श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आगे आगे होता है क्या… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जगाच्या पसरलेल्या प्रचंड पसा-यात आपल्या संसाराचं बस्तान सुरळीत बसवून ते निटनेटकेपणे टिकवून ठेवण्यासाठी आपल्या वकुबानुसार कुठलतरी कर्म आपल्याला स्वीकारणं भागच पडतं. मग ते आवडीच असो नहीतर नावडत असो. शकारण बुडत्याला कडीचाआधार असल्या शिवाय हा दुस्तर भवसागर तरून पारकरण शक्य होत नाही. इथे उतू नको मातू नको घेतलावसा टाकू नको असे आवर्जून सांगणारे मात्तबर अनुभवी खूप मार्गदर्शक भेटतात आपला अनुमभव ते सांगतात. त्यांच्या त्या प्रभावशाली तार्किक विचाराने प्रभावित होण्याशिवाय आपल्या पुढे कोणताच विकल्प नसतो. आपण या सांसारिक संघर्षात नव्यानेच पदार्पण करणारे नवयुवक असतो. आपल्याला कुठलेतरी कर्म स्वीकारावेच लागते. मग पुढे ते स्विकृत कर्म आपला धर्म मानून जन्मभर जपाव लागते तेव्हा कुठेआपल्या जन्माचे सार्थक झाले असे लोक समुहाकडून आपल्याला ऐकायला मिळते. कर्म नाही जपलं तर करंटेपणा पदरी पडतो.

स्वीकारलेल्या कर्माच्या मार्गावर सुसाट वेगाने धावताना कुठल्यातरी सुविचाराच्या थांबल्यावर अंमळ विश्रांती घेवून पुन्हा नव्या दमाने कर्माला भिडल्यावर यश पदरी पडतं यात शंका नाही.

मग आपणास गीतेत महत्त्वाचा म्हणून विवरणकेलेला निष्कामकर्मयोग आठवतो, फळाची इच्छा न बाळगता कर्म करत राहिल्याने यश, किर्ती, संपदा आपल्याकडे चिरंतन वास्तव्याला येतत. सूख आपल्या पायाशी लोळण घेते आणि अंत्यंत महत्त्वाच म्हणजे आपल्या कुळाचाही उद्धार होतो

आणि बनतो आपण दिगंत कीर्तीचे धनी. हे सगळं तत्वज्ञान मागच्या अनेक पिढ्यांनी स्वेच्छेने पाळलं म्हणून त्यांचा त्यांच्या पूर्वजांच्या सह इहलोकी लौकिक झाला. याचे अनेक पुरावे पूर्वजांनी पुराणात नोंदवून ठेवलेले आहेत. पण ते आज मितीला कितपत खरे ठरतील या बाबत मनात शंका निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

आजकाल काळ, माणूस, निसर्ग, व्यवहार, संस्कार संस्कृती संसार बदलला आहे. हा सगळा प्रकार आणि प्रताप माणसांनीच केला आहे या बाबत दूमत नाही. तो आता देव आहे की नाही इथपर्यंत बळावला आहे. म्हणूनच देवाविषयीचा माणसाच्या मनात असणारा धाक ही संपुष्टात आला आहे. त्या मुळेच माणूस स्वैराचारी व भोगवादी बनलाय. तो विवेकच विसरून गेलाय. पैसाच इथला देव बनलाय. माणूस त्यांच्या भोवती फिरू लागलाय. त्या देवानेच माणसाला आज कोणत्या स्थितीत आणून ठेवलं आहे ते अवलोकन करण्यातच खरी मजा आहे.

आपल्या जीवनातले माया, ममता लळा, जिव्हाळा, हे परवलीचे शब्दच परागंदा झालेत. जाताना त्यांनी माणुसकी ही गिळंकृत केलीय. मग माणुसकीने वागणारी माणसे कमी झालीत आणि माणसे पाशवीवृत्तीची बनलीत. त्यानी तर कमालच केली. सौख्य, स्वास्थ, शांतता, आध्यात्म, श्रद्धा, विश्वास, यांना कुठल्याकुठे पळवून लावलं त्यामुळे वरून झगमगीत दिसणार जगणं आतून भकास झालं. नैराश्याने ग्रासलं. माणसाचं भविष्य ही भयभीत झाल. लाचार झाल. ते एकाकीपणे चिंता करतय माणसांची, पण त्याच्या हातात तरी काय ठेवलय माणसांनी, कारण माणूस आज स्वतंत्र झालाय माणसावरच वर्चस्व गाजवायला‌. तिथे बिचार लाचार भविष्य तरी काय करणार, ? आता विज्ञानाचा व विकासाचा पराक्रम पहात बसण्याशिवाय माणूस दुसरं काय करू शकतो बरं? जुनं सोनं होतं असं म्हटलं तर काळही तुमच्या कानात हळूच सांगेल अभी रुको और देखो आगे आगे होता है क्या !

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted