मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं-  अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.  आता इथून पुढे )

“कुठे गेली होतीस?” त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली.बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं.अजित आत आला.

” बरं वाटतंय का त्याला?”त्याने विचारलं.तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली.मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.

” साँरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे…..”

उत्तर न देता अनू रडत राहिली.अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं.त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला.

रात्री दोन वाजता त्याला जाग आली.अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.तो उठून बाहेर आला.अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.

” मी घेऊ त्याला?”त्याने अनूला विचारलं.तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं.अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला.एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते.मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही,ओरडत नाही.प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते.बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही.त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या.

दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं.पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक.तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही.अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची.

कंपनीत आलं की अजितला आज आँर्डर येणार नाही ना याची भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं.नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणउतारा केला.राचीची आँर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या आँफिसमध्ये गेल्याचं कळलं.नक्कीच तो आपली आँर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली.पण आता त्याने मनाची तयारी केली होती.अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती.पण तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हेही त्याला माहित होतं.आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला सुटी घेऊन यावं लागणार होतं.धावपळ होणार होती,त्रास होणार होता पण इलाज नव्हता.सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार कठीण होतं.

तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं.त्यात दुपारी शिपाई जी.एम.साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला.जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.

” मे आय कम ईन सर”

” येस कम ईन”

तो जी.एम.साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.

” हँव अ सीट माय बाँय”

अजित अवघडून  बसला.जी.एम.साहेबांनी ड्राँवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.

“धीस इज युवर आँर्डर.”

शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती आँर्डर आली होती.पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं.अजितच्या पायातलं त्राण गेलं.त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.

“काँग्रँच्युलेशन्स फाँर युवर प्रमोशन!”

त्याच्या कानावर जी.एम.साहेबांचे शब्द पडले आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

“प्रमोशन?विच प्रमोशन?”त्याने आश्चर्याने विचारलं.

“येस! यू हँव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट आँफ प्राँडक्शन मँनेजर.”

अजितला फारसा आनंद झाला नाही.राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला सांभाळणं सोपं नव्हतं.

” सर राचीका प्लांट कैसा है?जस्ट आस्कींग टू हँव अ नाँलेज बिफोर जाँयनिंग. “

“यु आर नाँट गोईंग टू राची.यु विल वर्क हिअर अँज प्राँडक्शन मँनेजर.”

“व्हाँट?”अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस माय बाँय”जी.एम.हसत म्हणाले.

“व्हाँट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?”

” उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाँज व्हेरी अँरोगंट पर्सन. ही नाँट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हँड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाँज व्हेरी मच नोन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाँर धीस पोस्ट. “

जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राँडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं होतं.म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता.

आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला.वाटेत त्याने पेढे घेतले.घरात तो शिरला तर बाळ हाँलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता.अनू किचनमध्ये काहितरी करत असावी.अजित बँग ठेवून बाळाकडे गेला.बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला.त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला.त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला.त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला.त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला.अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला.मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला.त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.

” द्या इकडे त्याला माझ्याकडे” अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.

” राहू दे ना थोडा वेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय.”

“नको.तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना” अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण आज बाळाचा मुड वेगळाच होता.त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली.आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला.अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.         ” बदमाश!विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते”हताश होऊन अनू म्हणाली.

“अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज” अजित कळकळीने म्हणाला.”     तो विसरेल. तुम्हीही विसराल हो.पण मी कशी विसरेन.नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात.त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं.बरं तरी सोफ्यावर आदळलं,फरशीवर आदळलं असतं तर…” बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.

” चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्या दिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो.”

” पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता.आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय.पण आँफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही.त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटँक आला होता.त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता.”

“अरे बापरे!अगं मग सांगायचंस ना!आपण गेलो असतो त्यांना भेटायला.”

” काय सांगणार?मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात.मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली.”

” आय अँम एक्स्ट्रिमली साँरी अनू.खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं.खुप पश्चाताप होतोय गं.माफ कर ना मला प्लीज!”

” मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस,निष्पापांचाच बळी गेला आहे.माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता.बस.परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे.”

” तुझी शपथ,अनू मी परत असं कधीही करणार नाही.”

बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं.आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.

” एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राँडक्शन मँनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली.बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ.”

“अहो त्यांना माईल्ड अटँक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाँक्टरांनी घरी पाठवलं.’      “मग तर पेढे खायलाच पाहिजे” असं म्हणून अजितने बँगेतला पेढ्यांचा बाँक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

माझ्या या कामामध्ये खूप वेळा हृदय पिळवटणाऱ्या घटना घडतात, भावनांचा कस लागेल, अशा गोष्टी हाताळाव्या लागतात… अश्रू बर्फ होतील की काय असं वाटायला लागतं…. ! 

गाण्यातले सूर हरवले की ते गाणं बेसूर होतं…. 

परंतु जीवनातलं मन हरवलं की अख्ख आयुष्य भेसूर होतं… 

असे भेसूर प्रसंग डोळ्यांनी पहावे लागतात… अनुभवावे लागतात…. मन सुन्न होतं… असंही काही असतं यावर विश्वास बसत नाही.,. या परिस्थितीत नेमकं काय करावं बऱ्याच वेळा कळत नाही…! 

असे अनेक करुण प्रसंग पुस्तक रूपानं शब्दबद्ध करून ठेवले आहेत….! माझ्या पुस्तकातल्या पानात हे प्रसंग बंदिस्त झाले आहेत…  पिंपळाच पान ठेवावं तसे … !  या पानाच्या आता जाळ्या झाल्या आहेत… पण हरकत नाही ! … ही सुंदर नक्षीदार जाळी, मला माझ्या म्हाताऱ्या झालेल्या याचकांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची दरवेळी आठवण करून देते… ! 

…. आणि मीच रचलेल्या या जाळ्यात दरवेळी अडकायला मलाच खूप आवडतं….! 

मात्र संपूर्ण दिवसात एक तरी प्रसंग असा घडतो जिथं पोट धरून हसावं…. एक तरी सुखद प्रसंग असा घडतो की तो अनुभवताना वाटतं, धन्य झालो… या प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी निसर्गाने मला जिवंत ठेवलं… ! … संपूर्ण आयुष्य जगून झालं, तरीही सुख आणि समाधान म्हणजे काय हे अनेकांना कळत नाही, अशावेळी रस्त्यात बसलेला माझा एखादा याचक, चार ओळींमध्ये जगण्याचं सार सांगून जातो….! 

हे प्रसंग आणि आशावादी चित्र, मला सुद्धा जगायचं बळ देतं…. उद्या उठून परत तिथेच जाण्यासाठी प्रवृत्त करतं…. हे आशावादी चित्र म्हणजे माझ्या कामाचं टॉनिक आहे..! 

हे सर्व प्रसंग नंतर आठवून शब्दबद्ध करता येतात, परंतु दरवेळी कॅमेऱ्यात ते टिपता येत नाहीत…

पण, असं एक क्षणचित्र चुकून का होईना, पण कॅमेऱ्यात काल शनिवारी २५ मार्च रोजी बंदिस्त करता आलं. 

वरवर गमतीचा वाटावा, असा हा प्रसंग. परंतू  खूप काही शिकवून गेला. भेगाळलेल्या मातीवर पावसाचा टिपूस पडावा, तेव्हा त्या मातीला काय वाटत असेल ….?  नेमकं तेच मला या प्रसंगातून वाटलं…! 

तोच हा प्रसंग…

… एक आजी, वय वर्षे साधारण ७५….तिला माझ्याकडून काही वैद्यकीय साधने हवी होती, पण त्यावेळी ती साधने माझ्याकडे नव्हती. आजी माझ्या प्रेमाचीच, परंतू त्यावेळी मात्र ती चिडली, मला उलट सुलट बोलायला लागली. आमच्यात मग रस्त्यावरच्या रणांगणावर, “शाब्दिक घनघोर युद्ध” झाले…! 

… जुनं खोड हे … म्हातारी काय बोलायला ऐकते का मला ? प्रश्नावर प्रतिप्रश्न …. उत्तरावर प्रतिउत्तर… ! 

…. पट्टीच्या पैलवानाला दहा मिनिटात रिंगणात आसमान दाखवावं, तसं म्हातारीने दहा मिनिटात, मेरे जैसे छोटे बच्चे की बोलून बोलून जान ले ली राव …! 

एक दिन मैं पानी में  “शिरा” फिर “पोहा”…. अशा टाईपचे माझं हिंदी…. 

“गाडी के नीचे कुत्रा बसलाय…”  हे सुद्धा अस्मादिकांचेच वाक्य आहे …. ! 

वरील दोन्ही हिंदी वाक्यांचा मूर्ख (सॉरी, “मुख्य” म्हणायचं होतं….) निर्माता मीच आहे… !

तरीही मी खूप आनंदी आहे, कारण नवनिर्मिती महत्त्वाची ! 

असो….

तर यानंतर, मी पराभूत होऊन, तिला शरण गेलो, मान खाली घातली…! तरीही म्हातारीचा जिंकण्याचा आवेश अजून उतरला नव्हता….तिने उठून उभे राहत, अक्षरशः कसलेल्या पैलवानागत शड्डू ठोकत, मला कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले…! .. आभाळाकडे दोन्ही हात नेऊन आभाळाला गुदगुल्या कराव्या तशी बोटांची ती हालचाल करत होती… मध्येच एका पायावर उभे राहण्याची कसरत करत, शड्डू ठोकत, मला चिडवत, डिवचायची…’.ये की रं… घाबरलास का ? खेळ माझ्यासंगं कुस्ती…ये…!’ 

…. इकडे माझ्यावर इतका “भीषण प्रसंग” उद्भवला होता आणि आजूबाजूची मंडळी पोट धरधरून हसत होती… तेवढ्यात एक जण माझ्या कानाशी येऊन, जोरात हसत म्हणाला, ‘ खेळा डॉक्टर म्हातारीशी कुस्ती….!’

…. चिडलेल्या म्हातारीने नेमके हे ऐकले आणि ती आणखी चवताळली… या मूर्खाला जोरातच बोलायचे होते, तर कानाशी का बरं हा आला असेल ? मूर्ख लेकाचा….पण आता हे बोलून त्याने काळ ओढवून घेतला होता…! ‘ ये मुडद्या तू बी ये, कुस्ती खेळायला….’, म्हातारीने कुस्ती खेळण्याचे आवाहन शड्डू ठोकत त्याला सुद्धा दिले. म्हातारीचा आवेश काही केल्या उतरेना…! 

…. मेलेल्या उंदराला शेपटीला धरून बाहेर फेकावं, तसं म्हातारी आता माझ्या ॲप्रनला चिमटीत धरून, मला हवेत गरागरा फिरवून, चितपट करणार… हे स्पष्ट होते. … “सर सलामत तो पगडी पचास” असा शहाणा विचार करून मी तिच्यापुढे पुन्हा शरणागती पत्करली. “बचेंगे तो और लढेंगे” असा प्रेरणादायी विचार मनात घोळवत… ‘ म्हातारे, मी हरलो ‘ असं जाहीरपणे कबूल केलं. कोंबडीनं मान टाकावी, तशी मान टाकून पराभूत योद्धाप्रमाणे मी तिथून निघालो. 

लटपटत का होईना… परंतु शूर योद्धाप्रमाणे म्हातारी पुन्हा माझ्यासमोर आली . चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीमधून विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता…! …. “आयुष्यभर परिस्थितीशी कुस्ती करून, कायम पराभूत झालेली ही म्हातारी, आमच्या या कुस्तीत मात्र जिंकली होती” 

पण, योग्य वेळी हार मानून आपल्या माणसांना जिंकताना पाहणं यातही वेगळाच आनंद असतो….! 

तर… उंदराला मारलं, तरी मांजर काही वेळ त्याच्याशी खेळत राहतं, त्याप्रमाणे म्हातारी मला पुन्हा डिवचत म्हणाली, ‘का रं… हरलास ना ?’  म्हातारीला तिचा विजय माझ्या तोंडून पुन्हा वदवून घ्यायचा होता….! 

इंजेक्शन टोचल्यागत, कळवळून मी तिला, ‘ म्हातारे, तुच जीतलीस ‘ म्हणालो..! 

माझा पराभूत चेहरा आणि पडलेले खांदे पाहून म्हातारीला आता माझी दया आली असावी….

मला म्हणाली, ‘ चिडलास व्हय लेकरा…? आरं म्या गंमत केली तुजी… जितायची जितं खात्री आस्ती, मानुस तितंच कुस्ती खेळाया जातू…. तू मलाच जितवणार हे मला म्हाईत हुतं ल्येकरा….!’ … आजीच्या डोळ्यात आता पाणी होतं…! ‘ आरं कसली आलीया हार आणि कसली आलीया जीत ल्येकरा ??? बुद्धिबळाचा डाव संपल्यावर राजा,वजीर, हत्ती, घोडे आणि प्यादी एकाच डब्यात गप गुमान बसून असत्यात बग…! ‘ 

… वरवर अडाणी वाटणाऱ्या आजीने, या गमतीशीर प्रसंगातून, अख्ख्या आयुष्याचं सार सांगितलं….!!!

आजीच हे वाक्य ऐकून खरं तर मी अंतर्बाह्य हलून गेलो होतो….खरंच किती सत्य होतं हे ?  

तरीही, आजीची आणखी थोडी गंमत करावी, म्हणून मग मी अजून थोडा “रुसून” बसलो… तिच्यापासून बाजूला सरकून बसलो….

….. “आंतर चालण्यात असावं बाबा…. बोलण्यात आणि नात्यात ठेवू न्हायी” असं समजुतीने म्हणत,  माझ्या जवळ येत, छोट्या नातवाचा रुसवा काढावा, तशी ती माझ्याजवळ आली… म्हणाली, ‘ बाळा, ज्याला कुटं, कंदी, काय हरायचं त्ये कळतं…त्योच खरा जिततो…’

यानंतर, माझे दोन्ही हात हातात घेऊन, झोपाळ्यागत हलवत ठेक्यात ती गाणं गाऊ लागली….

तुजी माजी जोडी…

झालास का रं येडी…

चल जाऊ शिनीमाला…

आणू का रं गाडी…? 

…. आता इतक्या मायेने आजी जर नातवाला विनवत असेल…. तर कुठल्या नातवाचा राग पळून जाणार नाही ? तिचे सुरकुतलेले ते हात अजूनही माझ्या हाती होते… हातावरची आणि चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती ही आयुष्यानं शिकवलेल्या अनुभवांची होती… पचवलेल्या पराभवाची होती…! 

रस्त्यावर एकटी आयुष्य कंठत असताना, समोर येणाऱ्या वाईट परिस्थितीला सुद्धा, या वयात, दरवेळी शड्डू ठोकत, ‘ये खेळ माझ्यासंगं कुस्ती’ असं म्हणत आव्हान देत होती….! 

…. छोट्या छोट्या गोष्टींनी पिचून जात, रडत राहणारे आपण… चटकन हार मानणारे आपण….! 

माझ्यासाठी ती मात्र एक “अजिंक्य मल्ल” होती…! तिच्या कानाशी जाऊन मी म्हणालो, ‘आजी मी तुला जितवलं नाही… तू खरोखर जिंकली आहेस …! 

…. यावेळी मी तिच्या डोळ्याकडे पाहिले आणि सहज आभाळाकडे लक्ष गेलं….. दोन्ही पाण्याने भरले होते…! मी ते माझ्या ओंजळीत घेतलं …

…… तीर्थ ….तीर्थ …म्हणत असावेत, ते हेच असेल काय ???

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-4… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-३…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

तव देह म्हणजे तू नसशी

तव जीव देखिल तू नसशी

तू तर केवळ आत्मा असशी

सुखदुःखाच्या परे असशी

मना भासे सुखदुःखाचे लिंपण

परि आत्म्याला ते न स्पर्शे जाण

आरशात जसे प्रतिबिंब दिसे

विश्वरूपे परमात्मा असे

दृश्य द्रष्टा असे आपणचि

आपणा सन्मुख आपणचि॥१६॥

 

अज्ञाने प्रतिबिंबा ये बिंबत्व

तद्वत येई परमात्म्या द्रष्टत्व

अविद्या दावी दृश्य द्रष्टा द्वैत

परि ज्ञानयोगे साधे अद्वैत॥१७॥

 

बाणी तो स्वतःआपुल्या पोटी

द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी॥१८॥

 

सुताच्या गुंडी सूतचि पाविजे

तीनपणेविण त्रिपुटी जाणिजे॥१९॥

 

दर्पणी पाहता मुख

आपुलेसि आपण देख

आरसा नसता न राही बिंबत्व

तसेच जाई पहाणाराचे द्रष्टत्व॥२०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे,” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “ Coordination cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

 हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला, “Duty manager , please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना, की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार, तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मैं तुम को जमीन में जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले, “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मैं आपकी मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी में ठीक तरह  से बातचीत करने नहीं आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उनकी तरफ से माफी मांगता हूं . ”

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली, पण चढ्या आवाजांत म्हणाली, “मेरे दांत में बहोत दर्द है . मैं सफर नहीं कर सकुंगी. बस इतना मैंने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये हैं ? मैं उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार, पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”

यावर बनर्जीने जे उत्तर दिले, ते ऐकून मला हसावे की रडावे, ते कळेना.

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मैं वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैंने लेडी को बोला: टांग उपर करो,” असं म्हणून बॅनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग,’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी, तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिट में दोर्द गायब होता है.”

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जिभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #189 ☆ कथा कहानी – एतबार ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर एवं विचारणीय कहानी ‘एतबार’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 189 ☆

☆ कथा – कहानी ☆ एतबार

वीरेन्द्र जी ऊँचे प्रशासनिक पद से रिटायर हुए। वे रोब-दाब वाले अफसर के रूप में विख्यात रहे। चाल-ढाल और बोली में हमेशा कड़क रहे। उनके ऑफिस के आसपास कभी किसी को ऊँची आवाज़ में बोलने की हिम्मत नहीं हुई। रिटायरमेंट के बाद भी उनका स्वभाव वैसा ही बना रहा। घर के लोग उनसे उलझने से बचते रहते हैं।

वीरेन्द्र जी हमेशा चुस्त-दुरुस्त रहना पसन्द करते हैं। सबेरे स्मार्ट वस्त्रों और जूतों में पत्नी के साथ सैर को निकल जाते हैं। घूम कर आराम से घर लौटते हैं। कहीं अच्छा लगता है तो बैठ जाते हैं। उनका नित्य का क्रम बँधा हुआ है। उसमें व्यतिक्रम उन्हें पसन्द नहीं।

अपने जीवन और अपनी ज़रूरतों के बारे में वीरेन्द्र जी सख़्त हैं। अपने कपड़ों, खाने- पीने  और दूसरी ज़रूरतों में फेरबदल उन्हें पसन्द नहीं। वे उन पिताओं में से नहीं हैं जो अपने परिवार की ज़रूरतों के लिए अपनी ज़रूरतों को होम कर देते हैं। इस मामले में वे ज़्यादा भावुक नहीं होते।

वीरेन्द्र जी के साथ उनका छोटा बेटा और बहू रहते हैं। बड़ा बेटा ऑस्ट्रेलिया में और बेटी बैंगलोर में अपने पति के साथ है। छोटा बेटा और उसकी पत्नी शहर में ही जॉब करते हैं। वीरेन्द्र जी ने बंगला बड़ा बनाया है, इसलिए जगह की कमी नहीं है।

वीरेन्द्र जी का दृढ़ विश्वास है कि दुनिया में पैसे से ज़्यादा भरोसेमन्द कोई चीज़ नहीं है। उन्हें किसी मनुष्य में भरोसा नहीं है, अपनी सन्तानों पर भी नहीं। उनकी सोच है कि आदमी के लिए अन्ततः पैसा ही काम आता है, इसलिए भावुकता में उसे बाँटकर खाली हाथ नहीं हो जाना चाहिए। मित्रों के बीच में वे जब भी बैठते हैं तब भी यही दुहराते हैं कि पैसे से बड़ा दोस्त कोई नहीं होता, इसलिए उसे हमेशा सँभाल कर रखना चाहिए। वे अपने पैसे का हिसाब-किताब, अपने एटीएम कार्ड, अपनी मियादी जमा की रसीदें अपने पास ही रखते हैं। अपनी संपत्ति के बारे में खुद ही निर्णय लेते हैं। बेटे-बहू को कभी ज़रूरत से ज़्यादा जानकारी नहीं देते। पैसे निकालने, जमा करने का काम खुद ही करते हैं। उनके स्वभाव को जानते हुए बेटा-बहू भी उनसे जानकारी लेने की कोशिश नहीं करते।

वे अक्सर एक बड़े उद्योगपति का किस्सा सुनाते हैं जिसने भावुकता में अपनी सारी संपत्ति अपने बेटे के नाम कर दी थी और जो फिर अपना घर छोड़कर किराये के मकान में रहने को मजबूर हुआ था।

बैंक और एटीएम वीरेन्द्र जी के घर के पास ही हैं। कई बार पत्नी के साथ टहलते हुए चले जाते हैं। बेटे और बहू से पैसा नहीं निकलवाते। अपने पैसे के बारे में भरसक गोपनीयता बनाये रखने की कोशिश करते हैं।

वीरेन्द्र जी किसी का एहसान लेना पसन्द नहीं करते। उनकी सोच है कि दुनिया में बिना स्वार्थ के कोई किसी के लिए कुछ नहीं करता। उनके विचार से निःस्वार्थ सेवा जैसी कोई चीज़ नहीं होती। कोई उनके लिए कुछ करता है तो वह तुरन्त उसका मूल्य चुकाने की कोशिश करते हैं। एक बार उनके ऑफिस का चपरासी महेश उनके घर अपने गाँव से लायी मटर दे गया था। वीरेन्द्र जी ने तुरन्त मटर का मूल्य महेश के हाथों में ज़बरदस्ती खोंस दिया था। उनके इस आचरण से महेश का मुँह छोटा हो गया था। अपनी श्रद्धा का मूल्यांकन उसे दुखी कर गया था, लेकिन वीरेन्द्र जी ने उसे उचित समझा था।

वीरेन्द्र जी घूमने-घामने के शौकीन हैं। देश के ज़्यादातर महत्वपूर्ण स्थानों को देख चुके हैं। पत्नी के साथ सिंगापुर और जापान भी हो आये हैं। उनका सोचना है कि जब तक हाथ-पाँव चलते हैं, दुनिया का लुत्फ़ ले लेना चाहिए। साल में पत्नी के साथ कहीं न कहीं का चक्कर लगा आते हैं।

वे मुहल्ले के ‘लाफ्टर क्लब’ के भी सदस्य बन गये हैं। पार्क में दस-पंद्रह बुज़ुर्ग इकट्ठे होकर पहले झूठी और फिर एक दूसरे की हँसी देख कर सच्ची हँसी हँस लेते हैं। आसपास की इमारतों की महिलाएँ इनकी झूठी-सच्ची हँसी देखकर आनन्दित हो लेती हैं।

ऐसे ही वीरेन्द्र जी के रिटायरमेंट के तीन चार साल गुज़र गए। स्वास्थ्य के मामले में वह हमेशा ‘फिट’ रहे थे और इस बात का उन्हें गर्व भी रहा था। नौकरी के आख़िरी दिनों में कुछ ‘ब्लड प्रेशर’ की शिकायत ज़रूर हुई थी। तब से नियमित रूप से ‘ब्लड प्रेशर’ की दवा लेते थे।

एक दिन वीरेन्द्र जी पत्नी के साथ बैंक गये थे। काम करके सीढ़ी से उतरने लगे कि अचानक लगा दुनिया घूम रही है। रेलिंग पकड़कर अपने को सँभाला, फिर वहीं सीढ़ी पर बैठ गये। पत्नी घबरायी। फोन करके बेटे को बुलाया। वह कार लेकर आया और दोनों को घर ले गया। वीरेन्द्र जी को पलंग पर लिटा दिया। थोड़ी देर में तबियत कुछ सँभली तो पास ही के अस्पताल ले गया। डॉक्टर ने जाँच की, फिर बोला, ‘भर्ती करा दीजिए।चौबीस घंटे ऑब्ज़र्वेशन में रखना पड़ेगा। अभी ब्लड प्रेशर बढ़ा हुआ है। आराम ज़रूरी है।’

वीरेन्द्र जी अस्पताल में भर्ती हो गये। पहली बार अस्पताल की ज़िन्दगी का अनुभव हुआ। वहाँ के कर्मचारियों और डॉक्टरों को तटस्थ और मशीनी ढंग से काम करते देखा। देखा कि कैसे यहाँ आकर जीवन और मृत्यु के बीच का फर्क धूमिल हो जाता है। वीरेन्द्र जी को वहाँ चौबीस घंटे में बहुत कुछ सीखने-समझने को मिला।

चौबीस घंटे में वीरेन्द्र जी के अनगिनत ‘टेस्ट’ हो गये। कई विशेषज्ञ उनकी जाँच पड़ताल कर गये। दूसरे दिन शाम को अस्पताल से उनकी छुट्टी हो गई। डॉक्टर ने कहा, ‘ब्लड प्रेशर में फ्लक्चुएशन होता है। अभी कोई खास वजह समझ में नहीं आयी। दवाएँ लिख दी हैं। एक हफ्ते बाद फिर बताइए।’

दो दिन में ही करीब आठ हज़ार का बिल बन गया। वीरेन्द्र जी ने बेटे को अपना एटीएम कार्ड दिया,कहा, ‘निकाल कर जमा कर देना।’

बेटा बोला, ‘मैंने जमा कर दिया है। अभी आप इसे रखिए।’ वीरेन्द्र जी ने सकुचते हुए कार्ड रख लिया।

घर आकर वीरेन्द्र जी ने फिर कार्ड बेटे की तरफ बढ़ाया। बेटे ने कहा, ‘आप थोड़ा ठीक हो जाइए, फिर देख लेंगे।’

ऑस्ट्रेलिया से बड़े बेटे का फोन आया। कहा, ‘पैसे की दिक्कत हो तो बताएँ। भेज दूँगा।’ बेटी के फोन हर चार छः घंटे में आते रहे, कभी कैफियत लेने के लिए तो कभी हिदायत देने के लिए।

तीन चार दिन के आराम के बाद वीरेन्द्र जी ने बाहर निकलने की सोची। सबेरे पत्नी को लेकर घूमने निकले, लेकिन धीरे धीरे, अपने को टटोलते हुए चले। मन में कहीं डर बैठ गया था, आत्मविश्वास दरक गया था।

लौटे तो पलंग पर लेटे बड़ी देर तक सोचते रहे। आदमी और परिवार के बारे में उनकी मान्यताएँ कमज़ोर पड़ रही थीं। थोड़ी देर बाद बेटे को बुलाया, बोले, ‘शाम को मेरे पास बैठना। अपने बैंक एकाउंट और फिक्स्ड डिपाज़िट्स वगैरः के बारे में तुम्हें जानकारी दे दूँगा। तबियत का कोई भरोसा नहीं है, पता नहीं कब फिर से बिगड़ जाए।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 136 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media# 136 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 136) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 136  ?

☆☆☆☆☆

☆ Betrayal 

हिसाब में कच्चा होना भी

बड़ा दगा दे गया मुझे,

उसने मुझे ज़रा सा चाहा पर मैंने

खुद को पूरा दे दिया उसे…!

☆☆

Weakness in calculations

too betrayed me a lot…

She loved me a bit, but I gave

myself completely to her….!

☆☆☆☆

Life 

आप आए ज़िंदगी में, कुछ देर

ठहरे और फिर रवाना हो गए,

ज़िंदगी भी क्या है मुसाफिरों का

एक चंदरोज़ा ठिकाना ही तो है…

☆☆

You came into life, stayed

for a while and then left,

What’s life afterall, it’s only

a sojourn for the travelers…!

 ☆☆☆☆☆

Betrayal…
Painting credit: Captain Pravin Raghuvanshi
Medium: Oil colours on Oil paper

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 187 ☆ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 187 ☆ देह न बारम्बार ?

हमारे परिसर में मेट्रो ट्रेन का काम चल रहा है। इसके चलते घर लौटने के लिए एक किलोमीटर आगे जाकर एक पुलिया के अंडरपास से यू-टर्न लेना पड़ता है। यहाँ पास में कुछ मांसाहारी ढाबे हैं जो प्राणियों के अवशेष पुलिया के पास ही फेंक देते हैं। कौवों का हुजूम इन अवशेषों को लेकर यहाँ-वहाँ बैठा होता है और मारे दुर्गंध के उस मार्ग से निकलना कठिन होता है।

प्राणियों के अवशेष जीवन की क्षणभंगुरता का चित्र सामने खड़ा करते हैं। साथ ही चिंतन में विचार उठता है कि प्राण है तो ही देह सुगंधित है। चेतन तत्व का वास है तभी जीवन में सुवास है। अनित्य में नित्य है तो शरीर शेष है अन्यथा सब अवशेष है। इसे जीवन के विस्तृत क्षितिज पर देखें तो पाएँगे कि मनुष्य देह, आत्मा की यात्रा को सार्थक करने का साधन है।

विचार किया जाना चाहिए कि हम इस देहावधि को कैसे बिता रहे हैं? निरंतर दूसरों की आलोचना में व्यस्त रह कर…? दूसरों की प्रगति से कुढ़कर…? सदा कटु भाषा का प्रयोग करके…? वर्गभेद द्वारा…? वर्णभेद द्वारा…? स्त्री-पुरुष में अंतर करके…? आभासी या बनावटी जीवन जीकर…? आत्ममुग्धता का शिकार होकर.. ? ‘मैं और मेरा’ तक सीमित रह कर.. ? ये सारे तो कुछ लोकप्रिय (!) तरीके भर हैं जीने के। बाकी कटु सत्य तो यह है कि ‘मुंडे मुंडे मतिर्भिन्ना’ के बाद भी अधिकांश जन अपने तक सीमित होकर जीने के मामले में अभिन्न हैं।

कबीर ने लिखा है,

दुर्लभ मानुष जनम है, देह न बारम्बार,

तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार।

दुर्लभ मनुष्य जीवन स्वर्ग (आनंद) और नर्क (विषाद) के बीच  मील का पत्थर है। ऊर्ध्वाधर यात्रा आनंद की ओर ले जाएगी। विरुद्ध दिशा में चले तो विषाद तक पहुँचेंगे।

वस्तुत: देह से मनुष्य होना एक बात है, आचरण से मनुष्य बनना दूसरी। पहली से दूसरी की यात्रा में जीवन का उत्कर्ष छिपा है। इस यात्रा पर अपनी एक रचना स्मरण हो आती है,

यात्रा में संचित होते जाते हैं शून्य,

कभी छोटे, कभी विशाल,

कभी स्मित, कभी विकराल,

विकल्प लागू होते हैं,

सिक्के के दो पहलू होते हैं,

सारे शून्य मिलकर ब्लैकहोल हो जाएँ

और गड़प जाएँ अस्तित्व,

या मथे जा सकें सभी निर्वात एकसाथ

पाएँ गर्भाधान नव कल्पित,

स्मरण रहे,

शून्य मथने से ही उमगा था ब्रह्मांड

और सिरजा था ब्रह्मा का निमित्त,

आदि या इति, स्रष्टा या सृष्टि

अपना निर्णय, अपने हाथ

अपना अस्तित्व, अपने साथ..!

उर्ध्वाधर या रसातल, चुनाव क्या होगा?  वैसे बिरला ही होगा जो अमृत और हलाहल में अंतर न कर सके।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

💥 अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक 💥

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ लेटलतीफ़ आफ़ताब… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “लेटलतीफ़ आफ़ताब”।)  

? अभी अभी ⇒ लेटलतीफ़ आफ़ताब? श्री प्रदीप शर्मा  ? 

हमारी पाँचवीं क्लास के सहपाठी  का आफ़ताब नाम उसके माता-पिता ने यही सोचकर रखा होगा, कि  बड़ा होकर वह उनका नाम रोशन करेगा ! कड़कती ठंड में स्कूल जाना, किसी दंड से कम नहीं ! वह समय , समय की पाबंदी और अनुशासन का था।।आफ़ताब कक्षा में सबसे आख़िर में आने वाला छात्र था।

भरी क्लास के बीच दरवाज़े पर आहट होती थी ! मास्टरजी बिना देखे ही कह उठते थे, लो आफ़ताब आ गया। आफ़ताब सिर्फ बिस्तर से उठकर आता था, जागकर नहीं आता था। मास्टरजी की छड़ी बचपन में ही उसकी हथेलियां गर्म करती थी और फिर आफ़ताब मुर्गा बना दिया जाता था। बीच बीच में मास्टरजी पढ़ाते-पढ़ाते बेंत से मुर्गे की ऊँचाई नाप लिया करते थे। जब वह पूरी तरह जाग जाता, उसे फिर इंसान बनाकर क्लास में बैठने दिया जाता।।

तब तक हमारे लिए आफ़ताब भी केवल एक नाम ही था। भला हो फ़िल्म चौदहवीं के चाँद का, जिसके एक गाने में चौदहवीं के चाँद के साथ आफ़ताब का भी ज़िक्र हुआ है। हम भी जान गए, हमारा आफ़ताब ठंड में देरी से स्कूल क्यूँ आता था।

जो सूरज गर्मी में ज़ल्दी उगता है, देर शाम तक आसमान में बना रहता है, और जहाँ भरी दोपहर में  लोग सर पर छांव तलाश करते नज़र आते हैं, वही सूरज ठंड में ठिठुरता हुआ उदय होता है। बादलों की रजाई से अलसाया सा मुँह निकालता है। बच्चे ललचाई आँखों से उनींदे सूरज को देखते हुए बस में चढ़ जाते हैं। हर मज़दूर, किसान, पशु-पक्षी की निगाह धूप पर रहती है। सुबह की धूप का स्नान किसी कुंभ-स्नान से कम पुण्य देने वाला नहीं होता।।

किसी स्कूल मास्टर की हिम्मत नहीं, कड़कती ठंड में लेट लतीफ आसमान के आफ़ताब को मुर्गा बनाए। आस्तिक हो या नास्तिक, सुबह सूरज की ओर मुंह कर ही लेता है। किसी के अहसान का शुक्रिया अदा करना, किसी इबादत से कम नहीं। सुबह की धूप और प्याले की चाय की गर्मी क्या किसी जन्नत के मज़े से कम है।

शाम होते होते सूरज अपने दफ़्तर को समेट लेता है। गर्मी में शाम के सात बजे तक ड्यूटी बजाने वाले मिस्टर दिवाकर, पाँच बजे ही घड़ी दिखाकर लाइट्स ऑफ करने लग जाते हैं। लोग भी मज़बूरी में गर्म कपड़ों में खुद को समेटकर आदित्य को गुड नाईट कह देते हैं।।

जितनी ठंड बढ़ती जाएगी, सूर्य देवता के भाव बढ़ते जाएँगे ! उगते सूरज को ठंड में सलाम और गर्मी में सूर्य-नमस्कार किया जाता है। अमीर-गरीब, जानवर-इंसान को आसमान की छत के नीचे, कड़कती ठंड में, अगर कोई एक साथ लाता है, वह यही आफ़ताब है। इसकी कुनकुनी धूप में धरती माता की गोद कितनी प्यारी लगती है। इसे आप इंसानियत का धूप-स्नान भी कह सकते हैं।

ठंड की यह धूप ही वास्तविक कुंभ-स्नान है, जहाँ सुबह चौराहों पर स्कूल के बच्चे, चौकीदारों के द्वारा जलाए गए अलावों में हाथ तापते, अपनी स्कूल-बसों का इंतज़ार करते हैं। कोई कुत्ता भी वहाँ आकर धूप सेंकने के लिए सट जाता है। यह इंसानियत की आँच किसी अनजान राहगीर को अपने से अलग नहीं करती। सड़क पर किसी अनजान व्यक्ति के साथ धूप सेंकना हमारे अहंकार और अस्मिता को गला देता है। धूप स्नान ही कुम्भ का स्नान है। एक जलता अलाव किसी मज़हब को, किसी चुनावी नारे को नहीं पहचानता।।

केवल जिस्मों तक ही नहीं, रूह तक पहुँच है आफ़ताब की उस किरन की

ये सुबह, ये ठंडी हवाएँ

आओ अलाव जलाकर,

सुबह के नाश्ते में धूप खाकर

हम आज ठंड मिटाएँ।।

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 135 ☆ सॉनेट – हृदय गगरिया… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित  “सॉनेट – हृदय गगरिया”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 135 ☆ 

☆ सॉनेट – हृदय गगरिया ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

हृदय गगरिया रीती है प्रभु!

नेह नर्मदा जल छलकाओ।

जो बीती सो बीत गई विभु!

नैन नैन से तनिक मिलाओ।।

राम सिया में, सिया राम में।

अंतर अंतर बिसरा हेरे।

तुम्हीं समाए सकल धाम में।।

श्वास-श्वास तुमको हरि टेरे।।

कष्ट कंकरी मारे कान्हा।

राग-द्वेष की मटकी फोड़े।।

सद्भावों सँग रास रचाए।

भगति जसोदा तनिक न छोड़े।।

चित्र गुप्त जो प्रकट करो प्रभु।

चित्र गुप्त कर शरण धरो प्रभु।।

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१८-४-२०२२, जबलपुर

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ साहित्य की दुनिया ☆ प्रस्तुति – श्री कमलेश भारतीय ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹 साहित्य की दुनिया – श्री कमलेश भारतीय  🌹

(साहित्य की अपनी दुनिया है जिसका अपना ही जादू है। देश भर में अब कितने ही लिटरेरी फेस्टिवल / पुस्तक मेले / साहित्यिक एवं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किये जाने लगे हैं । यह बहुत ही स्वागत् योग्य है । हर सप्ताह आपको इन गतिविधियों की जानकारी देने की कोशिश ही है – साहित्य की दुनिया)

☆ राजकीय पत्रिकाओं का योगदान कितना ?

देश भर में राजकीय साहित्यिक पत्रिकाओं का प्रकाशन लम्बे समय से हो रहा है। हरियाणा साहित्य अकादमी की हरिगंधा, हिमाचल से हिमप्रस्थ और गिरिराज साप्ताहिक, जम्मू कश्मीर से शिराजा, उत्तर प्रदेश सरकार की उत्तरप्रदेश, राजस्थान साहित्य अकादमी की मधुमति, दिल्ली से इंद्रप्रस्थ भारती, साहित्य अकादमी की समकालीन भारतीय साहित्य, पंजाब के भाषा विभाग से पंजाब सौरभ आदि पत्रिकायें मेरे ध्यान में हैं। इनके अतिरिक्त भी हो सकती हैं। इन पत्रिकाओं में हिमप्रस्थ और शीराजा ने तो विशेषांक भी दिये हैं और हरिगंधा भी महिला विशेषांक नियमित हर वर्ष मार्च माह में प्रकाशित करता है। समकालीन भारतीय साहित्य का तो हर अंक ही विशेषांक के समान होता है। इसी प्रकार केंद्र सरकार की ओर से आजकल भी एक चर्चित पत्रिका है। इसके बावजूद अनेक राजकीय पत्रिकायें लेखकों को दिये जाने वाले पारिश्रमिक से ही वार्षिक शुल्क काटने की पेशकश करती हैं और इस तरह इनकी सर्कुलेशन चलती रहती है जिसे अधिकांश लेखक पसंद तो नहीं करते लेकिन कुछ कह भी नहीं सकते ! क्या इस पर पुनर्विचार की आवश्यकता नहीं ? इन पत्रिकाओं के प्रचार-प्रसार पर अलग से योजना बनाई जानी चाहिए। यह मेरा विचार है। यह मेरा अनुभव भी है जिन दिनों हरियाणा ग्रंथ अकादमी के उपाध्यक्ष के रूप में जिम्मेवारी मिली और कथा समय मासिक पत्रिका प्रकाशित की। तब इस परंपरा से कुछेक लेखकों ने जब इस तरह शुल्क काटने पर विरोध किया एक लेखक होने के नाते तब मुझे इसकी गंभीरता पता चली। दूसरे इन पत्रिकाओं का निरंतर चर्चा होना चाहिए। बुक स्टाॅल्ज पर रखी जानी चाहिएं। कुछ पत्रिकायें उपलब्ध हैं और बिक्री भी होती है। फिर भी और प्रयास किये जाने चाहिएं।

हिसार में चुपके चुपके महकी गजल :  पाठक मंच की ओर से गीत गजल का कार्यक्रम करवाया गया जिसमें गजल महकी और वह भी चुपके चुपके ! प्रसिद्ध गजल गायक व हिसार के ही मूल निवासी सुशील चावला, राजेश राजपालईशा खन्ना ने अपनी अपनी प्रस्तुतियां  देकर समां बांध दिया जबकि ये रिश्ता क्या कहलाता है, दिल दियां गल्लां, सास बिना ससुराल जैसे लोकप्रिय धारावाहिकों की लेखिका मुनीष राजपाल ने अपनी लेखन कला व रंगमंच के सफर की शानदार जानकारी दी। सुशील चावला और मुनीषराजेश राजपाल संयोगवश शहर में थे और उन्हें पाठक मंच ने आमंत्रित कर लिया। कार्यक्रम की मुख्यातिथि प्रसिद्ध समाज सेविका पंकज संधीर थीं और उन्होंने कहा कि इस छोटे से कार्यक्रम ने मुझे बहुत ताजगी प्रदान की है और उन्हें यह भी खुशी है कि हिसार के कलाकार मुम्बई में अपनी पहचान ही नहीं बना रहे बल्कि मजबूती से कदम जमा रहे हैं। यह भी खुशी की बात है कि सीनियर माॅडल स्कूल के दो छात्र सुशील चावला और राजेश राजपाल ने कला क्षेत्र में कितना सफर तय कर लिया है। इनके प्रोजेक्ट में भी सहयोग देने का विश्वास दिलाया।

सुशील चावला ने चुपके चुपके रात दिन, मांयें नी मेरिये, चम्बा कितनी कू दूर, मैंनू तेरा शबाब लै बैठा, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला आदि विभिन्न रंग के गीत व गजल आदि सुनाये और वाह-वाह लूटी। इसी प्रकार डाॅ ईशा खन्ना ने उमराव जान की लोकप्रिय गजल -इन आखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं और आज जाने की जिद्द न करो जैसे बहुत कर्णप्रिय गीत/गजल प्रस्तुत किये। इसी प्रकार राजेश राजपाल ने आने वाला पल जाने वाला है गाकर सबको आनंदित कर दिया। राजेश राजपाल मुम्बई में फिल्म महोत्सव सीरियल निर्देशक हैं। इस अवसर पर अमरनाथ प्रसाद, पूनम चावला, राकेश मलिक, रश्मि, नीलम सुंडा, गीतकार सतीश कौशिक, नीलम भारती आदि मौजूद थे।

शुभतारिका के दो विशेषांक : हरियाणा के अम्बाला छावनी से पिछले पचास वर्ष से प्रकाशित हो रही मासिक पत्रिका शुभतारिका ने दो विशेषांकों की घोषणा की है – व्यंग्य विशेषांक और लघुकथा विशेषांक। सबसे दिलचस्प बात यह है कि संभवतः अकेली शुभतारिका ऐसी पत्रिका है जिसकी ओर से छठवाँ लघुकथा विशेषांक प्रकाशित किये जाने की घोषणा की गयी है। यह बहुत ही सराहनीय है।

विजय को सम्मान : दिल्ली के रंगकर्मी विजय को पुणे की संस्था ने रंगकर्म के क्षेत्र में किये गये योगदान के लिये सम्मानित किया है। बधाई

साभार – श्री कमलेश भारतीय, पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क – 1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

(आदरणीय श्री कमलेश भारतीय जी द्वारा साहित्य की दुनिया के कुछ समाचार एवं गतिविधियां आप सभी प्रबुद्ध पाठकों तक पहुँचाने का सामयिक एवं सकारात्मक प्रयास। विभिन्न नगरों / महानगरों की विशिष्ट साहित्यिक गतिविधियों को आप तक पहुँचाने के लिए ई-अभिव्यक्ति कटिबद्ध है।)  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print