शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

मैत्री केली तर

 जात पाहू नका,

 आणि मदत केली तर

 ती बोलून

 दाखवू नका.

 कारण कोणत्याही

 बाटलीचा सील,

 आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की,

 विषय संपला.

 मित्र गरज म्हणून

 नाही तर

 सवय म्हणून

 जोडा.

 कारण गरज

 संपते,

पण सवयी कधीच

 सुटत नाहीत.

 ‘मित्रनावाची ही दैवी

 देणगी जिवापाड

 जपून ठेवा,

 कारण,

 जीवनातील अर्धा

 गोडवा हा मित्रांमुळेच

असतो.

 कोणीतरी विचारले,

 मित्रांमध्ये एवढे

 काय विशेष

 नातेवाईकांपेक्षा?

 त्यांना सांगितले,

 मित्र हे फक्त

 मित्र असतात.

त्यात सख्खे, चुलत, मावस,

 सावत्र असं

 काही नसते.

 ते थेट मित्रच

 असतात.

 मैत्रीचे धागे

 हे कोळ्याच्या जाळ्या

 पेक्षाही बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहूनही

 मजबूत असतात.

 तुटले तर श्वासानेही

 तुटतील,

 नाहीतर

 वज्राघातानेही

 तुटणार नाहीत.

 प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार होतातच

 असे नाही,

 काही दुखणी

 कुटुंब आणि

 मित्र मंडळी

 यांच्याबरोबर

 हसण्या आणि

 खिदळण्यानेही

 बरी होतात.

 माणसाने कितीही प्रयत्न

 केले तरी

 अंधारात सावली

 म्हातारपणात

 ‘शरीरआणि

 आयुष्याच्या शेवटच्या

 काळात पैसा

कधीच साथ देत नाहीत,

 साथ देतात ते

 फक्त आपण

 जोडलेले

 जवळचे मित्र.

 मित्र बोलवित

 आहेत पण तुम्हाला

 जावेसे वाटत नसेल तर,

समजा की तुम्ही

 म्हातारे झालात.

 म्हातारपण येऊ

 न देणे आपल्या

 हातातच

 आहे ना?

 मित्रांसोबत रहा

 व आनंदात जीवनभर

जगत राहा.

 

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted