मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुंदन भाग- १… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कुंदन भाग- १… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

जरा घाबरतच बेल वाजवली, आतमधे धीरगंभीर असा पोकळ नळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो तसा आवाज आला. दोन मिनटं गेली. मला बधिर झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे नक्की हेच घर आहे ना असा सुद्धा विचार मनात येऊन मागे फिरले पण नेमप्लेट तर तीच होती. अजून एकदा बेल वाजवावी का? मजल्यावर तीन फ्लॅट दिसत होते, खूप मोठा पॅसेज होता, हा फ्लॅट ह्या कोपऱ्यात, त्या बाजूला सुद्धा डेकोरेट केलेला दरवाजा दिसत होता. मधे सुद्धा एक फ्लॅट असावा. आत मधे हालचाल जाणवली बहुतेक कोणीतरी दार उघडायला येत असावं, मी सावरून उभी राहिले. मुद्दामून ड्रेस घातला होता म्हणजे मला खरं तर जीन्स टॉप्स वगैरे आवडतं, पण मावशी चिडते। म्हणते तुझं हे वय वाईट असतं ड्रेस घालत जा आजकालचे दिवस खराब आहेत.

दार उघडलं आणि मी स्तब्ध उभी राहिले समोर मध्यम वयाची सुंदर म्हणण्याइतपत एक बाई उभी होती. मी लीना, माझा आवाज एकदम घोगरा झाला म्हणजे खरंच मी घाबरले होते, कोणाकडे मेड म्हणून काम करण्याची माझी पहिलीच वेळ. म्हणजे आयुष्यात मावशीचं घर सोडून पहिल्यांदा अशी मी दुसरीकडे आले होते.

बस, त्या आवाजात जरब होती म्हणजे सुंदर बाईचा आवाज वाटत नव्हता तो.  तर हुकूमत गाजवणारा आवाज वाटत होता. कधी काम केलंयस का मुलांना सांभाळायचं? मी दचकले.  म्हणजे मावशीने सांगितलं होत एकट्या बाई आहेत हेल्पर म्हणून त्यांच्या घरात काम करायचंय. जे पडेल ते. पण मुलांना सांभाळायचं माहिती नव्हतं. मी बावरलेली पाहून त्या बाई म्हणाल्या म्हणजे तुला तसं कुंदनला बघावं लागणार नाही पण कधी गरज पडलीच तर ते सुद्धा करावं लागेल. माझ्या तोंडावर पडलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या, ये तुला घर दाखवते, मी यंत्रवत उठले आणि त्यांच्या मागे निघाले. दारातून आत मधे आल्यावर मोठा लांब पॅसेज, नंतर हॉलचा दरवाजा डाव्या बाजूला पुढे पॅसेज कंटिन्यू टॉयलेट बाथरूम्स, पॅसेजच्या टोकाला किचन. हॉल मधून दोन बेडरुम्सना दरवाजे. बेडरूम्स प्रशस्त म्हणजे सगळं घरच स्पेशिअस. मावशीच्या वनरुम किचन मधे राहण्याची सवय असल्याने हे एकदम अंगावर आल्यासारखं वाटत होत. बाईंनी थंडगार सरबत दिलं म्हणाल्या आता दिवेलागणी झालीये. तू निघ उद्या सकाळी सहाला ये, मी दचकले सहाला म्हणजे माझ्या दृष्टीने खूपच लवकर,  मनात विचार आला नको यायला उद्या॰ सहापासून किती वाजेपर्यंत कोणास ठाऊक असं वाटायला लागलं।  त्याचवेळेस बाई म्हणाल्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबायला लागेल.’ बाई मनातलं ओळखतात की काय असं वाटून गेलं. बाई छद्मी हसल्या म्हणाल्या, ‘ये उद्या आणि मला बाई म्हण्टलंस तरी चालेल,मी तुला लीना म्हणत जाईन.’ बाप रे सगळंच ओळखतात ह्या माझ्या मनातलं? मी मेन दरवाजाजवळ आले लॅच सिस्टीम माहिती नसल्याने मी तशीच उभी राहिले, बाई पुढे आल्या माझ्या अंगावरून जाताना त्यांच्या अंगाचा मंद सुवास जाणवला. त्या दार उघडत असताना माझं अचानक लक्ष पॅसेजच्या ह्या कोपऱ्यात गेलं तिथेसुद्धा एक दरवाजा होता म्हणजे एखादी खोली असावी. म्हणजे हॉल, किचन, दोन बेडरूम्स, दोन टॉयलेट बाथरूम्स, आणि ही खोली मला बाईंनी दाखवलीच नाही?

दाराचं लॅच सोफिस्टिकेटेड आवाज करत बंद झालं आणि मी मोकळा श्वास घेतला आणि मी दचकले आत बाई बोलत होत्या “कुंदन आले रे थांब.”मघाशी त्यांनी कुंदनचा उल्लेख केला होता पण कुंदन कोण हे सांगितलं नव्हतं आणि तो घरात आहे हे सांगितलं पण नव्हतं. आणि ती खोली? त्याबद्धल सुद्धा काही म्हणाल्या नाहीत? खूपच विचीत्र वाटलं खरं. सांगून टाकूया मावशीला नको म्हणून? तशीच घरी आले मावशी वाट बघत बसली होती, माझ्या जिभेवर अजून त्या थंडगार सरबताची चव रेंगाळत होती आणि बाई दिसत होत्या नजरेसमोर, बाईंची नजर गूढ वाटली मला काहीतरी लपवून ठेवल्यासारखं चोरटी पण हुकूमत गाजवणारी नजर, बाईंना नवरा नाहीये का? मी माझ्या विचारातच चपला काढल्या, मावशी म्हणाली, ‘लीना काय झालं? मी काही न बोलता पलंगावर बसले मघाशी नको वाटत होत त्या बाईंकडे जाणं पण ती खोली आणि कुंदन माझ्या मनात घोळत होते. पगार खूप देणार होत्या, बारा तास चांगल्या घरात वावरायचं, जेवणखाण होणार होतं म्हणजे तक्रारीला जागाच नव्हती शिवाय सगळंच पॉश असल्याने साफसफाई वगैरे फारशी करावी लागणार नव्हती हे नक्की, हल्ली ग्रॅज्युएट होऊन काय मिळतंय बाहेर त्यापेक्षा इकडे सुरक्षित आणि चांगला पगार, माझ्या तोंडातून आपसूक बाहेर आलं, “छान आहे.” मावशी खुश झाली. म्हणाले, ‘उद्या सकाळी सहाला जायचंय त्यांच्या घरी,’ मावशी सुद्धा आश्चर्यचकित झाली म्हणाली, ‘इतक्या लवकर?’

वॉचमनशी कालच ओळख झाली होती त्यामुळे त्याने मी बिल्डिंगच्या गेटमधून शिरल्यावर नुसती मान हलवली, मी लिफ्टपाशी आले पाचवा माळा  दाबला लिफ्टच्या पंख्याच्या आवाजात मनात विचार येत होते कुंदनबद्धल, कोण असेल हा कुंदन? बाई तर मध्यमवयीन वाटत होती॰ म्हणजे कुंदन असला तर निदान पंधरा सोळा वर्षांचा तरी असावा. कुंदनला काही आजार असेल का? का अपंग? लिफ्टचा दरवाजा उघडला आणि उजव्या बाजूला आले बेल वर हात ठेवला इतक्यात आतून कुजबुज ऐकू आली म्हणजे बाई मोठ्यांदीच बोलत होत्या पण सागाचा जाड दरवाजा असल्याने बाहेर खूप कमी आवाज येत होता. मी दाराला कान लावला आणि कानोसा घेऊ लागले. बाई, कुंदन कुंदन हाका मारत होत्या बहुतेक त्याला उठवत असाव्यात. अचानक त्या समोरच्या फ्लॅट च्या सेफ्टी डोअर मधून कोणीतरी बघत असावं असं जाणवलं मी झटक्यात दारापासून लांब झाले आणि बेल वर हात ठेवला.

आतमध्ये लगबग झाली असावी, मी श्वास का कोणास ठाऊक रोखल्यासारखा केला, बाईंनी दार उघडलं, बाई गाऊनमधे होत्या, मध्यमवयीन असल्या तरी तरुणीला लाजवतील अशी फिगर होती त्यांची. ‘ये’ म्हणाल्या मी का कोणास ठाऊक त्यांच्या आवाजाखाली संमोहित होत होते की काय कोणास ठाऊक? मी आतमधे आले, मला डायरेक्ट स्वयंपाकघरात घेऊन आल्या बाई. म्हणाल्या, ‘चहा येतो ना करता? दोघींचा कर आणि हो दूध सुद्धा. दे, त्यांनी एक मग दिला काढून. म्हणाल्या, ‘भरून दे साखर कमी टाक कुंदनला साखर कमी लागते.’ मी दचकले म्हणजे हा कुंदन कोण हे काही समजत नव्हते कदाचित आज दिसेल कुंदन असा विचार करून मी हो म्हणाले. पटपट चहा केला, बाईंनी चहाचा कप आणि दुधाचा कप एका ट्रे मधे घेतला आणि त्या पॅसेजच्या त्या कोपऱ्यात असणाऱ्या बंद खोलीच्या दिशेने निघाल्या, मी किचनमध्ये डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसले चहाचा कप हातात घेऊन, बाईंनी हळूच ते दार ढकललं आणि त्या आतमध्ये शिरल्या दार बंद करून घेतलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्या बंद दाराकडे बघत राहिले. अर्ध्या तासांनी बाई आल्या बाहेर, मी इकडची तिकडची कामं करण्याचा प्रयत्न करत होते. बाईंनी सगळं समजावून सांगितलं, अधूनमधून कुंदनचा उल्लेख करत होत्या. मला चैन पडत नव्हतं कुंदन काही दिसत नव्हता. जेवणं झाली. बाई अधून मधून त्या खोलीत जात येत होत्या, आतमधे गेल्यावर आतून बाईंची कुजबुज जाणवत होती पण कुंदनचा आवाज काही येत नव्हता.

करकरीत दुपार झाली बाई मला म्हणाल्या, ‘तू पडू शकतेस पाहिजे तर  हॉलमधे,’ मी तुम्ही काय करणार ह्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं, जणू माझ्या मनातला प्रश्न ओळखून त्या म्हणाल्या, ‘कुंदनजवळ पडते जरा नंतर मला दुपारी क्लब मधे जायचंय, मला झोप लागली तर अर्ध्या तासानी उठव मी जास्त झोपत नाही दुपारची.’

हे कुंदन प्रकरण मला खूपच गूढ वाटायला लागलं होत. बाई गेल्या त्या खोलीत आणि मी विचार करायला लागले कुंदनचा. दहा एक मिनीटांनी मी उठले हळूच आवाज  न करता त्या खोलीच्या दाराजवळ गेले आणि कान लावला, बाईंचा कोणाशी तरी बोलण्याचा स्पष्ट आवाज येत होता. माझ्याबद्धलच सांगत होत्या कुंदनला, मी थरारले. कोण आहे हा कुंदन म्हणजे दिसतच नाहीये बाई सुद्धा काही सांगत नाहीयेत त्याच्याबद्धल आणि माझ्याबद्दल त्याला सांगतायत? मी नीट कानोसा घेतला म्हणत होत्या ती लीनाताई राहील तुझ्याबरोबर उद्यापासून, तिला त्रास द्यायचा नाही. मी दचकले बाप रे म्हणजे कुंदनला आपल्याला सांभाळायला लागणार आहे? आतून हालचाल जाणवली मी झटक्यात हॉलमध्ये आले. बाई बाहेर आल्या. म्हणाल्या मी आज जरा बाहेर जाणार आहे. बहुतेक उद्यापासून दुपारी मी घरात नसेन, तुला सांभाळावं लागेल सगळं, मी सगळं म्हणजे काय हे विचारणार इतक्यात त्याच म्हणाल्या कुंदनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या सारखं कुंदन चा उल्लेख करत होत्या पण माझं धैर्यच होत नव्हतं कुंदन कोण, कुठे आहे म्हणून विचारायचं?

क्रमश: भाग १

मूळ लेखक – श्री अनिरुद्ध

प्रस्तुती – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 4 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 4 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – युनिव्हर्सिटीतून येऊन मी जरा पडले होते, एवढ्यात दरवाजाशी सतवंती येऊन उभी राहिली. `दीदी, आपल्याला भाभींनी बोलवलय.’ आता इथून पुढे )

`बोलावलय? म्हणजे आहेत कुठे ते लोक?’

जुगनी तशीच उभी राहिली. `जी, ड्राईंगरूममध्ये’

मी घड्याळाकडे पाहीलं. `कुणी आलय?’

`जी, भाभीजींचे चौकवाले भाऊ आलेत.’

मी विचार करू लागले, नवीन आलाय, तर मला का हे लोक बोलावताहेत? नवीन अंजलीचा शेजारी आहे. आर्किटेक्ट आहे. मी ड्रॉईंग रूममध्ये पोचले, तेव्हा दिसलं, टेबलावर खूप कागद पसरलेले आहेत आणि त्याच्या भोवतीनं सगळे लोक बसले आहेत. टेबलाजवळ जागा देण्यासाठी अंजली उठून उभी राहिली. बाकी सगळे बसून होते. मग भैया बोलू लागला, `दीदी, दीपच्या खोलीविषयी विचार करत होतो. आता आमचं इथं येणं-जाणं खूप वाढलय. आता थोड्या दिवसात दीपचं लग्न होईल. त्याची बायकोही येत जात राहील.’

मी दीपकडे पाहून हसू लागले. `तेव्हा दीपच्या खोलीचं रिनोव्हेशन करायचा विचार तुम्ही करताय.’

`नाही. ती गोष्ट नंतरची. खरं तर काय आहे, दीपची खोली एक तर्‍हेने घराचा पॅसेज आहे. त्याची बायको आल्यावर तसं चालणार नाही, नाही का?’

`ते बरोबर आहे…. मग?’ घर अशा तर्‍हेने बांधलेलं होतं, की माझ्या खोलीतून बाहेर पडायचं असेल, तर मला दीपच्या खोलीतून बाहेर जावं लागत होतं. आत्तापर्यंत या गोष्टीबाबत कुठलाच त्रास नव्हता. त्यामुळे तिकडे लक्षदेखील गेलेलं नव्हतं. पण आता? मी भैयाकडे बघितलं.

भैया टेबलावर पसरलेल्या घराच्या नकाशावर झुकले होते. `दोन मार्ग आहेत. एक तर तुझी आणि दीपची खोली बदलायची.’

मी सुन्न झाले. वाटलं, शरीरातलं सारं रक्त डोक्यात चढून कानफटीवर हातोडे मारतय. मी स्वत:ला प्रयत्नपूर्वक शांत केलं. मी भैयाकडे बघितलं. `आणि दुसरा मार्ग?’

`दुसरा म्हणजे तुझ्या खोलीला थेट ड्रॉईंगरूममध्ये उघडणारा दरवाजा करायचा. म्हणजे तू तुझ्या खोलीतून थेट ड्रॉईंगरूममधून बाहेर पडू शकशील!’

मी उगीचच घराच्या नकाशाकडे बघू लागले. `एक उपाय आणखीही आहे.’ मी शांत स्वरात म्हंटलं. व्हरांड्याच्या दुसर्‍या बाजूला असलेली खोली अगदी माझ्या खोलीसारखीच आहे. तेवढीच मोठी. गार्डन फेन्सिंग. ती तेवढी चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली नाही, म्हणून तुम्हा लोकांचं लक्ष तिकडे गेलं नाही.’

भैयाने माझं बोलणं एकदम तोडून टाकलं. `नाही दीदी! ती खोली पहिल्यापासूनच गेस्ट रूम म्हणून वापरतोय आपण! ती खोली दीपला दिली, तर सायकॉलॉजीकली मला वाटत राहील, की मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढलं.’

`माझ्या जीभेवर आलं होतं, की म्हणावं, `मग ठीक आहे. ती खोली मला द्या. पण जर भैया लगेच तयार झाला, तर मनाला खूप त्रास होईल. अपमानित झाल्यासारखं वाटेल. मी खूप वेळ विचार करत राहिले. सगळे जण माझ्याकडेच बघत होते. मनात आलं, सांगून टाकावं, तुम्हाला योग्य वाटेल तसं! तसंही जीवनात आत्तापर्यंत हेच करत आले आहे. पण अनपेक्षितपणे माझ्यातला `मी’ माझ्या सवयीच्या विरुद्ध कणा ताठ करून उभा राहिला. मला माझा स्वर संयत करण्यासाठी प्रयत्न करावा लागला. `नाही भैया! मी माझी खोली नाही देऊ शकणार. पहिल्यापासून मी तिथेच राहिले आहे. मी दुसरीकडे कुठे राहण्याचा विचार नाही करू शकत.’

दीप अंजलीला खेटून बसलाय. त्याचा उजवा हात तिच्या मांडीवर पडलाय. ती त्याला थोपटते आहे…. कशासाठी? कुणास ठाऊक? त्याची प्रतिक्रिया थांबवण्यासाठी… किंवा त्याला धीर देण्यासाठी… किंवा मग उगीचच….

भैयाने दीपकडे आणि दीपने भैयाकडे अर्थपूर्ण नजरेने बघितलं. वाटत होतं, जसे दोघेही निराश झाले आहेत. कदाचीत खोलीची मागणी दीपनेच केली असावी. भैयाने कागद उचलले आणि नवीनकडे ते देत म्हणाला, `ठीक आहे. आपण इथे दरवाजा बसवून घ्या आणि दीपच्या खोलीत एक वॉल टू वॉल कपाट बनवून घ्या आणि खिडक्यांचे दरवाजे नवीन करा.’

मी आणखी थोडा वेळ तिथे बसले. असं का वाटलं कुणास ठाऊक, की माझी उपस्थिती तिथे असहज वाटते आहे. मी तिथून उठून निघून आले. एक अजबशी बेचैनी मनात पसरून राहिली. मी स्वत:च्या मानाला समजावत राहिले, अशा प्रकारची व्यवस्था होणारच होती. भैयाने विचार केला नसता, तर या गोष्टीचा विचार मला करावा लागला असता. नाही तर माझ्या घरात येणं जाणं मला बाहेरच्या व्हरांड्यातून फिरून करावं लागलं असतं. तशी भाच्या-सुनेच्या खोलीत सारखी तर जाऊ शकत नाही ना! तरीही बैचैनी वाढतच गेली. भैया आणि दीपची इच्छा आणि सुविधा यात अडचण बनून राहिले, म्हणून अजबशा ग्लानीने घेरले अणि त्याच बरोबर या घरातल्या आपल्या अस्तित्वाला दुसर्‍या दर्जाचं बनू दिलं नाही, त्याचा अजब असा एक संतोषही वाटला.

आज-काल काय झालय कुणस ठाऊक, की स्वत:ला अगदी एकटं एकटं वाटू लागलय. काय होतय कुणास ठाऊक, की बसल्या बसल्या डोळे भरून येऊ लागलेत. काय झालय कुणस ठाऊक, वारंवार मनाला समजवावं लागतय.

भैया, अंजली, दीप आणि पल्लवी आले आहेत. विवाहानंतर पल्लवीला घेऊन दीप पहिल्यांदाच येतोय. तिच्यासाठी सगळं अगदी व्यवस्थित सगळं योग्य पद्धतीने व्हायला हवं. आठवडाभर मी तिच्या स्वागताची तयारी करते आहे. सगळी कपाटं रिकामी करून, झाडून-पुसून मी  स्वच्छता करून घेतलीय. नोकरांना आत्तापर्यंत शेकडो निर्देश दिले आहेत. प्रत्येक दिवसासाठी वेगळी बेड कव्हर, टॉवेल निवडून ठेवलीत. कोणत्या दिवशी कोणती क्रोकरी काढायची, कोणता मेन्यू बनवायचा, सगळं सगळं ठरवून टाकलय. क्रोकरीच्या सामाानातील खूप काही मी खरेदी केलय. खूप काही मम्मी-पापांच्या वेळेपासूनचं आहे. त्यांच्या स्टाईलची छाप अजूनही या घरावर आहे. पापा गेले, त्याला चौदा वर्षं झाली. मम्मी गेली, त्याला अकरा. पण वाटतय, किती तरी वस्तूंवर त्यांचा स्पर्श अजूनही रेंगाळतोय.

अंजली हिंडून हिंडून पल्लवीला घर दाखवते आहे. या वेळी दोघी बाहेरच्या व्हरांड्यात उभ्या राहून बोलताहेत. पल्लवीच्या खुशीच्या, आनंदाच्या चित्कारांचा आवाज आतपर्यंत येतोय.  `मम्मी आपली दोन्हीही घरं सुंदर आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची. कानपूरच्या  घराचं मॉडर्न आर्किटेक्ट. एकदम लेटेस्ट डिझाईन आणि हे घरसुद्धा किती सुंदर आहे…. व्हिक्टोरिअन स्टाईलचं. … उंच सिलींग कौलांची वर, खाली उतरती छपरं. गेटमध्ये येताच घर पाहून तब्बेत खूश होते…. बाग पण किती संदर आहे.’

अंजली हसते आहे. `बागेचं क्रेडिट आत्याकडे जातं. तीच इथे राहते आणि तीच सगळं करून घेते.’

माझे हात थांबले. वाटलं, अंजली पल्लवीला माझं घर नाही, स्वत:ची प्रॉपर्टी दाखवते आहे…. मग मी कोण आहे या घरात? केअर टेकर? माझं कोणतं घर आहे? कोणतंच नाही. पण मी तर हे घर दिवस रात्र संभाळत, सजवत होते. भ्रमात होते मी. आता या भ्रमाातून बाहेर पडायलाही खूप उशीर होऊन गेलाय. पल्लवीच्या उपस्थितीत मला अजब तर्‍हेने हीन-दीन असल्याचं जाणवू लागलं. वाटू लागलं, की मी या घरात पडलेली एखादी वस्तू आहे…. फालतु सामानाप्रमाणे. मी तिथेच उभी होते. डायनिंग रूम आणि ड्राईंगरूमच्या मधे काचेची मोठीशी भींत. … समोरच्या प्रâेंच विंडोतून दिसणारा अतिशय सुंदर असा फुलांचा बगिचा…. मखमली हिरवळ, लाल बारीक मुरुमांचा बनलेला ड्रईव्ह वे. मी तर दररोज इथे उभी राहून अलग अलग कोनातून आपलं घर न्याहाळते…. दररोज आपलंच घर… त्याच्या व्यवस्थित ठेव-रेवीवर मुग्ध होते. पण आज जसं काही या घराबद्दल काही जाणवतच नाही आहे. तीच बाग आहे… तेच घर… तेच छत… त्याच भिंती… पण या सगळ्यात मी जशी काही `बेघर’ होत चाललेय.

 – समाप्त –

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 3 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 3 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – `दीदी हे घर आमचं आहे. हे आमच्या पद्धतीने चालू द्यावं. पण असं कुणीच म्हणत नाही. अगदी सूचकतेनेही नाही. सगळे आपल्या भलेपणाची खाती भरताहेत. भलेपणा नं-एक भैया, भलेपणा नं-दोन अंजली, भलेपणा नं-तीन दीप, सगळे… आता भलाईचे कॉलम आणखी भरतील. आता दीपची बायको येईल. मग त्याची मुले माझं रजिस्टर एकदम रिकाम. केवळ उपकारांनी भरलेलं. उपकार नं.एक, नं.दोन, नं.तीन, नं.चार मग… मग… सगळं सगळ्यांसाठी करते, तरीही उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली आहे.  आता इथून पुढे )

आज-काल असं काय होतय, छोट्या छोट्या गोष्टींबाबतही किंवा काहीच नसताना डोळे वारंवार भरून येतात. वाटतय, पायाखाली आपली जमीनच नाही कुठे. जमीन नाही आणि डोक्यावर आपलं छतही नाही. जसं काही दुसर्‍यांच्या सावलीच्या खाली उभी आहे. अगदी एकटी… पापांची आठवण येते. सुधीर वारंवार डोळ्यापुढे येऊन उभा राहतो. जीवनात दोघांचीही कमतरता टोचते. दोघांशीही वेगवेगळी भांडणे करते. सुधीर तू माझ्याबाबतीत असं का वागलास? इतक्या सहजपणे तू तुझ्या जीवनातून मला वजा कसं करून टाकलंस? पापा तुम्ही माझ्याबाबतीत विचार का केला नाहीत?

जे घडून गेलं, त्यातलं किती तरी पुन्हा पुन्हा आठवतं. त्यावेळी माझ्य लग्नाला काही महिनेच झाले होते. त्या दिवशी देखील मी नेहमीप्रमाणे पापांबद्दल बोलत होते. कुठलंही काम, कुठलाही प्रसंग, कुठलीही समस्या असू दे, मी लगेच माझ्या पापांबद्दल बोलू लागायची. सुधीर हसत हसत म्हणायचा, `असं आहे वसु, की तुला फादर फिक्सेशन’चा आजार आहे. तू त्यांच्याबाबतीत अ‍ॅबसर्ड आहेस.’

`पापाच असे आहेतच’, मी उत्तर द्यायची. 

`सगळे आई-वडील असेच असतात.’ सुधीरनं आडवं पडून उत्तर दिलं. तो खूप वेळ छताकडे बघत तसाच पडून राहिला, जसं काही कसला तरी विचार करतोय. `वसु, आई-वडील तीन प्रकारचे असतात. एक जे आपल्या मुलांना आपल्या क्षमतेपेक्षा खूप कमी देतात. ते आपल्या मुलांचे अपराधी असतात. दुसर्‍या प्रकारचे आई-वडीलआपल्या क्षमतेनुरुप आपल्या मुलांसाठी करतात. जास्त नाही… की कमी नाही. आपल्या मुलांबाबतचं आपलं कर्तव्य ते पार पाडतात. त्यांचं वागणं ठीक असतं. कमीत कमी तक्रार करावी, असं त्यांच्या वागण्यात काही नसतं. बहुतेक लोक असेच असतात. ‘ सुधीर थोडा वेळ गप्प बसला. मग बोलू लागला, तेव्हा त्याचा स्वर भावुक होऊ लागला होता. `तिसर्‍या प्रकारचे लोक असे असतात, की जे आपल्या सामर्थ्यापेक्षा आपल्या मुलांसाठी खूप काही करतात. ते मुलांवर खरोखरच उपकार करत असतात.’ सुधीर थोडा वेळ गप्प बसला, मग म्हणाला, `वसु माझे पेरेंटस या तिसर्‍या कॅटॅगरीतले आहेत. त्यांनी आमच्यावर उपकार केले आहेत. आपल्या ऐपतीपेक्षा, सामर्थ्यापेक्षा खूप काही त्यांनी आमच्यासाठी केलय. मी तुला एवढ्याचसाठी सांगतोय, की कुठल्याही तर्‍हेने मी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकणार नाही. ‘ सुधीर माझ्याकडे वळला. त्याचा स्वर जसा काही वितळू लागला. थोड्या काळाच्या मौनानंतर सुधीर हसला. नंतर म्हणाला, `अच्छा, वसु, तू तुझ्या पेरेंटसना कोणत्या कॅटॅगरीत घालशील?’

मी दचकलेच. अशा तर्‍हेचा विचार मी कधी केलाच नव्हता. मी संबंधाच्या हिशोब-ठिशोबात  गुंतून गेले.संबंधांना काय खोलीच्या लांबी-रुंदीप्रमाणे मोजता येतं? की खिशातल्या पैशांप्रमाणे वाढवता, कमी करता येतं? तरी पण… तरी पण… आज विचार करते, तेव्हा वाटतं, पापांनी माझ्याबाबतीत खरोखरच न्याय केला होता का?

असं काहीच नाही, की ज्याबद्दल मी काही बोलू शकेन. भैयाबद्दल त्याच्याकडेच काय तक्रार करू? अंजलीला काय सांगू, की मी दुखावली गेलीय. … सगळ्यांकडूनच… या जगातून निघून गेलेल्या पाापांकडूनसुद्धा. एक मीनाक्षीच तेवढी आहे, जिच्यापुढे मी मनातलं सगळं सगळं बोलते. जिच्याशी मी माझं सगळं सुख-दु:ख, माझं एकटेपण वाटून घेते. तीस वर्षापासूनची मैत्री आहे आमची. पण… पण… तीदेखील माझी पीडा, माझी हार समजू शकत नाही. कधी म्हणते, भैया आणि अंजली तुझ्यावर इतकं प्रेम करतात, तुला इतका मान देतात, तर मग तुला इतका कसला त्रास होतोय? कधी म्हणते, `तुला इतकं अवघड वाटत असेल, तर सगळं सहन का करतेस. स्वत:लाच इतकं टॉर्चर का करत राहतेस? … आपलं स्वतंत्र घर कर.’

मी तरी काय करू? मी जशी काही बंदिवान आहे. पिंजर्‍यात अडकले आहे. भैया आणि अंजलीला काय सांगू, की मी घर सोडून जातेय. त्यांचं प्रेम आणि ते देत असलेला मान याच्या बदल्यात मी त्यांच्यावर रुसून कशी राहू?

हळू हळू भैयाचा व्यापार वाढत चालला…. त्या कारणासाठी त्याचं लखनौला येणंही वाढलं. सुरुवाती सुरुवातीला मला खूप छान वाटलं. वाटत राहिलं, मी काही एकटी नाही. एक समृद्ध, परिपूर्ण परिवार माझ्याजवळ आहे. आता किती तरी दिवसापासून भैया महिन्यातले दहा दिवस इथेच राहत होता. त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हर, स्टेनो, आणि चपरासीसुद्धा. कधी कधी अंजली आणि दीप पण यायचे. घरातला प्रत्येक कोपरा भरून गेल्यासारखं होत असे. कधी कधी घर एकदम परकं वाटत असे. वाटत असे, की घरात माझ्यासाठी जागाच उरली नाही. तेवढे दिवस माझं जीवन, माझी खोली आणि कीचन एवढ्यापुरतंच मर्यादित राहत असे. येणार्‍या-जाणार्‍यांसाठी चहा, काॅफी, नाश्ता पाठवता पाठवता थकायला होत असे. तन, मन आणि खरं सांगायचं तर धनानेही माझी स्थिती खालावत चालली होती. सांगायला सगळं घर माझं आहे, पण माझं अस्तित्व माझ्या खोलीपुरतंच उरलं होतं. घराच्या गेटवर भैया आणि त्याच्या नावाची प्लेट आधीपासूनच लागली आहे. आता एक प्लेट दीपच्या नावाचीही लागली. आणि त्याच बरोबर `यश कन्स्लटंट’चा मोठा बोर्ड. बाहेरपासूनच घर परकं वाटू लागलय.

दीप माझ्याकडून गेला, त्याला आता पाच वर्षं होऊन गेली होती. दोन वर्षं एम. बी. ए. केल्यानंतर तो मोठ्या दक्षतेनने भैयाचं काम संभाळत होता. या वर्षात असं काय झालं, की दीप परका वाटू लागला. कदाचित काळाचं अंतर नातेसंबंधालाही धूसर करत चाललय. आता तो येतो, तेव्हा जिव्हाळ्याची ऊबच नाही झिरपत. मला वाटत राहतं, कावळा नाही का, दुसर्‍याचं आपत्य, आपल्या घरट्यात आपल्या छातीखाली धरून त्याला उब देतं, वाढवतं, भ्रमात जगत राहतं, आणि पंखात बळ येताच ते आपल्या घरट्याकडे पोचतं, असं काही बाही दीपच्या बाबतीत वाटू लागलय. वाटू लागलय, दीपचा स्वर औपचारिक होत चाललाय. वाटतंय, जसं काही आपलेपणा दाखवण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागतोय. त्या प्रयत्नात तो थकत चाललाय.. मी पण थकत चाललेय. दीप माझ्यासाठी वारंवार महागड्या भेटी आणायचा. पण मला असं का वाटायचं, की तो `थँक्स गिव्हींग’ची काही औपचारिकता पार पाडतोय. कधी कधी मौनातदेखील शब्द आणि स्वर ऐकू येतात, कसे कुणास ठाऊक? मी मनाला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करते, की दीप आता मोठा झालाय. आपल्या पायावर उभी राहिलेली मुलं अशीच होत जातात. आपला मुलगा असता, तर तोही असाच झाला असता… परक्यासारखा… कदाचित झालाच असता.

युनिव्हर्सिटीतून येऊन मी जरा पडले होते, एवढ्यात दरवाजाशी सतवंती येऊन उभी राहिली. `दीदी, आपल्याला भाभींनी बोलवलय.’

बेघर – क्रमश: भाग ३

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 2 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील बागात आपण पाहिले – पापांना  खूप काही बोलून सुधीर घरात आत आला. मीही मागोमाग आत आले. आत येऊन रागारागाने सुधीर खूप काही बडबडत राहिला. मला चांगलं वाटलं नाही. तीन वर्षानंतर आज प्रथम आमच्या स्वरात विसंवाद निर्माण झाला होता. माझाही आवाज चढला. `सुधीर माईंड योर लँग्वेज…’ आता इथून पुढे)  

आमच्या दोघांच्यात वाद-विवाद झाला होता. सुधीर उत्तेजित झाला होता. त्याचा हात माझ्या अंगावर पडला नाही, पण वर जरूर उचलला गेला होता. ही गोष्ट त्याला तोडण्याच्या दृष्टीने पुरेशी झाली. सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आणि विवेकीकरण मी खूप नंतर करू शकले. मी बाहेरच्या खोलीत येऊन पापांजवळ बसले. त्यांनी मला बरोबर नीघ, म्हणून सांगितलं. आणि मी माझी बॅग भरली. आज विचार करते, मी तसं का केलं? मी सुधीरजवळ थांबू शकले असते. त्याला पापंची माफी मागायला सांगू शकले असते. सुधीर ज्या पद्धतीने पापांशी बोलला, त्याबद्दल त्याच्याशी भांडू शकले असते. त्याच्यावर रुसले असते, पण मी अशी तडकाफडकी निघून का आले?

 त्यावेळी वाटलं होतं, की एखाद्या दिवसात सुधीर धावत धावत माझ्या मागे येईल. माझी मनधरणी करेल. पण काहीच झालं नाही आणि मी मूर्खासारखी पापांच्या `बिगर देन लाईफ ईगो’ खाली दबून गेले. सुधीरकडून मान दिला जावा, असं काही मनात नव्हतं, फक्त पापांना ओलांडून परतण्याचं धैर्य दाखवू शकले नाही. कदाचित मीनाक्षी खरं बोलतेय. ती म्हणते, `पापांच्या वटवृक्षाखाली तू आणि भैया नीटपणे वाढू शकला नाहीत. पुरेसे विकसित होऊ शकला नाहीत.  एम. ए., पीएच. डी करणं म्हणजे काय विकसीत होणं?’

पापांनी मला विचार करायला वेळच दिला नाही. लगेचच युनिव्हर्सिटीत रिसर्च जॉईन करायला लावलं. रिसर्च पुरी होण्यापूर्वीच सुधीरने पाठवलेले डायव्होर्स पेपर मिळाले. खूप त्रास झाला मनाला. पण मी सही करून दिले. वाटलं, सुधीरला हेच हवय. नंतर सुधीरच्या लग्नाची बातमी कळली. खूप दिवसपर्यंत मी रडले. पण सुधीर माझ्यापासून दूर जाऊ लागला होता. पापा त्यांच्या मताप्रमाणे, इच्छेप्रमाणे माझ्या जीवनाचा आराखडा आखत होते…. एकदम स्मार्ट, समृद्ध, सक्षम जीवन. जीवनात एक पुरुष नसला, म्हणून काय झालं? त्याशिवाय किती तरी गोष्टी जीवनात आहेत. पापांनी मला असंच काही समजावलं होतं. 

त्या काळात पापा कानपुरातएक घर बांधत होते. पुरा एक बिध्याचा प्लॉट होता. तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या काळात त्यांना स्वप्नातही ते घरच दिसायचं. `त्या ठिकाणी वसु तुझ्यासाठीही सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अशी जागेची व्यवस्था करू.’ ते म्हणाले होते.

पापा किती काळजी घेतात, असा विचार मनात आला, आणि मी काहीशी निवांत झाले. याबद्दल मी खूप विचार केला आणि त्यांना नको म्हंटलं. `नको पापा! सगळं जीवन मला लखनौमधेच काढायचय. सुरुवतीपासून इथेच आहे. रिटयर झाल्यावरसुद्धा कानपुरला जाऊन काय करणार? माझे सारे मित्र, परिचित तर इथेच आहेत.’

`दीदी वेगळी का राहील? कानपूरमध्ये राहिली, तर माझ्याबरोबरच राहील ना!’ भैयाने विरोध केला. मी एकदम खूश झाले. हे छोटे छोटे विश्वास खूप दिलासा देतात. एकटं असूनही जीवन निराधार वाटत नाही. भैयापेक्षासुद्धा अधीक काळजी करणरी अंजली. कितीदा तरी असं व्हायचं, की भैयााशी संवाद अंजलीमार्फत व्हायचा. माझी इच्छा, आवश्यकता तीच भैयापर्यंत पोचवायची आणि ती ते सगळं पूर्णही करून घ्यायची.

 तसे घराबाबत पापा न्श्चििंत होते. लखनऊमध्ये अ‍ॅलॉटमेंटचं घर आहेच. मग कसली चिंता? शहराच्या मध्यवस्तीत चार बेडरूमचा फ्लॅट आहे. पापांना दूरदृष्टी आहे. सर्विसमध्ये असताना एकापेक्षा एक चांगले बंगले राहण्यासाठी मिळत होते. पण त्यांनी घर अ‍ॅलॉट करून घेतलं. नंतर ते कधीच सोडलं नाही. म्हणायचे, कधी ना कधी रिटायर व्हायलाच हवं. मग काही राहण्यासाठी सरकारी जागा मिळणार नाही. म्हणूनच लखनौमध्ये राहण्यासाठी एक ठिकाण त्यांनी नक्की करून ठेवलं होतं. अगदी योग्य व्यवस्था झाली होती. भैयासाठी कानपूरमधलं घर आणि माझ्यासाठी लखनौमधलं हे अ‍ॅलाटमेंटचं घर. या व्यवस्थेत मी खूप खूश होते. रिटायरमेंटनंतर मम्मी-पापा कानपूरला निघून गेले. चार बेडरूमच्या या फ्लॅटमध्ये इतक्या वर्षात मम्मी आणि पापांनी किती बदल केले होते आणि मी माझ्या सोयी-सुविधा आणि छंद म्हणून किती बदल केले होते. मॉडर्न बाथरूम, नवं फ्लोरिंग, किचनमध्ये टाईल्स, ग्रेनाईट बघता बघता घराचं रूपच पालटून गेलं. अ‍ॅलॉटमेंटचं घर आपलंच असतं. पिढ्यान पिढ्या. पण मला पिढ्यांबद्दल कुठे विचार करायचय. आपण गेलं, जग बुडालं. पण का? याच गोष्टीवर पापा अडले होते. मध्यवर्ती जागा. ही सरकारला का परत द्यायची? इतकं चांगलं घर. या जागेवर लाखो रुपये आमचे खर्च झालेत… आणि मग ठरलं, जॉईंट अ‍ॅलॉटमेंटमध्ये पापांबरोबर यशचं नाव लावावं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत घर हातातून जाणार नाही. पापांच्यानंतर भैया…. मग दीप… मग…’ आणि भैयाचं नाव घालून पापा निश्चिंत झाले.

मला खूप वाटलं, की मी दुखावली गेलेय, असं मला वाटू देऊ नये, पण मनाला काही तरी टोचलंच. खूप दिवसपर्यंत मी बैचैन राहिले, जसं काही कुणी माझ्याकडून हिरावून घेतलय. किती तरी जाणीवा अशा असतात, की त्यावर आपण विचार करू इच्छित नाही, पण त्या आपल्या मेंदूवर, काळजावर दबाव टाकतात. मी स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला, की कागदाच्या तुकड्यांनी काय फरक पडतो? फरक पडलाही नव्हता. सगळं घर माझंच होतं. मीच इथे राहत होते आणि माझ्या इच्छेनेच सगळं काही चालत होतं. हे घर ही माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. गेटवर गाडी थांबवून जेव्हा मी हॉर्न वाजवते, तेव्हा जुगनीची मुलं पळत पळत येतात, तेव्हा चांगलं वाटतं. लाल बारीक मुरुमाच्या रस्त्यावरून कार सरपटत व्हरांड्याच्या पुढे जाऊन थांबते. आत जाता जाता मी किती जणांना किती प्रकारचे आदेश देत जाते. कधी माळ्याला, कधी राम सिंहला, कधी जुगनीला. दररोज मी या घरातच येत असते… पण प्रत्येक वेळी नव्याने सगळं काही खूप छान वाटत राहतं. आपल्या स्वत:वर निर्भर राहून शानदारपणे जगण्याचा आत्मविश्वासही मी कमावला आहेच. पप्पा-मम्मी सगळं घर जसंच्या तसं सोडून गेलेत. सजलं-सजवलेलं फर्निचर, क्रोकरी, गालिचे… सगळं काही. शिवाय मीही घरात काही ना काही करतच असते. कुठल्या ना कुठल्या तर्‍हेने ते सजवत नटवत राहतेच. माझी मित्रमंडळी मला `हाउस प्राउड’ म्हणतात. `गृहाभिमानी’. इंग्लीश डिपार्टमेंटची मिसेस धर जेव्हा घरी येते, तेव्हा खूश होऊन जाते. `वसुधा तुझ्या घरी आलं, की खूप प्रसन्न वाटतं. आनंद होतो. आम्ही तर विचार करतोय, की जेव्हा मुलीचं लग्न होईल, तेव्हा तिला तुझ्याकडे महिनाभर `हाउस कीपींग’च्या ट्रेनिंगसाठी पाठवायचं. `परफेक्ट होस्टेस आहेस तू!’

मी दर वेळी हसते. मनात काही तरी टोचतं, पण चांगलं वाटतं.

मी बसल्या बसल्या नेहमी माझ्या सुख-दु:खाचा हिशेब मांडत असते. नशिबाने किती तरी गोष्टी माझ्याकडून हिसकावून घेतल्या, पण किती तरी गोष्टी मला दिल्यासुद्धा. युनिव्हर्सितीतली नोकरी… लखनौतलं हे आमचं घर, भैया आणि अंजलीसारखा भाऊ आणि वहिनी आणि दीप. दीप तर माझाच मुलगा आहे. दुसरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत माझ्याच जवळ राहून शिकलाय. अंजली आलेली असली, तरी आपल्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी तो माझ्याच आगे-मागे असायचा आणि माझी दुनिया त्याच्याभोवती फिरत असायची. अंजली आणि भैयाचे माझ्यावर खूप उपकार आहेत. सगळ्यात मोठा उपकार म्हणजे दीपला माझ्याजवळ ठेवून जाणं. आपलं पहिलं मूल असं कुणी दुसर्‍याकडे ठेवतं का? आणि ते थोड्या काळासाठी सोडणं कुठे होतं? ते तर एक प्रकारे देऊन टाकणंच होतं. कोणत्या शाळेत नाव घालायचं, त्याला कुठला कोर्स घेऊ द्यायचा, दीपला कुठे पाठवायचं, किंवा पाठवायचं नाही… सगळे निर्णय मी एकटीच तर घेत होते. भैया केवळ पैसे देऊन जायचा.

 पप्पा-मम्मीच्या निधनानंतर भैया माझी जास्तच काळजी घेऊ लागलाय. प्रत्येक सुट्टी लागण्यापूर्वी मला नेण्यासाठी कानपूरहून गाडी येते. त्यांच्या कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असला, तरी त्यात मला सहभागी करून घेतलं जातं. आपल्या कामासााठी भैया लखनौला येतच असतो. तेव्हा अंजली आपल्या मळयातून खूप सामान पाठवत असते. भाज्या, फळे, धान्य. आपल्या डेअरीतून तूप, पनीर… सगळं काही. माझं घर भरून राहतं. पापा इतके मोठे ऑफीसर होते, पण भैयाच्या राज्यात समृद्धी दिसू लागलीय. कानपुरातही आणि इथे लखनौमध्येही.

लखनौच्या विकास प्राधिकरणाची नोटीस आलीय. त्याच्या अंतर्गत येणरी सगळ्या मालमत्तेचं निस्तारण `ना फायदा, ना तोटा’ या तत्वावर केलं जाईल. सगळे लाभार्थी खूश होते. सूचना मिळताच भैयादेखील आला. एल. डी.ए. साठी धावपळ सुरू झाली. एक करोडची संपत्ती असलेल्या या मालमत्तेचं मूल्यांकन फक्त बारा लाख रुपये  झालं. भैया आणि दीप यात वाद-विवाद सुरू झाले. भैयाचं म्हणणं, इतकी छोटीशी रक्कम आहे, तर एक रकमी देऊन टाकावी. दीपचं म्हणणं असं, की आपण तेवढी तरी रक्कम एक रकमी कशाला द्यायची. आपण लोन घेतलं पाहिजे. मधून मधून अंजलीदेखील आपलं म्हणणं मांडत होती. तो उल्हास, तो वाद-विवाद यात मला कुणीच सामील करून घेतलं नाही. खूप प्रयत्न करूनही मी स्वत:देखील त्यात सामील होऊ शकले नाही.  सगळा वेळ मी गप्पच बसून होते. मी आजपर्यंत हे घर माझंच समजत होते. पापांनी असंच म्हंटलं होतं. पण घर खरेदी करण्याच्या वेळी भैय्याने मला काहीच विचारलं नाही. इतके पैसे देण्याचं माझंही सामर्थ्य होतंच.

कित्येक दिवस मी बेचैन होते. कित्येक रात्री मला झोप आली नाही. कित्येक वेळा जिभेवर आलं होतं, की  भैयाला सांगावं, `हे घर पापांनी मला दिलय’, पण मला भीती होती, की तो नाराज तर होणार नाही ना? आणि जर त्याने आपला कायदेशीर हक्क दाखवला, तर मी काय करू शकणार होते? मी गप्प बसले होते, पण मनाचे जसे काही तुकडे तुकडे झाले होते. भैयाने आपल्या आणि अंजलीच्याच्या जॉईंट नावाने घर खरेदी केलं होतं. मनाला एक काटाही टोचला होता. भैया माझं नावदेखील घालू शकला असता, तसं झालं असतं, तर आपण एकटं पडल्याची मला कमी जाणीव झाली असती. तसंही माझं जे काही आहे, ते मझ्यानंतर भैया आणि दीपकडेच तर जाणार आहे. मग भैया माझं नाव घालायला का घाबरला? कदाचित भैयााने या गोष्टीचा विचारच केला नसेल. 

घर अजूनही पहिल्याप्रमाणे माझ्याच इच्छेनुसार आणि आदेशानुसार चालतं. कोणत्या शेडचा बल्ब कुठे लावायचा, बागेतील वाफे कुठे तयार करायचे, `ड्राइव वे’ लाल मुरुमाचा बनेल, काr काळ्या कॉक्रीटचा, सगळं मीच ठरवत हेते आणि आताही मीच ठरवटे….. तरीही, वाटतय, माझी मूठ रिकामी आहे. वाटतय, जसं काही घराचं ओझं मी खांद्यावरून वाहतेय. कधी कधी कधी असंही वाटतं, की माझा सल्ला विचारण्याचे, माझ्या इच्छेचा विचार करण्याचे उपकार माझ्यावर केले जाताहेत. कधी कधी मनाला विलक्षण वेदना होतात. वाटतं, पापा अशी कशी व्यवस्था माझ्यासाठी करून गेले. माझ्या स्वत:च्याच घरात मला त्यांनी आश्रयार्थी बनवलं. त्या आश्रयासाठी किती उपकारांच्या खाली दबली गेलीय. इच्छा असली, तरी त्यातून मुक्त नाही होऊ शकत मी. या उपकारांचं ओझं वागवता वागवता थकत चाललेय. वाटतं, यातून मुक्त व्हावं. वाटतं अंजलीने म्हणावं, `दीदी हे घर आमचं आहे. हे आमच्या पद्धतीने चालू द्यावं. पण असं कुणीच म्हणत नाही. अगदी सूचकतेनेही नाही. सगळे आपल्या भलेपणाची खाती भरताहेत. भलेपणा नं-एक भैया, भलेपणा नं-दोन अंजली, भलेपणा, नं-तीन दीप, सगळे… आता भलाईचे कॉलम आणखी भरतील. आता दीपची बायको येईल. मग त्याची मुले माझं रजिस्टर एकदम रिकाम. केवळ उपकारांनी भरलेलं. उपकार नं.एक, नं.दोन, नं.तीन, नं.चार मग… मग… सगळं सगळ्यांसाठी करते, तरीही उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली आहे.

   बेघर – क्रमश: भाग २

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बेघर भाग – 1 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 1 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

एका गेटपासून दुसर्‍या गेटपर्यंत बारीक मुरुमाने बनलेल्या `ड्राईव्ह वे’ वर मी रोज सकाळी पंचवीस चकरा मारते. एका बाजूने एकशे चाळीस पाउले…. एकूण मोजले तर साडे तीन हजार पाउले. किती लांब अंतर? कल्पना नाही, पण माझं फिरणं असं बंगल्याच्या आतच होत होतं. रोजचं फिरून झाल्यावर मी व्हरांड्यात ठेवलेल्या आरामखुर्चीत हात-पाय पसरून आरामात बसते. जुगनीने तोपर्यंत कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून ठेवलेलं असतं. मी ते हळू हळू घोट घोट पीत राहते.

सकाळी लवकर उठण्याचा फायदा असा असतो, की स्वत:जवळ बसण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. नाही तर एकदा युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी तयार झालं, की डिपार्टमेंट आणि घर या सार्‍यातून फुरसत कुठे मिळते? पहाटे पहाटे काहीसा अंधार असताना उठण्याची ही सवय मी माझ्या पापांकडून घेतली. मम्मी या सवयीबद्दल पापांना हसत असे आणि हा त्यांचा `मिडिल क्लास हँगओव्हर’ आहे, असं म्हणून त्यांची चेष्टाही करत असे. तिच्यासाठी तर सकाळचे साात ही वेळदेखील `मिड नाईट’ असायची.

एकटी बसून रोजच मी स्वत:शी बोलते. विचार करण्यासारखं किती किती म्हणून आहे? पुरी पंचावन्न वर्षांची जीवनयात्रा. चौतीस वर्षं या घरातच काढलेली. अठरा वर्षाची असताना या ई. ब्लॉकच्या मोठ्या घरात राहायला आले होते. चोवीसाव्या वर्षी लग्न. त्यानंतर तीन वर्षं सुधीरबरोबर राहिल्यानंतर पुन्हा इथे आले होते. तेव्हापासून इथेच तर आहे. माझं हे घर, माझं हे जीवन, माझी ही दिनचर्या सगळ्याचीच मला सवय होऊन गेलीय.  पण कालपासून असं वाटतय, सगळं हे जीवनच उलटं-पालटं होऊन गेलय. काल अप्पूने येऊन जशी काही खूप जुनी जखम उकरली. डिपार्टमेंटमध्ये पोचल्यावर खांद्याला लावलेली पर्स काढून समोरच्या टेबलावर ठेवली. एवढ्यात अप्पू आत आली. गोरा रंग. छान भरलेलं शरीर. वाटलं हिला कुठे तरी पाहिलय. माझ्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव पाहून ती म्हणाली, `भाभी, मी अप्पू.’ तिच्या चेहर्‍यावर असमंजसता, भीती, वेदना सगळं काही होतं. तिचा आवाज कापत होता.

काही क्षण मी गोंधळात पडले, पण तिने मला भाभी म्हंटलं आणि मला लक्षात यायला वेळ लागला नाही. मी आश्चर्यचकित झाले. `अरे, अप्पू तू?’ वाटलं, या क्षणी मला कसं वाटायला हवं, याबद्दल माझं मन निर्णय घेऊ शकत नाही आहे. मग वाटलं, अश्रूंचा एक महापूर छातीत उसळतोय.

आम्ही दोघी खूप वेळपर्यंत एकमेकींसमोर गुपचुप बसून राहिलो. वाटलं, मी काही तरी बोलायला हवं, पण काय बोलावं, तेच कळेना. खूप वेळानंतर मी विचारलं, `कशी आहेस अप्पू?’

अप्पूने खाली घातलेली मान वर केली आणि म्हणाली, `मी ठीक आहे.’ मग ती काही क्षण गप्प बसली आणि म्हणाली, `भाभी तुम्ही कशा आहात?’ वाटलं, तिचा आवाज कापतोय. `भाभी आपली आठवण अजूनही येते.’ मग पुन्हा काही काळ गप्प बसली, जशी काही आपल्या येण्याची माफी मागते आहे. `लखनौला आले, तेव्हा  कुणी तरी सांगितलं, आपण युनिव्हर्सिटीत अध्यापन करता आहात. मनाने मानलं नाही आणि खूप हिम्मत धरून आपल्याला भेटायला आल!’ अप्पूचे डोळे पाणावले होते. काळाच्या थरांआड दबलेलं खूप काही एकदम उसळून वर आलं. स्वत:ला संयत करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागला. माझ्या स्वरात तक्रार उमटली. `अप्पू सुधीरने डायव्होर्सचे कागद पाठवले, तेव्हा कुणाला माझी आठवण झाली नाही. बाबूजी, अम्माजी, छोटे भैया, तू , तुम्हाला कुणलाच माझी आठवण झाली नाही? काय मी काहीच डिझर्व्ह करत नव्हते की काय?’

 ती माझ्याकडे अशा नजरेने पाहत होती, की जसं कही तिला माझं बोलणं समजतच नव्हतं.  त्यानंतर ती बोलू लागली. तिच्या आवाजात कंप होता. `भाभी, भैया तर आपल्या पाठोपाठ आपली मनधरणी करायला लखनौला आले होते. ..अम्मा, बाबूजींनी तर तुमच्याशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, पण अंकल म्हणाले, आपण कुणालाच भेटू इच्छित नाही आणि कुणाशी बोलूही इच्छित नाही.’ अप्पूच्या डोळ्यात अश्रू गर्दी करू लागले. `भैयाने आपल्याला बाबूजी गेल्याचे कळवले होते, पण…’ तिचा गळा एकदम दाटून आला. डोळ्यात थबकलेले अश्रू गालांवरून ओघळू लागले.

मी सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न उभे राहिले. सगळ्या प्रश्नांची उत्तरेही मला समजू लागली होती, पण आता सांगून तरी काय उपयोग? किंवा विचार करूनदेखील? `बाबूजींना काय झालं होतं?’

अप्पूने माझ्याकडे पाहीलं, पण माझ्या कुठल्याच प्रश्नचं उत्तर दिलं नाही. माझ्या काळजात एक कळ उठली…. पापा हे काय केलंत तुम्ही.. अप्पूचा आवाज कापत होता. `आई शेवटपर्यंत या दु:खातून वर आली नाही. ‘ काही अश्रू पुन्हा तिच्या गालावर ओघळले.

माझ्या जिभेवर आलं होतं, की विचारावं, `आणि सुधीर?’ पण गप्प बसले. आता काय बोलणार? कोणती तक्रार करणार? आणि कुणापाशी? सुधीर आता दुसर्‍या कुणाचा तरी पती आहे आणि पापा आता या जगातच नाही आहेत. मन वेदनेने भरून गेलं…. हे काय झालं? मी का होऊ दिलं असं? आता मी काहीच करू शकत नाही. त्यावेळी माझ्या हे का लक्षात आलं नाही, की जावई होण्यापूर्वी सुधीर एक फक्त ज्युनियर आय. ए. एस. ऑफीसर होता. त्याच्या उद्धटपणसाठी ते त्याला माफ करू शकत नव्हते. कदाचित पापा सुधीरला अद्दल घडवू इाfच्छत होते. पण त्यासाठी माझा बळी गेला. पापांच्या कदाचित मनातही आलं नसेल, की त्यांनी वारंवार झिकारल्यानंतर सुधीर मौन साधेल आणि आपला मार्ग बदलेल. सुधीरशिवाय माझं जीवन किती अपूरं अपूरं होईल, हे पापांच्या लक्षातच आलं नाही.                                                                                                                                           

 सुधीरशी माझा विवाह हा पापांच्या जीवनातला पहिला पराभव होता. सुरुवातीपासूनच हे नातं म्हणजे आपल्याला मिळालेला शह आहे, असं ते मानत होते. पण संबंधांच्या बुद्धिबळाच्या पटावर ते अजाणतेपणेच मात खात होते. जीवनाच्या गणितात पहिल्या प्रथमच त्यांची अशी गडबड झाली होती. पापा माझा विवाह नक्की करून आले होते. आमचे मावसोबा, म्हणजे माझ्या मावशीचे यजमान हैराण झाले होते. `हे काय केलत भाऊसाहेब आपण? आपल्या वसुला आपण इतक्या लाडा-कोडात वाढवलय… नाकावर माशी नाही बसू देत ती… आपण बरेलीत संबंध जोडून आलाय. आपण तो भग बघितलात? घाणीचं साम्राज्य आहे तिथे!’

पापांनी हसून बोलणं टाळलं. `अरे अनील, मुलगा बघितलास, तर एकदम खूश होऊन जाशील. दरवाजात तेज फाकेल. गोरा-चिट्ट, सहा फूट उंची, हसरा चेहरा. पहिल्या अटेंम्टमध्ये आय. ए. एस. पास झालाय. सबंध भारतात तिसरा आलाय. ज्या दिवशी तो माझ्याकडे कर्टसी कॉल द्यायला आला, त्या दिवशीच मी वसुसाठी त्याची निवड केली. परिस्थिती, दर्जा, प्रतिष्ठा मुलाची बघायची असते. बापाची नाही. पापांनी आमच्या मावसोबांकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. `आपले विवाह याच आधारावर झाले होते नं? …. आणि आपण खूश आहोतच का…. आणि आपल्या बायकासुद्धा… ‘ ते थोडा वेळ गप्प बसले. मग हळून म्हणाले, जशी काही एक महत्वाची गोष्ट सांगताहेत, `जर स्टेटसमध्ये खूप फरक असेल, तर मुलंसुद्धा कुठे आपल्या घरच्या लोकांशी जास्त काळ संबंध ठेवतात?’ मावसोबा चमकले. त्यांनी खजील नजरेने माझ्याकडे बघितले आणि ते गप्प बसले.  बोलणार तरी काय? आमचे नाना म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, आय. सी. एस. होते. आपल्या काळातले नामवंत कीर्तिवंत ऑफिसर. बजरंगी लालच्या चर्चा अजूनही ब्युरोक्रसीमध्ये चालतात. त्यांनी मम्मी आणि दोन मावशा यांचा विवाह गरीब घरातील कर्तृत्ववान मुलांशी लावून दिला. कदाचित हा त्यांच्या प्रखर बुद्धीच्या, कौटुंबिक प्रशासनाचा भााग असेल. त्यांच्या तीनही जावयांनी आपल्या परिवाराशी काही संबंध ठेवला नव्हता. तिघेही बजरंगी लालचे आज्ञाधारक राहिले. तिघांच्याही घरात त्यांच्या पत्नीचं शासन चालत होतं. पण सुधीरने अतिशय प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे मला त्याच्या परिवाराविषयी, त्यांची ऐपत, त्याच्या मर्यादा, समस्या, असुविधा, दोन्ही परिवारातील अंतर, आपल्या शिक्षणासाठी आई-वडीलांनी केलेला त्याग, सगळ्या गोष्टी नीटपणे समजावून सांगितल्या होत्या. आपल्या पत्नीकडून आपल्या कुटुंबाविषयी काय अपेक्षा आहेत, हेही मला स्वच्छपणे सांगितलं होतं. तेव्हा मला सुधीर खूपच आवडला होता.     

विवाहानंतर बरेलीला गेलं की त्रास तर व्हायचा, पण तिथल्या गैरसोयींबद्दल मी कधी तक्रार केली नव्हती. तसंही सुधीरनं माझ्या मनाची तयारी आधीच करून ठेवली होती, त्यामुळे तक्रार करण्याचं काही कारणही नव्हतं. पण एक वर्ष होतं न होतं, तोवरच पापांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या संयमाचाा बांध तुटू लागला. बरेलीवाल्यांनी माझ्याकडे येऊन रहावं, हे त्यांना पसंत नव्हतं, तसंच सुधीरने मलाा घेऊन वारंवार बरेलीला जााणंही त्यांना पसंत नव्हतं. मी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कुठपर्यंत करू शकणार होते?

आज जीवनाचे तुकडे तुकडे माझ्या डोळ्यासमोर गरगरू लागले आहेत. कधी वाटतं, किती काळ झाला हे सगळं घडून? कदाचित तो मागचा जन्म असेल. कधी वाटतं, सगळंच डोळ्यासमोर आहे. आता-आताच तर घडलं आहे. पापा,मम्मी, सुधीर आणि माझं लग्नं. वाटतय, सुधीरची जाणीव मनाच्या आस-पाास कुठे तरी स्पर्श करते आहे. सुधीरच्या आठवणी मन विंधून टाकताहेत, जशा काही त्या कुणा परपुरुषाच्याच आठवणी आहेत. जी व्यक्ती आपल्या जवळ होती, अगदी जवळ… अचानक ती परकी कशी होऊन गेली? कुठे गेला तो? याच दुनियेत कुठे तरी … पण त्याला हाका नाही माारू शकत…. त्याला स्पर्श नाही करू शकत. सुधीरच्या जवळिकीची इच्छा मनाला उध्वस्त करू लागली. मनात अजब अशी तडफड सुरू झाली. वाटू लागलं, कुठूनही, कसंही सुधीरला मिळवावं. आज नव्याने मनात विषाद दाटून आला. जेव्हा मी त्यालाा बोलावू शकत होते, तेव्हा का अभिमान धरून बसले. सुधीर आणि अम्मा, बाबूजी बोलवायला येण्याची वाट का पाहत राहिले? तेव्हा का नाही मनात विचार आला, की पापा असं करू शकतात. त्या एका क्षणाने सगळंच कसं नष्ट, उध्वस्त करून टाकलं, ते लक्षातच येत नाही…. आणि मी गप्प बसले. ते होऊ दिलं. का? का? अखेर का? आता काहीच करता येणार नाही. माझ्या आणि सुधीरमध्ये मोठा मधुर संबंध होता. माझं जग तर सुधीरच्या आस-पासच फिरत होतं. तेव्हा वाटत होतं, शंभर वर्षं जगलो, तरी असंच प्रेम करत राहू. अगदी ताजं. प्रत्येक क्षणी नवं नवं. तेव्हा वाटलं, माझं प्रेम कधीच म्हातारं होणर नाही. तणाव पापा आणि सुधीर यांच्यात झाला होता. वâदाचित् पापांनी सुधीरच्या वडलांविषयी काही तरी अशोभनीय वक्तव्य केलं होतं. त्याला असंही बजावलं होतं, की त्या घाणेरड्या घरात त्याने वसूला घेऊन वारंवाार जाऊ नये. त्याक्षणी सुधीर आपलं भान हरवून बसला. तो त्या क्षणी हे विसरला, की ते माझे पापा आणि या प्रांताचे सिनियर सेक्रेटरी आहेत.

पापांना  खूप काही बोलून सुधीर घरात आत आला. मीही मागोमाग आत आले. आत येऊन रागारागाने सुधीर खूप काही बडबडत राहिला. मला चांगलं वाटलं नाही. तीन वर्षानंतर आज प्रथम आमच्या स्वरात विसंवाद निर्माण झाला होता. माझाही आवाज चढला. `सुधीर माईंड योर लँग्वेज…’

क्रमश: १

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हॅपी रिटायर्ड लाईफ…!! – अज्ञात ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

हॅपी रिटायर्ड लाईफ…!! – अज्ञात ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

– ४ वर्षांपूर्वी एका रविवारी अचानक माझा मित्र अनिल आणि त्याची पत्नी अदिती माझ्या घरी आले. एकदम आनंद ! खूप वर्षांनंतर भेट होत होती. 

अनिल रिझर्व्ह बँकेत नोकरी करून काही वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेतलेला.  बँकेत असताना सुद्धा काही शिकवण्या करून आपल्या income ला जोड दिलेली. 

अदितीने खूप धडपड करून एक छोटासा व्यवसाय उभा केला होता. तो तसा छान चालला. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी आर्थिक बाजू भक्कम झाली होती.

एक मुलगा आणि एक मुलगी अशी पुलंच्या भाषेत ‘बेतशुद्ध संतती’ असलेला. दोघांची लग्न झालेली. पुन्हा पुलंच्या भाषेत ‘संसाराच्या शेवटी इष्ट स्थळी जाऊन पोचलेली’ अशी ही जोडी. दोघांचाही स्वभाव दिलखुलास ! त्यामुळे तो घरी येणे म्हणजे एक आनंद सोहळा !

थोड्या हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारले, ” मग कसं काय चाललंय रिटायर्ड लाईफ? ” 

” एकदम मस्त “…. अनिल 

” काय करतोस? “.. मी 

” काहीही नाही. म्हणजे तसं ठरवलंच आहे. खूप कष्ट केले रे. आता मात्र आपण कमावलेलं आपण उपभोगायचं असं ठरवलं आहे! “

” वा.. मग वेळ कसा जातो ? “….मी 

” अरे इथे वेळ जाण्याचा प्रश्न आहेच कुणाला. आयुष्यभर एक – एक मिनिट धावत होतो. आता धावायचं नाही. परमेश्वराने आमच्या दोघांचे आयुष्य आरामात जाईल एवढं सगळं दिलं आहे. तेव्हा शांतपणे राहायचं. अगदी सकाळचा walk सुद्धा ७:०० वाजता. उगीच लवकर उठा वगैरे काही नाही. “…. अनिल 

” आणि मुलगा? ” …. मी 

” हे बघ. त्याला मी स्पष्ट सांगितलं. बाबारे, आपलं वडील – मुलाचं नातं वगैरे ठीक आहे. पण आता तुझं लग्न झालंय. तेव्हा तू आता स्वतंत्र राहा. माझं स्पष्ट मत आहे. मुलांनी वेगळं राहिल्याशिवाय त्यांना आयुष्य कळणार नाही.”…. अनिल 

” हं “….मी थोडं hesitantly म्हटलं. 

” अरे बघ ना. वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाईलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे….” ….अनिल.   इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा !

” मग आता तू कुठे राहतोस? ” ….मी

” मी ठाण्याला आणि मुलगा दादरला. त्याला चॉईस दिला होता. त्याच्या दृष्टीने दादर सोयीचं होतं. म्हणून तो दादरला. मला ठाण्याला राहायला काही प्रश्न नव्हता म्हणून मी ठाण्याला “…. अनिल. 

आयुष्य दादरच्या मध्यवस्तीत काढलेल्या माणसाला ठाण्याला राहायला जाणे सोपे नव्हते. म्हणून त्याच्या सहजपणे बदल करण्याच्या मानसिकतेचे कौतुक वाटले. 

” सगळा नवीन set-up ना? सगळ्या व्यवस्था लागल्या?” …. मी 

” हो. दूध, पेपर, भाजी मार्केट सगळं छान लागलं “….अनिल 

” कामवाली बाई मिळाली का? ” … माझी पत्नी. तिने महिला वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला.

” आमच्याकडे तो काही प्रॉब्लेम नाही. तो सगळं विषय यांच्याकडे “…. अदिती (अगदी खूष होत सांगत होती)

” म्हणजे? ” …. माझी पत्नी 

” अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview  हे घेतात. विचार त्यांना “…. अदिती 

” अनिल तू घेतोस interview?”… मी 

” अरे it is a technique how to negotiate with her “… अनिल सांगत होता.. “ म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो ‘ तू किती पैसे घेणार दर महिन्याचे ? ‘. मग ती म्हणते ‘ ७०० रुपये ‘….  त्यात केर – लादी, सिंकमधील छोटी भांडी घासणे आणि आठवड्यातून एकदा फर्निचर पुसणे. 

मग मी तिला म्हणतो “ बरं. आता मी काय सांगतो ते ऐक. कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, खिडक्यांच्या कडा पुसणे, रोजची भाजी चिरून किंवा निवडून ठेवणे ही कामे पण करावी लागतील. या प्रत्येक कामाचे २५ रुपये याप्रमाणे एकूण ७५ रुपये मी जास्त देणार. मान्य? ‘ .. ती एकदम सहज मान्य करते “….. अनिल.  इथे आमचा जोरात हशा!

” कमाल आहे राव तुझी ” ….मी हसत हसतच म्हटले.

” खरी गम्मत पुढची..  ऐक. मी तिला विचारतो ‘ महिन्यात दांड्या किती मारणार? प्रामाणिकपणे सांग.’ यावर ती थोडसं अडखळत म्हणते ‘दोन होतातच साहेब. काय करनार कितीबी केलं तरी व्हतातच’.

मी म्हणतो ठीक आहे. ती पण माणूस आहे. अडचणी येणारच. मग तिला मी सांगतो ‘ हे बघ दोन दांड्या ठीक आहेत. तिसरी दांडी झाली नाही तर त्या महिन्यात २५ रुपये अजून जास्त ! ” आम्ही सर्व अवाक आणि हास्याचा मोठा फवारा !

” मानलं तुला. सुपर आयडिया आहे यार! ” ….मी 

” अरे तुला माहिताय… ती दुसरीकडे दांडी मारते. पण माझ्याकडे तिसरी दांडी मारत नाही “…. आम्ही हसून हसून फक्त पडायचे राहिलो होतो !

” म्हणजे ती मागत होती त्याच्यापेक्षा १०० रुपये जास्तच देतोस तिला “….मी 

” येस. अरे पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आवश्यक तिथे खर्च करायचा. मी माझ्या मुलांना सांगून ठेवलं आहे. माझ्यानंतर बँक बॅलन्स मधलं काही उरेल अशी अपेक्षा ठेऊ नका. Fixed Assets राहतील ते तुमचे ! उगीच सगळं मुलांसाठी म्हणून ठेवण्यात अर्थ नाही. त्यांना सुद्धा कमवायला काय लागतं ते कळू दे “…. अनिल 

” वा ….म्हणजे राजा – राणीचा संसारच म्हणायचं की तुझा “….मी 

” हो. जेवण रोज चांदीच्या ताटात. च्यायला, ती भांडी नुसती लॉकर मध्ये पडून राहतात. आपण कधी वापरायची? म्हणून मस्त राहायचं. दर आठवड्याला नवीन सिनेमा, नाटक, कार्यक्रम. आम्ही दोघंही जातो. 

…  पण आठवड्यातला गुरुवार हा स्वातंत्र्यदिन ! मला जे पाहिजे ते मी करणार आणि तिला जे पाहिजे ते ती. मग मित्र, नातेवाईक, फिरणं. आपापला चॉईस. मी तिला विचारत नाही, ती मला विचारत नाही “….अनिल. आम्ही सगळे गारद !

— अनिलच्या या गप्पांनंतर जणू एक नवी पहाट झाल्यासारखं वाटलं. बोलता बोलता आयुष्याचं तत्त्वज्ञानच जणू त्याने सांगितलं. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ ) इथून पुढे —– 

राजारामच्या वागण्या-बोलण्यातला मनापासूनचा आपलेपणा खरंतर रत्नालाही खूप आवडतो… तिलाही तो जवळचा वाटतो. त्याच्या भेटीचा तो एक प्रसंग तर तिच्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरला आहे… म्हणजे जेव्हा राजाराम आम्हाला शिर्डीमध्ये अगदी अचानक भेटला होता, तो प्रसंग… मी गाडी घेतल्यानंतरच्या लगेचच्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब शिर्डीला गेलो होतो. तिथे आम्हाला राजाराम आणि रेणुकावहिनी अगदी अनपेक्षितपणे भेटले. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच प्रसाद घेतला… दोन तीन तास एकत्रच होतो आम्ही. निघायची वेळ झाली तेव्हा मी माझ्या मुलांना त्या दोघांच्याही पाया पडायला सांगितलं. आणि फक्त दोन्ही मुलांनीच नाही, तर रत्नानेही त्या दोघांना वाकून नमस्कार केला. ते पाहून राजारामला खूपच भरून आलं होतं… डोळेही पाणावले होते त्याचे… माझ्याशी तर बोलूही शकला नव्हता तो. पण हात जोडून रत्नाला म्हणाला होता… ‘‘ वहिनी, मी तुमच्यापेक्षा फक्त वयाने मोठा आहे. बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही दोघे माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. मी तुमचा ‘ सुदामा ’ आहे असं समजून माझी कायम आठवण ठेवा…” त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण त्यानंतर जेव्हा-केव्हा त्याची आठवण काढली जाते, तेव्हा रत्ना राजारामविषयी ‘सुदामा’ या नावानेच बोलत असते—-

श्री भगवान वैद्य प्रखर

राजाराम झोपून उठल्यावर मी आमच्यासाठी चहा टाकला. तेवढ्यात तो तयार होऊन आला.. चहा घेता घेता त्याने विचारलं… ‘‘ रिटायर झाल्यावर दिले जातात, ते सगळे पैसे मिळाले असतील ना तुला? ”… राजारामने एक खडा टाकून पाहिला … पाणी किती खोल आहे याचा अंदाज घेत होता बहुतेक तो… ‘‘ हो… थोडे फार मिळाले… पण अजून बरेच मिळायचे बाकी आहेत… सरकारी काम आहे बाबा… आणि ते कधीच सहजपणे होत नाही, हे तर जाहीर आहे.”… मी पण त्याला माझ्याकडच्या पैश्यांचा थांगपत्ता लागू दिला नाही. 

‘‘ आणि रत्नावहिनींची नोकरी व्यवस्थित चालली आहे ना? ”– हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे, असंच मला वाटून गेलं.

‘‘ ठीक चालली आहे असंच म्हणायला हवं… दोन-दोन महिन्यांचा , कधी कधी तर तीन तीन महिन्यांचाही पगार दिला जात नाही तिच्या ऑफिसकडून…” … वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा आधार घेऊन मी सारखं त्याच्याशी चक्क खोटं बोलत होतो. तो आणि मी काही वेळ जणू एक अनामिक खेळ खेळत होतो… ज्यात मी होतो फळांनी लगडलेला एक वृक्ष… आणि राजाराम होता एक लहानसा निष्पाप मुलगा… जो अतिशय साध्या-सरळ मनाने बाण मारत राहिला होता आणि वृक्ष मात्र अतिशय हुशारीने आपली फळं वाचवत राहिला होता. 

पाच वाजायच्या जरासं आधीच मी राजारामला घेऊन बस-स्टँडवर पोहोचलोही होतो. बस अजून लागली नव्हती. राजारामला तिथेच थांबायला सांगून, मी त्याच्यासाठी पान आणायला गेलो. परत येईपर्यंत बस लागलेली होती. राजाराम बसमध्ये चढतच होता, इतक्यात रत्ना जवळजवळ पळतच बसपाशी आली. 

‘‘ वहिनी तुम्ही?… अहो इतकी धावपळ करत इतक्या लांब यायची काय गरज होती…”

‘‘ गरज होती दादा. खरं तर सुधाच्या लग्नासाठी आम्ही रामटेकला यायलाच हवं होतं. पण तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे मला. भावाच्या घरीही त्याला मदत करायला कुणी नाहीये. त्यामुळे आम्हा दोघांनाही काही दिवस आधीच त्याच्याकडे जावं लागणार आहे… हे घ्या.. सुधाच्या लग्नानिमित्त आमच्याकडून भेट…” तिने राजारामच्या हातात एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवली… ‘‘ रेणुकाताईंना म्हणावं की लग्नात ही साडी नेसायची. हा रंग अगदी खुलून दिसेल त्यांना… आणि त्याच पिशवीत शर्ट-पॅन्टचं कापडही आहे… तुमच्यासाठी.. अजून लग्नाला थोडे दिवस आहेत. गेल्या गेल्या शिवायला टाका.” 

‘‘ वहिनी उगीचच इतका खर्च कशाला केलात? तुम्ही दोघं लग्नाला आला असतात तर वेगळी गोष्ट होती.” 

‘‘असू दे हो… आणि रेणुकाताईंना ही चिठ्ठी द्या.”… पर्समधून एक पाकिट काढून तिने राजारामला दिलं… ‘‘ नीट सांभाळून ठेवा हं खिशात. वधू-वरांना आमचा आशिर्वाद सांगा, आणि लग्न पार पडल्यावर रेणुकावहिनींना घेऊन चार-आठ दिवस रहायलाच या आमच्याकडे… नक्की या.” 

…. एवढ्यात कंडक्टरने घंटा वाजवली आणि राजाराम जाऊन त्याच्या सीटवर बसला. रत्ना आणि मी आपापल्या स्कूटरवरून घरी आलो. मला घर एकदम सुनंसुनं वाटायला लागलं… हि-या-मोत्यांनी भरलेली नौका समुद्रात अचानक दिसेनाशी झाल्यावर दु:ख.. निराशा दाटून यावी… तशाच दु:खात… तशाच निराशेत मी जणू बुडून चाललो होतो. माझी मन:स्थिती रत्नाला बहुदा नेमकी कळली होती… ‘‘चला, चहा घेऊया.” 

‘‘ नको… आत्ता नको… नंतर घेऊ या….  बिचारा राजाराम… त्याला मी वीस हजार देईन या आशेने आला होता. त्याची एकूण परिस्थिती पाहून वाटलंही होतं… द्यावेत म्हणून…”

‘‘ मग का नाही दिलेत? त्याला वीस हजार देऊन टाकले तर आपण कंगाल होऊ असं  वाटलं होतं का तुम्हाला? अहो जन्मभराची तुमची मैत्री… वीस हजार रूपये त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले का तुम्हाला? घरातले दोघं दोघं नोकरी करत असतांना सुद्धा, एखाद्या मित्राला त्याच्या गरजेच्या वेळी जर ते उपयोगी पडू शकले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातली अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही… जाऊ दे आता. आणि ऐका… आता असे हताश होऊ नका… मी एकवीस हजार रूपयांचा बँक ड्राफ्ट काढून तुमच्या ‘सुदामा’ च्या हवाली केला आहे. त्या पाकिटात तो ड्राफ्टच होता. आणि म्हणूनच तो नीट सांभाळून न्यायला सांगत होते त्यांना……  आता चालेल ना चहा?” … असं म्हणत रत्ना चहा करण्यासाठी आत निघून गेली… 

आणि मी विचार करत राहिलो… ‘आज रत्नाने किती सहजपणे मला “ द्वारकाधीश “ बनवून टाकलं आहे’……..  

— समाप्त —

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 2 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला…) इथून पुढे —–

‘‘ मनोहर, आत्ता मी जिची लग्नपत्रिका द्यायला आलोय् ना, ती माझी तीन नंबरची मुलगी… सुधा… म्हणजे माझी शेवटची जबाबदारी…” 

‘‘ अरे पण तुला तर चार मुली आहेत ना?” 

‘‘ हो. पण चौथ्या मुलीचं लग्न दोन वर्षांपूर्वीच झालं. मी आमंत्रण पाठवलं होतं की तुला. अर्थात् तुला ते मिळालं की नाही कोण जाणे. असो.  काय आहे… सुधाचा डावा हात लहान आणि कमजोर आहे. या अपंगत्वामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे धाकटीचं लग्न आधी करून टाकलं. मुलाने तर पाच वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केलाय्… स्वास्थ्य केंद्रातल्या एका नर्सशी… आणि तेव्हापासून तो वेगळाच रहातोय्. या सुधासाठी स्थळ शोधणं फारच अवघड झालं होतं रे…”

‘‘ तिचा हा होणारा नवरा काय करतो?”

‘‘ मी टायपिस्ट म्हणून मँगेनीजच्या खाणीत काम करायचो ना, तिथे विष्णू नावाचा एक चपराशी होता. मी रिटायर होण्याच्या सहा महिने आधी एका दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी अनुकंपा-तत्त्वावर त्याच्या या मुलाला नोकरी मिळाली. त्याचाही डावा पाय पोलिओमुळे निरूपयोगी झालाय्… डाव्या पायाने लंगडाच झालाय् म्हण ना. दहावी पास आहे.” 

‘‘ थोडा भात घे ना अजून…” काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं मला. 

श्री भगवान वैद्य प्रखर

‘‘ नको नको… खूप जेवलो आज… किती दिवसांनी इतकं चांगलं जेवण झालंय् ते काय सांगू तुला?… या लग्नात हुंडा म्हणून साठ हजार रूपये द्यायचे ठरलेत. इकडून-तिकडून चाळीस हजारांची सोय झालीये. तरी अजून वीस हजारांची सोय करायला हवी. त्यासाठी ठोठावता येईल असं एकही दार उरलेलं नाहीये आता. लग्न अठ्ठावीस तारखेला आहे… आणि आज अठरा तारीख… असो… तू आता रिटायर झाला आहेस ना… आत्तापर्यंत एकाही लग्नाला आला नाहीस… पण या लग्नाला नक्कीच येऊ शकतोस. रेणुका… माझी बायको… म्हणत होती की, ‘‘ तुमचा हा मित्र म्हणजे मोठी आसामी आहे… स्वत: जाऊन निमंत्रण दिलंत तरच येतील ते. म्हणून आलो आहे…” ‘अन्न दाता सुखी भव’… असं म्हणत राजाराम हात धुवायला गेला. 

तो उठून गेल्यावर मला खरंच जरा हायसं वाटलं. माझ्या मनातल्या मनात विचाराचा जणू एक दिवा लागला, ज्याच्या प्रकाशात, राजारामने स्वत: मला निमंत्रण पत्रिका द्यायला येण्यामागचं ‘रहस्य’ मला उलगडल्यासारखं मला वाटलं… आणि माझ्या मनातल्या आमच्या मित्रत्वाच्या सरोवरात आजपर्यंत ज्या निर्मळ मैत्रीचे तरंग सतत उठत होते, त्या जागी आता जणू वाळूच्या लाटा उमटू लागल्या आहेत असं मला वाटून गेलं. मी डायनिंग टेबल आवरलं. राजाराम हात पुसत परत माझ्या जवळ येऊन उभा राहिला… 

‘‘ साडेपाचच्या बसचं रिझर्वेशन आहे बरं का रे माझं… पाच वाजता तरी निघावं लागेल मला…” राजाराम मोकळेपणाने म्हणाला… मनावरचं कुठलं तरी ओझं उतरल्यावर जाणवतो तो मोकळेपणा मला त्याच्या बोलण्यात जाणवला. 

‘‘अरे आजच्या दिवस थांब की. उद्या सकाळी जा. साडे-सहा सात वाजेपर्यंत रत्ना येईलच ऑफिसमधून… मग मस्त गप्पा मारू तिघं जण. अजून पुरेशा गप्पा तरी कुठे मारल्यात आपण…” असं म्हणतांना मला मनापासून सारखं जाणवत होतं हे की ते सगळं मी अगदी वरवरचं… औपचारिकपणे बोलत होतो… माझ्या मनातले मैत्रीचे धागे कमकुवत झाल्याचं माझं मलाच जाणवत होतं. 

‘‘ नको रे… आणि रत्नावहिनींशी सकाळीच चांगल्या दोन तास गप्पा मारल्या आहेत मी. त्यांनी हे ही मला सांगितलंय् की त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्नही नेमकं २८ तारखेलाच आहे. त्यामुळे सुधाच्या लग्नाला तुम्ही दोघं येऊ शकणार नाही, हे समजलंय् मला. आणि अरे मलाही तर खूप गप्पा मारायच्या आहेत की तुझ्याशी… आता हे लग्न एकदा पार पडलं की खास तेवढ्यासाठीच येईन तुझ्याकडे आणि चांगला आठवडाभर राहीन बघ… त्यावेळी मग मला जे जे माहिती नाहीये ते तू मला सांग… आणि तुला जे माहिती नाही, ते सगळं मी तुला सांगेन… काय?”

‘‘ पण आता थोडावेळ तरी आराम कर बाबा. मी तुला स्टँडवर पोहोचवायला येईन.”… आणि राजाराम जरासा म्हणून आडवा झाला आणि घोरायलाही लागला. मीही आडवा झालो. 

पण काही केल्या मला झोप लागेना… माझं मन तर माझ्याही  नकळत थेट रामटेकात पोहोचलं होतं… राजाराम हा तिथला माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. म्हणजे तसा तीन वर्षं पुढे होता तो माझ्या… मॅट्रिक झाल्यावर त्याने टायपिंगच्या परिक्षा दिल्या. आणि त्यानंतर रामटेकपासून दहा कि.मी. लांब असलेल्या मँगेनीजच्या खाणीत नोकरीला लागला… आधी रोजंदारीवर टाइम-कीपर म्हणून लागला होता, आणि सहा महिन्यांनी तिथेच टायपिस्ट म्हणून काम करायला लागला. मी मॅट्रिक झाल्यावर जेव्हा नोकरी शोधायला लागलो, तेव्हा राजाराम हा त्याबाबतीतला एकमेव मार्गदर्शक होता माझा … तोच माझ्या सगळ्या सर्टिफिकेटसच्या टाइप करून कॉपीज् काढायचा… खाणीतल्याच सरकारी लेबर ऑफिसरकडून वेळोवेळी त्या प्रमाणित करून घेऊन मला द्यायचा… त्या सगळ्या कामाची जबाबदारी त्याचीच आहे, असं मानणारा राजाराम… ‘With due respect and humble submission, I beg to state’’… अशासारखी सुरूवात करत मोठे मोठे अर्ज माझ्यासाठी स्वत: लिहूनही काढणारा…. पाठवायची घाई असेल तर स्वत:चे पैसे खर्च करून, पोस्टाची तिकिटं आणून लावून, अर्जांची ती पाकिटं कितीतरी ठिकाणी स्वत: पाठवणारा राजाराम… मला पहिली नोकरी मिळाल्याचं कळताच आनंदाने वेडा झालेला… स्वत:च्या खर्चाने पेढे वाटणारा राजाराम…. आई-वडील… बहिण…भाऊ… यांच्या प्रेमाखातर, गावाच्या जवळच असणा-या त्या खाणीत, तसली ती साधारण नोकरी करतच आयुष्य घालवलेला राजाराम… साहजिकच… कुठल्याही प्रगती विना, जसा होता तसाच राहिला. मी मात्र नोक-या बदलत राहिलो… त्या अनुषंगाने गावं बदलत राहिलो… राज्यही बदलत राहिलो. पण माझा हा बालमित्र राजाराम… त्याला मात्र मी कधीच विसरू शकलो नाही. त्यामुळेच त्याच्याबरोबर लहानपणी काढलेले, आणि माझ्या मॅट्रिकच्या सर्टिफिकेटसोबत कपाटात अगदी जपून ठेवलेले आमच्या दोघांचे फोटो, म्हणजे माझ्या मुलांसाठी मोठाच कुतूहलाचा विषय असायचा . त्याच्याबद्दल मी सतत इतका बोलायचो ना… त्या ‘टेपस्’… मी रत्नाला कितीवेळा ऐकवल्या असतील कोण जाणे ! आता तर जेव्हा जेव्हा राजारामचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा… ‘अख्ख्या गावात हा एकच मित्र होता का तुम्हाला… राजाराम नावाचा?’ असा टोमणा मारल्याशिवाय रहात नाही ती आणि मला कळत नाही आता कसा सांगू तिला की ‘अगं… आयुष्याच्या सुरूवातीपासूनच्या ते आत्तापर्यंतच्या या प्रवासात, वादळवा-याच्या तडाख्याने मातीच्या किती छोट्या-मोठ्या टेकड्या-डोंगर आपलं अस्तित्वच गमावून बसतात ते… त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ 

– क्रमशः भाग दुसरा. 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 1 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 1 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

गेटला कुलूप असलेलं पाहून माझी नजर आपोआपच मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. अकरा वाजत आले होते. म्हणजे रत्ना ऑफिसला जायला निघालीही होती. मी बॅगेतून किल्ल्यांचा जुडगा काढला, आणि गेटचं कुलूप उघडलं. अंगणात गेल्यागेल्याच माझं लक्ष सहज त्या कोप-याकडे गेलं, जिथे रत्नाची कायनेटिक ठेवलेली असते. कोपरा रिकामा होता ते पाहून रत्ना घरातून निघाली असल्याची खात्रीच पटली. मी घराच्या दाराचं कुलूप काढून बैठकीच्या खोलीत गेलो. समोरच्या टी-पॉयवर एक चिठ्ठी ठेवलेली बघताच, मी झटकन् ती चिठ्ठी उचलली आणि वाचायला लागलो. रत्नाने लिहिलं होतं… ‘‘ तुम्ही लायब्ररीत गेल्यावर थोड्या वेळातच तुमचे बालमित्र ‘सुदामा’ घरी आले होते. याच महिन्यात अठ्ठावीस तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्याचं आमंत्रण द्यायला आले आहेत. आज संध्याकाळच्या साडेपाचच्या बसचं परतीचं रिझर्व्हेशनही करून आले आहेत. मी तुमच्या दोघांचा स्वयंपाक करून ठेवला आहे. त्यांचे एक परिचित माझ्या ऑफिसजवळच राहतात. त्यांना आमंत्रण देण्यासाठी ते माझ्याबरोबरच आले आहेत. येतांना रिक्षाने येतील. दुपारी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला रजा घेणे शक्य नव्हते. तरीही ऑफिस सुटल्यावर थेट स्टँडवर येण्याचा प्रयत्न करते. मागे कधीतरी तुम्ही मला सांगितलं होतंत की तुमच्या या बालमित्राला खीर खूप आवडते म्हणून… मी खीर करून ठेवली आहे. दोघं मिळून सगळी संपवून टाका बरं का. मी माझ्यासाठी डब्यात घेऊन आले आहे.” 

श्री भगवान वैद्य प्रखर

चिठ्ठी वाचून टी पॉयवर ठेवता ठेवता माझं लक्ष टी.व्ही. जवळ ठेवलेल्या हॅन्डबॅगकडे गेलं. मी सहजच जवळ जाऊन पाहिलं… ती बॅग एखाद्या घराची छोटी प्रतिकृती आहे असंच वाटून गेलं मला… भिंतीवरचं प्लॅस्टर कितीतरी ठिकाणी निखळल्यावर कसं दिसतं… तशीच दिसत होती ती बॅग. तिच्या एका कोप-यात एक कागद चिकटवलेला होता… ज्यावर लिहिलेलं होतं… राजाराम चिंधूजी निंबाळकर, नेहरू वॉर्ड, मु.पो.रामटेक, जि.नागपूर… तो कागदही बराच जीर्ण झालेला होता. पण तो त्या बॅगेला इतका घट्ट चिकटलेला होता की, तो त्या बॅगेचाच अंगभूत भाग आहे, असं वाटत होतं. 

राजाराम आल्याचं कळल्यामुळे माझं मन आणि शरीरही रोमांचित झालं होतं. किती वर्षांनी भेटणार होतो आम्ही दोघे…पण… पण अजूनही त्याच्या एका मुलीचं लग्न व्हायचं आहे?… खरं तर त्याच्या मुलींची नावंही मला नीटशी आठवत नाहीयेत्. त्यातल्या दोघी तिघींची लग्नं तर नक्कीच झालेली होती. त्यांच्या निमंत्रण-पत्रिका आल्या होत्या की मला… पण कधी फक्त अभिनंदनाचा मेसेज पाठवून, तर कधी त्याच्याशी फोनवर बोलून, मी माझी ‘मैत्री’ निभावत राहिलो होतो. एक-दोनदा तर रत्नानेच पत्र पाठवली होती त्याच्या बायकोला… म्हणजे रेणुकाला. माझ्या घराची वास्तुशांत होती तेव्हा मीही आमंत्रण दिलं होतं त्याला… आणि माझ्या मुलीच्या लग्नालाही बोलावलं होतं. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर, त्यासाठी तो नक्की येईल अशी आशा… नव्हे.. खात्रीच वाटली होती मला. भलेही त्याच्या मुलामुलींच्या लग्नाला मी जाऊ शकलो नसलो, तरी माझ्या मुलीच्या लग्नाला त्याने यायला नको होतं का?… एकच तर मुलगी आहे मला…मला जरा रागच आला होता त्याचा. पण रत्नाने त्यावेळी मला समजावलं होतं… ‘अहो, तुमचा बालमित्र गरीब आहे. मित्राच्या मुलीच्या लग्नाला ते रिकाम्या हाताने कसे येऊ शकले असते? शिवाय यायचं म्हणजे तीनेकशे रूपये तरी बस भाड्यासाठी खर्च करावेच लागले असते ना त्यांना…” आमच्या मित्र-प्रेमात तिने अढी पडू दिली नव्हती… पण आता इतक्या वर्षांनी तो आला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार त्यामागे… किती वेळ मी असल्या शंकांच्या भोव-यात सापडलो होतो कोण जाणे… दारावर टकटक झाली, तसा मी भानावर आलो. माझा अंदाज खरा ठरला होता… राजारामच आला होता. दार उघडताक्षणी आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली… नंतर कितीतरी वेळ त्या ड्रॉइंगरूममधल्या पंख्याची हवासुद्धा आमच्या स्पर्शाने जणू गहिवरली आहे असंच मला वाटत राहिलं होतं. जवळपास वीस वर्षांनी भेटत होतो आम्ही… वीस वर्ष हा काही थोडा-थोडका काळ नाही. 

अत्यंत आपलेपणाने निमंत्रण पत्रिका माझ्या हातात ठेवून राजाराम आंघोळीला गेला. मी डायनिंग टेबलावर जेवणाची सगळी तयारी करून ठेवली. आणि मग ती पत्रिका वाचायला लागलो. तेवढ्यात राजाराम आवरून तयार होऊन आला. ‘चल जेवायला…’ मी त्याला म्हटलं…

‘‘तुला खीर आवडते हे मी रत्नाला कधी सांगितलं होतं कोण जाणे… पण आज खास तुझ्यासाठी ती खीर करून ठेवून गेली आहे बरं का ! मी गोड खूपच कमी खातो. आणि ‘दोघांनी मिळून खीर संपवून टाका’ असं रत्नाने चिठ्ठीत बजावलं आहे. त्यामुळे आता याची जबाबदारी पूर्णपणे तुझ्यावर आहे मित्रा…” खरंतर राजारामने लवकरात लवकर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं… वागावं असं मला वाटत होतं.

‘‘ मनोहर, अरे माझं खीर खाणं तर कधीच बंद झालंय्. चार मुली आणि एक मुलगा… यांना वाढवता वाढवता, त्यांची लग्नं करून देता देता माझी कंबर पार मोडून गेली आहे. खीर सोड… आता चहाही बिनदुधाचा पिण्याची वेळ आलीये माझ्यावर. आज वहिनीने माझ्यासाठी खीर केली आहे, तर मी नक्कीच खाईन… पण इतकी सगळी नाही खाऊ शकणार बाबा… आता सवयच राहिली नाहीये, आणि आता अशी इतकी पौष्टिक खीर तर पचणारही नाही मला. आपण पूर्वी खायचो ती खीर कशी असायची ते आठवतंय् ना तुला? डबाभर भातात एक वाटी दूध… एक वाटी पाणी… आणि फक्त दोन चमचे साखर घालायची. खूप वेळ ते सगळं एकत्र घोटत रहायचं आणि घटाघट पिऊन टाकायचं… भाताचा तांदूळही रेशनचा असायचा … तो इतका सुवासिक कुठला असायला? ”… राजाराम इतक्या मोकळेपणाने बोलायला लागला, याचा खूप आनंद झाला मला. त्याने निदान जेवण होईपर्यंत तरी मनावर असणा-या ताण-तणावातून बाहेर यावं आणि मोकळा श्वास घ्यावा असं मला अगदी मनापासून वाटत होतं. म्हणून मी झटकन् विषय बदलला. आणि त्याच्या कौटुंबिक बाबतीत बोलायच्या ऐवजी, गावात काय परिस्थिती आहे, या विषयावर बोलायला लागलो.. पण बहुतेक राजारामला या विषयात मुळीच रस नव्हता. म्हणून त्याने अगदी थोडक्यात मला सांगितलं, की आता रामटेकला जाण्यासाठी फक्त सकाळी, संध्याकाळीच नाही, तर दुपारीही बस सुरू झाली आहे… बस स्टँड आता गावाबाहेर हलवला गेला आहे. विड्याच्या पानांच्या ज्या बागा होत्या, त्या जागी पानांच्या ऐवजी आता निवासी कॉलन्या उगवल्यात. आपल्या बरोबर तो एक ‘हा’ होता ना, त्याचे कॅन्सर झाल्याने निधन झाले. दुसरा एक होता तो क्षयरोगाने ग्रासलेला आहे. आणि तो आणखी एक होता ना… कबड्डी खूप छान खेळायचा तो… त्याने कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली… राजारामचं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या  लक्षात आलं की, माझ्या लहानपणीच्या ज्या एका छोट्याशा बागेची अतिशय मोहक अशी प्रतिमा माझ्या हृदयात मी सांभाळली होती, आणि मला कायम जी आशा वाटत होती की, माझ्यासारखीच आणखी आणखी प्रगती करत, त्या छोट्या बागेचं आता मोठं उद्यान झालं असेल, तसं काहीच झालं नव्हतं… त्यातल्या एकन् एक रोपट्यावर काळाची घातक कीड पडली होती. मी हळूच राजारामकडे पाहिलं… आणि… आणि मला वाटून गेलं की, जीवन मरणाच्या सततच्या संघर्षात, कसं तरी करून स्वत:ला जपण्यात यशस्वी होत राहिलेलं, त्याच बागेतलं एक झाड माझ्यासमोर उभं आहे… मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला… 

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

साहित्य अकादमी पुरस्काराचा शानदार सोहळा चालू होता.  एक एक पुरस्कार विजेते राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्विकारत होते.  सुरेख व्यासपीठ, सुंदर सजावट.  प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निवेदिका, व्यासपीठावरचे मान्यवर, आणि अंगरक्षक.  प्रेक्षागृहातली सभ्य विद्वत्ता.  सगळेच कसे नीटनेटके होते.

याच वातावरणात एक व्यक्तिमत्व होतं शोभा विधाते. त्यांच्या “परीघ”  या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा, सावित्री फुले सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता.  निवेदिकेने  त्यांचे नाव पुकारले.  थोडक्यात परिचय करून दिला.  आणि त्यांना मंचावर पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित केले.

शोभा विधाते याही  वयात चेहऱ्यावर प्रसन्नता टिकून होत्या. रुपेरी केस,  सोनेरी काठाची पेस्टल शेडची साडी, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ,  वयाला शोभेसाच  सारा साज.

त्या मंचावर आल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.  निवेदिका म्हणाली, ” शोभाताई!  आपल्या  या काव्य प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.  ‘परीघ या काव्यसंग्रहातील एकेक रचना मनाला भिडते.  इतकी खरी वाटते की,  वाचताना जाणवते, या साऱ्या आपल्याच भावना आहेत. आपले मनोगत आपण प्रेक्षकांसमोर मांडावे.”

पोडीअमचा  माईक शोभाताईंनी हलकेच पकडला.  समोरच बसलेल्या विनय कडे त्यांनी पाहिलं.  विनयने अभिमानाने अंगठा दाखवला. शोभाताई बोलू लागल्या.

शोभा. एक मध्यमवर्गीय, रिती रिवाज, परंपरा सांभाळणाऱ्या समाजभिरू  कुटुंबातील मुलगी.  बाळबोध वळणाची, चौकटीत एका वर्तुळात वाढत होती.  मुलीची जात, मुलीची मर्यादा, मुलीने कसे वागावे, मुलीला काय शोभते, तिने काय करावे, काय नको,  कसे राहावे याच परिघातले शब्द ऐकत, ऐकत, आखलेल्या पाऊलवाटेवर ती चालत होती.  पण आतले आवाज आणि आतली वादळे तिला काहीतरी वेगळच सांगत होते.  तिचे स्वतःशी संवाद घडत होते. तिचे भांडणही तिच्या स्वत:शीच होत होते.

एक दिवस आई तिला म्हणाली,

“शोभे! आता पुरे शिक्षण.  वयोपरत्वे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत.  तरच ते चांगले असते.  जे समाजमान्य आहे तेच करावे.  आम्ही आता तुझ्यासाठी स्थळे पाहतो. एकदा तुझे लग्न झाले की दादाचाही मार्ग मोकळा होईल.”

तेव्हां तिने आईला विचारले,

“असं का?  तुम्ही दादाच लग्न करा की.  मला इतक्यात लग्न करायचं नाही.  मी काय करायचं ते मी ठरवेन.”

तेव्हां दादा चमत्कारिकपणे तिला म्हणाला होता,

” मग काय घोडनवरी झाल्यावर करणार का लग्न? आणि कधी आरशात पाहिलेस स्वतःला?  बुद्धिमत्तेचा गर्व उगीच नको करूस. शेवटी चूल आणि मुल, रांधा, वाढा, उष्टी काढा हेच खरे तुमचे जग. कळलं का? “

दादाच हसणं,  बोलणं, चेष्टेतलं असलं तरी खूप लागलं होतं.  प्रातिनिधिक स्वरूपाचं वाटलं होतं. पुरुषप्रधान परिघातलं ते अत्यंत संकुचित, कोत्या मनाचं,  खच्चीकरण करणारं, अडथळ्यांचं, हीन वक्तव्य होतं.

शोभा गप्प बसली होती याचा अर्थ तिने ते मानलं, स्विकारलं, असा मुळीच नव्हता. पण तिला एक माहीत होतं, लग्नाळू मटिरियल आपल्यात नाही.  “स्वजातीय, सुस्वरूप, सुगृहिणी, गृहकृत्यदक्ष, कमावती वधु पाहिजे”  या सदरातले एक एक शब्द,  तिने तिच्या मनाच्या खिडकीतून भिरकावून लावले होते.  एक मात्र नक्की होतं, समाजभीरु,  मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी, तिचं अस्तित्व, तिचं असं जगणं, बोलणं  तणाव देणार होतं.

तरीही एकदा तिने आई-वडिलांच्या आग्रहास्तव एक स्थळ, हो! स्थळच म्हणूया बघण्यास होकार दिला होता. त्याला  नकार देताना तिने आईला स्पष्ट सांगितले,

” तुला माहित आहे का त्याने मला काय विचारले?”

” काय?”  आईने  भीतभीतच तिला  विचारले.

शोभाने हसून म्हटले,” अगं! तो विचारत  होता, तुम्हाला मच्छरदाणीत झोप येते का?”

तरीही आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतीच.

प्रश्न तिथेच संपला होता? की परिघाबाहेरचा एक अवघड प्रश्न सुरू झाला होता?  दरम्यान काही घटनाही घडल्या.

शेजारच्या घरातल्या मीनाने स्वतःला जाळून घेतले होते.  आत्महत्येचे कारण समजलेच नाही. अपघाताच्या नावाखाली केस मिटवली गेली.

नंदिनी मावशीची मुलगी कायमसाठी तिच्याकडे परतली होती.  घटस्फोटाची नोटीस तिला मिळाली होती. प्रश्न होता तिच्या एकुलता एक मुलाच्या  कस्टडीचा.  नंदिनी मावशीच्या मुलीचे आर्थिक बळ शून्य  होते. कायद्याच्या कचाट्यात तिचे मातृत्व भरडून गेले होते.

प्रमोशनसाठी बॉसने घातलेल्या अटी धुडकावल्यामुळे वैजयंतीची बढती  नाकारली गेली. तिला राजीनामा द्यावा लागला होता.

आजूबाजूला घडणाऱ्या अशा अनेक घटनांशी शोभा तिचं नातं शोधत होती.  आणि शोधता शोधता तीही या प्रवाहाच्या विरोधात जात होती.

सोशियोलॉजी मध्ये ती पीएचडी करत होती. तिला टाटाची शिष्यवृत्तीही मिळाली होती. “शिक्षण, शोषण, आणि आजच्या स्त्रीचे स्थान सुरक्षितता आणि भवितव्य.”  हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. तळागाळापासून ते उच्चस्तरीय गटातल्या अनेक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून तिने असंख्य टिपणे गोळा केली होती. आणि त्याचबरोबर जीवनाच्या एका महाद्वारातून, मिळालेल्या अनुभवातून, ती अधिक स्वयंप्रेरित, कणखर आणि निश्चयी  बनत चालली होती.

अनेक वेळा ‘हा दिवा मालवू की नको’ या संभ्रमातही ती पडली होती. पण तरीही पायाखालची वाट तिला बोलावत होती.

दादाचं लग्न झाल्यावर तिने घर सोडलं.  स्वतंत्र बाण्याची, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिलेली, भले समाजासाठी वेगळी, चौकटी बाहेरची पण ती एक सक्षम स्त्री होती. ‘हा माझा मार्ग एकला’  हेही ती जाणत होती. तिची वाट सोप्पी नव्हती. आई-वडिलांना तिने  सांगितले,

“तुम्ही माझे जन्मदाते आहात. मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. आपण एकत्र राहू शकतो.”

   पण त्यांनी मुलाकडे राहणंच  पसंत केलं.  ते कधीही म्हणाले नाहीत,” तू मुलगी असलीस तरी मुलासारखीच आहेस.”

    शोभा विधाते, हे नाव ठळक होत गेलं.  साहित्य क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व.  समाजाभिमुख लेखनामुळे वाचकांचा ओघ वाढत गेला.  पुस्तकांचा प्रचंड खप झाला. अनेक मुलाखती घडल्या. अनेक साहित्य कट्ट्यांवर एक शानदार व्यक्तिमत्व झळकत होतं.    

 शोभा विधाते.

    मुलाखतकार हटकून विचारायचे, ‘आता शेवटचा प्रश्न. थोडा व्यक्तिगत. आपण लग्न का केले नाही?’

    त्यावेळी मात्र शोभाच्या मनात विनोदानेच यायचे की सांगावे का यांना? “मला मच्छरदाणीत झोपायचे नव्हते.”

    आयुष्याच्या मध्यंतरानंतर विनय भेटला.  खरं म्हणजे तो तिचा बालमित्रच होता. अतिशय बुद्धीमान, विचारी. किती तरी वक्तृत्वस्पर्धेची व्यासपीठे दोघांनी मिळून गाजवली होती. पण तारुण्यात जे धागे जुळू शकले नाहीत, ते या उतार वयात जमले.

 

   गृहस्थी भोगून मोकळा झालेला विनय आणि वेगळाच प्रपंच सांभाळत आलेली अविवाहित शोभा.  विनय ची  कहाणी जेव्हा शोभाने ऐकली  तेव्हांही तिला वाटले होते,  सहजीवनाचे सौख्य शून्य टक्के असताना ही माणसे आयुष्यभर तडजोडी करत कशी जगतात?  आता बायको जग सोडून गेली, मुलगा परदेशस्थ झाला.  विनयचे जीवन मुक्त होते का एकाकी होते?  आणि अशा मध्यावर शोभाने, विनयशी तिचे जीवन का जोडले?  प्रश्न अनुत्तरीतच होता.  कदाचित प्रवाहात हरवलेले दोन ओंडके  योगायोगाने जवळ आले असतील.

   गेल्या काही वर्षापासून शोभा आणि विनय, विवाह बंधनात न अडकता एकत्र रहात आहेत. परिघा बाहेरचं जीवन जगत आहेत.

    मंचावरून बोलत असताना, शोभा जणू अदृश्यपणे मनाच्या प्रोजेक्टरवर तिच्या आयुष्याचा चित्रपट पाहत होती.  प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.  संग्रहातल्या अनेक कवितांची जन्म कहाणी तिने  उलगडली होती. मनोगताच्या  समारोपाशी येताना ती म्हणाली,

“एक कविता सादर करते. कवितेचे  शीर्षक आहे, परीघ.”

      तुझ्या दारावर किती वेळा थाप वाजवली

      पण आतून तू कडी काढलीसच नाहीस

      बंद दारापलीकडे मला ऐकू येतोय

      तुझा घुसमटलेला श्वास

      निशब्द नाकारलेले ठोके

      अगं! मी तुझं अस्तित्व.

      तुझी अस्मिता, स्वातंत्र्य विश्वास.

      पण तुझं दारच बंद!

     सोडायचा नाही परीघ तुला

    म्हणतेस, बरी आहे रे मी या वर्तुळातच

    पण लक्षात ठेव, वाटलंच कधी तर दार उघड

    मी पायरीवर तुझी वाट बघत आहे ..

नि:शब्द प्रेक्षागृहात नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि बाहेरच्या काउंटरवर “परीघ” काव्यसंग्रहाच्या सर्व कॉपीज संपून गेल्या.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print