श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

एकदा एका माकडाला  ?अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्यानं झोपलेल्या सिंहाचे ?  कान ओढले. 

सिंह उठला आणि रागानं गर्जना केली की, “ हे धाडस कोणी केलं ? 

स्वतःच्या मृत्यूला स्वत:हून कुणी बोलावलं ? “ 

माकड : “ मी कान ओढले.  महाराज, सध्या मला कोणी मित्रच नसल्यामुळे मी खूप उदास आहे?; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.”

सिंहानं हसून विचारलं ?: “ माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना ?” ?

माकड : “ नाही महाराज.”

सिंह : “ मग ठीक आहे.  आता असं कर. आणखी पाच-दहा वेळा माझे कान खेच, खूपच छान वाटतंय रे !”

या कथेचे सार :— एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच. म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, ? त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. ? मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा, मजा करत रहा. संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.

विश्वास ठेवा की, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मैत्री – श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली  वा  अडाणी कशीही असो – मैत्री  मैत्रीच असते. 

सहज वाटले मन मोकळं करावं ☺️.

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments