदास्ती के शासनकाल के दौरान, बौद्ध भिक्षुओं ने काठमांडू घाटी में प्रवेश किया और सांखू में एक वन मठ की स्थापना की।

1950 के दशक में काठमांडू और इसके आसपास के अन्य शहरों जैसे पाटन में जनसंख्या में बड़ी वृद्धि देखी गई। हालांकि, भक्तपुर राजधानी से बहुत दूर था और काठमांडू घाटी के अन्य शहरों में हुए विकास से बचा हुआ था। भक्तपुर भी केंद्रीय शक्तियों द्वारा बहुत अलग-थलग और उपेक्षित था। जब एक नया राजमार्ग बनाया गया, तो यह शहर को पूरी तरह से बायपास करता था और इसके बजाय बाहरी इलाके से होकर गुजरता था। 1962 में भक्तपुर का हवाई दृश्य देखने पर दूर दाईं ओर न्यातापोला मंदिर और पृष्ठभूमि में लंगटांग पहाड़ दिखता था। पहाड़ टूटने और बारिश से सघन हरियाली ने उनको ढँक दिया है।

********

18 जून 2022 को सुबह सात बजे काठमांडू से पोखरा जाने हेतु बस में  सवार हुए। बस स्थानक पर भारत में सात रुपयों में मिलने वाली चाय तीस रुपयों में ख़रीद कर पी। एक आरामदायक सोफ़ानुमा सीट वाली बस में सबसे पीछे की सीट मिली। पोखरा नेपाल के पश्चिमांचल विकास क्षेत्र जिसकी सीमा उत्तराखंड से मिलती है, का एक पर्यटन नगर है। यह गण्डकी अंचल के कास्की जिला के पोखरा घाटी मैं स्थित है। पोखरा नेपाल का दूसरा बडा शहर है। पोखरा नेपाल के पश्चिमांचल विकास क्षेत्र, गण्डकी अंचल और कास्की जिला का सदरमुकाम है।

नेपाल का पृथ्वी राजमार्ग राजधानी काठमाण्डौ, भरतपुर और देश के पूर्वी क्षेत्र से पोखरा को जोडता है। सिदार्थ राजमार्ग भैरहवा के सिमा से बुटवल होते हुए पोखरा को जोडता है। पोखरा-बाग्लुंग-बेनी सडक पोखरा को उत्तर पश्चिम के मुक्तिनाथ, मुस्तांग से जोडती है। शहरी यातायात सहज है। टैक्सी कहीं भी मिल सकती है। पोखरा मैं एक अंतर्देशीय विमानस्थल है। इस विमानस्थल को अन्तराष्ट्रीय बनाने का प्रयास हो रहा है। अभी यहाँ से काठमाण्डौ, भरतपुर व जोमसोम तक की उडान उपलब्ध है। पोखरा से दिल्ली तक सीधी बस सेवा भी उपलब्ध है। आप नेपाल में हैं तो गांधी मार्ग, नेहरू चौक, शास्त्री नगर, इंदिरा मार्केट जैसे शब्दों जिनसे कुछ लोगों की चिढ़ होती है, उनसे मुक्त हैं। बस को चले एक घंटा होने को आया है परंतु आप अभी काठमांडू से बाहर नहीं निकले हैं। जब आप बस्ती पीछे छोड़ेंगे तब हिमालय के पहाड़ों से बातें कर रहे होंगे। नेपाल में रेल नहीं होने से सड़क यातायात एकमात्र आवागमन का साधन है तो ट्राफ़िक की कल्पना की जा सकती है। हम एक पहाड़ की चढ़ाई से गुज़र रहे हैं। सोचा अब काठमांडू से बाहर निकल जाएँगे। लेकिन यह क्या, पहाड़ पार करते ही फिर मकानों की क़तार शुरू हो गई। समतल ज़मीन नहीं होने से सभी मकान चार मंज़िला हैं। भूकम्प संवेदी क्षेत्र होने से अधिक ऊँचे मकान बना नहीं सकते। पहाड़ों को ही कटना मिटना होगा। पहली बस्ती चंद्रागिरी आई। थोड़ी देर में पता चला कि आगे एक घाटी में पूरी बस्ती आबाद है। जैसे-जैसे आबादी का दबाव बढ़ता जाएगा घाटियाँ और पहाड़ियाँ आबाद होती जायेंगी।     

आपने अक्सर नेपालियों के उदास कठोर चेहरों को देखा होगा। उनकी लम्बाई ज़्यादा नहीं होती है। पहाड़ों पर चढ़ने-उतरने से शरीर के पिछले तरफ़ मोटापा नहीं होकर सपाट होता है। वे अपने इलाक़े का प्रतिबिम्ब होते हैं। पहाड़ी लोग चेहरे पर एक अजीब सी उदासी लिए होते हैं वहीं सागरों के नज़दीकी लोग लहरों सी चंचलता से आँखें मटकाते रहते हैं। पहाड़ों पर उदासी का आलम होता है परंतु यहाँ के पहाड़ सदाबहार हैं। यहाँ पर्णपाती वन नहीं होते। बारिश और समुद्रतल से ऊँचाई के कारण हमेशा पेड़ों की मखमली चादर से ढँके पहाड़ों पर बादलों के सफ़ेद टुकड़े और आती जाती धुँध उदासी को निराशा में नहीं बदलने देती। ढाबे या रास्तों के होटल को खाजा घर लिखते हैं। एक खाजा घर पर बस रुकी। चना मसाला प्याज़ नीबू के साथ पिछत्तर रुपए में लिया। बस चलने लगी तो चना ज़ोर गरम बस में ही खाया।

एक घंटे बाद बस ड्राइवर ने त्रिशूली नदी के किनारे एक खाजा घर पर पच्चीस मिनट का लंच स्टॉप दिया। नदी किनारे पराठा और टमाटर चटनी का भोजन ग्रहण करते नदी की प्रकृति को निहारते रहे। सामने ही नदी एक भँवर बना रही थी। पानी की तरह आदमी को भी थोड़ी सी अधिक जगह मिले तो वह भी पसरने लगता है। वहीं दिल का भँवर बनता है। दिल का भँवर करे पुकार-प्यार का राग सुनो। जीवन के तेज बहाव में जो कचरा इकट्ठा होता है वह पीछा नहीं छोड़कर वहीं घूमता है। आदमी भी घूमने लगता है। भँवर से निकलने के लिए हिकमत और हिम्मत दरकार होती है। अन्यथा जीवन का भँवर आदमी को शराब की प्यालियों के साथ ग़म के सागर में डुबो देता है।

एक बड़ी बस्ती चरौंदी आई। उसके बाद एक लम्बा दर्रा शुरू हुआ है, जिसमें भू-ऋखलन होने से बस चींटी की तरह रेंगती रही। दाहिनी तरफ त्रिशूली नदी संकरे पहाड़ी दर्रे से चिपकी सड़क के साथ चलती रही। नदी के भूरे से पानी और ऊँची पहाड़ी हरियाली के बीच चींटी की तरह रेंगते रहे। एक छोटी बस्ती मुग्लिंग के बाद सड़क के बाएँ तरफ़ से एक नदी साथ चलने लगी। दाहिनी तरफ़ वाली नदी का साथ छूट गया। ज़िंदगी में आदमियों का साथ भले ही छूट जाए पर पहाड़ों में झरनों और नदियों का साथ नहीं छूटता। वे घूमफिर कर कहीं न कहीं मिल जाते हैं। आपको अकेला नहीं छोड़ते। समतल ज़मीन पर पहुँचा कर आगे निकल जाते हैं। थोड़ी बड़ी बस्तियाँ आंबुखैरेनी, तनहुँ, दामौली के बाद दोनों नदियों का संगम हो गया। वे फिर पश्चिम की तरफ़ चल पड़ीं। वहाँ गंडक नदी उनका रास्ता देख रही है। बारिश के दिनों में तीनों मिलकर बिहार की तराई में तबाही मचा कर गंगा में मिलेंगी और गंगा भारतीय संस्कृति की तरह सबको समाहित करके बंगाल की खाड़ी में आश्रय पायेगी।

पोखरा

पोखरा शहर नेपाल के सबसे लोकप्रिय पर्यटन स्थलों में से एक है। यह काठमांडू के बाद नेपाल का दूसरा सबसे बड़ा शहर है। यह अन्नपूर्णा पर्वत श्रृंखला में स्थित है। यह एवरेस्ट ट्रैकिंग बेस कैंप सहित कई बाहरी गतिविधियों का केंद्र है। यहाँ अन्नपूर्णा सर्किट ट्रैक होने के कारण ट्रैकरों की भारी भीड़ रहती है। ऊँची पहाड़ी चोटियाँ, झील व नदी इस शहर के सौंदर्य में इज़ाफा करते हैं। आप इस शहर की साहसिक यात्रा कर सकते हैं और आसान दर्शनीय स्थलों की यात्रा का भी आनंद ले सकते हैं। काठमांडू के बाद सर्वाधिक लोग इस जगह की यात्रा करते हैं। पोखरा के सुंदर दृश्य, पहाड़ों पर सूर्य और चंद्रमा की लाल, पीली, सुनहरी और धवल छाया, प्राचीन झील के किनारे राहत की साँस सुप्त जीवन को जगाने में उपयोगी सिद्ध हो सकते है।

आप पोखरा शहर में अन्नपूर्णा पर्वत की तलहटी में छुट्टी बिता सकते हैं। शहर और उसके आसपास चलने और ट्रेकिंग परीक्षणों का आनंद ले सकते हैं, पर्वतारोहण भी कर सकते हैं। पोखरा शहर की गलियों और बाजारों में खरीदारी कर सकते हैं। पेड़ों के साये में शहर के परिदृश्य का शानदार नजारा देख सकते हैं। शहर की सड़कों पर भोजनालय, क्लब और बार कई स्थान पर खुले मिलते हैं। जहां आप भोजन के साथ मनोरंजक गतिविधियों का आनंद ले सकते हैं। पोखरा अतुलनीय नज़ारों का भंडार है जो साल भर पर्यटकों को आकर्षित करता है। यहाँ आकर अविस्मरणीय सफर की नींव रखी जा सकती है।

हमारी बस शाम को चार बजे पोखरा पहुँच गई। जवाहर जी ने होटल आयस्लेंड में कमरा बुक कर रखा था। कमरे में पहुँच एक कप गरम चाय पीकर अपना एनर्जी स्विच ऑन किया। नहा धोकर दिन भर की थकान उतारी। तैयार होकर पैदल ही फेवा झील किनारे घूमने निकल गये। अधिक दूर नहीं थी। दस मिनट में फेवा झील पहुँच गये। नौकायन का आनंद लिया।

यह नेपाल की दूसरी सबसे बड़ी झील है। इसकी खास बात यह है कि इसके पारदर्शी जल में अन्नपूर्णा व धौलागिरी पर्वत श्रृंख्लाओं का प्रतिबिंब साफ झलकता है। लेकिन बादल और बारिश की संगत से प्रतिबिम्ब का कोई पता नहीं था। हाँ आस-पास के पहाड़ी पेड़-पौधे स्वच्छ जल में लहराते दिखे जिससे झील का पानी हरा नज़र आ रहा था। नज़ारा इतना अद्भुत कि आप बिना पलक झपकाए घंटों तक बस इस झील के पानी को देख सकते है। आपको किसी साथी की भी ज़रूरत महसूस नहीं होगी। यहाँ बैठकर दुनिया के सबसे मनोरम सूर्यास्त के आप गवाह बन सकते थे परंतु बारिश की रिमझिम में सूर्य भगवान भी छिपे रहे। गंगा आरती की तरह यहाँ भी शाम को झील किनारे देवी आरती होने लगी है।

झील में नौकायन हेतु भावताव की प्रक्रिया में आधा घंटा निकला लेकिन छै सौ रुपया में जाने वाली नौका तीन अन्य सैलानियों के साथ साझा करने से तीन सौ में सौदा तय हुआ। नौका से वराही मंदिर द्वीप पर गये। इसके अन्य नाम है – झील मंदिर व वराही मंदिर। यह मंदिर वराही देवी को संमर्पित है जिन्हें माँ दुर्गा का ही रूप माना जाता है। यहाँ दो मंज़िला पगोड़ा भी है। इस द्वीप की मान्यता हिन्दूओं व बौद्धिष्टों दोनों के बीच एक समान है। यह मंदिर अराधना का केन्द्र है। इसकी मुख्य मूर्ति पारंपरिकता की झलक बिखेरती है जो लकड़ी, ईंट व पत्थर से बनी है। यह मान्यता है कि माँ दुर्गा ने वराही का अवतार राक्षसों को मारने के लिए धारण किया था। यह मंदिर शक्ति का प्रतीक है। मंदिर की परिक्रमा करके नौकायन सम्पन्न हुआ। नौकायन के बाद झील के किनारे ही घूमते रहे। अंत में एक अच्छे से दिखते रेस्टोरेंट में भोजन करके होटल में आराम किया।   

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares