सौ. दीप्ती गौतम
वाचताना वेचलेले
☆ थवा पक्ष्यांचा… – लेखक : डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆
☆
मानवी जीवनाचे वास्तव:
एके सकाळी एक मुलगा आपल्या आजोबांसोबत शेतात फिरायला गेला.
अचानक त्याच्या नजरेस आकाशात इंग्रजी व्ही (‘V’) आकारात उडणारा पक्ष्यांचा एक मोठा थवा दिसला.
मुलाने कुतूहलाने विचारले,
“आजोबा, हे पक्षी नेहमी थव्यानेच का उडतात? प्रत्येकाने आपापल्या मार्गाने उडालं तर चालणार नाही का? ”
आजोबा हसले.
ते म्हणाले,
“बाळा, निसर्ग कधीच विनाकारण काही करत नाही.”
ते पुढे म्हणाले,
“हे स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.
ते जेव्हा ‘व्ही’ आकारात उडतात, तेव्हा सर्वात पुढचा पक्षी हवेला चिरत पुढे जातो. त्यामुळे त्याच्या मागच्या पक्ष्यांना कमी प्रतिकार सहन करावा लागतो आणि त्यांची ऊर्जा वाचते.
पण एक गोष्ट लक्षात घे…
पुढचा पक्षी कायम पुढे राहत नाही.
तो दमला की शांतपणे मागे जातो…
आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो.
असं करत करत…
संपूर्ण थवा एकमेकांच्या बळावर हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो.
मुलगा आश्चर्याने ऐकत होता.
तेवढ्यात एक पक्षी थव्यापासून थोडा दूर गेला.
क्षणभर तो स्वतंत्रपणे उडत राहिला.
पण लवकरच त्याला वार्याचा जास्त प्रतिकार जाणवू लागला.
त्याचा वेग कमी झाला…
दिशा डळमळू लागली…
आणि काही क्षणांतच तो पुन्हा थव्यात येऊन सामील झाला.
आजोबा हसून म्हणाले,
“बघितलंस? पंख त्याच्याकडे आधीही होते… पण? सोबत नव्हती.”
⸻
आपलं आयुष्यही असंच आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे स्वतःची क्षमता असते.
पण…
जीवनाचा लांब प्रवास फक्त क्षमतेवर पूर्ण होत नाही.
त्यासाठी साथ लागते…
विश्वास लागतो…
आधार लागतो…
आणि आपली माणसं लागतात.
कुटुंब…
मित्र…
समाज…
हे आपल्या आयुष्याचे ‘थवे’ आहेत.
जेव्हा आपण थव्यात असतो…
तेव्हा कधी आपण इतरांचा भार हलका करतो…
तर, कधी इतर आपल्या थकलेल्या पंखांना बळ देतात.
म्हणूनच…
समूहातील एखादी व्यक्ती काही दिवस दिसत नसेल…
तर तिची चौकशी करायला हवी.
कदाचित ती आयुष्याच्या वार्याशी एकटी झुंज देत असेल.
तिला दोष द्यायला नको…
तिला पुन्हा थव्यात घेऊन यायला हवे.
कारण, नैसर्गिक नियम हाच आहे—
की, पक्षी जसा एकटा तर उडू शकतो…
पण तोच थव्याने अधिक दूर, अधिक सुरक्षित आणि अधिक सक्षमपणे प्रवास करु शकतो.
माणसांचंही तसंच आहे.
एकट्याने यश मिळवता येईल…
पण आयुष्य जिंकण्यासाठी अखेर माणसं लागतात.
म्हणून…
कोणालाही मागे राहू द्यायला नको.
कोणाला हरवू द्यायला नको.
कारण…
जसे, एकत्र उडणारे पक्षी फक्त अंतर पार करत नाहीत…
तर ते एकमेकांना गंतव्यापर्यंत पोहोचवतात.
म्हणूनच…
जीवनाचं खरं सौंदर्य “मी” मध्ये नसतंच…
ते नेहमी “आपण” मध्येच असतं.
☆
लेखक : डॉ. शिरीष राजे
मानसशास्रतज्ज्ञ
प्रस्तुती : दीप्ती गौतम
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




