सौ. वृंदा गंभीर
विविधा
☆ सौभाग्य… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
“एका स्त्रीचं सौंदर्य म्हणजे सौभाग्य”…
आज काल सौभाग्यच लेणं म्हणजे डेड फॅशन मानलं जात…
“बंधन नको मोकळीक हवी असते… साडी सौभाग्याचं लेणं नको वाटतं…
“भारतीय परंपरा नको, वेस्टर्न फॅशन वाटतीय “…
पण, सौभाग्य म्हणजे काय हे तिला विचारा जे तिच्याकडून हिरवलं जात…
“स्त्रीचं सौंदर्य म्हणजे कपाळावरील कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैंजण, बोटात जोडवी “…
किती खुलेलं रूप असतं रंग कोणताही असो तिचं सौंदर्य उठून दिसतं…
“कसं कळेल आजच्या पिढीला. का पूर्वीच्या आई सारखं परंपरेच महत्व पटवल्या जात नाही “…
हातात बांगडी नसते, आई म्हणते माझ्या मुलीला बांगड्या आवडतं नाही. माझ्या मुलीला मी बंधनात अडकवलं नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे तू जग असं शिकवलं, अग बाई पण,
हे बंधन नाही सौंदर्य आहे.
“शिकली मोठी झाली मोठ्या नोकरीला लागली म्हणजे तू स्त्री म्हणून बदलत नाही स्त्रीचं असते ना, मग सौभाग्य अलंकार घालून सौंदर्य वाढव ना…
ड्रेस मध्ये कंफर्टेबल वाटतं, हातात बंगडया असल्यामुळे काम सुचत नाही. हे ऐकायला मिळतं कारण खूप आहेत… मूर्ख आहेत स्वतःच सौंदर्य स्वतः खराब करून पुरुषां सारखं रहात आहेत..
असो, ” ज्या स्त्रीचं सौंदर्य गेलं तिला किती त्रास होतो.
“तिचा जेंव्हा पती जातो, तिला “विधवा” म्हणून हिणवलं जातं…
तिचा राग, राग केला जातो, तिला शुभकार्याला बोलवलं जातं नाही, , तिला किती वेदना होत असतील?
याचा विचार कुणी करत का?
“खरी ती विधवा नसते तर “अर्ध मेलेली असते”… कारण, तिचं हृदय मेलेलं असत तिने तिचं हृदय लग्नातच पतीला दिलेलं असतं, पती गेल्यावर ती मरते पतीचं हृदय तिच्यात धडधड करत असतं..
पतीच्या मातीच्या वेळी तिचं सौंदर्य काढून घेतल्या जातं यात तिचा काय दोष असतो…
किती वेदना होत असतील जेंव्हा मंगळसूत्र काढल्या जातं…
पायातील जोडवी काढले जातात…
हातातील बांगड्या वाढवल्या जातात…
आणि हे सौंदर्य काढून घेणारी स्त्रीचं असते…
आई, बहीण, नणंद किंवा अजून कोणी विधवा…
अशावेळी सौंदर्य काढून घेता ना मग सौभाग्य कशात आहे ते वेळेत का शिकवत नाही…
बांगडी ची किंमत कळते जेंव्हा स्मशानात हातातील बांगडी काढून घेतली जाते…
जोडव्याची किंमत कळते जेंव्हा जोडवी पतीच्या चितेत फेकली जातात.
मंगळसूत्रची किंमत कळते जेंव्हा एवढ्या गर्दीत ते काढून घेतलं जातं…
“तेंव्हाच स्त्रीची खूप मोठी हार असते जरी ती मोठी क्लासवन असली तरीही”
लाखो रुपये खर्चून लग्न लावून देता पण फॅशन च्या नावाखाली..
आभूषण नको असतात म्हणून आम्हाला आवडतं नाही सांगत बंधन नको असतं…
“त्याचं अभूषणांच महत्व आई ने पटवून दिले तर स्त्रीचं खरं सौंदर्य जपता येईल असं वाटत नाही का?
स्त्रीच सौंदर्य साडीतच आहे कशीही असली तरी सुदंर दिसते…
“पती आहे तोपर्यंत स्त्री जिवंत असते,,,, तेंव्हाच जगून घ्या नंतर काही उपयोग नाही….
हातात बांगड्या, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू,,,,,
नंतर कितीही घालावं वाटलं तरी घालू शकणार नाही…
वेळीच महत्व समजून घ्या,,, शिक्षण परंपरा हिसकावून घेत आहे… वेळीच सावरा… तुमचं सौंदर्य जपा…
सरासरी हातात बांगडी घालायची नाही किंवा गोट घालायचे आम्हाला बांगडी आवडतं नाही असं म्हणतात,,,,, त्यावेळी सांगावं वाटतं अग बाई हीच बांगडी हातातून काढतात तेंव्हा कळतं,,, पण वेळ गेलेली असते….
जेंव्हा हळदी कुंकू कार्यक्रम असतो आपल्याचं घरातील सुवासिनी हळदी कुंकू करतात तेंव्हा हळदी कुंकवाच महत्व काय असतं ते कळतं…
“संक्रांतीला हळदी कुंकू देवाला ववसा देणं सुवासिनीच असत…
ते फक्त सुवासिनीने करायचं असं का?
विधवा स्त्रीच्या हृदयात तिच्या पतीचं हृदय धडधड करत असतं मग तिने का नाही तिच्या पतीच्या फोटोला वसा अर्पण करायचा? तिच्या हृदयात पती कायम जिवंत असतो मग तिला का नकारायचं…
“वेळीच सावरा फॅशन च्या नावाखाली सुवासिनी म्हणून जगायचं विसरून चालणार नाही…
बाहेरील सौंदर्यापेक्षा आतील सौंदर्यला महत्व दया परंपरा जपा,,,, सौंदर्य टिकवा….
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




