मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसात भिजायचं…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पावसात भिजायचं” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

पावसात भिजायचं

मातीत रुजायचं

आभाळी भिडायचं

*

स्वप्न पहायचं

पावसात भिजायचं

थंडीत थिजायचं

मनात पहायचं

*

कवितेत हसायचं

पावसात भिजायचं

स्मृतीत रमायचं

गेलेल्या दिसांचं

*

चित्र स्मरायचं

पावसात भिजजायचं

आजारी पडायचं

देणं डाॕक्टरचं

*

देऊन टाकायचं

पावसात भिजायचं

घरात शिरायचं

भजी अन् चहाचं

जमवून आणायचं

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ सरी ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ आषाढ सरी ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

ओल्या सरी संगतीनं

वाहू लागला रानगंध

ओसरती आषाढ सरी

रानं पसरती हिरवे पंख

ढग डोंगरावर लोंबतो     

ओला गारवा झोंबतो  

यक्ष पत्नीच्या शोधात   

वेडा मेघदूत धावतो     

 *

लाल कौलारू छप्पर

गळू लागली वळचण

हिरव्या डोंगराच्या कुशीत

खेडी जातात सुखावून

 *

कोवळा जीव कुरवाळीत

शीळ घालतो रानवारा

चिंब सरींचा शिडकाव

आषाढ पावसाच्या धारा

 *

फुटं कातळाला पाझर

आबादानी झाली रानं

आंबल्या-चिंबल्या जीवाला

सुखावतो आषाढघन

 

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संक्रमण..  – कवी – ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ संक्रमण..  – कवी – ड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सूर्योदय तो पूर्वेला अन्

 पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

 त्रिकालाबाधित सत्य असे ।

 *

रवि जरासा अवखळ भारी

 एका जागी स्थिर नसे

 एका जागी नित्य उगवणे

 हेच तया मंजुर नसे ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

 जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

 मजला येईल कंटाळा ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

 उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

 पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेव ही हसले किंचीत

 हट्ट पाहुनी सुर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

 हा मेळ कसा साधायचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

 ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

 पश्चिमेस जा अस्ताला ।।

 *

परी उगवता पूर्व दिशेला

 उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

 दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

 उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

 जागा बदले नित्याची ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

 उत्तरायनी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

 दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

 गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

 नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

 बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

 हे देवाचे दान असे ।

कवी – ड .समीर आठल्ये

प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महिधात्रिकेची फुले… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? महिधात्रिकेची फुले… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत (वर्ण संख्या १२ यति ६ व्या अक्षरावर) 

पानांच्या छत्रीत लावण्यात न्हाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||ध्रु||

*

किती बाई याचे रूपडे देखणे 

पाचूच्या मण्याचे सरित गुंफणे

नाजूक साजूक दिसे भुईवाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||१||

*

हिरव्या रंगात पांढरी पाकळी 

भुईला पाहण्या बघाना वाकली

कधी मुंडावळी तोरणाची जाळी

महिधात्रिकेची फुले इवलाली ||२||

*

लोधर म्हणती, भुईन आमला

मनाला भावला शब्दात गुंफला

औषधी खजिना आहे भोम्यामाली

महिधात्रिकेची फुले इवलाली ||३||

*

रानभाजी खाती भुई आवळ्याची

दगड फोड्या हा आहे याची ख्याती

देखणे लोलक पाचुची झळाळी

महिधात्रिकेची फुले इवलाली ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? निसर्ग … ☆ श्री अनिल वामोरकर ☆

रंगांची उधळण

निसर्गाचं देणं

रंगून रंगात जाणं

मन:शांतीचं लेणं…

*

छाप रंगाची

ठेवून लतांवर

मोहवून टाकते

मन:पटलावर..

*

दूर दूर हिरवाई

आकाशाची निळाई

या संधी समयी

अंतरात प्रज्वले समई…

*

हिरवाई ती शांततेची

केशरी ती विरक्तीची

धवल निर्मळतेची

शिकवण ती आध्यात्म्याची…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२४ ☆ आई… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२४ ?

☆ आई ☆  प्रभा सोनवणे ☆

बहरली अंगणी जाई

अन आठवली माझी आई!

*

मन आईचे निर्मळ

शुभ्र फुलांची ओंजळ!

*

दूर टेकडीच्या पलिकडे

माझे एक सानुले खेडे!

*

त्या हिरव्या वळणावर

आहे मायवेडे घर!

*

जरी माहेर माझे दूर

येई इथंवर आईचा सूर!

*

किती काढाव्या आठवणी

येई डोळ्याला गं पाणी!

*

आई मायेची रांगोळी

आई ममतेची पाकोळी!

*

आई शिवालयातील समई

आई… मुक्ताई ….जनाई!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस☆ श्री अनिल वामोरकर ☆

(जिवलग विषय. त्याचे आगमन, बरसणे, म्हणजे नवजीवन चराचरास. अन्न पाण्याची सोय करणारा, सखाच की. तसा पाऊस हा आध्यात्मिक सुद्धा!

तेच या कवितेत मांडण्याचा प्रयत्न! बघा आवडते का?)

थेंब, रिमझिम आणि मुसळधार

 

विजेचा गडगडाट

सतर्क व्हावे

सूचक साधकासी

श्रीगणेशा करावा साधनेचा..

 

साधनेचा

एक एक थेंब

आर्तता वाढवी,

जवळ नेई

परमेश्वराच्या…

 

साधनेतील

थेंब थेंब जोडी,

सातत्य तया नाम,

रिमझिम संततधार बरसे,

भक्तीबीज अंकुरण्या…

 

आर्ततेची परिसीमा

समाधी अवस्था,

त्याचे प्रत्यक्ष दर्शन,

सार्थक जीवनाचे,

जीवनाची इतिश्री,

मुसळधार.. कृपा..

शांत शांत शांत…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात्र पावसाची… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ रात्र पावसाची... ☆ श्रीशैल चौगुले ☆

चंद्र झाकलेला

ढग धावणारे

वाट अर्धकाळी

बंध गोवणारे.

*

वारा गारधुंद

स्पर्श अंतरीला

भाव आठवात

ऋतू मंथरिला.

*

मन आषाढात

सृष्टी रिमझीम

घर कोसभरी

ओल रुमझुम.

*

साथ पावलांची

साज सळसळ

किर्र रातकिडे

झरे खळखळ.

*

दृष्टी डोकावून

तारे अल्पसेज

नीर साचलेले

धरा रंगरेज.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आषाढ पौणिमा, म्हणजे – गुरुपौर्णिमा

त्या निमित्त ही अक्षर गुरुवंदना !

“श्री गुरवे नमः”

आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

प्रास्ताविक

आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या गुरुंचे/गुरुतत्वाचे पुण्यस्मरण करण्याचा, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा दिवस.

गुरु कोण?

आपल्याला जो  शिकवतो, ज्ञान देतो तो आपला गुरु. गुरु देहधारी असू शकतो किंवा विदेही असू शकतो. येवढेच काय पण गुरु मानवेतर प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, वस्तू, धातू काहीही असू शकतो. साक्षात श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले होते हे सर्वश्रुत आहे. न्यूटनला झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाने ज्ञान दिले. ते फळ त्याचा गुरु म्हणता येईल. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

माणूस जन्मापासून मरेपर्यंतच्या आपल्या जीवनयात्रेत पदोपदी, क्षणोक्षणी, कळत नकळत काही तरी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. तो ते ज्ञान कुणाकडूनही घेत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जो आपल्याला काही शिकवतो तो गुरुच. गुरु हे एक तत्व आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सद्गुरु कोण?

समर्थ म्हणतात, जाणावे आपणासी आपण, या म्हणती ज्ञान (Absolute knowledge) या शुद्ध ज्ञानाव्यतिरिक्त मिळालेली सगळी केवळ माहिती (Information). असे शुद्ध, विमलज्ञान (Absolute knowledge) देणारा तो ‘सद्गुरु’. सद्वस्तु दाखवि तो सद्गुरु अशी सद्गुरु या शब्दाची सोपी व्याख्या समर्थांनीच केली आहे.

अध्यात्मक्षेत्रात  सद्गुरुला सर्वोच्च मानले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मा, सद्गुरु म्हणजे विष्णू, सद्गुरु म्हणजेच महेश्वर. सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱा सद्गुरु. जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे असा सद्गुरु. सद्गुरु हाच वेदांत, सद्गुरु हाच सिद्धांत आणि सद्गुरु हाच धादांत!

भारतीय अध्यात्म परंपरेत सद्गुरु हाच एकमेव मोक्षदाता आहे असे मानतात. सद्गुरुची महती सांगताना कबीरजी महाराज आपल्या एका दोह्यात म्हणतात,

गुरु गोविंत दोऊ खडे, काके लागू पाय

बलिहारी गुरु आपने, गोविंद दिये बताय।

साक्षात ईश्वर आणि सद्गुरु दोघेही समोर उभे ठाकले तर प्रथम सद्गुरुचे पाय धरावे नंतर गोविंदाचे. कारण सद्गुरुमुळे तर गोविंद लाभले आहेत! येवढे सद्गुरूचे महत्व आहे.

माणसाला सायुज्यमुक्तिदाता  सद्गुरु केवळ त्याच्या  पूर्वपुण्याईमुळेच मिळू शकतो. पण सध्याच्या काळात अशा योग्यतेचा सद्गुरु लाभणे कठीणच आहे.

परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती सद्गुरुविनाही होऊ शकते असे मानणारे थोर तत्वचिंतक जे. कृष्णमूर्तींसारखे काही मान्यवर आहेत त्यांचाही इथे उल्लेख करायला हवा.

सद्यस्थिति – गुरुहाट

सध्या अध्यात्म हा व्यवसाय, व्यापार होऊन बसलाय! समाजकारण,  राजकारण, नेतेगिरी, भाईगिरी, तशी अध्यात्मगिरी झालीय. देशाविदेशात अनेक गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, गुरुमाँ, बुवा, बाबा, बापू, श्री, श्री श्री, श्री श्री श्री आपापले मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, तख्ते, डेरे, दमदमे, दरबार,आखाडे उघडून बसले आहेत. तिथून जगभर पसरलेल्या भक्तांना सामुदायिक दीक्षा, मंत्रदीक्षा, अनुग्रह, शक्तिपात दीक्षा, आँनलाईन दीक्षा आणि अनुग्रह घाऊक प्रमाणात दिले जातात. काहींना एकांतदीक्षा, अंगसंगदीक्षाही देण्याची व्यवस्था असते. हे मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, दरबार इ. सर्व सुखसोयींनी युक्त असतात. मठाधिपती गुरु राजाश्वैर्य भोगत असतात. गुरुदेवांना स्वतःची झेड प्लस सुरक्षा असते. गुरुदेवांभोवती भक्त-भक्तिणींचे गराडे पडलेले दिसतात. गुरुदेवांच्या चरणी भक्त आपल्या निष्ठा, श्रद्धा, भक्तीबरोबर धनकोष व खिसेही रिकामे करतात. गुरु शेकडो हजारो कोटींचे स्वामी होतात पण भक्त बिचारे मात्र नंतर काही दिवसात  पस्तावतातही! याला अपवाद असू शकतील पण तरीही सामान्यांनी या पासून दूर रहावे हेच हिताचे. असो.

ग्रंथ हेच गुरु.

म्हणून मला वाटते की सध्याच्या विज्ञान युगात या गुरु, बुवा, बापूंच्या नादी न लागता माणसाने ग्रंथ हेच गुरु आणि त्यांचे वाचन हीच उपासना मानावी.

वाचनाला पर्याय नाही. विविध समाजमाध्यमे, आंतरजाल, गुगल, विकिपिडिया हे ही सध्याचे शक्तिशाली गुरुच आहेत. सूज्ञाने त्यांच्या भजनी लागून आपला उद्धार आपणच करावा.

ग्रंथमहात्म्य

‘ग्रंथदासा’च्या शब्दातच ऐका ग्रंथमहात्म्य

या साऱ्यांची (ग्रंथकारांची) कैक चिंतने। शिक्षणे, शिकवणे, निरीक्षणे। सिद्धांत, मते, अनुमाने। आपापल्या शास्त्राविषयी।।१२।।

त्यांचेच हे उपकार। लिहिले ग्रंथसंभार। ज्ञानाचे भरले भांडार। ग्रंथगर्भी।।१३।।

हे थोरांच्या अनुभवांचे बोल। साधके अभ्यासावे सखोल। जाणून विद्यार्जनाचे मोल। जन्म सार्थकी लावावा।।१४।।

ग्रंथ ज्ञानमार्गीचे वारू। ग्रंथ दवडिती अज्ञान तिमिरू। की भवसागराचे तारू। पैल लाविती।।१५।।

ग्रंथ हेचि गुरु। ग्रंथ परम उपकारू।त्यांना माझा नमस्कारू।अत्यादरे।।१६।।

ग्रंथांविषयी अनादरू। करिता हानि अपरंपारू।हे सत्य मनी धरू। स्वहिताकारणे।।१७।।

नाना विषयांचे नाना ग्रंथ। नाना भाषेतील नाना ग्रंथ। नाना कला शास्त्रांचे अद्भुत ग्रंथ। टीका, कोष, उपदेश।।१८।।

सकळ ग्रंथांविषयी आदरू। धरून मनी अपारू।धुंडाळावे ग्रंथांतरू। नित्य नेमे।।१९।।

नाना ग्रंथ वाचावे। सार शोधून घ्यावे। असार ते त्यजावे। हे विहित क्रिया।।२०।।

(ग्रंथदासविरचित ‘ग्रंथसंग्रह निगराणी प्रकरण’)

वाचन हीच उपासना. वाचनाचे महत्व आणि लाभ ग्रंथदास आपल्या ‘वाचनक्रिया निरूपण प्रकरणा’त लिहितो….

वाचन, चिंतन, मनन। मंथन आणि निधिध्यासन। हेचि साधकाचे लक्षण। यास उपाय नाही।।३६।।

जयास वाटे थोर व्हावे। त्याने अखंड वाचावे।वाचता वाचता जाड व्हावे।  गगनासारिखे।।३७।।

आता ऐका वाचनाचे लाभ। गळती बुद्धीचे मळभ। मार्ग सापडे सुलभ।ज्ञान मंदिराचा।।३८।।

वाचने संशय फिटती। वाचने आशंका आटती।वाचने क्षितिजे रुंदावती। जाणिवांची।।३९।।

वाचने विषय समजती। वाचने रहस्ये उकलती।  वाचने धोके टळती। अधोगतीचे ।।४०।।

वाचने लौकीक वाढे। वाचने लोकसंग्रह घडे। संतसमागम घडे। लाभे व्युत्पन्नता।।४१।।

वाचने कळे सभ्यता। अंगी येई विनम्रता। वाचने लोकप्रीयता। वाढीस लागे।।४२।।

ऐसे सारेच लाभते। भक्ती-ज्ञान-वैराग्य चढते।सार-असार कळो येते। चित्ता ये प्रसन्नता ।।४३।।

वाचने प्रज्ञा वाढे। वाचने अज्ञान झडे। वाचने वाचती वेढे। जन्म मृत्यूचे।।४४।।

वाचाल तरी वाचाल। नाही तर मराल। न करावा अन्य सवाल। या ऊपरी।।४५।।

(“ग्रंथदास”विरचित “वाचनक्रीया निरूपण प्रकरण”)

समारोप

आम्हाला ज्यांनी जन्मभर शिकवले, समजावले, शहाणे केले त्या सर्वांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. ज्या वेळी मातेच्या उदरातून आपण या जगात आलो त्यावेळी होतो केवळ एक जिवंत त्वचा-अस्थि-मांसाचा पिंड! त्यावेळी आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले होते खरे, पण व्यक्तिमत्व प्राप्त व्हायचे होते. त्या व्यक्तिमत्वहीन अस्थित्वचामांसपिंडावर जन्मल्या क्षणापासून पुढे क्षणोक्षणी कोणी ना कोणी काही ना काही संस्कार केले आणि त्या पिंडाला आकार देत राहिले. आज आपण जे आहोत, आपले जे व्यक्तिमत्व घडले आहे, जे जगाला दिसते आहे त्यामागे अनंत अज्ञात हात आहेत. ते हात या साऱ्या  ज्ञात अज्ञात गुरुंचे आहेत.

त्यात सर्वाधिक वाटा आहे असंख्य ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांचा. तेही सगळेच आपले गुरु आहेत हे नाकारता येत नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरुंचे, ग्रंथकर्त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे आभार मानणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी त्या सर्व गुरुजनांना आणि त्या मागील महद्गुरुतत्वाला माझा साष्टांग दंडवत! तस्मै श्री गुरवे नमः!!

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोर पर्वाचा अंत

वयाच्या ७७ व्या वर्षी रविंद्रनाथांना त्वचेचा जंतुसंसर्ग (Erysipelas) झाला होता. त्याच्याच गुंतागुंतीमुळे १० सप्टेंबर १९३७ रोजी ते चक्कर येऊन पडले व त्यातच ते कोमा मध्ये गेले. जवळजवळ ६० तास ते कोमात होते. त्याकाळी खाजगी टेलीफोन ची सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांना शांतिनिकेतनात पोहोचायला वेळ लागला. मात्र सुदैवाने रविंद्रनाथांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला व ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खोलीत पडलेला एक प्लायवुडचा तुकडा दिसला व त्यांनी ब्रश व रंग मागितले कारण त्यांना खिडकीतून दिसणारी निसर्गशोभा कुंचल्याने चित्रबद्ध करायची होती. तेंव्हा ते शुद्धीवर येऊन फक्त तीन दिवस झाले होते. त्या चित्राला त्यांनी शीर्षक दिलं, ‘A dark wood with streaks of yellow light breaking through it’s gloom. ‘पुढे आणखी १० च दिवसांनी त्यांनी एक कविता लिहिली व पुढच्या तीन महिन्यात त्याच कवितेला घेऊन १८ कवितांची एक शृंखला (poem cycle) लिहिली. तिला शीर्षक दिलं प्रांतिक. ही poem cycle पुढच्या कांही महिन्यात (१९३८) प्रकाशितही केली. या कवितांच्या केंद्रस्थानी ‘जीवन, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन’ हाच विषय आहे. या सर्व अठरा कविता त्यांच्या स्वतःच्या मूळ बंगाली कवितांचं इंग्रजी भाषांतर आहे. कोमात असताना, जीवनमृत्यूच्या दरम्यानच्या दोलायमान स्थितीमुळे त्यांच्या नकळत त्यांच्या अंतर्मनात जे तरंग उठले असतील त्यांचं हे प्रकटीकरण असू शकतं.

‘On Deathland dying’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका एलिझाबेथ म्हणतात “रविंद्रनाथ टागोरांइतका मृत्यूविषयी सखोल विचार कुणी केला नसेल. ” 

तरुण वयातच जिवलग मैत्रीण व स्फूर्ती स्थान असलेल्या कादंबरी देवींच्या आकस्मिक मृत्यू मुळे त्यांच्या मनाला ज्या असह्य वेदना झाल्या, त्यामुळे कदाचित उर्वरित आयुष्यात मृत्यू हाच त्यांचा जिवलग सखा झाला असावा. वयाच्या ५० व्या वर्षी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “सूर्य, चंद्र, तारे, जमीन, आकाश, झाडं झुडपं, नद्या, समुद्र सगळं कांही जिथल्या तिथं असताना माझी जिवलग सखी मात्र एका क्षणात होत्याची नव्हती झाली. हे स्वप्न की सत्य हे कळायच्या आत घडूनही गेलं. एखादा कपडा कशात तरी अडकून कांही कळायच्या आत टर्रकन फाटून जावा व त्या फाटलेल्या भोकातून पलिकडे सर्व अंधारच अंधार दिसावा तसं झालं. “

ह्या मृत्यू नामक अंधारानेच मग त्यांना भुरळ पाडली. जीवन जर क्षर आहे तर अक्षर काय आहे, याचा शोध घेण्याची प्रेरणा त्यांना या प्रसंगाने दिली. सावलीतलं झाड जसं सूर्यप्रकाशाच्या शोधात आपल्या फांद्यांचे हात पाय पसरतं तसाच मृत्यूच्या अंध:कारात अडकलेला त्यांचा आत्मा सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचा शोध घेत होता.

सन १९३७ मध्ये कोमात जाण्याच्या घटनेनंतर रवींद्रनाथ पूर्ण बरे कधीच झाले नाहीत. त्याची प्रकृती दिवसें दिवस ढासळतच चालली होती. त्यातच त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्या किडनीज् हळूहळू निकामी होऊन युरेमिया व इतर गुंतागुंत निर्माण झाली. हवापालट करण्यासाठी म्हणून १९४० मध्ये टागोरांच्या सून प्रतिमा देवी त्यांना किलामपोंग येथे घेऊन गेल्या पण तिथे त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना शांतिनिकेतनात परत आणण्यात आलं.

आणि ७ मे १९४१ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

—–

गीत : १००

DIVE down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless.

No more sailing from harbour to harbour with this my weather-beaten boat. The days are long passed when my sport was to be tossed on waves.

And now I am eager to die into the deathless.

Into the audience hall by the fathomless abyss where swells up the music of toneless 

strings I shall take this harp of my life.

I shall tune it to the notes of for ever, and, when it has sobbed out its last utterance, lay down my silent harp at the feet of the silent.

—-

मराठी भावानुवाद : गीत : १००

या अथांग, अतल सागरी

शोधिले जन्मजन्मांतरी

*

कुठे मिळेना, असा शिंपला

ज्या मोत्यांत, अनंग लपला

*

शोध शोधुनी दमलो मी पण

शीड फाटले, होडीचे पण

*

पुरे अता मज नाही साहवत

तुझ्याविना प्रभू नाही राहवत

*

अमर्त्य अशा तुझ्या अंतरी

मम मृत्युला स्थान दे परी

*

शेषशायी तू, क्षीरसागरी 

येईन म्हणतो, तुझ्या मंदिरी

*

माझी हृदयस्थ वीणा छेडुनि

मूकपणाने तारा झंकारुनि

*

चिरंतनाचे सूर लावुनि

तुटतील तारा मूक होउनि

*

शांतच वीणा, शांतच तूही

चिरशांती मम उजळील देही

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

गीत : १०१

EVER in my life have I sought thee with my songs. It was they who led me from door to door, and with them have I felt about me, searching and touching my world.

It was my songs that taught me all the lessons I ever learnt; they showed me secret paths, they brought before my sight many a star on the horizon of my heart.

They guided me all the day long to the mysteries of the country of pleasure and pain, and, at last, to what palace gate have they brought me in the evening at the end of my journey?

—–

मराठी भावानुवाद : गीत : १०१

तुझ्याचसाठी गीते रचितो

तुझ्याचसाठी ती मी गातो

त्या गीतातून तूच स्पर्शितो

मम विश्वाचा एक कोपरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

*

या गीतांनी मला शिकविले

मार्ग मुक्तीचे मज दावियले

मनःचक्षुंनी मग साठविले

तारांगण हृदयात, मधुकरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

 *

ही गीते मज घेऊनि जाती

सुखदुःखाचे देश दाविती

गूढ तयांचे अर्थ सांगती

अंतिम समयी तुझिया द्वारा

मजला नेती हे सर्वेश्वरा॥

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares