‘सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
संपादकीय निवेदन
✒️ अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ✒️
तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांनी आयोजित केलेल्या दशकपुर्ती सोहळा काव्यलेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना त्यांच्या ‘तितिक्षा’ या रचनेसाठी सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार मिळाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐 💐
☘️. ☘️. ☘️. ☘️. ☘️
– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कार प्राप्त कविता – “ती चार दैवी मुले…”
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुरस्कार प्राप्त कविता
विषय – तितिक्षा
कवितेचा उत्सव
☆ ती चार दैवी मुले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
☆
बालपणी हरवली,
छाया माथ्यावरची!
पोरकी झाली चौघे,
वाट धरी पैठणची!… १
*
ब्रम्ह वृंदास सामोरे,
प्रश्न केले अवघड!
शुध्दिपत्र मिळण्यास,
खूप केली धडपड!… २
*
ज्ञाना देई गुरूपद,
निवृत्तीस ते श्रध्देने!
चालले सोपान, मुक्ता,
मागुती त्यांच्या मायेने!.. ३
*
तितिक्षा सर्वास होती,
घेण्यास ज्ञान सखोल!
वृत्ती सर्वांच्याच होत्या,
तितिक्षेत समतोल!… ४
*
आकलन झाले सर्वां,
ही आहेत दैवी बाळे!
यांच्या अथांग ज्ञानात,
श्रीकृष्ण अंतरी खेळे!.. ५
*
जाणली त्यांची तितिक्षा,
योगेश्वराने अंतरी!
ज्ञानेश्वरी ही जन्मली,
या नेवाश्यात भूवरी!.. ६
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे






