रेखा जांबवडेकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ सिनेमा, क्रिकेट, राजकारण… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆
☆
एक गोष्ट मला कधीच समजली नाही की…
चित्रपटांतील अभिनेते किंवा अभिनेत्री असे नेमके काय काम करतात की त्यांना एका चित्रपटासाठी ५० किंवा १०० कोटी रुपये मिळतात…?
काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशी चर्चा खूप झाली होती की अभियांत्रिकीतील टॉपर मुले-मुली पुढे शिक्षण घेण्याऐवजी चित्रपटसृष्टीची निवड का करतात?
ज्या देशात सर्वोच्च शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते इत्यादी लोक वर्षाला १० ते २० लाख रुपये कमावतात, ज्या देशाचा राष्ट्रपती वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा कमी कमावतो, त्या देशातील चित्रपट कलाकार वर्षाला १० ते १०० कोटी रुपये कमावतात..!
कमावोत; पण ते असे काय काम करतात? हा प्रश्न तर उपस्थित होणारच ना…?
आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे?
मोठमोठ्या शास्त्रज्ञांना १०० कोटी रुपये कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागते आणि हे लोक एका वर्षात इतके पैसे कमावतात..!
प्रश्न तर उपस्थित होणारच…
आज ज्या तीन क्षेत्रांनी देशातील नव्या पिढीला मोहित केले आहे ती म्हणजे
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण
या तीन क्षेत्रांशी संबंधित लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा दोन्हीही मर्यादेपलीकडे गेली आहे. हेच आजच्या आधुनिक तरुणांचे आदर्श बनले आहेत. प्रत्यक्षात आज त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेव्हा एखादी गोष्ट महागडी असते, अविश्वसनीय असते, अप्रासंगिक असते, तेव्हा ती देश आणि समाजासाठी हानिकारक किंवा आत्मघातकी ठरते.
आज कोणताही सुशिक्षित युवक किंवा युवती या क्षेत्रांकडे आकर्षित झाला नाही तरच ते अस्वाभाविक वाटेल..!
बॉलिवूडमध्ये ड्रग्स आणि वेश्याव्यवसाय, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग आणि ऑनलाइन जुगार, राजकारणात गुंडगिरी आणि भ्रष्टाचार.
या सगळ्यांच्या मागे मुख्य कारण पैसा हेच आहे..
आणि हा पैसा त्यांच्यापर्यंत आपणच पोहोचवतो, हीसुद्धा मोठी मूर्खता आहे..!
७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य वेतन मिळत असे. ३०-४० वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती. ३०-४० वर्षांपूर्वी राजकारणही इतके धनसंपन्न नव्हते.
हळूहळू आपण लुटले जात राहिलो आणि ते आनंदाने आपल्याला लुटत राहिले..!
आपण या माफियांच्या जाळ्यात इतके अडकलो आहोत की येणाऱ्या पिढीचे आणि देशाच्या भविष्याचे नुकसान करत आहोत..!
५० वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट इतके अश्लील किंवा फुहड नव्हते. क्रिकेटपटू आणि नेते इतके अहंकारी नव्हते. आज तर हे लोक देव बनून बसले आहेत..!
आता गरज आहे की यांना डोक्यावरून खाली उतरवून जमिनीवर आणावे, जेणेकरून त्यांना स्वतःची मर्यादा कळेल..!
एकदा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो-ची-मिन्ह भारतात आले होते.
त्यांची भेट भारतातील मंत्र्यांशी झाली. बैठकीत त्यांनी मंत्र्यांना विचारले, “तुम्ही सर्व काय करता? ” आपले मंत्री म्हणाले, “आम्ही सर्व राजकारण करतो. “
त्यांना हे उत्तर समजले नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले, “माझा अर्थ असा की तुमचा व्यवसाय काय आहे? ” मंत्री म्हणाले, “राजकारण हाच आमचा व्यवसाय आहे. “
हो-ची-मिन्ह थोडे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “कदाचित तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही. राजकारण तर मीही करतो, पण माझा व्यवसाय शेती आहे. मी शेतकरी आहे. माझा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. सकाळ-संध्याकाळ मी शेती करतो आणि दिवसा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतो. ” हे ऐकून भारतीय प्रतिनिधीमंडळातील लोक निरुत्तर झाले..!
नंतरच्या एका सर्वेक्षणात समजले की भारतात ६ लाखांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह राजकारणावर चालतो; आज ती संख्या कोट्यवधींमध्ये पोहोचली आहे..!
जेव्हा कोरोनाने संपूर्ण युरोपला विळखा घातला होता, तेव्हा डॉक्टरांना अनेक महिने सलग सुट्टी मिळाली नव्हती आणि संपूर्ण युरोप संकटात सापडला होता. तेव्हा पोर्तुगालमधील एका डॉक्टरने संतापून म्हटले होते, “तुम्ही सर्व फुटबॉलपटू रोनाल्डोकडे जा. तुम्ही त्याला कोट्यवधी डॉलर्स देता, मग तोच तुम्हाला वाचवेल. आम्हाला सामान्य फी देऊन इतक्या मोठ्या अपेक्षा का ठेवता? “
माझे स्पष्ट मत आहे की ज्या देशातील तरुणांचे आदर्श शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी नसून, राजकारणी, क्रिकेटपटू आणि अभिनेते असतात; त्या देशाची वैयक्तिक प्रगती कदाचित होऊ शकते, पण देशाची सर्वांगीण प्रगती अशक्य आहे.
सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, धोरणात्मक दृष्टिकोनातून तो देश कायम मागे राहील.
अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील.
ज्या देशात अनावश्यक आणि अप्रासंगिक क्षेत्रांचे वर्चस्व वाढत राहील, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल.
देशात भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढत जाईल.
प्रामाणिक लोक मात्र उपेक्षित राहतील. राष्ट्रवादी लोकांना जगणे कठीण होईल.
तथापि, सर्व क्षेत्रांमध्ये काही चांगले लोकही असतात आणि ते माझ्या दृष्टीने आदरास पात्र आहेत.
गरज आहे की आपण प्रतिभावान, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, समाजसेवी, देशासाठी काहीही करण्याची भावना असलेले, जिद्दी देशभक्त, राष्ट्रनिष्ठ वीर लोकांना आदर्श मानले पाहिजे…,
नाचणारे-गाणारे भांड, ड्रग्ज घेणारे, चारित्र्यहीन, गुंड, मवाली, जातीयवादी आणि दुष्ट देशद्रोही लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती आपण विकसित केली पाहिजे.
आपण असे केले तर ठीक, अन्यथा देशाची अधोगती निश्चित आहे.
तुम्ही स्वतः ठरवा,
सलमान, अमिर, शाहरुख, ह्रितिक, करिश्मा, करिना, आलिया किंवा सचिन, विराट यांचे देशाच्या सामाजिक मूल्यवर्धन आणि विकासात काय योगदान आणि सहकार्य आहे? (Value addition)
आपली मुले अशा लोकांना आदर्श मानतात जे स्वतः फक्त आत्मकेंद्रित आहेत, असे या लेखाचे मत आहे..!
भविष्यात माझ्या भारत देशाला अशा स्वयंमशगुल तारकांची फार गरज नाही.
डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांची गरज भासणार आहे.
म्हणून भारताचे भविष्य डोळे उघडून जागे होवो अशी आशा.
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





