मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 98 ☆ सांगना केव्हा येणार तू… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 98 ? 

☆ सांगना केव्हा येणार तू… ☆

आठवतात दिवस

आजही मला ते

ओल्या वाळूतले

खेळण्याचे ते…

 

तुझा लटका राग

आजही आठवतो

तुझा तो अबोला

मी मनात साठवतो

 

असा हा तुझा ध्यास

माझ्या रोम रोमात

तुझ्या-विना मी,

असतो फक्त शून्यात…

 

तुझे प्रेमळ बोलणे

स्मरणात आहे मला

सांग तू आहेस कुठे

कसा शोधू गं तुला…

 

अंगणातल्या जागी

आजही पारिजात उभा

विचारतो सतत मला

कुठे आहे तुझी प्रभा…

 

त्यास मी काय सांगू,

न कळलेच तेव्हा

प्रिये सोडणं अबोला,

सांगणं तू येणार केव्हा…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा  असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.

क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला  अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!

मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!

मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !

त्याचीच ही अनुभव कथा!

‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २ 

(पूर्वसूत्र – एका गंभीर बनू शकणाऱ्या प्रश्नाचं हे सहज सोपं उत्तर होतं. म्हणून मग आठवड्यातले दोन दिवस बँकेत येताना मी स्वतःच  लिटिल फ्लॉवर काॅन्व्हेंट स्कूलमधे जाऊन स्वतः कॅश मोजून घेऊन कॅश व स्लीप बँकेत घेऊन येऊ लागलो)

काही दिवस हे सुरळीत सुरू राहिलं आणि तो अनपेक्षित प्रसंग घडला. एका शुक्रवारची गोष्ट. रिजनल ऑफिसच्या अचानक आलेल्या फोननुसार शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मला ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी कोल्हापूरला जावं लागणार होतं.रविवारी पौर्णिमा असल्याने सोलापूरला परतण्यापूर्वी माझ्या नित्यनेमानुसार नृसिंहवाडीला दत्तदर्शन घेऊन येणंही शक्य होणार होतं. मीटिंगची आवश्यक ती तयारी रात्री उशीरपर्यंत बसून पूर्ण केली.शनिवारी पहाटे उठून मी बॅग घेऊनच बाहेर पडलो आणि ‘लिटिल फ्लॉवर’मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले.पैसे आणि स्लिप ब्रॅंचमधे जाऊन सुजाता कडे सोपवली.

“सुजाता नीट मोजून घे मगच मी निघतो”मी तिला सांगितलं.

ती ‘हो’ म्हणाली. मी केबिनमधे आलो. थोडा वेळ वाट पाहिली. मग न रहावून बॅग घेऊन बाहेर आलो.

“सर, खरंच निघा तुम्ही”

सुजाता म्हणाली तेव्हा माझी सुटका झाली.

कोल्हापूरची मीटिंग चांगली झाली. नृसिंहवाडीचं दत्त दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं. घरी सर्वांना भेटणं,गप्पा मारणं, फिरणं झालं आणि नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूरची बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमाराला घरी पोचलो. साडेआठला ब्रॅंचमधे. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं.मी केबिनमधे जाताच माझीच वाट पहात असलेले सुहास गर्दे माझ्यापाठोपाठ केबिनमधे आले.

“गुड मॉर्निंग सर”

“गुड मॉर्निंग.कांही विशेष?”

“विशेष काही नाही सर. पण शनिवारी थोडा घोळच झाला होता”

माझ्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली.

“कसला घोळ?”

“लिटिल फ्लॉवरच्या कॅशमधे ८५० रुपये शॉर्ट होते.”

“अहो भलतंच काय?कसं शक्य आहे हे?”

“सर,खरंच.५० रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या”

एव्हाना सुजाता समोर येऊन खाली मान घालून उभी होती.

“सुजाता, हे काय म्हणतायत?”

“हो सर. ८५० रुपये शॉर्ट होते” तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरू लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. मला संताप अनावर होऊ लागला. मी काही न बोलता डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने तिच्याकडे पहात तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिन बाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून तिच्याकडे दिलेले असताना ८५० रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्य नव्हतं आणि चक्क १७ नोटा कमी? मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करीत राहिला. तिची आर्थिक चणचण,कौटुंबिक प्रश्न,थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देत होतं. पण संशयाचा काटा मनात रुतण्यापूर्वीच मी तो उपटून दूर भिरकावून दिला. ‘नाहीs सुजाता असं कांही करणं शक्यच नाही..’ मनाला ठामपणे बजावून सांगितलं. पण मग ‘साडेआठशे रुपये गेले कुठे ‘हा प्रश्न होताच.

“सुहास, मला पूर्ण खात्री आहे. मी ती कॅश दोनदोनदा मोजून घेतली होती. त्या कॅशमधे फरक असणं शक्यच नाही. दुसऱ्या कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल. कांहीतरी गफलत  नक्कीच झाली असेल.हा प्रश्न धसाला लावलाच पाहिजे”

“त्याची खरंच काही गरज नाहीये सर. प्रॉब्लेम आता मिटलाय.पैसे वसूल झालेत.”.   

“वसूल झाले म्हणजे?कसे? कुणी भरले?”

“सर, मी ‘लिटिल फ्लॉवर’ला फोन करून त्याच दिवशी सांगितलं.तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेला आहात हेही बोललो. त्यांनी आढेवेढे न घेता लगेच पैसे पाठवले सर”

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना.मिस् डिसूझाना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा, पण माझाच हात थरथरू लागला. डायल न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना मात्र त्याच्याही नकळत तो मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून गेलाय असंच मला वाटू लागलं. कारण पैसे मोजून घेणारा मी होतो! मी शांतपणे डोळे मिटून मान मागे टेकून बसलो. स्वस्थता नव्हतीच. माझ्यासमोर उभं राहून मिस्  डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडेच पहातायत असा भास मला झाला आणि मी दचकून भानावर आलो. खूर्ची मागे सरकवून ताडकन् उभा राहिलो. काहीतरी करायला हवं होतं पण काय करावं ते सुचत नव्हतं. अस्वस्थ मनाला प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार सळसळत वर झेपावला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो.

“सुजाता, मी त्या दिवशी ‘आधी कॅश मोजून घे मगच मी जातो” असं तुला सांगितलं होतं ना?” तिने भेदरून माझ्याकडे पाहिलं. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देची बसल्या जागी चुळबूळ सुरू झाली.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं?”

“सर, सुजाताच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती.त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश बरोबरच असणार म्हणून तिने ती न मोजता तशीच बाजूला सरकवून ठेवली होती आणि सगळ्यांत शेवटी ती मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी असल्याचं लक्षात आलं”

“म्हणून मागचा पुढचा विचार न करता तुम्ही थेट मिस् डिसोझांना फोन केलात?”

“साॅरी सर “

त्यांच्यासमोर डोके आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केल्यासारखं मलाच अपराधी वाटू लागलं. त्यांना समक्ष जाऊन भेटणंच गरजेचं होतं. तेही आत्ताच. या क्षणी. पण जाऊन सांगणार काय? रिक्त हस्तानं जाणंही योग्य वाटेना. पगार व्हायला अजून बरेच दिवस अवकाश होता. त्या काळी ८५० रुपये ही कांही फार किरकोळ रक्कम नव्हती. आपल्या सेव्हिंग खात्यात पुरेसा बॅलन्स असेल? हा विचार मनात आला आणि मी खसखन् आमचं स्टाफ लेजर ओढलं. माझ्या सेव्हिंग खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५ रुपये बॅलन्स होता. त्या काळी पाच रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायला लागायचा. मी लगोलग विथड्राॅल स्लिप भरून ८५० रुपये घेतले आणि बाहेरचा रस्ता धरला.

मिस् डिसोझांच्या कपाळावर सूक्ष्म आठी होती. चेहऱ्यावरचं स्मितहास्य विरून गेलं होतं. नेहमीची शांत नजर गढूळ झाली होती. त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस्..?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.”

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटेच आलो. सकाळी  ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय अॅम रियली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs.., नाऊ व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट फ्राॅम अस?” त्यांनी चिडून विचारलं.

मी काही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हॉट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. बट दे वेअर इनोसंट. त्यांची चूक मला रेक्टिफाय करू दे. प्लीज. तुमच्याकडून मी पैसे मोजून माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच तुमच्यापुरता तो व्यवहार पूर्ण झाला होता. पुढची जबाबदारी मीच स्वीकारायला हवी.सो प्लीज अॅक्सेप्ट इट”

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समवन ऑफ युवर स्टाफ मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ”

“नाॅट नेसेसरीली. ती एखादी साधी चूकही असू शकेल कदाचित. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“इट मीन्स यू आर पेईंग धीस अमाउंट आऊटऑफ युवर ओन पॉकेट”

“आय हॅव टू”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या एकदम विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानाने उठलो.निघणार   तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“वेट अ मिनिट. लिसन मि.लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो फ्रॉम अॅब्राॅड रेग्युलरली. तेव्हा ८५० रुपये ही रक्कम माझ्यासाठी खूप लहान होती. पण प्रश्न तत्त्वाचा होता. विश्वासाचा होता. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांच्या मागणीनुसार आठशे पन्नास रुपये पाठवले होते कारण त्या क्षणी आय डी नॉट वॉन्ट टू मेक इट अॅन इश्यू. इट्स नाईस यू हॅव कम पर्सनली.सोs नाऊ धीस मॅटर इज ओव्हर फाॅर मी. प्लीज डोन्ट वरी फॉर माय लॉस.आय ॲम शुअर माय गॉड वील गिव्ह इट बॅक टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या मनापासून बोलत होत्या. पण मला ते स्वीकारता येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास वाटतो आहे. माय गॉड ऑल्सो वीर स्क्वेअर अप माय लाॅस  इन धीस आॅर दॅट वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्य भावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. मला त्याचीच गरज आहे मॅम. प्लीज अॅक्सेप्ट इट…प्लीज”

त्या हसल्या.अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५० रुपये गेले कुठे ही रुखरुख माझ्या मनात होतीच. पण तीही फार काळ टिकली नाही. कारण मी परत बँकेत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्यापाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. सगळी चूक सुजाताची होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.

समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने लिटिल फ्लॉवरची कॅश मोजायला घेतली.पन्नास रुपयांची पॅकेटस् मोजायला सुरुवात करणार तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस नेहमीप्रमाणे ड्राफ्ट काढण्यासाठी कॅश भरायला आला. शनिवारचा हाफ डे.कॅशअवर्स संपत आलेले. त्याला तातडीने ड्राफ्ट हवा होता. सुजाता भांबावली. तिच्या रुटीन मेडिकल चेकअपची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून तिलाही निघण्याची घाई होती. त्यामुळे लिटिल फ्लॉवरची कॅश पूर्ण न मोजता तशीच बाजूला सारून तिने पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा खच. ती कॅश मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं त्यात ८५० रुपये जास्त आहेत. तिने पुन्हा सगळी कॅश मोजून खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेली रिसीट आणि जास्तीचे आलेले ८५० रुपये पेट्रोल पंपाच्या माणसाला परत केले. त्यानंतर लिटिल फ्लाॅवरची कॅश मोजायला घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की ती ८५० रुपयांनी कमी आहे. अर्धवट मोजून आधी बाजूला सरकवून ठेवताना त्यातल्या पन्नास रुपयांच्या सतरा नोटा अनवधानाने पेट्रोल पंपाच्या    कॅशमधे मिक्स झाल्या होत्या. म्हणूनच ती कॅश ८५० रुपयांनी जास्त येत होती. हे जाणवलं तेव्हा सुजाता घाबरुन गेली होती.

“पेट्रोल पंपावरचा माणूस रोज बँकेत येणाराच आहे ना?”

“नाही सर. रोज दिवाणजी येतात.शनिवारी ते नसल्याने दुसरा नोकर आला होता”

“हो पण मग प्रॉब्लेम काय? पेट्रोल पंपाचे मालक आपल्या ओळखीचे आहेत ना?”

सुहास गर्दे मान खाली घालून बोलू लागले,

“हो सर.मी इतर दोघा तिघांना घेऊन शनिवारी आधी त्यांच्याकडेच गेलो होतो सर पण.. पण त्या नोकराने सरळ हात वर केले.८५० रुपये सुजाताने दिलेच नव्हते म्हणाला. मालकांनी दमात घेतल्यावर पॅन्टचे खिसे उलटे करून दाखवू लागला. रडून भेकून कांगावा सुरू केलान्”

“म्हणून तुम्ही मिस डिसोझांना फोन केलात? ती चूक कॅश काउंटिंगमधल्या चुकीपेक्षाही जास्त गंभीर होती सुहास..” कशी ते मी त्यांना समजावून सांगितलं. तिथं मी गेल्यावर जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ऐकताना सुजाताची मान शरमेने खाली गेली होती‌. तिचे डोळे भरून आले होते. ती असहाय्यपणे उठली. थोडी रेंगाळली. मग केबिनचं दार ढकलून जड पावलांनी बाहेर गेली. पुन्हा आत आली आणि मुठीत घट्ट आवळून धरलेली शंभर रुपयांची नोट माझ्यापुढे करून उभी राहिली.

“सर”.. तिचा आवाज भरून आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरंतर ते मी  भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. पण आता दर महिन्याला असे थोडे थोडे करून मी ते परत करणाराय सर”.

मी मनातून थोडासा हललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं.

नकळत घडत गेलेल्या प्रसंगांच्या या दीर्घ मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत काढली. तिने पैसे परत करायची आवश्यकता नाहीय हे तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. माझे म्हणणं नाईलाजाने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं या सगळ्याच प्रकरणाला मी अतिशय योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. पण तो पूर्णविराम नव्हता तर अर्धविराम होता हे मला खूप नंतर समजलं. कारण प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगाचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या एका अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी मला तरी कुठे ज्ञात होतं?

क्रमश:.. 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.

ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.

तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली  न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.

” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.

–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.

आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी  बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.

आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.

आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 

बाबा …  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..

तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!

आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

{सर्व बाबा लोकांना समर्पित.}

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?
☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित 

आपल्या मेंदूचे उजवा आणि डावा असे दोन भाग असतात. उजव्या मेंदूचे काम सर्जनशीलता,  कला, अंतर्ज्ञान. डाव्या मेंदूचे काम कारणमिमांसा, निर्णयक्षमता, गणित, शास्त्र, पृथक्करण, भाषा, तर्क, आणि रोजचे पूर्ण रुटीन. 

फक्त लहानपणीची काही वर्षे आपला उजवा मेंदू काम करतो, नंतर त्याचे काम करणे हळूहळू बंद होते.संगीत ऐकल्यामुळे उजव्या मेंदूतील १७ केंद्रे ऍक्टिव्हेट होतात. संगीतोपचार म्हणजे ” उजव्या मेंदूचे अभ्यंगस्नान “. 

संगीत उपचारांमध्ये संगीत हे माध्यम असते.

आपल्या शरीरातील एकूण एनर्जीच्या २५ टक्के एनर्जी मेंदूला आवश्यक असते. बाकी  शरीरासाठी आपण पौष्टिक आहार घेतो, व्यायाम करतो, परंतु शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी जबाबदार असलेल्या मेंदूसाठी अक्षरशः काहीच करत नाही. 

संगीत उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपण कमी जास्त प्रमाणात डाव्या मेंदूच्या अधिपत्याखाली असतो. संगीतोपचारामुळे मेंदूच्या उजव्या भागातील केंद्र ऍक्टिव्हेट केली जातात जे खूप जरुरी आहे. म्हणून रोज वीस मिनिटे तरी संगीत ऐकावे. संगीताच्या माध्यमातून ब्रेन प्रोग्रामिंग होते, त्याप्रमाणे भावना बनतात.

संगीताचे फायदे… 

१) संप्रेषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल) सुधारते. 

२)  स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. संगीतामुळे मेमरी स्ट्रॉंग होते, विशिष्ट संगीताच्या साह्याने त्या वेळची परिस्थिती     आठवते.

३) एकाग्रता वाढते. 

४) रागावर नियंत्रण ठेवता येते. 

५) शारीरिक वेदनांवर नियंत्रण ठेवता येते. 

६) ताण तणावावर नियंत्रण ठेवता येते. 

७) स्ट्रेस हार्मोनची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते…. वाद्य वाजवताना बोटांच्या हालचाली मेंदूसाठी उत्तम असतात.

गाणे म्हणणे का जरुरी आहे —- संगीताचा उगम कला म्हणून झाला नसून, भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी झाला आहे. ५ टक्के लोक संगीत तयार करतात व ९५ टक्के लोक त्याचा आनंद घेतात. हे कला म्हणून ठीक आहे. आपल्याला लोक नावे ठेवतील ही गोष्ट मनातून काढून टाकून प्रत्येकाने फ्रीली येईल तसे गायले पाहिजे. 

ओरिजिनल गाणे ऐकून तेच गाणे स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करणे, या प्रयत्नाला आपला मेंदू सर्वात जास्त सकारात्मक प्रतिसाद देतो. मोठ्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, तर लहान मुले व तरुण मंडळी सुध्दा गाण्याचा प्रयत्न करतील व त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच होईल.. पटकन मूड चेंज होण्यासाठी तरुण वयात आपण जी गाणी ऐकत होतो, त्याच पद्धतीची किंवा तीच गाणी ऐकावीत. संगीताचा कोणताही साईड इफेक्ट नाही. 

संगीत हे मानवासाठी वरदानच आहे…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 29 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 29 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४६.

मला भेटण्यासाठी केव्हापासून

तू माझ्याकडं यायला निघाला आहेस

तुझा सूर्य, तुझे तारे

माझ्यापासून तुला लपवू शकणार नाहीत

याची मला खात्री आहे.

 

तुझा पदरव सकाळ-संध्याकाळ मला ऐकू येतो.

तुझं गुपित तुझ्या दूतानं

माझ्या काना -मनात सांगून ठेवलंय.

 

आज माझं जीवन सर्वस्वी जागृत झालंय

आनंदाची एक क्षीण भावना

माझ्या ऱ्हदयातून स्फुरते आहे.

काम बंद करायची वेळ झाली असं वाटतं.

हवेत पसरलेल्या तुझ्या

मधुर अस्तित्वाचा मंद सुगंध मला जाणवतो आहे.

 

४७.

त्याची वाट पाहण्यात जवळजवळ

सारी रात्र वाया गेली.

 

थकून भागून रामप्रहरी मला डुलकी लागेल,

तेव्हा तो येईल अशी मला भिती वाटते.

 

मित्रांनो! त्याला अडवू नका,मना करू नका.

त्याच्या पदरवानं मला जाग आली नाही तर,

कृपा करा आणि मला उठवू नका.

 

पाखरांच्या कलकलाटानं तसंच

प्रांत:कालीन प्रकाश महोत्सवाच्या,

वाऱ्याच्या कल्लोळानं मला जाग यायला नको.

 

माझ्या दाराशी माझे स्वामी अचानक आले

तरी मला झोपू दे

त्यांच्या स्पर्शानेच मला जाग येऊ दे.

 

अंधकारमय निद्रेत पडणाऱ्या स्वप्नातून

तो येईल तेव्हा त्याच्या हास्य किरणांनी

मला जाग यावी,

पापण्या उघडताच तो समोर दिसावा,

प्रथम प्रकाशाच्या किरणात आणि आकारात

तो मला दिसावा.

माझ्या जागृत आत्म्याचा प्रथम आनंद आविष्कार

त्याच्या नजरेत मला दिसावा.

 

अशा वेळी माझे पुनरागमन

त्याच्या येण्यातच व्हावे.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #159 ☆ कहानी – एटिकेट ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय कहानी  ‘एटिकेट ’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 159 ☆

☆ कहानी – एटिकेट

गौरी के सामने वाले मकान में नये किरायेदार आ गये हैं। युवा पति-पत्नी और बूढ़ी माँ। दो छोटे बच्चे हैं, दोनों बेटे। बड़ा चार पाँच साल का होगा और छोटा ढाई तीन का। गौरी का मन बार-बार उस घर में जाने के लिए उझकता है। संबंध बनाने और निभाने की उसे आदत है। नये लोगों के प्रति मन में उत्सुकता है। लेकिन उसकी आदत छिद्रान्वेषण या निन्दा-पुराण की नहीं है। अभी तक पड़ोसियों से उसके संबंध प्रेम और मैत्री के रहे हैं और शहर छोड़ देने के बाद भी गौरी से उनका प्रेम-सूत्र अक्षत रहता है।
जल्दी ही पता चल गया कि सामने वाले दंपति सक्सेना हैं। बड़े लड़के का घर का नाम पिंटू और छोटे का गोलू है। बच्चे सुन्दर और प्यारे हैं। गौरी का उस परिवार से खाने-पीने की चीज़ों के आदान-प्रदान का सिलसिला चल पड़ा है।

उनका छोटा बेटा गोलू खूब नटखट और चंचल है। माँ-बाप ने अभी से उसे किसी नर्सरी में डाल दिया है। सवेरे से स्कूल की ड्रेस में सज-धज कर नेकर की जेबों में हाथ डाले गेट के सामने घूमता है तो बहुत भला लगता है। स्कूल जाने के नाम पर रोता नहीं, खुश खुश चला जाता है।

गोलू खूब सवेरे उठकर बाहर आ जाता है। घर के गेट का ‘लैच’ ऊपर से बन्द रहता है, लेकिन उसे खोलने की तरकीब उसने ढूँढ़ ली है। बन्दर की तरह गेट पर चढ़कर वह ‘लैच’ को पलट देता है और फिर उतरकर धक्का मारकर गेट को खोल देता है। इसके बाद जिधर मुँह घूम जाए, चल देता है। माँ-बाप जब बाहर आकर देखते हैं तो या तो पास के किसी घर के सामने रेत के ढेर पर खेलता मिलता है या फिर किसी पिल्ले को चूमते-चाटते। मुहल्ले में लोग उसे जानने लगे हैं, इसलिए कभी लंबा निकल जाए तो कोई न कोई हाथ पकड़ कर घर तक छोड़ जाता है।

गौरी का बेटा टीनू पाँच साल का है।एक दिन गोलू टीनू के पीछे पीछे गौरी के घर में दाखिल हो गया। वैसे भी वह फक्कड़ और मनमौजी है। किसी भी घर में घुसकर वहाँ खेलकूद में मस्त हो जाने में उसे कोई दिक्कत नहीं होती। जब भूख या नींद लगती है तभी उसे घर की याद आती है।

गौरी के घर में आकर भी वह टीनू के खिलौनों की छीन-झपट में लग गया। टीनू को अपने खिलौनों से मोह है, किसी को देने में तकलीफ होती है। इसलिए थोड़ी देर खूब हंगामा हुआ। टीनू खिलौनों को अपनी तरफ खींचता था तो गोलू अपनी तरफ। खिलौनों को हाथ आते न देख गोलू ने चिल्ला चिल्ला कर रोना शुरू कर दिया। गौरी ने आकर टीनू को समझाया और गोलू को खिलौने दिलवाये। गोलू खिलौने समेटकर एक कोने में जम गया और दीन-दुनिया को भूल कर खेलने में व्यस्त हो गया।

