सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
इंद्रधनुष्य
☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग २ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
☆
(माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.) –
इथून पुढे – –
त्यांच्याबरोबर पत्ते खेळावे. फार वेळ खेळावे लागत नाही. कारण अशा माणसांना पेशंस खूप कमी असतो. ते एकच गोष्ट करण्यास लगेच कंटाळतात. पत्त्यांमध्येही आधी क्रमवार चित्र लावून घ्यावीत. म्हणजे राजा राणी गुलाम l यांचा क्रम जो आहे तो आपण आधी त्यांच्यापुढे काढून दाखवावा आणि सतत त्यांच्याकडून करून घ्यावा. असे केल्याने तो सिक्वेन्स जो आहे तो लक्षात येईल. त्यांच्यासमोर बसून आपणही पत्त्यातली चित्र क्रमवार सतत लावावीत. त्यामुळे ती चित्रे डोळ्यात बसतील.
त्यानंतर अगदी लहान लहान सिक्वेन्स करायला भाग पाडावी. आठ दहा दिवस एवढेच घ्यावे. फार घेऊ नये. त्यानंतर मोठे सिक्वेन्स लावणे. म्हणजे प्रथम १२३४हे पहिले आठ दहा दिवस करायचं. आणि नंतर एक ते दहा अंक नंतरच्या आठवड्यात करावे. असे मोठे सिक्वेन्स लावण एक एक पायरी चढायला शिकवण. नंतर लहान मुलांची खेळतो ते भिकार सावकार किंवा एकच रंगाचे पत्ते वेगळे करणे, एकाच आकारचे पत्ते वेगळे करणे, जेणेकरून त्यांना बदाम, इस्पिक, चौकट, किलवर हे पत्ते वेगवेगळे ओळखता येऊ लागतील. रंग समजतील.
काही तोंडी गणिती खेळ घेणे म्हणजे एक ते दहा अंक. एक ते वीस, तीस ते चाळीस असे वाढवत रोज म्हणायचे. हे जमायला लागल्यावर दोन ते पाच पर्यंतचे पाढे घ्यायचे. विशिष्ट अंक काढून एक ते 20 अंक मोजायला शिकवायचं. उदाहरणार्थ तीन अंक गाळला म्हणून एक दोन चार पाच सात आठ दहा अकरा. यात खरं म्हणजे सहा आणि नऊ हे सुद्धा अंक येतात पण त्या सहा आणि नऊ हे अंक तीन गुणिले दोन आणि तीन गुणिले तीन हे कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही म्हणून इथे तो वापरू नये. भाषिक खेळ, शब्दकोडी सोडवणे, अंताक्षरी घेणे, गावाच्या भेंड्या लावणे यावरून स्मरणशक्ती वाढते. अर्थात आपल्या मुलांबरोबरही लहानपणी हे खेळ खेळले तर त्यांची स्मरणशक्ती वाढते हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यांच्याबरोबर कविता म्हणणे असे अनेक विविध खेळ आपण घेऊ शकतो. शब्दांमधील अक्षरांची उलटा पालट करून योग्य ते शब्द म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करणे. पहिला आणि शेवटचा अक्षर एकच असलं शब्द कसा उलटा सुलता वाचला तरी तोच होतो. अशा प्रकारचे खेळ. म्हणजे उदाहरणार्थ समास, नवीन कसाही वाचला तरी तो तोच शब्द राहील. असे छोटे छोटे खेळ खेळतात त्यांच्या चांगला फायदा होतो
ओंकार आणि गायत्री मंत्राने मेंदूच्या पेशी उद्दीपित होतात त्यांना काही प्रमाणात तरी आठवण्यासाठी हा पण एक प्रयत्न करता येतो. तसंच श्वास जो आहे तो श्वास मोजून वाढवून आणि सोडून. या प्रकारची क्रिया केली म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आपण पाच, सात, पाच असं करतो. म्हणजे पाच सेकंद श्वास घेणे, सात सेकंद तो साठवणे छातीमध्ये आणि पुढचे पाच सेकंद उछवास करणे. याला आपण मोठी माणसं सहज करू शकतो. पण या वयाला आणि त्यांच्या स्थितीला हे शक्य होत नाही म्हणून श्वास घेण्याची क्रिया 3 सेकंद, श्वास रोखण्याची क्रिया 3 सेकंद, आणि श्वास सोडण्याची क्रिया तीन सेकंद याप्रमाणे करून घ्यावे त्याचा चांगला उपयोग होतो. त्यांच्याबरोबर आपण फिरायला जाऊ शकता. मग फिरायला कुठे लांब जायचं असं नाही. पार्किंग मध्ये, जवळच्या बागेत थोडावेळ त्यांना फिरवून आणले. त्यांच्या मित्रांना, आपल्या मित्रांना मुद्दाम त्यांच्याशी गप्पा मारायला बोलावणे. म्हणजे त्यांनाही सोशल लाइफ अनुभवता येते. तसंच आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावं त्या मित्रांना पूर्ण कल्पना त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना द्यावी आणि ती मुलं जर त्या आजोबांना घेऊन किंवा आजीला घेऊन काही खेळ खेळले तर ते त्या वेळापुरते आनंदी राहतात कारण त्यांनाही नातवंडांची आवड असते. आणि मग तीही मुलं एक अर्धा तास रोज खेळली तरी त्या वेळेची ते वाट बघतात. कदाचित त्यांना वेळ समजणार नाही. किती वाजलेत ते पण कळणार नाही. पण मुले घरी येऊन बसली आहेत हे मेंदूला त्यांची तेवढी तरी जाणीव होईल. अशी आशा वाटते.
आता प्रश्न असा येतो की पेशंट समजा व्हायलेंट झाला तर पेशंटला शांत कसं करायचं? आपल्या मनावरील नियंत्रण, योगाचा उपयोग समजूत घालण्यासाठी लागणारा आपला पेशंस, आणि सहानुभूती, समजूतदारपणा या गोष्टी जर आपण आपल्या अंगी baanaavalya, वाढवल्या तर हे शक्य होईल. म्हणजे इथे पुन्हा अध्यात्म आलं. हे अध्यात्माच्या साह्याने आपण आपल्यामध्ये तयार केलं तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यावेळी गोष्टी करता येतील. ते लगेच विसरणार. पण पेशंट व्हायोलंत झाल्यास मग अवघड जातं. आपल्या मुलांवरही नियंत्रण ठेवायला हवे. मुलांना त्यांची मानसिक स्थिती आपण स्वतः शांतपणे समजावून सांगावी. पेशंटकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आजोबा आजीशी पूर्वीप्रमाणेच प्रेमाचे वागणे ठेवण्यास सांगावे. त्यांच्याशी गोड बोलायला सांगा. वर्गातील गमती जमती त्यांना सांगाव्यात. जेणेकरून त्यांना घरात महत्त्व मिळत आहे हे त्यावेलेपुरते तरी समजते व त्यांची चिडचिड कमी होते. असं पहा “परिस्थिती बदलता येत नसेल तर आपली मन:स्थिती बदलावी लागते”
याबरोबरच त्यांची औषधा वेळेवर द्यायला हवी. त्यांच्या जवळच्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा आपण जो फ्रेंडशिप बँड बांधतो त्या बँडवर त्यांचं नाव, आपला नंबर मोबाईल नंबर, आणि घरचा पत्ता हा त्यांच्याजवळ सतत ठेवावा. जेणेकरून ते एकटेच जर बाहेर पडले आणि हरवले, रस्ता सापडत नसेल तर कोणीतरी माणूस तो त्यांना पत्ता सांगून घरापर्यंत आणून सोडेल. त्यांचा आजार यांची माहिती पण त्यात द्यायला विसरू नये. इथे परिस्थिती बदलता येत नाही म्हणून आपल्यावरच बंधने येतात. म्हणून आपण स्थित:प्रज्ञ राहणं हेच अध्यात्म आहे. ज्याची आपल्यावर जबाबदारी आहे तो एखाद्या लहान मुलासारखा होतो. म्हणून त्यांचे हट्ट पुरवावे लागतात. पण ते सर्व क्षणिक आहेत. दुसऱ्या मिनिटाला ते सर्व विसरतात. म्हणून स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण तुम्ही करताय त्या सेवेची कदाचित त्यांना जाणीव होणार नाही, पण त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते महत्त्वाचे आहेत, माझी आजी म्हणायची की “कोणी एखाद्या माणसाने आपल्याला बोलून काही आशीर्वाद दिले नाहीत तरी त्याच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात”. बोलीभाषा मन शांत करण्यासाठी, (स्वतःचे आणि पेशंटचे सुद्धा)
त्यांची चित्तवृत्ती जागृत करण्यासाठी सावकाश पण लयबद्ध स्वरात. आवाजातील चढ-उतार ऐकून मानसिक तृप्ती करणारी. त्याच वेळी चेहऱ्यावरील भाव महत्त्वाचे आहेत. त्यांना आनंददायी वाटले पाहिजे आणि इतर लोक काय करतील, म्हणतील याची परवा न करता स्वतः वागायचे आणि आपल्या मुलांना सुद्धा तशीच शिकवण द्यायची आहे.
आता प्रश्न असा की अध्यात्म कुठे आलं? आपण सुरुवातीलाच अध्यात्माचा अर्थ समजून घेतलाय. स्वतःला ओळखणे मी कसा आहे याचे उत्तर शोधताना आपल्याला आजूबाजूच्या सर्वांनी चांगला माणूस म्हणून ओळखावे अशी सर्वांची सूpt इच्छा असते. त्यासाठी आत्मशोध घ्यावा लागतो. “उधारेत आत्मन्:आत्मनं “आपणच आपला फक्त उद्धार करायचा नाही तर एक कुटुंब वचन म्हणून” मी “हे याचे उत्तर शोधायचे. मी मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण, बहिणीनं मुले, नातेवाईक यांच्याशी जोडला गेलेलो आहे. आपणच आपला उद्धार करायचा असेल तर कुटुंबातील सर्व नाती मला समजूतदारपणे गोडीने शांततेने आपलीशी करावी लागतील. आई बाबा पण त्यातच असतील. सर्वांना सुखी, आनंदी ठेवायचे असेल तर आपल्या अंगी अध्यात्म रुजवण्याशिवाय पर्याय नाही. सर्वेशु sukhina संतु lसर्वे संतू निरामय:llअसं आपल्याकडे म्हणलं जातं. सगळ्यांना सुखी करायचे सगळ्यांनाच निरामय आयुष्य द्यायचे ही आपली सुप्त इच्छा मनापासूनची इच्छा आहे. अशा आई-वडिलांचे संगोपन मनापासून करायचे म्हणजे सुद्धा ती एक ईश्वरी सेवा आहे.. मग अध्यात्म त्यापासून काय वेगळे आहे हो?
प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी — भाग दुसरा
💦🌨️
लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड -पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




