सौ. सुचित्रा पवार

??

☆ झाकोळ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

बरेचदा आपण छोट्या छोट्या कारणामुळं नाराज होतो ,निराश होतो व हातातील काम बाजूला पडते .

कोणत्याही स्थितीत आपण आपले मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नये, कारण कोणतेच दिवस घर करून जीवनात रहात नाहीत तसेच सुदृढ मन एव्हढ्या तेव्हढ्या कारणावरून विचलित होत नसते .

आपले मनःस्वास्थ्य बिघडले तर सभोवतालची परिस्थिती बदलत नाही. उलट परस्थिती आपल्यावर हवी होते व आपण त्या स्थितीचे गुलाम होतो. दिवस पुढे सरकतात अन मग बरेच काही यात निसटून जाते– आणि फक्त न फक्त पश्चाताप शिल्लक रहातो .जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून परिस्थितीवर आपल्याला स्वार होता आलं पाहिजे,  त्याचे लगाम आपल्या हाती खेचता आले पाहिजेत. अगदीच काळोखात चांदण्या नसल्या तरी काजवा तरी असतोच ! कधी काजवा, कधी चांदणी तर कधी चंद्र जीवनात प्रकाश देतोच !

आपण स्वयं सूर्य आहोत, फक्त झाकोळले आहोत. तो झाकोळ दुसरे कुणी दूर करणार नाही, आपली आभा तेज पसरायला तो झाकोळ आपणच दूर करायचाय, किंवा त्या झाकोळातून पुढे जायचंय .

जो काटा पायात रुतून बसलाय तो कुरूप करतो. तो काटा हळुवारपणे काढून टाकता आला पाहिजे, किंवा तो तसाच पायात ठेवून त्याची टोकदार बोच मोडता आली पाहिजे.

निराशेच्या या अंध:कारात आपले खूप काही हरवते जे कधीच परत येणार नसते. बरेचदा आपली म्हणणारी 

माणसे ,कामाच्या ठिकाणची, आसपासची माणसे, मित्र, मैत्रिणी, नैराश्य, दुःख, मानसिक यातनेचे झाकोळ पसरतात आपल्या जीवनावर.

ज्या गोष्टीपासून त्रास होतोय ती गोष्ट महत्वाची असली तरी डिलीट करता यायला पाहिजे ….. 

” झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ” असं मनाला बजावून झाकोळातून  सूर्य होऊन तळपायला हवे .

 …… Be happy be positive. 🌹

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted