मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #142 ☆ ज्ञानेश्वरी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 142 – विजय साहित्य ?

☆ ज्ञानेश्वरी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 

ज्ञानदीप

भावार्थाचा

ज्ञानेश्वरी

ग्रंथ साचा.. . . !

 

विश्वात्मक

देवरूप

कल्याणाचे

निजरूप.. . . !

 

प्राणिजात

होवो सुखी

मागितले

दान मुखी.. . !

 

सज्जनांची

धरू कास

मांगल्याची

ठेवू आस. . . . !

 

तिन्ही लोकी

दुःख नाश

मागितले

स्नेहपाश…!

 

वाचूनीया

ग्रंथसार

व्हावा नर

ज्ञानाकार.. . !

 

ऐसे दान

ज्ञानियाचे

आर्णव ते

पीयूषांचे. . . !

 

मागितले

भावदान

संसाराचे

आत्मज्ञान.. . !

 

भेदभाव

नको मनी

ईश रूप

पाहू जनी.. . !

 

ईश्वराने

ईश्वराला

द्यावे दान

प्रेमळाला.. . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गंध सुगंध… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गंध सुगंध… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिरात टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते. आणि तऱ्हेतऱ्हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणे, अत्तर यांचे वास नाकाला येऊ लागतात.

पंचंद्रियात गंधाचे इंद्रिय हे फार तीक्ष्ण असते. कोणत्या वासामुळे आपण कुठे आहोत हे डोळ्यांनी न पाहता सुद्धा समजते. त्यावरून सहज आठवले ते पदार्थांचे वास!

यांच्या एका स्नेहांकडे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जावे की कांदे पोह्याचा वास अगदी बाहेरच्या दारापर्यंत यायचा! तसे कांदे पोहे तेच पदार्थ घालून केले तरी त्यांच्या इतके छान जमतील असं वाटायचं नाही. तो कांदे पोह्याचा वास अजूनही स्मरणात आहे!

 उन्हाळ्यातील संध्याकाळी अंगणात पाणी मारले की येणारा मातीचा वास- मृद्गंध, संध्याकाळी उमलणारी जुई, मोगरा, रात राणीची फुले यांचे सुगंध हे काही कुपित भरून ठेवायचे गंधच नाहीत मुळी! ते फक्त मनाच्या कुपीतच भरून राहतात आणि आपले आपल्याला अनुभवता येतात. असाच एक गंध माझ्या आजोळ च्या घरात मी मनात भरलेला! माझ्या मामाच्या घरी म्हैसूर सँडल्स वापरला जाई.तो येणारा चंदनी वास मला आजोळच्या घरी घेऊन जातो. आम्ही ‘हमाम’ साबण वापरणारे त्यामुळे त्या चंदनी सोपचा वास आमच्यासाठी दुर्मिळच होता!

सुगंध हा असा सांगता तरी येतो पण माझ्या मुलीला आजीची गोधडी पांघरली, की आजीचा वास त्या गोधडीला येतो आणि तसाच वास आईच्या गोधडीलाही येतो असं ती म्हणायची तेव्हा मी बघतच राहायची! पण ते आजीचं आईचं ते पांघरूण तिला मायेच्या सुगंधात ओढून घ्यायचं!

कितीतरी वेगळे वास दिवस भरात घेतो. किराणा मालाच्या दुकानात  तेल, डाळी, धान्य, साबण इत्यादींचा एकत्रित वास भरलेला असतो. पॅकिंगच्या जमान्यात दुकानात येणारे हे वास आता कमी झाले आहेत. कापडाच्या दुकानातील कोऱ्या कापडाचा गंध हाही वेगळाच! तो कॉटन ला येणारा वास आता सिंथेटिक कपड्यांना नाही!

कामावर जाताना येताना लोकल, बस प्रवास यातील गंध, घामाचा कुबट वास नको म्हणून मारलेले विविध प्रकारचे स्प्रे यामुळे होणारे वासाचे मिश्रण नाकाला झोंबणारेच वाटते काही वेळा तर ते ऍलर्जीकही  असते.

गंध सुगंधांच्या या दुनियेत देवघरात येणारा वास काही वेगळाच असतो वातावरणाचा परिणाम असेल किंवा काही असेल पण तिथे येणारा धूप, कापूर, उदबत्ती, अत्तर यांचा सुगंध मनाला पवित्रतेचा आनंद देतो. वेगवेगळे गंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतात आणि कळत नकळत ते आपण घेत असतो.कोळीणीला माशांच्या गंधाइतके काहीच प्रिय नसते. तिच्या उशाशी वासाच्या फुलांपेक्षा मासळीचा गंधच तिला अधिक आनंद देतो! बालगंधर्व अत्तराचे खूप शौकीन होते. त्यांच्या रोजच्या स्नानाच्या पाण्यात विविध प्रकारची अत्तरे वापरली जायची. त्यांच्यासाठी कनोजहून अत्तरे मागवली जायची.पूर्वीच्या काळी राजे रजवाडे अशा सुगंधी अत्तराचे मोठे खरेदीदार असतं.तो जमाना गेला!  गंधांचे महत्त्व बदलले.सेंटची कृत्रिम दुनिया जन्माला आली आणि पाश्चात्य संस्कृतीचे सुगंध दरवळू लागले.

गंधाच्या दुनियेत एकदा शिरल्यावर बरेच काही सुगंध आणि आठवणी मनात दरवळू लागल्या. अंगणातल्या वेलीवर उमलणारी जुईची नाजूक फुले तोडून गजरे ओवणारी माझीच मी मला आठवली. सोनचाफ्याची फुले दप्तरात ठेवून वह्या पुस्तकांना सुगंधित करणारी आणि मोगऱ्याच्या वासावर अजूनही जीव टाकणारी मी, सुगंधाच्या बद्दल किती किती लिहू?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 5 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

” मी इथे बसलो तर चालेल ना ? “

आवाजाने मी ‘ नक्षत्रांच्या देण्यातून ‘, विचारातून भानावर आलो. आवाजाच्या रोखाने पाहिले. माझ्यापेक्षा अंदाजे पाच-सहा वर्षांनी लहान वाटणारी व्यक्ती मलाच विचारत होती, ‘मी इथे बसलो तर चालेल ना ?’

मला कितीतरी वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. मी ही कबीरबाबांना असाच प्रश्न विचारला होता.

” बसा हो.”

” धन्यवाद ! आपण ? “

” मी ? मी, सूर्य ढळलेला माणूस ! “

पूर्वीचा प्रसंग ऐकून नकळत माझ्या तोंडून मला त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तरच बाहेर पडले.

माझ्या उत्तराने ती व्यक्ती चमकली आणि माझ्या शेजारी येऊन बसत म्हणाली,

” तुम्ही बाबांना भेटला होतात ?  ओळखत होतात त्यांना ? “

” एकदा भेट झाली होती.. पण अजूनही लक्षात आहे. त्यालाही झाली असतील पंचवीसेक वर्षे.”

” पंचवीस वर्षे ? कसे शक्य आहे ? त्यांना जाऊन तर सत्तावीस वर्षे झाली. “

” वर्षांचा हिशेब आठवणीत कुठे राहतो ? आठवणीत फक्त क्षणांची गर्दी असते. काही मोजक्याच क्षणांचीच गर्दी. बाबांची भेटही तशीच. काही क्षण घडलेली. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते. मी त्यांना मनोमन कबीरबाबा असे नावही दिले होते. मी त्यांना नाव विचारले होते, नाही असे नाही  तेंव्हा त्यांनी हेच उत्तर दिले होते, ‘ सूर्य ढळलेला माणूस ! ‘

” हो. ते शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असायचे. “

ते म्हणायचे नाव काहीही असले तरी आपली खरी ओळख हीच असते. उगवत्या सूर्याचे कौतुक असते. कोवळी कोवळी किरणे मनाला उल्हासित करतात, एखाद्या बालकासारखी. मध्यानीचा सूर्य आपल्या मस्तीतच तळपत असतो. आपण साऱ्या जगाला प्रकाश देतो याची त्याला जाणीव झालेली असते. कुटुंबातील कर्ता-सवरता माणूस असाच असतो… आणि सूर्य मावळतीला गेला की आपला अस्त जवळ आला असल्याची जाणीव त्याला होत असावी. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे याची कृतज्ञतापूर्वक जाणीव इतरांना असत नाही. ते फक्त मावळत्या सूर्याची शोभा पहात असतात.  त्यांना तो सूर्य क्षितीजपार झालेला, मावळलेला पहायचा असतो. त्यांच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता संपलेली असते. उगवत्या सूर्याची प्रतीक्षा त्यांच्या मनात असते.

” आयुष्यभर खस्ता काढून थकली-भागलेली माणसे अशीच…. “

” हो. फक्त अडचण ठरणारी. कुणीही उठ म्हणले की उठावे लागणारी..”

माझ्या मनात घरातील प्रसंग तरळून जाऊ लागले.

” तुम्हांला सांगतो, खूप वाईट वाटते हो , बाबांची आठवण आली की.. या वयात अपेक्षा असतात त्या काय आणि किती ? पण आम्ही त्याही पूर्ण करू शकलो नाही. प्रेमाने दोन शब्द बोलायला, विचारपूस करीत दोन क्षण जवळ बसायलाही आम्हांला वेळ मिळाला नाही.. वेळ मिळाला नाही म्हणणेही चुकीचेच आहे. आम्हांला जाणीवच झाली नाही कधी त्याची. “

” त्यावेळी तुम्ही मध्यान्ही तळपत होता ना ! हे असेच असते हो … फार वाईट वाटून घेऊ नका. ही जगराहाटीच आहे. एक विचारू ? “

” विचारा. “

” ही चुकल्याची जाणीव तुम्हांला कधी झाली ? सूर्य ढळल्यावरच ना ? “

क्षणभर विचारात पडून तो म्हणाला,

” खरं सांगायचं तर हो. “

मी हसलो. मी पहिल्यांदा इथं आलो तेंव्हा माझी आणि बाबांची भेट झाली. त्यानंतर बाबा पुन्हा इथं आलेच नाहीत. अनंताच्या प्रवासाला निघून गेले.. इथल्या प्रवासाच्या अंतिम स्टेशनवर पोहोचले.. त्यांचा इथला प्रवास संपला. सूर्य क्षितीजपार गेला.  आज तो इथं आला म्हणजे… म्हणजे माझाही हा प्रवास संपत आलाय. आता उद्यापासून इथं यायचं कारण नाही, कुणाला अडचण वाटायचे कारण नाही.. कुणाच्या टी-पार्ट्या, कुणाचं रॅप-पॉप.. कुठंच अडचण नाही.

मनाला खूप बरं वाटू लागले… मोकळं मोकळं. जणू कसले तरी ओझे उतरून बाजूला ठेवून दिल्यासारखे, डोक्यावरून  उतरल्यासारखे.  

अंतिम स्टेशन जवळ आल्याचे जाणवले तसा प्रवासाचा सारा शीण उतरून गेल्यासारखे वाटू लागले.. एकदम ताजे-तवाने. माझा सूर्य आता क्षितिजापार चाललाय.

उद्या तो माझी वाट पाहिल, परवा वाट पाहिल, काही दिवस वाट पाहिल अन  वाट पाहण्याचं पुन्हा विसरूनही जाईल.. पण तो मात्र इथं येतंच राहील.. पुन्हा कुणीतरी नवागत इथं येईल. त्याला विचारेल,

‘ इथं बसले तर चालेल का ? ‘

तो विचारणाऱ्याकडे नजर टाकून म्हणेल,

‘ बसा. कुणीही तुम्हांला, ‘ इथून उठा, ‘ म्हणणार नाही. ‘

थोड्या वेळाने तो नवागत त्याला विचारेल,

‘ आपण ? ‘

तो म्हणेल,

‘ सूर्य ढळलेला माणूस. ‘

अन् दिशांदिशांमधून प्रतिध्वनी उमटत राहतील,

‘ सूर्य ढळलेला माणूस !’

‘ सूर्य ढळलेला माणूस !! ‘

‘सूर्य ढळलेला माणूस !!! ‘

◆ समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’. 

आपल्या शिष्याला गीतेतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतानाच्या वेळेचे हे साईबाबांचे उद्गार ! यातून बाबा केवळ भगवद्गीतेतील श्लोकाचेच विवरण करतात असे नाही, तर ते त्याबरोबरच संभाषण शास्त्र आणि कला यांचे मूलतत्व सांगतात. 

संभाषण हे मूलतः आपण व्यक्त होण्याचे, दुसऱ्याशी संपर्क साधण्याचे एक साधन आहे. आपण दुसऱ्यापाशी व्यक्त होतो म्हणजे काय करतो? आपण आपल्या मनातील काहीतरी समोरच्याला सांगतो. कसे? त्या बाबीवरील आपले ज्ञान दुसऱ्याच्या विश्वातील अनुभवांच्या जवळातजवळ जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचे आणि ऐकणाऱ्याचे अनुभव विश्व एकच असते (जे फारच क्वचित घडते) तेव्हा हे अतिशय सुलभ होते. मात्र या दोघांच्या अनुभव विश्वात जितकी तफावत अधिक तितके हे कठीण होत जाते—आपण एका साध्या उदाहरणातून पाहू या—

माझ्या समोर गुळाचा खडा आहे. समोरच्याला हे काय आहे ते माहिती नाही. आता होणारे संभाषण कसे असेल?

‘ हे काय आहे?’

‘ गूळ ’

‘ याचं काय करायचं? ’

‘ हा खायचा.’

‘ कसा लागतो तो?’

‘ गोड ’

‘ गोड म्हणजे? ’ 

‘ तू साखर खाल्ली आहेस ना? साखर गोड असते.’ 

‘ म्हणजे गूळ साखरेसारखा लागतो? ’ 

(पाहिले ना सत्याचे शब्दरूपात कसे असत्य झाले!)

‘ तसे नाही रे. करंजी गोड असते.’

‘ म्हणजे हा करंजीसारखा लागतो?’ (आणखी एक असत्य!)

आता कितीही पदार्थांची नावे सांगितली तरी गुळाची चव त्यांचापेक्षा वेगळीच असणार ना ! मग किती असत्य सांगायचे?

‘आपल्या जिभेवर जे विशिष्ट रससंवेदक असतात ते जेव्हा चेतविले जातात ती चव,’– मी शास्त्राचा आधार घेतला आणि तो माझ्याकडे मोठा आ वासून भूत बघितल्यासारखा पाहू लागला. आता कशी समजावून सांगू मी त्याला गुळाची चव? त्याच्या अनुभवविश्वातून सगळ्या पदार्थांची यादी सांगूनही मला गुळाची चव सांगता येत नव्हती. 

अखेरीस मी त्याला म्हटले, ‘ तू खाऊन बघ ना, म्हणजे तुला समजेल याची चव.’ 

किती सोपा मार्ग ! पण इथे शब्द कुचकामी ठरले, कारण मी त्याला त्याची निश्चित अनुभूती देऊ शकत नव्हतो. म्हणजेच जे अनुभूतीजन्य असते ते सत्य असते आणि त्याला शब्दरूप द्यायचा प्रयत्न केला की ते असत्य होते. अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हा ‘ संप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ आणि ‘ असंप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ यांच्यातील  फरक आहे. प्रज्ञेच्या आधाराने झालेले ज्ञान हे कधीच निर्भेळ असू शकत नाही – संपूर्ण सत्य असू शकत नाही; ते अनुभूतीजन्यच असले पाहिजे. 

म्हणूनच संभाषणात शाब्दिक संभाषणापेक्षा चेहेऱ्यावरील आणि नजरेतील भाव व देहबोली अधिक परिणामकारक ठरतात. अन्यथा ‘ मला असे म्हणायचे होते की ….’ किंवा ‘ पण मला असं नव्हतं म्हणायचं ….’ असे सांगायची वेळ येते. 

संपूर्ण सत्य हे केवळ अनुभवजन्यच असते. ते शब्दरूप घेऊन आले की भेसळीने त्याचे असत्य होते. 

‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -1… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -1… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

करियर हा शब्द रुळला तेव्हापासून त्याला तीन शब्द चिकटले आहेत. हट्ट, अट्टाहास आणि दुराग्रह!

यात प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते. मम्मीची भूमिका नवर्‍याच्या कारकिर्दीवर अवलंबून असते. पप्पांची भूमिका ‘ हम करे सो कायदा ‘ अशी असते किंवा ताटाखालचे मांजर कायमच म्यावम्याव करते. मुला-मुलींच्या  भूमिका पक्क्या कधीच असत नाहीत. कधी बाल हट्ट असतो, कधी स्वप्नांचा अट्टाहास असतो, तर ऐकीव गोष्टींचा दुराग्रह करणारे काही निघतातच.

नेहमीच्या उदाहरणातून या गोष्टी मी स्पष्ट करतो. प्रथम या तीन शब्दांचा अर्थ मला अभिप्रेत काय आहे त्याबद्दल. हट्ट प्रत्येकाच्या(अपवाद संतमहंतांचाच)मनात असतो. पण यथावकाश तो पुरा होणे शक्य नाही हे समजून घेणारा त्या हट्टाचा नाद सोडतो. सुंदरच बायको, श्रीमंतच बंगलेवाला नवरा, मुला-मुलींचे पायलट बनण्याचे किंवा सिनेस्टार बनण्याचे स्वप्न ही झाली हट्टाच्या संदर्भातील काही नेहमीची उदाहरणे. नोकरीच्या सुरुवातीला किंवा वयाच्या गद्धेपंचविशीपर्यंत हे हट्ट संपत जातात.

सुंदर बायको किंवा श्रीमंत नवरा मिळेपर्यंत तिशी गाठणे, लग्न न करणे हा झाला अट्टाहास. कर्ज काढून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून पायलट किंवा सिनेस्टार बनता येत नाही हेही तिशीत कळते. मग हे सारे पुढची तीस वर्ष मिळेल ते गोड मानून मार्गाला लागतात. आपल्या आसपास  अशी अनेक उदाहरणे सहज ओळखू येतात.

दुराग्रह मात्र वाईटच. स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंबाची फरपट करण्यामध्ये दुराग्रही मुलगा, मुलगी, आई, वडील खलनायकाची भूमिका बजावत राहतात.दुराग्रहाची विविध रूपे मला दर वर्षी दर महिन्याला सामोरी येत असतात. काहीवेळा दुराग्रह समजावून देणारा भेटला तर फरक पडतो. याउलट काही जणांनी कान व मेंदू बंद केल्यामुळे ऐकायचा संबंधच नसतो. करीयरची निवड करण्याचे निकष, त्यातील  ठोकताळे, हातातील खर्चायची रक्कम, शिकण्यासाठीची वर्षे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्यासाठी लागणाऱ्या क्षमता, या साऱ्या ताळेबंदाची नीट माहिती घेतल्यावर काहींचा दुराग्रह दूर होऊ शकतो.

दहावीला जेमतेम 64 टक्के मार्क असलेली मुलगी डॉक्टर व्हायचंय म्हणते, चित्रकलेत अजिबात रस नसलेला मुलगा ॲनिमेशन किंवा गेमिंगमध्येच जायचे सांगतो, बारावीला 57 टक्के व जेईईला 50/300 मार्क पडलेला मुलगा  आयआयटी रिपीट करायला मला कोट्याला वडील पाठवत नाहीत म्हणून अडून बसतो. ही आहेत दुराग्रहाची ठळक उदाहरणे. शिकणे सोपे पण हट्ट, अट्टाहास, दुराग्रह सोडणे कठीणच.

लहानपणी चॉकलेट खावेसे वाटते. पावसात वडापाव आणि कांदाभज्याची आठवण होते. तसे वयाच्या 14 ते 19 दरम्यानचे हट्ट असतात. समोर येईल ते करावेसे वाटते. बरे वाईटाचे भान नसते. सिगरेटचा झुरका, चोरून पाहिलेला सिनेमा, बुडवलेली परीक्षा,अर्थातच कोणाच्यातरी प्रेमात पडणे, यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. ऐकीव करियरचा हट्ट इयत्ता बारावीपर्यंत हळू हळू कमी होतो. नववी दहावी– स्वप्नाळूपणा या दोन वर्षात जातो. संशोधक बनायचं असं म्हणणारा, फिजिक्स किती जड जातं हे कळते अन् हट्ट सोडतो. गणित कठीण जाणारा इंजिनीअरिंगवर  विचार करतो. पंधरा वीस टक्के मार्क अकरावीलाच कमी झाल्यावर मेडिकल मिळणार नाही याचा अंदाज येतो. कविता करणारी, त्यातच रमणारी मुलगी, भाषा शिकताना त्यातील छटा कळल्यावर भानावर येते. लेखक, पत्रकार, सिनेमासाठी लेखन करायचे असे म्हणणारेही थोडे जागे होतात. यांचे हट्ट हळूहळू कमी होतात.

मात्र इयत्ता बारावीनंतर अट्टाहासाची अनेक उदाहरणे दिसतात. रात्र रात्र जागून इंटरनेटवर विविध संस्था, नवीन अभ्यासक्रमांची न ऐकलेली नावे, एखाद्या गडगंज श्रीमंत मित्राने कुठे तरी विकत घेतलेला प्रवेश, यातून मनात असूयेचा प्रवेश होतो. 

— क्रमशः भाग पहिला

लेखक – डॉ. श्रीराम गीत

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कालची गणपती मिरवणूक म्हणजे आजवरचा कहर होता. टिळक रोड, अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक इथे लोकांचा अक्षरशः महापूर आला होता. 

मागच्या दोन वर्षांपासून तुंबलेले खास चेंगरून घेण्यासाठी बाहेर पडलेत असं वाटत होतं. निम्म्याहून जास्त लोक दारू प्यायलेले होते, तर काही जण रस्त्यावरच उभे राहून पीत होते. या पिणाऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नव्हत्या. दारू पिऊन बेभान नाचणे, नाचून नाचून रस्त्यावरच उलट्या करणे, आणि उलट्या करून झाल्या की पुन्हा नाचणे.

स्पीकर्सच्या आवाजाबद्दल तर न बोललेलं बरं. त्या बेसमुळे अक्षरशः छाती फुटून हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या सगळ्यात हाईट म्हणजे त्या मरणाच्या गर्दीत काही पालकांसोबत त्यांच्या कडेवरची लहान मुलं देखील रेटली जात होती. ती मुलं जीवाच्या आकांताने रडत होती.

कोरोनात घरटी एक माणूस दगावल्यासारखा दगावला आहे. त्या दुःखातून बरेच जण अजून नीट सावरले नाहीयेत आणि त्यांच्याच घरासमोर ‘ पोरी जरा जपून दांडा धर ‘ वगैरे सारखी गाणी कर्कश्श आवाजात लावून विचित्र हावभाव आणि ओंगळवाणे हातवारे करत नाचणारे, एकमेकांना रेटणारे आणि असा नाच पहायला गर्दीत चेंगरत वाहत जाणारे लोक बघून कोणत्याही स्थिर मानसिकतेच्या माणसाला मळमळल्याखेरीज राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती.

‘ बाप्पाच्या आगमनाची चाहूल ‘, ‘ बाप्पा गेला की घरात पोकळी जाणवते ‘  हे सगळं त्यांनाच होतं ज्यांच्या घराजवळ एखादं सार्वजनिक मंडळ नसतं. बाकी जे मुख्य शहरात किंवा मिरवणूक मार्गावर राहणारी मंडळी आहेत त्यांना, म्हाताऱ्या माणसांना, सलग तीस-छत्तीस तास त्या गर्दीत उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना, ज्यांना खरंच सामान्य माणूस म्हणता येईल अशा सर्व स्थिर मानसिकतेच्या लोकांना, आणि स्वतः गणपतीला देखील गणेशोत्सव संपला की हायसं वाटत असावं.

‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘, ‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत असे घाणेरडे प्रकार करणारे भक्त बघूनच गणपती बाप्पाने मागची दोन वर्षे ब्रेक घेतला असणार आहे … 

लेखक  : श्री विक्रम रजपूत, पोलीस उपनिरीक्षक

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 179 ☆ अभियंता दिवस विशेष – स्मार्ट इंजीनियरिंग के हाल के कुछ उदाहरण ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय आलेख – ”हिन्दी: वैधानिक स्थितियां…”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 179 ☆  

? आलेख – अभियंता दिवस विशेष – स्मार्ट इंजीनियरिंग के हाल के कुछ उदाहरण… ?

प्रति वर्ष १५ सितम्बर को भारत रत्न सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया का जन्म दिन इंजीनियर्स डे के रूप में मनाया जाता है.उन्हें नये भारत का विश्वकर्मा कहा जाता है. जब वर्ष १८८३ में विश्वेश्वरैया जी ने सिविल इंजीनियरिंग की पढ़ाई पूरी की तब अंगुलियों पर गिने जाने वाले इंजीनियर्स थे, औद्योगिकीकरण का प्रारंभ हो रहा था.  बांध, नहरें, रेल लाइन, सड़कें, जल प्रदाय, भवन, विद्युतीकरण आदि   अनंत विकास कार्य किये जाने थे. अपनी प्रतिभा और अथक मेहनत से विश्वेश्वरैया जी ने अपनी समर्पित कार्यकारी छबि बनाई और देश को जाने कितने ही सफल प्रोजेक्टस दिये.

पंडित नेहरू ने कल कारखानो को नये भारत के तीर्थ कहा था, इन्ही तीर्थौ के पुजारी, निर्माता इंजीनियर्स को आज अभियंता दिवस पर बधाई.

आज दुनियां में भी भारतीय इंजीनियर्स ने अपनी विद्वता और मेहनत से यही छबि बनाने में सफलता पा ली है. भारत के आई आई टी जैसे संस्थानो के इंजीनियर्स ने विश्व में अपनी कार्य प्रणाली से  भारतीय बुद्धि की श्रेष्ठता का समीकरण अपने पक्ष में कर दिखाया है.

नोएडा के ट्विन टावर्स का ध्वस्त किया जाना…

जहाँ भ्रष्टाचार और घोलमाल से, राजनैतिक शह पर नोयडा में सुपरटेक के गगन छूते ट्विन टावर्स तान दिये गये थे वहीं न्यायालय के आदेश पर कुछ सेकेंड में सघन आबादी में बिना और कहीं नुकसान के इन ट्विन टावर्स को धूल धूसरित करने के इंजीनियरिंग के स्मार्ट करिश्में भी हैं. जिस पर गर्व किया जाना चाहिये. 28 अगस्त 2022 को दोपहर 2 बजे का समय निर्धारित किया गया, एडिफिस कंपनी को इन टावर्स को गिराने का जिम्मा दिया गया था.  टावर सोक ट्यूब सिस्टम के तहत ध्वस्त किए गये.  इस तकनीक में मलबा पानी के झरने की तरह सीधे नीचे गिरता है.  टावर को गिराने के लिए सेकेंड दर सेकेंड अलग अलग हिस्सों में नियंत्रित विस्फोट किए गये टावर गिरने की शुरुआत बेसमेंट से की गई. फिर एक-एक कर स्लैब ढ़हा दिये गये.  दोनों टावर का पहला फ्लोर पहले सेकेंड और अंतिम फ्लोर सातवें सेकेंड में ध्वस्त हो गया. एमरॉल्ड कोर्ट में बने 97 मीटर ऊंचे 29 मंजिला सियान टावर में पहले धमाका किया गया. कुछ पल बाद  103 मीटर ऊंचा, 32 मंजिला एपेक्स टावर धराशायी किया गया. ध्वस्त किये गये टावर्स से केवल नौ मीटर की दूरी पर स्थित सोसायटी में लोग रह रहे हैं यह महत्वपूर्ण बात है. इस सदी ने प्रारंभ में ही आतंकी गतिविधि में न्यूयार्क के ट्विन टावर्स से हवाई जहाजों को टकराते और उन्हें हजारों लोगों की मृत्यु के दुखद हादसे के रूप में देखा था. उस दुखद घटना के बाद सारी दुनियां ने नोएडा के ट्विन टावर्स को कंट्रोल्ड स्मार्ट इंजीनियरिंग के साथ पल भर में गिराये जाते देखा.

ओंकारेश्वर बांध के जलाशय पर दुनियां का सबसे बड़ा तैरता सोलर बिजली घर…

मध्य प्रदेश में दुनिया में सबसे बड़ा फ्लोटिंग सोलर पावर प्लांट नर्मदा नदी पर स्थित ओंकारेश्वर बांध में बनाया जा रहा है. परियोजना के अनुसार ओंकारेश्वर बांध पर तैरते हुये सोलर पैनल लगाए जाने हैं. दुनिया में अब तक केवल 10 इस तरह के फ्लोटिंग पावर प्लांट हैं. ओंकारेश्वर में निर्माणाधीन यह प्लांट दुनिया का सबसे बड़ा, तैरता सोलर प्लांट होगा, क्योंकि पूर्ण हो जाने पर इसकी क्षमता 600 मेगावाट होगी. इस परियोजना का निर्माण दो चरणों में पूरा किया जायेगा.   पहले चरण में 278 मेगावाट की परियोजना पर काम शुरू हो चुका है.   अब तक, सौर परियोजनाएं आम तौर पर भूमि पर विकसित की जाती थीं जिससे ढ़ेर सारी जमीन बेकार हो जाती थी. बांध के वाष्पीकृत होते पानी की भी बचत इन पैनल्स के लग जाने से होगी. इस सोलर पार्क परियोजना की स्थापना से  प्रति वर्ष 1200 मिलियन यूनिट सौर ऊर्जा बिजली के रूप में प्राप्त होगी. बिना आबादी के विस्थापन हुये, बांध में फैले जल संग्रहण पर तैरती परियोजना स्मार्ट इंजीनियरिंग का नमूना है.

आर्टीफीशियल इंटेलीजेंस के वर्तमान वैश्विक परिदृश्य में स्मार्ट इंजीनियरिंग लगातार विकसित हो रही प्रणालियों, उत्पादों और अनुप्रयोगों के लिए अपरिहार्य होती जा रही है. इंजीनियरिंग हार्डवेयर सिस्टम और सॉफ्टवेयर का  अधिकाधिक समन्वित प्रयोग  हितधारकों, विकास, परिनियोजन, निर्माण और संचालन में विभिन्न भूमिकाओं के साथ विस्तार प्राप्त कर रहा है. समय की मांग है कि इंजीनियरिंग के  एनालिटिकल  समाधान, सामाजिक उद्देश्य के साथ साथ व्यापार, और विकास में तालमेल बनाये रखा जाये.   डेटा निर्भर ए आई सिस्टम के  सिमुलेशन और सॉफ्टवेयर, इंजीनियरिंग लागत को तथा परियोजना निर्माण के प्रभावी समय को कम करने वाले विकल्प प्रदान करते हैं.  वर्तमान में प्रत्येक परियोजना के स्मार्ट इंजीनियरिंग समाधानों की आवश्यकता है एवं इस क्षेत्र में विकास के अभूतपूर्व नये नये अवसर तथा संभावनायें हैं.

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

 फेलो आफ इंस्टीट्यूशन ऑफ इंजनियर्स

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 117☆ जुगत की पहेली, सच्ची सहेली ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना जुगत की पहेली, सच्ची सहेली। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 117 ☆

जुगत की पहेली, सच्ची सहेली ☆ 

जोड़ तोड़ की पहल क्या कुछ नहीं करवा देती है। सम्मान पाने की लालसा लिए सही गलत का भेद भुला कर बस कॉपी पेस्ट की ओर चल दिए नवीन लाल जी, आपकी हर रचना किसी न किसी की रचना का अंश होती थी पर हद तो तब हो गयी जब पूरा का पूरा ठीकरा ही अपने सर पर लाद लिया। कहते हैं महाभारत काल में दुर्योधन की पत्नी भानुमती ने उसकी मृत्यु के बाद  पूरे कुनबे को जोड़ने के लिए कुछ भी जोड़ तोड़ किया था। आदिकाल से विवाह द्वारा सम्बन्धों को जोड़ने की परम्परा चली आ रही है। इसे दूसरे शब्दों में रिश्तों की वैधता को सर्टिफाइड करना कहें तो भी कोई अतिश्योक्ति नहीं होगी।

शक्ति, धैर्यता, प्रकृति, पूर्णता, प्रार्थना ये  सब कुछ करते हुए भी कहीं न कहीं कुछ अधूरा रह जाता जिसके लिए इन्जार करना पड़ता है कृपा का, पर ये  मिले कैसे…?

सहन करने की भी एक सीमा होती है, बार – बार जब कोई असफ़ल होता है  तो बजाय पूरी ताकत के फिर से प्रयास करे इससे अच्छा वो ये समझता है कि मैदान छोड़कर भाग जाओ।

ये विराट संसार है जैसे ही आप पलायन करेंगे कोई और आकर उस रिक्त स्थान को भर देगा  इसलिए जैसे ही अवसर मिले उसका भरपूर लाभ उठाएँ, चाहें कितनी बार भी गिरें पर उठें और पुनः जीवन की दौड़ में शामिल हों।

कोई भी व्यक्ति या वस्तु पूर्ण नहीं होती है ये तो सर्वसत्य है, हमें उसके  गुण दोषों को  स्वीकार करने की समझ होनी चाहिए।

इस संदर्भ में  छोटी सी कहानी याद आती है, एक शिष्य बहुत दुःखी होकर अपने गुरु के  सम्मुख  रुदन करते हुए कहने लगा कि मैं आपके शिष्य बनने के काबिल नहीं हूँ, हर परीक्षा में जितने अंक मिलने चाहिए वो मुझे कभी नहीं मिले इसलिए मैं  अपने घर जा रहा हूँ, वहाँ पिता के कार्य में हाथ बटाऊँगा, गुरु जी ने उसे समझाने की बहुत कोशिश की पर वो अधूरी शिक्षा  छोड़ कर अपने  गाँव चला गया।

किसी के जाने का दुःख एक दो दिन तो सभी करते हैं पर जल्दी ही उस रिक्त स्थान की पूर्ति हो जाती है। एक दिन गुरुजी सभी शिष्यों को पढ़ा रहे थे तभी  उन्हें  वहाँ कुछ पक्षी उड़ते हुए दिखे उनका मन भी सब कुछ छोड़ हिमालय की ओर चला गया कि कैसे  वो अपने गुरु के सानिध्य में वहाँ रहते थे, तो  गुरुदेव ने भी  तुरन्त अपने प्रिय शिष्य को आश्रम की जिम्मेदारी दी और  चल दिये हिमालय की गोद में।

ये किस्सा एक बार का नहीं जब मन करता गुरुदेव कहीं न कहीं अचानक चल देते सो उनके शिष्य भी उन्हीं के पद चिन्हों पर चलते हुए अधूरे ज्ञान के साथ जब जी आता  अपनी पढ़ाई छोड़ कर चल देते कुछ वापस भी आते।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – हिंदी का लेखक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना

समूह को कुछ दिनों का अवकाश रहेगा। 

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – पुनर्पाठ- हिंदी का लेखक  ??

हिंदी का लेखक संकट में है। मेज़ पर सरकारी विभाग का एक पत्र रखा है। हिंदी दिवस पर प्रकाशित की जानेवाली स्मारिका के लिए उसका लेख मांगा है। पत्र में यह भी लिखा है कि आपको यह बताते हुए हर्ष होता है कि इसके लिए आपको रु. पाँच सौ मानदेय दिया जायेगा..। इसी पत्र के बगल में बिजली का बिल भी रखा है। छह सौ सत्तर रुपये की रकम का भुगतान अभी बाकी है।

हिंदी का लेखक गहरे संकट में है। उसके घर आनेवाली पानी की पाइपलाइन चोक हो गई है। प्लम्बर ने पंद्रह सौ रुपये मांगे हैं।…यह तो बहुत ज़्यादा है भैया..।…ज़्यादा कैसे.., नौ सौ मेरे और छह सौ मेरे दिहाड़ी मज़दूर के।….इसमें दिहाड़ी मज़दूर क्या करेगा भला..?….सीढ़ी पकड़कर खड़ा रहेगा। सामान पकड़ायेगा। पाइप काटने के बाद दोबारा जब जोड़ूँगा तो कनेक्टर के अंदर सोलुशन भी लगायेगा। बहुत काम होते हैं बाऊजी। दो-तीन घंटा मेहनत करेगा, तब कहीं छह सौ बना पायेगा बेचारा।…आप सोचकर बता दीजियेगा। अभी हाथ में दूसरा काम है..।

हिंदी के लेखक का संकट और गहरा गया है। दो-तीन घंटा काम करने के लिए मिलेगा छह सौ रुपया।… दो-तीन दिन लगेंगे उसे लेख तैयार करने में.., मिलेगा पाँच सौ रुपया।…सरकारी मुहर लगा पत्र उसका मुँह चिढ़ा रहा है। अंततः हिम्मत जुटाकर उसने प्लम्बर को फोन कर ही दिया।…काम तो करवाना है। ..ऐसा करना तुम अकेले ही आ जाना।..नहीं, नहीं फिकर मत करो। दिहाड़ी मज़दूर है हमारे पास। छह सौ कमा लेगा तो उस गरीब का भी घर चल जायेगा।…तुम टाइम पर आ जाना भैया..।

फोन रखते समय हिंदी के लेखक ने जाने क्यों एक गहरी साँस भरी!

© संजय भारद्वाज

रात्रि 1.11 बजे, 27.7.2019

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 127 ☆ गीत – अनगिन चले गए ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक 122 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान द्वारा राष्ट्रीय स्तर पर बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिया जाना सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ (धनराशि ढाई लाख सहित)।  आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 127 ☆

☆ गीत – अनगिन चले गए  ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

अनगिन चले गए

परिचित शुभचिन्तक

देखा अदभुत रे संसार।

अब तो छूट रहा है प्यार।।

 

ये भी जोड़ा , वो भी जोड़ा

नाते , रिश्ते जोड़ लिए

कहीं कपट था, कहीं रपट है

कुछ ने रिश्ते तोड़ लिए

 

कैसे मिथक और उपमाएं

करतीं जीवन साज – सँवार।

 

ईश्वर को मैं देख न पाया

लेकिन गीत सदा ही गाया

सुख – दुख में सब काल छिन गया

सुख चाहती है केवल काया

 

कोशिश करी सदा मिलने की

आँख बंद कर की मनुहार।।

 

 

शब्द – शब्द ने ब्रह्म जगाया

जो चाहते थे कब वह पाया

मैल लगे वस्त्रों को हमने

थोड़ा – थोड़ा था चमकाया

 

द्वार खोलती अनुभूति नित

कुछ से मिलता प्यार अपार।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print