हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – मुल्क ☆ श्री महेश कुमार केशरी ☆

श्री महेश कुमार केशरी 

☆ कथा कहानी ☆ लघुकथा – मुल्क ☆ श्री महेश कुमार केशरी ☆

“मांँ तुम रो क्यों रही हो ? ” -सादिक  ने अमीना बीबी के कंँधे पर धीरे से हाथ  रखकर पूछा। ” नहीं, मैं रो कहाँ रही हूंँ ? “ ” नहीं, तुम रो नहीं रही हो तो तुम्हारी आंँखों  से आंँसू कैसे. निकल रहे हैं ? ” सादिक, वैसे ही बोल रहा था। जैसे वो, अमीना बीबी की बात को ताड़ गया हो। “कुछ नहीं होगा… हमलोग.. कहीं.. नहीं जा रहें हैं। सादिक  ने अमीना बीबी को जैसे विश्वास दिलाते हुए कहा।” बहुत मुश्किल से अमीना बीबी का जब्त किया हुआ बांँध जैसे भरभराकर टूट गया,  और वो रुआंँसे गले से बोलीं – ” इस तरह से जड़ें… बार-बार नहीं खोदी जातीं l ऐसा ही एक गुलमोहर का पेंड़ हमारे यहांँ भी हुआ करता था। तुम्हारे अब्बा ने उसे लगाया था। इस गुलमोहर के पेंड़ को देखकर तुम्हारे अब्बा की याद आती है। सोचा, इस गुलमोहर के पेंड़ को ही देखकर मैं बाकी की बची-खुची जिंदगी भी जी लूंँगी। मैंने यहांँ  बहुत समय निकाल  दिया। अब, सोचती हूंँ की बाकी का समय भी इसी जमीन पर इसी गुलमोहर के नीचे काट दूंँ। यहांँ की तरह ही वहांँ भी धूप के कतरे , पानी की प्यास और  आदमी को लगने वाली भूख में मैंने कोई अंतर नहीं पाया। बार-बार जड़ें नहीं खोदी जाती ..सादिक मियांँ ! ..ऐसे गुलमोहर एक दिन में नहीं बनते। “और अचानक से अमीना बीबी जोर जोर से रोने लगीं। सादिक ने अमीना बीबी को अपनी बाहों में भर लिया और  चुप कराने की कोशिश करने लगा।अमीना बीबी को चुप कराते- कराते सादिक भी पता नहीं कब खुद भी रोने लगा। 

© महेश कुमार केशरी

द्वारा -मेघदूत मार्केट फुसरो, बोकारो झारखंड – 829144 मो-9031991875, [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #145 ☆ गरीबी पर दोहे ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  “गरीबी पर दोहे। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 145 ☆

☆ गरीबी पर दोहे ☆ श्री संतोष नेमा ☆

होती धन की हीनता, बनते तभी गरीब

समझ सकें क्या दीनता, जब सुख होत करीब

 

धन-दौलत से आँकते, यहाँ गरीबी लोग

दोष सभी दें ईश को, कहें भाग्य का योग

 

कोसें अक्सर समय को, करें न कोई कर्म

भाग्य भरोसे न रहें, निभा कर्म का धर्म

 

अटल इरादे गर रखो, बनो नहीं मजबूर

कर्मों की कर साधना, करो गरीबी दूर

 

धन-दौलत से खुशी का, नहीं कोई संबंध

निर्धन रहता चैन से, उस पर क्या प्रतिबंध

 

जाने कितनी योजना, चला रहीं सरकार

पर गरीबी मिटी नहीं, सब बेबस लाचार

 

महनत कर कर थक गए, संवरा नहीं नसीब

जाने क्या है भाग्य में, सोचे यही गरीब

 

रोज चुनौती मिल रहीं, हो कैसे निर्वाह

मंहगाई के दौर में, निर्धन रहा कराह

 

दीनबन्धु सुध लीजिए, है गरीब लाचार

उनको भी संतोष हो, ऐसा कर उपचार

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #151 ☆ धुंद झाले मन माझे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 151 – विजय साहित्य ?

☆ धुंद झाले मन माझे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

धुंद झाले मन माझे

शब्द रंगी रंगताना

आठवांचा मोतीहार

काळजात गुंफताना…….॥१॥

 

धुंद झाले मन माझे

तुझें मन ‌वाचताना

प्रेमप्रिती राग लोभ

अंतरंगी नाचताना……..॥२॥

 

धुंद झाले मन माझे

हात हातात घेताना

भेट हळव्या क्षणांची

प्रेम पाखरू होताना……..॥३॥

 

धुंद झाले मन माझे

तुझ्या मनी नांदताना

सुख दुःख समाधान

अंतरात रांगताना……….॥४॥

 

धुंद झाले मन माझे

तुला माझी म्हणताना

भावरंग अंगकांती

काव्यरंगी माळताना……॥५॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रिय…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे 

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रिय…” ☆ श्री आशिष मुळे ☆

पहाटेच्या गार वाऱ्यात अर्धोंमिलीत माझ्या डोळ्यात अन् शिणलेल्या माझ्या मनात दिसलीस तू सूर्यकिरणांच्या तेजात..   किती वर्ष झाली तुला दूर जाऊन काळही गेला आता वेळ विसरून दिसलीस का मग अशी अचानक जाताना तर गेली होतीस तुझं मन सावरून..   विचारायला जमलं नाही तुलाही अन मलाही पण आज विचारायला हरकत नाही माझ्यातली हिंमत आजही तीच आहे पण तुझ्यातली भीती काही गेलेली दिसत नाही..   म्हणून विचारतो, खरंच काय मिळवलस? जनरिती समोर तेव्हा झुकून आणि विचार कर काय गमावलस वादळात माझा हात सोडून..   दोष नाही देत तुला, डोळ्यातून पाणी काढू नकोस आता तरी मनातलं, जिभेवर आणायला लाजू नकोस आजही मित्रच आहे तुझा, तुझ वाईट कधी चिंतणार नाही दुखलं तुला काही तर आजही डोळ्यात पाणी थांबणार नाही..   आज मीही लूजर नाही आणि तूही विनर नाही याचा मला खरंच आसुरी आनंद होत नाही कारण जातानाही तू मला काही देऊनच गेलीस जिंकायच्या ऊर्मीला माझ्या ज्वाळा बनवून गेलीस..   त्याच आगीवर आजही जगतो आहे जगता जगता इतरांनाही ऊर्जा देतो आहे आता परत येऊ नकोस अन भडकलेली माझी चिता अशी मधूनच विझवू नकोस…  

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया… 7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

भारतीय इतिहासात ‛विजयनगर साम्राज्य’ असे म्हटले की साहित्य- कला- संस्कृती- पराक्रम अशा वेगवेगळ्या आयामानी परिपूर्ण संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. विजयनगरची राजसत्ता मुस्लिम आक्रमणे रोखून धरण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे या काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. म्हणूनच भारतीय संस्कृती व कलांचा हा भरभराटीचा काळ मानला जातो. साहित्याच्या विशेषतः संस्कृत भाषेच्या  दृष्टीनेही हा सुवर्णकाळ मानला जातो. स्त्री- पुरुषांना शिक्षणाच्या पण समान संधी होत्या. त्यामुळे पुरुषलेखकांच्या बरोबरीनेच या काळात स्त्री लेखिकांनीही साहित्यक्षेत्रात आपले उत्तम योगदान दिलेले दिसून येते. चौदाव्या शतकातील कम्परायण याची पत्नी गंगादेवी, सोळाव्या शतकात अच्युतराय याची पत्नी तिरुमलांबा यांची नावे प्रामुख्याने यात घ्यावी लागतील. यातील गंगादेवीचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.

गंगादेवीच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु  ती सामान्य परिवारात जन्मली असे काही इतिहासकार सांगतात. ती धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि संगीतशास्त्रात प्रवीण होती. तिच्या या पांडीत्यावरच खुश होऊन  राजा कम्परायण यांनी तिच्याशी विवाह केला. एकदा पतीबरोबर ती युद्धासाठी दक्षिणेकडे गेली. त्या युद्धाचे आणि विजयाचे वर्णन करणारे  ‘मधुराविजयम् ‘ हे काव्य गंगादेवीने संस्कृत भाषेत लिहिले.

या काव्याचा अभ्यास करतानाच आपोआप गंगादेवीचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता लक्षात येते. या काव्यात एकूण नऊ सर्ग आहेत. त्यात तिने कवी वाल्मिकी, कवी कालिदास अशा कवींना वंदन करून काव्याची सुरुवात केली आहे. त्यातून तिचा या सर्व कवींच्या साहित्याचा अभ्यास होता असे लक्षात येते.

संस्कृत भाषेत काव्यशैलीचे प्रकार आहेत. त्यातील वैदर्भीय या प्रकारात तिचे काव्य मोडते. शिवाय उपमा, अलंकार यांनी नटलेले पण सुबोध, सरल पदानी युक्त अशी तिची रचना आहे. त्यामुळे तिचा व्याकरणाचा अभ्यासही परिपूर्ण होता.

सूर्योदय, चंद्रोदय, जलचक्र, सहा ऋतूंचे वर्णन, तुंगभद्रा नदीचे वर्णन यातून तिचा भूगोलाचा अभ्यास दिसून येतो आणि कवी कालिदासाचाही थोडाफार प्रभाव तिच्यावर असावा असे वाटते.

पहिल्या काही अध्यायात गंगादेवी विजयनगर साम्राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजा बुक्क याचे उत्कृष्ट राज्यशासन, कुमार कंपन्नाचे बालपण आणि प्रारंभिक जीवनाचे वर्णन केले आहे. पुढच्या काही अध्यायात त्याच्या दक्षिणेकडील आक्रमणाचे आणि कांचीपुरम् च्या विजयाचे वर्णन आहे. आपले काव्य हे एक ऐतिहासिक पुरावा असेल याची जाणीव असल्यामुळे गंगादेवीने विस्ताराने येथे इतिहास मांडलेला दिसून येतो.

तिच्या काव्यातून त्या काळातील राजकीय परिस्थिती, समाजाची मानसिकता, त्या लोकांची आर्थिक – सामाजिक- शैक्षणिक स्थिती, युद्धनीती याचे वर्णन येते. त्यातून तिची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते.

आजपर्यंत आपण संस्कृत साहित्यातील लेखक- कवींनी वेद- पुराण याचा संदर्भ घेऊन किंवा काहीवेळा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या स्त्रीपात्रांचा परिचय करून घेतला. पण आजच्या शेवटच्या भागात मुद्दाम एका अशा स्त्रीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे की जी कोणत्याही साहित्यकृतीतील पात्र नसून स्वतःच लेखिका होती. तिच्या एकाच काव्यातून ती आजपर्यंत जनमानसात आणि संस्कृत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. गंगा नदी ही भारताची मानबिंदू आहे तशीच गंगादेवी ही साहित्यातील स्त्रीलेखकांसाठी मानबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तिच्यातील या प्रतिभाशक्तीला सलाम!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती साडी… – भाग-३ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ ती साडी… – भाग- ३ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(रेणू भूतकाळात डोकावून पाहत होती . मनासारखा जीवनसाथी आणि मनासारखे आयुष्य ती जगू शकत होती. याचा तिला थोडासा गर्वच वाटू लागला होता.) आता पुढे….

तिच्या चित्र प्रदर्शनाच्या तयारीनं जोर पकडला होता. सकाळी सकाळीच “आशा मावशी ,खूप भूक लागलीय… ब्रेकफास्ट…” तिनं जोरात आवाज दिला. शेवटी खाली येऊन पाहिलं तर सगळं सामसूम!तिनं खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं, तर तिला घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळीकडे पाणीच पाणी दिसलं.

‘म्हणजे पूर आलेला दिसतोय….पण नो टेन्शन.’–ती नको नको म्हणत असतानाही आशा मावशीनं वरच्या स्टुडिओ शेजारच्या खोलीतला फ्रीज  खाण्यापिण्याच्या पदार्थांनी गच्च भरून ठेवला होता. शेजारीच एक गॅसची शेगडी आणि सिलेंडर तसेच थोडी भांडीकुंडी, पाणी अशी सगळी इमर्जन्सीच्या काळातली तयारी पण केली होती.ती वर आली. सँडविच व कॉफी घेऊन ती आरामात सोफ्यावर बसली. तिचं मन आशा मावशीला धन्यवाद देत होतं.लाईट पण गेलेत हे तिला गिझर ऑन केल्यावर कळलं. ‘काही हरकत नाही …आज  नो अंघोळ’… ती पुटपुटली. खिडकीतून पुन्हा ती  खाली पाहू लागली तेव्हा तिला दिसले की घरात पाणी शिरलेय. दुपारी खाली जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली तेव्हा खालच्या सात आठ पायऱ्या पाण्यात बुडाल्यात,… आणि तिची ड्रॉइंग हॉलमधील पेंटिंग्स पण पाण्यात बुडालीत हे दिसलं. बेचैन झाली खरी,… पण विचलित न होता वाढलेलं पाणी, बुडणारी झाडं ,घरं निर्धास्तपणे ती बाल्कनीतून बघत राहिली. रात्री खाऊन पिऊन काळ्या कुट्ट अंधारात बिछान्यावर  आडवी झाली.’ हेऽऽ एवढ्याशा संकटानं घाबरण्याइतकी लेचीपेची  मी थोडीच आहे!’ आपल्या मनाचा अंदाज घेऊन स्वतःवरच खुष होत ती झोपली.

सकाळी पाणी आणखी  वाढलेलं दिसलं. तशी ती गच्चीत आली.  बाय चान्स तिला एक नाव दिसली. “हेल्प मी, हेल्प मी” ओरडत हातातला रंगीत रुमाल तिनं हवेत फडकवला.  त्या नावेतल्या डिझास्टर मॅनेजमेंट टीमने खूप प्रयत्न करून तिला  नावेत उतरवून घेतले. खरा प्रश्न पुढे उभा राहिला… आपला ओव्हर- कॉन्फिडन्स दाखवायचा नादात गच्चीतून आत खोलीत जाऊन मोबाईल बरोबर घ्यायलाही ती विसरली होती…कपडे वगैरे तर दूरची गोष्ट !…..ते लोक विचारू लागले कुठे जाणार? तेव्हा कोणाचाही फोन नंबर, घरचा पत्ता ती सांगू शकली नाही. “इतक्या पूरग्रस्त लोकांना तुम्ही कुठे ठेवलेय तिथेच मला सोडा… अशा  रहाण्यातलं थ्रिल मला अनुभवायचंय”..ती  बेफिक्रीनं उद्गारली…तिथे पोहोचल्यावर,” थँक्स गाईज! मी पुढचं सगळं छान मॅनेज करेन.” ती म्हणाली.

छान पैकी जेवली. खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची धावपळ एन्जॉय करत राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव निरखत मनातच त्यांची स्केचेस बनवत राहिली.पण रात्री एका चटईवर.. बिना उशीचं झोपताना तिला अवघड वाटू लागलं….आणि रात्री अंधारात डासांचं नृत्य, संगीत आणि कडाडून चावणं दोन-तीन दिवस तिनं सहन केलं पण हळूहळू  तिचा ताठा, स्वतःबद्दलच्या वल्गना… सगळं लुळं पांगळं झालं. एका अनामिक भीतीने मनाचा कब्जा घेतला.जोरजोरात थंडी वाजू लागली… आणि सपाटून ताप चढला. केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी औषध दिलं. ब्लड टेस्ट झाली. पण ताप उतरायची चिन्हे दिसेनात.तिची झोप उडाली….मनात नाही नाही ते विचार घोंगावू लागले… आपल्या भिजलेल्या पेंटिंग्जची दुरावस्था आठवून ती व्याकूळ झाली.

“अगोबाई मॅडम तुम्ही इथं?” ओळखीचा आवाज ऐकून तिने डोळे किलकिले केले. समोर आशामावशी उभ्या! रेणू एकदम हरकून गेली. त्या शेजारणी बरोबर त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आल्या होत्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे पुढाकार घेत त्या तिला म्हणाल्या ,”तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्या घरला.  काय अवस्था झाली तुमची. आमच्याकडे पूर बीर नाहीये… रिक्षात घालून नेतो… वाटेत डॉक्टरला पण दाखवतो… तुमचं चांगल पथ्य पाणी पण करतो. तिथल्या व्यवस्थापकांची परवानगी घेऊन त्या रेणुला आपल्या घरी घेऊन  आल्या. घरी तिची योग्य सेवा सुश्रुषा झाली. हळूहळू तिचा ताप उतरला. त्यापूर्वीचे एक दोन दिवस आशा मावशीने स्पंजींग करून तिला आपले जुने गाऊन घालायला देऊन तिचे अंगावरचे कपडे धुऊन टाकले होते.

“मॅडम पाणी गरम आहे. चार-पाच दिवसात तुमची अंघोळ झालेली नाहीये.आज तुम्ही अंघोळ करून घ्या.” आशा मावशीने सांगितले.,” मॅडम तुमची कापडं, गाऊन काहीच वाळलं नाहीय हो… बाहेर धो धो पाऊस आहे…. माझ्या साड्याही आंबट ओल्या आहेत… तर असं करा माझं तिथं ठेवलेलं परकर झंपर घाला. आणि हेही सांगतोय की दार पावसानं फुगलंय .आतनं कडी नाही बसणार …मी राहतो बाहेर उभी, तुमच्यासाठी साडी घेऊन. काळजी करू नका. अंघोळ करून घ्या तुम्ही. हातात एक कॅरीबॅग घेऊन आशा मावशी बाहेर पडल्या. त्या स्वयंपाक- घरातल्या छोट्याशा मोरीत रेणूनं कशीबशी आंघोळ आटोपली . ढगळा ब्लाऊज व परकर घातलाआणि दरवाजा खडखडवला.आशामावशी आत आल्या घडी मोडून निऱ्या केलेली  एक साडी त्यांनी तिच्या खांद्यावर टाकली. आणि दरवाजा बंद करून बाहेर उभ्या राहिल्या. साडी बघून रेणूच्या  मनात चर् र्  झालं. ती,….’ती’ साडी होती. सासूचा बेदरकारपणे अपमान करत आशा मावशीच्या खांद्यावर टाकलेली साडी….आज ती साडी नेसणं भाग होतं.नियतीने तिला समझौता करायला… चलता है… म्हणायला भाग पाडलं होतं. तिच्या बेछूट, उर्मटपणे वागायच्या सगळ्या फंड्यांना जणू ती साडी वाकुल्या दाखवून हसत होती. आयुष्यातला हा असा पराभव पचवणं तिला शक्य नव्हतं. त्या स्ट्रॉंग, ओव्हर कॉन्फिडंट, आयुष्यात कधीही न रडलेल्या स्त्रीला त्या साडीनं ओक्साबोक्शी रडायला भाग पाडलं होतं. पण हे अश्रू खरंच पश्चातापाचे होते का?

** समाप्त**

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

” हे बघा आई , मी बिझी आहे , उद्या मला मिटींग्स आहेत . एवढा काही वेळ नाही मला , मी कुमारिकेच्या घरी 

अथर्वबरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईल ” सायली म्हणाली .

“अगं संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला . नीट पूजा करू , तुझ्या वेळेनुसार बोलवू ” सासूबाई म्हणाल्या .

“आई , अहो भाव महत्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय….संध्याकाळी कंटाळा येतो खूप ” सायलीने चप्पल घालता घालता म्हंटलं .

“सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता ? ” 

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला . सासूबाई म्हणाल्या , ” शिरीष तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव भाव ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही , शिरिषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हंटलं की तुम्हाला वेळ नसतो, थकलेले असतात . घरच्या आरतीलाही चार वेळा या रे म्हणावं लागतं . कुठलाही उपास म्हंटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता, पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…” 

 सायली म्हणाली , ” आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय “

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे उपास तापास, देव धर्म म्हणजे स्वतःच्या मनाला, शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे unproductive आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत, बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली तुला म्हंटलं आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल, तू म्हणालीस भाव महत्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन. अगं दे ना तू दान, पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत , त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला ‘भाव महत्वाचा’ ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला. परवाचंच घे, घरी भजन आहे म्हंटल्यावर तू नाक मुरडलं , वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं त्यात रंगून गेलीस . फेरदेखील धरलास आमच्याबरोबर , हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो, हे मात्र खरं आई . इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच ! ” सायली म्हणाली .

” हो ना ? तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हंटलं की हेच– भाव महत्वाचा. अरे त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते, आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही, मग गोंधळ घालायचा का विचारलं की आई, ‘भाव महत्वाचा’ , ‘देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला. अरे देव-देवी काहीच म्हणत नाही, हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे . हे बघ नेहेमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले आणि सायली तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्वाचा– पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते . हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचे डाएट म्हणा ना. ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं . आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून, मेकप करून आपण जातो. दांडिया खेळू नये असं नाही. पण आपलीही संस्कृती , परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्वाचं, तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना? मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू. सारखं ‘भाव महत्वाचा’ म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी…. उद्या असेन मी, नसेन मी …..” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

—— असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ६  (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ६ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० – इंद्र 

—मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील सहाव्या सूक्तात इंद्र आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. तरीही हे सूक्त इंद्रसूक्त म्हणूनच ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री. 

यु॒ञ्जन्ति॑ ब्र॒ध्नम॑रु॒षं चर॑न्तं॒ परि॑ त॒स्थुषः॑ । रोच॑न्ते रोच॒ना दि॒वि ॥ १ ॥

व्योमामध्ये चमचमताती असंख्य नक्षत्रे

सज्ज जाहली या देवाच्या प्रस्थानास्तव खरे

इंद्राचे हे तेज किती हो उज्ज्वल प्रकाशते

सामर्थ्याने साऱ्या विश्वे संचारा करिते ||१||

यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑ । शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा ॥ २ ॥

अती देखणे तांबटवर्णी अश्व सज्ज झाले

रथासी जुंपून सेवक त्यांना घेउनिया आले

पाहुनिया वारूंना लोभस अभिलाषा जागली

आरुढ होता इंद्र रथावरी तेजा येत झळाळी ||२||

के॒तुं कृ॒ण्वन्न॑के॒तवे॒ पेशो॑ मर्या अपे॒शसे॑ । समु॒षद्‍भि॑रजायथाः ॥ ३ ॥

जयासि ना आकार तयाला साकारा आणिले

जाड्य अचेतन तयामध्ये तू चैतन्या भरले 

साक्ष होऊनी उषेसवे तू  प्राणा साकारले

जन्म घेउनिया अवनीवर अवतारुनी आले ||३||  

आदह॑ स्व॒धामनु॒ पुन॑र्गर्भ॒त्वमे॑रि॒रे । दधा॑ना॒ नाम॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ४ ॥

यज्ञाकरिता सर्वा परिचित असे नाम धारिले

पुनःपुन्हा जन्माला येण्या गर्भवास पावले

जननानंतर मरण अशा या सृष्टिक्रमा राखिले

कितीकदा या अवनीवरती जन्म घेउनी आले ||४|| 

वी॒ळु चि॑दारुज॒त्‍नुभि॒र्गुहा॑ चिदिन्द्र॒ वह्नि॑भिः । अवि॑न्द उ॒स्रिया॒ अनु॑ ॥ ५ ॥

बलशाली तू सुराधीपती योगसिद्ध राजा

सहज भेदिशी अशनी योगे अभेद्य ऐशा नगा

योगाच्या सामर्थ्याने तू  गुंफा फोडुनीया 

प्रभारूपी धेनूंना आणिसी शोधूनी तू लीलया ||५||

    

दे॒व॒यन्तो॒ यथा॑ म॒तिमच्छा॑ वि॒दद्व॑सुं॒ गिरः॑ । म॒हाम॑नूषत श्रु॒तम् ॥ ६ ॥

वैभवदायी देवेंद्राला कितिक स्तोत्र अर्पिली

समाधान देवाला अपुल्या देण्यास्तव गायिली

किती महत्तम सुरेंद्र तैसा यशोवंत फार

जगता साऱ्या विश्रुत आहे शचीपती तो थोर ||६||   

इन्द्रे॑ण॒ सं हि दृक्ष॑से सञ्जग्मा॒नो अबि॑भ्युषा । म॒न्दू स॑मा॒नव॑र्चसा ॥ ७ ॥

देवेंद्राला भय ना ठावे शूर वीर तेजस्वी

तयासवे तव संचाराची शोभा ही आगळी

उभय देवतांचे हे तेज प्रदीप्त हो होते

मुदित पाहूनी दोघांना ही समाधान दाटते ||७||

अ॒न॒व॒द्यैर॒भिद्यु॑भिर्म॒खः सह॑स्वदर्चति । ग॒णैरिन्द्र॑स्य॒ काम्यैः॑ ॥ ८ ॥

इंद्राचे अनुचर ही असती सकलांना प्रीय

दहीदिशांना  तेज फाकते त्यांचे  तेजोमय

अवगुण त्यांच्या ठायी नाही सर्वगुणांनी युक्त

त्यांच्या पूजेसाठी घोष  करीत त्याचे भक्त ||८||

अतः॑ परिज्म॒न्ना ग॑हि दि॒वो वा॑ रोच॒नादधि॑ । सम॑स्मिन्नृञ्जते॒ गिरः॑ ॥ ९ ॥

भक्त तुझा मी दास तुझा मी स्तोत्र तुझी अळवितो

तुझ्या स्तुतीने अपुली वैखरी अलंकृत करितो

सर्वव्यापी हे देवा करता विलंब का आता 

द्युलोकीहून सत्वर यावे दर्शन द्यावे आता ||९||

इ॒तो वा॑ सा॒तिमीम॑हे दि॒वो वा॒ पार्थि॑वा॒दधि॑ । इन्द्रं॑ म॒हो वा॒ रज॑सः ॥ १० ॥

व्योमातुन वा पार्थिवातुन सत्वर ही यावे 

दिव्यलोकही वा त्यजुनी आता साक्ष इथे व्हावे  

इंद्राचा सहवास अर्पितो अभिष्ट आनंद

अभिलाषा ना अन्य ठेविली दर्शन हा मोद ||१०||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

https://youtu.be/_J2mwG5SfHg

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जरा बरं नसेल तर… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ जरा बरं नसेल तर… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात—–

 

तू झोप आता म्हणून दहा वेळा उठवतात 

चहा कशात आहे, साखर संपलीये का, गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —

 

टेबलावरची वर्तुळ सांगतात किती झालाय चहा, 

आवरणारे म्हणतात तू झोपूनच रहा,

 फडके म्हणून नवाकोरा नॅपकीनही घेतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

दूध जातंच उतू  जरी केलं ‘वर्क फ्रॉम होम’ 

आणि ऑफिसला गेले तर फोन वर फोन.

चौकशीच्या नादात बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

खरकटी भांडी आणि पिम्पाखाली तळे,

 कुकरच्या अगणित शिट्या आणि पोळी भाजीची पार्सले,

 यांच्या दर्शनानेच बहुदा आजारपणे पळतात,

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

रागावू नका, एखादा नवरा असेलही जगावेगळा.

 सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळा.

 —पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

 —की पलीकडचे रंग जरा जास्तच हिरवे दिसतात.

                                              

———म्हणे नवरे मदत करतात??

 

हा माझा अभिप्राय आहे — जसं पुरुष म्हणतात 

चांगल्या बायका नेहमी दुसऱ्यालाच मिळतात, 

तसं बायका देखील म्हणतात —–

चांगले नवरे नेहेमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात ——

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 106 ☆ कविता – रिश्ते ये खून के ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय एवं भावप्रवण कविता  ‘रिश्ते ये खून के’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने  के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 106 ☆

☆ कविता – रिश्ते ये खून के — ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

नहीं मालूम था

कि रिश्ते ये खून के ,

समय के साथ

पानी हो जाते हैं ,

बेमानी हो जाते हैं ।

नहीं मालूम था कि

रिश्ते ये प्यार भरे

 भाव भरे , स्नेह तरे

संजोया जिन्हें हर पल

आँखों के संग – संग

वह दे जाएंगे खालीपन

रिश्तों में दे खारापन |

नहीं मालूम था कि

रिश्तों की किरचें

बिखर जाएंगी

 चारों ओर

संभलने और संभालने

की कोशिशें

छोड़ जाएंगी निशान !

 रिश्ते ये खून के ?  

©डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print