तब से गौरी के घर में गोलू के आने का सिलसिला शुरू हो गया। वह खिलौने लेकर एक तरफ जम जाता और फिर घर-द्वार भूल जाता। माँ आवाज़ देती तो कहता, ‘अबी नईं आयेंगे’ या ‘थोला लुको, आते हैं।’ माँ बुला बुला कर परेशान हो जाती, लेकिन उस पर कोई असर न होता। अन्ततः गौरी ही उसे समझा-बुझा कर घर भेजती।

घर जाते वक्त वह किसी खिलौने को कंधे से चिपका कर चल देता। फिर उसके और टीनू के बीच खींचतान और हंगामा होता। गौरी टीनू को समझा-बुझा कर खिलौना उसे दे देती, कहती, ‘सवेरे वापस आ जाएगा।’ सवेरे तक गोलू की माँ खिलौना लौटा जाती, तब टीनू को संतोष होता।

आज की संस्कृति के हिसाब से गोलू एकदम नासमझ था। टीनू कुछ खाने को मेज़ पर बैठता तो वह भी बगल की कुर्सी पर जम जाता, कहता, ‘हमें भी दो। हम भी खायेंगे।’ एक बार लेने पर मन न भरता तो कहता, ‘औल दो। खतम हो गया।’ टीनू हँसता। उसे गोलू की बातें अजीब लगती थीं। उसे स्कूल और घर में ‘एटीकेट’ की शिक्षा दी गयी थी। उसे सिखाया गया था कि चीज़ों की माँग सिर्फ अपने घर में करनी है। दूसरे घर में कोई दे तब भी ‘थैंक यू’ कह कर मना कर देना है। उस घर के लोग खाने पीने के लिए बैठने लगें तो धीरे से खिसक लेना है। लेकिन गोलू अभी शिक्षित नहीं है। नादान और भोला है। अभी उस पर नयी तालीम और तहज़ीब का असर नहीं है।

बाहर पॉपकॉर्न बेचने वाला आवाज़ लगाता है तो टीनू की फरमाइश पर गौरी खरीदने जाती है। तभी सामने से गोलू प्रकट हो जाते हैं। कहते हैं— ‘हमें भी।’ जब तक उनके माँ या बाप बाहर निकलते हैं तब तक वे पॉपकॉर्न का पैकेट लेकर चल देते हैं। यही हाल गुब्बारे वाले के आने पर होता है। टीनू को गुब्बारे अच्छे लगते हैं लेकिन खरीदते वक्त अपना हिस्सा लेने के लिए गोलू हाज़िर हो जाते हैं। गुब्बारा देने में थोड़ी भी टालमटोल हो तो वहीं हाहाकार शुरू हो जाता है। उसकी फरमाइशों पर गौरी को भी मज़ा आता है।

कई बार गोलू की माँ संकोच में पड़ जाती है लेकिन गौरी उन्हें समझा देती है। कहती है, ‘वह अपना अधिकार समझ कर माँगता है। उसके मन में भेद नहीं है, न वह तेरा-मेरा जानता है। आप खामखाँ परेशान होती हैं।’

कुछ दिनों से गोलू का आना कम हो गया है। शायद उसे कोई और अड्डा मिल गया है। वैसे बीच की सड़क पर अब भी वह खेलता या कहीं भी आराम से टाँगें पसारकर अपने में मशगूल दिख जाता है। उसका स्कूल जाना बदस्तूर ज़ारी है।

एक दिन गोलू की माँ गप-गोष्ठी के इरादे से गौरी के घर आ गयी। पीछे पीछे गोलू था। पहले से थोड़ा बड़ा और शान्त हो गया था। आने पर उसने पहले की तरह खिलौनों की तरफ ताक- झाँक नहीं की। अच्छे बच्चों की तरह शान्त कुर्सी पर बैठा रहा।

थोड़ी देर में गौरी फ्रिज खोल कर उसके लिए चॉकलेट ले आयी। उसकी तरफ बढ़ा कर बोली, ‘लो बेटे।’

गोलू ने अपने हाथ पीछे बाँध लिये, माँ की तरफ देख कर बोला, ‘नईं।’

गौरी को आश्चर्य हुआ, कहा, ‘क्या नखरा करता है! ले ले।’

गोलू ने चॉकलेट की तरफ और फिर माँ की तरफ देखा, फिर वैसे ही हाथ पीछे किये हुए बोला, ‘नईं, हम नईं लेंगे।’

उसकी माँ ने कहा, ‘ले ले बेटे, आंटी दे रही हैं।’

गोलू ने धीरे-धीरे हाथ बढ़ाकर चॉकलेट ले ली, फिर कहा, ‘थैंक यू, आंटी।’

उसकी माँ का चेहरा गर्व से दीप्त हो गया। बोलीं, ‘स्कूल में सिखाया है। अब पहले जैसे नहीं करता। कोई कुछ देता है तो मना कर देता है। ‘थैंक यू’ कहना भी सीख गया है।’
गौरी गोलू का मुँह देखती रह गयी। उसे लगा एक और बच्चा ईश्वर की दुनिया से निकल कर आदमी की दुनिया में दाखिल हो गया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 109 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 110 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 110) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media# 110 ?

रात क्या होती है

हमसे पूछिए ना

आप तो सोये और…

बस सुबह हो गई…

What is the night,

just ask me,

You just sleep

and it’s morning…

☆☆☆☆☆

तलब करें तो मैं अपनी

आँखें भी उन्हें दे दूँ ,

मगर लोग तो मेरी आँखों

के  ख़्वाब  माँगते  हैं…

If you desire, I’m willing

to give my eyes to them,

but people ask for the

dreams of my eyes…

☆☆☆☆☆

मैं अभी से किस तरह से

उसको  बेवफ़ा  कहूँ,

बात तो मंज़िलों की है

रास्ते में क्या बयां करूं…

How can I just call her

unfaithful now itself,

It’s a matter of destination,

why to comment while enroute…!

☆☆☆☆☆

जलते सूरज ने गुरूर से कहा,

है क्या कोई मेरे जैसा…

तभी एक नन्हा सा दीया बोला,

जब शाम होगी तब देखेंगे…!

The burning sun said proudly,

Is there anyone like me…

Then a small lamp said,

We’ll see when it is evening!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 156 ☆ मेरी भाषा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ आपदां अपहर्तारं ☆

आज की साधना

समूह को कुछ दिनों का अवकाश रहेगा।

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

☆  संजय उवाच # 156 ☆ मेरी भाषा ?

भाषा सभ्यता को संस्कारित करने वाली वीणा एवं संस्कृति को शब्द देनेवाली वाणी है। कूटनीति का एक सूत्र कहता है कि किसी भी राष्ट्र की सभ्यता और संस्कृति नष्ट करनी हो तो उसकी भाषा नष्ट कर दीजिए। इस सूत्र को भारत पर शासन करने वाले विदेशियों ने भली भाँति समझा और संस्कृत जैसी समृद्ध और संस्कृतिवाणी को हाशिए पर कर अपने-अपने इलाके की भाषाएँ लादने की कोशिश की।

असली मुद्दा स्वाधीनता के बाद का है। राष्ट्रभाषा को स्थान दिये बिना राष्ट्र के अस्तित्व और सांस्कृतिक अस्मिता को परिभाषित करने की  प्रवृत्ति के परिणाम भी विस्फोटक रहे हैं।

यूरोपीय भाषा समूह के प्रयोग से ‘कॉन्वेंट एजुकेटेड’ पीढ़ी, भारतीय भाषा समूह के अनेक  अक्षरों का उच्चारण नहीं कर पाती। ‘ड़’, ‘ण’  अप्रासंगिक होते जा रहे हैं। ‘पूर्ण’, पूर्न हो चला है, ‘शर्म ’ और ‘श्रम’ में एकाकार हो गया है। हृस्व और दीर्घ मात्राओं के अंतर का निरंतर होता क्षय, अर्थ का अनर्थ कर रहा है। ‘लुटना’ और ‘लूटना’ एक ही हो गये हैं। विदेशियों द्वारा की गई ‘लूट’ को ‘लुटना’ मानकर हम अपनी लुटिया डुबोने में अभिभूत हो रहे हैं।

लिपि नये संकट से गुजर रही है। इंटरनेट खास तौर पर फेसबुक, ट्विटर, वॉट्सएप पर देवनागरी को रोमन में लिखने का चलन भी है। ‘बड़बड़’ के लिए barbar/ badbad  (बर्बर या बारबर या बार-बार) लिखा जा रहा है। ‘करता’, ‘कराता’, ‘कर्ता’ में फर्क कर पाना भी संभव नहीं रहा है। जैसे-जैसे पीढ़ी पेपरलेस हो रही है, स्क्रिप्टलेस भी होती जा रही है।

संसर्गजन्य संवेदनहीनता, थोथे दंभवाला कृत्रिम मनुष्य तैयार कर रही है। कृत्रिमता की  पराकाष्ठा है कि मातृभाषा या हिंदी न बोल पाने पर व्यक्ति संकोच अनुभव नहीं करता पर अंग्रेजी न जानने पर उसकी आँखें स्वयंमेव नीची हो जाती हैं। शर्म से गड़ी इन आँखों को देखकर मैकाले और उसके वैचारिक वंशजों की आँखों में विजय के अभिमान का जो भाव उठता होगा, ग्यारह अक्षौहिणी सेना को परास्त कर वैसा भाव पांडवों की आँखों में भी न उठा होगा।

हिंदी पखवाड़ा, सप्ताह या दिवस मना लेने भर से हिंदी के प्रति भारतीय नागरिक के कर्तव्य  की इतिश्री नहीं हो जाती। आवश्यक है कि नागरिक अपने भाषाई अधिकार के प्रति जागरुक हों। समय की मांग है कि हिंदी और सभी भारतीय भाषाएँ एकसाथ आएँ।

बीते सात दशकों में पहली बार भाषा नीति को लेकर  वर्तमान केंद्र सरकार संवेदनशील और सक्रिय दिखाई दे रही है। राष्ट्र और राष्ट्रीयता, भारत और भारतीयता के पक्ष में स्वयं प्रधानमंत्री ने पहल की है। नयी शिक्षा नीति में भारत सरकार ने पहली बार प्राथमिक शिक्षा मातृभाषा में देने को प्रधानता दी है। तकनीकी शिक्षा के क्षेत्र में भी भारतीय भाषाओं का प्रवेश हो चुका है,  यह सराहनीय है।

केदारनाथ सिंह जी की प्रसिद्ध कविता है, जिसमें वे कहते हैं,

जैसे चींटियाँ लौटती हैं/ बिलों में,

कठफोड़वा लौटता है/ काठ के पास,

वायुयान लौटते हैं/ एक के बाद एक,

लाल आसमान में डैने पसारे हुए/

हवाई-अड्डे की ओर/

ओ मेरी भाषा/ मैं लौटता हूँ तुम में,

जब चुप रहते-रहते/

अकड़ जाती है मेरी जीभ/

दुखने लगती है/ मेरी आत्मा..!

अपनी भाषाओं के अरुणोदय की संभावनाएँ तो बन रही हैं। नागरिकों से अपेक्षित है कि वे इस अरुण की रश्मियाँ बनें।

 © संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी   ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 108 ☆ अभियंता दिवस विशेष : हम अभियंता… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित अभियंता दिवस विशेष : हम अभियंता…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 108 ☆ 

☆ अभियंता दिवस विशेष : हम अभियंता… ☆

(छंद : हरिगीतिका)

*

हम अभियंता!, हम अभियंता!!

मानवता के भाग्य-नियंता…

*

माटी से मूरत गढ़ते हैं,

कंकर को शंकर करते हैं.

वामन से संकल्पित पग धर,

हिमगिरि को बौना करते हैं.

नियति-नटी के शिलालेख पर

अदिख लिखा जो वह पढ़ते हैं.

असफलता का फ्रेम बनाकर,

चित्र सफलता का मढ़ते हैं.

श्रम-कोशिश दो हाथ हमारे-

फिर भविष्य की क्यों हो चिंता…

*

अनिल, अनल, भू, सलिल, गगन हम,

पंचतत्व औजार हमारे.

राष्ट्र, विश्व, मानव-उन्नति हित,

तन, मन, शक्ति, समय, धन वारे.

वर्तमान, गत-आगत नत है,

तकनीकों ने रूप निखारे.

निराकार साकार हो रहे,

अपने सपने सतत सँवारे.

साथ हमारे रहना चाहे,

भू पर उतर स्वयं भगवंता…

*

भवन, सड़क, पुल, यंत्र बनाते,

ऊसर में फसलें उपजाते.

हमीं विश्वकर्मा विधि-वंशज.

मंगल पर पद-चिन्ह बनाते.

प्रकृति-पुत्र हैं, नियति-नटी की,

आँखों से हम आँख मिलाते.

हरि सम हर हर आपद-विपदा,

गरल पचा अमृत बरसाते.

‘सलिल’ स्नेह नर्मदा निनादित,

ऊर्जा-पुंज अनादि-अनंता…

*

अभियांत्रिकी:

कण जोड़ती तृण तोड़ती पथ मोड़ती अभियांत्रिकी

बढ़ती चले चढ़ती चले गढ़ती चले अभियांत्रिकी

उगती रहे पलती रहे खिलती रहे अभियांत्रिकी

रचती रहे बसती रहे सजती रहे अभियांत्रिकी।

*

तकनीक:

नवरीत भी, नवगीत भी, संगीत भी तकनीक है 

कुछ प्यार है, कुछ हार है, कुछ जीत भी तकनीक है 

गणना नयी, रचना नयी, अव्यतीत भी तकनीक है 

श्रम-मंत्र है, नव यंत्र है, सुपुनीत भी तकनीक है 

*

भारत :

यह देश भारत वर्ष है, इस पर हमें अभिमान है 

कर दें सभी मिल देश का, निर्माण नव अभियान है 

गुणयुक्त हो अभियांत्रिकी, शर्म-कोशिशों का गान है 

परियोजना त्रुटिमुक्त हो, दुनिया कहे प्रतिमान है

*

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print