प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

 बकुळीची फुले वेचतांना कविता आठवते…

 या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया

 बकुळीचा गजरा आणि बकुळीचा अत्तर मला फार आवडत.

पहाट होताच मंद धुंद वाऱ्यातून एक एक पाकळी उमले चराचरात

 रंगमार्दव पिवळसर हिरवा

भ्रमरही भिरभिरती चाखावया मधुर मकरंद

कधीन हिरमुसता फुले फुलती *

 गंधीत व्हावी दुःखे अवघी

 रहावी सुखा सवे आनंदी

 

 ओच्यात वेचता नाजूक फुले

 ओंजळीत घेता गंधाने वेडावे मन

मोत्या सम नाजूक फुले सुरेख 

एकेक फूल ओवताना

बहरात येई गजरा

 जपून मनाच्या कुपीत त्याचा गंध

लावे त्याचा तो वेगळाच छंद

येता सर पहिली पावसाची बकुळही मोहरे भरभरून

राधा ही वाट पाहे माधव देईल मज कधी फुल

नाजूक पाकळीत वाटे नक्षत्र अवतरले धरेवर

बहरतो बारमाही, औषधीय गुणधर्म आयुर्वेदात

बारमाही फुलणारं औषधीय गुणधर्माचं आणि पावसाळ्यात अधिकच भरणार बकुळ.

या फुलाला मराठीत बकुळी मालवणी मध्ये ओवळा कोकणी ओमवाल अस म्हणतात तर हिंदीत मौलसरी, बंगाली बकुल, गुजराती बरसोळी तामिळ मगिळहंबू, आदिवासी वोवळ, कानडी मध्ये रंजक, मल्याळम इळन्नी, उर्दू किराकुली.

बकुळ वृक्ष 

बकुळीची फुले त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत मुलांना ही फुले गोळा करायचा छंद असतो त्याचबरोबर धार्मिक ग्रंथात या वृक्षाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे रामायण महाभारत यामध्ये याचे उल्लेख आहेतच पण बुद्ध, जैन धर्मीय सुद्धा या वृक्षाला पवित्र मानतात बकुळीची फुले सुकली तरी त्याचा सुगंध टिकून राहतो तसेच आकारही फारसा बदलत नाही.

हा वृक्ष मूळचा भारतीय उपखंडातील असून ऑस्ट्रेलिया मध्ये ही आढळतो साधारण पाणथळ जागा सोडल्यास उष्णकटिबंधात याची चांगली वाढ होते याचे वनस्पतीशास्त्रीय नाव Minusops elengi linn असून कुळ नाव Sapotaceae आहे इतर नावे बकुल, बोलसरी, चिरपुष्प, ओवळी, इंडियन मेडलर, बुलेट वूड इत्यादी आहेत हा वृक्ष सदाहरित असून 30 ते 50 फूट उंच वाढतो खोड गोलाकार गुळगुळीत असते फांद्या गोलाकार पसरतात पाने चकचकीत हिरव्या रंगाची असतात पाने एक आड एक अशी येतात सुमारे दोन ते चार इंच लांब तर एक ते तीन इंच रुंदीची असून लांबट टोकदार असतात फुले मळकट पांढऱ्या रंगाची असून गोलाकार असतात आतला पुष्प मुगुट उठून दिसतो फुले आकर्षक सुगंधी असतात फळे लांबट गोल मासाल असतात त्यांचा रंग भगवा पिवळा असतो फुले व फळे साधारण जानेवारी ते जुलै या कालावधीत येतात फळे खाण्यासाठी वापरतात त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत फळे चवीला तुरट गोड असतात 

या वृक्षाचे अनेक औषधी उपयोग आहेत दंतविकार, वेदना नाशक, ज्वरनाशक, डांग्या खोकला, आव या विकारांमध्ये या वनस्पती पासून औषधे बनवली जातात तसेच फुलांपासून अत्तर बनविले जाते तसेच फुलांपासून हार व गजरे बनवितात लाकूड टणक टिकाऊ असल्यामुळे बांधकामात त्याचा वापर केला जातो दाट सावली व सुगंधी फुले यामुळे हा वृक्ष मंदिर, बागा, तसेच सावलीसाठी रस्त्याच्या कडेला लावला जातो अशा आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेला हा वृक्ष.

लेखिका : सुचिता पाटील

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted