श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(UPI – Unified Payments Interface)

श्री. दिलीप असबे 

आज जगातील जवळपास निम्म्या रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये एकट्या भारताचा वाटा आहे. हे केवळ भारताच्या अथांग लोकसंख्येमुळे नाही, तर या पेमेंट सिस्टीममुळे शक्य झाले आहे जी पूर्णपणे मोफत आहे, २४ तास अखंड चालते आणि वाराणसीतील रस्त्यांवरील फेरीवाल्यापासून ते मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वांसाठी समान रीतीने काम करते.

ही प्रणाली डिझाइन करणारे आणि यशस्वीपणे अमलात आणणारे अभियंते म्हणजे दिलीप असबे. रोजच्या जीवनात यूपीआय (UPI) वापरणाऱ्या बहुतांश भारतीयांनी त्यांचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.

यूपीआय येण्यापूर्वी, डिजिटल पेमेंटचे गणित सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते. जेव्हा जेव्हा एखादे कार्ड स्वाइप केले जायचे, तेव्हा व्यापाऱ्याला व्हिसा (Visa) किंवा मास्टरकार्डला (Mastercard) १ ते २ टक्के शुल्क द्यावे लागायचे. या परदेशी कंपन्या भारतातील प्रत्येक व्यवहारावर व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत होत्या. लहान व्यापाऱ्यांना हे परवडणारे नव्हते. बँकेतून पैसे ट्रान्सफर करायला तास जायचे आणि ते फक्त बँकेच्या दिवशीच व्हायचे. परिणामी, कोट्यवधी भारतीयांसाठी रोख रक्कम (Cash) वापरणे ही त्यांची आवड नसून एक गरज बनली होती.

मुंबईचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या दिलीप असबे यांनी एनपीसीआय (NPCI) च्या सुरुवातीच्या दिवसांत तिथे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि रुपे (RuPay) यांसारख्या भारताच्या मुख्य पेमेंट प्रणाली उभारण्यात तब्बल एक दशक घालवले. २००९ पर्यंत, त्यांच्या टीमने आधारच्या (Aadhaar) आधारे एक नवीन पेमेंट लेयर तयार करता येईल का यावर काम सुरू केले.

२०१५ पर्यंत त्यांच्या लक्षात आले की आयएमपीएस प्रणाली पुरेशी नाही. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय लॉन्च करण्यात आले. ही एक मोफत, २४ तास चालणारी आणि सर्व बँकांशी एकाच वेळी जोडली गेलेली प्रणाली होती, ज्यावर कोणतेही ॲप सहज तयार करता येत होते. शुल्काबाबत दिलीप असबे यांचे तत्त्व अगदी स्पष्ट होते: तुम्ही ग्राहकांकडून कोणतेही शुल्क वसूल करू शकत नाही, अन्यथा हे संपूर्ण मॉडेल अपयशी ठरेल.

आज यूपीआय ५० कोटींपेक्षा जास्त (+500 Million) वापरकर्ते आणि ६ कोटी ५० लाख (65 Million) व्यापाऱ्यांना ६७५ बँकांच्या माध्यमातून सेवा देत आहे. यूपीआयद्वारे दरमहा १८ अब्जांपेक्षा जास्त (18 Billion) व्यवहार होतात आणि व्यवहारांचे एकूण मूल्य २० लाख करोड पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णनजलद पेमेंट क्षेत्रातील जगाचा नेताअसे केले आहे.

दिलीप असबे हे २०१८ पासून NPCI चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.

एका बिगर-नफा (Non-profit) संस्थेत काम करणाऱ्या एका मराठी सरकारी अभियंत्याने १४० कोटी लोकांसाठी ही आर्थिक क्रांती उभारली.

लक्षात घ्या या UPI साठी कोणताही आयपीओ (IPO) नाही, कोणतीही युनिकॉर्न (Unicorn) कंपनी नाही… फक्त यूपीआय (UPI).

जाता जाता पण महत्वाचं :::: 

ज्या नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात UPI च्या योजनेचा पाया घातला गेला, आणि दिलीप असबे यांच्या टीमने अखंड मेहनत घेऊन एप्रिल 2016 मध्ये लाँच केलेली ही सिस्टिम आजही अखंड कार्यरत आहे, त्याच नंदन निलेकणी यांना पेपर फुटी विरोधातील तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी मोदींजींनी दिली आहे. त्यामुळे एक सर्वंकष लिकप्रूफ व्यवस्था नक्की निर्माण होईल याची खात्री बळगूया.

 – मला आलेल्या इंग्रजी लेखाचा मराठी भाषेत अनुवाद सादर करत आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक / अनुवादक : प्रसन्न आठवले

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted