मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची छायाचित्रे..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची छायाचित्रे.. ☆ संध्या बेडेकर ☆

न्युटन ने अगर गिरे हुए सेब की जगह गिरे हुए लोग देखे होते तो *gravity *की जगह *Humanity* की पढाई हो रही होती.  

श्रावण महिना म्हणजे विशेष महिना. श्रावण सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, असे अनेक सणवार आणि १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळी 

महिने केंव्हा सुरू होतात ? आणि केंव्हा संपतात, कळतच नाही. नवीन लग्न झालेल्यांच्या घरी अजून एक भर म्हणजे मंगळागौर पूजन. एकंदरीत उत्साही वातावरण.

आमच्या भजन मंडळीला अनेक ठिकाणी भजनासाठी आमंत्रण असते.

दरवर्षी आम्ही दोनदा तरी भजन आनंदवन आणि आसरा या वृद्धाश्रमात करतोच.

तेथील लोकांना पण आता आमची सवय झाली आहे.

तेथे गेल्यावर मात्र आयुष्याची अनेक छायाचित्रे प्रकर्षाने जाणवतात. रंगीन असं एकही चित्र दिसत नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं ज्यांना आयुष्यात लहान सहान कारणांवरून तक्रार असते ना त्यांनी मधून मधून वृद्धाश्रमाला भेट द्यावी. अशा सर्वांचे डोळे उघडतील आणि डोकं ठिकाणावर येईल.

बरे असो,

वृद्धाश्रमाचे नाव जरी आनंदवन असले तरी आनंदाचा अभाव स्पष्ट जाणवतो. प्रत्येक चेहर्यावर नकळत नजर थांबते, चेहऱ्यावरील भाव वाचायचा मी प्रयत्न करते. त्यांच्या डोळ्यातील स्तब्ध भाव त्यांच्या दुःखाची, पण स्पष्ट न दिसणारी अनेक कारणं मनात धुमाकूळ घालतात.

येथे स्वइच्छेने कोणी येत असेल का ? 

या लोकांचे कोणी नातेवाईक नाहीत का ? यांची मुल कुठे आहेत ? यांनी कोणती नोकरी केली असेल ? यांचे येथे येण्याआधीच आयुष्य कसे असेल ? यांना कोणी भेटायला येत असेल का ? घरच्यांनी पण नाइलाजाने यांना इथे ठेवले असेल का ? 

त्यांचा पण आयुष्याचा काही काळ मजेत गेला असेलच ना. खटृटी मीठी यादें असतीलच ना. त्यावेळी आयुष्य नावाच्या पुस्तकाचे पूढचे पान त्यावर काही तरी भारी लिहिलं असेल या आशेने / विचाराने पलटवत असतीलच ते. आता ते पुस्तक बंदच करून ठेवलं असेल का त्यांनी ? 

 एका खोलीत चार अनोळखी माणसं एकत्र राहतात. सर्व जेष्ठ, एकटे, मनाने खचलेले,

एकमेकांना बघून यांच्या दुखात भरच पडत असणार. कदाचित समदुःखी असल्याने आपापल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं जमत असेल का त्यांना ? 

शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. काही तर अगदी फाइव स्टार आहेत. तेथे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बिचारा भाव दिसत नाही. पण येथे मात्र त्यांना बघून जीव कासावीस होतो.

प्रत्येक वर्षी दोन चार नवीन चेहरे दिसतात, तर जूने चेहरे गायब असतात. ते कुठे गेले ? आपल्या घरी गेले का ? असा विचार मनात येतो पण विचारायची हिम्मत होत नाही.

आज कार्यक्रम चालू असताना एक गृहस्थ उमाताईंजवळ आले आणि म्हणाले, 

“तुमची काही हरकत नसेल तर त्या तिथे बसलेल्या ताई आहेत ना, त्या छान गाणं म्हणतात. त्यांना एक भजन म्हणू देत का ? “

 उमाताईंनी लगेच हो म्हंटल आणि लगेच पेटीची साथ दिली. थोड्या वेळ का होईना त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंदी भाव बघून आम्हाला बरं वाटलं 

आज भजन झाल्यावर, संस्थेचे संस्थापक बरोबर चहा घेत असताना त्यांनी आपले अनुभव सांगितले. सध्या सामाजिक परिस्थिती कशी खालावली आहे त्याबद्दल ते बोलत होते. एकेक *खरी गोष्ट * ऐकून जीव खालीवर होत होता.

सध्या लोकांची वैचारिक समीकरण चूकत आहेत. संवेदना जणू मेल्या आहेत. लोक माणूस घाणे झाले आहेत. बाकीचे जाऊ दे स्वतः चे आई वडील पण नकोसे झाले आहेत.

सामाजिक परिस्थिती भयावह आहे.

अस प्रत्येक घरी आहे, असं म्हणता येणार नाही. पण प्रमाण वाढत चाललंय. सामाजिक आरोग्य ढासाळलय. हा रोग तीव्र गतीने वाढतोय. कॅंसर सारख्या रोगांवर रामबाण औषध शोधणं सुरू आहे. पण या रोगांवर औषध काय ? 

म्हणूनच की काय, 

काल आसाम सरकार ने या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सुट्टी जाहीर केली आहे.

ती कशाला ? 

तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या आईवडिलांबरोबर ही सुट्टी घालवावी यासाठी.

म्हणजे आता परिस्थिती ही आहे की हे सांगावं लागतंय. कुठून तरी सुरुवात करणं पण गरजेचे आहे.

संस्थापक जे सांगत होते, 

त्यात नटसम्राट चे उदाहरण होते. तर मुलांनी वृद्धाश्रमात आईला किंवा वडिलांना आणून सोडलेली अनेक व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यांची तब्येत खराब आहे हे सांगायला फोन केला, तर तो सुद्धा उचलत नाहीत. आपण कोणालाही नकोसे आहोत ही भावना च माणसाला अर्ध अधिक संपवते. हे असे लोक जीवन जगत नाही तर दिवस काढतायेत. श्वास चालू असेपर्यंत जगणार आहेत नाईलाजाने.

मी सहज त्यांना मला तेथे ओळखीचे वाटणाऱ्या एका गृहस्थांबददल विचारले तर ते म्हणाले, 

अहो!! ते सहकार नगर मध्ये राहणारे श्री देशमुख आहेत. बायको मागच्या वर्षी गेली. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. एका मोठया कंपनीत वैज्ञानिक आहे.

Gravitational force संबंधित काही तरी research करतोय म्हणे.

आई गेली तेंव्हा किंवा त्यानंतरही *त्याला* भारतात येणे जमले नाही.

मोठा माणूस तो. म्हणून वेळ मिळाला नाही. 

संस्थापकांचा राग लक्षात आला.

देशमुख येथे रहात नाही पण आठवड्यातून दोन तीन दा येतात. छान इंग्रजी बोलतात. खूप पुस्तकं वाचतात. सर्वांशी गप्पा मारतात, सर्वांना बरोबर घेऊन बाग काम करतात. त्यांच्या येण्याने येथील वातावरण थोडं बदललंय.

तेवढ्यात श्री देशमुख तेथे आले. आमच्या बरोबर गप्पा मारत होते.

चेहऱ्यावर, बोलण्यात आत्मविश्वास होता.

जे झालं ते झालं. त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पूढे काय करायचे ? हे बघावे. या मताचे असावे. 

असे त्यांच्या बोलण्यावरून वाटल. श्री देशमुख म्हणाले, 

मी पण त्यांच्यातलाच एक आहे. त्यांचा एकटेपणा, दुःख मी समजू शकतो. मी येथे रहात नाही पण मधून मधून येतो.

स्वतः ला किती ही समजवा, किती ही बहादुर बनायचा प्रयत्न करा, शेवटी कुठे तरी हृदयात दबलेले दुःख, ती जखम आपल डोकं वर काढतेच ना.

सहजच देशमुख साहेब बोलून गेले.

माझा मुलगा अमेरिकेत वैज्ञानिक आहे. Gravitational force च्या संदर्भात Reaserch करतोय.

थोडं हसून (?) म्हणाले, 

ज्यावेळी न्युटनने सफरचंद खाली पडताना बघीतले आणि gravity चां शोध लावला. त्यावेळी जर त्याने माणसाला खाली पडताना बघीतल असतं तर बर झालं असतं. आज लोकांनी gravity च्या ऐवजी Humanity चां अभ्यास केला असता. 

नाही का ? 

सर्व स्तब्ध होते. जग पूढे चाललंय, पण आपण ? प्रत्येकाच्या चेहर्यावर अनेक प्रश्न होते.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संस्कार म्हणजे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “संस्कार म्हणजे…☆ श्री जगदीश काबरे ☆

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.

गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे.

 

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव.

… विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.

… प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे,

 

उदाहरणार्थ – – 

.. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.

.. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रवृती.

.. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती.

.. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.

 

… म्हणून आपल्या कृत्याची जबाबदारी नशिबावर, ईश्वरावर न ढकलता प्रत्येकाने आपल्या आत डोकावून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वीकारली पाहिजे.

आणि त्यासाठी ईश्वराची नाही तर सदविवेकाची गरज आहे. –

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अतुल्य के. व्ही.

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

फक्त एक स्विच ‘ऑन’ केल्याने – – 

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत.

संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु. ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।

पु. ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

मग साहीरजींनी तो शेर ऐकवला – 

“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी। 

सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,

खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?

अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,

रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।”

… आणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांनी तो पूर्ण शेर मराठी रुपांतर केलेला होता.

“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,

एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी

ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी 

सेजेशी समई मी लावू कशाला?

जुळत्या जीवालागी जळती कशाला?

अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,

रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.

ह्यातील *’झुंझुरता’* ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा…

… आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु. ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

असे हे आपले मराठी प्रतिभावंत…

… एक नंबरी सोनेरी नाणं…

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रात्रभर जागणारी पिढी आणि… गप्प होत चाललेले पालक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रात्रभर जागणारी पिढी आणि… गप्प होत चाललेले पालक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

रात्रीचे एक दोन वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून थोडासा अंधुकस लाइट बाहेर पडत असतो. आईला मध्येच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाईल असतो. कानात इयरफोन. स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं.

“अजून झोपला नाहीस?”आईचा प्रश्न. “हो ना… पाच मिनिटांत झोपतो. ”हे पाच मिनिटं मग एक तास होतात. दोन तास होतात. आणि शेवटी रात्र संपते.

हे दृश्य आज अनेक घरांमध्ये रोज घडतं आहे.

सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत झोप. उठल्यावर चहा हातात आणि पुन्हा मोबाईल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते.

रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवातच दुपारच्या सुमारास होणं आणि मग पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप किंवा स्क्रीनसमोर बसणं हे अनेक मुलांचं रूटीन बनलं आहे.

 

काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे. हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच असते. मनाला शांत झोप हवीच असते. डोळ्यांना अंधार हवा असतो. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी वेळ हवा असतो.

पण आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा करत आहे.

 

आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग होतं. रात्री गच्चीवर झोपायचं. तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याआधीच जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा.

आज अनेक मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही. त्याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीशी आणि भविष्यातील जीवनशैलीशी आहे. पण आजची पिढी जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागली आहे.

 

पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो. सुरुवातीला आम्ही सांगतो. खूप प्रेमाने सांगतो. नंतर समजावतो. पुन्हा पुन्हा सांगतो. कधी रागावतो. कधी विनवणी करतो. पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं.

“आम्हाला माहिती आहे. ”

“तुम्ही काळजी करू नका. ”

“सगळेच असं करतात. ”

“आमच्या जनरेशनचं लाइफ वेगळं आहे. ”

ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात. पण त्यांचं मन मात्र शांत नसतं. कारण अनुभवाने त्यांना माहीत असतं की शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावी लागते.

वीस-पंचवीस वर्षांच्या वयात काही परिणाम जाणवत नाहीत. पण सततची अपुरी झोप, अस्थिर दिनचर्या, शारीरिक हालचालींचा अभाव, स्क्रीनचा अतिरेक आणि मानसिक ताण याची छोटी छोटी बीजं नकळत पेरली जात असतात.

उद्या त्याच बीजांचं झाड उभं राहतं. चिडचिड वाढते. एकाग्रता कमी होते. उत्साह हरवतो. नात्यांमध्ये संवाद कमी होतो. आत्मविश्वास डळमळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातील साध्या साध्या गोष्टींमधला आनंद हरवायला लागतो.

पण पालकांना सर्वात जास्त वेदना या परिणामांची नसते.

त्यांना वेदना असते ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचता न येण्याची.

प्रत्येक पिढीला वाटतं की पालक आपल्याला समजून घेत नाहीत. पण सत्य हे आहे की आई-बाबा मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात.

लहानपणी मुलांच्या रडण्याचा अर्थ समजून घेतात. शाळेतल्या भीतीचा अर्थ समजून घेतात. पहिल्या अपयशाचं दुःख समजून घेतात. पहिल्या प्रेमाची चाहूलही ओळखतात. मुलं काही बोलली नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून मनातील गोष्ट वाचतात.

मग एक वेळ अशी येते की तीच मुलं मोठी होतात आणि म्हणतात,

“तुम्हाला काहीच समजत नाही. ”हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करतं. कारण त्यांना माहिती असतं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलं आहे.

 

आई-बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात.

ते त्यांच्या स्वप्नांचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करणारे पहिले लोक असतात. त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात.

मुलं आजारी पडली की रात्रभर जागणारे तेच.

मुलांना यश मिळालं की स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच.

मग ते रात्रभर जागू नकोस असं सांगतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते.

त्यामागे प्रेम असतं.

काळजी असते.

अनुभव असतो.

आणि एक निःस्वार्थ भीती असते

“आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये. ”

पण सतत समजावूनही जेव्हा काही बदल होत नाही, तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात.

मुलांना वाटतं की आता त्यांना काही फरक पडत नाही.

पण खरं तर त्यांना खूप फरक पडत असतो.

फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की आता शब्दांची ताकद संपली आहे.

आता अनुभवच शिकवणार आहे.

हे गप्प होणं म्हणजे हार नाही.

तो एक प्रकारचा दुःखी स्वीकार असतो.

ज्यादिवशी पालक बोलणं कमी करतात, त्यादिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते.

उलट ती आणखी वाढलेली असते.

कारण आई-वडील असणं ही अशी अवस्था आहे की मुलं पन्नास वर्षांची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही.

त्यांच्या वयाबरोबर काळजीचं स्वरूप बदलतं, पण काळजी कधीच संपत नाही.

म्हणूनच आजच्या मुलांना एक विनंती आहे.

आई-बाबांचं प्रत्येक म्हणणं मान्य करा असं नाही.

प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत व्हा असंही नाही.

स्वतःचे विचार ठेवा.

स्वतःचे निर्णय घ्या.

स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा.

पण कधीतरी त्यांच्या बोलण्यात दडलेलं प्रेम ऐकण्याचा प्रयत्न करा.

कारण आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा आई-बाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ अचानक समजू लागतो.

आणि मग मनात एकच खंत राहते—

“हे तेव्हा समजलं असतं तर किती बरं झालं असतं. ”

 

आजही अनेक घरांमध्ये एखादी आई रात्री उठून मुलाच्या खोलीत डोकावते.

एखादा बाबा सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलाकडे पाहून न बोलता निघून जातो.

ते काही बोलत नाहीत.

रागावत नाहीत.

वाद घालत नाहीत.

पण त्यांच्या मनात एक नि:शब्द प्रार्थना सतत सुरू असते,

“देवा, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य दे. योग्य समज दे. त्यांना सुखी ठेव. आणि जे आम्ही शब्दांत सांगू शकलो नाही, ते त्यांना आयुष्य वेळेवर शिकवो. ”

कारण जगातलं सर्वात निःस्वार्थ प्रेम कोणतं असेल, तर ते पालकांचं.

ते कधी उपदेशाच्या रूपात दिसतं.

कधी काळजीच्या रूपात.

कधी भांडणाच्या रूपात.

आणि कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दांमधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वात खरी भाषा असते.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मैत्र☆  कल्याणी केळकर बापट

काल व्हॉट्स ॲप वर एक खूप विचारात पाडणारा फोटो बघितला. त्या फोटोमध्ये दहा वर्षांच्या अंतराने छोट्या चार स्टेजेस दाखवण्यात आल्या होत्या. साधारण 1995 मधील फोटोत सहा सात समवयस्क मित्र घोळका करून बसले असतात आणि मनमोकळी विचारांची देवाणघेवाण करीत असतात. दुसऱ्या फोटोच्या भागात ही मित्रांची संख्या थोडी कमी होते. हा फोटो साधारण 2005 मधील. पुढील 2015 सालच्या फोटोत ही मित्रांची संख्या जरा जास्तच रोडवते आणि अगदी दोन तीन मित्र साथीला असतात. आणि शेवटचा फोटो 2025 मधील ह्यात तो मुलगा एकटाच बसला असून बाजूला म्हणजेच साथीला व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि अशीच मंडळी असतात.

खरं सांगायचं तर कोंबडी आधी की अंडे आधी ह्या न उत्तर मिळणाऱ्या प्रश्ना सारखा प्रश्न मनात लगेच येतो की मित्रांची संख्या घटल्याने वा दुर्मिळ झाल्याने ह्या आभासी गोष्टींची मदत घेतल्या जाते की ही मदत घेऊन आभासी गोष्टींना जवळ केल्याने मित्र दुरावल्या जातात ?

ह्या गोष्टीचा विचार करता एक गोष्ट नक्की. “मैत्र” ह्या संकल्पनेत झपाट्याने बदल होत गेला. सहसा सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीची जाणीव अगदी बालवयात शेजारी राहणाऱ्या समवयस्क मुलांकडून होत असे. आणि ही अगदी सुरवातीची घट्ट मैत्री पुढे काही काळाने परिस्थिती मुळे दूर गेल्यासारखी वाटली तरी मनात मात्र त्या जुन्या लहानपणच्या मैत्रीचे धागे घट्ट गुंफल्या गेलेले असतात. मैत्रीची जपणूक करण्यासाठी द्यावा लागतो वेळ, कायम मदतीचा हात आणि परस्परांमध्ये हवी सद्भावना.

आभासी जगातील मैत्र हे खरं, कायमस्वरूपी टिकणारे मैत्र नव्हेच. फ्लॅट संस्कृती मधील कायमदार बंद संस्कृती ही अनमोल मैत्र गमावतेय हे नक्की.

 

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राउंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबुनच कानी आला…

” इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं तर… मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची? “

” हो ग खरचं त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती ?”

जया म्हणाली,

 ” त्यांचही काहीतरी कारण असेल ना?त्याशिवाय का कोणी युद्ध करेल.. ?

आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं,

” आज काय इराण अमेरिका विषय का?” 

” सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये.. “

मी त्यांच्या गप्पा ऐकायला बसले.

” माझ तर ठाम मत आहे.. ट्रम्प यांच चुकलंच… “

” म्हणजे तू इराणची बाजू घेणार आहेस का? “

“खरं म्हणजे मी तटस्थ भूमिकेत आहे. (हीच मत कोण विचारणार आहे देव जाणे… मनात म्हटलं..) माझं म्हणणं इतकंच आहे की युद्धानंतर होणारे भयानक विनाशकारी परिणाम विचारात घ्या. “

सुधाताई मध्येच म्हणाल्या,

“एकेकांना पट्ट्या मारून सरळ केलं पाहिजे”

” अहो पट्ट्या कसल्या मारताय ?ती काय शाळा आहे का ?मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड होऊन पंधरा वर्षे झाली तुम्हाला.. तरी अजून तीच शिक्षा सांगताय”

 ” तुम्हाला समजलं नाही.. मी प्रतिकात्मक बोलले. ज्याला जी भाषा समजते त्याला तसं उत्तर दिलं तरच त्याला ते समजते. “

मध्येच विनया म्हणाली,

” पंचमहाभूतातील जल आणि ही चराचर सृष्टी, ईश्वरानी सर्वांसाठी निर्माण केलेली आहे. अशा सखोल अध्यात्मिक विचारांची आपल्यासारखी त्यांना बैठक नाही. तिथे जाऊन कोणीतरी त्यांना हे शिकवायला पाहिजे. “

” हो ते पण खरं आहे. तुझं हे म्हणणं मात्र मला अगदी पटलं.. म्हणूनच शांततेत समाधान आहे.. हे त्यांना कळत नाही.

” मला तर वाटतं त्या होर्मुझ का काय सामुद्रधुनीतून जहाजांनी एकमेकांना वाट करून द्यायची. जरा कडेकडेनी जायचं.. जा बाबा तुम्ही जा.. आम्ही पण जातो. कोणी कोणत्या दिवशी जायचं आपापसात चर्चा करून ठरवून घ्यायचं. त्यासाठी युद्ध कशाला?”

“बरोबर आहे.. आणि एखादी गोष्ट करायचीच अस मनानी ठरवलं तर ती करता येते. “

” हो… आता रोजचच ऊदाहरण घे.. पुण्यात कसं आम्ही छोट्या गल्लीत.. कार, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, शिवाय कडेला भाजीवाले, भेळ पाणीपुरीवाले असले तरी त्यातून वाट काढत जातो. “

निशा लगेच म्हणाली,

” याचं कसलं कौतुक.. तुम्ही पुणेकर कशाचाही अभिमान बाळगता. “

” निशा.. तुम्ही सोलापूरकर तर काही बोलूच नका. इतक्या वर्षात तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. पाच दिवसांनी तुमच्याकडे पाणी येतय”

विनिता म्हणाली,

” हो म्हणूनच तर पुढची पिढी पुण्यात राहायला येत आहे. “

” त्यांच्यामुळे इथल्या जागेचे भाव वाढले आहेत. पुढे या सर्वांना पाणी कसं पुरणार हीच चिंता आम्हाला आहे. “

आता यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकदम जिल्हास्तरीयवर आली.

निशा म्हणाली,

” आमच्या सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा तुम्हाला आवडतो. “

“अग पण त्याचा इथे काय संबंध?”

खरंतर कशाचाच.. कुणाचाही.. कसलाच.. संबंध नव्हता. या मैत्रिणी बागेत येतात. येऊन कुठलीही मतं मांडतात. घरी त्यांचं कोणी… ऐकत नाही. आणि यांच्याशी बोलायला घरी कुणाला वेळही नाही.

 इथं कसं मैत्रिणींशी काहीही बोलता येतं. वाट्टेल ती मतं मांडता येतात.

आपण सगळ्या विषयावर कसं बोलू शकतो असं… ऊगीच आपल मनाचं समाधान करून घेता येत… या सहज आनंदासाठी… खरंतर सगळ्याजणी इथे जमतात.

स्वाती इतका वेळ गप्प होती. ती एकदम उभीच राहिली. म्हणाली, “अगं आज संध्याकाळी मी कैरीची डाळ करून आणायचं ठरल आहे ना? ती भिजत घालायची आहे. आत्ता पाण्यात घातली तरच ती चांगली भिजेल. “

आता पाण्याची चर्चा एकदम वैयक्तिक पातळीवर आली.

 सगळ्या भानावर आल्या.

“हो ग पाच-सहा तास तरी भिजली पाहिजे “… असं एकजण म्हणाली

मी स्वातीला विचारले,

“कैरीची डाळ घेऊन कुठे जाणार आहेस?”

” अगं अनुकडे.. तिचे मिस्टर बेड रिडन आहेत. ती बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही चार पाच जणी अधून मधून तिच्याकडे जातो. गप्पा मारतो. तिचा दिवस चांगला जातो. “

संगीता म्हणाली,

” मी गोड करंज्या नेणार आहे. ती विचारत असते मी काय करू? वय झालं.. दमते ग.. बिचारी… म्हणून तिला सांगितल आहे.. तू फक्त पाणी दे. “

” आमची अगदी वाट पाहत असते.. चला निघू या”

” ए सोलापूरकर गुडघे दुखतात ना.. चालत जाऊ नको. मी गाडीवर सोडते तुला घरी. “

 दोघींनी तिचा हात धरला. सगळ्याजणी घरी निघाल्या.

खरचं मनात सामंजस्य, प्रेम, माया आपुलकी, आपलेपणा असला की अनेक प्रश्न सोडवता येतात…

ट्रंप साहेबांनी खरतर आमच्या मैत्रिणींशी बोलून त्यांचा सल्ला एकदा घेतला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय चर्चा करता करता सहजपणे रोजच्या जीवनातले प्रश्न सोडवणाऱ्या…

हातात हात घालून एकमेकींना आधार देत… घरी निघालेल्या या मैत्रिणींची मैत्री बघून माझ्या डोळ्यात आपोआप आलं… पाणी…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गीतांजलीतील कविता वाचत असताना कवी आणि देव यांच्या भावनिक नात्यांतील वैविध्यतेचे पदर जसजसे उलगडत जातात तसतसा एक प्रश्न वाचकांच्या मनात रुंजी घालू लागतो; तो म्हणजे या दोघांचं नातं तरी कोणतं आहे? आणि आश्चर्य म्हणजे हाच प्रश्न टागोरांना देखील पडतो. गीत क्र. ७७ मधे ते देवाला म्हणतात, “तू माझा कोण आहेस? पिता आहेस? बंधू आहेस? सखा आहेस? तू आहेस तरी कोण? समजा मी तुला पिता मानलं तर या नात्यातला जो आदर आहे तो मला तुझ्यापासून लांब ठेवेल. मग मी तुझ्याजवळ कसा येऊ? तुझा हात कसा धरू? तुला जर सखा मानलं तर मी कायमचा तुझ्याजवळ राहू शकणार नाही. तुला जर बंधू मानलं तर माझं जे संचित आहे त्यात तुला वाटणी द्यावी लागेल. ती कशी देऊ? शेवटी कवी म्हणतो मी तुला सरळ माझं जीवन समर्पित करतो. म्हणजे या नात्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही कारण मग मी तुझ्याशी एकरूप होऊन जाईन. ”

देव पिता म्हणून:-

ते देवाला पिता मानून प्रार्थना करतात की जिथे मनात भीती नसेल, मान ताठ असेल, जिथे ज्ञान मुक्त असेल, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात मला घेऊन चल. तिथे सत्य, शांती, प्रेम, अहिंसा यांचेच राज्य असेल. (गीत ३५)

देव माता म्हणून:-

ते देवाला माता मानतात. त्यांना मातेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होते. पण त्यांच्या लक्षात येतं की, सुख, आनंद, कीर्ती, संपत्ती या गोष्टी तर तिनेच दिल्या आहेत. त्याच तिला कशा परत द्यायच्या. त्यामुळे ते म्हणतात, माझ्या दुःखावर फक्त माझी सत्ता आहे. म्हणून त्या दुःखाश्रूंची माळच मी तुला वाहीन. ती तुझ्या वक्षावर रूळत राहील आणि तुझ्या हृदयाशी हितगुज करेल. (गीत ८३)

देव बालक म्हणून:-

त्यांना कधी कधी देव हा बालकाच्या रूपातही दिसतो. कवीने सागर किनारी वाळूत खेळणाऱ्या बालकांना वैश्विकरूप दिले आहे. त्या बालकांच्या निरागसपणात कवीला देव दिसतो. बालकांच्या हास्यात, नृत्यात, गोबऱ्या गालात त्यांना देवाची किमया दिसते, निसर्ग दिसतो आणि तो सर्व व्यापी परमेश्वर भेटतो. (गीत ६०, ६१)

देव पती म्हणून:-

मधुरा भक्ती ही आपल्या अध्यात्मात महत्त्वाची मानली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू! या भक्तीमध्ये देव प्रियकर म्हणजे जोडीदार असतो. कवी स्वतः पत्नीच्या भूमिकेत जाऊन प्रियकराच्या रूपात देवाला पाहतो. या कवितेत (गीत ५२) कवीला म्हणजे पत्नीला वाटतं प्रियकराच्या गळ्यात असणारा हार खूप सुंदर आहे. पण त्याला विचारायचं कसं, देतोस कां म्हणून? पण सकाळ झाल्यावर तिला वाटतं तो आपल्यासाठी काहीतरी आठवण म्हणून नक्की ठेवून जाईल. तो जाता क्षणी ती धावत शेजेकडे येते. निदान एखादं फूल, निदान फुलाची‌ पाकळी ठेवून जाईल. प्रत्यक्ष पाहते तो एक तळपणारी तलवार ठेवलेली असते. प्रेयसी/पत्नी (म्हणजे कवी) खूप घाबरते. पण तिच्या लक्षात येतं की ज्याअर्थी प्रियकराने दिलेली वस्तू आहे त्या अर्थी त्यामागे काहीतरी त्याचा उद्देश असेल. या तलवारीने आता आपल्याला पाश तोडण्याची भीती वाटणार नाही आणि एकदा पाश तोडले की आपण आपलं सगळं आयुष्य त्याच्यावर ओवाळून टाकू शकतो. तोपर्यंत ही तलवार जपून ठेवायला हवी.

(अपूर्ण, पुढील भागात)

—–

गीत : ८८

DEITY of the ruined temple! The broken strings of Vina sing no more your praise. The

bells in the evening proclaim not your time of worship. The air is still and silent about you.

In your desolate dwelling comes the vagrant spring breeze. It brings the tidings of

flowers ⎯ the flowers that for your worship are offered no more.

Your worshipper of old wanders ever longing for favour still refused. In the eventide, when fires and shadows mingle with the gloom of dust, he wearily comes back to the ruined temple with hunger in his heart.

Many a festival day comes to you in silence, deity of the ruined temple. Many a night of worship goes away with lamp unlit.

Many new images are built by masters of cunning art and carried to the holy stream of

oblivion when their time is come.

Only the deity of the ruined temple remains unworshipped in deathless neglect.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८८

तुटल्या तारा अन् भग्न वीणा।

इथे न भाकित कोणी करूणा॥

*

पूजन, अर्चन कधी नसे जरी।

सहजच कोणी घंटानाद करी॥

*

भग्न तुझ्या या मंदिरी निर्जन।

उनाड वारा, बनुनी सज्जन॥

*

पुष्पांचा गंधीत निरोप आणी।

जी नच पडली तुझिया चरणी॥

*

जो होता कधी तुझा पुजारी।

कृपाप्रसादा वंचित तो मुरारी॥

*

मनःशांती त्या कुठे मिळेना।

म्हणुनि येई तुझिया स्तवना॥

*

येई परतुनि तो भग्न मंदिरी।

घेऊनि तशीच आर्तता उरी॥

*

संध्याप्रकाश अन् छाया जेंव्हा।

मिसळत धूलीकणांशी तेंव्हा॥

*

असो दिवाळी, दसरा, होळी।

कुणी न दर्शना ये वेळोवेळी॥

*

काळोख्या रात्री अंधारातून।

कोणी न लावी समई परतून॥

*

लबाड, व्यवहारी लोकांनी।

मंदिरे निर्मिली, जुनी त्यागुनि॥

*

विस्मरतील सारे, ती ही नंतर।

दुर्लक्षाचे दुर्लक्षित अंतर॥

*

भग्न न होई पुन्हा, भग्न ते।

मृतास पुन्हा, मरण न येते॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत : ८९

NO more noisy, loud words from me ⎯ such is my master’s will. Henceforth I deal in

whispers. The speech of my heart will be carried on in murmurings of a song.

Men hasten to the King’s market. All the buyers and sellers are there. But I have my

untimely leave in the middle of the day, in the thick of work.

Let then the flowers come out in my garden, though it is not their time and let the midday bees strike up their lazy hum.

Full many an hour have I spent in the strife of the good and the evil, but now it is the

pleasure of my playmate of the empty days to draw my heart on to him; and I know not why is this sudden call to what useless inconsequence!

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८९

हळुवार सुरांनी, गाईन गाणी

बोल हृदीचे, गीतात गुणगुणी॥

*

नित्यच येथे चाले, देणे घेणे

मी परि जाईन, येता बोलावणे॥

*

ऐनपणाच्या भरात असता

साद तयाची, कानी घुमता॥

*

वसंत नसता, फुले फुलावी

मधु त्यातला, भ्रमरा खुणवी॥

*

काळ जातो, भल्याबुर्‍या कलही

सखा सौंगडी, भेटो लवलाही॥

*

असे अचानक त्याचे बोलवणे

असो सार्थ वा अर्थहीन भेटणे॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत ९०

ON the day when death will knock at thy door what wilt thou offer to him?

Oh, I will set before my guest the full vessel of my life ⎯ I will never let him go with empty hands.

All the sweet vintage of all my autumn days and summer nights, all the earnings and gleanings of my busy life will I place before him at the close of my days when death will knock at my door.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९०

पुसे मज आज, सखा पांडुरंग।

पाहुणा यमासम, येता दारी सांग॥

*

करिसि का स्वागता, तुझ्या घरी।

दडपुनि दार का, पाठवी माघारी॥

*

शिकवण हीच, देई मम संस्कृती।

पाहुणा न जाये, रिकाम्या हाती॥

*

दिस शरदाचे, ग्रीष्मातल्या रात्री।

गोड समजुनी, वाढीन मी पात्री॥

*

ठेवीन सामोरी आयुष्याचा पेला। 

कमाई नि कोठी देईन त्याजला॥

*

मृत्यूचे दूत, माझ्या दारी आले।

स्वागता तयांच्या, प्राण माझे दिले॥

*

– क्रमशः भाग ३०

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

 बकुळीची फुले वेचतांना कविता आठवते…

 या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया

 बकुळीचा गजरा आणि बकुळीचा अत्तर मला फार आवडत.

पहाट होताच मंद धुंद वाऱ्यातून एक एक पाकळी उमले चराचरात

 रंगमार्दव पिवळसर हिरवा

भ्रमरही भिरभिरती चाखावया मधुर मकरंद

कधीन हिरमुसता फुले फुलती *

 गंधीत व्हावी दुःखे अवघी

 रहावी सुखा सवे आनंदी

 

 ओच्यात वेचता नाजूक फुले

 ओंजळीत घेता गंधाने वेडावे मन

मोत्या सम नाजूक फुले सुरेख 

एकेक फूल ओवताना

बहरात येई गजरा

 जपून मनाच्या कुपीत त्याचा गंध

लावे त्याचा तो वेगळाच छंद

येता सर पहिली पावसाची बकुळही मोहरे भरभरून

राधा ही वाट पाहे माधव देईल मज कधी फुल

नाजूक पाकळीत वाटे नक्षत्र अवतरले धरेवर

बहरतो बारमाही, औषधीय गुणधर्म आयुर्वेदात

बारमाही फुलणारं औषधीय गुणधर्माचं आणि पावसाळ्यात अधिकच भरणार बकुळ.

या फुलाला मराठीत बकुळी मालवणी मध्ये ओवळा कोकणी ओमवाल अस म्हणतात तर हिंदीत मौलसरी, बंगाली बकुल, गुजराती बरसोळी तामिळ मगिळहंबू, आदिवासी वोवळ, कानडी मध्ये रंजक, मल्याळम इळन्नी, उर्दू किराकुली.

बकुळ वृक्ष 

बकुळीची फुले त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत मुलांना ही फुले गोळा करायचा छंद असतो त्याचबरोबर धार्मिक ग्रंथात या वृक्षाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे रामायण महाभारत यामध्ये याचे उल्लेख आहेतच पण बुद्ध, जैन धर्मीय सुद्धा या वृक्षाला पवित्र मानतात बकुळीची फुले सुकली तरी त्याचा सुगंध टिकून राहतो तसेच आकारही फारसा बदलत नाही.

हा वृक्ष मूळचा भारतीय उपखंडातील असून ऑस्ट्रेलिया मध्ये ही आढळतो साधारण पाणथळ जागा सोडल्यास उष्णकटिबंधात याची चांगली वाढ होते याचे वनस्पतीशास्त्रीय नाव Minusops elengi linn असून कुळ नाव Sapotaceae आहे इतर नावे बकुल, बोलसरी, चिरपुष्प, ओवळी, इंडियन मेडलर, बुलेट वूड इत्यादी आहेत हा वृक्ष सदाहरित असून 30 ते 50 फूट उंच वाढतो खोड गोलाकार गुळगुळीत असते फांद्या गोलाकार पसरतात पाने चकचकीत हिरव्या रंगाची असतात पाने एक आड एक अशी येतात सुमारे दोन ते चार इंच लांब तर एक ते तीन इंच रुंदीची असून लांबट टोकदार असतात फुले मळकट पांढऱ्या रंगाची असून गोलाकार असतात आतला पुष्प मुगुट उठून दिसतो फुले आकर्षक सुगंधी असतात फळे लांबट गोल मासाल असतात त्यांचा रंग भगवा पिवळा असतो फुले व फळे साधारण जानेवारी ते जुलै या कालावधीत येतात फळे खाण्यासाठी वापरतात त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत फळे चवीला तुरट गोड असतात 

या वृक्षाचे अनेक औषधी उपयोग आहेत दंतविकार, वेदना नाशक, ज्वरनाशक, डांग्या खोकला, आव या विकारांमध्ये या वनस्पती पासून औषधे बनवली जातात तसेच फुलांपासून अत्तर बनविले जाते तसेच फुलांपासून हार व गजरे बनवितात लाकूड टणक टिकाऊ असल्यामुळे बांधकामात त्याचा वापर केला जातो दाट सावली व सुगंधी फुले यामुळे हा वृक्ष मंदिर, बागा, तसेच सावलीसाठी रस्त्याच्या कडेला लावला जातो अशा आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेला हा वृक्ष.

लेखिका : सुचिता पाटील

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “क्षणांचे सोने…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “क्षणांचे सोने… – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खूश असतो. दोन मुली असल्या तरी खूश असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो…

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

  ★★★

लेखक:पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares