मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

बहिणी…..​​

दुःख  वाटून घेणाऱ्या…. सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या …. सल्ला घेणाऱ्या 

खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या 

आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या 

स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणाऱ्या 

शाबासकीची पहिली थाप पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

 

​​बहिणी ….. 

आयुष्याला मिळालेलं एक वरदान.

जागेपणीचं स्वप्न छान …. पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान

मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर

हळुवार हात पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर

 

​​बहिणी ….. 

गातात नाचतात, खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम.

त्या सुगरण असोत  नसोत…. प्रत्येक  घास वाटतो अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती… लहान थोर… शहर गाव.

बहीण असते एक सरिता ….. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी……. 

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

Image result for पुत्रकामेष्टि अनिल बर्वे

पुस्तकाचे नाव – पुत्रकामेष्टी (नाटक)

लेखक – श्री अनिल बर्वे

पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठे – ८०

मूल्य – १२ रुपये

अमेज़न लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

फ्लिपकार्ट लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

 

पुत्रकामेष्टी (नाटक) – (एक आस्वादन)

पुत्रकामेष्टी हे अनिल बर्वे यांचं भन्नाट नाटक. मर्मस्पर्शी. मर्मस्पर्शी की मर्मभेदी ? बी.के. मोठ्या इंडस्ट्रीचा मालक. आहे. त्याचं आपल्या पत्नीवर, उर्मिलावर निरातीशय प्रेम आहे. पैशाने विकत घेता येणारी सारी सुखे त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहेत. पैशाने विकत घेता न येणारे सुख म्हणजे आपत्यप्राप्ती. ते मात्र त्यांच्याकडे नाही. त्यासाठी उर्मिला वेडी-पिशी झालेली आहे. मूल न होण्याचं कारण? हनीमूनच्या वेळी त्यांच्या गाडीला झालेला अपघात आणि त्याचा परिणाम म्हणजे उर्मिलाचं गर्भाशय काढावं लागणं. ती बी.के.च्या मागे लागते की त्याने घटस्फोट घ्यावा आणि दुसरं लग्नं करावं. बी.के.ला ते मान्य नाही. तो उपाय सुचवतो, आंनाथश्रमातून मूल दत्तक घ्यावं, पण ते उर्मिलाला मान्य नाही. तिला बी.के.चं स्वत:चं मूल हवय. त्यासाठी उर्मिला उपाय सुचवते, एखाद्या वेश्येचा उपयोग करायचा. म्हणजे आपत्यप्राप्ती  हेही सुख पैशाने मिळवता येईल, याबद्दल तिला खात्री आहे. ती म्हणते, ‘थोड्याशा पैशासाठी वेश्या रात्रीपुरतं शरीर भाड्याने देते. आपण दीड-दोन वर्षांसाठी तिला भाड्याने घ्यायचं. ह्युमन इनक्युबेटर. तिच्या गर्भाशयात आपलं मूल वाढवायचं.’ ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायचे. हा सौदा झाला. आपल्या इच्छेने ते तिच्या गर्भाशयात वाढेल.

बी. के. ला अर्थातच हे मान्य नाही. पण राजा युक्तिवाद करत, बी. के. ला हे मान्य करायला लावतो. राजा हा बी. के. इंडस्ट्रीचा लीगल अॅकडव्हायझर. त्या दोघांचा मित्र. उर्मिलाचा मानलेला भाऊ. तो एखाद्या अस्तरासारखा त्यांच्या आयुष्याला चिकटून आहे. नाटकात त्याची भूमिका बी. के.च्या पर्सनल अॅथडव्हायझरची. राजा आणि बी. के. अशा वेश्येचा शोध घेतात. तिथे त्यांची गाठ पडते. छंदिता… छंदाशी आणि इथे त्रिकोणाचा तिसरा बिंदू अवतीर्ण होतो.

छंदिताशी बोलण्यातून पुढे कळत जातं, ती मुरळी आहे. दहाव्या वर्षीच तिच्या आई-वडलांनी तिचे खंडोबाशी लग्नं लावून दिले आहे आणि तेव्हापासून तिला धंद्याला लावले आहे. बी. के. तिला स्पष्टच सांगतो, त्याला तिच्यापासून मूल हवे आहे. त्यासाठी तो वाटेल तितके पैसे तिला द्यायला तयार आहे, पण तिने मुलावर कोणताच हक्क सांगता कामा नये. दोन लाख रुपयांच्या बदल्यात ती हे काम करायला खुशीने तयार होते.

बी.के.आणि राजा छंदिताला घेऊन पाचगणीला येतात. इथे पाहुणीच्या सोबतीसाठी आणि लक्ष ठेवायला बहाद्दूर आणि माळीण आहे. उर्मीलाही इथेच येऊन रहाते. बी.के. ला झालेलं मूल उर्मिलाचं आहे, असं जगाला भासवायचय म्हणून तो तिचं  बाळंतपण स्वित्झर्लंडला करायचं ठरवतो. छंदाला सहा महीने होतात. बाळ पोटात गडबड करू लागतं आणि छंदाचं ममत्व एकदम जागं होतं. तिच्या स्वभावात , विचारात बदल होतो. बी. के. च्या इच्छेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे ती केवळ मानवी इनक्युबेटर रहात नाही. तिच्या भावना, तिचं वात्सल्य जागृत होतं. बाळ दोन माहिन्याचं होतं. बी.के. तिला हाकलून देतो. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी ती कोर्टात जाते. एरवी बी.के.ची सतत पाठराखण करणारा राजा इथे मात्र वकील म्हणून छंदीताच्या बाजूने उभा आहे. प्रेक्षकच न्यायाधीश आहेत. निकाल छंदाच्या बाजूने लागतो. ती मुलाला घेऊन जाऊ लागते. म्हातार्यान माळिणीला मात्र वाटतं, असे गुंते कोर्टात सुटत नाहीत. एका झाडाचं कलम दुसर्याा झाडावर करायचं, तर ते हलक्या हाताने, मायेने करायला हवं. ती छंदिताशी बोलते. तिच्या बोलण्यातून छंदिताला जाणवतं, बाळाला चांगल्या रीतीने वाढवणं, त्याचं नीट पालन-पोषण करणं कसं अवघड आहे, नव्हे अशक्य आहे. ती बाळाला ठेवून जाते. उर्मिलाने दिलेले दोन लाख रुपयेही ठेवून जाते. बी.के. शक्तिपात झाल्यासारखा कोचावर बसतो आणि ओक्साबोक्षी रडू लागतो. नाटक संपते.

नाटक शोकांत आहे, पण यात रूढार्थाने कुणी खलनायक वा खलनायिका नाही. असलीच तर नियती खलनायिका आहे. सार्या  शोकांतिकेचे मूळ उर्मिलेच्या मुलाविषयीच्या असोशीतव आहे. तिला मूल हवाय, पण ते अनाथाश्रमातलं नकोय. त्याचे कारणही तिच्या बालपणीच्या आठवणीत आहे. राजा तिला सख्खा भाऊ वाटत असतो, पीएन राजाला जेव्हा कळतं की तो आश्रित आहे. तेव्हा त्याचं वागणं एकदम बदलतं आणि तो ‘मानलेला’ भाऊ होतो. तिला वाटतं दत्तक मुलाला मोठा झाल्यावर वस्तूशिती कळली आणि तोही असाच बदलला तर? म्हणून तिला ते नकोय. ती आग्रह धरते, कुणा वेश्येचा यासाठी वापर करावा. ह्युमन इनक्यूबेटर. त्याप्रमाणे छंदीता ही वेश्या दोन लाख रुपयाच्या मोबदल्यातत्या घराण्याला वारस द्यायचं कबूल करते. पुढे तिला दिवस रहातात.

एकदा घरातली वयस्क माळीण, उर्मिला आणि छंदीता बोलत असतात. बोलता बोलता माळीण म्हणते,’ निपुत्रिक होता म्हणून राजा दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला… तुम्हीदेखील असाच यज्ञ करताय ग… अग यज्ञ करायचा झाला, म्हणजे हवन करावं लागतं. बळी द्यावा लागतो. … तुम्ही तिघंही गुणी लेकरं ग. … तुमच्यापैकी कुणाचा बळी जाणार, काळजी वाटते. भीती वाटते मनाला.’ तिचं बोलणं म्हणजे भविष्यातील घटनेचं सूचनाच आहे.

यातील व्यक्तिरेखा लेखकाने अतिशय कुशलतेने विकसित केल्या आहेत. बी. के. मोठा उद्योगपती. धांनवंत. यशवंत. त्याचे उर्मिलेवर हिरातीशय प्रेमाहे. तो व्यवहारीही आहे. उर्मिला मुलासाठी वेदी-पिशी झालेली आहे. ती वेद लागण्याची सीमा गाठू शकते, हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो तिचा अव्यवहार्य हट्ट पुरवतो. छंदिताला तो मानवी इनक्यूबेटर मानतो. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, कणव आहे, हे त्याच्या वेळोवेळी बोलण्यातून जाणवतं, पण त्याला तिची भावनिक गुंतवणूक नकोय. ती मुलाचा ताबा द्यायला नकार देते, तेव्हा तो तिच्याबद्दल अतिशय जहरी उद्गार काढतो. रांड, बाजारबसवी, हरामजाडी… वगैरे.. वगैरे… जेव्हा त्याला कळतं, ती मुलाला ठेवून गेलीय, पैसेही न घेता गेलीय, तेव्हा तो पराभूत होतो. कोचावर बसतो आणि ओक्साबोक्शी रडू लागतो.

उर्मिलेचे बी. के. वर अतिशय प्रेम आहे. ती सरळ स्वभावाची आहे. छंदिताशी ती माणुसकीने, मायेने वागते. राजा कंपनीचा लीगल अॅहडव्हायजर. तो बी.के. आणि उर्मिलेच्या जीवनाला अस्तरासारखा चिकटलेला आहे. वृद्धा माळीणीने जग पाहिलाय. ती शहाणपणाचं बोलते.

नाटकातले संवाद मोठे रेखीव आणि नेटके आहे. जी ती पात्रे आपापल्या भाषेत बोलतात, लेखकाच्या भाषेत नाही.   छंदिताला मुलाचा ताबा मिळालाय आणि ती घर सोडून निघालीय.  आता माळीणाबाई आणि तिच्यातला संवाद बघा-

माळीण- छंदा पोरी, चांगलं झाला हो…तुला तुझं बाळ मिळालं. पण बाळाचं घर गेलं ग…   बाळाचं घर गेलं. कुठं जाणार तू आता? … पुन्हा कोठयात?

छंदा- नाय

माळीण- नकोच जाऊस हो. नकोच जाऊस. कोणत्याही पोराला ‘रांडेचा’ म्हटलेलं आवडायचं नाही. … मग जाणार कुठे तू आता?

छंदा – देवाच्या जगात कुठेही.

माळीण- जग देवाचंच ग .. पण देव दगडाचा … उखाण्यात सांगायला गोड वाटतं… आभाळाचं  छ्प्पर! पण त्याच्याखाली राहाता येत नाही हो. राहाता येत असतं, तर टिनाची छपरं कशाला बांधली असती माणसांनी? ( छंदा निरुत्तर ) कामधंदा काय करणार?

छंदा – कुठं तरी मोलमजुरी

माळीण- चांगली हो. घामाची कष्टाची भाकरी खूप चांगली. पण छंदा पोरी… घाम गाळून  पोटापुरती भाकरी भाकरी मिळेल, बाळापुरतं दूध नाही मिळणार. … दूध खूप महाग असतं. तू असं कर. … भाताची पेज देत जा त्याला….

छंदा – अं?

माळीण- आता भाताच्या पेजेत दुधाचं बाळसं कुठलं असायला? बाळ हडकेल जरासा. .. पण जीवंत राहील हो. जीवंत राहील.

राजाने कोर्टात केलेले भाषण म्हणजे तर मास्टर पीस म्हणावा लागेल. भावी काळात निर्माण होऊ शकणार्यान समस्येकडे तो संकेत करतो. छंदीताने 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात मानवी टेस्ट ट्यूब म्हणून काम कारायचे, बी. के. च्या मुलाला जन्म द्यायचे कबूल केलेले असते. पण नंतर ती त्या मुळावर हक्क सांगते. राजा म्हणतो, ‘भावी काळात टेस्ट ट्यूबचा प्रयोग यशस्वी झाला, तर निर्जीव टेस्टट्यूबज तुमच्यापुढे तुमच्यापुढे येणार नाहीत. मग?

मग न्यायाधीश महाराज त्या टेस्टट्यूबजचा वापर फक्त बी.के. ऊर्मिला सारखी निपुत्रिक जोडपीच वात्सल्यपूर्तीसाथी करणार नाहीत…. तर प्रत्येक चांगल्या शोधाचा स्वार्थासाठी दुरुपयोग करणार्याा दुष्टशक्तींचाही वापर करतील स्मगलर, गुंड, व्यापारी, सावकार, जमीनदार… तरुण मुला-मुलींकडून रक्त विकत घेतल्याप्रमाणे त्यांची बीजं विकत घेतील. टेस्टट्यूबमधून मुलं काढतील… ज्या मुलांना नसेल आई.. नसेल बाप… असेल फक्त मालक! गुलामांच्या पिढ्यांच्या पिढ्या तयार होतील.’

भावी अनर्थाचे अंगावर शहारा उमटवणारे भीषण चित्र तो पुढे उभे करतो.

तो म्हणतो, ‘मूल विकत घेतलं काय आणि मुलाला जन्म देणारी आई भाड्याने घेतली काय, या व्यवहारात खरदी-विक्री अंतर्भूत आहेच.’

न्यायाधीशाने कोणताही निर्णय दिला तरी तो क्रूरच असणार आहे. राजा म्हणतो, ‘तरीपण असा क्रूर निर्णय द्या – फक्त यांच्याताला कोणीही बळी जावो… पुढल्या पिढ्या बळी जाणार नाहीत…. समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नाही.’

निर्णय होतो. मुलाचा ताबा छंदाला मिळतो. वैयक्तिक समस्येपासून सुरू झालेलं नाटक एका अनर्थ करू शकणार्यार विलक्षण आशा सामाजिक समस्येचं सूचन करतं. प्रेक्षक – वाचक यात गुंतत जातो. 

अगदी आवर्जून बघावं निदान वाचावं असं आहे ‘पुत्रकामेष्टी’ नाटक.

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #160 ☆ अधूरी ख़्वाहिशें ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख अधूरी ख़्वाहिशें । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 160 ☆

☆ अधूरी ख़्वाहिशें  ☆

‘कुछ ख़्वाहिशों का अधूरा रहना ही ठीक है/ ज़िंदगी जीने की चाहत बनी रहती है।’ गुलज़ार का यह संदेश हमें प्रेरित व ऊर्जस्वित करता है। ख़्वाहिशें उन स्वप्नों की भांति हैं, जिन्हें साकार करने में हम अपनी सारी ज़िंदगी लगा देते हैं। यह हमें जीने का अंदाज़ सिखाती हैं और जीवन-रेखा के समान हैं, जो हमें मंज़िल तक पहुंचाने की राह दर्शाती है। इच्छाओं व ख़्वाहिशों के समाप्त हो जाने पर ज़िंदगी थम-सी जाती है; उल्लास व आनंद समाप्त हो जाता है। इसलिए अब्दुल कलाम जी ने खुली आंखों से स्वप्न देखने का संदेश दिया है। ऐसे सपनों को साकार करने हित हम अपनी पूरी शक्ति लगा देते हैं और वे हमें तब तक चैन से नहीं बैठने देते; जब तक हमें अपनी मंज़िल प्राप्त नहीं हो जाती। भगवद्गीता में भी इच्छाओं पर अंकुश लगाने की बात कही गई है, क्योंकि वे दु:खों का मूल कारण हैं। अर्थशास्त्र  में भी सीमित साधनों द्वारा असीमित इच्छाओं  की पूर्ति को असंभव बताते हुए उन पर नियंत्रण रखने का सुझाव दिया गया है। वैसे भी आवश्यकताओं की पूर्ति तो संभव है; इच्छाओं की नहीं।

इस संदर्भ में मैं यह कहना चाहूंगी कि अपेक्षा व उपेक्षा दोनों मानव के लिए कष्टकारी व उसके विकास में बाधक होते हैं। इसलिए उम्मीद मानव को स्वयं से रखनी चाहिए, दूसरों से नहीं। प्रथम मानव को उन्नति के पथ पर अग्रसर करता है; द्वितीय निराशा के गर्त में धकेल देता है। सो! गुलज़ार की यह सोच भी अत्यंत सार्थक है कि कुछ ख़्वाहिशों का अधूरा रहना ही कारग़र है, क्योंकि वे हमारे जीने का मक़सद बन जाती हैं और हमारा मार्गदर्शन करती हैं। जब तक ख़्वाहिशें ज़िंदा रहती हैं; मानव निरंतर सक्रिय व प्रयत्नशील रहता है और उनके पूरा होने के पश्चात् ही सक़ून प्राप्त करता है।

‘ख़ुद से जीतने की ज़िद्द है/ मुझे ख़ुद को ही हराना है/ मैं भीड़ नहीं हूं दुनिया की/ मेरे अंदर एक ज़माना है।’ जी हां! मानव से जीवन में संघर्ष करने के पश्चात् मील के पत्थर स्थापित करना अपेक्षित है। यह सात्विक भाव है। यदि हम ईर्ष्या-द्वेष को हृदय में धारण कर दूसरों को पराजित करना चाहेंगे, तो हम स्व-पर व राग-द्वेष में उलझ कर रह जाएंगे, जो हमारे पतन का कारण बनेगा। सो! हमें अपने अंतर्मन में स्पर्द्धा भाव को जाग्रत करना होगा और अपनी ख़ुदी को बुलंद करना होगा, ताकि ख़ुदा भी हमसे पूछे कि बता! तेरी रज़ा क्या है? विषम परिस्थितियों में स्वयं को प्रभु-चरणों में समर्पित करना सर्वश्रेष्ठ उपाय है। सो! हमें वर्तमान के महत्व को स्वीकारना होगा, क्योंकि अतीत कभी लौटता नहीं और भविष्य अनिश्चित है। इसलिए हमें साहस व धैर्य का दामन थामे वर्तमान में जीना होगा। इन विषम परिस्थितियों में हमें आत्मविश्वास रूपी धरोहर को थामे रखना है तथा पीछे मुड़कर कभी नहीं देखना है।

संसार में असंभव कुछ भी नहीं। हम वह सब कर सकते हैं, जो हम सोच सकते हैं और हम वह सब सोच सकते हैं; जिसकी हमने आज तक कल्पना नहीं की। कोई भी रास्ता इतना लम्बा नहीं होता; जिसका अंत न हो। मानव की संगति अच्छी होनी चाहिए और उसे ‘रास्ते बदलो, मुक़ाम नहीं’ में विश्वास रखना चाहिए, क्योंकि पेड़ हमेशा पत्तियां बदलते हैं, जड़ें नहीं। जीवन संघर्ष है और प्रकृति का आमंत्रण है। जो स्वीकारता है, आगे बढ़ जाता है। इसलिए मानव को इस तरह जीना चाहिए, जैसे कल मर जाना है और सीखना इस प्रकार चाहिए, जैसे उसको सदा ज़िंदा रहना है। वैसे भी अच्छी किताबें व अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते; उन्हें पढ़ना पड़ता है। श्रेष्ठता संस्कारों से मिलती है और व्यवहार से सिद्ध होती है। ऊंचाई पर पहुंचते हैं वे लोग जो प्रतिशोध नहीं, परिवर्तन की सोच रखते हैं। परिश्रम सबसे उत्तम गहना व आत्मविश्वास सच्चा साथी है। किसी से धोखा मत कीजिए; न ही प्रतिशोध की भावना को पनपने दीजिए। वैसे भी इंसान इंसान को धोखा नहीं देता, बल्कि वे उम्मीदें धोखा देती हैं, जो हम किसी से करते हैं। जीवन में तुलना का खेल कभी मत खेलें, क्योंकि इस खेल का अंत नहीं है। जहां तुलना की शुरुआत होती है, वहां अपनत्व व आनंद भाव समूल नष्ट हो जाता है।

ऐ मन! मत घबरा/ हौसलों को ज़िंदा रख/ आपदाएं सिर झुकाएंगी/ आकाश को छूने का जज़्बा रख। इसलिए ‘राह को मंज़िल बनाओ,तो कोई बात बने/ ज़िंदगी को ख़ुशी से बिताओ तो कोई बात बने/ राह में फूल भी, कांटे भी, कलियां भी/ सबको हंस के गले से लगाओ, तो कोई बात बने।’ उपरोक्त स्वरचित पंक्तियों द्वारा मानव को निरंतर कर्मशील रहने का संदेश प्रेषित है, क्योंकि हौसलों के जज़्बे के सामने पर्वत भी नत-मस्तक हो जाते हैं। ऐ मानव! अपनी संचित शक्तियों को पहचान, क्योंकि ‘थमती नहीं ज़िंदगी, कभी किसी के बिना/ यह गुज़रती भी नहीं, अपनों के बिना।’ सो! रिश्ते-नातों की अहमियत समझते हुए, विनम्रता से उनसे निबाह करते चलें, ताकि ज़िंदगी निर्बाध गति से चलती रहे और मानव यह कह उठे, ‘अगर देखना है मेरी उड़ान को/ थोड़ा और ऊंचा कर दो मेरी उड़ान को।’

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘नामकरण’… श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Naming…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “~नामकरण~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि – नामकरण ??

हार्ट अटैक…, ब्रेन डेड..,

मृत्यु के

नये-नये नाम गढ़ रहे हम…

सोचता हूँ,

संवेदनशून्यता को

मृत्यु कब घोषित करेंगे हम ?

© संजय भारद्वाज 

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

? ~ Naming ~ ??

Heart attack…, brain dead..,

We’ve been crafting

new names for the death…

I wonder

When will we declare

insensitivity as death…!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चमत्कार ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीर्ष साधना कल सम्पन्न हो गई है🌻

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि –  चमत्कार ??

कल जो बीत गया,

उसका पछतावा व्यर्थ,

संप्रति जो रीत रहा

उसे दो कोई अर्थ,

 

बीज में उर्वरापन

वटवृक्ष प्रस्फुटित करने का,

हर क्षण में अवसर,

चमत्कार उद्घाटित करने का,

 

सौ चोटों के बाद एक वार

प्रस्तर को खंडित कर देता है,

अनवरत प्रयासों से उपजा

एक चमत्कार कायापलट कर देता है,

 

संभावनाओं के बीजों को

कृषक हाथों की प्रतीक्षा निर्निमेष है,

चमत्कारों के अगणित अवसर

सुनो मनुज, अब भी शेष हैं..!

 

© संजय भारद्वाज 

(प्रातः 5:43 बजे 21 जून 2021)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #159 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से \प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है “भावना के दोहे।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 160 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

मोहन राधा से कहे,क्यों बैठी हो मौन।

सोच में किसके डूबती ,बतला दो है कौन।।

🌹

प्यारे तेरे केश हैं,  प्यारे तेरे बोल।

मन मोहन की राधिका,तू तो है अनमोल।।

❤️

मोहन तुझको देखकर, कटते है दिन रात।

तुझ बिन ब्रज सूना लगे, कौन करे अब बात।।

🌹

मोर मुकुट धारण करें, न्यारी छबि के लाल।

तुझे निहारु दरपण से,राधा के गोपाल।।

❤️

सुंदर छबि है आपकी, मन – मोहन का राग।

ओ प्यारे ओ साँवरे, राधा का अनुराग।।

🌹

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #146 ☆ मन पर दोहे ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  “मन पर दोहे। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 146 ☆

☆ मन पर दोहे ☆ श्री संतोष नेमा ☆

तन का राजा मन सदा, जिसके हैं नवरंग

उसके ही आदेश से, करें काम सब अंग

 

मन टूटा तो टूटता, अंदर का विश्वास

रखें सुद्रण मन को सदा, मन से बंधती आस

 

मन चंचल मन वाबरा, मन की गति अंनत

पल में ही वह तय करे, जमी-गगन का अंत

 

जो अंकुश मन पर रखे, मन पर हो असवार

उसका जीवन है सफल, रखे शुद्ध आचार

 

रखें साथ तन के सदा, मन को भी हम साफ

तभी बढेगा जगत में, स्वयं साख का ग्राफ

 

ध्यान योग अभ्यास से,मन पर रखें लगाम

तभी मिलेगी सफलता,बनते बिगड़े काम

 

मन रमता संसार में,मन माया का दास

मन के घोड़े भागते,लेकर लालच,आस

 

दूर करें मन का तिमिर,मन में भरें उजास

रोशन हों सुख-दुख सभी,अंतस प्रभु का वास

 

मन को निर्मल राखिए,कभी जमे नहिं धूल

मन मैला तो कर्म भी,बनें राह के शूल

 

जीवन के सुख-दुख सभी,मन के हैं आधार

छिपे न मन से कुछ कभी,मन के नैन हजार

 

मन के पीछे भागकर,खोएं मत “संतोष”

तभी मिलेगी सफलता, रखें ज्ञान का कोष

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

कवडसा असा

“तो” धावत  येई

सायं-संध्या त्यास

किती, घाई घाई

 

देव्हाऱ्यात देव

भेटता लोळण

चरण स्पर्शूनी

गोड आळवण

 

तेजाळती क्षण

भारावले मन

नेत्र ही दिपले

ओजस हा दिन

 

गवसला सूर

तृप्तीत सुखाचा

सृजन सोहळा

अजब सृष्टीचा

 

“देव” ही हसले

भाग्य उजळले

नतमस्तक मी

निःशब्द बोलले

 

आशीर्वाद मज

द्यावा हो सत्वर

सुख शांती नांदो

इथे निरंतर

 

सेवा कामी तन

सतत झिजावे

इतुकेच आता

मनात ठसावे.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #152 ☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 152 – विजय साहित्य ?

☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

दत्त दत्त कृपा निधी

वेद चारी तुझ्या पदी..

गोमाताही देवगणी

दत्तात्रेय नाम वदी..१

 

गुरुदेवा दिगंबरा

सत्व रज तम मूर्ती..

निजरुपे लीन होऊ

द्यावी चेतना नी स्फूर्ती..२

 

अनुसूया अत्रीऋषी

जन्म दाते त्रैमुर्तीचे..

ब्रम्हा विष्णू आणि हर

तेज आगळे मूर्तीचे..३

 

दत्त दत्त घेता नाम

भय चिंता जाई दूर

लय, स्थिती नी उत्पत्ती

कृपासिंधु येई पूर..४

 

अवधुता गुरू राया

तुझ्या दर्शना आलो‌ मी..

काया वाचा पदी तुझ्या

आनंदात त्या न्हालो मी..५

 

हरी,हर नी ब्रम्हा तू

साक्षात्कारी पालक तू

ज्ञानमूर्ती पीडाहारी

संसाराचा चालक तू..६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदल… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ बदल…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

एका प्रसिद्ध टीव्ही  मालिकेतील नायिका सोज्वळ आहे. जुन्या काळातील नायिकांसारखी ती दोन वेण्या घालते. अलीकडं कोणी वेण्या घालत नाहीत. आंबाडा, एक वेणी या हेअरस्टाईल्स तर कालबाह्य झाल्या आहेत. पॉनिटेल फक्त मध्यमवयीन महिलांनी घातलेला दिसतो. तरूणी, नवयौवना यांच्या हेअरस्टाईलनं क्रांतिकारक बदल केलेला दिसतो. खरं तर या नवयुवती हेअरस्टाईल करतच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या सगळ्या आजकाल केस बांधतच नाहीत. केस मोकळे सोडणं हीच सध्याची फॅशन आहे.

एक काळ असा होता की केस मोकळे सोडणं असभ्य मानलं जाई. आंबाडा, एक वेणी, दोन वेण्या एवढेच पर्याय उपलब्ध असत. पोनीटेल ची फॅशन ही लहान केस असणाऱ्यांसाठी वरदान ठरली. ज्या मुलींचे केस खरोखरच टेल सारखे, शेपटी सारखे लहान होते त्या मुली एक आडवी क्लिप लावून पोनी बांधू लागल्या. मानेच्या नाजूक झटक्यानं ही पोनी डौलदार झोका घेऊ लागली. आकर्षक दिसणं कोणाला नको असतं बरं? ही स्टाईल वेगानं समस्त महिला वर्गानं उचलून धरली. लांब केसांचा आता कंटाळा येऊ लागला. वेळ वाचतो या नावाखाली लहानथोर सगळ्याच महिला पोनी बांधण्यासाठी केसांची लांबी मर्यादित ठेवू लागल्या. वेणी घालणं ही जुनाट फॅशन झाली. काकूबाई स्टाईल म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि काकूबाई म्हणवून घेणं कोणाला चालेल, हो ना?

मधल्या काळात साधना कट, बॉबकट, बॉयकट अशा काही कटस्टाईल्स लोकप्रिय झाल्या. पण त्यांची लोकप्रियता फारशी मोठी नव्हती. बघता बघता हिंदी सिनेमा, टीव्ही मालिकांतील नायिका केस मोकळे सोडून फिरू लागल्या. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी आमच्या मुली, सुना देखील मुक्त केस आणि मुक्त मनानं मोकळ्या ढाकळ्या बिनधास्त जगू लागल्या. स्वच्छता, हायजिन साठी घातलेली बंधनं या मुलींनी झुगारून दिली. घरभर केस पडू नयेत म्हणून एका जागी बसून केस विंचरणं, स्वयंपाक करताना, घरकाम करताना ते बांधून ठेवणं हे नियम जाचक वाटू लागले. मोकळे केस हे मुक्त जगण्याचं, मुक्त विचारांच प्रतीक ठरलं. इथंपर्यंत थोडं ठीक आहे असं वाटतंय तोच कुरळे केस नकोसे वाटू लागले. स्ट्रेट, स्मूथ, सिल्कि केस पसंतीची पावती मिळवू लागले.त्यासाठी महागड्या ट्रिटमेंटस् केल्या जाऊ लागल्या. पण केसांची नवी मुक्त स्टाईल वाऱ्याच्या वेगानं पसरली.

मुक्तांगण कितीही प्रिय असलं तरी वैविध्यपूर्ण केशरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं दिसतं. फ्रेंच रोल, हाय बन, लो बन आणि अगणित हेअरस्टाईल्स सण समारंभ, लग्न मुंजीत मानाचा मुजरा घेतात.

चांगलं दिसणं, आधुनिक राहणं, काळाबरोबर चालणं जमायल हवंच. तो आपला हक्कच आहे. फॅशन करताना स्थळकाळाचं भान मात्र असायला हवं. आपण कुठं आहोत, कोणत्या समारंभाला जाणार आहोत, आजूबाजूला कोणत्या वयोगटातील लोक आहेत, अशा काही गोष्टींचा विचार करावा इतकंच. स्वयंपाक करताना बांधलेले केस कामात अडथळा आणत नाहीत . शिवाय ते हायजेनिक आहे.

पूजा असेल, धार्मिक विधी असतील तर बांधलेले केस बरे. आजूबाजूला पणत्या,दिवे,समया असतील तर मोकळे केस धोकादायक ठरू शकतात. वयस्कर किंवा आदरणीय मोठी माणसं आजूबाजूला असतील तर केस मोकळे सोडू नयेत. ते छानसे बांधावेत.अशा वागण्यातून आदर, नम्रता व्यक्त होते. आधुनिकपणाचा स्वीकार करताना तारतम्य ठेवायला हवंच.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print