विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जल ऊर्जा (Water Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

मिळवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जलतत्त्व संतुलित करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जल ऊर्जा हे निसर्गाशी जोडलेली शांतता आणि भावनांवर नियंत्रण मिळवून देणारी असते.

जल ऊर्जेचे फायदे:

मानसिक शांती:

पाण्या सारखा प्रवाहीपणा आपल्या विचारात येतो. त्या मुळे मनातील गोंधळ कमी होतो. व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाण्यासारखी स्थिरता आणि शांतता मिळण्यास मदत होते.

तणावमुक्ती: मज्जासंस्था शांत होते. आणि मानसिक ताण कमी होतो. ही ऊर्जा स्नायुंमधील ताण कमी करुन शरीराला शिथिल (Relax) करते. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

सर्जनशीलता:

मन स्पष्ट आणि शांत झाल्यामुळे कल्पकतेत वाढ होते. मनाला नवीन दृष्टी मिळते.

भावनिक समतोल: भावनांचे नियमन करण्यास आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होते. जलतत्व हे भावनांशी संबंधित असते. या मुळे राग, भीती, तणाव या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. आणि मन स्थिर होते.

लवचिकता

पाणी जसे पात्रा प्रमाणे आकार धारण करते त्या प्रमाणे ही ऊर्जा जीवनातील बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते.

अंतर्मनाची शुद्धी

पाणी जसे अशुद्धी धुवून टाकते, त्या प्रमाणे ही जलऊर्जा मनातील जुन्या नकोशा आठवणी, दुःख, नकारात्मक विचारांचे ओझे स्वच्छ करुन मन हलके करते.

अंतर्ज्ञान

ही ऊर्जा अंतर्ज्ञानाशी (Intuition) जोडलेली असते.

सकारात्मक ऊर्जा वाढणे

या ऊर्जे मुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित होतात.

टीप: हे ध्यान रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात करणे अधिक फलदायी मानले जाते, जेणेकरून मन अधिक एकाग्र होऊ शकते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted