मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला.

बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपविताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले.

त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का? याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या.

तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला.

इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरूण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला.

तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता. न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले. आणि म्हणाले,

“आजोबा, ” तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले.. ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो. ? निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? 

जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवित राहिले…

“  बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस, हाच जीवनाचा गोडवा.. ! त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण.. ! बाळ, या दोन्ही वेळी आपण स्वत: त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण.. त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !” 

“ आणि अगं अनेक माणसं भेटतात या प्रवासात.. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात.. त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले..

काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. आणि कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात.. त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी.., त्यांचा पिंड निराळाच असतो… आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत.. ! जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं.. ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे.. ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही !.. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. !”

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत, तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे.., खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा.. पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं.., वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो.. पण एक मात्र खरं….

 …. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण “भाळणं ” संपल्यावर उरतं ते “सांभाळणं.. “

…. हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ” जीवन जगणं ” कळलं.. !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहित.. बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले.., सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले,

…. ” अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत.. !” 

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो.. !”

दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या…. आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव… “

लेखिका : माहीत नाही…( पण विचार…. विचार करण्यासारखे !) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!!) – इथून पुढे — 

भिजलेलं ते ब्लॅंकेट आणि कुजलेली ती पॅन्ट यांना मी आता मनोमन नमस्कार केला…. आणि काय जादू झाली … त्यातला दुर्गंध कुठल्या कुठे पळून गेला… !!! 

आता बाबांच्या मी शेजारी बसलो…. ! चौकशी केली आणि सुरुवातीला सांगितलेली सर्व कर्म कहाणी समजली. मी त्यांना अत्यंत नम्रपणे विचारलं, “ बाबा मी तुमच्यासाठी काय करू ? “ 

ते सुद्धा हात जोडून तितक्याच नम्रतेने म्हणाले, “ तुम्ही माझा जीव घेता का जीव ? “

“ माझं काम जीवदान द्यायचं आहे बाबा “ मी म्हणालो.

ते क्षीणपणे हसले, म्हणाले, “ घ्या हो जीव… एखादं औषध द्या आणि मारून टाका…. कंटाळलो आहे मी आता…. आडबाजूच्या फुटपाथ वर एखाद्याला असं औषध दिलं तर कोणाला कळणार आहे ??? “

बाबांचं आयुष्यातलं मन उडून गेलं होतं …गाण्यातले सूर हरवतात तेव्हा फक्त ते गाणं बेसूर होतं, पण जीवनातलं मन हरवलं की ते आयुष्य भेसुर होतं… ! 

“ बाबा तुमची बायको तुमच्याशी अशी का वागली ?” मी चाचपले…. 

“ जाऊ द्या हो डॉक्टर…  पाऊस संपला की छत्रीचं सुद्धा ओझं होतं…! “

“ म्हणजे ? “

“ अहो तिची माझी साथ तितकीच होती… “

“ तिच्या वागण्याचा त्रास नाही होत तुम्हाला ? “

“ अहो, तिने त्यावेळी जी साथ दिली ती मी प्रसाद म्हणून घेतली… प्रसादाची चिकित्सा करायची नसते… जे मिळालं ते समाधानाने ग्रहण केलं मी…. !  प्रसाद हा जीव शमवण्यासाठी असतो… भूक भागवण्यासाठी नाही… ! “

“ मला नाही कळलं बाबा… “

… “ माझ्या पडत्या काळात तिने मला खूप साथ दिली, खरं तर मी तिचा आभारी आहे डॉक्टर … 

आपण मंदिरात जातो …. गाभाऱ्यात आपण किती वेळ असतो ? दोन पाच मिनिटं …परंतु तीच दोन पाच मिनिटं पुढे कितीतरी दिवस जगायला ऊर्जा देतात… तिची माझी साथ सुद्धा अशीच दोन पाच मिनिटांची… 

गाभाऱ्यात जाऊन आपल्यासोबत कोणी देवाची मूर्ती घरी घेवून येत नाही… तिथं अर्पण करायची असते श्रद्धा आणि परतताना घेवून यायचा, “तो” सोबत असल्याचा विश्वास ! डॉक्टर माझी मूर्ती फक्त हरवली आहे… श्रद्धा आणि विश्वास नाही… ! “

माझ्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले…

“ जाऊद्या हो डॉक्टर…तुम्ही जीव घेणार आहात ना माझा ?”  विषय बदलत ते म्हणाले. 

“ होय तर… मी तुमचा जीव घेऊन, तुमचे विचार सुद्धा घेणार आहे बाबा…” माझ्या या वाक्यावर कुडकुडणारे हात एकमेकावर चोळत ते गूढ हसले. 

आता शेवटचा प्रश्न ..  “ तुम्हाला तिचा राग नाही येत ? “

ते पुन्हा क्षीणपणाने हसत म्हणाले,.. “ डॉक्टर मी तिला “बायको” नाही, “मुलगी” मानलं…  जोवर माझ्यासोबत होती, तोपर्यंत तिने माझी सेवा केली… आता ती दुसऱ्याच्या घरी गेली… मुलगी शेवटी परक्याचीच असते ना ? “

हे बोलताना त्यांनी मान दुसरीकडे का वळवली… हे मला कळलं नाही… !  मान वळवली तरी खांदयावर पडलेले अश्रू माझ्या नजरेतून सुटले नाहीत…. 

“ मी नवरा नाही होवु शकलो, पण मग मीच तिचा आता बाप झालो….”  ते हुंदका लपवुन बोलले…. ! “ मी तिला माफ केलंय तिच्या चुकीसाठी…” 

मी अवाक झालो… ! 

“ बाबा… ? अहो…. ??  तुम्ही …??? “ माझ्या तोंडून शब्द फुटेनात….“ इतक्या सहजी तुम्ही माफ केलं तिला ? नवरा होता होता, बाप झालात तीचे ??? “

“ डॉक्टर क्षमा करायला काहीतरी कारण शोधावंच लागतं ना हो ? “ ते हसत म्हणाले… 

मी पुन्हा एकदा शहारलो… ! .. एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी मुद्दामहून कारण शोधलं जातं… आणि  ते माफ करण्यासाठी कारण शोधत होते… ! 

ते पुन्हा हसले…. !  त्यांचं हे एक हसणं,.. हजार रडण्याहून भीषण आणि भेसूर होतं…! 

आता माझे शब्द संपले होते… सर्व काही असूनही मी गरीब होतो, आणि .. आणि  हातात काहीही नसलेले… रस्त्यावर पडलेले ते बाबा खरे श्रीमंत ! 

मनोमन त्यांना नमस्कार करून मी जायला उठलो. 

मला त्यादिवशी पाणी मिळालंच नाही… पण बाबांच्या अश्रूत मी चिंब भिजून गेलो…. ! 

पाणी न पिताही माझी तहान शमली होती… गाडी जवळ आलो…. गाडी गपगुमान चालू झाली… अच्छा…  म्हणजे हा सुध्दा कुणीतरी खेळलेला डाव होता तर….! 

मी घरी आलो…. डोक्यात बाबांचेच विचार…

‘ प्रेम म्हणजे क्षमा… ! ‘ .. आज प्रेमाची नवी व्याख्या समजली…. 

‘ स्वतःसाठी काहीतरी मागणं म्हणजे प्रार्थना नव्हे… जे मिळालंय, त्याबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजे प्रार्थना !’ .. आज प्रार्थनेचीही नवी व्याख्या समजली… 

‘ जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश… परंतु जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान !!! ‘

सर्व काही हरवूनही, समाधानी राहून, वर तिलाच दुवा देणाऱ्या बाबांचा मला हेवा वाटला !!! 

जगावं तर सालं अस्स…. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही…. ! 

त्यांच्या “मनात” सुरू असलेलं युद्ध “पानावर” कधीही लिहिले जाणार नाही… 

इथं तेच दुर्योधन होते….तेच अर्जुन होते …आणि कृष्णही तेच होते…! 

…. आयुष्याच्या रणभूमीवर आजूबाजूला सर्वजण असूनही ते बाबा एकटेच होते. 

श्वास चालू असतात, तोपर्यंत एकट्यालाच चालावं लागतं…. श्वास थांबले की मगच लोक आपल्या आजूबाजूला रडत गोळा होतात… आणि आपल्या जाण्याचा हा “सोहळा” पाहायला आपणच शिल्लक नसतो…. ही खरी शोकांतिका  !!! 

आज २३ तारखेला शनिवारी सकाळी पाय आपोआप बाबांकडे वळले… 

…. त्याच ओल्या गाठोड्यात ते तसेच पडले होते… भीष्मासारखे मौन धारण  करून, थंडीनं कुडकुडत…  ! 

त्यांचे डोळे बंद होते… मी गाठोड उघडलं…. अंगावरचं भिजलेलं एक एक कापड काढून टाकलं… आता मला ते ‘ दिगंबर ‘ भासले ! .. उघड्या फुटपाथवर, नागड्या आकाशाखाली मी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला… अंगावरचा मळ हाताने साफ केला….आता अजून कुठली पूजा मांडू ?? .. जखमेतले किडे काढले… दाढी कटिंग केली… पँटमध्ये केलेली मल-मुत्र-विष्ठा साफ केली…. आणि मीच खऱ्या अर्थानं सुगंधित जाहलो…. ! 

मग त्यांना लंगोट बांधला… उघड्या बंब त्या बाबांनी, माझ्या डोक्यावर मायेनं हात ठेवला आणि खऱ्या अर्थाने माझ्या स्टेथोस्कोपचा आज सन्मान झाला…! 

उघडले डोळे जेव्हा त्यांनी, गाईच्या नजरेत मला वासरू दिसले…..  

.. आणि नुकत्याच हातात आलेल्या या वृद्ध बाळामध्ये मला माझेच पिल्लू दिसले…. रस्त्यावरच मग त्याला न्हाऊ घातले….! 

इतक्यात माझ्या कानावर ढोल ताशाचा अगडबंब आवाज आला… आमच्या बाळाच्या जन्माचा सोहळा कोण साजरा करतंय, हे बघायला मी मान वळवली…. पाच दिवसाच्या गणपतीची ती विसर्जन मिरवणूक होती ! 

इकडे बाबांचंही जुनं आयुष्य आम्ही विसर्जित करत होतो…!!!  यानंतर त्यांना स्वच्छ पुसून नवीन पांढरे शुभ्र कपडे घातले. कपडे घालता घालता ते म्हणाले, “ डॉक्टर, आज पुन्हा इकडे कसे आलात ?”

आता मी हसत म्हणालो, “ अहो बाबा, तुमचा जीव घ्यायचा होता ना ? जीव घ्यायलाच आलोय…!”

यावर अत्यंत समाधानाने ते हसले….! 

बाबांना ऑपरेशनसाठी एका हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ऍडमिट केलं आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना एखादा व्यवसाय टाकून देऊ किंवा त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू… ! 

अरे हो… आता तुम्हाला सांगायला हरकत नाही… पण, बाबांच्या इच्छेनुसार शेवटी मी त्यांचा “जीव” घेतलाच आहे… ! आणि आता हा “जीव” मी माझ्या जिवात जपून ठेवला आहे…!! 

कुठवर ??? …. माझ्या जिवात जीव आहे तोवर… !!! 

— समाप्त— 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी जीव घेता का जीव???… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक होता गरुड…! नावाप्रमाणेच आकाशात उंच भरारी घेणारा… ! 

साजेशी बायको पाहून याने एका पक्षीणीशी लग्न केलं… 

हा दररोज सकाळी कामावर जायचा, संध्याकाळी घरी यायचा, दिवसभर काबाड कष्ट करायचा…  जमेल तितकं पक्षिणीला आनंदात ठेवायचा…! 

कोल्हापूर जिल्ह्यातलं याचं छोटंसं एक गाव… गरुडच तो … याने स्वप्न पाहिलं, बायकोला म्हणाला, “ मी पुण्यात जाऊन आणखी कष्ट करतो, म्हणजे आपल्याला आणखी सुखाचे दिवस येतील… !”

पुण्या मुंबईच्या आकाशात हा गरुड उंच झेप घेऊ लागला…  मिळेल तो दाणापाणी बायकोला घरी पाठवू लागला, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला… ! 

“माझी ती पक्षीण” इतकंच त्याचं आयुष्य होतं… ! तिनं सुखी आणि आनंदी राहावं इतकंच त्याचं माफक स्वप्न होतं…. त्यासाठी तो स्वतःच्या शक्तीबाहेर काम करू लागला…. प्रकृती ढासळली… पंख थकले… आता दाणापाणी कमी मिळू लागलं …. ! हा स्वतःच्या मनाला खायचा, तरीही काम करतच होता… !  पक्षिणीला जास्तीत जास्त सुखी कसे ठेवता येईल, याचाच तो सतत विचार करायचा… ! याने आणखी चार कामे धरली आणि प्रकृती आणखी ढासळत गेली…. 

मधल्या काळात पक्षिणीला एका धष्टपुष्ट श्रीमंत “गिधाडाने” साद घातली, ती भुलली, तिला मोह झाला आणि ती त्याच्याबरोबर भूर्र उडून गेली…. ! मनापासून प्रेम करणाऱ्या गरुडाला ती सोडून गेली… ! 

गरुड असला तरी चालता बोलता जीवच तो… हा धक्का त्याला सहन झाला नाही… ! तो  पूर्ण खचला…. 

‘आता कमवायचं कोणासाठी ?’  हा विचार करून रस्त्यात वेड्यासारखा तो फिरायला लागला…. होती ती नोकरी गेली, तेव्हापासून पुण्यातल्या रस्त्यावर विमनस्क अवस्थेत तो फिरू लागला…. याला बरीच वर्षे लोटली… तरुणपण सरलं… डिप्रेशनच्या याच अवस्थेत एके दिवशी एक्सीडेंट झाला, उजव्या पायाची तीन हाडे मोडली… जिथे एक्सीडेंट झाला तिथेच पुण्यातल्या एका नामांकित रस्त्यावरच्या फुटपाथवर तो गरुड पडून राहिला… घायाळ जटायू सारखा…! 

पक्षिणीला याबद्दल माहीत असण्याचे काही कारण नव्हते…. कळवणार कोण ? आणि कळलं असतं तरी ती थोडीच येणार होती ? कारण तिच्यासाठी ते श्रीमंत “गिधाड” हेच तिचं सर्वस्व होतं… ! 

 

प्रसंग २

मी पुण्यातल्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो, रस्त्यावर पडलेल्या लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. माझे एकूण 60 स्पॉट आहेत.  यात जवळपास पुणे पिंपरी चिंचवड असे सर्व भाग कव्हर होतात. 

मला नेहमी असं वाटतं, की मी जे काही काम करतोय ते मी करतच नाही… कोणीतरी माझ्याकडून हे करवून घेतंय, माझ्याही नकळत….. कोण ???  ते मलाही माहीत नाही !!!  मी पण शोधतोय त्याला….

तर ..

एकदा १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी मला एक फोन आला, संध्याकाळी माझा त्यांनी सत्कार ठेवला होता. त्यांनी पत्ता सांगितला, संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेलो. जाताना आजूबाजूचा परिसर पाहिला, मला हा परिसर थोडा नवीन होता. परिसर चकाचक असला तरी फुटपाथवर अनेक निराधार लोक मला दिसले. 

या नवीन ठिकाणी पुन्हा यायचं, असं मी मनाशी ठरवलं आणि २२ सप्टेंबर २०२३ म्हणजे शुक्रवारी, मी या परिसरात फेरफटका मारला. अनेक जीवाभावाचे लोक भेटले, अंध आणि अपंग…. माझ्या परीने मला जे जे शक्य होतं, ते ते मी त्यांच्यासाठी त्या दिवशी केलं आणि तिथून अत्यंत समाधानाने परत फिरलो. 

परत निघालो , पण अचानक एका ठिकाणी माझी मोटरसायकल बंद पडली. किक मारून, बटन स्टार्ट करून थकलो, गाडी काही केल्या सुरू होईना… ! पेट्रोल पण भरपूर होतं…. मग झालंय काय हिला ??? 

घामाने निथळणारा मी ….आता थंड पाण्याची बाटली कुठे मिळते का ? म्हणून शोधत फुटपाथवरून चालत, चरफडत निघालो…. 

फुटपाथ वर कुणीतरी एक भिजलेलं गाठोड टाकलं होतं… आधीच वैतागलेला मी…. वाटेत पडलेल्या त्या भिजलेल्या गाठोड्याला रागाने लाथ मारून बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला…. !  

मला वाटलं तेवढं ते गाठोड हलकं नव्हतं….माझ्या पायाने ते सरकवलं गेलं नाही …. मी रागाने त्या गाठोड्याला अजून जोराने लाथ मारली आणि मला त्याच्यातून “आयो” म्हणून किंचाळल्यासारखा आवाज आला…! .. मी दचकलो… घाबरलो … मलाही काही कळेना ! 

भिजलेल्या त्या बोचक्यातून आधी एक दाढीवाला चेहरा बाहेर आला, त्यानंतर मला एक हात दिसला, मग दुसरा हात दिसला, दोन्ही हाताने त्याने ती चादर खाली केल्यानंतर मला त्या व्यक्तीचे पोट आणि पाय दिसले…. ! 

डॉक्टर म्हणून अनेक बाळंतपण आजवर पाहिली…. पण बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येताना आज पहिल्यांदाच पहात होतो…. !  गर्भातून लहान बाळ जन्माला येणं हे नैसर्गिक…. परंतु बोचक्यातून दाढीवाले बाळ जन्माला येणं हे अनैसर्गिक… ! …. फेकलेल्या बोचक्यातून म्हातारे आई बाप हल्ली रस्त्यावर जन्माला येतात, ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे ! 

तर, भिजलेल्या बोचक्यातून बाहेर पडलेल्या त्या बाबांची मी पाया पडून माफी मागितली आणि त्यांची चौकशी केली आणि समजले …. हो…. हाच तो पाय तुटलेला तो गरुड !!! 

हा “गरुड” पाय तुटल्यापासून पाच महिने याच जागेवर पडून आहे. दया म्हणून कोणीतरी याला ब्लॅंकेट दिलं होतं, या ब्लँकेटमध्ये तो स्वतःला गुंडाळून घेतो… भर पावसात  हे ब्लॅंकेट भिजून आणि कुजून गेलं आहे… त्याच्या आयुष्यासारखं….! 

खूप वेळ पाण्यात बोटं भिजल्यानंतर, पाणी त्वचेच्या आत जातं, बोटं पांढरी फटक होतात, त्यावर सुरकुत्या पडतात…. ! जवळपास सर्वांना हा अनुभव कधीतरी आला असेल…. पण कपाळापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत यांचं संपूर्ण शरीर पांढरंफटक पडलं होतं….शरीरातल्या प्रत्येक भागाच्या त्वचेच्या आत पाणी गेलं होतं… पाण्यात भिजून स्पंज जसा फुलतो तसं संपूर्ण शरीर फुललं होतं… फुग्यासारखं…! जिथे पाय तुटला होता तिथल्या जखमांमध्ये किडे वळवळ करत होते…. थंडीने ते कुडकुडत होते, दात वाजत होते, हात थरथरत होते, डोळे निस्तेज पडले होते….टेबलाच्या अगदी कडेला एखादी वस्तू ठेवावी आणि ती कधी पडेल असं वाटावं, तसं डोळे खोबणीतून कधी बाहेर पडतील असं वाटत होतं…. 

एखादयाला असं पाहणं खूप त्रासदायक असतं…. ! पहिल्यांदा ती ओली घाणेरडी ब्लँकेट काढून मी फेकून दिली… आणि घाणेरड्या वासानेही शरमेनं लाजावं इतकी दुर्गंधी त्यावेळी मला जाणवली… !

” पॅन्ट नावाचं जे वस्त्र त्यांनी घातलं होतं, त्यात पाच महिन्यांची मल मूत्र विष्ठा होती…” या एका वाक्यात दुर्गंधीची कल्पना यावी ! पण ते तरी काय करणार ? पायाचे तीन तुकडे झालेला माणूस जागेवरून हलेल कसा ? 

खरं सांगू ? बाबांच्या आधी, मी या पँटचा विचार करायला लागलो….कारखान्यात जेव्हा हे कापड तयार झालं असेल, तेव्हा या कपड्याला काय वाटलं असेल… ? मी आता एका प्रतिष्ठिताच्या अंगावर सफारी म्हणून जाईन किंवा नवरदेवाचा कुर्ता होईन किंवा एखाद्या नवरीचा शालू होईन… ! मग माझ्या अंगावर सुगंधाचे फवारे उडतील आणि मला जपून ते कपाटात ठेवतील…! अहाहा….!!! 

पण झालं उलटंच…. या कपड्याची पॅन्ट शिवली गेली आणि ती नेमकी या गरुडाच्या पदरी पडली…!

तेव्हापासून हे कापड … पँट होवून, त्या गरुडाची मलमूत्रविष्ठा अंगावर घेऊन सांभाळत आहे… !

किती स्वप्नं पाहिली होती आयुष्यात, आणि आता अंगभर एखाद्याची मलमूत्रविष्ठा, तोंडावर फासून घेताना काय वाटत असेल या कपड्याला ? कुणी विचार केलाय ??

देवाच्या पायाशी पडलेल्या फुलांचे कौतुक मला नाही… त्यांना सन्मान मिळतोच ! एखाद्या चितेवर आपण फुलं उधळतो… आपल्या इच्छेसाठी…..  मनात नसूनही ती फुलं मात्र चितेवर सहज जळून खाक होतात… आपल्या आनंदासाठी…. मला त्या फुलांचं कौतुक आहे…. !!!  कुणाच्या आनंदासाठी असं सहज जळून खाक होणं… इतकं सोपं असतं का ? .. जळून खाक झालेल्या त्या फुलांपुढे मी मात्र नतमस्तक आहे… ! 

पण …. काहीतरी स्वप्नं घेऊन जन्माला आलेल्या त्या कपड्याला मात्र आज कुणाची तरी मलमूत्रविष्ठा सांभाळावी लागते… आता माझी नजर बदलते… मी त्या पॅन्टकडे कृतज्ञतेने बघू लागतो… नमस्कार करतो…. !  पॅंटीचे ते कापड मला यावेळी कानाशी येऊन म्हणतं…. , “ डॉक्टरसाहेब एकाच खाणीत अनेक दगड सापडतात…. त्यातले काही पायरी होतात …कोणी मूर्ती होतात… तर कोणी कळस होतात… 

आमच्यासारखे काही दगड मात्र  “पाया” म्हणून स्वतःला जमिनीखाली गाडून घेतात… कळस दिसतो… मूर्ती दिसते …पायरीलाही लोक नमस्कार करतात…! ते मंदिर…तो कळस… ती आरास… धान्याची ती रास… ती मूर्ती… ती आकृती… हे सगळं जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आमच्यासारख्या दगडांमुळे उभं असतं साहेब…. !” 

मी शहारून जातो…. अंगावर काटा येतो ! 

काही गोष्टी अव्यक्त राहतात …. आणि म्हणूनच सारं व्यक्त होतं…. !!! 

.. आयुष्यभर जगून हे सत्य मला कधी कळलं नाही… आज मलमूत्रविष्ठा धारण केलेल्या या निर्जीव कपड्याने मला कानात येऊन मात्र हे सगळं सांगितलं… !!! तेव्हापासून मंदिरात मी देव शोधत नाही…. मंदिराच्या खाली गाडला गेलेला तो अव्यक्त दगड शोधतोय… !!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “नदीमाय तुझ्या चित्तरकथेचे आम्हीच कलाकार…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

प्रिय नदीमाय, आज तुझ्या अत्यल्प वाहत्या पाण्यात मी एक कागदी नाव सोडली आहे. इतरांच्या नजरेतून लपवण्यासाठी कागदाची नाव केलेली आहे पण ती कागदी नाव नसून तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. सध्या तुझं वाहणं थांबलेलं असल्यामुळे निवांत वाच. मराठवाड्यात मान्सुन आगमनाचा पाऊस झाला नाही, परतीचा पाऊस चार दिवसांनी परतलेला असेल. पुढच्या हाहाकाराची चाहूल दिसतेय. माझ्या बालपणी तुझं खळाळतं रूप पाहिलेलं असल्यामुळे तुझी खंडमयता बेचैन करत आहे.

प्रिय नदीमाय, तुला वाटलं असेल की हे पत्र आजच का लिहिले असेल ? तर तुला सांगतो आज जागतिक नदी दिन आहे. नाही कळलं ? कळणार कसं गं तुला ?माझी भोळी माय. अगं आम्ही माणसं स्वतःचा जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा करतो. साधुसंतांचे, महापुरूषांचे, नारीरत्नांचे, वीरगाथांचे स्मरण  म्हणून जयंती पुण्यतिथी दिन साजरे करतो. निसर्ग शक्तीची पूजा म्हणून सण उत्सव साजरा करतो. तुझेही आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणून तुझाही दिवस साजरा करावा म्हणून जागतिक स्तरावर आम्ही ‘नदी दिन‘ साजरा करतो.

आता तुला प्रश्न पडला असेल की हे जग म्हणजे  काय आहे ? ती कथा खरेच खूप मोठी आहे. पण हीच कथा तुझ्या चित्तरकथेची पटकथा आहे. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इतक्या लांबच्या वर्षाची आहे की एकवेळ ऋषीचे कुळ सापडेल, तुझेही मुळ सापडेल पण मनुष्य जन्माचा नेमका आरंभ बिंदू काळाच्या मापन चौकटीत मांडणं कठीण आहे. हवा, पाणी, जमीन हे पृथ्वीचे आरंभीचे घटक. या घटकांनीच जैविक व अजैविक उपघटकांची निर्मिती केली. नव जीव-निर्मितीचे वरदान लाभलेल्या पृथ्वीवर मानव नावाचा जीव आला. गुहेचा ,डोंगरकपारीचा आधार घेत हा माणूस सुरुवातीला जीव मुठीत घेऊन राहत असे. अन् आता मानवामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा जीव मेटाकुटीला आला आहे. पशूपालन व शेतीसाठी माणसाला स्थिर पाणवठ्याची गरज निर्माण झाली. ही गरज नदीमाईने पुरविली‌. म्हणून आरंभीच्या मानवी वसाहती नदीच्या आधारानेच उभ्या राहिल्या. स्थिर जीवनामुळे माणसाची अन्नासाठीची भटकंती थांबली व थांबवलेल्या वेळेत त्याने विकास, प्रगती नावाखाली इतक्या उचापती केल्या आहेत की त्यातून निसर्गाला अपरिमित झळ पोहोचली आहे. नदीमाय तू सुद्धा त्यातून सुटली नाहीस. तुझ्याही ते लक्षात आलेच असेल. माय म्हणून तू आम्हाला माफ करत असशील, हे मातृत्व म्हणून ठीक असलं तरी आता तुझ्या नरडीभोवती फास आवळला गेला आहे. शेवटच्या घटकेत तुझी सुटका झाली नाही तर पुढची मानवी पिढी तुझ्या कोरड्याठाक काठावर मरून पडलेली असेल.

नदीमाय, किती गं सुंदर तुझा जन्म. उंच पठारावर, डोंगरपर्वतावर, बर्फाच्या साठ्यातून तुझा जन्म. पृथ्वीच्या पृष्ठावर पावसाच्या आगमनाने ओढलेली तू एक साधी रेषा. पण अशा अनंत रेषा, अनंत प्रवाह एकत्र येत तू नदी होतेस. घनदाट जंगलातून, भयानक दरीखोऱ्यातून, धबधब्यातून ओसंडून वाहत तू विशाल रूप घेत धावत मानवी वस्तीत येतेस. केवळ शेती व पशुपालन या आमच्या प्राथमिक गरजा होत्या तोपर्यंत आपलं नातं माय नदी व पुत्र मानव असंच होतं. आमच्या घरात जन्मलेल्या मुलींना नदीची नावं आहेत. नदीचे उत्सव आहेत. चित्रपटाची गाणी, नावे यांतसुद्धा नदी आहे. नदी व मानव एकरूप आहेत. पृथ्वी हे जर एक मानवी शरीर मानलं तर नदी ही पृथ्वीची रक्ताभिसरण संस्था आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगीकरण, कारखानदारी, व्यवसाय, अर्थाचा हव्यास इत्यादी कारणांमुळे मानवाने नदीच्या नरडीला नख लावले. जमिनीवरील भूखंड माफियांची एक शाखा वाळू माफिया म्हणून उदयास आली. नदीमाय, हे वाळू माफिया कुणी परग्रहावरील एलिएन्स नसून धरतीच्या लेकरातीलच हव्यासी लोकांचा कंपू आहे, जो सातत्याने नदीमायीच्या थेट गर्भात लोखंडी खोऱ्यांचा मारा करून शेकडो वर्षांनंतर तयार होणाऱ्या वाळू कणांची भ्रुणहत्या करून चोरी करत आहे.

जंगलातील वनस्पतींच्या मुळातून, मृदागंध खडकातून तू आमच्यासाठी अमृत चवीचे पाणी आणलेस. 

पण नागरी वस्तीत येताच आम्ही तुला काय दिले- तर न विरघळणारे प्लास्टिक, किळसवाणे घाणेरडे पदार्थ, दुर्गंधीयुक्त सांडपाणी, कारखान्यातील विषारी जल, अपरिमित कचरा, किती किती म्हणून सांगावं ? असं सांगितलेलं पण काही माणसांना आवडत नाही म्हणून तर गुपचूप पत्र लिहिले आहे.

नदीच्या आश्रयाने आमची कथा लिहिली आहे, पण आम्ही मात्र तुझी चित्तरकथा केली आहे. पण काही माणसं खूप चांगली असतात. ब्रिटनचा एक नागरिक आहे ,मार्क ॲंजोलो– त्यानेच तब्बल पंचवीस वर्षे थॉम्पसन नदीवर स्वच्छता मोहीम राबविली. नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम जगाच्या नजरेत आणून दिले. 

त्याने ही समस्या व उपाय जगाच्या नजरेत आणून दिले. नदी स्वच्छतेसाठी व नैसर्गिक जलस्त्रोत मोकळे करण्यासाठी हा ‘ नदी दिन ‘ आहे.नदीच्या आयुष्याचा गोंडस पट विस्कटून टाकणाऱ्या चित्रपटाचे सर्व कलाकार मानवी वंशाचे आहेत. आमच्यातीलच काहींनी तुझी चित्तरकथा केली आहे म्हणून तर मी तुझी उपकारक कथा आमच्या बांधवांना सांगण्याचे मनावर घेतले आहे.

‘ सिंधु ‘सारखी प्रगत संस्कृती तुझी देणगी आहे. एवढेच नव्हे तर मानवी संस्कृतीचा उदय, विकास व प्रगतीचा तूच आधार आहेस. अन्नासाठी मासेमारी, पोटासाठी शेती, उद्योगासाठी वीज, निवाऱ्यासाठी वाळू, वाहत्या पाण्यामुळे वनस्पतींचा बीजप्रसार, या सर्वांचे मूळ तू आहेस. म्हणून नदीमाय तू जगले पाहिजेस.

जलस्त्रोताबाबत उपकार , जनजागृती व नदी संवर्धन करणारा एक सेवक पुत्र म्हणून मी तुझ्या कामावर असेन .हा शब्द तुला देतो  नदीमाय….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  chambhareks79@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा…” ☆ श्री सुनील देशपांडे

आयुष्याचा ७३ वर्षाचा प्रवास संपवून आज ७४ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बरंच आयुष्य जगून झालेलं आहे. बाकी आयुष्य फार थोडं उरलेलं आहे याचे जाणीव आहेच. खरं तर या दिवसाला वाढदिवस का म्हणतात हे समजत नाही. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतं. वाढतो फक्त एक आकडा. जगलेल्या आयुष्याचा.  त्या वाढलेल्या आकडेवारीमुळे  लोकांना या माणसाने काहीतरी केलं असेल असं वाटत असावं.

तसं पाहायला गेलं तर करण्याच्या इच्छा प्रचंड असतात. साऱ्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. अर्थात अपूर्ण इच्छाच जास्त असतात. पण तरीही  आयुष्यात समाधान बाळगावं अशा गोष्टी घडल्यास जाताना तरी चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल.

बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकातील कवितेच्या ओळी आठवतात ….. 

आयुष्याचा माग मिळेना, गुन्हा कळेना जगदीशा ।

कुठे कधी अस्पष्ट हसावी एखादी तरी स्मितरेषा।।

आयुष्यामध्ये चेहऱ्यावर स्मितरेषा उमटण्यासारख्या घटना तशा कमीच असतात.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।

परंतु आयुष्याच्या शेवटाकडे असताना सिंहावलोकन करताना काही समाधानाच्या स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर असणार आहेत.

मुले कर्तृत्ववान आणि आई-वडिलांची काळजी घेणारी असावीत हा सगळ्यात मोठा कौटुंबिक समाधानाचा ठेवा. त्याची एक स्मितरेषा !

आपल्या देशात अवयवदान आणि देहदान या सर्व महादानाचे प्रमाण वाढते आहे ही एक सामाजिक स्मितरेषा !!

साहित्य विश्वात छोटीशी लुडबुड करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेता आले ही मानसिक समाधानाची अजून एक स्मितरेषा!!!

रोटरी मार्फत समाजाच्या उपयोगाचे काही उपक्रम करता आले त्याची एक आंतरराष्ट्रीय सामाजिक स्मितरेषा!!!!

आपल्या देशाचा झेंडा वैज्ञानिकांनी चंद्रावर फडकवला आणि आता मंगळ पदाक्रांत करून शुक्रापासून सूर्यापर्यंत लक्ष्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आहे ही राष्ट्रीय स्मितरेषा !!!!!

पत्नीची साथ शेवटपर्यंत (कुणाच्या ? ते माहित नाही) असेलच ४६ वर्षांचा सहवास ही आणखी एक स्मितरेषा !!!!!!

काही मित्रमंडळी, काही नातेवाईक, समाजकार्यातील सहकारी या सर्वांच्या आठवणीमध्ये माझी एखादी तरी स्मृती नक्की असेल याचे समाधान ही एक स्मितरेषा !!!!!!!

अशा अनेक स्मितरेषा या जगातून एक्झिट घेताना चेहऱ्यावर असतील आणि ही समाधानाची लकेर घेऊन या जगातून एक्झिट मिळेल हा आनंदाचा भाग.

(आयुष्याचे शेवटचे पर्व हे पुण्यात घालवता येणे हे, पुण्याचे (?) असले तरी त्यामध्ये आयुष्यभर गमावलेले पुण्य खर्ची पडेल काय ? ही सुद्धा भीती आहेच.)  

आयुष्याच्या शेवटच्या पर्वात आनंदाचे डोही आनंद तरंग या अवस्थेत असणे हे सगळ्यात मोठे भाग्य माझ्या वाट्याला आले याचे समाधान खूप मोठे आहे.

शेवटी माझ्याच एका जुन्या कवितेच्या  ओळी …… 

‘शेवटचे मिटताना डोळे, चेहऱ्यावरती स्मित  विलसावे !’ 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुसरी बाजू… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी बाजू… ☆ श्री सतीश मोघे

‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते ‘, हा वाक्प्रयोग आपण लहानपणापासून वाचलेला, ऐकलेला आणि बऱ्याच प्रसंगी आपली बाजू मांडतांना उपयोगात आणलेला आहे. पहिल्याच भेटीत किंवा एखाद्या प्रसंगी  समोरच्या व्यक्तीने केवळ एखादी कृती करणे, न करणे किंवा एखादे वाक्य बोलणे, न बोलणे यावरून समोरच्याविषयी आपले कायमचे मत न बनविता, काही काळ त्याच्या सहवासात राहून तो ज्या विचाराने चालतो आहे ते विचार, ज्या भावनांचा आदर करतो त्या भावना, त्याच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन या सर्व जाणीवांच्या संदर्भाने त्याच्या कृती अथवा उक्तीचा अर्थ लावावा, त्याच्याविषयीचे मत तयार करावे, असा या वाक्प्रयोगाचा मतितार्थ आहे.

कोणत्याही नात्यात नाण्याची समोर येणारी बाजू ,ही त्या व्यक्तीने पहिल्याच भेटीत अपेक्षित असलेली केलेली कृती किंवा उक्ती असते, अपेक्षित नसलेली केलेली कृती किंवा उक्ती असते किंवा अपेक्षा असतांनाही न केलेली कृती किंवा उक्ती असते. ही बाजू पूर्णत: त्या व्यक्तीच्या हातात असते. मात्र दुसरी बाजू समजून घेणे, हे त्या व्यक्तीच्या हातात नसून आपल्या हातात असते. आपल्याला अपेक्षित असलेली कृती तिने केली,  आपल्याला अपेक्षित असलेली उक्ती, म्हणजे यथास्थिती प्रेमाचे,कौतुकाचे, आधाराचे, उत्साहवर्धक बोल ती बोलली तर तिची दुसरी बाजू आपल्याला उजळ वाटून ती आपल्याला खूप प्रिय होते, थेट काळजात जाऊन बसते. तेच तद् विरुद्ध  बोलली, वागली किंवा अपेक्षित असे वागलीच नाही, बोललीच नाही तर तिची दुसरी बाजू काळी वाटून ती व्यक्ती अप्रिय होते. अशा पहिल्याच भेटीतल्या भाळण्याच्या किंवा पहिल्याच भेटीतल्या तिरस्काराच्या धावणाऱ्या भावनेला, ‘नाण्याला दुसरी बाजूही असते’ हा विचार वेग कमी करण्याचे स्पीड ब्रेकरचे काम करतो. भावनेला विचारांची जोड देतो.

काहींचे मन मोठे असते. पण हा मनाचा मोठेपणा योग्यवेळी, योग्य कृतीतून, वाणीतून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते किंवा ‘मनाचा मोठेपणा’ ही प्रदर्शन करण्याची वस्तू नाही, असाही त्यांचा अंतरीच भाव असतो. तर काहीचे मन अजिबात मोठे नसते, ते कोतेच असते. पण त्यांचे वागण्याचे,बोलण्याचे कौशल्य  असे काही असते की आपल्याला ते व्यापक हदयाचे, हितचिंतक वाटू लागतात. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसमवेत काही काळ राहून, संवाद साधत राहिलो तरच त्यांची दुसरी बाजू, समोर येते. या व्यक्ती अशा का वागतात? याची उत्तरे समजतात. चांगल्या व्यक्तींना न गमावण्यासाठी आणि चुकीच्या व्यक्तींच्या मोहपाशात न अडकण्यासाठी काही काळ जाऊ देणे आणि दुसरी बाजू समजून घेऊन मग निर्णय घेणे केव्हाही चांगले.

अर्थात अशी दूसरी बाजू समजून घेणे अशाच व्यक्तींच्या बाबतीत घडते, ज्या व्यक्ती आपल्याला जीवनात हव्याशा वाटतात. पहिल्याच भेटीत एखादी व्यक्ती आवडली नाही आणि भविष्यात त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात निकड नसेल किंवा अन्य कारणांमुळे ती नको असेल तर त्या व्यक्तीची दुसरी बाजू समजून घेण्याची आवश्यकता राहत नाही. मात्र अशावेळी कुठेही बोलतांना त्या व्यक्तिविषयी नकारात्मक, टिकात्मक बोलणे टाळले पाहिजे. कारण त्या व्यक्तीची दुसरी बाजू आपण पुरती समजून घेतलेली नसते. 

दुसऱ्या व्यक्तीची ‘दुसरी बाजू’ समजून न घेता अनेकांजवळ जर तिच्याविषयी आपण नकारात्मक बोललो तर ऐकणाऱ्यांसमोर नकळत आपल्या व्यक्तीमत्वाची नकारात्मक, अंधारलेली बाजू प्रदर्शित होते आणि आपण त्या क्षणी प्रियता गमावतो, आपले मूल्य कमी होते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. काही प्रसंगात आपलीही दुसरी बाजू असते, दुसऱ्याचीही दुसरी बाजू असते. सकृतदर्शनी दोन्हीही बाजू खऱ्या असतात. अशावेळी आपली दुसरी बाजू बाजूला सारुन, दुसऱ्याचीच दुसरी बाजू समजून घेणे हे आवश्यक असते. हेच मनाचा मोठेपणा दाखविणारे असल्याने जनमानसात तुमची उंची वाढविणारे असते.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती, त्या प्रसिद्ध लेखकांचा नामोल्लेख पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाकडून त्याच्या भाषणात करावयाचा राहून गेला. प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखकांनी त्यांच्या भाषणात याविषयी जाहिर नाराजी व्यक्त केली. यात दोघांच्याही ‘दुसऱ्या बाजू’सकृतदर्शनी खऱ्या होत्या. ‘अनेक व्यवधानात नजरचुकीने नामोल्लेख राहिला’, ही लेखकाची दुसरी बाजू. तर ‘मी रात्रभर जागुन, अल्पकालावधीत विनंती आली असतांना, प्रस्तावना लिहिली. लेखकाने भाषणात अनेकांचे उल्लेख केले, आभार मानले. आपलाही उल्लेख आवश्यक होता’, ही प्रस्तावनाकार लेखकमहोदयांची दुसरी बाजू .दोन्हाही बाजू  सकृतदर्शनी खऱ्या. पण मोठ्या माणसानेच मोठे मन दाखवून छोट्याची दुसरी बाजू समजून घ्यायची असते, या प्रस्थापित मूल्याला त्यांच्या कृतीने धक्का बसला आणि त्यामुळे जनमानसात  त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. उच्च पदावर पोहचलेल्या व्यक्तींवर समाजात वावरताना, व्यक्त होतांना,आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय अपेक्षित आहे? ही चाहत्यांची दुसरी बाजू समजून घेऊन कृती होणेही आवश्यक असते.

कोणत्याही नातेसंबंधात आणि त्यातही कौटुंबिक किंवा मैत्रीच्या नातेसंबंधात ‘समोरच्याची बाजू ऐकून घेणे’ याहीपेक्षा ‘ त्या व्यक्तीला समजून घेणे’ अधिक अपेक्षित असते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी मानवजीवनाची व्याख्या करताना असे म्हटले  आहे की, “माणसात देव आणि दानव दोघांचे अस्तित्व आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा आणि दानवांचा नाश करण्याकरिता होणारा संघर्ष म्हणजेच मानवजीवन आहे.” प्रत्येकाच्या ठिकाणी चांगल्या-वाईट वृत्ती असतात, गुण-दोष असतात. पण त्याची वाटचाल ही जर अधिक चांगले होण्याकडे, देवत्वाकडे असेल तर अशा व्यक्तीला समजून घेणे गरजेचे ठरते. मानवी जीवनाची ही दुसरी बाजू समजून घेतली,म्हणजे स्वीकारली की समोरच्या व्यक्तीला समजून घेणे सोपे जाते. दोषांचे, अवगुणांचे पाढे न वाचता गुण-दोषांची बेरीज वजाबाकी केली जाते.त्यात गुण अधिक असल्याचे दिसले तर ही अधिक गुणांची ‘दुसरी बाजू’ समजून घेऊन दोषांसह त्या व्यक्तीला  स्वीकारले जाते. बेरीज- वजाबाकीत दोष अधिक असल्याचे दिसले, तर त्या व्यक्तींचा आपण त्याग करतो किंवा दोष अधिक असूनही त्याग करण्याचे धैर्य नसेल किंवा असलेल्या नाजूक नात्यामुळे त्याग करण्याची मनाची तयारी नसेल, तर आहे त्या गुणांवर समाधानी राहून त्या व्यक्तीशी असलेले नाते आपण कायम ठेवतो. दुसरी बाजू  आणि त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया, आपल्याला नाते  टिकविण्याची  असलेली गरज, आपल्या अंगी असलेले धैर्य, मनाची तयारी, समाजाच्या टिकेचे भय अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. कौटुंबिक नातेसंबंधात दुसरी बाजू समजून घेणे हे बऱ्याचदा आपल्याच सहनशीलतेची परिक्षा असते.

काळाच्या ओघात नात्यांची वीण घट्ट होते. नात्यात आपलेपणा येतो, ओलावा येते. नाते परिपक्व होते. अशा परिपक्व नात्यात समोरच्याची बाजू त्याने न सांगता, न मांडताच ऐकू येते, समजते.ती समजून वागणे घडते. जवळच्या औषधाच्या दुकानात न मिळणारी आयुर्वेदिक औषधे आणायला बाबा मला सांगायचे. ऑफिसमधून निघाल्यावर कामाचा थकवा, ट्रॅफिक या सर्वात बऱ्याचदा लक्षात असूनही मी कंटाळा करायचो. घरी आल्यावर बाबा कधीही ‘औषध का आणले नाही?’ याचा जाब विचारत नसत. दुसऱ्यादिवशी ते फक्त एव्हढेच म्हणायचे ‘आज जमले तर आण.’ दुसऱ्याला जाब विचारून, त्याची दुसरी बाजू ऐकून मग आपले समाधान करून घ्यायचे, अशी लांबची प्रक्रियाच तिथे नव्हती. समोरचा, ‘तसेच योग्य कारण असल्याशिवाय  असे वागणार नाही, बोलणार नाही’, हा समंजस भाव व्यापक असला की,दुसरी बाजू न सांगताही समजते आणि समोरच्यालाही, झालीच चूक, तरीही आपली बाजू मांडण्याचे अवघड काम करण्याची आवश्यकता राहत नाही.नाती अधिक आरामदायी, सुखदायी, समृद्ध होतात. 

बऱ्याचदा ज्या व्यक्तीशी आपला कधीही प्रत्यक्ष संबंध आलेला नाही आणि आपण केवळ एक नामांकित, मोठी व्यक्ती म्हणून तिला ओळखत असतो अशा व्यक्तीच्या जीवनात जर एखादी  घटना घडली तर अशा घटनांबाबत सत्याची एक तिसरी बाजूही असते हेही लक्षात ठेवावे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, प्रसिद्ध अभिनेते जर रविंद्र महाजनी यांचा मृत्यू ही याची उदाहरणे देता येतील. त्यांच्या निधनाची आलेली बातमी ही  त्या घटनेची पहिली बाजू होती. माध्यमांनी माहिती मिळवून मांडलेली बाजू दूसरी बाजू होती. पण सत्याची तिसरी बाजू  गेलेली व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांनाच माहिती होती. तेव्हा अशा प्रसंगात दुसरी बाजू माहीत झाली तरी तिसरी बाजू ज्ञात नसल्याने दुसऱ्या बाजूच्या आधारे कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे उचित नसते.

असं म्हणतात की, चंद्रावर पोहचल्यावर चांद्र यानाला असे जाणवले की, ‘चंद्र माणसासारखाच आहे. त्यालाही दुसरी, काळी.. अंधारलेली बाजू आहे. पण तो, प्रकाशित बाजूच नेहमी सर्वांसमोर ठेवून आपला प्रभाव पाडत असतो.’ बऱ्याचदा ही दुसरी  काळी ,अंधारी बाजू ‘हे असेच असायचे’ याची खूणगाठ बांधून, त्याकडे दुर्लक्ष करून, उजळ बाजूकडे बघत ,आहे ते नाते टिकविण्यासाठी,  त्यात आनंद घेण्यासाठीच जाणून घ्यायची असते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे

आजकाल जिकडे पाहाल तिकडे सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज ची मांदियाळी आहे.

बिफोर अमुक वजन आणि आफ्टर 10 किलो, 20 किलो, 30 किलो कमी झाल्यानंतरचे हे व्हिडिओ  आपल्याला प्रेरित केल्यावाचून राहत नाहीत. आपलाही असाच एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ  बनवावा, ही सुप्त इच्छा नकळत मनात जन्म घेतेय, अनेकांच्या ! आणि मग सुरू होतो या ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा प्रवास….

जिमला जायचंच असं पक्कं ठरवलं की मग चौकशी केली जाते. जिममध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तिथल्या भिंतीवरचे मोटिवेशनल कोट्स वाचून, उत्साहवर्धक म्युझिक ऐकून, अनेक बॉडी बिल्डर मंडळींना ‘ हिरो ‘ स्टाईलने वजन उचलताना पाहून भारावून जायला होतं. मनातल्या ‘ ट्रान्सफॉर्मेशन ‘ची कल्पना डोळ्यासमोर तरळायला लागते आणि ती प्रत्यक्षात उतरणार, हे अगदी खरं वाटायला लागतं.

जिममध्ये सहा महिन्यांची, वर्षाची फी एकत्रित भरली की ‘ एवढा डिस्काउंट मिळेल ‘ अशी आकर्षक ऑफर बिंबवून सांगितली जाते. आणि आपणही आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात मान डोलावून मोकळे होतो. …  चला, पहिलं काम तर झालं ! जिमची फी भरली…

आता एवढे भारी व्यायाम प्रकार करायचे तर त्याला शोभून दिसणारे कपडे नकोत, साजेशे शूज नकोत ?

चला, बाजारात खरेदीला…. हुश्श !  सगळी तयारी परफेक्ट झाली… आता जिमला जायचं फक्त बाकी राहिलं…

…  जिमच्या पहिल्या दिवशी शरीराला सवय नसल्याने कमी व्यायाम करायचा असतो. पण काही उत्साही वीरांनी निश्चित टार्गेट एकाच दिवसात निम्म संपवायचं असं जणू मनात ठरवलेलं असतं.. सगळा व्यायाम आटोपला की थोड्या वेळाने अंगाची ओरडाआरडी सुरू होते.. हात जरासे हलवले तरी दुखतात… चालण्यासाठी पाय मुश्किलीने उचलावे लागतात… संपूर्ण शरीर ठणकत असतं… आणि मग…?

… मग, काय ? दुसऱ्या दिवशी जिमला सुट्टी !!!

मला कोणत्याही पद्धतीने व्यायाम, जिम अथवा जिम लावणारे यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही. 

वर सांगितलेलं हे फक्त एक जरासं रंजित पण खरं उदाहरण आहे. अनेकजण नियमितपणे व्यायाम करणारे आहेत, आरोग्याबाबत जागरूक असणारे आहेत व जिमला रेग्युलर जाणारे आहेत…

… पण माझा म्हणायचा मुद्दा एकच ! …

*जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बाह्य शरीरात हवंय, ते होण्यासाठी आणि ते करण्याअगोदर आपण आपल्या अंतररुपी मनोधारणेत बदल करणं खूप आवश्यक आहे,.. असं मला वाटतं*.

स्वतःला प्रत्येकाने एक प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे.. ” मला माझ्या शरीराबद्दल किती आदर वाटतो ?”

एकदा मनुष्याने स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करायला सुरुवात केली की, ह्या बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा होतो आणि तो पूर्ण व्हायला मदत होते. हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत.

अनेकदा आपण आपलं निश्चित ध्येय गाठतो, परंतु कमी केलेलं वजन परत वाढतं आणि आपण पुन्हा पूर्वपदाला येऊन पोहोचतो. असं का ? एकदा ध्येय गाठलं की संपलं…पुन्हा खमंग आणि गोडाधोडाचे पदार्थ खाणं सुरू होतं. जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवणं सुरू होतं….. 

…  आणि मग.. मग पुन्हा जैसे थे !

जर आपल्याला आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर मात्र सगळं बदलतं…

आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय. दहा दिवस खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असेल…

– तर मग मी तीस मिनिटे जरा एक्सट्रा फिरतो..

– घरात मिठाई बनवताना साखरेचे प्रमाण मी कमी करते..

– बाहेरून मिठाई आणताना लक्षात ठेवून मी कमी गोड मिठाई आणतो..

– बाप्पा घरी सुट्टीसाठी आलाय, पण मी माझ्या व्यायामाला अजिबात बुट्टी होऊ देणार नाही..

– बाप्पाला वेगवेगळ्या फळांचा प्रसाद ठेवूयात..

– घरच्या घरी प्रयोगशील बनून, बाप्पाला आरोग्यदायी रेसिपीची नवलाई चाखवूया..

… वगैरे, वगैरे.. असं सगळं निश्चित ठरवता येईल की.. 

पण हे सगळं फक्त बाप्पा घरी आहे तेवढ्यापुरतंच ठरवून — फक्त ठरवून नाही, तर प्रत्यक्ष आचरणात आणून चालणारच नाही. हे सगळे नियम कायमसाठी पाळले तरच अपेक्षित ते ट्रान्सफॉर्मेशन होईल ना ? मग त्यासाठी काय करायला हवं तर कोणत्याही मोहाला बळी पडताना, एक क्षण थांबून आपण स्वतःलाच विचारावं .. ..

* मला माझ्या शरीराबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल खरोखरच मनापासून आदर वाटतो की नाही वाटत ? आणि वाटत असेल तर मग ही अमुक एक कृती माझ्या आरोग्यासाठी हितदायक आहे का ? जर ही कृती केल्याने माझ्या आरोग्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार असेल, तर या क्षणिक मोहाला मी बळी पडणार नाही* ! आणि हा निश्चय मात्र अगदी ठाम हवा बरं का .. “ केल्याने होत आहे रे – पण – आधी केलेची पाहिजे “ हा उपदेश आधी तुमच्या मनावर बिंबवला जायला हवा. आणि तो अगदी काटेकोरपणाने आणि अगदी मनापासून पाळला जायला हवा. मग बघा तुमच्याही नकळत हळूहळू कसे हवे ते बदल व्हायला लागतात. 

सुरुवात जर या ‘ आंतरिक ट्रान्सफॉर्मेशन ‘ च्या  नियमित सरावाने  केलीत ना की तुमच्या ‘ बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन ‘ चा व्हिडिओ ‘ व्हायरल ‘ झालाच म्हणून समजा..!!!

मग आता लगेच करूयात अशा ट्रान्सफॉर्मेशन चा ‘ श्रीगणेशा ‘ ?

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांगता गणेशोत्सवाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ सांगता गणेशोत्सवाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

अनंत चतुर्दशी झाली! आज सकाळ उगवली, तीच मुळी मरगळलेली! सकाळी उठून बाल्कनीत गेले तर मागच्या कॉर्पोरेशनच्या मैदानावर वेगळेच दृश्य दिसत होते. कॉर्पोरेशनचे कामगार कामावर येऊन स्वच्छता मोहीम सुरू झाली होती.

कालपर्यंत मंगलमय वातावरणात असणारे ते ठिकाण, आज अगदी मांडव परतणे झाल्यावर दिसणाऱ्या लग्न कार्यालयासारखेच दिसत होते! जिकडे तिकडे कागद, फुलांचे निर्माल्य ,डेकोरेशनचे मोडके तोडके साहित्य, आणखी काय काय!

तिथे दोन मोठे पाण्याचे टॅंक गेले दहा दिवस पाण्याने भरून ठेवले होते. प्रत्येकाच्या गणेश विसर्जनाच्या पद्धतीप्रमाणे- दिवसाप्रमाणे रोज गणपती विसर्जनासाठी लोक येत होते. बाजूलाच कचरा टाकण्यासाठी निर्माल्य कुंड होते. कोणी त्यात व्यवस्थितपणे कचरा टाकत, तर कोणी दुरूनच फेकत! ज्यामुळे कुंडा बाहेरही कचरा! आरती साठी दोन टेबले होती, जिथे गणेश मूर्ती ठेवून लोक बाप्पाची आरती म्हणणे, नारळ फोडणे, पुन्हा पुन्हा देवाला ‘लवकर ये पुढच्या वर्षी’ अशी प्रार्थना करून मगच गणपतीला उचलत होते!

आज सकाळी ते मोठे पाण्याचे टॅंक ग्राउंड वरच ओतले गेले. तळाशी राहिलेली माती खोऱ्याने काढली जात होती. रंगीबेरंगी पाण्याचे ओघळ बाहेर लांब पर्यंत वाहत होते. गेले २/३ पाऊस असल्याने आधीच भिजलेले ते मैदान आता आणखी चिखलमय दिसत होते.जणू काही सगळ्याचेच विसर्जन झाले होते. शेवटी गणेशाच्या मूर्तीची माती या जमिनीतच मिसळून जात होती. मन भरून आले! कालपर्यंत देव्हाऱ्यात विराजमान झालेल्या या मूर्ती आज पुन्हा मातीत मिसळल्या! मातीचा होतो, मातीत मिसळलो याप्रमाणे! मधला काळ म्हणजे फक्त रंगमंचावरील काही काळाचे आगमन असंच वाटलं मला!

नकळत मनात आलं, शेवटी आपण म्हणजे तरी काय जन्माला येतो ते मातीचा गोळा म्हणून! त्याला घडवत आकार देत वाढवले जाते. आयुष्याच्या बालपण, तरुणपण, वृद्धत्व अशा अवस्था अनुभवत शेवटी मातीलाच मिळतो. पार्थिव गणेश आपल्याला हेच सांगतो. ‘या जगाचा मोह करू नका, हे तर सोडून जायचंच आहे, पण जोपर्यंत देहात आहात, तेव्हा चांगलं काही करा. प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा उत्सव असू दे!.’ जगण्याची ही उर्मी, आनंद आपण या गणेशा कडून शिकला पाहिजे….

कालच वाचनात एक कविता आली….

तळाशी जाता जाता,

आधी अंगावर लागलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर..

अलंकाराचे ओझं हलकं करायचं, कालांतराने..

स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे..

इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका, दैवत्वाची झालर सोडून द्यायची,

आणि त्याच मातीचा भाग व्हायचं,

जिथून आपण आलो होतो..

पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी,

बाप्पा जाता जाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो…’

अशी एक सुंदर कविता आज व्हाट्सअप वर वाचायला मिळाली. कवी कोण आहे ते लिहिले नव्हते, पण अगदी सुंदर शब्दात बाप्पाच्या जाण्याच्या रूपाची सांगता या कवितेत व्यक्त झाली आहे, ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते!

‘गणेशोत्सव’ हा आता आपल्या सामाजिक जीवनाचे एक अंग झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्रती जागरूकता आणि एकत्र येण्याची वृत्ती वाढावी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. स्वातंत्र्य तर मिळाले, पण सार्वजनिक गणेशोत्सव मात्र वाढत्या प्रमाणात साजरा होऊ लागला..

त्याचे काही चांगले, काही वाईट असे रूप आता आपल्याला बघायला मिळते.

गेला महिनाभर सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते राबत असतात. आपला देखावा अधिकाधिक चांगला, नाविन्यपूर्ण होण्यासाठी धडपडत असतात. तात्कालीन नवनवीन विषयांचा विचार करून त्यावर आधारित  देखावे, जसे यंदा चांद्रयान मोहीम, पुण्याची मेट्रो यासारखे उत्तम उत्तम देखावे उभारले गेले. काही मंडळे समाजोपयोगी कार्यक्रम यानिमित्ताने आखतात. जसे रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत, वेगवेगळ्या स्पर्धा….       या उत्सवामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना काम मिळते. उद्योग धंदा वाढतो, त्यामुळे पैसा खेळता राहतो. नवीन पिढीसाठी हे उत्साहाचे टॉनिक असते. शाळा शाळातून गणपती पूजा, अथर्वशीर्ष या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. शाळेतील गणपतीचेही चांगले डेकोरेशन केले जाते. मुलांच्या रोजच्या शाळेच्या चाकोरीबद्ध जीवनात हा एक चांगला बदल असतो. आनंददायी अशा या गणेशोत्सवाची सांगता आज झाली.

या बुद्धी दात्या गणेशाला आनंदाने निरोप घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा त्याच्याकडून घेऊया, म्हणजेच या गणेशोत्सवाची खरी सांगता झाली असे म्हणता येईल! जय गजानन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अमूर्ततेचा शोध ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ अमूर्ततेचा शोध… ☆ श्री सुनील काळे 

भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेगळ्या विचारसरणींची , वेगवेगळा पेहराव करणारांची जशी रेलचेल  आहे तशीच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत . काहीजण वास्तववादी चित्र काढतात , काहीजण व्यक्तीचित्र रेखाटण्यात तर काहीजण निसर्गचित्रात माहीर असतात . काहीजण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेली असतात . या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात . काही चित्रकार जलरंगात , काही तैलरंग तर काहीजण ॲक्रलिक रंगाचा वापर करतात .  एकाच विषयाच्या , वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात तर काहीजण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात . प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते .माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा पण त्याच्या प्रश्नानां उत्तरे देताना मी भांबांऊन जायचो कारण अँब्स्ट्रॅक्ट  चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक व मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .

1993 साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरी शेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो . त्याठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत . एके दिवशी खास मजबूत पॅकींग केलेले एक मोठे पार्सल खास स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते . एका मोठ्या चित्रकाराचे चित्र खास स्पेशल महागडी फ्रेम करण्यासाठी आले होते . ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण केले होते . त्यामूळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते .

वर्कशॉपचा इन्चार्च म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती . त्यासाठी मी सर्व तयारी केली . पण मलाही चित्र समजून घेण्याची उत्सुकता मोठी होती . वर्कशॉपला एक मोठे बर्हीवक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले . ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पहात होतो . कधी दूरून पाहायचो . त्या अदभूत चित्राचे आकार , रंगाचे ॲप्लीकेशन भलतेच वेगळे वाटत होते . कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता . कधी वाटायचे फाटक्या विविध रंगाच्या लहानमोठ्या  चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत . तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगाच्या फटकाऱ्यांमूळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे . संपूर्ण चित्रात एक निर्जर निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे , स्वच्छन्दीपणे वहात आहे . ते चित्र गतिमान वाटायचे तर काही अँगलमधून शांत वाटायचे . अनेकवेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता . त्या चित्राचे न समजलेले आकार , रंग , चित्राची रचना कित्येक वर्ष कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती . ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते .

पावसाळा संपल्यामूळे आज सकाळी सगळीकडे स्वच्छ वातावरण होते . मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो . सगळीकडे हिरवागार परिसर , थंड हवा व नुकतीच सुर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर पडल्यासारखे चमकत होते . अनेकविध पक्षांच्या चिवचिवटामूळे आसंमतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते .

नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भूत चित्र दिसले . नदीच्या प्रवाहातून वहात आलेली घाण ,माणसांनी टाकलेली रंगीबेरंगी फाटलेले कपडे , प्लास्टीकच्या पिशव्या , बारदाने , थर्माकोलच्या वस्तू , बिसलरीच्या बाटल्या , जुन्या बॅगा , वापरलेल्या बूटांच्या व चपलेच्या जोड्या , झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यावर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या . 

ती लाल ,पिवळी , जांभळी असंख्य अनेकरंगी छोटी छोटी फाटकी लफ्तरे निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती . त्याच्या एकत्रित असण्याने ,फडकण्यामूळे त्या कॅनव्हासला एक अद्भूत गुढता निर्माण झाली होती . त्या चमकणाऱ्या सुर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एका मोठ्या अमूर्त पेंटींग असल्यासारखाच भासत होता . 

तीस वर्षानंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलघडत होता . माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू , माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच  किनाऱ्यावर मुक्तपणे सोडून नदी मात्र स्वच्छपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या उर्जेने , नव्या उमेदीने , नव्या धेय्याने , नव्या आकांक्षेने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . 

कोणतीही अपेक्षा , कोणतीही गुंतागुंत ,  कोणतीही तक्रार न करता ,मनात कोणतीही आढी न ठेवता स्वच्छ पाण्यासोबत नदी वेगाने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . . . 

आपणही कोणती अढी , कोणत्या इच्छा , कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वहात राहत राहीले पाहीजे कशातही गुंतून न राहता.  सगळा जात , पात, धर्म , उच्च , नीच आशा , अपेक्षांचा साचलेला डोक्यातला कचरा , राग , लोभ, मोठेपणाची हाव किनार्‍यावरच सोडून दिली पाहीजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहीजे …. नदीप्रमाणे  

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : Sunilkaleartist@gmail.com

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘ रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं ‘..  

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी…  वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतीची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ ये इकडे, तिचं संपायचं नाही ‘. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे….  विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘ पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या ‘. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा !  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे….”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय, नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. .

लेखक : श्री जयंत विद्वांस

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा  आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares