संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “रमा.. माझा आदर्श..“ ☆ संध्या बेडेकर ☆
Always Remember Life In Front Of You Is more Important Than Life Behind You.
मी आणि रमा दोघी बाल मैत्रिणी. अगदी शाळेपासून बरोबर. लग्नानंतरही दोघी एकाच शहरात. मी लहानपणी रडू बाई होते. रमा मला सांभाळायची. माझ्यासाठी भांडायची. मला समजावून सांगायची. तिच्या मुळे मी आपली लढाई लढायला शिकले. तिच्या संगतीत माझा आत्मविश्वास वाढला. लग्नानंतर ही आमची दोस्ती आधी पेक्षाही जास्त झाली.
आता तर सर्व मनमोकळेपणाने बोलायला एक भरवशाचे ठिकाण होते. वयाच्या वेगवेगळ्या फेजचे प्रश्नही वेगळेच असतात. त्या त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती प्रमाणे, स्वभावानुसार घेत असतोच. बरोबर कोणी आधार देणारं असेल तर प्रवास थोडा सोपा होतो.
रमा नेहमी म्हणते,
अग! आपल्या आयुष्याची १००% जबाबदारी आपलीच असते. आपण कसं वागावं? हा आपला निर्णय असतो. लोकांनी ठरवायला आपले प्रश्न म्हणजे काही ग्राम पंचायतीचे मुद्दे नाहीत.
खूप कमी लोक असतात, जे आपल्याला समजतात.
रमा म्हणजे देवाने मला दिलेलं सुंदर, मुल्यवान उपहारच आहे, असं मी समजते.
असे आमचे एकमेकांच्या सहवासात वैवाहिक जीवन मजेत सुरू होते. आमच्या नवऱ्यांची पण दोस्ती झाली, त्यामुळे आमची चौकडी मजेत होती.
रमा तेथे क्षमा अस बरेच जण म्हणायचेही.
आजही मला ती सकाळ आठवते. रामाचा फोन आला. म्हणाली,
अग! सेवासदन दवाखान्यात तुम्ही दोघे लवकर या. हे चक्कर येऊन खाली पडले. अजय ऑफिस मध्ये गेलाय.
आम्ही दोघं लगेचच पोहचलो. तोपर्यंत सर्व संपलेल होत. सिव्हीयर हार्ट अटॅक. अचानक सर्व जग बदलल. वयाच्या पन्नाशीतच रमावर सर्व जबाबदारी आली. तिची शाळेची नोकरी, अजय नुकताच नोकरीला लागलेला. रमाच्या मुलीचे पल्लवी चे लग्न दोन वर्षांपूर्वीच झालेलं.
हळूहळू परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतः लाच सांभाळत रमा पुन्हा उभी राहिली.
मागच्या वर्षी अजयचे लग्न झाले. अनिता घरात आली.
अजय अनिता, म्हणाले
अग! आई तुला नोकरी सोडायची असेल तर तू सोड. अगदी मजेत रहा, नोकरीमुळे तुला तुझे छंद, enjoy करता येत नाहिये. रमा छान गाणं म्हणते. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेते. आपल्या मैत्रिणींचा गृप तयार करून त्यांना पण स्पर्धेसाठी तयार करते. हसतमुख मृदुभाषी रमा सर्वांना आवडते. नोकरी मुळे माझा वेळ छान जातो, म्हणून नोकरी पण करते.
पुन्हा एकदा आयुष्याची घडी व्यवस्थित बसली होती, म्हणण्यापेक्षा वैचारिक ताकदीने तिने आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला होता.
अनुजाचां जन्म झाला आणि घरात पुन्हा नव्याने उत्साह संचारला.
देवाने बहुतेक रमाची परीक्षा घ्यायचे ठरविलेच होते.
पुन्हा एकदा ती भयावह सकाळ होती. रमाचा फोन आला म्हणाली,
अग! पल्लवी ला बरं नाहिये, म्हणून तिला दवाखान्यात भरती केलय. काय झालं? काय नाही? समजायच्या आत पल्लवीला देवाज्ञा झाली.
एका समस्येतून स्वतः ला सांभाळतच होती तर, दुसरी समस्या समोर उभी. पल्लवी ची दोन लहान मुलं, जावयी आणि अर्ध्यावर संसार सोडून पल्लवी गेली.
कधी कधी देवालाही प्रश्न विचारावेसे वाटतात. असं का? कशासाठी एवढी शिक्षा? एक साधारण जीवन जगणारा माणूस अशी एवढी मोठी कोणती चूक करतो? की ही अशी शिक्षा? ग्रहांचा एवढा प्रभाव, एवढी वक्रदृष्टी?? की ज्या दिवशी देवाने रमाची पत्रिका लिहायला घेतली, त्यादिवशी देवाचा मूड ठीक नव्हता.? की मागच्या जन्माचे भोग? हे तर आपल्या समजण्याच्या पलीकडचे प्रकरण आहे.
देवाचा हा हिशेब आजपर्यंत कोणालाच कळला नाही. त्याची आज्ञा मानन्या पलीकडे आपल्या समोर दुसरा काही पर्यायही नसतोच.
Sometimes you have to accept the facts that certain things will never go back as they used to be.
परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलते. कधी माणूस हताश होऊन देवाला, आपल्या भाग्याला कोसतो, तर कधी आपण बघतो
Strong men don’t complaint. They adjust, adapt and conquer the situation.
रमा म्हणजे असच एक strong व्यक्तिमत्व.
ती नेहमी म्हणते,
Always Remember life in front of you is more important than the life behind you.
पुन्हा एकदा गाडी रूळावरून घसरली. अशा वेळेस प्रत्येक दिवशी एक नवीन परीक्षा असते. Head of the family म्हंटल्यावर तसं वागायची जबाबदारी पण असतेच.
प्रोब्लेम सगळ्यांनाच असतात फक्त त्या प्रोब्लेम मधून बाहेर पडायला भावना, वास्तविकता, समोर उभी असलेली परिस्थिती यांचे विश्लेषण करत दररोज या परिस्थितीत काय महत्वाचे आहे? याचा विचार करून भावनांवर कंट्रोल करता आला पाहिजे. हे तेवढं सोपं काम नाही. त्याकरिता आपल्या पेक्षा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो.
. Strong people never accept the definition of life from others. They say,
It is my life. I will define it as per requirements of my family.
रमाने पुन्हा एकदा धैर्याने परिस्थिती ला तोंड दिलं. यावेळेस एक नाही दोन दोन परिवारांना सांभाळलं.
काळ कोणत्याही परिस्थितीवर औषध आहे. हे खरंय.
जसजसा काळ पुढे सरकत होता, पल्लवी ची मुलं मोठी झाली.
आज तर शिक्षण संपवून चांगल्या नोकरीत आहेत.
कोणतेही प्रोजेक्ट कसे successfully पूर्ण करावे? हे कोणीही रमा कडून शिकावे.
मधल्या काळात रमाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच झलक मला दिसली.
अनुजाच्या जन्मानंतर, दुसऱ्या बाळासाठी इच्छा असूनही अजय अनिता दोघे दुविधेत होते.
घरात सर्वच नोकरी करणारे, मग नवीन छोट्या बाळाला कोण सांभाळेल?
यावर चर्चा होताना, रमाने सहजच निर्णय घेतला.
म्हणाली,
अग! अनिता, मी सोडते ना नोकरी. आता माझी पेंशनेबल नोकरी झालीय. मी लक्ष देईन घराकडे, बाळाकडे. अनुजा ला एक बहिण/ भाऊ नक्की असू दे. अग! काळजी करू नका. मैं हून ना!
हा नोकरी सोडण्याचा निर्णय एवढा सोप्पा होता का? पण अगदी सहजपणे रमाने घेतला. रमा सारख्या लोकांचे विचार vision खूप क्लीअर असतात.
म्हणतात ना,
हम क्या करते इसका महत्व तो हैं ही । परंतु हम किस भाव से करते हैं? इसका महत्व अधिक हैं।
खरंय,
Family is not about blood, It is who is willing to hold your hand when you need to hold it.
आज आम्ही दोघीही सिनियर सिटीझन आहोत. आजही रमाच्या उत्साह बघण्यासारखा आहे. घर, जबाबदारी, त्याचबरोबर आपले छंद जोपासणे याचे गणित/ तालमेल जमत तिला.
मैत्रिणींचा खूप जमावडा नसला तरी चालतो. रमा सारखी एक मैत्रिण म्हणजे माझ्यासाठी लॉकर मध्ये ठेवण्यासारखा मुल्यवान ठेवा आहे.
आम्ही दोघी एकाच वयाच्या मैत्रिणी असलो, तरीही मला तिच्या बद्दल खूप आदर आहे.
Thank you Rama for being with me.
I always enjoy company of People who introduce you to new ways of thinking and new ways of seeing life. They are always very important for me.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





